
मेमू म्हणजे “मुख्य मार्ग विद्युत बहू एकक”. शहरी व उपनगरी भागांना जोडणाऱ्या सामान्य ईएमयू गाड्यांच्या तुलनेत भारतीय रेल्वेवर, एमईएमयू ही विद्युत बहू एकक (ईएमयू) गाड्या आहेत ज्या भारतात लघु आणि मध्यम-अंतरांच्या मार्गावरचालविल्या जातात. ह्या गाड्या ओव्हरहेड तारांमधून २५ किलोव्होल्ट प्रत्यावर्ती धारा वापरून चालविण्यात येतात.
या गाड्या पूर्व घाट व पश्चिम घाट दरम्यान २०० किमी (१२० मैल) पर्यंत गतीवर धावू शकतात. रेकची जास्तीत जास्त अनुमत गती रुंदमापी रुळांवर १०५ किमी/ता (६५ मैल/तास) आहे. मोटरकोच डीसी कर्षण मोटर वापरतात. २०१७ मध्ये, आयसीएफने १६०० एचपी मेधा डेमू वास्तुकलावर आधारित एलएचबी हायब्रीड एसी-एसी मेमू रेक रवाना केले. हे रेक असंकालिक कर्षण मोटर वापरतात आणि त्यांची कमाल संकल्पित गती ११०किमी / ता आहे. हे निष्कलंक स्टीलचे डब्बे असतात. त्यापैकी दोन दक्षिण मध्य रेल्वेवर कार्यरत आहेत .
इंटिग्रल कोच फॅक्टरीने ११०-१३० किमी / ता वर धावण्यास सक्षम नवीन मेमू सुरू केले. प्रति युनिट निर्माणाची किंमत २६ कोटी रुपये असून ते २,६१८ प्रवासी वाहवून नेऊ शकतात. या ट्रेनमध्ये तीन फेज कर्षण मोटर आहे आणि २५ किलोवोल्ट करंटवर चालते जी ३५% उर्जा वाचवते. यात जीपीएस- आधारित प्रवासी माहिती प्रणाली आणि कोचमध्ये घोषणा प्रणाली उपलब्ध आहे. यात डबल लीफ स्लाइडिंग दरवाजे, गँगवे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि अॅल्युमिनियम सामान रॅक आहेत.चालकाच्या केबिनमध्ये एसी असून प्रशिक्षकामध्ये आपत्कालीन संप्रेषणाची सुविधा आहे. या गाड्या उत्तर प्रदेशात २००–३०० किमी (१२०–१९० मैल) अंतर असेलेल्या शहरांमध्ये चालण्यासाठी संकल्पित केलेल्या आह. ही सेवा फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू होऊ शकेल.
१९९ ० च्या दशकात भारतीय रेल्वेने १० फूट ८ इंच (३,२५० मिमी) रुंदीचे मेमू यान बांधले. १५ जुलै १९९५ रोजी आसनसोल – आद्रा विभाग आणि २२ जुलै १९९५ रोजी खडगपूर – टाटा विभागात यांची सेवा सुरू झाली. १७ ऑक्टोबर १९९५ रोजी रायपूर – दुर्ग – भाटापारा – रायपूर – बिलासपूर मार्गावर मेमू सेवेचे प्रारंभ झाला. २०१७ मध्ये प्रथम २० डब्ब्यांची मेमू सूरत ते विरार दरम्यान धावले. २०१८ मध्ये, इंटिग्रल कोच फॅक्टरीने ११०–१३० किमी/ता (६८–८१ मैल/तास) गतीवर धावण्यास सक्षम नवीन मेमूची सुरुवात केली
भारतीय रेल्वे हळूहळू सर्व लोहायंत्राने ओढलेल्या मंद आणि वेगवान प्रवासी आणि अंतर शहरी ट्रेनच्या जागी ईएमयू सेवा सुरू करत आहे. श्रेणीसुधारित केलेल्या गाड्यांना पुन्हा मेमू म्हणून चालविल्या केले जाते.
साभार – विकिपीडिया
अतिवृष्टी झाल्याने पावसाळ्यात पूरस्थिती होते. आजूबाजूच्या परिसरात पाणी साचायला सुरू झाले की प्राणी आपल्यासाठी सुरक्षित आसरा शोधायला सुरवात करतात आणि हा आसरा तुमचे घर पण असू शकते. आपल्यासाठी धोकादायक गोष्ट म्हणजे या प्राण्यांमध्ये आजूबाजूचे विषारी साप पण असू शकतात. याशिवाय पुराच्या पाण्यात पण साप वाहून येतात व घरात शिरू शकतात.
ह्या गोष्टीवर खबरदारी म्हणजे ह्या सापांविषयी संपूर्ण माहिती असणे. त्यासाठी आम्ही ह्या पोस्ट सोबत एक pdf स्वरुपात पुस्तिका जोडत आहोत. “उपाय” बहुद्देशीय संस्थेने ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. विषारी आणि बिनविषारी साप कसे ओळखायचे, अगदी सारखे दिसणाऱ्या सापाच्या जाती कोणत्या, सर्पदंश झाल्यावर कोणते प्रथमोपचार करावे. सर्पदंश टाळण्यासाठी कोणती सावधगिरी बाळगायची याबद्दल माहिती दिली आहे.
हि पोस्ट शेयर करा म्हणजे ह्या माहितीने अनेकांचे जीव वाचू शकतील.
आपल्या आजच्या जीवनशैलीने निसर्गाची अपरिमित हानी झाली आहे. ह्या हानीमुळे होणारे परिणाम दिसू लागले आहेत. आज लोकांची कमी होणारी रोगप्रतिकारक शक्ति आणि त्याचे एखाद्या आजाराला बळी पडणे हे चित्र आजकाल दिसत आहे. कोरोना काळात तर परिस्थिती खूपच गंभीर झाली होती. ह्या सर्वातून एक शिकवण मिळाली की आरोग्यासाठी निसर्गाला पर्याय नाहीच. आणि लोकाना खरच वाटू लागले की आपण निसर्ग संवर्धनासाठी काही तरी केलेच पाहिजे.
तुम्हाला निसर्गासाठी काहीतरी करावेसे वाटत असेल तर ईथे तुम्हाला आम्ही लहानशी मदत करू शकतो.
ऑयकॉस फॉर इकॉलॉजिकल सर्विसेस, पुणे ही संस्था २००२ पासून निसर्ग संवर्धन – पुनर्जीवन, जीविधीता संवर्धन, निसर्ग शिक्षण, पर्यावरण जागृती क्षेत्रात कार्यरत आहे. ह्या संस्थेच्या मानसी करंदीकर आणि केतकी घाटे यांनी कोरोना काळात 21 Prospects For Nature ह्या पुस्तिकेचे मराठीतून तसेच इंग्लिश मधून लिखाण केले आहे. त्यांनी ह्या पुस्तकात निसर्ग संवर्धनासाठी २१ कृती सांगितल्या आहेत ज्या आपण आपल्या दैनंदिन जीवनात शहरात राहून सुद्धा करू शकतो.
पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग म्हणजेच आजचा सिंधुदुर्ग जिल्हा होय. या प्रदेशाला ‘मालवणी मुलुख’ अशी स्वतंत्र ओळख प्राप्त झाली आहे.मालवणच्या कुरटे बेटावर भर सागरात छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग या जलदुर्गामुळे १ मे १९८१ रोजी या दक्षिण कोकणाला ‘सिंधुदुर्ग जिल्हा’ हे स्वतंत्र बाणेदार नाव प्राप्त झाले.
सुमारे ५२१९ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ, १२१ किलोमीटर सागर किनारा या जिल्ह्याला लाभला आहे. संपूर्ण साक्षर असलेल्या या जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे नऊ लाख आहे. देवगड, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी व दोडामार्ग असे आठ तालुके असलेल्या या जिल्ह्याला समृद्ध निसर्ग संपदा लाभली आहे. जलश्री, वनश्री व शैलश्री या तिन्हींचा जणू अपूर्व संगमच येथे पहायला मिळतो.
उत्तरेला विजयदुर्गाची खाडा आणि दक्षिणेला तेरेखोलची खाडी, पश्चिमेचा अथांग सिंधुसागर तर पूर्वेला उत्तुंग सह्याद्रीचे कडे – दऱ्या आणि डोंगर. सागर सह्याद्रीच्या मधल्या भागात लालमातीचा हा मुलुख साहित्य, संगीत, नृत्य, लोककला, शिल्प या क्षेत्रात खूप आघाडीवर आहे.
लालमाती, काळीभोर कातळे, जांभा खडक, नारळ- पोफळी, आंबा, काजू, फणस यांच्या सदाहरित बागा, हिरवेगार भात फळे, पावसाळ्यात दुथडी भरुन वाहणाऱ्या नद्या, प्रत्येक गावात एकापेक्षा एक अधिक घनदाट देवराया, त्याच्यासोबत माऊली सातेरी, भूमिका, पावणाई, रवळनाथ, वेतोबा इ. देवतांची विस्तीर्ण सभामंडप असलेली भक्ती, शांती व समाधान प्राप्त करुन देणारी मंदिरे, खास प्राचीन बारा-पाचाची देवस्थान पध्दती, दशावतार ही उत्स्फूर्त नाट्याविष्कार दाखवणारी लोककला, हौशी मराठी रंगभूमीचे माहेर आणि फक्त जिल्ह्यापूरती खास ठसकेबाज, नादमधूर, चिमटे काढीत पण समोरच्याच्या हृदयाचा ठाव घेणारी ‘मालवणी’ बोली. ही या प्रदेशाची स्वतंत्र ओळख आहे.
तुम्हाला फणसांचे – आंब्यांचे शेकडो प्रकारचे स्वाद चाखायचे असतील, कोकम रस, सोलकढी, अप्रतिम शाकाहारी भोजन तसेच असंख्य प्रकारचे चवदार स्वाद प्राप्त झालेले ‘मत्साहारी’ भोजन हवे असेल तर ‘मालवणी मुलुखाला’ महाराष्ट्रात दुसरा पर्याय नाही. वडे – सागोती, तिखला, पापलेट, सरंगा, माशांची कडी, सांबारे, भाजी – पाव – उसळ, कांदाभजी, शेवकांडे किंवा चिरमुऱ्याचे लाडू , जत्रेतले गोड खाजे, ग्रामीण भागात मिळणारी खोबऱ्याची कापे, एवढेच काय जांभुळ, करवंदे, हसोळी, नीव, जगमे – चाफरे, ओवळधोडे, चार भाजलेल्या किंवा उकडलेल्या आठल्या (फणस बिया) चिनी, कणग्या, कारंदे हा सारा रानमेवा व त्यांचा अनोखा स्वाद घ्यायचा असेल, ओल्या काजूगरांचा गुळ – खोबरं घातलेला ‘मोवला’, काळ्या वाटाण्याची उसळ, आंबोळी, गरमागरम उकडा भात व सोबत रसदार फजाव, वालीचे झणझणीत सांबारे यांची चव हवी असेल तर या प्रदेशात वेगवेगळ्या ऋतूत यावे लागेल.
सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रांगणा, पारगड, मनोहर मनसंतोषगड यासारखे २९ गड – किल्ले, आंबोली थंड हवेचे ठिकाण, श्रीसंत सोहिरोबा, साटम महाराज, टेंबे स्वामी, राऊळ महाराज, भालचंद्र महाराज अशा संत महंतांचे मठ, असंख्य साहित्यिक कवी, कलावंतांची घरे-गावे, कुडोपी, हिवाळे, बुधवळे परिसरातील अत्यंत प्राचीन कातळशिल्पे, नेरुर-वालावल-पेंडूरचा अनोखा निसर्ग,पेंडूरचे प्राचीन जैन मंदिर, मठगाव आणि वेतोरे येथील प्राचीन शिलालेख, वेंगुर्ले येथील ‘डचवखार’ दाभोलीचे ‘कुडाळदेशकर मठसंस्थान’, बांदा येथील बैल -रेडे घुमट, सावंतवाडीची रंगीत खेळणी, मोती तलाव, नरेंद्र डोंगर, धामापूरचा शांत – निरव तलाव, तिलारीचे मातीचे धरण, हत्तीचे वास्तव्य असलेला परिसर, पिंगुळीची ठाकर आदिवासीची लोककला, धनगरांचे ‘चपई नृत्य’, सावंतवाडीचे शिल्पग्राम, कुडाळ, कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील असंख्य प्रेक्षणीय स्थळे…
हे सारे मालवणी मुलखाचे बाह्यरुप झाले. तुम्हाला जर कष्टात, गरिबीत पण स्वाभिमानाने, रसिकतेने प्रत्येक गोष्टीत कलात्मक पध्दतीचा आविष्कार करीत स्वत:शी खूश असणारी, जराशी ओळख झाल्यावर भरभरुन बोलणारी आपल्या अजब जीवनकथा व चटका लावणाऱ्या व्यथा विशिष्ट हातवारे, अभिनय करीत उत्कट जीवन जगणारी माणसं पाहायची आहेत ? तर तुम्हाला येथे वारंवार यावे लागेल. कुणाही रसिक निसर्गप्रेमीला पुन्हा पुन्हा यावे असा मोह वाटेल असा हा निसर्गरम्य प्रदेश आहे.
साभार – “मालवणी लोकगीते” (प्रा.डॉ. बाळकृष्ण लळीत)
Content Protected! Please Share it instead.