Author Archives: Kokanai Digital

मुंबईत धावणार विना-वातानुकूलित ‘डोअर-क्लोजिंग’ लोकल; सुरक्षितता वाढली तरी अनेक आव्हाने समोर

   Follow us on        

मुंबई: मुंबईकरांच्या प्रवासात सुरक्षितता आणण्याच्या उद्देशाने देशातील पहिली विना-वातानुकूलित (Non-AC) पण स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल ट्रेन मुंबईत दाखल झाली आहे. कुर्ला कारशेडमध्ये पोहोचलेल्या या नव्या ट्रेनमध्ये अनेक आधुनिक बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन यात स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले आहेत, मात्र हेच दरवाजे उन्हाळ्यात ‘ओव्हन’सारखी परिस्थिती निर्माण करतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर उपाय म्हणून रेल्वेने खिडक्यांचा आकार दुपटीने वाढवला असून, ताशी १०,००० क्युबिक मीटर हवा खेळती ठेवणारे शक्तिशाली ब्लोअर्स प्रत्येक डब्यात बसवले आहेत.

​या नव्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी लेग-रूम वाढवण्यात आला असून सामानाचा कप्पाही सध्याच्या गाड्यांपेक्षा दुप्पट मोठा करण्यात आला आहे. तांत्रिकदृष्ट्या ही ट्रेन सहा-सहा डब्यांच्या दोन युनिट्समध्ये विभागलेली असून ती ‘वेस्टिब्युल’ (एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाता येणारी) पद्धतीची आहे. मात्र, महिला, अपंग आणि प्रथम श्रेणीच्या प्रवाशांची सुरक्षितता जपण्यासाठी डब्यांमध्ये अंतर्गत विभाजने (Partitions) कायम ठेवण्यात आली आहेत. प्रवाशांना पुरेशी हवा मिळावी यासाठी बंद दरवाजांना झरोके (Louvres) देण्यात आले आहेत.

​सुविधा असल्या तरी या ट्रेनबाबत काही आव्हानेही उभी ठाकली आहेत. स्वयंचलित दरवाजे उघडण्यास आणि बंद होण्यास लागणाऱ्या वेळेमुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होऊन गाड्यांना उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, या गाडीच्या डब्यांची रचना सध्याच्या गाड्यांपेक्षा वेगळी असल्यामुळे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची धावपळ होऊ शकते. प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यापूर्वी या ट्रेनची काही महिने तांत्रिक चाचणी घेतली जाणार आहे, त्यानंतरच ही ‘हाय-टेक’ लोकल मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईल.मुंबईकरांच्या प्रवासात सुरक्षितता आणण्याच्या उद्देशाने देशातील पहिली विना-वातानुकूलित (Non-AC) पण स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल ट्रेन मुंबईत दाखल झाली आहे. कुर्ला कारशेडमध्ये पोहोचलेल्या या नव्या ट्रेनमध्ये अनेक आधुनिक बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन यात स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले आहेत, मात्र हेच दरवाजे उन्हाळ्यात ‘ओव्हन’सारखी परिस्थिती निर्माण करतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर उपाय म्हणून रेल्वेने खिडक्यांचा आकार दुपटीने वाढवला असून, ताशी १०,००० क्युबिक मीटर हवा खेळती ठेवणारे शक्तिशाली ब्लोअर्स प्रत्येक डब्यात बसवले आहेत.

​या नव्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी लेग-रूम वाढवण्यात आला असून सामानाचा कप्पाही सध्याच्या गाड्यांपेक्षा दुप्पट मोठा करण्यात आला आहे. तांत्रिकदृष्ट्या ही ट्रेन सहा-सहा डब्यांच्या दोन युनिट्समध्ये विभागलेली असून ती ‘वेस्टिब्युल’ (एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाता येणारी) पद्धतीची आहे. मात्र, महिला, अपंग आणि प्रथम श्रेणीच्या प्रवाशांची सुरक्षितता जपण्यासाठी डब्यांमध्ये अंतर्गत विभाजने (Partitions) कायम ठेवण्यात आली आहेत. प्रवाशांना पुरेशी हवा मिळावी यासाठी बंद दरवाजांना झरोके (Louvres) देण्यात आले आहेत.

​सुविधा असल्या तरी या ट्रेनबाबत काही आव्हानेही उभी ठाकली आहेत. स्वयंचलित दरवाजे उघडण्यास आणि बंद होण्यास लागणाऱ्या वेळेमुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होऊन गाड्यांना उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, या गाडीच्या डब्यांची रचना सध्याच्या गाड्यांपेक्षा वेगळी असल्यामुळे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची धावपळ होऊ शकते. प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यापूर्वी या ट्रेनची काही महिने तांत्रिक चाचणी घेतली जाणार आहे, त्यानंतरच ही ‘हाय-टेक’ लोकल मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईल.

अवघ्या २० ते ३० किमी अंतरावर थांबे! मुंबईहून सुटणारी ही गाडी ‘वंदे भारत एक्सप्रेस’ आहे की ‘पॅसेंजर गाडी’?

   Follow us on        

मुंबई: पश्चिम रेल्वेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ‘वंदे भारत एक्स्प्रेस’च्या थांब्यांबाबत सध्या प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. विशेषतः गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमधील थांब्यांच्या संख्येतील तफावत पाहता, रेल्वे प्रशासन गुजरातवर अधिक मेहेरबान असल्याचे दिसून येते. २०९०१/०२ मुंबई सेंट्रल – अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेसची सुरुवात झाली तेव्हा ती केवळ अहमदाबाद, वडोदरा, सुरत आणि मुंबई सेंट्रल अशा प्रमुख स्थानकांवर थांबत होती. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच गुजरातमध्ये या गाडीला आणंद, नवसारी, वलसाड आणि वापी असे अनेक थांबे देण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, मार्च २०२५ ते ऑगस्ट २०२५ या अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत गुजरातमध्ये तीन नवीन थांबे वाढवण्यात आले, ज्यामुळे या गाडीचा ‘सुपरफास्ट’ दर्जा केवळ नावापुरता उरला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

​रेल्वेच्या या निर्णयातील विसंगती अधिक स्पष्ट होते जेव्हा आपण दोन स्थानकांमधील अंतर पाहतो. गुजरातमध्ये सुरत ते नवसारी हे अंतर केवळ २९ किमी आणि वापी ते वलसाड हे अंतर फक्त २६ किमी असतानाही तेथे थांबे देण्यात आले आहेत. याउलट, महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर वापी ते बोरीवली या १४० किमीच्या प्रदीर्घ अंतरात मागणी होऊनही एकाही नवीन थांब्याचा विचार करण्यात आलेला नाही. पालघर किंवा विरार सारख्या महत्त्वाच्या स्थानकांकडे झालेले हे दुर्लक्ष अन्यायकारक असल्याची भावना मराठी प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. एकाच रेल्वे मार्गावर एका राज्यासाठी नियमात शिथिलता आणि दुसऱ्या राज्यासाठी उपेक्षा, असा रेल्वेचा हा ‘दुजाभाव’ प्रवाशांच्या पचणी पडत नसल्याचे चित्र दिसत आहे.

Mumbai Goa Highway: मे महिन्याचीही डेडलाईन हुकणार?

   Follow us on        

मुंबई: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (NH66) काम पूर्ण करण्याबाबत नवीन आश्वासने दिली जात असली तरी, प्रत्यक्ष कामाची संथ गती आणि विलंबामुळे या प्रकल्पाच्या प्रगतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नुकत्याच सिंधुदुर्ग येथील एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा महामार्ग एका महिन्यात पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, स्थानिक निरीक्षणा प्रमाणे खरी परिस्थिती गडकरींच्या दाव्यापेक्षा पूर्णपणे वेगळी असल्याचे दिसून येत आहे.

​महामार्गावरील अनेक महत्त्वाचे टप्पे, उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि जोडणी रस्ते अजूनही अपूर्ण अवस्थेत आहेत. अधिकृत दावे आणि प्रत्यक्ष कामातील तफावत वाढत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. जाणकारांच्या मते, हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी किमान चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो. जर पावसाळ्यामुळे कामाचा वेग मंदावला, तर ही मुदत आणखी लांबू शकते. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा प्रवासासाठी चांगल्या रस्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी ही अनिश्चितता चिंतेचा विषय ठरत आहे.

​या महामार्गाला यापूर्वीही भूसंपादन, तांत्रिक अडचणी आणि अंमलबजावणीतील दिरंगाई यामुळे अनेकवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या काही पट्टे वाहतुकीसाठी खुले असले, तरी अनेक ठिकाणी खड्डे, वळणे आणि अर्धवट कामामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पावसाळा तोंडावर असल्याने उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. आता येणारे काही आठवडे हे ठरवतील की, हा बहुप्रतिक्षित महामार्ग खरोखरच पूर्ण होतो की प्रवाशांना पुन्हा एकदा विलंबाचा सामना करावा लागतो.

सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील डिजिटल कोच इंडिकेटर अवघ्या दोन महिन्यांत बंद

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या सावंतवाडी  येथे प्रवाशांच्या सुविधेसाठी बसवण्यात आलेले डिजिटल कोच इंडिकेटर अवघ्या दोन महिन्यांत  बंद पडले आहेत. मागील नऊ दिवसांपासून ही यंत्रणा पूर्णपणे बंद असल्याने प्रवाशांना आपला डबा शोधण्यासाठी पुन्हा एकदा धावपळ करावी लागत आहे.

​प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी फेब्रुवारी २०२६ मध्ये या स्थानकावर डिजिटल कोच इंडिकेटर बसवण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मोठ्या प्रतिक्षेनंतर ही यंत्रणा कार्यान्वित झाली, मात्र तंत्रज्ञानातील बिघाडामुळे अवघ्या दीड महिन्यातच ती निकामी झाली आहे. सध्या हे इंडिकेटर असून नसल्यासारखेच आहेत.

​स्थानकावरील ही महत्त्वाची सुविधा बंद असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यात सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी लक्ष घातले आहे. त्यांनी यासंदर्भात रत्नागिरी येथील RRM (प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक) कार्यालयात रीतसर तक्रार नोंदवली आहे.

​”रेल्वे प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून ही यंत्रणा उभारली आहे, मात्र तिची देखभाल व्यवस्थित होत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही यंत्रणा तात्काळ दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात यावी,” अशी मागणी मिहीर मठकर यांनी केली आहे.

​कोकण रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना कोच इंडिकेटर नसल्यामुळे मोठा फटका बसत आहे. ऐन गर्दीच्या वेळी गाडी आल्यावर डबा कुठे येईल हे समजत नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. आता रेल्वे प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन हे इंडिकेटर लवकरात लवकर सुरू करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संगमेश्वर रोड स्थानकावर ९ साप्ताहिक गाड्यांच्या थांब्यासाठी आग्रही मागणी

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरील ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी ९ महत्त्वाच्या साप्ताहिक गाड्यांना थांबा मिळावा, या मागणीसाठी ‘निसर्गरम्य चिपळूण’ आणि ‘निसर्गरम्य संगमेश्वर रेल्वे’ फेसबुक ग्रुपच्या वतीने रत्नागिरी येथे कोकण रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने कोकण रेल्वेचे रिजनल रेल्वे मॅनेजर शैलेश बापट यांची भेट घेऊन प्रवाशांच्या समस्या मांडल्या.

​पर्यटन आणि ऐतिहासिक महत्त्व

संगमेश्वर तालुका हा सुमारे १९६ गावांचा विस्तार असलेला मोठा परिसर आहे. या भागात मार्लेश्वर, कर्णेश्वर यांसारखी धार्मिक स्थळे, तसेच प्रचितगड, भवानी किल्ला आणि छत्रपती संभाजी महाराज स्मारक (शृंगारपूर) यांसारखी ऐतिहासिक ठिकाणे आहेत. या स्थळांना भेट देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक आणि भाविक येत असतात. सध्या नेत्रावती, पोरबंदर आणि जामनगर एक्सप्रेसला मिळालेल्या थांब्यामुळे प्रवाशांच्या संख्येत आणि रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

​या ९ गाड्यांच्या थांब्याची मागणी

वाढता प्रतिसाद पाहून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खालील ९ गाड्यांना संगमेश्वर रोड येथे थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे:

​केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस

​अमृतसर सुपरफास्ट एक्सप्रेस

​इंदौर सुपरफास्ट एक्सप्रेस

​हापा सुपरफास्ट एक्सप्रेस

​बांद्रा–मडगाव एक्सप्रेस

​श्रीगंगानगर एक्सप्रेस

​जबलपूर–कोकण एक्सप्रेस

​दुरंतो एक्सप्रेस

​मरूसागर एक्सप्रेस

​प्रशासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा

या गाड्यांना थांबा मिळाल्यास स्थानिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळेलच, शिवाय परिसराच्या आर्थिक आणि पर्यटन विकासालाही मोठी चालना मिळेल. रेल्वे प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा संदेश जिमन आणि समस्त संगमेश्वरवासीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या मोहिमेत रुपेश मनोहर कदम (सायले) व अन्य सदस्यांचा सक्रिय सहभाग लाभला आहे.

आंबोली: मद्यधुंद टेम्पो चालकामुळे १० वर्षीय मुलीचा मृत्यू; आई गंभीर जखमी

   Follow us on        

सिंधुदुर्ग: आंबोली घाटात रविवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका टेम्पो चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने १० वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला, तर तिची आई गंभीर जखमी झाली आहे. निकिता प्रसाद राऊत (वय १०, रा. फौजदारवाडी, आंबोली) असे मृत मुलीचे नाव असून, तिची आई चैताली राऊत यांच्यावर उपचार सुरू आहेत.

​अपघातानंतर थरार आणि पळ काढण्याचा प्रयत्न:

मिळालेल्या माहितीनुसार, राऊत कुटुंबीय दुचाकीवरून आंबोलीहून सावंतवाडीच्या दिशेने जात होते. यावेळी आंबोली घाटाच्या पायथ्याशी असलेल्या ‘नानापाणी’ जवळ समोरून येणाऱ्या, लादी (फरशी) वाहून नेणाऱ्या टेम्पो चालकाने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. धडक इतकी जोरात होती की निकिता दुचाकीवरून फेकली गेली आणि तिचा जागीच अंत झाला. अपघातानंतर घाबरलेल्या मद्यधुंद चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही किलोमीटर अंतरावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि वळणावर टेम्पो रस्त्याच्या मधोमध उलटला. टेम्पोमधील सर्व फरशा रस्त्यावर विखुरल्या गेल्या, ज्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल अडीच तास ठप्प झाली होती.

​ग्रामस्थांचा संताप आणि पोलिसांची कारवाई:

या घटनेची माहिती मिळताच आंबोलीतील ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर मोठी गर्दी केली. मद्यधुंद चालकामुळे एका निष्पाप मुलीचा जीव गेल्याने नागरिक अत्यंत आक्रमक झाले होते. ‘त्या दोघांना आमच्या ताब्यात द्या’ अशी मागणी करत संतप्त जमावाने संताप व्यक्त केला. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, हवालदार रामदास जाधव आणि संतोष गलोले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चालक आणि त्याच्या साथीदाराला (क्लीनर) ताब्यात घेतले. पोलिसांनी योग्यरीतीने परिस्थिती हाताळल्याने पुढील अनर्थ टळला. सध्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे.

दादर रत्नागिरी पॅसेंजर गाडी पूर्ववत होण्याची आशा पल्लवित

   Follow us on        

मुंबई: कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या दादर-रत्नागिरी रेल्वे गाडीबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. कोव्हिड काळात बंद झालेली आणि सध्या दिवा स्थानकावरून सुटणारी ही गाडी पुन्हा एकदा दादरहून चालवण्यात यावी, या मागणीसाठी खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान रेल्वेमंत्र्यांनी या मागणीवर सकारात्मकता दर्शवली असून, यासंदर्भात तांत्रिक बाबींची (Operational Feasibility) तपासणी करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

​गेल्या अनेक दिवसांपासून मध्य आणि पश्चिम उपनगरातील चाकरमानी या गाडीसाठी पाठपुरावा करत आहेत. सध्या ही गाडी दिवा टर्मिनल येथून सुटत असल्याने मुंबईतील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांच्या या भावना लक्षात घेऊन खासदार रवींद्र वायकर यांनी रेल्वेमंत्र्यांना सविस्तर पत्र दिले होते. तसेच प्रत्यक्ष भेटीत त्यांनी ही गाडी केवळ दादरहूनच नाही, तर दादर, अंधेरी, बोरिवली आणि वसई मार्गे कोकणात नेण्याबाबतही सविस्तर चर्चा केली. पश्चिम उपनगरातील प्रवाशांना थेट कोकणात जाण्यासाठी हा मार्ग अत्यंत सोयीचा ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

​या संदर्भात रेल्वेमंत्र्यांनी वायकर यांना पत्राद्वारे कळवले आहे की, रेल्वे प्रशासन या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत आहे. गाड्यांचे वेळापत्रक आणि रेल्वे मार्गावरील उपलब्ध जागा यांची तांत्रिक तपासणी केल्यानंतर ही मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील. “कोकणवासीयांची ही मागणी रास्त असून, केंद्रीय रेल्वे मंत्री आणि रेल्वे प्रशासनाकडे आम्ही याचा सातत्याने पाठपुरावा करू आणि ही गाडी लवकरात लवकर पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहू,” असा विश्वास खासदार रवींद्र वायकर यांनी व्यक्त केला आहे. या सकारात्मक प्रतिसादामुळे आता पुन्हा एकदा दादरहून रत्नागिरीसाठी गाडी धावण्याची आशा पल्लवित झाली आहे.

मुंबई: मध्य रेल्वे स्थानकांवर मिळणार किराणा माल; दुकानांसाठी लवकरच निविदा निघणार

   Follow us on        

मुंबई: मुंबईतील मध्य रेल्वेच्या प्रत्येक स्थानकावर किराणा (किराणा) दुकाने उभारण्यासाठी लवकरच टेंडर काढण्यात येणार आहेत. यासंदर्भातील सूचना रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर ‘कमिंग सून’ म्हणून प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्थानकांवर किराणा दुकाने, स्टॉल्स आणि किरकोळ विक्रीसाठीच्या जागा भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याने स्थानिक मराठी व्यावसायिकांसाठी ही मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

काही स्थानिक कार्यकर्त्यांनी मराठी बांधवांना आवाहन केले आहे की, टेंडर जाहीर झाल्यावर तात्काळ अर्ज करावे आणि या दुकानांचा ताबा घ्यावा. सध्या रेल्वे प्रशासनाकडून मुंबई विभागातील विविध स्थानकांवर किराणा किऑस्क, स्टॉल्स यांच्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्याची तयारी असल्याचे समजते.

मात्र, काहींनी चिंता व्यक्त केली आहे की, डी-मार्ट, जिओ मार्ट सारख्या मोठ्या कंपन्या या टेंडरमध्ये भाग घेऊ शकतात आणि स्थानिक छोट्या व्यावसायिकांना संधी मिळणार नाही. टेंडरसाठी मोठी डिपॉझिट रक्कम (अंदाजे २५ लाखांपेक्षा जास्त) लागू शकते, त्यामुळे इच्छुकांनी अधिकृत वेबसाइट (cr.indianrailways.gov.in) वरून माहिती घ्यावी आणि वेळेवर अर्ज करावा, असे सांगितले जात आहे. ही योजना मुंबईकर प्रवाशांना स्थानकांवरच किराणा खरेदीची सोय उपलब्ध करून देणारी ठरेल.

 

 

 

धक्कादायक! आकाशातून पडला ५ किलोचा बर्फाचा गोळा; घराचे छप्पर फोडून घरात कोसळल्याने खळबळ

   Follow us on        

मालवण: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील देवली-परबवाडी येथे एक अत्यंत अजब आणि धक्कादायक घटना घडली आहे. भर उन्हाळ्यात विजय मधुकर देऊळकर यांच्या घराच्या छपरावर आकाशातून सुमारे ५ किलो वजनाचा बर्फाचा एक भलामोठा तुकडा कोसळला. शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास देऊळकर कुटुंब आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असताना अचानक झालेल्या या मोठ्या आवाजाने संपूर्ण परिसरात घबराट पसरली. हा बर्फाचा गोळा इतक्या वेगाने आणि शक्तीने पडला की, त्याने घराच्या छपराची कौले आणि लाकडी रिप तोडून थेट स्वयंपाकघरात प्रवेश केला.

​ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा घरातील महिला अर्चना देऊळकर या स्वयंपाकघरातच होत्या. सुदैवाने, बर्फाचा हा तुकडा त्यांच्या अंगावर न पडता बाजूला पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या लोकांची मोठी धावपळ उडाली आणि ग्रामस्थांनी देऊळकर यांच्या घराकडे धाव घेतली. विशेष म्हणजे, घटना घडली तेव्हा परिसरात कोणत्याही प्रकारचे ढगाळ वातावरण नव्हते किंवा पावसाचे कोणतेही संकेत नव्हते. घरच्या आजूबाजूला कोणताही उंच भागही नाही होता. रखरखत्या उन्हात अचानक आकाशातून एवढा मोठा बर्फाचा तुकडा पडल्याने हे नेमके काय गौडबंगाल आहे, यावर गावात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

​घटनेची माहिती मिळताच देवली गावचे सरपंचांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हा तुकडा नैसर्गिक गारांचा प्रकार आहे की विमानातून पडलेला साचलेला बर्फ (Blue Ice), याचा उलगडा होणे आवश्यक आहे. या रहस्यमय घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे या प्रकरणाची शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पुराव्यासाठी देऊळकर यांनी तो बर्फाचा तुकडा सुरक्षितपणे फ्रीजमध्ये जतन करून ठेवला असून, सध्या संपूर्ण जिल्ह्यात या ‘आस्मानी’ संकटाचीच चर्चा रंगली आहे.

Shaktipeeth Expressway: सुधारित आराखडा तयार; पण भूसंपादन मोबदल्याचे गणित काय?

   Follow us on        

छत्रपती संभाजीनगर: राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या बहुचर्चित शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाच्या आखणीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, आता हा मार्ग ८५५ किलोमीटर लांबीचा होणार आहे. पूर्वी हा प्रकल्प १२ जिल्ह्यांसाठी प्रस्तावित होता, मात्र सुधारित आराखड्यानुसार आता हा महामार्ग राज्यातील १३ जिल्ह्यांतील ४० तालुके आणि सुमारे ४०० गावांमधून जाणार आहे. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे १८ तासांचे अंतर केवळ ८ तासांवर येणे अपेक्षित आहे.

​या प्रकल्पामध्ये वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेषतः मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतून हा मार्ग सुमारे २७० कि.मी. धावणार आहे. यवतमाळ, कोल्हापूर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांमध्ये या महामार्गाची लांबी प्रत्येकी १०० किलोमीटरपेक्षा जास्त असेल.

​दरम्यान, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या मोबदल्याचा निर्णय अद्याप गुलदस्त्यातच आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘समृद्धी महामार्गा’च्या धर्तीवरच जमीन मालकांना मोबदला देण्याचा विचार शासन स्तरावर सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी या महामार्गासाठी जमीन देण्यास विरोध दर्शविला आहे. जुन्या आखणीनुसार काही गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण झाली असली, तरी नव्या बदलांमुळे आणि मोबदल्याच्या अनिश्चिततेमुळे पेच कायम आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search