Category Archives: मुंबई

Konkan Railway: कार्नाक रोड ओव्हर ब्रिज पुनर्बांधणीसाठी मध्य रेल्वेचा ६ दिवसांचा ब्लॉक; कोकण रेल्वेच्या गाड्यांवर परिणाम होणार

   Follow us on        
Konkan Railway:मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि मशीद स्थानकांदरम्यान कार्नाक रोड ओव्हर ब्रिजच्या (आरओबी) पुनर्बांधणीसाठी सहा दिवसीय विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पुलाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ओपन वेब गर्डर्स सुरू करण्यासाठी ब्लॉकची योजना आखण्यात आली आहे. या कामासाठी सलग सहा रात्रींसाठी दीर्घकालीन पॉवर आणि वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान मुंबई  लोकल सेवेबरोबर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. या ब्लॉकचा कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांवर होणार परिणाम खालीलप्रमाणे
गाडी क्र. १२०५२  मडगाव जं. – मुंबई CSMT जनशताब्दी एक्स्प्रेसचा २५/०१/२०२५ रोजी सुरू होणारा प्रवास  दादर समाप्त होईल.
गाडी क्र. २२१२०  मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेसचा  दिनांक २५/०१/२०२५ रोजी सुरू होणारा प्रवास दादर समाप्त होईल.
गाडी क्र. १२१३४ मंगळुरु जं. – मुंबई सीएसएमटी चा दिनांक २५/०१/२०२५ रोजी सुरू होणारा प्रवास दादर स्थानकावर समाप्त होईल.
दिनांक २६/०१/२०२५ रोजी प्रवास सुरु करणारी  गाडी क्र. १२०५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं.  जनशताब्दी एक्सप्रेस आरंभ स्थानकावरून २० – ३० मिनिटांनी उशिराने निघेल
दिनांक २६/०१/२०२५ रोजी प्रवास सुरु करणारी  गाडी क्र. २२२२९  मुंबई सीएसएमटी – मडगाव जं.  वंदे भारत एक्सप्रेस आरंभ स्थानकावरून २० – ३० मिनिटांनी उशिराने निघेल
दिनांक २६/०१/२०२५ रोजी प्रवास सुरु करणारी  गाडी क्र. २२११९  मुंबई सीएसएमटी – मडगाव तेजस एक्सप्रेस आरंभ स्थानकावरून २० – ३० मिनिटांनी उशिराने निघेल
दिनांक २५/०१/२०२५ रोजी प्रवास सुरु करणारी  गाडी क्र. २०११२ कोकणकन्या एक्सप्रेस अर्धा तास उशिराने चालविण्यात येणार आहे.
गाडी क्र. १२०५२  मडगाव  – मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस चा दिनांक २६/०१/२०२५ रोजी सुरू होणारा प्रवास दादर स्थानकावर समाप्त होईल.
गाडी क्र. २२१२० मडगाव  – मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेस चा दिनांक २६/०१/२०२५ रोजी सुरू होणारा प्रवास दादर स्थानकावर समाप्त होईल.

Mumbai Local: मुंबई लोकल लाईनवर ३ दिवसाचा मेगाब्लॉक; लोकलच्या तब्बल २७७ फेऱ्या रद्द

मुंबई: मुंबईच्या लाईफ लाईनला 3 दिवस ब्रेक असणार आहे. येत्या 24, 25 आणि 26 जानेवारी रोजी पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे तब्बल 277 लोकल रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. माहीम ते बांद्रा स्थानकांदरम्यान पुलाच्या पुर्नबांधणीसाठी शुक्रवार ते रविवार हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांचे मेगाहाल होण्याची शक्यता असून प्रवासाचे योग्य ते नियोजन करावे लागणार आहे.
मुंबईत शुक्रवारी रात्रीपासून ते रविवारी सकाळपर्यंत घेण्यात येणाऱ्या या विशेष ब्लॉकच्या दरम्यान लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. शुक्रवारी 127 लोकल पूर्णपणे रद्द, तर 60 लोकल अंशत: रद्द करण्यात येणार आहेत. तर शनिवारी 150 लोकल पूर्णपणे रद्द करण्यात येणार असून 90 लोकल अंशत: रद्द करण्यात येतील. 24 जानेवारीला शेवटची चर्चगेट-विरार स्लो लोकल रात्री 11.58 वाजता सुटेल. लोकल रद्द झाल्याने प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
असा असणार विशेष ब्लॉक
भारतीय रेल्वेवरील ‘स्क्रू पायलिंग’वर उभारलेला शवेटचा पूल वांद्रे ते माहीम दरम्यान मिठी नदीवर आहे. या पुलाच्या मजबुतीकरणाचे काम पश्चिम रेल्वेने हाती घेतले आहे. याच कामांसाठी 24, 25 आणि 26 जानेवारी रोजी रात्रकालीन विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. शुक्रवारी रात्री 11 ते शनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. तर रात्री 12.30 ते सकाळी 6.30 वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावर देखील ब्लॉक राहील. तसेच 25 आणि 26 जानेवारीला रात्री 11 ते रविवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या आणि डाऊन जलद मार्गांवर ब्लॉक सुरू होईल. जलद मार्गावर शनिवारी रात्री 11 वाजता ब्लॉक सुरू होऊन रविवारी सकाळी 7.30 वाजेपर्यंत ब्लॉक राहील.
पहिला ब्लॉक (शुक्रवार-शनिवार) वेळापत्रक
मुंबईत शुक्रवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असून 24 जानेवारीला शेवटची चर्चगेट-विरार स्लो लोकल रात्री 11.58 वाजता सुटेल. रात्री 11 वाजेपासून चर्चगेटवरून सुटणाऱ्या सर्व स्लो लोकल मुंबई सेंट्रल आणि सांताक्रूझ दरम्यान जलद मार्गावर धावतील. यावेळी महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्थानकांवर लोकल थांबणार नाही. ब्लॉकनंतर शनिवारी सकाळी विरार स्थानकातून पहाटे 5.47 वाजता पहिली चर्चगेट लोकल धावणार आहे. तर ब्लॉकनंतर शनिवारी चर्चगेट स्थानकातून पहिली डाऊन जलद लोकल 6.14 वाटता सुटेल. तसेच शनिवारी सकाळी चर्चकेट स्थानकातून पहिली डाउन धिमी लोकल सकाळी 8.03 वाजता सुटणार आहे.
दुसरा ब्लॉक (शनिवार-रविवार) वेळापत्रक
मुंबईत शनिवारी रात्री घेण्यात येणाऱ्या ब्लॉक काळात चर्चगेट ते दादर दरम्यान जलद लोकल धावणार आहेत. शनिवारी सकाळी विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर, बोरीवली धिम्या आणि जलद लोकल अंधेरीपर्यंत धावणार आहेत. अप जलद मार्गावर शेवटची लोकल विरार ते चर्चगेट रात्री 10.08 मिनिटांनी धावेल. तर डाऊन जलद मार्गावर शेवटची लोकल चर्चगेट ते बोरीवली रात्री 10.33 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर रविवारी सकाळी डाऊन जलद मार्गावर पहिली चर्चगेट-विरार लोकल सकाळी 8.35 वाजता सुटणार आहे. तर जलद मार्गावर पहिली विरार-चर्चगेट लोकल 7.38 वाजता धावणार आहे.

मुंबई: राणीच्या बागेत लवकरच पाहता येणार विविध प्रजातींचे साप

   Follow us on        

मुंबई : भायखळ्याचे वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात (राणीची बाग) लवकरच सापांच्या विविध प्रजाती पाहता येणार आहेत. येथे सर्पालय उभारण्यात येणार असून त्यासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळालेली आहे. दरम्यान, येत्या काही महिन्यांत सर्पालयाच्या बांधकामास सुरुवात होणार आहे.

प्राणीसंग्रहालय प्रशासनाने सर्पालयाबाबतचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी सादर केला होता. त्या प्रस्तावास मागील महिन्यांत केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळाली आहे. यानुसार काही दिवसांत सर्पालयासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत. आलेल्या निविदांची छाननी करून सर्पालयाच्या बांधकामास सुरुवात करण्यात येणार असून २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली. दरम्यान, जुने सर्पालय तोडून १६८०० चौरस फूट जागेत नव्याने बांधण्यात येणार आहे. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना यापुढे विविध प्रजातींचे साप पहायला मिळतील. सध्या प्राणी संग्रहालयात पेंग्विन, वाघ, देशी अस्वल आदी प्राणी उपलब्ध आहेत.

Mumbai Local: पाश्चिम रेल्वे मार्गावर रुळाला तडे; मोठा अनर्थ टळला, वाहतुक रखडली

 

   Follow us on        

Mumbai Local: पश्चिम रेल्वेच्या वैतरणास्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब समोर आली आहे. हा प्रकार रेल्वे प्रशासनाच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या काही गाड्या पालघर स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या लोकल गाड्यांच्या वेळापत्रकारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैतरणा स्थानकाजवळ मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ या मार्गावरील गाड्या पालघर स्थानकावरच रोखल्या. वेळीच खबरदारी घेण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.

या घटनेमुळे मुंबईच्या दिशेने होणारी वाहतुक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सकाळी कामाला जाणार्‍या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रूळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

महत्वाचे: मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग उद्यापासून ‘या’ वेळे दरम्यान तीन दिवस बंद रहाणार

   Follow us on        

मुंबई: मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर डोंगरगाव/ कुसगांव येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर्स बसविण्याचे काम सुरू आहे. या कारणाने दि. 22, 23 आणि 24 जानेवारी असे तीन दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक ण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे

या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी पुणे वाहिनीवरील वाहतूक द्रुतगती मार्गाच्या किमी क्रमांक 54/700 वळवण ते वरसोली टोल नाका (राष्ट्रीय महामार्ग क्र. 48) येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. वरील तिन्ही दिवस दुपारी 3 वाजल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवरुन सोडण्यात येईल. तसेच या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरुन सुरू राहणार आहे. (Mumbai Pune Expressway)

द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या अनुषंगाने आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. या कालावधीदरम्यान वाहनचालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. 9822498224 या किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाच्या अधिकार्‍यां तर्फे करण्यात आले आहे.

 

Mumbai Local Trains : मुंबईला लवकरच 238 एसी लोकल मिळणार

   Follow us on        

Mumbai Local : मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. एसी लोकल खरेदी करण्याचा प्रस्ताव पुन्हा रुळावर आला असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट अंतर्गत मुंबईला तब्बल २३८ नव्या एसी लोकल ट्रेन मिळणार आहेत.शनिवारी अश्विनी वैष्णव यांनी अनेक प्रकल्पांवर भाष्य केले. तेव्हा त्यांनी एसी लोकल खरेदीबाबत माहिती दिली.

मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या फेज 3 आणि 3 A अंतर्गत, मुंबईत लवकरच २३८ एसी लोकल ट्रेन धावणार आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०२३ मध्ये मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) एसी लोकल ट्रेनसाठी जागतिक निविदा काढल्या होत्या. खरेदी रखडल्याने हा उपक्रम पुढे ढकलण्यात आला. आता १८ महिन्यांनंतर एसी लोकल खरेदीवर भर देण्यात येत आहे.

एमयूटीपी म्हणजेच मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या मूळ योजनेनुसार, फेज 3 मध्ये ४७ एसी लोकल गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. यासाठी अंदाजे ३,४९१ कोटी रुपये इतका खर्च येऊ शकतो. तर फेज 3 A मध्ये १९१ एसी लोकल गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. यासाठी अंदाजे १५,८०२ कोटी रुपये इतका खर्च येऊ शकतो.एसी लोकल खरेदीबाबतच्या निर्णयामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. यामुळे प्रवाशांना उन्हाळ्यात एसी लोकलने प्रवास करता येईल. शिवाय याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर देखील होऊ शकतो असे म्हटले जात आहे. तरी या २३८ एसी ट्रेन मुंबईत कधी धावणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

 

मुंबई लोकल्स समोरा समोर आल्याची ‘ती’ बातमी खोटी

   Follow us on        

Mumbai Local: मिरा रोड रेल्वे स्थानकावर एकाच ट्रॅकवर दोन लोकल समोरासमोर आल्याची धक्कादायक बातमी आज समाज माध्यमांवर आज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. मोठा अपघात थोडक्यात टळला अशा या शीर्षकाखाली न्यूज चॅनेल्सने सुद्धा या बातमीचा मोठा गाजावाजा केला होता. मात्र ही बातमी खोटी असल्याचा खुलासा पाश्चिम रेल्वेने केला आहे.

“सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिशाभूल करणारा आहे. मीरा रोड स्थानकावर एकाच रुळावर गाड्या जवळपास समोरासमोर आल्याची कोणतीही घटना घडलेली नाही. आज 17.00 वाजता, एक लोकल ट्रेन पुरेशा आणि सुरक्षित अंतर राखून त्याच ट्रॅकवर दुसऱ्याच्या मागे उभी होती. हे ऑपरेशनल नियमांनुसार होते. उपनगरीय ट्रेन ऑपरेशन नियमानुसार, जर सिग्नल दिवसा 1 मिनिटांपेक्षा जास्त काळ लाल असेल (आणि रात्री 2 मिनिटे) तर EMU ट्रेन मर्यादित वेगाने पुढे जाऊ शकते आणि पुढील ट्रेनच्या जवळ येऊ शकते.सुरक्षा प्रोटोकॉलनुसार हे पूर्णपणे सुरक्षित आहे. नागरिकांना विनंती आहे की त्यांनी अफवा पसरवणे आणि दहशत पसरवणे थांबवावे.” अशा शब्दात पाश्चिम रेल्वे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.

   Follow us on        

 

 

 

समोर वाकलेला रूळ… मोटारमेनचे प्रसंगावधान; लोकल ट्रेनचा मोठा अपघात होता होता टळला

   Follow us on        

Mumbai: विरारहून मुंबईकडे जाणाऱ्या फास्ट लाईनच्या अप मार्गावर काल मंगळवारी रेल्वे रुळ वाकल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे विरार चर्चगेट एसी ट्रेनचा जागच्या जागी ब्रेक मारल्यानं वेस्टर्न लाईनवर मोठा अनर्थ टळलाय. ट्रेनचा मोटरमन रुळावर लक्ष ठेवून होता आणि त्याला वाकलेला ट्रॅक दिसताच त्याने गाडी थांबवली. पुढील दुर्घटना होऊ नये म्हणून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित कळवले. त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. परंतू ट्रॅक नक्की कशामुळे वाकला? याचे नेमके कारण स्पष्ट होऊ न शकल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.

मंगळवारी दुपारी 12.45 ला विरारहून सुटलेली एसी लोकल विरार-नालासोपारा स्थानकादरम्यान आली असता मोटरमनच्या लक्षात वाकलेला रेल्वे रुळ आला. त्याने तत्काळ लोकल थांबवून वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर मागून येणाऱ्या जनरल लोकललाही थांबवण्यात आले. दोन्ही लोकल थांबल्याने अनेक प्रवाशांनी गाडीतून उतरून पायी नालासोपारा स्थानक गाठले. रेल्वे प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करत फास्ट ट्रॅकवरील वाहतूक स्लो ट्रॅकवर वळवली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून वाकलेला रुळ पूर्णपणे बदलला, त्यानंतर फास्ट लाईनवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, ट्रॅक वाकण्याचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

या घटनेमुळे प्रवाशांना काही काळ गैरसोय सहन करावी लागली. मात्र, मोटरमनच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप राहिले. त्याच्या वेगवान निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला. प्रवाशांनी मोटरमनचे आभार मानले असून, त्यांच्या सतर्कतेची प्रशंसा केली आहे. रेल्वे प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून, ट्रॅक वाकण्याचे कारण शोधण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी रेल्वे ट्रॅकच्या देखभालीवर अधिक भर दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. मोटरमनच्या निर्णयामुळे एका मोठ्या दुर्घटनेची टांगती तलवार टळली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रशासनाकडून अधिक मजबूत सुरक्षा उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

३१ डिसेंबरला ‘पेग लिमिट’ चा नियम; जास्तीत जास्त किती पेग घेता येणार?

   Follow us on        
मुंबई: नवं वर्ष सुरू होण्यासाठी अगदी मोजकेच दिवस शिल्लक आहेत, मात्र आतापासूनच अनेकांनी नववर्षाच्या स्वागताचं नियोजन करण्यास सुरुवात केले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी  मात्र मस्त हॉटेलमध्ये जाऊन दारूचे ग्लास रिचवत नवं वर्षाचं सेलिब्रेशन करण्याच्या बेतात असलेल्या एक महत्वाची बातमी  आहे. नव्या नियमांनुसार नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जे हॉटेल किंवा बारमध्ये 31 डिसेंबरला जाणार आहेत, अशा मद्यपींना केवळ चार पेग एवढीच दारू मिळणार आहे.
चार पेगपेक्षा अधिक दारू यावेळी कुठल्याही हॉटेलमध्ये मिळणार नाही. याबाबत हॉटेल असोसिएशनकडून माहिती देण्यात आली आहे. नव्या वर्षाचं सेलीब्रेशन करण्यासाठी अनेक जण हॉटेलमध्ये येतात. ते प्रमाणाबाहेर दारू पितात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण होतो. प्रमाणाबाहेर दारू पिल्यास अपघाताचा धोका असतो. जेव्हा लोक दारू पिऊन आपल्या गाडीनं घरी जातात तेव्हा अनेक अपघात होतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या वर्षी नव वर्षाच्या स्वागताला हा नियम बनवण्यात आल्याचं हॉटेल असोसिएशनकडून सांगण्यात आलं आहे.
चालकाची व्यवस्था करणार
सरकारकडून नव वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व हॉटेल आणि बारसाठी नवी गाईडलाईन्स जारी करण्यात आली आहे. कोणत्याही ग्राहकाला दारू देण्यापूर्वी त्याच्या वयाबाबत खात्री करून घ्यावी. त्याच्या वयाचा पुरावा त्याच्याकडे मागावा. अल्पवयीन असेल तर दारू देऊ नये. तसेच दारू पिल्यामुळे जर त्याला घरी जाण्यास समस्या असेल तर अशा व्यक्तींसाठी चालकाची सोय करावी. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरला सकाळी पाच वाजेपर्यंत सर्व हॉटेल आणि बार सुरू राहणार आहेत, तशी परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासोबतच हॉटेलमध्ये येणार्‍या ग्राहकांना दारूच्या लिमीटचं बंधन देखील घालण्यात आलं आहे.

मुंबई आणि ठाण्यात लवकरच दिसणार केबल टॅक्सी

   Follow us on        

मुंबई: रस्त्यावरची ट्रॅफीक हवेत नेण्यासाठी परिवहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जबरदस्त प्लान बनवत आहेत. मुंबई आणि ठाण्यात केबल टॅक्सी सुरु केली जाणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यात रस्ते वाहतुकीवर येणारा ताण कमी करण्यासाठी एमएमआर क्षेत्रात भविष्यात केबल टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे. केबल टॅक्सी प्रकल्प हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सध्या युरोपियन देशांमध्ये केबल टॅक्सी सेवा सुरू आहे. बंगळुरूतील रोप वे वाहतुकीचा अभ्यास करुन अहवाल तयार केला जाणार आहे. याच्या मदतीनेच मुंबई आणि ठाण्यात केबल टॅक्सी सुरु केली जाणार आहे. सध्या महाराष्ट्रात कुठेही केबल टॅक्सी कुठेच सुरु नाही. केबल बोर्न टॅक्सी ही रोप वे प्रमाणे काम करेल. यामध्ये एका वेळी 15-20 प्रवाशांची वाहतूक करता येईल. हा प्रकल्प मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (एमएमआरडीए) च्या अंतर्गत नसून राज्य सरकारच्या परिवहन विभागाच्या अंतर्गत असेल असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. आपण मेट्रो चालवू शकलो तर केबल टॅक्सी चालवायला काहीच हरकत नाही, कारण रोप वे बांधण्यासाठी आपल्याला जास्त जमीन लागणार नाही असेही असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.

सरनाईक यांच्या आधी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही केबल टॅक्सी हे वाहतुकीचे उत्तम साधन असल्याचे सांगितले होते. केबल टॅक्सी पॉड टॅक्सी म्हणूनही ओळखली जाते. केबल टॅक्सी वीज आणि सोलर एनर्जीवर चालते. हे वाहतुकीचे अतिशय पर्यावरणपूरक साधन आहे.

 

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search