Category Archives: मुंबई

Special Trains: मुंबई – गुजरात दरम्यान धावणार अतिजलद तेजस विशेष गाड्या

   Follow us on        

मुंबई :प्रवाशांच्या सोयीसाठी आणि विशेषतः उन्हाळी हंगामात प्रवाशांची वाढती मागणी गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल ते राजकोट आणि मुंबई सेंट्रल ते गांधीधाम दरम्यान विशेष भाड्याने अतिजलद तेजस विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी, पश्चिम रेल्वेने विशेष भाड्याने दोन विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे .

ट्रेन क्रमांक ०९००५ मुंबई सेंट्रल -राजकोट स्पेशल दर बुधवार आणि शुक्रवारी मुंबई सेंट्रलहून रात्री ११.२० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ .४५ वाजता राजकोटला पोहोचेल. ही ट्रेन ३० मे ते २७ जून पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे,

ट्रेन क्र. ०९००६ राजकोट-मुंबई सेंट्रल स्पेशल दर गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी ६.३० वाजता राजकोटहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन ३१ मे ते २८ जून पर्यंत धावेल.ही गाडी बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, विरमगाम, सुरेंद्रनगर आणि वांकानेर स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल. या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, एसी २-टायर आणि एसी ३-टायर कोच असतील.

ट्रेन क्रमांक ०९०१७ मुंबई सेंट्रल – गांधीधाम स्पेशल ही गाडी दर सोमवारी मुंबई सेंट्रलहून रात्री ११. २० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.५५ वाजता गांधीधामला पोहोचेल. ही ट्रेन ०२ जून ते ३० जूनपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक ०९०१८ गांधीधाम-मुंबई सेंट्रल स्पेशल दर मंगळवारी गांधीधामहून संध्याकाळी ६. ५५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन ०३ जून ते ०१ जुलैपर्यंत धावेल. ही ट्रेन दोन्ही दिशांना बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, विरमगाम, समख्याली आणि भचाऊ स्थानकांवर थांबेल. या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, एसी २-टायर आणि एसी ३-टायर
कोच आहेत.

कालावधी वाढवण्यात आलेल्या विशेष गाड्या: ट्रेन क्रमांक ०९०६७ उधना-जयनगर अनारक्षित विशेष गाडी २९ जून पर्यंत,ट्रेन क्रमांक ०९०६८ जयनगर-उधना अनारक्षित विशेष गाडी ३० जून पर्यंत , ट्रेन क्रमांक ०६०९६ उधना-समस्तीपूर स्पेशल २८ जून पर्यंत आणि ट्रेन क्रमांक ०९०७० समस्तीपूर-उधना स्पेशल ३० जून पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Metro Line14: मुंबई मेट्रोचा अंबरनाथ-बदलापूर पर्यंत विस्तार होणार; असा असेल मार्ग

   Follow us on        
Metro Line14: अंबरनाथ -बदलापूर लोकल प्रवाशांसाठी  एक दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई मेट्रोचा विस्तार करण्यात येणार असून मेट्रो थेट बदलापूरपर्यंत धावणार आहे. कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो लाईन 14 च्या संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर आली आहे.
एमएमआरडीएने कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो 14 मार्गाच्या कामासाठी पाऊल टाकले आहे. या मेट्रो 14 मार्गिकेच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून महिन्या अखेरपर्यंत टेंडर काढण्यात येणार आहेत. पीपीपी म्हणजेच सार्वजनिक – खाजगी भागीदारी तत्त्वावर ही मेट्रो मार्गिका उभारण्यात येणार आहे. सुरुवातीला मेट्रोच्या कामासाठी पीपीपी तत्त्वावर उभारणीसाठी इच्छुक कंपन्यांकडून टेंडर मागवण्यात येणार आहेत.
कसा असेल कांजूरमार्ग – बदलापूर मार्ग?
  • मेट्रो 14 ही कांजूरमार्ग ते बदलापूर या मार्गावर धावणार आहे.
  • हा मार्ग एकूण 38 किलोमीटर लांबीचा असणार आहे
  • कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो 14 मार्गावर एकूण 15 स्थानके असणार आहेत
  • मेट्रो 14 चा मार्ग हा कांजूरमार्ग – घणसोली – महापे – अंबरनाथ – बदलापूर असा असणार आहे.
  • हा मार्ग घणसोलीपर्यंत भूमिगत असणार आहे. ठाण्यातील खाडी खालून ही मेट्रो धावणार आहे.
  • घणसोली ते बदलापूर हा उन्नत मार्ग असणार आहे.
  • या मार्गावरील 4.38 किलोमीटर लांबीचा मार्ग हा पारसिक हिल येथून जाणार आहे.
  • कांजूरमार्ग – बदलापूर या मेट्रो 14 प्रकल्पाचा अंदाजे खर्च 18 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.
  • या प्रकल्पाच्या उभारणीसाठी जवळपास 75 हेक्टर जमीन व्यावसायिक वापरासाठी लागणार आहे.
  • हा मेट्रो मार्ग ठाणे खाडी, पारसिक हिल आणि फ्लेमिंगो अभयारण्याच्या क्षेत्रातून जाणार आहे.
मेट्रो मार्गामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाटी एमएमआरडीएन यापूर्वीच सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न असणार आहे.

मुंबई ते तळकोकण प्रवास फक्त ५ तासांत; यंदा गणपतीत कोकणात जाण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध होणार

   Follow us on        
मुंबई: यंदा गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर हाती आली आहे. गणपतीत आता समुद्र मार्गे प्रवास करता येणार आहे. चाकरमान्यांना कमी वेळेत गावी पोहोचवण्यासाठी मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे साडेचार तासांत मालवण, विजयदुर्ग तर तीन तासांत रत्नागिरी गाठता येणार आहे. आता मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू होणार आहे.
जलवाहतूक सेवा सुरू झाल्याने चाकरमानी कमी वेळेत कोकणात पोहोचणार आहेत. हायटेक यंत्रणा असलेल्या एम टू एम या बोटीमार्फत कोकणात प्रवास करणार आहेत. फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे चाकरमान्यांचा मोठा त्रास कमी होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय मानला जात आहे.
चाकरमान्यांचा त्रास कमी होणार
गणेशोत्सवात कोकणात जाताना चाकरमान्यांना रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडीने होणारी परवड आणि वेळखाऊ प्रवासाचा त्रास चाकरमान्यांसाठी नेहमीचाच झाला आहे. या त्रासातून दिलासा देण्यासाठी मत्स्य व बंदरे विभागाकडून मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे.
जलवाहतूक सेवेसाठी एम टू एम बोट वापरली जाणार आहे. येत्या २५ मे रोजी ती मुंबईतील भाऊचा धक्का येथे दाखल होणार आहे. फडणवीस सरकारमधील मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून परवडणाऱ्या दरात जलवाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. याकरिता एम टू एम ही बोट सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचे प्रयोजन आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हायटेक यंत्रणा असलेल्या एम टू एम या बोटीमार्फत पुन्हा एकदा जलवाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
मुंबईतील माझगाव डॉक येथून प्रवास सुरू होईल. जवळपास साडेचार तासांत कोकणातील मालवण, विजयदुर्ग तर तीन तासांत रत्नागिरीपर्यंत पोहोचता येईल. लवकरच चाकरमान्यांना परवडतील, असे दर यासाठी निश्चित केले जाणार आहेत.

Amrit Bharat Express: मुंबईला मिळणार पहिली अमृत भारत एक्सप्रेस

   Follow us on        

Mumbai Amrit Bharat Express : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, देशाच्या आर्थिक राजधानीला अमृत भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सुपरफास्ट होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन येत्या काही महिन्यांनी मुंबईवरून सुरू होणार आहे. मुंबई ते बिहार दरम्यान ही गाडी चालवली जाणार असून यामुळे बिहार मधून मुंबईला आणि मुंबईमधून बिहारला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पुढील आठवड्यापासून बिहार ते मुंबई दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन चालवली जाईल अशी शक्यता आहे. पंतप्रधान मोदी जेव्हा बिहारला भेट देतील तेव्हा ते या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे.

दरम्यान ही नवीन अमृत भारत ट्रेन सहरसा आणि मुंबई दरम्यान धावणार आहे. यामुळे मुंबई ते सहरसा हा प्रवास वेगवान होणार आहे. खरे तर बिहारला या आधी सुद्धा अमृतभारत एक्सप्रेस ची भेट मिळालेली आहे.

बिहार मधील पहिली अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन दरभंगा ते आनंद विहार टर्मिनल (ANVT) या मार्गावर धावत आहे. आता या मार्गानंतर, मुंबई ते सहरसा या मार्गावर अमृत भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता असून ही बिहारची दुसरी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन असेल.

 

Mumbai Local: मध्य रेल्वे मार्गावरील १४ लोकल गाड्यांच्या जागी एसी लोकल्स धावणार; वेळापत्रक इथे वाचा

Mumbai Local: मुंबईचे तापमान अधिकच वाढू लागले आहे. त्यामुळे लोकल प्रवासही अधिक त्रासदायक ठरत आहे. अशा वेळी प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येतेय, मध्य रेल्वेवर लवकरच १४ नॉन एसी गाड्यांचे रूपांतर एसी गाड्यांमध्ये होणार आहे.. विशेष म्हणजे येत्या १६ एप्रिलपासून ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे.
खालील गाड्या दिनांक १६ एप्रिलपासून रविवार आणि सुट्टीचे दिवस वगळता एसी लोकल म्हणून चालविण्यात येणार आहेत.
Down Direction ( From CST)
मार्ग निर्गमन आगमन
विद्याविहार – कल्याण ६:२६ ७:२५
सीएसएमटी – बदलापूर ९:०० १०:३२
सीएसएमटी – ठाणे १२:२४ १३:२०
सीएसएमटी – ठाणे १४:२९ १५:२५
सीएसएमटी – ठाणे १६:३८ १७:३५
सीएसएमटी – ठाणे १८:४५ १९:४२
सीएसएमटी – बदलापूर २१:०८ २२:५६

Mumbai Local: ‘फेविकॉल’ च्या जाहिरातीवरून नवा वाद

   Follow us on        
Western Railway: वांद्रे (पश्चिम) येथील वांद्रे रिक्लेमेशन जंक्शनवरील एका होर्डिंग वरील जाहिरातीवर पश्चिम रेल्वे प्रशासनाने आक्षेप घेतला आहे. या जाहिरातीत एका जुन्या काळातील प्रतिमा होती, ज्यामध्ये गर्दीने भरलेल्या मुंबई लोकल गाड्या फूटबोर्डवरून लटकलेल्या प्रवाशांना दाखवण्यात आले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते या जाहिरातीत भारतीय रेल्वे, विशेषतः मुंबई लोकल गाड्यांचे अपमानजनक आणि दिशाभूल करणाऱ्या पद्धतीने चित्रण केले आहे.
शुक्रवारी पश्चिम रेल्वेने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) द्वारे व्यवस्थापित केलेल्या वांद्रे येथील एका होर्डिंगवर औपचारिक आक्षेप घेतल्यानंतर फेविकॉलच्या जुन्या जाहिरातीमुळे वाद निर्माण झाला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी हे होर्डिंग, तसेच त्यासारख्या सर्व जाहिरातींमध्ये असलेली प्रतिमा त्वरित काढून टाकण्याची आणि “निर्णयातील चूक” म्हणून वर्णन केल्याबद्दल औपचारिक माफी मागण्याची मागणी केली आहे.
“आपल्या रेल्वेमध्ये अभूतपूर्व परिवर्तन होत आहे. चुकीचे प्रतिनिधित्व किंवा नकारात्मक चित्रण पूर्णपणे अस्वीकार्य आहे. आम्ही या जाहिरातीला तीव्र आक्षेप घेतला आहे आणि ब्रँडला ती त्वरित मागे घेण्याची विनंती केली आहे,” असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गेल्या ११ वर्षांत, मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या आहेत, आधुनिक रेकची सुरुवात, डीसी ते एसी सिस्टीममध्ये रूपांतर, वातानुकूलित लोकल ट्रेन सुरू करणे आणि प्रवाशांची सुरक्षितता आणि सोय सुधारण्यासाठी अनेक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाल्या आहेत. पश्चिम आणि मध्य रेल्वे एकत्रितपणे दररोज ७० लाखांहून अधिक प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सुविधा देत आहेत. मात्र जुना फोटो वापरून केलेल्या अशा जाहिरातीमुळे जनतेत चुकीचा संदेश जातो असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Mumbai Local: मुंबई लोकलसेवेच्या जाळ्याचा विस्तार होणार

   Follow us on        
मुंबई :मुंबई रेल्वे विकास महामंडळाने ‘एमयूटीपी ३ ब’मध्ये पनवेल-वसई उपनगरी रेल्वे प्रकल्पाचा समावेश केला आहे. त्यामुळे आता पनवेल-वसई लोकल धावल्यानंतर त्याचा विस्तार बोरिवली- विरारपर्यंत करणे शक्य होणार आहे. बोरिवली आणि विरार परिसरातील नागरिकांना पनवेल गाठण्यासाठी आता थेट मुंबई उपनगरी रेल्वे अर्थात मुंबई लोकल उपलब्ध होणार आहे. यामुळे लाखो प्रवाशांचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या ‘एमयूटीपी ३ ब’ प्रकल्पसंचामध्ये नवीन पनवेल-वसई उपनगरी रेल्वे मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. वसईपासून पुढे बोरिवली आणि विरार अशा दोन्ही दिशांना याची जोडणी असणार आहे, असे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास वाडेकर यांनी सांगितले  आहे.
‘एमयूटीपी’अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या रेल्वे प्रकल्पात राज्य आणि केंद्र सरकारकडून ५०:५० प्रमाणे निधी दिला जातो. नवीन पनवेल-वसई लोकल मार्ग सुरू करण्याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाबाबत राज्य सरकारशी प्राथमिक बैठका पार पडल्या आहेत. महामुंबईतील प्रवाशांचा प्रवास जलद करणाऱ्या या प्रकल्पाला राज्य सरकारकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच अंतिम बैठका घेऊन नवीन रेल्वे प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असेही वाडेकर यांनी सांगितले.

Loading

मुंबई गोवा मार्ग पुढील ६ महिन्यात पूर्ण होणार; प्रकल्पाचा खर्च १९,४६९ कोटी रुपयांपर्यंत वाढणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

   Follow us on        
Mumbai Goa Highway:
संपूर्ण गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग-६६ चे चौपदरीकरण पुढील सहा महिन्यांत पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या मार्गाचे जवळजवळ ४६३ किमी लांबीचे काम आधीच पूर्ण झाले आहे, त्यामुळे संबंधित राज्य सरकारांशी झालेल्या चर्चेनंतर प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रलंबित समस्या सोडवण्यात आल्या आहेत.
मुंबई आणि गोवादरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि प्रवासाचा वेळ कमी करणे हे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे, त्यामुळे या प्रदेशातील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होईल. तथापि, विविध समायोजन आणि व्याप्ती बदलांमुळे संपूर्ण प्रकल्पाचा खर्च १९,४६९ कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.
या प्रकल्पाच्या पूर्णतेमुळे वाहतूक कार्यक्षमता सुधारेल, आर्थिक फायदे मिळतील आणि गोवा आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या लोकांसाठी एकूण प्रवास अनुभव वाढेल अशी अपेक्षा आहे असे ते पुढे म्हणालेत.

Mumbai Local: खुशखबर! मुंबईसाठी २३८ नव्या उच्च दर्जाच्या लोकल गाड्या तयार केल्या जाणार

   Follow us on        

Mumbai Local: लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे. मुंबईसाठी उच्च दर्जाच्या 238 लोकल गाड्या तयार करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. यामुळे लोकलची गर्दी कमी होण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे लाखो मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत मुंबई लोकलविषयी महत्वाची माहिती दिली आहे. ‘मुंबईसाठी उच्च दर्जाच्या 238 लोकल गाड्या तयार करण्यात येणार आहेत. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नव्या तंत्रज्ञानाच्या डब्यांविषयी चर्चा झाली आहे. तसेच मुंबईतील जुन्या गाड्या आणि डबे बदलण्यावर भर देण्यात येणार आहे’ अशी माहितीही वैष्णव यांनी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाचा फायदा लाखो मुंबईकरांना होणार आहेकमी भाड्यात उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दलही माहिती दिली आहे. ‘प्रवासाचा खर्च प्रति किलोमीटर 1.38 रुपये आहे, मात्र आम्ही प्रवाशांकडून फक्त 73 पैसे घेतो. म्हणजेच आम्ही 47 % अनुदान देतो. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये प्रवाशांना 57 हजार कोटींचे अनुदान दिले होते, ते 2023-24 मध्ये वाढून सुमारे 60 हजार कोटी झाले होते. आमचे ध्येय कमी भाड्यात सुरक्षित आणि उत्तम सेवा पुरवणे हे आहे’ अशी माहितीही वैष्णव यांनी दिली आहे..

Konkan Railway: दोन्ही गाड्या दादर पर्यंत नेण्यासाठी शिवसेनेकडून रेल्वेला वाढीव अवधी; होळीआधी मागणी पूर्ण न झाल्यास ‘रेल रोको’ चा इशारा

   Follow us on        

मुंबई: दादरहून कोकणात जाणाऱ्या रत्नागिरी व सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन अचानक बंद केल्यामुळे शिवसेनेने पुकारलेले (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शनिवारचे ‘रेल रोको’ आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.

कोकणी जनतेची गैरसोय करणाऱ्या मध्य रेल्वेला आठवडाभरापूर्वी शिवसेनेने उग्र आंदोलनाचा इशारा दिला होता. दादर-रत्नागिरी आणि दादर- सावंतवाडी पॅसेंजर होळीआधी सुरू करा, नाहीतर १ मार्चला दादर स्थानकात तीव्र ‘रेल रोको’ करू, दादरहून गोरखपूर व बरेलीला जाणाऱ्या ट्रेन सुटूच देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला होता. शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते-माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, आमदार सुनील शिंदे, महेश सावंत, रेल कामगार सेनेचे सरचिटणीस बाबी देव, संजय जोशी, विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी २० फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांना स्मरणपत्र दिले होते. त्याचवेळी दोन्ही पॅसेंजर दादरवरून कशा सोडता येईल, या ट्रेनचा इतर गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, याबाबत रेल्वे कामगार सेनेचे संजय जोशी, बाबी देव यांनी अभ्यासपूर्ण म्हणणे मांडले होते. मध्य रेल्वे प्रशासनाने आपण दादर ते दिवा मार्गाचा पाहणी करून ही गाडी पुन्हा दादर पर्यंत कशी नेता येईल याबाबत अभ्यास करू असे आश्वासन दिले होते. त्यामुळे शिवसेनेने रेल्वेला यासाठी अधिक वेळ देण्याचा निर्णय घेतला असून हे आंदोलन स्थगित केले असल्याचे सांगितले आहे.

होळीआधी ट्रेन सुरू झाली नाही तर ‘रेल रोको

दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी या दोन्ही पॅसेंजर पूर्वीच्या वेळापत्रकानुसार दादर स्थानकातून तातडीने सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाकडून होळीआधी योग्य ती कार्यवाही न झाल्यास दादरवरून गोरखपूर आणि बरेलीला जाणाऱ्या ट्रेनसमोर कोणत्याही क्षणी ‘रेल रोको’ आंदोलन केले जाईल. दादर-गोरखपूर आणि दादर-बरेली या गाड्या दादरवरून सुटू देणार नाही, असा इशारा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिला आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search