Category Archives: मुंबई
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngwing.com_.png)
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngegg-3-280x280.png)
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngegg-1-280x280.png)
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngegg-2-1-280x7.png)
मुंबई : भायखळ्याचे वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात (राणीची बाग) लवकरच सापांच्या विविध प्रजाती पाहता येणार आहेत. येथे सर्पालय उभारण्यात येणार असून त्यासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळालेली आहे. दरम्यान, येत्या काही महिन्यांत सर्पालयाच्या बांधकामास सुरुवात होणार आहे.
प्राणीसंग्रहालय प्रशासनाने सर्पालयाबाबतचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी सादर केला होता. त्या प्रस्तावास मागील महिन्यांत केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळाली आहे. यानुसार काही दिवसांत सर्पालयासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत. आलेल्या निविदांची छाननी करून सर्पालयाच्या बांधकामास सुरुवात करण्यात येणार असून २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली. दरम्यान, जुने सर्पालय तोडून १६८०० चौरस फूट जागेत नव्याने बांधण्यात येणार आहे. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना यापुढे विविध प्रजातींचे साप पहायला मिळतील. सध्या प्राणी संग्रहालयात पेंग्विन, वाघ, देशी अस्वल आदी प्राणी उपलब्ध आहेत.
Follow us on
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngwing.com_.png)
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngegg-3-280x280.png)
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngegg-1-280x280.png)
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngegg-2-1-280x7.png)
Mumbai Local: पश्चिम रेल्वेच्या वैतरणास्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब समोर आली आहे. हा प्रकार रेल्वे प्रशासनाच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या काही गाड्या पालघर स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या लोकल गाड्यांच्या वेळापत्रकारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैतरणा स्थानकाजवळ मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ या मार्गावरील गाड्या पालघर स्थानकावरच रोखल्या. वेळीच खबरदारी घेण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.
या घटनेमुळे मुंबईच्या दिशेने होणारी वाहतुक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सकाळी कामाला जाणार्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रूळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे रेल्वे अधिकार्यांनी सांगितले आहे.
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngwing.com_.png)
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngegg-3-280x280.png)
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngegg-1-280x280.png)
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngegg-2-1-280x7.png)
मुंबई: मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर डोंगरगाव/ कुसगांव येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर्स बसविण्याचे काम सुरू आहे. या कारणाने दि. 22, 23 आणि 24 जानेवारी असे तीन दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक ण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे
या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी पुणे वाहिनीवरील वाहतूक द्रुतगती मार्गाच्या किमी क्रमांक 54/700 वळवण ते वरसोली टोल नाका (राष्ट्रीय महामार्ग क्र. 48) येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. वरील तिन्ही दिवस दुपारी 3 वाजल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवरुन सोडण्यात येईल. तसेच या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरुन सुरू राहणार आहे. (Mumbai Pune Expressway)
द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या अनुषंगाने आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. या कालावधीदरम्यान वाहनचालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. 9822498224 या किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाच्या अधिकार्यां तर्फे करण्यात आले आहे.
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngwing.com_.png)
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngegg-3-280x280.png)
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngegg-1-280x280.png)
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngegg-2-1-280x7.png)
Mumbai Local : मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. एसी लोकल खरेदी करण्याचा प्रस्ताव पुन्हा रुळावर आला असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट अंतर्गत मुंबईला तब्बल २३८ नव्या एसी लोकल ट्रेन मिळणार आहेत.शनिवारी अश्विनी वैष्णव यांनी अनेक प्रकल्पांवर भाष्य केले. तेव्हा त्यांनी एसी लोकल खरेदीबाबत माहिती दिली.
मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या फेज 3 आणि 3 A अंतर्गत, मुंबईत लवकरच २३८ एसी लोकल ट्रेन धावणार आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०२३ मध्ये मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) एसी लोकल ट्रेनसाठी जागतिक निविदा काढल्या होत्या. खरेदी रखडल्याने हा उपक्रम पुढे ढकलण्यात आला. आता १८ महिन्यांनंतर एसी लोकल खरेदीवर भर देण्यात येत आहे.
एमयूटीपी म्हणजेच मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या मूळ योजनेनुसार, फेज 3 मध्ये ४७ एसी लोकल गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. यासाठी अंदाजे ३,४९१ कोटी रुपये इतका खर्च येऊ शकतो. तर फेज 3 A मध्ये १९१ एसी लोकल गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. यासाठी अंदाजे १५,८०२ कोटी रुपये इतका खर्च येऊ शकतो.एसी लोकल खरेदीबाबतच्या निर्णयामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. यामुळे प्रवाशांना उन्हाळ्यात एसी लोकलने प्रवास करता येईल. शिवाय याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर देखील होऊ शकतो असे म्हटले जात आहे. तरी या २३८ एसी ट्रेन मुंबईत कधी धावणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngwing.com_.png)
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngegg-3-280x280.png)
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngegg-1-280x280.png)
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngegg-2-1-280x7.png)
Mumbai Local: मिरा रोड रेल्वे स्थानकावर एकाच ट्रॅकवर दोन लोकल समोरासमोर आल्याची धक्कादायक बातमी आज समाज माध्यमांवर आज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. मोठा अपघात थोडक्यात टळला अशा या शीर्षकाखाली न्यूज चॅनेल्सने सुद्धा या बातमीचा मोठा गाजावाजा केला होता. मात्र ही बातमी खोटी असल्याचा खुलासा पाश्चिम रेल्वेने केला आहे.
“सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिशाभूल करणारा आहे. मीरा रोड स्थानकावर एकाच रुळावर गाड्या जवळपास समोरासमोर आल्याची कोणतीही घटना घडलेली नाही. आज 17.00 वाजता, एक लोकल ट्रेन पुरेशा आणि सुरक्षित अंतर राखून त्याच ट्रॅकवर दुसऱ्याच्या मागे उभी होती. हे ऑपरेशनल नियमांनुसार होते. उपनगरीय ट्रेन ऑपरेशन नियमानुसार, जर सिग्नल दिवसा 1 मिनिटांपेक्षा जास्त काळ लाल असेल (आणि रात्री 2 मिनिटे) तर EMU ट्रेन मर्यादित वेगाने पुढे जाऊ शकते आणि पुढील ट्रेनच्या जवळ येऊ शकते.सुरक्षा प्रोटोकॉलनुसार हे पूर्णपणे सुरक्षित आहे. नागरिकांना विनंती आहे की त्यांनी अफवा पसरवणे आणि दहशत पसरवणे थांबवावे.” अशा शब्दात पाश्चिम रेल्वे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.
Follow us on![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngwing.com_.png)
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngegg-3-280x280.png)
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngegg-1-280x280.png)
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngegg-2-1-280x7.png)
The viral video circulating on social media is misleading.
No such incident of trains nearly meeting head-on on the same track at Mira Road Station has occurred..
At 17.00 hrs today , a local train was held up behind another on the same track, maintaining an adequate and safe…
— Western Railway (@WesternRly) January 15, 2025
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngwing.com_.png)
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngegg-3-280x280.png)
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngegg-1-280x280.png)
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngegg-2-1-280x7.png)
Mumbai: विरारहून मुंबईकडे जाणाऱ्या फास्ट लाईनच्या अप मार्गावर काल मंगळवारी रेल्वे रुळ वाकल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे विरार चर्चगेट एसी ट्रेनचा जागच्या जागी ब्रेक मारल्यानं वेस्टर्न लाईनवर मोठा अनर्थ टळलाय. ट्रेनचा मोटरमन रुळावर लक्ष ठेवून होता आणि त्याला वाकलेला ट्रॅक दिसताच त्याने गाडी थांबवली. पुढील दुर्घटना होऊ नये म्हणून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित कळवले. त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. परंतू ट्रॅक नक्की कशामुळे वाकला? याचे नेमके कारण स्पष्ट होऊ न शकल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.
मंगळवारी दुपारी 12.45 ला विरारहून सुटलेली एसी लोकल विरार-नालासोपारा स्थानकादरम्यान आली असता मोटरमनच्या लक्षात वाकलेला रेल्वे रुळ आला. त्याने तत्काळ लोकल थांबवून वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर मागून येणाऱ्या जनरल लोकललाही थांबवण्यात आले. दोन्ही लोकल थांबल्याने अनेक प्रवाशांनी गाडीतून उतरून पायी नालासोपारा स्थानक गाठले. रेल्वे प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करत फास्ट ट्रॅकवरील वाहतूक स्लो ट्रॅकवर वळवली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून वाकलेला रुळ पूर्णपणे बदलला, त्यानंतर फास्ट लाईनवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, ट्रॅक वाकण्याचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
या घटनेमुळे प्रवाशांना काही काळ गैरसोय सहन करावी लागली. मात्र, मोटरमनच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप राहिले. त्याच्या वेगवान निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला. प्रवाशांनी मोटरमनचे आभार मानले असून, त्यांच्या सतर्कतेची प्रशंसा केली आहे. रेल्वे प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून, ट्रॅक वाकण्याचे कारण शोधण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी रेल्वे ट्रॅकच्या देखभालीवर अधिक भर दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. मोटरमनच्या निर्णयामुळे एका मोठ्या दुर्घटनेची टांगती तलवार टळली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रशासनाकडून अधिक मजबूत सुरक्षा उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngwing.com_.png)
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngegg-3-280x280.png)
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngegg-1-280x280.png)
![](https://kokanai.in/wp-content/uploads/2022/11/pngegg-2-1-280x7.png)
मुंबई: रस्त्यावरची ट्रॅफीक हवेत नेण्यासाठी परिवहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जबरदस्त प्लान बनवत आहेत. मुंबई आणि ठाण्यात केबल टॅक्सी सुरु केली जाणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यात रस्ते वाहतुकीवर येणारा ताण कमी करण्यासाठी एमएमआर क्षेत्रात भविष्यात केबल टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे. केबल टॅक्सी प्रकल्प हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सध्या युरोपियन देशांमध्ये केबल टॅक्सी सेवा सुरू आहे. बंगळुरूतील रोप वे वाहतुकीचा अभ्यास करुन अहवाल तयार केला जाणार आहे. याच्या मदतीनेच मुंबई आणि ठाण्यात केबल टॅक्सी सुरु केली जाणार आहे. सध्या महाराष्ट्रात कुठेही केबल टॅक्सी कुठेच सुरु नाही. केबल बोर्न टॅक्सी ही रोप वे प्रमाणे काम करेल. यामध्ये एका वेळी 15-20 प्रवाशांची वाहतूक करता येईल. हा प्रकल्प मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (एमएमआरडीए) च्या अंतर्गत नसून राज्य सरकारच्या परिवहन विभागाच्या अंतर्गत असेल असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. आपण मेट्रो चालवू शकलो तर केबल टॅक्सी चालवायला काहीच हरकत नाही, कारण रोप वे बांधण्यासाठी आपल्याला जास्त जमीन लागणार नाही असेही असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.
सरनाईक यांच्या आधी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही केबल टॅक्सी हे वाहतुकीचे उत्तम साधन असल्याचे सांगितले होते. केबल टॅक्सी पॉड टॅक्सी म्हणूनही ओळखली जाते. केबल टॅक्सी वीज आणि सोलर एनर्जीवर चालते. हे वाहतुकीचे अतिशय पर्यावरणपूरक साधन आहे.