Category Archives: रत्नागिरी

श्री रामवरदायिनी देवस्थान ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान.

   Follow us on        

चिपळूण:- श्री रामवरदायिनी मंदिर देवस्थान ट्रस्ट, यांच्या वतीने मजरे दादर, कळकवणे येथे दसपटी विभागातील शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केलेल्या श्री समर्थ अविनाश शिंदे कळकवणे (आय. ए. एस), कु. हरिज्ञा लक्ष्मण शिंदे ओवळी (नेव्ही अधिकारी), श्री अथर्व श्रीधर कदम टेरव (सी. ए.), कु. स्नेहा अरूण शिंदे कळकवणे (सी. ए.), श्री शुभम शशिकांत शिंदे कोळकेवाडी (कबड्डी क्षेत्रात विशेष प्राविण्य), डॉ. सलोनी सुभाष शिंदे तिवरे (एम.बी.बी.एस.), श्री कृपाल दिलीप शिंदे कोळकेवाडी (पी. एच.डी. डॉक्टरेट परीक्षेत विशेष प्राविण्य), कु. अनुजा अनिल चव्हाण मोरवणे (डॉक्टरेट इन फिजिओथेरपी), श्री निलेश कृष्णाजी शिंदे कळकवणे (वैद्यकीय क्षेत्रात विशेष पुरस्कार) प्राप्त केलेल्या या नवरत्नांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व दसपटीभूषण, दसपटीरत्न असे सन्मानचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले.

सदर किर्तींवंतांचा गौरव करताना न्यासाचे अध्यक्ष श्री प्रतापराव शिंदे यांनी सांगितले की या गुणवंतांनी घेतलेले कठोर परिश्रम, चिकाटी, सातत्य तसेच आईवडिलांचे व कुलस्वामिनी रामवरदायिनी- भवानीचे आशीर्वाद यामुळेच त्यांना हे घवघवीत यश प्राप्त झाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपण आपल्या समाजाचेही काही देणे लागतो याचा विसर पडू देवू नये असा मोलाचा सल्ला दिला.

गुणवंतांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमचे गुणगौरव सोहळे अनेक झाले पण आई रामवरदायिनीच्या प्रांगणात आमच्या समाज बांधवांनी केलेला सन्मान आमच्यासाठी विशेष आहे व त्यामुळे आम्ही सर्व भारावून गेलो आहोत.

या सन्मान सोहळ्यास न्यासाचे विश्वस्त, व्यवस्थापन समिती, सल्लागार समिती, दसपटी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, दसपटी विभागातील मान्यवर तसेच आदरणीय समाज बांधव उपस्थित होते.

Loading

रत्नागिरी जिल्ह्यातील ३११ गावे ‘इको सेन्सेटिव्ह झोन’ मध्ये समाविष्ट

   Follow us on        
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील ३११ गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत कुणाच्या हरकती असल्यास ६० दिवसांत हरकती सादर कराव्यात, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.
केंद्र शासनाच्या पर्यावरण , वने व वातावरण बदल यांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्धीसाठी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि संगमेश्वर या पाच तालुक्यांतील ३११ गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित केली आहे. या मसुदा अधिसूचनेत नमूद केल्यानुसार क्षेत्रातील ज्या स्थानिक रहिवासी यांची यासाठी हरकत आहे, त्यांनी साठ दिवसांच्या आत केंद्र शासनाच्या पर्यावरण वने व वातावरण बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली- ११०००३ यांच्याकडे हरकत नोंदविणे आवश्यक आहे.महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूरचे सदस्य सचिव तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडील केंद्र शासनाचे पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाचे अधिसूचना पत्रासह प्राप्त झाले आहे. त्यानुसार चिपळूण, खेड, राजापूर, रत्नागिरी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार चिपळूण, खेड, लांजा, राजापूर व संगमेश्वर यांना ही अधिसूचना स्थानिक पातळीवर प्रसिद्ध करून अधिसूचनेबाबत हरकतीचा अहवाल सादर करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
कोणत्या तालुक्यात किती गावे?
या ३११ गावांमध्ये चिपळूण तालुक्यातील ४४ गावांचा, खेड तालुक्यातील ८५ गावांचा, राजापूर तालुक्यातील ५१ गावांचा, संगमेश्वर तालुक्यातील ८ गावांचा समावेश आहे.

Loading

Konkan Railway: संगमेश्वर स्थानकावर ३ गाडय़ांना थांबे मिळण्याची शक्यता

समाजमाध्यमांचा, पत्रकारितेचा प्रभावी वापर आणि उत्तम राजकिय नेतृत्व यांचा उत्तम मिलाफ 

   Follow us on        

चिपळूण दि. २४ जुलै: निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर या फेसबुक ग्रुपच्या सदस्यांनी संगमेश्वर चिपळूण मतदारसंघाचे आमदार श्री शेखर निकम यांच्यासोबत आज कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांची विविध मागण्यांसाठी आज भेट घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून संतोष कुमार झा यांनी निवेदनात दिलेल्या मागण्यांसाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे वचन दिले असल्याचे पत्रकार संदेश जिमन यांनी सांगितले.

संगमेश्वर स्थानकाचे उत्पन्न आणि प्रवासी संख्या पाहता येथे काही 9 गाड्यांना थांबा मिळावा अशी आमची मागणी होती. आमदार निकाम सर यांच्यामुळे या बैठकीचा योग जुळून आला असून निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर या फेसबुक ग्रुपच्या वतीने मी त्यांचे तसेच श्री झा साहेबांचे आभार मानतो. संगमेश्वरला लवकरच किमान 9 पैकी 3 गाडयांना थांबा मिळेल अशी आशा आज निर्माण झाली आहे. या प्रसंगी आमदार आदरणीय शेखर सर, ग्रुपच्या वतीने श्री दीपक पवार, संतोष पाटणे, समीर सप्रे, अशोक मुंडेकर, सुशांत फेपडे आदी उपस्थित होते अशी माहिती पत्रकार संदेश जिमन यांनी दिली.

संगमेश्वर मध्येच या तीन गाड्याना थांबा मिळण्याची दाट शक्यता

▪️1) 110099/11000 LTT मडगांव LTT

▪️2) 19577/19578 जामनगर तिरुनलवेली एक्सप्रेस

▪️3)20909/20910 कोचिंवेल्ली पोरबंदर एक्सप्रेस

समाजमाध्यमांचा, पत्रकारितेचा प्रभावी वापर आणि उत्तम राजकिय नेतृत्व यांचा उत्तम मिलाफ

पत्रकार संदेश जिमन यांनी समाज माध्यमातून नेहेमीच संगमेश्वर, चिपळूण येथील रेल्वे प्रवाशांसाठी आवाज उठवला आहे. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून मागच्या वर्षी नेत्रावती एक्सप्रेसला संगमेश्वर येथे थांबा मिळवून दिला होता. त्यांच्या कार्याचे त्यावेळी मोठे कौतुक झाले होते आणि प्रवासी संघटनेंकडून त्यांचा सत्कारही करण्यात आला होता. सामान्य जनतेचा आवाज प्रशासनाकडे पोहोचविण्यासाठी समाज माध्यमांचा उत्तम वापर कसा करता येईल याचे एक उत्तम उदाहरण त्यांनी दिले आहे. आपल्या मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी आणि सोयींसाठी आमदार शेखर निकम नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. रेल्वे प्रश्नासंबंधी त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्यांच्या रूपाने या मतदारसंघात एक उत्तम नेतृत्व लाभले असल्याची जनतेची भावना आहे.

 

 

 

 

Loading

बेस्ट हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने सुमन विद्यालय टेरव येथे मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

चिपळूण: जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचालित सुमन विद्यालय टेरव या प्रशालेमध्ये शुक्रवार दिनांक १९ जुलै २०२४ रोजी बेस्ट हनुमान मंदिर ट्रस्ट सांताक्रुझ, मुंबई यांच्यावतीने इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना एकूण ७०८ वह्यांचे वितरण करण्यात आले.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे संचालक तसेच सरस्वती कोचिंग क्लासेस, सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट, सरस्वती फाउंडेशन मुंबईचे विश्वस्त व महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री.सुधाकरराव कदम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रशालाचे मुख्याध्यापक श्री. मंदार सुर्वे सर यांनी श्री. सुधाकरराव कदम यांचा विशेष सन्मान केला. त्याचप्रमाणे बेस्ट हनुमान मंदिर ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष श्री.नंदकुमार राणे साहेब आणि न्यासाचे चिटणीस व काडवली गावचे सुपुत्र श्री.नारायण चव्हाण साहेब यांचे जय भवानी एज्युकेशन सोसायटी आणि सुमन विद्यालय टेरव यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. त्यानंतर इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गवार वह्यांचे वितरण करण्यात आले. सदर शैक्षणिक मदत विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी सरस्वती कोचिंग क्लासेस मुंबईचे संस्थापक तसेच जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार श्री.अजितराव कदम त्याचप्रमाणे श्री.सुधाकरराव कदम यांनी विशेष प्रयत्न केले. सदर मोफत वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मंदार सुर्वे सर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अमोल टाकळे सर यांनी केले.

 

Loading

Breaking: रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,अनेकांचे सुरक्षित जागी स्थलांतर

   Follow us on        
रत्नागिरी: चिपळूण खेड दापोली भागात पावसाचा जोर वाढत चालला आहे रविवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खेड येथील जगबुडी नदीला पूर आला आहे. खेड बाजारपेठेत पाणी शिरले आहे. यंत्रणा अलर्ट झाली असून अनेकजणांना सुरक्षितेसाठी स्थलांतरित करण्यात आले आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर सुरू असून अनेक सखल भागात पाणी भरण्याचे प्रकार घडले आहेत. सुरक्षिततेसाठी काही जणांना स्थलांतरित करण्यात येत आहे. खेड शहरातील नदीकाठच्या काही लोकांना स्थलांतरित करण्यात आला आहे. चिपळूण शहरालाही पुराची भीती असून वशिष्ठी नदीने इशारा पातळी गाठली आहे. या सगळ्या वरती चिपळूण व खेड नगरपरिषद प्रशासन लक्ष देऊन असून अलर्ट मोडवर आहे. तर तिकडे गुहागर तालुक्यात खवळलेल्या समुद्रात नौका बुडाली आहे, सुदैवाने आतील चार ते पाच खलाशी हे सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले आहेत.गुहागर तालुक्यात पाचेरी सडा येथे मार्गावरील येथे डोंगर खचण्याचा प्रकार घडला असून माती रस्त्यावरती आली आहे. त्यामुळे येथील बौद्धवाडी येथील काय कुटुंबांना त्यामुळे स्थलांतर करण्यात आल आहे. गुहागर तालुक्यातील अति दुर्गम भाग असलेल्या पाचेरी सडा हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अशातच रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोठी भरती असल्याने पुराच पाणी च पाणी चिपळूण व खेड बाजारपेठेत भरण्याची भीती व्यक्त होत आहे. खेडच्या जगबुडीने सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दरम्यान धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड दापोली रस्ता पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Loading

खळबळजनक: खासदार नारायण राणे यांच्यापासून जीवितास धोका; पोलीस महासंचालकांकडे कारवाईची मागणी, वाचा कोणी केली ही मागणी

   Follow us on        

रत्नागिरी, दि. १२ जुलै:भाजपचे खासदार नारायण राणे हे आपल्या एका वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बारसु रिफायनरी आंदोलकांनी पोलीस महासंचालक ,महाराष्ट्र राज्य यांना एका पत्राद्वारे भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यापासून जीवास धोका असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

मंगळवारी (ता. ९) खासदार नारायण राणे यांनी राजापूर येथे केलेल्या या वक्तव्यानुसार ‘’बारसू रिफायनरी विरोधकांना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येवू दिले जाणार नाही आणि आले तर बाकीची जबाबदारी आमची, पोलिसांची नाही” , अशी गंभीर धमकी दिली आहे. या धमकीची आपण गांभीर्याने दखल घ्यावी व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून आम्हा सर्वांच्या जीविताचे रक्षण करावे, असे या पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

नारायण राणे यांची गुन्हेगारी वृत्तीचा पूर्वइतिहास पाहता रिफायनरीला विरोध करणार्‍या स्थानिक ग्रामस्थांचे प्रतिनिधी यांच्या जीवितास धोका आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. रिफायनरीला विरोध करणाऱ्या आम्हा सर्वांच्या जीविताचे रक्षण करावे, असेही या निवेदनात म्हंटले आहे.

Loading

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात मुसळधार पाऊस, रस्त्यावर पाणीच पाणी, शाळांना सुट्टी जाहीर. आंबोली धबधब्यावर प्रशासनाची खबरदारी

   Follow us on        

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुवांधार कोसळत असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून आंबोलीत धबधब्यातील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. वाढत्या प्रवाहामुळे आज येथील आलेल्या पर्यटकांना खबरदारी म्हणून खाली उतरविण्यात आले आणि प्रवेश बंद करण्यात आला. वेंगुर्ला बेळगाव मार्गावर माडखोल बाजारात चार फूट पाणी आल्याने येथील रस्ताही काही कालावधी साठी बंद होता.

हवामान खात्याने आज सिंधदुर्गला दक्षतेचा ‘रेड’ अलर्ट दिला होता. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला आहे. सिंधुदुर्गात आज मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून अनेक ठिकाणी रस्त्यावर आणि तसेच बाजारात पाणी साचल्याने येथील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले आहे. सावंतवाडी शहरातही मुसळधार पाऊस झाल्याने बाजारपेठ तसेच रस्ते पाण्याने भरले आहेत. खारबारदारी म्हणून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

जिल्ह्यात उद्याही पावसाचा जोर कायम
हवामान खात्याने पुढील चार दिवसांचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असून त्यानंतर पावसाचा जोर ओसरणार आहे.

Loading

न्याती इंजिनिअर्स ठरली रत्नागिरी विमानतळावरील टर्मिनल इमारत बांधण्यासाठी सर्वात कमी बोली लावणारा बोलीदार

   Follow us on        
रत्नागिरी: न्याती इंजिनिअर्स अँड कन्सल्टंट्स प्रा. लिमिटेड (NECPL) ला बुधवारी कोकणातील रत्नागिरी विमानतळावर (RTC) नवीन टर्मिनल इमारत बांधण्यासाठी सर्वात कमी बोली लावणारा बोलीदार Bidder म्हणून घोषित करण्यात आले आहे. 
मिरजोळे गावातील रत्नागिरी विमानतळ हे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) च्या मालकीचे आहे आणि सध्या नजर ठेवण्यासाठी आणि शोध तसेच बचाव कार्यासाठी भारतीय तटरक्षक दलाचे एक स्टेशन आहे.महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी (MADC) द्वारे आता 3200 चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेल्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारत, लिंक टॅक्सीवे आणि दोन ATR-72 प्रकारची विमाने हाताळण्यास तजवीज करण्यात येत आहे. त्यासाठी MADC ने मार्च 2024 मध्ये नवीन टर्मिनल इमारत  बांधकाम कामासाठी रु. 50.52 कोटी अंदाज आणि 540 दिवस (1.47 वर्ष) बांधकाम  मुदतीसाठी निविदा मागविल्या होत्या. यासाठी आलेल्या ७ बोलीदारापैकी, फुलारी रियल्टी, नेश आर्किटेक्ट्स आणि एससीसी इन्फ्रास्ट्रक्चर या 3 कंपन्यांनी सादर केलेल्या निविदा तांत्रिकदृष्ट्या  अटींचे पालन करत नसल्याने त्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. 
इतर बोलीदारांनी लावलेल्या बोली खालीलप्रमाणे 
न्याती इंजिनिअर्स अँड कन्सल्टंट्स प्रा. लिमिटेड – ५७.६४ कोटी रुपये 
हायटेक इन्फ्रा – ६०.२१ कोटी रुपये  
जेनेरिक इंजिनीरिंग  – ६३ .१५ कोटी रुपये  
अजवानी इन्फ्रा – ६४.०० कोटी रुपये 
NECPL अंदाजरकमेच्या 14.09% जास्त असल्याने करारासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी बोलीदार आणि MADC मध्ये पुढील वाटाघाटी होणार आहेत. 

Loading

Revas Reddy Coastal Highway: अजून दोन पुलांच्या बांधकामासाठीच्या निविदा उघडल्या; ‘या’ कंपनीने लावली सर्वात कमी बोली

   Follow us on        
Revas Reddy Coastal Highway Updateds: रेवस-रेड्डी कोस्टल हायवे बद्दल एक महत्वाची माहिती समोर येत आहे. अशोका बिल्डकॉन लिमिटेड (ABL) या कंपनीलाला शुक्रवारी कोकणातील  जयगड आणि कुंडलिका नद्यांवर दोन नवीन पुलांच्या नागरी बांधकामासाठी सर्वात कमी बोली लावणारा बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले आहेत. 
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRDC ने दोन्ही पुलांच्या बांधकामासाठी मार्च 2024 मध्ये 3 वर्षांच्या बांधकाम मुदतीसह निविदा मागवल्या होत्या. अशोका बिल्डकॉन आणि हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी (HCC) या दोन्ही करारांसाठी आपल्या निविदा सादर केल्या होत्या. 
जयगड खाडी पूल
रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड नदीवरील तवसल आणि सांडेलवगण यांना जोडणारा 2 लेन असलेला 4.4 किमी लांबीचा जयगड खाडी पुलाच्या बांधकामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. 
MSRDC चा अंदाज: रु. 625.87 कोटी
पक्की बोली (रु. कोटी)
Ashoka -794.85
HCC – 826.15
जयगड खाडी पूल
कुंडलिका खाडी पूल
3.8 किमी लांबीचा कुंडलिका पूल 2 लेनसह रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीवरील रेवदंडा आणि साळव यांना जोडेल. या पुलाला रेवदंडा खाडी पूल असेही संबोधले जाते.
MSRDC चा अंदाज: रु. 1061.67 कोटी
पक्की बोली (रु. कोटी)
Ashoka -1357.87
HCC  – 1422.64
कुंडलिका खाडी पूल
अशोका बिल्डकॉन लिमिटेड ची बोली जयगड पुलासाठी 794.85 कोटी आणि रु. कुंडलिका पुलासाठी 1357.87 कोटी हे MSRDC च्या अंदाजापेक्षा 26.99% आणि 27.89% जास्त होते, त्यामुळे वाटाघाटी करून अंतिम निर्णय घेण्यात येईल. 
या मार्गावरील निविदांची आतापर्यंतची माहिती 
• आगरदांडा क्रीक ब्रिज – HCC सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• धरमतर क्रीक ब्रिज – Afcons इन्फ्रास्ट्रक्चर ही सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• जयगड खाडी पूल – अशोका बिल्डकॉन सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• कुंडलिका ब्रिज – अशोका बिल्डकॉन सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• कुणकेश्वर पूल – विजय एम मिस्त्री बांधकाम कंपनी  सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• काळबादेवी पूल – विजय एम मिस्त्री बांधकाम कंपनी  सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• बाणकोट खाडी पूल – बोलीसुरू आहे (निविदा उघडण्याची तारीख: ७ जून)
• दाभोळ खाडी पूल – बोली सुरू आहे ( निविदा उघडण्याची तारीख: ७ जून)

Loading

गणपतीपुळे येथे समुद्रात बुडून पर्यटकाचा मृत्यू; तिघांना वाचविण्यात यश

   Follow us on        
रत्नागिरी, दि. २ जून : सोलापूर येथून गणपतीपुळे येथे देवदर्शन व पर्यटनाला आलेल्या एकाचासमुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने एकाचा बुडून मृत्यू झाला. आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अजित धनाजी वाडेकर (वय २५, रा. इसबावी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे मृताचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी कि सोलापूर जिल्ह्यातील इसबावी येथून अजित वाडेकर, अजय बबन शिंदे (वय २३), सार्थ दत्तात्रय माने (वय २४) व आकाश प्रकाश पाटील (वय २५) असे चार तरुण गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी व पर्यटनासाठी आले होते. गणपतीपुळे येथे समुद्रात अंघोळ करण्याचा मोह टाळता आला नाही. प्रथम देवदर्शन न करता ते समुद्रात अंघोळीसाठी उतरले. पोहता पोहता खोल पाण्यात जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी अजित वाडेकर हा खोल समुद्राच्या पाण्यात प्रवाहात अडकला. अजितला पाण्याबाहेर येता येत नसल्याचे लक्षात येताच त्याच्याबरोबर असलेल्या तरुणांनी व इतर पर्यटकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. किनाऱ्यावर असलेल्या गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक व गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राचे सहायक पोलिस उपनिरीक्षक संदीप साळवी, हवालदार कुणाल चव्हाण यांनी किनाऱ्याकडे धाव घेतली. जीवरक्षक अक्षय माने, महेश देवरुखकर, अंजिक्य रामाणी, विशाल निंबरे आदींसह किनाऱ्यावरील येथील व्यावसायिक राकेश शिवलकर यांनी पाण्यात उड्या घेतल्या. समुद्राच्या खोल पाण्यात अडकलेल्या तीन तरुणांना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर समुद्राच्या पाण्यात अडकलेल्या अजित वाडेकर या तरुणाला वाचविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याला पाण्याबाहेर काढल्यानंतर तो बेशुद्ध झाल्याने गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने तातडीने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी नेण्यात आले; मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्याने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा जाधव यांनी त्याला मृत घोषित केले. या तरुणाचे शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्रातून देण्यात आली. या घटनेचा अधिक तपास जयगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search