Author Archives: Kokanai Digital

पाश्चिम उपनगरीय रेल्वेमार्गावर AC आणि Non-AC फेऱ्यांमध्ये वाढ होणार..

मुंबई : पाश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील वाढती गर्दी आणि AC लोकल्सना मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन पाश्चिम रेल्वे प्रशासनाने AC आणि Non-AC फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ऑक्टोबरपासून 20 AC लोकल्स आणि 10 Non-AC लोकल्स ह्या मार्गावर वाढविण्यात येतील.

सध्या चर्चगेट ते डहाणू ह्या मार्गावर एकूण 1375 लोकल्स फेर्‍या चालविण्यात येत आहेत त्यामधे 48 फेर्‍या AC लोकल्स च्या आहेत. ह्या मार्गावर सुमारे 30 लाख प्रवाशी दररोज प्रवास करतात त्यामधे सुमारे 1 लाख प्रवासी AC लोकल्सने प्रवास करतात. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात AC लोकल्सने प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या 25% वाढली आहे. मध्य उपनगरीय रेल्वेशी तुलना करता ह्या मार्गावर AC लोकल्सना मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन ह्या मार्गावर 20 AC लोकल्स वाढवायच्या निर्णय घेतला आहे.

ह्या सर्व वाढिव सेवांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

Loading

खुशखबर…गणेशोत्सव दरम्यान तुतारी एक्सप्रेस अतिरिक्त डब्यांसोबत चालविण्यात येणार…..

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने दादर – सावंतवाडी तुतारी 11003/11004 एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

 ही गाडी नियमित 19 डब्यांसोबत चालविण्यात येते. आता त्यात अतिरिक्त 5 डबे वाढवून त्या आता 24 डब्यांसोबत चालविण्यात येणार आहेत.  AC Three Tier 1 डबा + Sleeper Coach 2 डबे + Second Seating 2 असे एकूण 5 अतिरिक्त डबे जोडण्यात येतील.

ही गाडी दिनांक २७/०८/२०२२ ते १२/०९/२०२२ ह्या कालावधीत अतिरिक्त डब्यांसोबत चालविण्यात येतील.रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना ह्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

.

Related :कोकणात गावी जाणार्‍या गणेशभक्तांना खुशखबर.. ह्या गाड्यांचे डबे कोकण रेल्वे प्रशासनाने वाढवले.

 

Loading

खाजगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना इशारा – गणेशोत्सव काळात अधिक भाडे आकारल्यास कठोर कारवाई.

हंगामाच्या काळात प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेऊन अव्वाच्या सव्वा प्रवास भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना राज्य परिवहन विभागाने इशारा दिला आहे. नेहमीच्या भाड्यापेक्षा दीडपट किंवा दुप्पट प्रवास भाडे आकारत आहे अशी तक्रार आल्यास त्या व्यावसायिकावर कठोर कारवाई केली जाईल असे जाहीर करण्यात आले आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात गावी खूप मोठ्या संख्येने चाकरमानी गावी जातो. रेल्वे आणि ST बससेवा आपल्या विशेष फेर्‍या ह्या काळात सोडतात. पण त्या अपुऱ्या पडतात त्यामुळे चाकरमानी खाजगी ट्रॅव्हल्स चा पर्याय निवडतात. ह्या मजबुरीचा फायदा खाजगी ट्रॅव्हल्स व्यावसायिक घेतात आणि दुप्पट भाडे आकारतात असे निदर्शनास आले आहे. ह्या काळात 700/800 असणारे प्रवासभाडे 1500/2000 च्या घरात जाते आणि ह्याचा फटका चाकरमान्यांचा खिशाला बसतो.

असे प्रकार आढळल्यास प्रवाशांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.

   

Loading

अखेर ‘त्या’ AC लोकल्स रद्द करून Non-AC स्वरुपातच चालवण्याचा निर्णय.

मुंबई : मध्य रेल्वेच्या 10 सेवा AC लोकल्स मध्ये परावर्तित करण्याचा निर्णय तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात येत आहे. त्या १० सेवा २५.०८.२०२२ पासून आधी पूर्वीप्रमाणे Non AC स्वरुपात चालविण्यात येतील. AC सेवा पुन्हा सुरू करण्याची तारीख पुनरावलोकनानंतर कळविण्यात येईल असे आज मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.

मागील आठवडय़ात मध्य रेल्वेच्या 10 गाड्या AC लोकल्स मध्ये परावर्तित केल्या गेल्या होत्या. ह्या निर्णयाचा प्रवाशांकडून विरोध झाला होता. कळवा आणि बदलापुरात आंदोलने पण करण्यात आली होती. सोशल मीडियावर पण ह्या संदर्भात विरोध दर्शवला गेला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पण विधी मंडळात ह्या विरुद्ध आवाज उठवला होता. ह्या गाड्या पुन्हा सामान्य स्वरुपात चालविण्यात याव्यात म्हणुन प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी निवेदने दिली. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे समजते.

Loading

कोकणात गावी जाणार्‍या गणेशभक्तांना खुशखबर.. ह्या गाड्यांचे डबे कोकण रेल्वे प्रशासनाने वाढवले.

कोकणात गावी जाणार्‍या गणेशभक्तांसाठी खुशखबर. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने काही गाड्यांच्या डब्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

खालील गाड्या ह्या अतिरिक्त डब्यांसोबत चालविण्यात येतील. ह्या गाड्या आधी 12 डब्यांसोबत चालविण्यात येणार आहे असे जाहीर करण्यात आले होते. आता त्यात अतिरिक्त 5 डबे वाढवून त्या आता 17 डब्यांसोबत चालविण्यात येणार आहेत. AC Two Tier 2 डबे + AC Three Tier 2 डबे + AC Chair Car 1 डबा असे एकूण 5 अतिरिक्त डबे जोडण्यात येतील. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना ह्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

1) Lokmanya Tilak T – Madgaon Weekly Express. 11099

ही गाडी 27.08.2022 आणि 10.09.2022 ह्या दिवशी (शनिवार) लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन ह्या दरम्यान चालवण्यात येणारी गाडी.

2) Madgaon – Lokmanya Tilak T Weekly Express. 11100

ही गाडी 28.08.2022 आणि 11.09.2022 ह्या दिवशी (रविवार) मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस ह्या दरम्यान चालवण्यात येणारी गाडी.

1) Lokmanya Tilak T – Madgaon Bi-Weekly Express. 11085

ही गाडी 29.08.2022 आणि 07.09.2022 ह्या दिवशी (सोमवार, बुधवार) लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन ह्या दरम्यान चालवण्यात येणारी गाडी.

2) Madgaon – Lokmanya Tilak T Weekly Express. 11086

ही गाडी 30.08.2022 आणि 08.09.2022 ह्या दिवशी (मंगळवार, गुरुवार) मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस ह्या दरम्यान चालवण्यात येणारी गाडी.

Related News  गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या अजून विशेष गाड्या…आरक्षण २५ ऑगस्ट पासून

 

Loading

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या अजून विशेष गाड्या…आरक्षण २५ ऑगस्ट पासून

अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला आहे, त्यात कोकणात उत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना कोकण रेल्वेने खुशखबर दिली आहे. यंदा भाविकांची गावी जाण्यासाठी गर्दी पाहता ह्या अगोदर सोडलेल्या विशेष गाड्यांशिवाय अजून काही गाड्या सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ह्या अतिरिक्त गाड्यांचे आरक्षण दिनांक २५/०८/२०२२ रोजी सर्व आरक्षण खिडक्यांवर आणि ऑनलाईन पोर्टल वर उपलब्ध होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

1) MADGAON JN – PANVEL – MADGAON JN WEEKLY SPL (Fully Reserved)

MADGAON JN – PANVEL-01596

हि गाडी दिनांक ०२/०९/२०२२ आणि ०९/०९/२०२२ ह्या दिवशी (शुक्रवारी) मडगाव येथून दुपारी ३ वाजता सुटेल ती पनवेल स्टेशन ला दुसऱ्यादिवशी सकाळी ०५:१० ला पोहचेल.

MADGAON JN – PANVEL-01595

हि गाडी दिनांक ०४/०९/२०२२ आणि ११/०९/२०२२ ह्या दिवशी (रविवारी) पनवेल येथून दुपारी १६.४५  वाजता सुटेल ती  मडगाव स्टेशनला दुसऱ्यादिवशी सकाळी ०६:००  ला पोहचेल.

ह्या गाड्या  रोहा, माणगाव, वीर, सापे वामने ,खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रॊड, थिवीम, करमाळी ह्या सर्व स्थानकांवर थांबतील.

डब्यांची स्थिती   =   18 Second Seating (SL) + 01 Generator Car + 01 SLR = Total -20 Coaches _________________________________________________________________________________________________________________

 

2) PANVEL – RATNAGIRI – PANVEL WEEKLY SPL (Fully Reserved)

PANVEL – RATNAGIRI -01591

हि गाडी दिनांक ०३/०९/२०२२ आणि १०/०९/२०२२ ह्या दिवशी (शनिवारी) पनवेल येथून सकाळी ५.४० वाजता सुटेल ती रत्नागिरी स्टेशनला त्याच दिवशी सकाळी ११:४५ ला पोहचेल.

RATNAGIRI – PANVEL -01592

हि गाडी दिनांक ०३/०९/२०२२ आणि १०/०९/२०२२ ह्या दिवशी (शनिवारी) रत्नागिरी येथून दुपारी ०३:०५ वाजता सुटेल ती पनवेल स्टेशन ला त्याच दिवशी रात्री १०:३५ ला पोहचेल.

ह्या गाड्या  रोहा, माणगाव, वीर, सापे वामने ,खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, ह्या सर्व स्थानकांवर थांबतील.

डब्यांची स्थिती   =   18 Second Seating (SL) + 01 Generator Car + 01 SLR = Total -20 Coaches

______________________________________________________________________________________________________________________________________________________________

3) PANVEL – RATNAGIRI – PANVEL WEEKLY SPL (Fully Reserved)

 PANVEL – RATNAGIRI  -01593

हि गाडी दिनांक  ०४/०९/२०२२ आणि ११/०९/२०२२ ह्या दिवशी (रविवारी ) पनवेल येथून रात्री ०१:३०  वाजता सुटेल ती रत्नागिरी स्टेशनला त्याच दिवशी सकाळी ०७:३० ला पोहचेल.

RATNAGIRI – PANVEL -01594

हि गाडी दिनांक  ०४/०९/२०२२ आणि ११/०९/२०२ ह्या दिवशी (रविवारी) रत्नागिरी येथून सकाळी ०८:२० वाजता सुटेल ती पनवेल स्टेशनला त्याच दिवशी  दुपारी  03:२०  ला पोहचेल.

ह्या गाड्या  रोहा, माणगाव, वीर, सापे वामने ,खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, ह्या सर्व स्थानकांवर थांबतील.

डब्यांची स्थिती   =   18 Second Seating (SL) + 01 Generator Car + 01 SLR = Total -20 Coaches

_______________________________________________________________________________________________________________________________________________________________

1) UDHANA- MADGAON – UDHANA BI-WEEKLY SPECIAL ON SPECIAL FARE

UDHANA – MADGAON JN  – 09020

हि गाडी दिनांक २७/०८/२०२२आणि २९/०८/२०२२ ह्या दिवशी (शनिवार आणि सोमवार) उधना येथून दुपारी ३.२५ वाजता सुटेल ती मडगाव स्टेशन ला दुसऱ्यादिवशी सकाळी ०९:३० ला पोहचेल.

MADGAON JN – UDHANA  – 09019

हि गाडी दिनांक २८/०८/२०२२आणि ३०/०८/२०२२ ह्या दिवशी (रविवार आणि मंगळवार) मडगाव येथून सकाळी १०:२० वाजता सुटेल ती उधना स्टेशन ला दुसऱ्यादिवशी सकाळी ०५:०० ला पोहचेल.

ह्या गाड्या  नवसारी, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल रोहा, माणगाव, वीर, सापे वामने ,खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रॊड, थिवीम, करमाळी ह्या सर्व स्थानकांवर थांबतील.

डब्यांची स्थिती  – 01 AC (2A) + 12 Sleeper (SL) + 04 General + 03 AC (3A) + 2 SLR = Total 22 Coaches

अधिक माहितीसाठी  www.enquiry.indianrail.gov.in ह्या संकेतस्थळास भेट द्या.

कोकणात गावी जाणार्‍या गणेशभक्तांना खुशखबर.. ह्या गाड्यांचे डबे कोकण रेल्वे प्रशासनाने वाढवले.

 

 

 

Loading

मुख्यमंत्र्यांचे राज्यातील शेतकऱ्यांना ‘भावनिक पत्र’

राज्यात शेतकर्‍यांच्या होणार्‍या आत्महत्या आपल्याला खूप दुःख होत आहे. तुम्ही आत्महत्या करू नका तुम्हाला अस्मानी संकटातून, सावकारी दृष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशा आशयाचे भावनिक आवाहन त्यांनी आज एका पत्राद्वारे केले आहे. त्यांनी लिहिलेले पत्र खाली वाचा त्यांचाच शब्दात.

महाराष्ट्र हा लढवय्यांचा आहे, तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे, म्हणूनच भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोटीच जन्माला आले आहेत. घाम गाळत, जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचेच नव्हे, तर उभा महाराष्ट्र देशाची भूक भागवण्याचेही काम करत आहात, म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचं असेल तर तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे.

परंतु, अचानक नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होताना पाहून मन कासावीस होऊन जाते, तुमच्यातील काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात नि जगाकडे पाठ फिरवून आत्त्महत्येचा मार्ग पत्करतात.. हे चित्र पाहून मात्र माझं मन एक सामान्य कष्टकरी कुटुंबातील माणूस म्हणून आणि या महाराष्ट्राचा कारभारी म्हणून विषन्न होऊन जातं….वाटतं, कि आपल्याच घरातील कुणी आपण गमावलंय…..

लक्षात घ्या, माझ्या शेतकरी भावांनो, तुम्ही आहात तर छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे…..तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही आहे. तुम्ही आमची संपत्ती आहात, माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना नेहमी म्हणायचे कि, ”रडायचं नाही लढायचं”

शिवछत्रपतींची शपथ घालतो तुम्हला, तुमचा तोलामोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका….आत्महत्या करू नका…मी तुमच्यासारखा रांगड्या मनाचा सरळसाधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात, काळजाला भिडतात. या आस्मानी संकटातून, या सावकारी दृष्टचक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे. आत्मघात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचे लखलखते यश सामावलेले असते……

मी आणि माझं सरकार सतत २४ तास तुमच्यासाठी तुमच्या सोबत आहे, याची खात्री बाळगा…जीव देणं बंद करूयात, जीव लावूयात एकमेंकाना….

चला, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधुयात आणि आपण मिळून हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया….

जय महाराष्ट्र!

 

Loading

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीची कामे २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे बांधकाममंत्री रविन्द्र चव्हाण यांचे आदेश.

 

मुंबई गोवा महामार्गाबाबत सह्याद्री अतिथीगृहात कोकणातील लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत आज बांधकाममंत्री रविन्द्र चव्हाण यांनी आज एक बैठक आयोजित केली होती.

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा रस्तेमार्ग प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी कोकणातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावीत. पूर्ण ताकदीने आणि युद्धपातळीवर काम करा, अशा सूचना बांधकाममंत्री रविन्द्र चव्हाण यांनी या बैठकीत दिल्या.

प्रत्येक जिल्ह्यात रस्ते दुरुस्तीचे काम करणाऱ्या एजन्सीज वाढवून येत्या आठवड्यात प्रामुख्याने खड्डे भरण्याचे काम पूर्ण करणार तसेच याबाबत कोकणातल्या लोकप्रतिनिधींना घेऊनच ते स्वतः सदर कामाच्या प्रगतीचा आढावा प्रत्यक्ष स्थळावर जाऊनच घेणार असे ते बोलले.

याच बरोबर संपूर्ण महामार्गावर वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी जास्तीत जास्त ट्रॅफिक वॉर्डन तैनात करून वाहतुक व्यवस्थापन सुरळीत ठेवण्याचे आदेशही या बैठकी दरम्यान वाहतूक विभागाला दिले आहेत असे त्यांनी पुढे सांगितले.

या बैठकीत शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर, खासदार सुनील तटकरे, खासदार विनायक राऊत, आमदार प्रवीण दरेकर, भरत गोगवले, नितेश राणे, वैभव नाईक,आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) एस. एस. साळुंखे, सचिव (बांधकाम) पी. डी. नवघरे, मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) संतोष शेलार, कोकण विभागाचे मुख्य अभियंता एस. एन. राजभोग, रायगडच्या वरिष्ठ अभियंता श्रीमती सुषमा गायकवाड, रत्नागिरीच्या वरिष्ठ अभियंता श्रीमती नाईक, रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) श्री. जाधव आदी उपस्थित होते.

कालच माध्यमांवर सर्वत्र मुंबई गोवा महामार्गाच्या काही भागाचा खड्ड्यांमुळे झालेल्या अवस्थेचा विडिओ व्हायरल झाला होता. पुढच्याच आठवडय़ात गणेशोत्सवासाठी ह्या मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात रहदारी होणार आहे. ह्या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आल्याचे समजते.

Related कोकणात गणेशोत्सवासाठी गावी जाणार्‍या चाकरमान्यांचे हाल… मुंबई – गोवा महामार्गावर अक्षरशः खड्ड्यांची रांगोळी….

 

Loading

माझ्या माता-बहिणींवर केसेस न पडण्यासाठी मी हात जोडले- निलेश राणे – माजी खासदार

रत्नागिरी : कालची बातमी मीडियाकडून चुकीच्या पद्धतीने दाखवली गेली आहे. जनतेला घटनास्थळी नेमके काय घडले होते हे सांगण्यासाठी मी हा विडिओ पोस्ट करत आहे असे  आज माजी खासदार निलेश राणे हे म्हणाले आहेत. त्यांनी आपल्या बोलण्याच्या पूर्ण विडिओ आज ट्विटर वर पोस्ट केला आहे.

आंदोलनकर्त्यांचा आरोप होता कि माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्याने शिवी घातली, कदाचित अनावधानाने असा प्रकार घडला असेल त्यामुळे मी माफी मागितली. मी माघार घेतली कारण ती सर्व आपलीच माणसे होती आणि काही अनुचित प्रकार घडू नये आणि प्रकरण हाताबाहेर जाऊ नये आम्ही थोडे नमते घेतले, कारण काही विपरीत घडले असते तर माझ्या त्या आई बहिणींवर केसेस पडल्या असत्या आणि मला ते नको होते, म्हणून मी हात जोडलेत. एवढेच नाही तर मी त्यांना तुम्ही मला बोलवाल तिथे मी चर्चेसाठी यायला तयार आहे. त्यांचे ते आंदोलन यशश्वी झाले असून पूर्ण देशभर पोहोचले आहे त्यामुळे आता त्यांनी हे आंदोलन थांबवावे ह्यासाठी मी त्यांना विनंती केली होती. पण हि सर्व बातमी काहीश्या चुकीच्या पद्धतीने मीडिया वर दाखवली गेली होती त्यामुळे मला हा विडिओ पोस्ट करावा लागला आहे असे ते म्हणाले आहेत.

Loading

१ सप्टेंबर रोजी सर्व रेशनधारकांची पडताळणी होणार, चुकीच्या माहिती दिलेली आढळल्यास कारवाई होणार

सरकारद्वारे रास्त दराने दिले जाणारे रेशनकार्ड वरील धान्य घेणारी व्यक्ती खरोखर गरजू आहे का, त्याचे उपन्न त्या कसोटी मध्ये बसत आहे का नाही ह्याची पडताळणी पुढच्या महिन्यात होणार आहे. उत्पन्न वाढलेल्या धारकाचे रेशनवरील धान्य ह्या पडताळणीनंतर बंद करण्यात येणार आहे.

कमी उत्त्पन्न गटामध्ये मोडत असलेली गरीब जनता उपाशी राहू नये म्हणून सरकराद्वारे गरीब कुटुंबाना स्वस्त  दरात रेशन दिले जाते. मात्र काही लोकांचे उत्पन्न वाढले तरी त्यांचे ह्या सुविधेमध्ये नाव असल्याने त्याचा दुरुपयोग होताना दिसत आहे. काही लोक हेच धान्य त्यांना मिळालेल्या किमतीपेक्षा जास्त दराने विकून ह्या सुविधेचा गैरवापर करत आहेत. काही लोक तर चक्क जनावरांना हे धान्य खायला घालत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

ह्या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व प्रत्येक रेशनधारकांची धान्य निरीक्षकांमार्फत पडताळणी होणार आहे. वेळप्रसंगी संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. खोट्या माहितीद्वारे कमी उत्पन्न दाखवून जर कोणी ह्या सुविधेचा दुरुपयोग केला असेल तर त्यांच्याकडून मागील धान्याची किंमत वसूल केली जाणार आहे.

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search