Category Archives: अंबरनाथ – बदलापूर

Metro Line 14: कांजूरमार्ग–बदलापूर मेट्रो लाइन बाबत मोठी अपडेट समोर

   Follow us on        

मुंबई: मुंबई मेट्रो लाईन १४ (कांजूरमार्ग–बदलापूर) प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, OPEC Fund for International Development (OFID) या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने गुरुवारी MMRDA चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, IAS यांची भेट घेतली. या बैठकीत OFID ने मेट्रो लाईन १४ (कांजूरमार्ग–बदलापूर) तसेच इतर मेट्रो प्रकल्पांच्या अर्थसहाय्यासाठी ठाम रस व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, OFID सध्या MMRDA च्या मेट्रो लाईन ५ (ठाणे–भिवंडी–कल्याण) या प्रकल्पात प्रणाली घटकांसाठी वित्तपुरवठा करणारा भागीदार आहे.

शिष्टमंडळात अल शायमा अल शैबी (उपाध्यक्षा – सार्वजनिक क्षेत्र संचालन), सोमनाथ बसु (संचालक – सेक्टर्स अँड थीम्स) आणि तोशिफुमी काझाओका (वरिष्ठ देश व्यवस्थापक) यांचा समावेश होता. यावेळी OFID ने ‘मुंबई 3.0’ तसेच महत्त्वाच्या पाणीपुरवठा प्रकल्पांमध्येही वित्तपुरवठ्याबाबत उत्सुकता दर्शवली असून, यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Badlapur Train Accident: लोकल गाड्यांच्या ‘लेटमार्क’ चा अजून एक बळी

   Follow us on        

बदलापूर: मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकात धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात आज एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचे अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, यामध्ये गाडी फलाटावरून सुटत असताना ती पकडताना महिलेचा तोल गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, या अपघातानंतर रेल्वेच्या ढिसाळ नियोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

​नेमकी घटना काय?

​सकाळच्या गर्दीच्या वेळी (Peak Hours) बदलापूर स्थानकावर ही घटना घडली. समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडिओनुसार, लोकल फलाटावरून वेग घेत होती. त्याच वेळी या महिलेने डब्यात चढण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा पाय घसरला आणि ती थेट रेल्वे आणि फलाट यांच्यातील फटीत पडली. उपस्थित प्रवाशांनी आरडाओरड करेपर्यंत आणि गाडी थांबेपर्यंत खूप उशीर झाला होता. गंभीर जखमी झालेल्या या महिलेचा जागीच मृत्यू झाला

अपघाताला जबाबदार कोण? 

​बदलापूर रेल्वे स्थानकावरील या दुर्दैवी अपघाताकडे पाहिल्यास, प्रथमदर्शनी धावती गाडी पकडण्याचा प्रयत्न केल्यामुळे ती महिलाच याला जबाबदार असल्याचे भासते. मात्र, या अपघाताला केवळ वैयक्तिक चूक मानणे तांत्रिकदृष्ट्या सोपे असले, तरी त्यामागील ईतर कारणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या विस्कळीत नियोजनाचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. बदलापूर ते दादर हा साधारण तासाभराचा प्रवास आता चक्क दीड ते पावणेदोन तास घेत आहे. सकाळी नोकरी-व्यवसायासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांवर कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्याचे प्रचंड दडपण असते आणि रेल्वेच्या ‘लेट-लतीफी’मुळे हे दडपण अधिकच वाढते. याच मानसिक तणावातून प्रवासी जीव धोक्यात घालून धावती गाडी पकडण्याचा धोका पत्करतात.

​या परिस्थितीला रेल्वेचे विसंगत प्राधान्यक्रम मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत. सकाळी जेव्हा नोकरदार वर्गाची सर्वाधिक गर्दी असते (पीक अवर्स), तेव्हा प्रशासनाकडून लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य दिले जाते. बदलापूरहून निघालेली लोकल गाडी ठाण्यापर्यंत वेळेत पोहोचते, परंतु त्यानंतर फास्ट ट्रॅकवर एक्सप्रेस गाड्यांची रांग असल्याने लोकलचा वेग बैलगाडीसारखा होतो. जलद मार्ग पूर्णपणे ‘जाम’ झाल्यामुळे लोकल गाड्या रखडतात.

हे रोजचेच झाले असल्याने कामावर वेळेवर पोहोचण्यासाठी आणि लेट मार्क वाचवण्यासाठी बहुतेक जणांना आता आपल्या नेहमीच्या गाडी आधी अर्धा पाउण तासतास पूर्वीची गाडी पकडावी लागत आहे. प्रवाशांची खासकरून महिला वर्गाची जी आपली घरची कामे आटोपून नोकरी करतात त्यांची खूपच मोठी धावपळ होत आहे. अशा धावपळीत गाडी पकडताना असे अपघात होत आहेत.

रेल्वे प्रशासनाने यावर लवकरात लवकर याकडे लक्ष देवून गाड्यांचे लेटमार्क कमी करावेत अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

 

अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ 👇

Chhatrapati Shiavaji Maharaj Statue in Japan: मूळ अंबरनाथकर आणि जपानचे आमदार योगेंद्र पुराणिक (योगी) यांनी जपानमध्ये उभारला शिवरायांचा पुतळा

   Follow us on        
टोकियो, जपान:अंबरनाथचे सुपुत्र व टोकियो आमदार असलेले योगेंद्र पुराणिक (योगी) यांनी  पुढाकार घेत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा टोकियो येथे उभारण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. भारतीय संस्कृती आणि मराठी अस्मितेचा गौरव करणाऱ्या या उपक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रभरातून कौतुक होत आहे.
मा. योगेंद्र पुराणिक यांचे बालपण अंबरनाथमधील कानसई परिसरात गेले असून, त्यांनी आपले शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालय, अंबरनाथ येथून पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी जपानमध्ये गेलेल्या योगी पुराणिक यांनी तिथे समाजकारणात सक्रिय भाग घेत जपानमध्ये निवडून आलेले पहिले भारतीय आमदार म्हणून ऐतिहासिक ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत-जपान सांस्कृतिक मैत्री अधिक दृढ होत आहे
या पवित्र स्मारकाला अंबरनाथचे माजी नगरधायक्ष श्री.सुनील चौधरी आणि त्यांचे कुटुंबीय यांनी नुकतीच भेट दिली. त्यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवरायांना अभिवादन केले. भेटीदरम्यान श्री सुनील चौधरी टोकियोतील मराठी व भारतीय समाजातील प्रतिनिधींशीही संवाद साधला.

Metro Line14: मुंबई मेट्रोचा अंबरनाथ-बदलापूर पर्यंत विस्तार होणार; असा असेल मार्ग

   Follow us on        
Metro Line14: अंबरनाथ -बदलापूर लोकल प्रवाशांसाठी  एक दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई मेट्रोचा विस्तार करण्यात येणार असून मेट्रो थेट बदलापूरपर्यंत धावणार आहे. कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो लाईन 14 च्या संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर आली आहे.
एमएमआरडीएने कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो 14 मार्गाच्या कामासाठी पाऊल टाकले आहे. या मेट्रो 14 मार्गिकेच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून महिन्या अखेरपर्यंत टेंडर काढण्यात येणार आहेत. पीपीपी म्हणजेच सार्वजनिक – खाजगी भागीदारी तत्त्वावर ही मेट्रो मार्गिका उभारण्यात येणार आहे. सुरुवातीला मेट्रोच्या कामासाठी पीपीपी तत्त्वावर उभारणीसाठी इच्छुक कंपन्यांकडून टेंडर मागवण्यात येणार आहेत.
कसा असेल कांजूरमार्ग – बदलापूर मार्ग?
  • मेट्रो 14 ही कांजूरमार्ग ते बदलापूर या मार्गावर धावणार आहे.
  • हा मार्ग एकूण 38 किलोमीटर लांबीचा असणार आहे
  • कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो 14 मार्गावर एकूण 15 स्थानके असणार आहेत
  • मेट्रो 14 चा मार्ग हा कांजूरमार्ग – घणसोली – महापे – अंबरनाथ – बदलापूर असा असणार आहे.
  • हा मार्ग घणसोलीपर्यंत भूमिगत असणार आहे. ठाण्यातील खाडी खालून ही मेट्रो धावणार आहे.
  • घणसोली ते बदलापूर हा उन्नत मार्ग असणार आहे.
  • या मार्गावरील 4.38 किलोमीटर लांबीचा मार्ग हा पारसिक हिल येथून जाणार आहे.
  • कांजूरमार्ग – बदलापूर या मेट्रो 14 प्रकल्पाचा अंदाजे खर्च 18 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.
  • या प्रकल्पाच्या उभारणीसाठी जवळपास 75 हेक्टर जमीन व्यावसायिक वापरासाठी लागणार आहे.
  • हा मेट्रो मार्ग ठाणे खाडी, पारसिक हिल आणि फ्लेमिंगो अभयारण्याच्या क्षेत्रातून जाणार आहे.
मेट्रो मार्गामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाटी एमएमआरडीएन यापूर्वीच सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न असणार आहे.

बदलापुरात ‘रेल रोको’… दोन्ही बाजूची वाहतुक ठप्प

   Follow us on        

बदलापूर: दोन चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणी संतप्त पालक आणि बदलापूरकरांनी आंदोलकांनी साडेदहाच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या मांडला. त्यामुळे मुंबईहून येणारी आणि मुंबईकडे जाणारी अशा दोन्ही रेल्वे सेवेला त्याचा फटका बसला आहे.

मंगळवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासून बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेबाहेर पालक आणि नागरिकांनी आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन आक्रमक रूप घेत असतानाच यातील काही आंदोलकांनी आपला मोर्चा बदलापूर रेल्वे स्थानकाकडे वळवला. साडेदहा वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून येणारी अशी दोन्ही रेल्वे सेवा बंद पाडली. रेल्वे रुळावर आंदोलक बसल्याने एकाच गोंधळ उडाला त्यामुळे लोकल वाहतूक ठप्प झाली. अकरा वाजेपर्यंत पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आंदोलक आरोपीच्या फाशीची मागणी करत घोषणाबाजी करत आहेत.

अंबरनाथ – बदलापूरात पुढील दोन दिवस पाण्याचे ‘वांदे’

   Follow us on        

बदलापूर दि. २५ एप्रिल : बदलापुर आणि अंबरनाथ येथील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीवरील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रात उद्या शुक्रवारी नवीन पंपिंग यंत्रणा आणि विद्युत पुरवठा सुधारणा करण्याच्या कामासाठी १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवार २६ एप्रिल सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील. तसेच शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील नागरिकांना दोन दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

गेल्याच आठवड्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील पाणीपुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला होता. त्यात तांत्रिक बिघाडामुळे दोन दिवस अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांमध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. त्यानंतर गेल्या चार ते पाच दिवसांपासून उंच भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच येत्या शुक्रवारी उल्हास नदी किनारच्या खरवई येथील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रात सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत तातडीचे काम हाती घेण्यात येणार आहे. येथे नवी पाणी उपसा यंत्रणा आणि विद्युत पुरवठ्यातील सुधारणा करण्यासाठी आवश्यक कामे केली जाणार आहे. त्यासाठी १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे या काळात अंबरनाथ आणि बदलापूर शहरात विविध ठिकाणी पाणीपुरवठा बंद असेल.

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search