Category Archives: सिंधुदुर्ग

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात युवती गंभीर जखमी

   Follow us on        

मुंबई-गोवा महामार्ग | ३० जुलै: मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे एका भरधाव ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दिशा ज्ञानेश्वर नारुजी (वय २६, रा. बांदा पानवळ) या तरुणी गंभीररीत्या जखमी झाली.

संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी एकत्र येत वाहतूक रोखून धरली. अपघातग्रस्त ट्रकला घेराव घालण्यात आला आणि चालकाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. जखमी युवतीला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक गस्त आणि वेगमर्यादा काटेकोरपणे पाळण्याची मागणी केली आहे.

 

गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर धावणार ‘शिवसेना एक्सप्रेस’

   Follow us on        

मुंबई, दि. २९: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिवसेनेच्या वतीने एक विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘शिवसेना एक्सप्रेस’ नावाने मोफत विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात येत असून, या सेवेमुळे अनेक चाकरमान्यांना वेळेवर आणि विनाखर्च आपल्या गावी गणपती साजरा करण्याची संधी मिळणार आहे.

ही विशेष रेल्वे २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकातून कुडाळकडे रवाना होणार आहे. मात्र ही मोफत सेवा फक्त पूर्वनियोजित बुकिंग केलेल्या प्रवाशांसाठीच उपलब्ध असणार आहे. बुकिंगसाठी सोमवार ते शनिवार दरम्यान सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत संपर्क साधता येईल.

 

या उपक्रमाचे आयोजन कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश नारायणराव राणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९६६५८९६९६६ किंवा ९६६५२७०२३१ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पेंडूर येथे २० फूट लांबीचा महाकाय अजगर आढळल्याने खळबळ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

   Follow us on        

पेंडूर (ता. मालवण) – मालवण तालुक्यातील कट्टा-नेरुरपार मार्गे कुडाळ येथे जाणाऱ्या हमरस्त्यावर, पेंडूर गावाच्या हद्दीत सुमारे १५ ते २० फूट लांबीचा एक महाकाय अजगर रस्ता ओलांडताना दिसून आला. रस्त्याने जात असलेल्या गावातील वाहनचालक व त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींनी हा अजगर प्रत्यक्ष पाहिला असून, त्यातील एका युवकाने हा क्षण मोबाईलमध्ये चित्रीत केला. सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या महाकाय सापाचे पहिल्यांदाच दर्शन झाल्यामुळे गावातील शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “कधी हा अजगर गुरांना गिळंकृत करेल की काय?” अशी काळजी शेतकऱ्यांच्या मनात आहे.

गावाच्या एका बाजूने वाहणारी कर्ली नदी, तसेच आजूबाजूच्या निसर्गसंपन्न भागामुळे यापूर्वी देखील वन्य प्राणी आढळले आहेत. काही वर्षांपूर्वी, एक भली मोठी मगर पेंडूर तलावात सापडली होती. ती स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या मदतीने पकडून पुन्हा नदीत सोडली होती.

   

याच पार्श्वभूमीवर गावकऱ्यांची मागणी आहे की, या अजगरालाही तात्काळ पकडून जंगलात सोडावे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या गुरांना किंवा इतर जनावरांना धोका पोहोचणार नाही.

पेंडूर ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गाकडून वनविभागाकडे या संदर्भात तात्काळ कार्यवाहीची मागणी करण्यात येत आहे.

Kudal: कुडाळ आगारात टेलिफोन आणि एस टी फेऱ्यांचा सावळा गोंधळ

   Follow us on        

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आगाराला जो सावळा गोंधळ चालू आहे तो त्वरीत थांबवावा आणि कायम स्वरुपी नवीन चालू दूरध्वनी देण्याची व्यवस्था करावी अन्यथा आंदोलन केले जाईल अशी मागणी तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते आणि विशेष मागास प्रवर्ग महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे. प्रासीद्धिस दिलेल्या पत्रकात बापर्डेकर म्हणाले की कुडाळ डेपोचा कोरोना काळापासून दूरध्वनी नव्हता तो आजमितीस सुस्थितीत नाही. अधून मधुन तिघांचे मोबाईल नंबर बाहेर पेपर फलकावर लावलेले परंतु तो ज्या आधीकारि वर्ग अगर विभाग नियंत्रक,वाहतूक नियंत्रकजवळ असतो ते कधीच फोन उचलत नाही . रिंग वाजून जाते . मुंबई हून कुडाळ रेल्वे स्टेशनला येण्यापूर्वी अगर स्टेशनला आल्यावर अगर मालवाहून कुडाळला जायचं असेल मग स्वतःचा फोन असुदे की इतरांच्या फोन वरून केव्हाही मालवण एस टी बस संबंधी विचारपूस करिता फोन केला तर त्याठिकाणी उपस्थित आणि ज्यांच्याजवळ आहे ते रिंग वाजली तरी फोन उचलत नाही अशावेळी दमून भागून आलेल्या प्रवाशांनी करावं तरी काय .खाजगी वाहन की रिक्षेला भरमसाठ पैसे देऊन प्रवास करावा की कमी पैशात एस टी महामंडळाने प्रवास करण्यास ताटकळत रेल्वे स्टेशनला किंवा मालवण राहावे? असा प्रश्न या पत्रकात विचारला आहे.

मालवण आगार व्यवस्थापनाला मानाव लागतं ते मालवण आगाराच्या सर्व अधिकारी ,कर्मचारी यांना कारण त्यांचा कोरोना काळापासून दूरध्वनी आणि वाहतूक काही अपवाद वगळता आजपर्यंत बंद नाही.वाहतूकही कुडाळ ची बंद नाही.कुडाळला विचारले तर त्याचं एकच उत्तर मालवणवाल्याच आम्हाला काही विचारू नका ती आली तर सोडू परंतु कित्येकवेळा रेल्वे स्टेशनला न जाता कुडाळ आगारातूंनच बस वळविली जाते.याला जबाबदार कोण? याचे मूळ कारण कुडाळ आगाराला वाली नाही त्याचे बाप हे वर्क शॉप ठिकाणी बसतात तक्रार घेऊन दूरवर त्यांच्या पर्यंत जाणे कोणत्याही प्रवाशांना शक्य नाही.कुडाळ मालवण कुडाळ एस टी फेऱ्याना प्रवाशांन बरोबर शाळा ,कॉलेज विद्यार्थी तर कित्येक वेळा सरकारी कर्मचारी असतात मग अचानक एखादी गाडी रद्द करणे कारण नसताना उशिरा एस टी सोडणे प्रवाशांसोबत पर्यटक इतरांना कितपत परवडणार याची माहिती संबंधित अधिकारी यांनी द्यावी .प्रवाशांनी लेखी तक्रार पुस्तकात तक्रार केली तर त्याच निरसन होत नाही.याला जबाबदार कोण आहेत. तरी येत्या पंधरा दिवसांत आगार व्यवस्थापक आणि आगार प्रमुख तसेच दूरध्वनी यांची व्यवस्था कायमस्वरूपी डेपोला ज्याठिकांनाहून जिल्ह्यातील बस सोडल्या जातात त्याठिकाणी करावी.अन्यथा आंदोलन करावे लागेल याची सूचना प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे सुरेश बापर्डेकर यांनी दिली आहे

   

Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टप्प्यातील संरेखनात बदल; नवीन आराखडा असा असेल.

   Follow us on        

सावंतवाडी: बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित आखणीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. आंबोली येथील संवेदनशील परिसरातील पर्यावरणावर होणारा परिणाम टाळण्यासाठी आणि ३० किलोमीटर लांबीचा भव्य बोगदा खोदण्याची आवश्यकता टाळण्यासाठी आता केसरी-फणसवडे या पर्यायी मार्गाचा वापर केला जाणार आहे. यामुळे केवळ १० किलोमीटर लांबीचा बोगदा खोदून हा महामार्ग थेट मळगावला जोडला जाणार आहे.

या बदलामुळे आंबोलीतील इको सेन्सिटिव्ह भाग आणि बागायती क्षेत्रातून जाणाऱ्या महामार्गाची गरज टळणार आहे. ज्यामुळे स्थानिक पर्यावरण आणि कृषी क्षेत्राचे संरक्षण होईल.

आमदार दीपक केसरकर यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, “शक्तीपीठ” महामार्गाच्या प्रस्तावित आखणीत बदल करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आंबोली येथील इको सेन्सिटिव्ह आणि बागायतीच्या भागातून जाणारा महामार्ग आता अन्य भागातून वळवण्यात येणार आहे. यामुळे केसरी-फणसवडे या मार्गाचा वापर केला जाणार असून, आंबोलीतील तब्बल ३० किलोमीटर लांबीचा बोगदा खोदण्याची गरज लागणार नाही. त्याऐवजी फक्त १० किलोमीटर लांबीचा बोगदा खोदून हा महामार्ग मळगावला जोडला जाईल.” या बदलामुळे प्रकल्पाच्या खर्चातही बचत होण्याची शक्यता आहे, तसेच पर्यावरणीयदृष्ट्या अधिक शाश्वत पर्याय निवडला गेल्याने स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. शक्तीपीठ महामार्गाचे काम आता अधिक गतिमान होण्याची अपेक्षा आहे.

Banda: एसटी बस दुसर्‍या बसवर आदळली आणि १०० फूट फरफटत नेले; बांद्याजवळ २ एसटी बसमध्ये मोठा अपघात

   Follow us on        

Banda: बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जिवितहानी झाली नाही पण दोन्ही बस मधील एकूण १९ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास झाला.

बांदा फुकेरी बस फुकेरीतुन बांद्याच्या दिशेने. येत होती. पानवळ येथे बस आली असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या उस्मानाबाद पणजी बसची समोरून जोरदार धडक बसली. बस चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला मात्र भरधाव वेगात तब्बल 100 फूट फुकेरी बसला फरफटत नेले. फुकेरी बस मधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्यात. सर्व जखमीना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

फुकेरी बसमधील कॉलेजच्या विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या. “बस चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला, मात्र भरधाव वेगात तब्बल 100 फूट फुकेरी बसला फरफटत नेले,” असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सर्व जखमी प्रवाशांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. डॉक्टरांनी सांगितले की, “जखमी प्रवाशांवर योग्य उपचार केले जात आहेत.” अपघातामुळे परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली

Amboli: धक्कादायक! वर्षा पर्यटनासाठी आलेला पर्यटक ३०० फूट दरीत पडला; शोधमोहीम सुरु

   Follow us on        

सिंधुदुर्ग : प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोली घाटाजवळील कावळेसाद पॉईंटवर वर्षा पर्यटनासाठी आलेला कोल्हापूर येथील युवक खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेलिंगच्या पलीकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी हा युवक गेला असता, पाय घसरून पडल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरीत पडलेल्या युवकाचा शोध घेतला जात आहे. वाऱ्यांच्या वेगामुळे उलट्या दिशेने वाहणाऱ्या धबधब्यापाशी हा युवक कोसळल्याची माहिती आहे.
कोल्हापूरमधून मित्राचा ग्रुप वर्षा पर्यटनासाठी कोकणात आला होता. त्यावेळी, आंबोली घाटाता या पर्यटकांनी आपला गाडी थांबवून निसर्स सौंदर्याचा आनंद लुटला. मात्र, दुर्दैवाने यावेळी एक युवका रोलिंगच्या पलिकडे जाऊन दरीत कोसळल्याची दु:खद घटना घडली. त्यानंतर, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून या युवकाच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्रांची चौकशी करण्यात येत आहे. युवक नेमकं दरीत कोसळला कसा याबाबत माहिती घेतली जात आहे, पण रोलिंग पलिकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी गेला असता हा अपघात झाल्याचे समजते. दरम्यान, घटनास्थळी दाट धुके आणि मोबाईल टॉवरला रेंज नसल्यामुळे मदतकार्य करताना पोलिसांना अडचणी येत आहेत.

जिल्हा परिषदेचे कर्मचारी राजेंद्र सनगर
राजेंद्र बाळासो सनगर (45 वर्षे) चिले कॉलनी, कोल्हापूर असे दरीत कोसळलेल्या पर्यटकाचे नाव आहे. ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत. कोल्हापूर येथील सनगर हे त्यांच्या 14 सहकाऱ्यांच्या टीमसोबत आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते. कावळेसाद पॉईंट येथे रेलिंग जवळून असताना पाय घसरला आणि ते दरीत कोसळले. आंबोली रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. मात्र, रात्रीचा काळोख आणि दाट धुक्यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत.

 

Sawantwadi Terminus: भूमीपूजन दगडाचा प्रतिकात्मक केक कापून अपूर्ण कामाचा वाढदिवस साजरा..

   Follow us on        

Sawantwadi: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला आज २७ जून रोजी १० वर्षे पूर्ण होऊन देखील ते अदृश्य असल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे स्थानकावर वाढदिवस साजरा केला. सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेकडून हाताला काळ्या फिती बांधून साखर वाटत, भुमिपुजन दगडाचा केक कापून गांधीगिरीने याचा निषेध नोंदविण्यात आला.

सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन २७ जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, तत्कालीन पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, तत्कालीन खासदार विनायक राऊत आणि इतर लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत झाले होते. यानंतर पहिल्या टप्प्याचे काम झाले. मात्र, दुसऱ्या टप्प्याचे काम अजूनही झालेले नाही. परिणामी, हे महत्त्वाकांक्षी टर्मिनस आजही धूळ खात पडले आहे. रेल्वे प्रवासी संघटनेने या टर्मिनसच्या पूर्णत्वासाठी वेळोवेळी आंदोलने केली. मात्र, प्रवाशांची गैरसोय होत असूनही लोकप्रतिनिधी यावर गप्प बसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साखर वाटून, केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. रेल्वे प्रशासन, प्रवाशी यांना साखर वाटून गांधीगिरी मार्गान प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर म्हणाले, १० वर्ष प्रकल्प रखडलेला आहे. तिन्ही सार्वत्रिक निवडणूक एकाच पक्षाची सत्ता राज्यात आलेली आहेत. त्याच सरकारने भूमिपूजन केल्यानंतर प्रकल्प पूर्ण होत नसेल तरी ती क्षरमेची बाब आहे. सरकारला जाग आणण्यासाठी व अर्धवट कामाची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे‌. केवळ रेल्वे मंत्री बदलले म्हणून प्रकल्प अर्धवट ठेवणं योग्य नाही. प्रकल्प पूर्ण करायचा नसेल तर जनतेची फसवणूक केल्याच जाहीर करा असं आवाहन त्यांनी केलं‌. तर ज्या दगडावर नारळ फोडून भुमिपूजन केलं तो दगड केक स्वरूपात आम्ही कापून अर्धवट कामाचा निषेध केला. जन आंदोलन करून देखील सरकार दखल घेत नसल्याने दगडी सरकारला हा दगड होता. त्यामुळे निदान आता तरी सरकारनं कोकणवासीयांना न्याय द्यावा. प्रवाशांची होणारी गैरसोय रोखावी असं मत सचिव मिहिर मठकर यांनी व्यक्त केले. तसेच गणेशोत्सवापूर्वी रेल्वे टर्मिनस पूर्णत्वास आणून चाकरमान्यांचे होणारे हाल, अपेष्टा रोखाव्यात असे मत उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी व्यक्त केले. उपस्थित पोलिस, रेल्वे कर्मचारी, प्रवासी, रिक्षा चालक यांना साखर वाटून अनोख्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड.संदीप निंबाळकर, सचिव मिहिर मठकर, सल्लागार सुभाष शिरसाट, सल्लागार अँड सायली दुभाषी ,भूषण बांदिवडेकर,पांडुरंग राऊळ, सागर तळवडेकर,तेजस पोयेकर,पुंडलिक दळवी, अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार, विनायक गांवस , नितिन गावडे, सिद्धार्थ निंबाळकर, मंगेश सावंत, चंद्रकांत राघो कोरगावकर, रवी सातवळेकर, पांडुरंग परब, नारायण मसुरकर, प्रमोद खानोलकर,विनायक राऊळ, लवू नाईक, एकनाथ नाटेकर, राजेंद्र वरडे , प्रकाश महादेव भाईंडकर , दिलीप कुलकर्णी, काका पांढरे, रिक्षा व्यावसायिक तसेचं रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Sangameshvar: अंत्रवली ग्रामपंचायत कार्यालयाला आश्वासनाचा विसर, पत्रकार संदेश जिमन यांच्या स्मरणपत्राने कार्यकारी मंडळाला येईल काय जाग?

   Follow us on        

गतवर्षी १२ जून २०२३ रोजी पत्रकार संदेश जिमन आणि वाडी ग्रामस्थ यांनी प्रशासनाला धारेवर धरत मागणी नसताना बांधण्यात आलेल्या मालपवाडी येथील साकवाचा मुद्दा उपस्थित केला. त्या साकवाला दोन्ही बाजूला चढणे उतरणे यासाठी योग्य ती सुविधा नसल्याने उपोषण करणार असे पत्र संदेश जिमन यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला दिले होते.

या पत्राची दखल घेत सरपंच महोदयांनी लेखी पत्र संदेश जिमन यांना दिले. त्या पत्रात स्पष्ट उल्लेख केला असा की “३१ जानेवारी २०२४ पर्यंत साकवाच्या दोन्ही बाजूचे काम पूर्ण केले जाईल.” हे एक वेळकाढू आश्वासन ठरले. अद्याप ते काम पूर्ण न झाल्याने पत्रकार संदेश जिमन यांनी या समस्येकडे आपला मोर्चा पुन्हा वळवला आहे.

दिनांक २० जून २०२४ रोजी ग्रामपंचायत अंत्रवली येथे ग्रामसेवक महोदयांना स्मरणपत्र देऊन संदेश जिमन यांनी चांगली झाडाझडती घेतली. या पत्रात संदेश जिमन यांनी ग्रामपंचायत अंत्रवली च्या कार्यकारी मंडळाला दिलेल्या आश्वासनाकडे डोळे झाक का केली? उपोषणाला विरोध करण्यासाठीच केवळ हा आश्वासनाचा बनाव होता काय?
असे प्रश्न विचारले आहेत.

ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाने जर कर्तव्यदक्षतेने हा विषय मार्गी लावला असता तर स्थानिक ग्रामस्थांना आणि संदेश जिमन यांना हा खटाटोप करावा लागला नसता. केवळ मोठ्या पदांची लालसा बाळगणे पण प्रत्यक्षात त्या पदांचे महत्त्व ध्यानात न घेता कामात कुचराई करणे हे कितपत योग्य! कोणत्या दबावामुळे हे काम आजवर पुर्ण झाले नाही,याचे उत्तर गुलदस्त्यात आहे.

या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलवावी. प्रश्न निकाली काढावा. जर काहीच शक्य नसेल तर संदेश जिमन यांनी कायदेशीर मार्गाने जाण्यास ग्रामपंचायत कार्यालयाची काही हरकत नसल्याचे लेखी पत्र ग्रामपंचायतीने द्यावे असे पत्रात म्हटले आहे.

या विषयाचे गांभीर्य ध्यानात घेऊन संबंधित विभागाने चौकशी आदेश देऊन सत्यता पडताळणे गरजेचे आहे. दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. लाखोंचा निधी कोणाच्या भल्यासाठी? ठेकेदार आणि त्यांच्या बगलबच्च्यांसाठी की जनसामान्यांच्या हितासाठी?  ही अनागोंदी कोणाच्या आशिर्वादाने चालते? याला जबाबदार कोण? कारवाई झाली पाहिजे! ही ग्रामस्थांची मागणी आहे.

Malvan: राजकोट किल्ल्यावर पर्यटकांना बंदी; कारण काय?

   Follow us on        

Malvan: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवणमधील समुद्र तटबंदीवरील राजकोट किल्ला आजपासून पुढील काही दिवस शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. किल्ल्यावरील पदपथाची आवश्यक दुरुस्ती आणि इतर अनुषंगिक कामे पूर्ण होईपर्यंत राजकोट किल्ला शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी काही दिवस बंद राहणार असल्याची माहिती येथील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतराच्या सभोवताली पदपथाच्या आवश्यक दुरुस्ती पूर्ण होईपर्यंतआजपासून राजकोट किल्ला बंद राहणार आहे.

मालवणमधील राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. यावर माजी आमदार वैभव नाईक यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली. ‘मागच्या वेळेला जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तसा पुन्हा पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल या भीतीमुळेच किल्ला बंद ठेवण्यात आला आहे का?’, असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

तसंच, ‘शंभर कोटी रूपये खर्च करून शंभर वर्षे टीकेल असे पुतळ्याचे काम केल्याचे सरकार सांगत असताना अशा प्रकारे बंदी आणली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अजूनही लक्ष घालून जे अधिकारी दोषी आहेत. त्यांच्यावर कारवाई केली पाहीजे.’ अशी मागणी देखील माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

राजकोट किल्ला बंद करण्यात आल्यामुळे कोकणामध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. किल्ल्याच्या बाहेर येऊन पर्यटकांना परत जावे लागत आहे. दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर हा किल्ला पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाईल असे सांगितले जात आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search