






मुंबई :राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात वाढ होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ह्या वाढीस मान्यता दिली आहे. महामंडळाचे सुमारे ९२ हजार अधिकारी-कर्मचार्यांना याचा फायदा होणार आहे.
ह्या आधी मिळणारा २८ टक्के महागाई भत्ता आता ३४ टक्के दराने मिळणार आहे.सुमारे १५ कोटी रुपयांची मासिक वाढ वेतनखर्चात होणार आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या सन २०१६-१७ ते २०२१-२२ या सहा वर्षांसाठीच्या वेतनसुधारणेच्या प्रस्तावास देखील यावेळी मंजुरी देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची ३०२ वी बैठक सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन- नैनोटिया, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चेन्ने, कामगार आयुक्त सुरेश जाधव, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांचेसह एसटी महामंडळ, परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

मुंबई :राज्यात विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याच्या मोठा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा लाभ राज्यातील 60 हजार शिक्षकांना होणार आहे अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या संदर्भात सांगितल्याप्रमाणे, 20 ते 40 टक्के आणि 40 ते 60 टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. दरम्यान याचा शासन निर्णय लवकरच निघणार असल्याचेही दीपक केसरकर यांनी संगीतले.
अशातच पात्रता पूर्ण न करु शकलेल्या संस्थांना यातून वगळण्यात येईल. त्या शाळांव्यतिरिक्त सर्वच्या सर्व शाळांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. जवळपास 1 हजार 160 कोटी रुपयांचे हे पॅकेज शिक्षकांसाठी जाहीर करत असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. दरम्यान ज्यांनी या अनुदासाठी मागणी केली नव्हती त्यांनाही या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.


‘इन्स्टंट लोन ॲप’ डाऊनलोड केल्यास आपल्या फोनमधील वैयक्तिक माहितीचा ताबा इतर कोणाला मिळू शकतो.
सावध रहा- ॲप डाऊनलोड करताना स्त्रोताची विश्वासार्हता तपासा.#ThodasaSochLe #सायबर_सुरक्षा pic.twitter.com/Sfx7r9eLz2
— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) October 30, 2022
नागपूर :वेदांता, ‘टाटा-एअरबस’ हे प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला गेल्याचं समजत आहे.
सॅफ्रन ग्रुप मिहानमध्ये ११८५ कोटींची गुंतवणूक करण्यास उत्सुक होता. विमान तसंच रॉकेट इंजिन बनवणाऱ्या या कंपनीने मात्र आता महाराष्ट्रातून माघार घेतली असल्याची माहिती मिळत आहे. हा प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. जागा मिळण्यास उशीर झाल्याने प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. या प्रकल्पामुळे ५०० ते ६०० कामगारांच्या हाताला रोजगार मिळणार होता.
Vision Abroad
मुंबई: पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य तर्फे सन २०२१ साली पोलीस शिपाई संवर्गात रिक्त झालेली पदे भरण्यासाठी नोव्हेंबर मध्ये होणारी भरती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे.
हि पदे भरण्याबाबत राज्यातील जिल्ह्यातील पोलीस आयुक्त आणि अधिक्षक यांना एक आदेशपत्रक पाठवण्यात आले होते. ह्या आदेशपत्रकात सन २०२१ साली पोलीस शिपाई संवर्गात १४,९५६ रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात देण्यात यावी असे सांगण्यात आलेले होते. त्यानुसार सोबत दिलेल्या नमुन्यात दिनांक ०१.११.२०२२ ह्या दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात यावी व तसे कार्यालयास ई-मेल द्वारे कळविण्यात यावे असे आदेश देण्यात आले होते.
सदर भरती प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत आहे अशा आशयाचे एक माहितीपत्रक पोलीस महासंचालकांच्या वतीने काढण्यात आलेले आहे.
Related : महाराष्ट्र पोलीस दलातील १४,९५६ रिक्त पदांसाठी भरती…पहा जिल्ह्यानुसार पदांची संख्या
j
मुंबई :यंदा एसटी महामंडळाने दिवाळी सुट्ट्यांमध्ये एसटीच्या जादा फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यंदा राज्यभरात दिवाळीनिमित्त १४९४ जादा बसेस सोडणार आहे.
एसटी बसेसच्या या अधिकच्या फेऱ्या २१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान म्हणजे ११ दिवस चालवण्यात येणार आहेत. ही माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. राज्यातील सर्व आगारांना जादा गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या असून प्रवाशांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.
कोणत्या विभागातून किती बस?
प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. सध्या औरंगाबाद विभागातून ३६८,मुंबई २२८, नागपूर १९५, पुणे ३५८, नाशिक २७४ व अमरावती येथून ७१ बस गाड्या सोडण्यात येणार आहेत.
बसच्या आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच msrtc mobile reservation App चा वापर करावा, असे आवाहन एसटी प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
Content Protected! Please Share it instead.