Category Archives: रत्नागिरी

रायगड रत्नागिरी लोकसभा क्षेत्रातील रेल्वे समस्या सोडवण्यासाठी मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक पार

   Follow us on        

मुंबई: रायगड रत्नागिरी लोकसभा क्षेत्रातील रेल्वे समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी लोकसभा खासदार सुनील तटकरे अध्यक्षतेखाली सोमवार दि. २० जानेवारी, २०२५ सकाळी १०:३० ते १२:३९ या वेळेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार व कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा व इतर अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत आपापल्या समस्या मांडण्यासाठी संबंधित ठिकाणच्या प्रवासी संघटना व प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. आपना सहकारी बँकेचे संचालक तथा रत्नागिरी जिल्हा नियोजन चे सदस्य श्री. अजयशेठ बिरवटकर यांनी जल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितिन सखाराम जाधव व अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय मधुकर महापदी यांना निमंत्रित केले होते.

याप्रसंगी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण, रत्नागिरी दिवा गाडी दादरपर्यंत पूर्ववत करणे, मुंबई चिपळूण नवीन गाडी सुरू करणे, पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस कल्याणमार्गे वळवणे, जबलपूर कोईंबतूर एक्सप्रेसला कल्याण येथे थांबा देणे, खेड येथे विविध गाड्यांना थांबा देणे, गोव्यातून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांमध्ये कोकण रेल्वेने रत्नागिरीच्या उत्तरेकडील स्थानकांना दिलेला अपुरा कोटा वाढवणे किंवा सर्व स्थानकांना समान कोटा देणे आदी महत्त्वाचे विषय मांडण्यात आले.

त्याचबरोबर पेण, नागोठणे, रोहा, माणगाव आणि वीर येथीलही समस्यांवर चर्चा करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांनी ज्या ज्या गोष्टी शक्य असतील त्या पुढे रेल्वे बोर्ड व मंत्रालयाकडे मांडण्याचे आश्वस्त केले. तसेच खासदार  सुनील तटकरे यांनी रेल्वे मंत्रालयात पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

ही बैठक आयोजित करून सर्वांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याबद्दल खासदार श्री. सुनिल तटकरे व बैठकीला आमंत्रित केल्याबद्दल श्री. अजयशेठ बिरवटकर यांचे जल फाऊंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेच्या वतीने आभार.

Ratnagiri ST Bus Accident: “काळ आला होता पण…” प्रवाशांनी भरलेली एसटी बस धरणात पडता पडता वाचली

   Follow us on        

Ratnagiri bus accident: रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एका एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही एसटी बस रविवारी रात्री दाभोळवरुन मुंबईच्या दिशेने येत होती. त्यावेळी शेनाळे घाटातील एका तीव्र उतारावर चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस दरीत घरंगळत गेली. मात्र, त्याठिकाणी असणाऱ्या एका झाडाला धडकून बस तिथेच थांबली. ही बस आणखी पुढे घरंगळत गेली असती तर ती धरणात कोसळून मोठा अनर्थ घडला असता. मात्र, सुदैवाने आणि प्रवाशांचे दैव बलवत्तर असल्याने प्रवाशांचे जीव वाचले.

प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात झाला त्यावेळी एसटी बस रविवारी रात्री मंडणगड शेनाळे घाटातून जात होती. या घाटात अतितीव्र उताराचा रस्ता आहे. यापैकी एका उतारावर एसटी बसवरील नियंत्रण सुटून ती दरीत कोसळली. दरीतील झाडाझुडपांमधून ही एसटी बस खाली घरंगळत जात होती. बस दरीत कोसळताना प्रवाशांना जाग आली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. या दरीच्या खालच्या बाजला धरण होते. ही एसटी बस आणखी खाली घरंगळत गेली असती तर थेट धरणात कोसळली असती आणि अनेक प्रवाशांचा जीव जाण्याची शक्यता होती. मात्र, दरीतील एका झाडला धडकून एसटी बस तिथेच अडकून पडली. यानंतर बचावपथकांनी घटनास्थळी धाव घेऊन एसटी बसमधील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. रात्रीची वेळ असल्यामुळे बसपर्यंत मदत पोहोचण्यास विलंब झाला. तोपर्यंत अनेक प्रवाशी बसमध्ये जीव मुठीत धरुन बसले होते.

 

रत्नागिरीकरांसाठी २१ दिवसीय मोफत योग शिबिराचे आयोजन

   Follow us on        
रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात पार पडणार योग शिबिर 
नवीन वर्ष सुरू होतंय..प्रत्येकजण मनाशी एक नवीन निश्चय करत असतो. तर मग विचार कसला करताय रत्नागिरीकरांनो ..कारण नवीन वर्षाची सुरुवात आरोग्यदायी करण्याची एक नामी संधी उपलब्ध होणार आहे.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक यांच्या भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रात खास रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
हे शिबिर रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक योगभवनात संपन्न होणार आहे. शिबिराचा कालावधी एकूण २१ दिवसांचा असून हे शिबिर १ जानेवारी २०२५ ते २१ जानेवारी २०२५ दरम्यान दररोज सायं ०५ वाजता होणार आहे.मोफत शिबिर असल्यामुळे आरोग्याची गुरुकिल्ली एक प्रकारे या शिबिरातून रत्नागिरी करांना प्राप्त होणार आहे. तरी इच्छुक नागरिकांनी  दिलेल्या लिंक वर https://forms.gle/asQ7baBQMbUtju9t9
 क्लिक करून आपली नोंदणी निश्चित करावी तसेच ७७९८४९०६१५ या क्रमांकावर संपर्क साधावा

पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते श्री क्षेत्र टेरव देवस्थान दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

   Follow us on        
चिपळूण: श्री क्षेत्र टेरव, कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई देवस्थान २०२५ दिनदर्शिकेचा प्रकाशन व लोकार्पण सोहळा, कोकणचे लाडके सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या शुभहस्ते नुकताच दिमाखात संपन्न झाला. गेली १५ वर्षे भाविक व ग्रामस्थांना आकर्षक, दर्जेदार व परिपूर्ण  दिनदर्शिका भेट देण्यात येत आहे.
सालाबादप्रमाणे या वर्षीही  दिनदर्शिकेला  वाढती  मागणी आहे.  टेरव गावातील सर्व ग्रामस्थांना तसेच मुंबई, पुणे, ठाणे, सुरत इ. शहरात वास्तव्यास असलेल्या  टेरव वासियांना सदर दिनदर्शिकेचे  वितरण करण्यात येणार आहे.
देवस्थानात तसेच टेरव गावात साजरे होणारे सार्वजनिक सण, उत्सव व इतर सर्व धार्मिक कार्यक्रमांची माहिती दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आली आहे.

देवरुख: महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाआरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन

देवरुख: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि कोकण विकास संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आदरणीय रोहित तांबे यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे आयोजन 6 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारील सभापती निवास मध्ये, देवरुख पोलीस स्टेशनसमोर करण्यात आले असून दुपारी 3 वाजेपर्यंत चालणार आहे. या शिबिरामध्ये नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीसह विविध वैद्यकीय सेवांचा लाभ घेता येणार आहे. जिल्ह्या रुग्णालयात रुग्णांना रक्ताचा तुटवता भासत असून रक्तदान शिबिराद्वारे समाजहितासाठी रक्तदानाची चळवळ पुढे नेण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.

या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी आरोग्य तपासणीसाठी आणि रक्तदानासाठी नोंदणी केली आहे. “समाजासाठी ही एक छोटी सेवा आहे जी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करणारी आहे,” असे रोहित तांबे यांनी सांगितले.

शिबिरात सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहिती घेण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अशा उपक्रमांमुळे समाजातील आरोग्यविषयक जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी वाढण्यास हातभार लागतो.

Loading

दि.बुध्दिस्ट सोसायटीच्या वतीने माता रमाई राष्ट्रीय स्मारक वणंद दापोली येथे बौध्दाचार्य,श्रामणेर शिबीराचे आयोज

   Follow us on        

दापोली: दि.बुध्दिस्ट सोसायटी ऑफ् इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी व तालुका शाखा दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई राष्ट्रीय स्मारक वणंद दापोली येथे रविवार दि.२७.१०.२०२४ ते मंगळवार दि.०५.११.२०२४ पर्यंत बौद्धाचार्य,श्रामणेर शिबीर आयु.विजय जाधव जिल्हा उपाध्यक्ष संस्कार विभाग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात ४० प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग नोंदविला आहे.

भिक्षू संघाचे संघनायक पुज्य भन्ते बोधी रत्न यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर संपन्न होईल.शिबीराचे उद्घाटन आद.अनंत सावंत जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी यांच्या हस्ते होईल.प्रमुख मार्गदर्शक आयु.एन.बी.कदम जिल्हा महासचिव,आयु.प्रदिप जाधव जिल्हा कोषाध्यक्ष हे असतील.

शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून आद.अनंत सावंत वरिष्ठ केंद्रीय शिक्षक आद.एन.बी.कदम केंद्रीय शिक्षक आदी.विजय जाधव केंद्रीय शिक्षक आद.विकास पवार केंद्रीय शिक्षक आद.अल्पेश सकपाळ केंद्रीय शिक्षक आद.संजय कांबळे केंद्रीय शिक्षक हे मार्गदर्शन करतील.या

कार्यक्रमाला विशेष उपस्थिती जिल्हा पदाधिकारी आयु.आयु.विजय कांबळे, आयु.जनार्दन मोहिते,आयु.शरणपाल कदम‌,आयु.सुनिल पवार,आयु.सुनिल धोत्रे, आयु.संदिप धोत्रे,आयु.महेंद्र झकदम.आयु.तानाजी कांबळे, तालुका पदाधिकारी आयु.अनिल घाडगे अध्यक्ष दापोली,आयु.राहूल मोहिते अध्यक्ष संगमेश्वर, आयु.विजय मोहिते अध्यक्ष रत्नागिरी, आयु.आर.बी.कांबळे अध्यक्ष लांजा, आयु.सत्यवान जाधव अध्यक्ष राजापूर,आयु.जयरत्न कदम अध्यक्ष चिपळूण,आयु.विद्याधर कदम अध्यक्ष गुहागर, आयु.अ.के मोरे अध्यक्ष खेड, आयु.हर्षद जाधव अध्यक्ष मंडणगड आयु.दिपक धोत्रे अध्यक्ष वणंद ग्राम शाखा हे उपस्थित राहणार आहेत.

Loading

धक्कादायक! गणपतीपुळ्याच्या समुद्रात दोघांचा बुडून मृत्यू; एकाला वाचविण्यात यश

   Follow us on        
रत्नागिरी, दि. २९ सप्टें: गणपतीपुळे येथे समुद्रात आज रविवारी (दि.29) सायंकाळी 5.15 च्या सुमारास जेएसडब्ल्यू कंपनीच्या पोर्टवरील तीन कर्मचार्‍यांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. तर एकाला वाचवण्यात जीव रक्षकांना यश आले. प्रदीप कुमार (30,मुळ रा.ओडीसा) आणि महंमद युसूफ (29,मुळ रा.उत्तराखंड) अशी बुडून मृत्यू झालेल्या तरूणांची नावे आहेत. तर डाकुआ टुकुना (30,रा.वेस्ट बंगाल) याला वाचवण्यात यश आले.
याबाबात सविस्तर वृत्त असे कि जेएसडब्ल्यू कंपनीच्या पोर्टचे तीन कर्मचारी रविवारी गणपतीपुळे येथे फिरायला आले होेते. ते समुद्रात आंघोळ करण्यासाठी गेले असताना हे तिघेही लाटेबरोबर पाण्यात ओढले गेले. त्यांनी आरडोओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून समुद्रकिनारी असलेले जीवरक्षक अनिकेत राजवाडकर आणि सुलभ चालक निखिल सुर्वे यांनी समुद्रात उड्या घेत तिघांनाही समुद्रकिनारी आणले परंतु, यातील दोघांच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच जयगड पोलिसानी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र या तिघांपैकी दोघांचा या दरम्यान मृत्यू झाला.

Loading

देवरूखात उद्या राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धा : लाखोंची बक्षिसे 

   Follow us on        

देवरुख: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोकण प्रदेशाध्यक्ष रोहित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त देवरूख येथे गुरुवारी भव्य राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

रोहित तांबे यांचा आज वाढदिवस साजरा करण्यात आला, यानिमित्ताने गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात येणार आहेत. तसेच गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी देवरुख बागवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि भव्य राजस्तरीय नांगरणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .या स्पर्धेत लाखोंच्या बक्षिसांची लय लूट होणार आहे. यामध्ये घाटी व गावठी असे एकूण २० विजेत्यांना या स्पर्धेत सन्मानित करण्यात येणार आहे.

सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी रोहित दादा विचार मंच , कोकण विकास संघर्ष समिती कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेत आहेत .यामध्ये उद्योजक अक्षय जाधव सागर मोहिते ज्येष्ठ नेते संगम पवार मंगेश कदम भैया जाधव बाबू गोपाळ, प्रवीण सावंत शिवणे ऋतिक सावंत उजगांव, सोनू सावंत गमरे,आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

Loading

श्री रामवरदायिनी देवस्थान ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान.

   Follow us on        

चिपळूण:- श्री रामवरदायिनी मंदिर देवस्थान ट्रस्ट, यांच्या वतीने मजरे दादर, कळकवणे येथे दसपटी विभागातील शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केलेल्या श्री समर्थ अविनाश शिंदे कळकवणे (आय. ए. एस), कु. हरिज्ञा लक्ष्मण शिंदे ओवळी (नेव्ही अधिकारी), श्री अथर्व श्रीधर कदम टेरव (सी. ए.), कु. स्नेहा अरूण शिंदे कळकवणे (सी. ए.), श्री शुभम शशिकांत शिंदे कोळकेवाडी (कबड्डी क्षेत्रात विशेष प्राविण्य), डॉ. सलोनी सुभाष शिंदे तिवरे (एम.बी.बी.एस.), श्री कृपाल दिलीप शिंदे कोळकेवाडी (पी. एच.डी. डॉक्टरेट परीक्षेत विशेष प्राविण्य), कु. अनुजा अनिल चव्हाण मोरवणे (डॉक्टरेट इन फिजिओथेरपी), श्री निलेश कृष्णाजी शिंदे कळकवणे (वैद्यकीय क्षेत्रात विशेष पुरस्कार) प्राप्त केलेल्या या नवरत्नांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व दसपटीभूषण, दसपटीरत्न असे सन्मानचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले.

सदर किर्तींवंतांचा गौरव करताना न्यासाचे अध्यक्ष श्री प्रतापराव शिंदे यांनी सांगितले की या गुणवंतांनी घेतलेले कठोर परिश्रम, चिकाटी, सातत्य तसेच आईवडिलांचे व कुलस्वामिनी रामवरदायिनी- भवानीचे आशीर्वाद यामुळेच त्यांना हे घवघवीत यश प्राप्त झाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपण आपल्या समाजाचेही काही देणे लागतो याचा विसर पडू देवू नये असा मोलाचा सल्ला दिला.

गुणवंतांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमचे गुणगौरव सोहळे अनेक झाले पण आई रामवरदायिनीच्या प्रांगणात आमच्या समाज बांधवांनी केलेला सन्मान आमच्यासाठी विशेष आहे व त्यामुळे आम्ही सर्व भारावून गेलो आहोत.

या सन्मान सोहळ्यास न्यासाचे विश्वस्त, व्यवस्थापन समिती, सल्लागार समिती, दसपटी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, दसपटी विभागातील मान्यवर तसेच आदरणीय समाज बांधव उपस्थित होते.

Loading

रत्नागिरी जिल्ह्यातील ३११ गावे ‘इको सेन्सेटिव्ह झोन’ मध्ये समाविष्ट

   Follow us on        
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील ३११ गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत कुणाच्या हरकती असल्यास ६० दिवसांत हरकती सादर कराव्यात, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.
केंद्र शासनाच्या पर्यावरण , वने व वातावरण बदल यांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्धीसाठी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि संगमेश्वर या पाच तालुक्यांतील ३११ गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित केली आहे. या मसुदा अधिसूचनेत नमूद केल्यानुसार क्षेत्रातील ज्या स्थानिक रहिवासी यांची यासाठी हरकत आहे, त्यांनी साठ दिवसांच्या आत केंद्र शासनाच्या पर्यावरण वने व वातावरण बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली- ११०००३ यांच्याकडे हरकत नोंदविणे आवश्यक आहे.महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूरचे सदस्य सचिव तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडील केंद्र शासनाचे पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाचे अधिसूचना पत्रासह प्राप्त झाले आहे. त्यानुसार चिपळूण, खेड, राजापूर, रत्नागिरी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार चिपळूण, खेड, लांजा, राजापूर व संगमेश्वर यांना ही अधिसूचना स्थानिक पातळीवर प्रसिद्ध करून अधिसूचनेबाबत हरकतीचा अहवाल सादर करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
कोणत्या तालुक्यात किती गावे?
या ३११ गावांमध्ये चिपळूण तालुक्यातील ४४ गावांचा, खेड तालुक्यातील ८५ गावांचा, राजापूर तालुक्यातील ५१ गावांचा, संगमेश्वर तालुक्यातील ८ गावांचा समावेश आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search