Category Archives: देश

या रेल्वे स्थानकावर प्रवासी तिकीट खरेदी करतात मात्र प्रवास करत नाही; नेमके कारण काय?

दक्षिण भारतात एक रेल्वे स्थानक आहे. जिथे दररोज 60 हून अधिक तिकिटे खरेदी केली जातात, परंतु प्रवासासाठी कोणीही त्यांचा वापर करत नाही. जर ते प्रवास करत नसतील तर ते तिकीट का घेतात असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर मग या प्रश्नाचे उत्तरही खाली वाचूया.
तेलंगणा राज्यात वारंगल जिल्ह्यातील नरसंपेटा मतदारसंघासाठी नेकोंडा रेल्वे स्टेशन हे एकमेव थांबा आहे. परंतु तिरुपती, हैदराबाद, दिल्ली आणि शिर्डी यांसारख्या महत्त्वाच्या शहरांना जाणाऱ्या गाड्या तिथे थांबत नाहीत, ज्यामुळे प्रवास करू इच्छिणाऱ्या रहिवाशांना अडचणी येतात. पद्मावती एक्स्प्रेसचा परतीचा प्रवासही रद्द करण्यात आला, त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली होती.
प्रवाशांच्या वारंवार विनंती केल्यामुळे अलीकडेच सिकंदराबाद ते गुंटूर या इंटरसिटी एक्स्प्रेसला नेकोंडा येथे तात्पुरता थांबा देण्यात आला. परंतु रेल्वे अधिकाऱ्यांनी एक अट घातली आहे: तीन महिन्यांसाठी उत्पन्न मिळाल्यासच ते पूर्ण थांबा देतील; अन्यथा, ते ते रद्द करतील.
मग काय? कसाबसा मिळालेला हा थांबा न गमावण्याचा निर्धार असलेले नेकोंडा येथील सर्व ग्रामस्थ एकत्र आले आणि त्याची त्यांनी ‘नेकोंडा टाउन रेल्वे तिकीट फोरम’ नावाचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला, ज्यामध्ये सुमारे 400 लोक सदस्य म्हणून सामील झाले. त्यांनी रु. 25 हजार रुपये देणगीद्वारे जमा केले. या रकमेतून ते  याद्वारे ते नेकोंडा ते खम्मम, सिकंदराबाद आणि इतर ठिकाणी दररोज रेल्वे तिकीट खरेदी करतात मात्र प्रवास करत नाहीत.
स्थानकाला उत्पन्न दाखवण्यासाठी ते असे करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. स्टेशनवर अधिक गाड्या थांबवण्याच्या दिशेने काम करण्याची त्यांची योजना आहे.

भारतीय रेल्वे मंडळात ५६९६ पदांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी शेवटचे २ दिवस बाकी

 RRB Bharti 2024: भारतीय रेल्वे मंडळने असिस्टंट लोको पायलट (ALP) या पदांसाठी ५६९६ जागांसाठी भरती करण्याचे जाहीर केले आहे. त्यासंबंधी जाहिरात सुध्दा प्रसिदध करण्यात आली आहे.  योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.  अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी  २०२४ आहे. 
  • अर्ज करण्याचे माध्यम -ऑनलाइन
  • एकूण पदसंख्या – ५६९६ पदे
  • संस्था – भारतीय रेल्वे मंडळ
  • नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही
  • शेवटची दिनांक – ३१ जानेवारी २०२४
  • जाहिरात दिनांक – जानेवारी २०२४
  • भरती प्रकार – सरकारी
  • निवड मध्यम (Selection Process) –
  • अधिकृत वेबसाईट www.indianrailways.gov.इन
  • पद- असिस्टंट लोको पायलट (ALP)
  • पदसंख्या – ५६९६
  • शैक्षणिक योग्यता/ Eligibility Criteria: – असिस्टंट लोको पायलट (ALP): १० वी उत्तीर्ण आणि ITI.
  • वेतन/ पगार/ Pay Scale: -असिस्टंट लोको पायलट (ALP): वेतन संबधी अधिक माहितीसाही जाहिरात (PDF) पहावी.
  • वय मर्यादा/ Age Limit: या तारखेप्रमाणे: 2024 रोजी.
  • कमीत कमी: १८ वर्ष.
  • जास्तीत जास्त: ३० वर्ष.
  • वयामध्ये सूट: जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.

 

भरतीची जाहिरात

महाराष्ट्राच्या चित्ररथाला जिंकवून देण्यासाठी आपले मत महत्वाचे; ‘असे’ देता येईल मत

मुंबई: कर्तव्यपथावरील संचलनात आज अनेक नेत्रदीपक चित्ररथ समाविष्ट झाले होते. या सर्व चित्ररथातील विजेता चित्ररथ निवडण्यासाठी जनतेकडून मते मागविण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्यातर्फे ‘छत्रपतीशिवाजीमहाराज : लोकशाहीचे जनक’ या विषयावर अतिशय चित्त वेधक आणि नितांत सुंदर असा चित्ररथ कर्तव्यपथावरील संचलनात सहभागी झाला. या चित्ररथाला जिंकून देण्याची संधी आता आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे सर्वानी आपले मत नोंदवून या राज्याच्या चित्ररथाला जिंकवून द्यावे असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचनालय तर्फे काण्यात आले आहे.
उद्या २७ जानेवारी सायं. ५.३० पर्यंत हे मतदान आपणास करता येणार आहे.
कसे नोंदवाल मत?
👇मार्ग पहिला :-
स्वत:च्या नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावरून MYGOVPOLL(स्पेस)344521(comma) 9 असा संदेश 7738299899 या क्रमांकावर पाठवावा.
म्हणजेच हा मेसेज खालील प्रमाणे होईल
MYGOVPOLL 344521,9 
👇मार्ग दुसरा :-
प्रथमत: https://mygov.in/group-poll/vote-your-favourite-tableau-republic-day-2024/ या लिंकवर क्लिक करुन लॉगिन करा. त्यानंतर महाराष्ट्राचा चित्ररथ निवडून मत नोंदवा.

ज्ञानवापी मशीदच्या जागी हिंदू मंदिर होते; ASI ने पुरावे समोर आणले

नवी दिल्ली: ज्ञानवापी मशीद संदर्भात भारतीय पुरातत्व विभागाचा (ASI) रिपोर्ट आला आहे. या अहवालातून ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी मंदिरच होते. मंदिर पाडून मशीद उभारण्यात आली आल्याचे स्पष्ट झाले आहे. मंदिर असल्याचे 32 पेक्षा जास्त पुरावे मिळाले आहेत. 32 शिलालेखमधून हिंदू मंदिर असल्याचे स्पष्ट होत आहे. हा अहवाल दोन्ही पक्षांना एएसआयने दिला आहे. मशीद बांधताना हिंदू मंदिरातील खंबे थोड्याप्रमाणात बदलण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या अहवालातील काही माहिती पुढे आली आहे. 
नेमके काय आहे रिपोर्टमध्ये
ज्ञानवापीत मंदिर असताना एक मोठा केंद्रीय कक्ष होता. तसेच उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम विभागात एक एक खोली होती. त्यातील उत्तर, दक्षिण आणि पश्चिम विभागातील अवशेष मिळाले. परंतु पूर्व विभागाचे अवशेष अजून मिळाले नाही. मंदिराचे जे केंद्रीय कक्ष होते ते आता मशिदीचे केंद्रीय कक्ष आहे. मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेकडून होता. हे प्रवेशद्वार दगडांनी बंद करण्यात आला आहे. मशीद बनवताना मंदिराच्या अनेक खुणा मिटण्याचा प्रयत्न झाला असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
  • मशिदीच्या आधी, तिथे बांधलेल्या मंदिरात एक मोठा मध्यवर्ती कक्ष होता आणि उत्तर बाजूला एक लहान खोली होती.
  • मध्यवर्ती कक्ष आणि पूर्व-अस्तित्वात असलेल्या संरचनेचे मुख्य प्रवेशद्वार आहे.
  • मशिदीची पश्चिमेकडील खोली आणि पश्चिमेकडील भिंत आहे.
  • मशिदीच्या बांधकामादरम्यान, मंदिराच्या खांबांमध्ये तसेच इतर भागांमध्ये किरकोळ बदल करण्यात आले. ज्यामुळे त्याला मशिदीचा आकार देण्यात आला.
  • विद्यमान संरचनेवर शिलालेख दिसून आले.
  • दगडांवर अरबी आणि पर्शियन शिलालेख आहे.
  • तळघरात शिल्पाचे अवशेष आहेत.
  • शिलालेखामध्ये देवनागरी, तेलुगू आणि कन्नड लिपी
ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी 32 शिलालेख सापडले. त्यात देवनागरी, तेलुगू आणि कन्नड लिपी मिळाली आहे. त्यावर जनार्दन, रुद्र आणि उमेश्वर असे देवांचे नाव मिळाले. महा-मुक्तिमंडप यासारखे तीन शब्द शिलालेखांमध्ये मिळाले आहे. मंदिराचे अनेक शिलालेख मशीद बनवताना वापरल्याचे अहवालात म्हटले आहे.
त्याचप्रमाणे येथे शिवलिंग, हनुमान आणि गणेशजी च्या मुर्त्या आढळून आलेल्या असल्याने येथे मंदिरच असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. 

“हॅव अ बोरिंग बर्थडे.. वीरू” सचिनच्या विरूला वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा…

मुंबई :आज माजी भारतीय क्रिकेटवीर वीरेंद्र सेहवाग याचा वाढदिवस. या निमित्ताने वीरेंद्र सेहवाग अर्थात वीरू ला सर्व त्याच्या चाहत्यांनी विविध माध्यमातून शुभेच्छाच पाऊस पाडला आहे. मात्र विरुचा क्रिकेट पार्टनर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने त्याला अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंट वर विरूला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने पोस्ट केले की 

“जेव्हा मी त्याला हळू खेळ आणि क्रीजवर राहण्यास सांगितले त्यावर तो म्हणाला, “ठीक आहे” आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर प्रहार करून चौकार मारला. माझ्या सल्ल्याचा अगदी विरुद्ध वागायला आवडणाऱ्या माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आणि माझ्या म्हणण्याच्या विरुद्ध वागतो म्हणून मी त्याला मी म्हणणार आहे……हॅव अ बोरिंग बर्थडे,वीरू”

 

”त्यादिवशी विवाह मुहुर्त असल्याने… ” निवडणूकीच्या तारखेत बदल करण्याचे दिले गेले अजब कारण…

राजस्थान :निवडणूक आयोगाने राजस्थान विधानसभेसाठी मतदानाची तारीख बदलली आहे. 23 नोव्हेंबर ऐवजी आता 25 नोव्हेंबरला राजस्थानमध्ये मतदान होणार आहे. ही तारीख बदलण्याचे कारण ऐकून तुम्हीपण थोडे आश्चर्यचकित व्हाल. 

23 नोव्हेंबर या दिवशी लग्नाचा चांगला मुहूर्त आहे. त्यामुळे त्याचा मतदानावर परिणामाची भीती सर्वच पक्षांनी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून हा बदल करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

दिनांक 23 नोव्हेंबर हा दिवस विवाह आणि मंगलकार्यासाठी शुभ असल्याने या दिवशी मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे आणि इतर सामाजिक कार्ये असतिल त्यामुळे या दिवशी मतदान करणे मतदारांना गैरसोयीचे जाईल. तसेच त्याचा परिणाम होवूनकमी मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या तारखेत बदल करावा अशी निवेदने राजकीय पक्षांकडून आणि सामाजिक संस्थे कडून आली होती. त्याचप्रमाणे समाज माध्यमातून सुद्धा हा याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. या सर्वांचा विचार करून आपण या तारखेत बदल करत असल्याचे भारतीय निवडणूक आयोगाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे. 

 

 

वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मुंबईहून दोन विशेष वंदे भारत ट्रेन

मुंबई : वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मुंबईहून गुजरातमध्ये जाणाऱ्या क्रिकेटप्रेमी प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने ‘मुंबई ते अहमदाबाद’ दोन विशेष वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचे नियोजन केले आहे. क्रिकेट सामन्यांसाठी विशेष एक्स्प्रेस चालवण्याची भारतीय रेल्वे इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.

यंदाच्या वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामना शनिवारी, १४ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू होणार आहे. स्टेडियमची आसनक्षमता एक लाख ३२ हजार असून सामन्यांची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. यामुळे मुंबई ते अहमदाबाददरम्यान सामन्याच्या आदल्या दिवशी रात्री उशिरा आणि सामन्याच्या दिवशी पहाटे अशा दोन वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचे नियोजन आहे.

तात्पुत्या वेळापत्रकानुसार १३ ऑक्टोबरला रात्री दहा वाजता मुंबईहून अहमदाबादसाठी वंदे भारत एक्स्प्रेस रवाना होईल आणि १४ ऑक्टोबरला पहाटे सहा वाजता अहमदाबादमध्ये पोहोचेल. दुसरी विशेष एक्स्प्रेस मुंबईहून सामन्याच्या दिवशी म्हणजे १४ ऑक्टोबरला पहाटे पाच वाजता सुटेल आणि १२ वाजेपर्यंत अहमदाबादला पोहोचेल. तूर्त गाड्यांचे थांबे निश्चित करण्यात आले नसले, तरी महत्त्वाच्या स्थानकांवर गाड्यांना थांबा देण्यात येणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘वंदे भारत’चा नवा स्लिपर व्हर्जन लवकरच; फोटो येथे पहा

Sleeper Version Of Vande Bharat : आरामदायी, वेग आणि अत्याधुनिक अशी ओळख असलेल्या वंदे भारतचा प्रवास आणखी आरामदायी होणार आहे. ट्रेनमध्ये नवा स्लिपर व्हर्जन येणार आहे.
केंदीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या स्वरुपातील स्लिपर व्हर्जनचे फोटो शेअर केले आहेत. ट्रेनमधील स्लिपर कोच अतिशय आरामदायी असून, यामुळे प्रवाशांना सुखद अनुभव मिळणार आहे.
नव्याने प्रस्तावित स्लिपर कोच पुढील वर्षाच्या (२०२४) सुरवातीला येणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी म्हटले आहे.

सनातन धर्माची मच्छरांशी तुलना करणार्‍या उदयनिधीं विरोधात मुख्यमंत्र्यांची कडक शब्दात प्रतिक्रिया

मुंबई :तमिळनाडूचे क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा तसेच अभिनेते उदयनिधी स्टॅलिन याने सनातन धर्मा विषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर विविध स्तरावरून याचा निषेध केला जात आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदयनिधीचा कठोर शब्दात समाचार घेतला आहे. 

काय म्हणाले मुख्यमंत्री? 

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या ‘दिवट्या’ मुलाने, उदयनिधीने सनातन धर्म संपविण्याची भाषा आज केली. असे अनेक स्टॅलिन येतील आणि जातील, पण सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल. स्टॅलिन पाठोपाठ काँग्रेसचाही बुरखा फाटला. सनातन धर्म म्हणजे जातींमध्ये विभागलेला समाज आहे, बाकी काही नाही अशी भाषा कार्ती चिदंबरमने केली आहे.

हा केवळ हिंदू धर्मावर हल्ला नाही तर हिंदू संस्कृती, संस्कार आणि उज्ज्वल परंपरेचा त्यांनी अपमान केला आहे. कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावण्याचं पाप त्यांनी केलंय. त्यांच्या विधानामुळे ‘इंडी’आघाडीचा खरा, हिंदूविरोधी चेहरा आज पुन्हा जगासमोर आला आहे. कॉंग्रेसने तर कायमच हिंदूविरोधी भूमिका घेतलेल्या आहेत. काँग्रेसचा राम मंदिराला विरोध होता. हिंदू दहशत वाद हा शब्दप्रयोग त्यांनीच शोधून काढला. चिदंबरम पुत्राने मांडलेली भूमिका काँग्रेसच्या विचारसरणीला धरूनच आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली एक भारत, श्रेष्ठ भारत उभारणीचं काम सुरू आहे. परदेशात भारताचा जयजयकार होतोय. पण देशाचा विकास, प्रगती विरोधकांच्या डोळ्यात खुपतंय. त्यामुळे अशा पद्धतीने विष कालवण्याचं काम ते करत आहेत.

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर ‘इंडी’ आघाडीचे गोडवे गाणाऱ्या उद्धव ठाकरेचे ‘उद्योग’ बघून त्यांना प्रचंड वेदना झाल्या असत्या. खरं तर उद्धव ठाकरे यांनी उदयनिधी आणि चिदंबरम यांच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध करायला हवा. त्यांना तसं करायचं नसेल तर आता उदयनिधी स्टॅलिन यांच्याही गळ्यात गळे घालून पुन्हा फोटो काढायलाही हरकत नाही. कारण त्यांनीसुध्दा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा गळा घोटून हिंदू विरोधकांच्या गळ्यात गळा घातलेला आहे.

आज इंडिया आघाडीचा बुरखा फाटला असून हिंदूविरोधी विचार रुजविण्याचे आणि धर्म संपवण्याचे त्यांचे मनसुबे उघड झाले आहेत. मात्र अशा शेकडो आघाड्या एकत्र आल्या तरी ना तर धर्म संपवू शकणार ना हिंदू संस्कृती. ती भारतीयांच्या रक्तात आहे, डीएनएमध्ये आहे, हे समजण्याची कुवत असायला हवी.

नेमके काय बोलले उदयनिधी? 

तमिळनाडूचे क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा तसेच अभिनेते उदयनिधी स्टॅलिन यांना द्रमुक (DMK) पक्षाचे भवितव्य समजले जाते. उदयनिधी यांनी पत्रकार परिषदेत सनातन धर्मावर केलेल्या एका विधानामुळे ते सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सनातन धर्म आणि हिंदुत्वाची शिकवण हे डेंग्यू, मलेरिया आणि करोना रोगासमान आहेत, असे विधान उदयनिधी यांनी चेन्नई येथे शनिवारी (दि. २ सप्टेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. भाजपाकडून आणि विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून या विधानावर जोरदार टीकास्र सोडण्यात आले. त्यानंतर उदयनिधी यांनी काहीशी सावध भूमिका घेत भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचे आरोप फेटाळून लावले. “सनातन धर्मामुळे जाती आणि धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडली जाते, त्यामुळे अशा धर्माचे उच्चाटन करायला हवे” या आपल्या वक्तव्यावर ते ठाम असल्याचे म्हणाले. मात्र अमित मालवीय यांनी नरसंहाराचा दिलेला संदर्भ चुकीचा असून आपण नरसंहाराबाबत काही बोललो नाही, असे ते म्हणाले.

“मी माझ्या वक्तव्याचा महत्त्वाचा भाग पुन्हा उद्धृत करतो. ज्याप्रमाणे कोविड १९ चा प्रादुर्भाव होतो किंवा डासांमुळे डेंग्यू आणि मलेरिया सारखे रोग पसरतात, त्याप्रमाणे सनातन धर्मदेखील अनेक सामाजिक समस्या निर्माण करण्यास जबाबदार आहे”, असे स्पष्टीकरण उदयनिधी यांनी ट्विटरवर दिले आहे.

सर्वसामान्यांना दिलासा; घरगुती गॅस सिलेंडर उद्यापासून २०० रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता

नवी दिल्ली : सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. घरगुती गॅस सिलेंडर २०० रुपयांनी स्वस्त होण्याती शक्यता आहे. उद्यापासूनच हे नवे दर लागू होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. 
आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या किमती कमी झाल्या आहेत त्यामुळे हे दर कमी  होण्याची शक्यता आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आगामी निवडणुका. डिसेंबरमध्ये ५ राज्यांमध्ये निवडणुका आहेत, तसंस एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. मोदींची यंदा तिसरी लोकसभा निवडणूक असणार आहे. त्यामुळे मोदी सरकार महागाईबाबत कुठलाच धोका पत्करण्याच्या तयारीत नसल्याचं सूत्रांकडून कळतंय. 
LPG गॅस सिलेंडरचे सध्याचे दर
ऑगस्ट महिन्यात राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरचे दर ११०३ रुपये इतके होते. तर मुंबईत सिलेंडरचे दर ११०२ रुपये, कोलकातामध्ये ११२९ रुपये, चेन्नईमध्ये १११८.५० रुपये होते. पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजीच्या दरात बदल करतात. सूत्रांच्या माहितीनुसार, उज्ज्वला योजनेतंर्गत घरगुती गॅस सिलेंडरचे दर २०० रुपयांनी स्वस्त होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search