Category Archives: देश

वंदेभारत एक्सप्रेसचा रंग बदलणार; ‘हे’ आहे कारण

 

Vande Bharat Express :निळ्या आणि पांढर्‍या रंगातील वंदे भारत एक्सप्रेसला आता नवीन लूक मिळणार आहे. यापुढे निर्मिती होणार्‍या वंदे भारत एक्सप्रेस गाड्या भगव्या Orange आणि राखाडी Grey रंगाच्या असणार आहेत.

सध्या असलेला पांढरा रंग धूळ चिटकून खराब होत असल्याने लूक व्यवस्थित ठेवण्यासाठी त्याला वारंवार धुवून साफ करावे लागत आहे. हे जरा जास्त गैरसोयीचे होत असल्याने त्याला पर्यायी दुसरा कोणता रंग देता येईल याबद्दल ईतर रंगाचे पर्याय शोधले जात आहेत. सध्या भगव्या Orange आणि राखाडी Grey रंगाचा पर्याय विचाराधीन असून एका गाडीला प्रायोगिक तत्त्वावर हा रंग दिला आहे. या रंगाना हिरवा झेंडा भेटल्यास भविष्यात सर्वच वंदे भारत एक्सप्रेस भगव्या आणि राखाडी रंगाच्या दिसणार आहेत. या बदला बरोबरच प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी आसनव्यवस्थेत सुधारणा करण्यात येणार आहेत. 

भगवा रंग देशाच्या झेंड्याच्या रंगातून घेतला आहे असे केंदीय रेल्वे मंत्री आदित्य वैष्णव म्हणाले आहेत. भगवा रंग भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे तर राखाडी रंग आधुनिकतेचे प्रतीक आहे म्हणुन हे दोन्ही रंग या एक्सप्रेस गाडीसाठी निवडण्यात आले आहेत.

Loading

RBI कडून नवीन सुविधा | एटीएम कार्ड नसले तरीही एटीएम मधून पैसे काढू शकता

ICCW RBI | तुम्ही एटीएमवर गेलाय अन् डेबीट कार्ड जर विसरला असाल तर? चिंता करण्याचं कारण नाही. तुम्ही युपीआयच्या माध्यमातून आता एटीएममधून पैसे काढू शकता.

२०२२मध्ये आरबीआयने आयसीसीडब्लू नावाची सुविधा सुरु केलीय. ज्यात आपण डेबीट कार्ड न वापरता युपीआय थ्रू एटीएम मशीनमधून पैसे काढू शकतो.

यासाठी तुम्हाला फक्त एक प्रोसेस फॉलो करावी लागते. सर्वात पहिलं तुम्ही एटीएम मशीवर एटीएम कॅश विल्ड्राल या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला जी रक्कम हवी आहे ती टाका, त्यानंतर क्युआर कोड जनरेट होईल.

जनरेट झालेल्या क्युआर कोडला तुमच्या युपीआय ॲपवरुन स्कॅन करा आणि युपीआय पीन टाका. त्यानंतर ‘प्रेस हिअर फॉर कॅश’ पर्यायावर क्लिक करा. तुम्ही टाकलेली रक्कम तुम्हाला एटीएम मशीनमधून मिळेल.

ही सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे लागत नाही. युपीआयचा वापर करुन तुम्ही दोन वेळा दिवसांत असे पैसे काढू शकता. तसेच प्रत्येक ट्रान्जेक्शनला तुम्ही जास्तीत जास्त ५ हजार रुपये काढू शकता.

Loading

Odisha Train Accident : जुनियर इंजिनीअर कुटुंबासह फरार! घातपाताचा संशय वाढला

Odisha Train Accident  : बालासोर रेल्वे अपघात चौकशी प्रकरणी एक मोठी बातमी आहे. या प्रकरणात याआधी चौकशी करण्यात आलेला रेल्वेचा जुनियर इंजिनीअर आमीर खान अचानक कुटुंबासहित गायब झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की आमीर खान याची याआधी अपघात प्रकरणी सीबीआयने चौकशी केली होती. मात्र त्यानंतर तो कामावर रुजू झाला नाही होता. संशय आल्याने सीबीआयने चौकशीसाठी पुन्हा तो ज्या भाड्याच्या घरात राहत होता ते घर गाठले असता तो फरार असल्याचे दिसून आले. त्याचा घराला कुलूप लावले होते. शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता तो आणि त्याचे कुटुंब अचानक गायब झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.

सीबीआयने तो राहत असलेले घर सील करून त्यावर पाळत ठेवली आहे. सीबीआय फरार इंजिनीअर आमीर खान आणि त्याच्या कुटुंबाचा शोध घेत आहेत.

बालासोर येथील भीषण रेल्वे अपघातात 292 प्रवाशांनी आपला जीव गमावला होता तसेच बरेच प्रवासी जखमी झाले होते. हा अपघात की घातपात याची चौकशी करण्यासाठी सीबीआयला पाचारण करण्यात आले होते.

Loading

आधारकार्ड – पॅनकार्ड लिंक करण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक | स्मार्टफोनवर करू शकता लिंक; जाणून घ्या प्रोसेस…

नवी दिल्ली :सरकारने PAN आणि Aadhaar Card लिंक करणे अनिवार्य केले आहे. तुम्ही जर आतापर्यंत ही दोन्ही कागदपत्रं लिंक केली नसल्यास ३० जून २०२३ ही शेवटची तारीख आहे. ३० जून २०२३ पर्यंत आधार – पॅन लिंक न केल्यास पॅन कार्ड काम करणार नाही. असे पॅन कार्ड पुनः कार्यरत करण्यासाठी पुढील एक महिन्यासाठी अवधी भेटू शकतो मात्र मोठ्या रकमेचा दंड बसू शकतो. त्यामुळे आजच आपले आधार – पॅन लिंक करून निश्चित व्हा. 

आधार – पॅन कार्ड लिंक करण्याची प्रोसेस खूपच सोपी असून, तुम्ही घरबसल्या मिनिटात हे करू शकता. यासाठी तुम्हाला इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तुम्ही www.incometax.gov.in ला देखील ओपन करू शकता. वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला क्विक लिंकमध्ये Link Aadhaar या पर्यायावर जावे लागेल. हा पर्याय तुम्हाला वेबपेजच्या उजव्या बाजूला दिसेल. यावर टॅप केल्यानंतर पॅन नंबर, आधार नंबर, रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि नाव इत्यादी माहिती द्यावी लागेल.

आता तुम्हाला लिंक आधार हा पर्याय सिलेक्ट करावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर आधार व पॅन कार्ड लिंक होईल. जर तुमचे आधार कार्ड व पॅन कार्ड आधीपासूनच लिंक असल्यास तुम्हाला एक मेसेज दिसेल. ज्यात कागदपत्रं लिंक असल्याचे सांगितले जाईल. तसेच, तुम्ही आधीच आधार कार्ड व पॅन लिंक करण्याची रिक्वेस्ट केली असल्यास उजव्या बाजूला दिलेल्या Link Aadhaar Status वर क्लिक करून माहिती पाहू शकता. यानंतर आधार व पॅन नंबर देवून View Link Aadhaar Status वर क्लिक करा. या प्रोसेसनंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. दरम्यान, PAN आणि Aadhaar Card लिंक करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे.  

 

Loading

वंदे भारत एक्सप्रेसच्या छताला गळती; विडिओ व्हायरल

Vande Bharat Express | सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा एक धक्कादायक विडिओ सध्या सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

वंदे भारत एक्सप्रेसच्या छताला गळती लागली असून मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी गाडीत शिरत आहे आणि रेल्वेचे कर्मचारी हे पाणी भरून बाहेर टाकत असल्याचा एक विडिओ ट्विटर वर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे केरळ कोन्ग्रेस च्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वर हा विडिओ पोस्ट केला गेला आहे.

Loading

सावधान | ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत आहे; कोकण किनारपट्टीला धोका

 

Cyclone Alert |अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ निर्माण झाल्याने देशाच्या किनारपट्टीसह इतर भागातही धोका निर्माण झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 5 जून रोजी दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या चक्रीवादळाला ‘बिपरजॉय’ असं नाव देण्यात आलं आहे. 

ताज्या माहितीनुसार  हा कमी दाबाचा पट्टा गोव्यापासून 920km किमी अंतरावर दक्षिण-पुर्व अरबी समुद्रात असून उत्त्तर दिशेने सरकत आहे. पुढील 4 ते 5 दिवसांत ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात तसेच महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील काही भागात चक्रिवादळाची शक्यता आहे. 

मान्सून आधी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्याने पावसावरही परिणाम झाला आहे.

 

Loading

ओडिसात रेल्वेचा भीषण अपघात; ५० प्रवाशांचा मृत्यू.. १५० हून अधिक जण जखमी

Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. कोरोमंडल एक्सप्रेसची मालगाडीला धडक बसली. या भीषण रेल्वे अपघातात तबब्ल 179 जण जखमी झाले असून यामध्ये 50 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोमंडल एक्सप्रेसची मालगाडीला धडक बसल्यानंतर रेल्वेचे अनेक डब्बे रुळावरून घसरले. हा अपघात संध्याकाळच्या सुमारास झाल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर या मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.

कोरोमंडल एक्सप्रेस ही रेल्वे कोलकाता येथील हावडा स्थानकावरून चेन्नईला जात असताना ओडिशामधील बालासोर जिल्ह्यात एका मालगाडीला धडकली. त्यानंतर कोरोमंडल एक्सप्रेसचे तब्बल 18 डब्बे रुळावरुन घसरले. यामध्ये तबब्ल 179 जण जखमी झाले असून यामध्ये 50 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

 

Loading

केरळ मध्ये हाऊसबोट बुडाली; २१ प्रवाशांचा मृत्यू

केरळ : केरळमधील मलप्पुरममधील तनूर भागात 40 प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट पलटी होऊन 21 जणांचा मृत्यू झाला, यात अधिक लहान मुले आहेत. मृतांची संख्या 21 वर पोहोचली असून 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघात होताच सुरूवातीला 9 आणि नंतर काही वेळाने 15 जणांचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.

रात्री उशिरा मृतांचा आकडा आणखी वाढला. बोटीखाली आणखी लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बुडालेली बोट किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. या बचाव कार्यात अनेक स्वयंसेवक-कार्यकर्तेही मदत करत आहेत. रात्री उशीरापर्यंत बचावकार्य आणि जखमींना रुग्णालयात नेण्याची प्रक्रिया सुरू होती.

अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक होते. यासोबतच बोटीवर संरक्षण उपकरणे नसल्याच्याही बोलले जात आहेत. ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण समुद्रापासून काही अंतरावर आहे.

तनूर जिल्ह्याजवळील ओटीपुरम येथे वाहत्या नदीत बोट किनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावर असताना हा अपघात झा ला.

Loading

प्रस्तावित संकेश्वर-बांदा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहराबाहेरून?

सावंतवाडी – प्रस्तावित संकेश्वर-बांदा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार कि नाही याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. माजी आमदार शिवराम दळवी यांनी लिहिलेल्या एका पत्राला सावंतवाडी नगरपरिषदेने दिलेल्या उत्तरामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
दोन वर्षांपूर्वी सावंतवाडी मतदार संघाचे माजी आमदार शिवराम दळवी यांनी सावंतवाडी नगरपरिषदेला एक पत्र लिहिले होते. या पत्रात संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातील ज्या रिंग रोड मधून जाणार होता त्या रिंग रोड बाबत काय ठराव झाला याबाबत प्रश्न विचारला होता. मात्र नगरपरिषद मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी याबाबत कोणताही ठराव झाला नाही असे उत्तर दिले आहे. त्यामुळे हा महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.
संकेश्‍वर ते बांदा हा नवा महामार्ग होऊ घातला आहे. हा महामार्ग चौपदरी असुन जवळपास दोन हजार कोटी रुपये यावर खर्च करण्यात येणार आहे. या महामार्गाचा सर्व्हे पूर्ण झाला असून जवळ जवळ 45 ते 60 मिटर रुंदीचा व 108 मीटर लांबीचा हा मार्ग असणार आहे. केंद्र शासनाच्या भारतमाला आणि सागरामाला या दोन्ही योजनेमध्ये या महामार्गाला स्थान मिळाल्याने याचे काम तातडीने सुरू होणार आहे. मात्र हा मार्ग सावंतवाडी शहरातून जाणार, की बावळाटमार्गे बांद्याला जोडणार? हा नवा पेच निर्माण झाला होता .  बावळाटमार्गे बांदा, असा मार्ग झाल्यास 10 किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. शिवाय तांत्रिक अडचणीही कमी होतील. त्यामुळे बावळाटमार्गेच हा मार्ग नेण्याच्या हालचाली चालू होत्या. मात्र विरोध झाल्याने केंद्राने हा मार्ग आंबोली – माडखोल – सावंतवाडी – इन्सुलि मार्गे जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. हा मार्ग सावंतवाडी शहरात रिंग रोड मार्गे जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र दोन ते तीन वर्षे उलटली तरी सावंतवाडी नगरपरिषदेत याबाबत साधा ठराव पास झाला नसल्याने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग या शहराच्या बाहेरून जातो. रेल्वेमार्ग सुमारे आठ किलोमीटर दूर अंतरावरून नेण्यात आला आहे. येथे विकासासाठी पूर्ण वाव असुनही सावंतवाडी शहर विकासाच्या दृष्टीने मागे पडत आहे. त्यामुळे निदान प्रस्तावित संकेश्वर-बांदा मार्ग सावंतवाडी शहरातूनच जावा अशी मोठ्या प्रमाणावर मागणी करण्यात आली आहे.

Loading

‘त्या’ ओव्हर नंतर अर्जुन तेंडुलकर होतोय ट्रोल; नक्की काय म्हणत आहेत नेटकरी? इथे वाचा…

सध्या क्रिकेट चाहत्यामंध्ये आयपीएलचा फिव्हर आहे. सोशल मीडियावर तर या संदर्भात दिवसाला हजारोने पोस्ट व्हायरल होताना दिसतात. कोण चांगला खेळाला, कोण वाईट खेळाला याची चर्चा तर होतेच. असाच एक विषय सध्या सोशल मीडिया वर खूप गाजतोय तो म्हणजे अर्जुन तेंडुलकरची एक वाईट ओव्हर. पंजाब विरुद्ध खेळताना एका ओव्हरमध्ये त्याने ३१ रन दिलेत आणि तो सोशल मीडियावर एक महत्वाचा विषय बनला. या संदर्भात क्रिकेट चाहते दोन्ही बाजूनी आपली आपली मते मांडत आहेत. त्यातील काही कंमेंट्स आपण खाली बघू.
@nilzalte
अर्जुन तेंडुलकरने एका ओव्हरमध्ये 31 रन दिल्या. 
अर्शदिप सिंहनं अटीतटीच्या ओव्हरमध्ये दोन स्टंप तोडून केवळ दोन रन दिल्या. 
टॅलेंट इसे कहते है! बाकी आप समझदार है.
@prashantsuroshi
स्टुअर्ट ब्रॉडला युवराजने ६ सिक्स मारले होते पण आज तो जगातल्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. कार्लोस ब्रेथवेटने बेन स्टोक्सला ५ सिक्स मारले होते आज स्टोक्स कुठे पोहोचला आहे आणि कार्लोस कुठे आहे ? बॉब विलीसला संदीप पाटील ने ६ फोर्स मारले होते पण तरी तो इंग्लडच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी आहे. प्रत्येकाचा दिवस असतो हो. इतक्या लवकर निष्कर्ष काढून काय होणार आहे. 
@हेमन्त१८५६
युवराज सिंग ने स्टुअर्ट ब्रॉड ला एका षटकात सहा षटकार मारले होतें,कसोटी सामन्यांमध्ये याच ब्रोडने
पुढे 576 बळी घेतले आहेत.
@rohitjangam01
अनुभव येण्यासाठी काही सामने खराब जावे लागतात, सगळेच पहिल्या प्रयत्नात यशस्वी होतीलच अस नाही. मुळात तुलना होऊ नये. प्रत्येक खेळाडू हा चांगल्या किंवा वाईट परिस्थितितून शिकण्याचा व त्यातून चांगल देण्याचा प्रयत्न करत असतो.
@ivikas_bhartiya
Arjun Tendulkar conceded 31 runs in the 16th Over. He is a brilliant bowler but his ups and downs will make him a better player. Stop trolling and give Support.
@Nidhin_B_
Here we gooo.. The result of nepotism, 31 runs in one over and he couldn’t handle the pressure.  
I’ve seen lot of players coming in support of Arjun, and speaking against 
SanjuSamson
. Yeah he’s not a nepo product
@Msabzar2
Surprised to c mumbai playing handicaped Arjun tendulkar in their squad. Sachin Tendulkar shouldn’t let his son play this game. He is not worth it

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search