Tag Archives: Konkannews

आंगणेवाडी जत्रेची तारीख ठरली….

   Follow us on        

सिंधुदुर्ग-मालवण: दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या आंगणेवाडीची जत्रा यंदा शनिवारी दिनांक 4 फेब्रुवारी 2023 या दिवशी संपन्न होणार आहे. नुकतीच या यात्रेच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी कोकणवासियांना या यात्रेच्या तारखेबद्दल उत्सुकता असते. आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला या वार्षिकोत्समध्ये दर्शनाला भाविक देशा-परदेशातून येतात.

 

आंगणेवाडीच्या यात्रेसाठी देवीला कौल लावून तारीख निश्चित करण्याची पद्धत आहे. आजही लावलेल्या कौलानुसार 4 फेब्रुवारी हा दिवस यात्रेसाठी ठरवण्यात आला आहे.

दरवर्षी आंगणेवाडीच्या जत्रोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाकडूनही विशेष रेल्वे फेर्‍या चालवल्या जातात. एसटी कडूनही भाविकांना खास बससेवा असते. आता सिंधुदुर्गामध्ये चिपी विमानतळ देखील प्रवासी सेवेसाठी खुले करण्यात आले आहे त्यामुळे भाविकांसाठी प्रवास वेगवान आणि सुलभ झाला आहे.

 

आंगणेवाडीच्या देवीच्या दर्शनाला या जत्रोत्सवामध्ये अनेक सेलिब्रिटी, राजकीय मंडळी आवर्जुन हजेरी लावतात. लाखो भक्त दिवसभरात देवीचं दर्शन घेतात. यासाठी विशेष सोय केली जाते.

 

 

Loading

ग्रामपंचायत निवडणुक – रत्नागिरी जिल्हय़ात तीन दिवस मद्यविक्री बंद

   Follow us on        

Grampanchayat Election News : रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूकीच्या दरम्यान ग्रामपंचायत क्षेत्रातील दारूविक्री दिवसभर बंद राहणार अशी सुचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली आहे. त्यांच्या आदेशानुसार मद्यविक्री दि. १७, १८, २० डिसेंबरला संपूर्ण दिवसभर बंद राहणार आहे.

हेही वाचा : राज्यात तलाठी भरती होणार.. जाणून घ्या जिल्हानिहाय पदसंख्या …

जिल्हय़ात एकूण 222 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. निवडणुका शांततेत पार पडाव्यात आणि कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. मुंबई मद्य निषेध अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्हाधिकार्‍यांनी देशी, विदेशी मद्य, माडी विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ज्या ग्रामपंचायत क्षेत्रातील निवडणूक बिनविरोध होणार आहेत अशा ग्रामपंचायत क्षेत्रांना मात्र हा आदेश लागु होणार नाही आहे. ह्या आदेशाची अवमानता केल्यास महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ५४, ५६ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे याची सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Loading

परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद?

Mumbai Goa Highway : परशुराम घाटातील चौपदरीकरणाचा भराव आणि रुंदीकरणाचे काम जलद गतीने व्हावे यासाठी घाटातील वाहतूक पुन्हा काही दिवस बंद ठेवण्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरु आहे.या घाटात गेल्या वर्षभरापासून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान घाट केव्हापासून बंद ठेवायचा ते अद्याप निश्चित झालेले नाही.

याबाबत अद्याप तारीख निश्चित झालेली नाही. मात्र तसे नियोजन राष्ट्रीय महामार्ग व ठेकेदार कंपनीकडून केले जात आहे. घाटातील वाहतूक बंद ठेवून चिरणीमार्गे वाहतूक वळवण्याचे ठरले आहे

Loading

KR UPDATES 09/11/2022- कोकण मार्गावरील काही गाड्यांच्या आरंभ स्थानकामध्ये तात्पुरत्या स्वरूपाचा बदल

मुंबई: मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस च्या सहाव्या मार्गिकेच्या अपग्रेडेशनचे काम दिनांक ०८/११/२०२२ ते १२/१२/२०२२ दरम्यान होणार आहे. ह्या दरम्यान ह्या स्टेशन वरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या गाडयांचा प्रवास त्याच्या अगोदरच्या स्टेशन पर्यंत मर्यादित करण्यात येणार आहे. ह्या कामामुळे कोकण मार्गावरून चालविण्यात येणाऱ्या खालील गाड्यांचा आरंभ किंवा शेवटच्या स्थानकामध्ये बदल करण्यात आलेले आहेत.
१)  Train no. 16345/16346  Lokmanya Tilak (T) -Thiruvananthapuram Central – Lokmanya Tilak (T) Netravati Express (Daily)
हि गाडी दिनांक ०८/११/२०२२ ते 1३/१२/२०२२ पनवेल स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे. हि गाडी १२:५५ वाजता पनवेल स्टेशन वरून सुटेल.
२) Train no. 12619/12620 Lokmanya Tilak (T) – Mangaluru Central – Lokmanya Tilak (T)   Matsyagandha Express (Daily) 
हि गाडी दिनांक ०८/११/२०२२ ते १२/१२/२०२२ पनवेल स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे. हि गाडी १६:३३ वाजता पनवेल स्टेशन वरून सुटेल. 
कृपया प्रवाशांनी ह्या बदलाची नोंद घ्यावी आणि हि पोस्ट शेयर करावी. 

 

Loading

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची “कहाणी अधुरीच”… काम पुन्हा ठप्प

रायगड : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम काही पूर्ण होण्याची चिन्हे दिसेनात. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या ठप्प आहे. जागोजागी खासकरून महामार्गाची वडखळ ते इंदापूर या पट्टय़ात दुरवस्था झाली आहे.

दुसरीकडे महामार्गावरील अपघातांचे दृष्टचक्र थांबताना दिसत नाही. रायगड जिल्ह्यात गेल्या ९ महिन्यांत या मार्गावर ४९ जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम २०११ साली सुरू झाले होते. २०२२ हे वर्ष सरायला आले तरी ८४ किलोमीटरच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. मूळ ठेकेदाराची हकालपट्टी करूनही कामाला गती मिळू शकलेली नाही. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत काम बंद ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे रस्त्याची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. वाहनचालकांना खडतर परिस्थितीला सामोरे जात प्रवास करावा लागत आहे.

महामार्गाची दुरवस्था झालेली असतानाच महामार्गावरील अपघातांचे प्रमाणही वाढले असल्याची गंभीर बाब आता समोर आली आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२२ या दहा महिन्यांत रायगड जिल्हा पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या महामार्गावरील भागात १४५ अपघात झाले असून, त्यामध्ये ४९ जणांचा मृत्यू तर १६० जण जखमी झाले आहेत, त्यामुळे दुहेरी संकटाला कोकणवासीयांना सामोरे जावे लागत आहे.

कोकणातील जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जात आहे. कोकणच्या विकासाला उपयुक्त असा एक चौपदरी रस्ता मिळविण्यासाठी आजून किती वर्षे वाट पाहावी लागेल ह्याच उत्तर कोणाकडे नाही. कोकणातील नेते फक्त राजकारणात व्यस्त असल्याचे दिसत आहेत. ह्या प्रश्नासाठी तरी सर्व नेत्यांनी एकजुट दाखवावी अशी अपेक्षा कोकणवासीयां कडून केली जात आहे.

 

 

 

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search