Author Archives: Kokanai Digital

सिंधुदुर्ग जिल्हाच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांची कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती

 

कोल्हापुर :सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या  के. मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. उद्या बुधवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. तर किशोर तावडे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणुन नेमणूक करण्यात आली आहे.

के. मंजूलक्ष्मी हे सध्या सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असून ते सिंधुदुर्ग मध्ये सर्वाधिक प्रशासकीय कारभार सांभाळणाऱ्या जिल्हाधिकारी ठरल्या आहेत. ते सिंधुदुर्ग येथे दोन वर्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व तीन वर्ष जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.के.मंजुलक्ष्मी ह्या ९ फेब्रुवारी २०१८ ला सिंधुदुर्ग मध्ये जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रुजू झाल्या त्यानंतर दोन वर्षानी २० मे २०२० रोजी त्यांची जिल्हाधिकारी पदी शासनाने नियुक्ती केली होती. कोरोना काळात त्यांनी जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट काम केले होते.तर सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ भारतमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर आला होता यामुळे त्यांचा दिल्लीत सत्कार ही झाला होता .

Loading

वंदे भारत एक्सप्रेसला अफाट प्रतिसाद; मुंबई ते ‘या’ शहरा दरम्यान आता धावणार दोन वंदेभारत एक्सप्रेस

Vande Bharat Express : देशात वंदे भारत एक्सप्रेस ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवासी संख्या वाढल्याने आता तिकिटे मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आता काही मार्गावर दुसरी वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याचा विचार केला जात आहे.
प्रमुख भारतीय शहरांमधील कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या उद्देशाने, पश्चिम रेल्वेने गजबजलेल्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर दुसरी सेमी हाय-स्पीड ट्रेन सुरू करण्याची तयारी केली आहे. मुंबई-गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेसच्या उल्लेखनीय यशानंतर, आता मुंबई-अहमदाबाद अशी नवी वंदे भारत एक्सप्रेस पुढील महिन्यापासून चालू करण्यात येणार असल्याची माहिती पाश्चिम रेल्वेने दिली आहे.
दररोज 30,000 पेक्षा जास्त प्रवासी मुंबई-अहमदाबाद रेल्वेमार्गावर अवलंबून आहेत,  सध्या या मार्गावर सुमारे 24 गाड्या चालतात, ज्यात नियमित आणि साप्ताहिक सेवा समाविष्ट आहेत. दुसरी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे उद्दिष्ट ही गर्दीची अडचण दूर करणे आणि आरामदायक प्रवास पर्यायांची वाढती मागणी पूर्ण करणे हा आहे.

Loading

पश्चिम घाटमाध्यावरील परिसरात तेजस ठाकरेंना सापडली सापाची नवी प्रजाती

मुंबई :ठाकरे कुटुंबातील सर्वाल धाकटे सदस्य अर्थात उद्धव आणि रश्मी ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे मात्र सध्या निसर्गात रमल्याचं पाहायला मिळत आहे.पर्यावरण, निसर्ग आणि जीवसृष्टीचा जवळून अभ्यास करणाऱ्या तेजस ठाकरे यांच्या टीमनं एक किमया केली आहे.
पश्चिम घाटमाध्यावरील परिसरात तेजस ठाकरे यांच्या टीमला एक साप आढळला असून, त्याला ‘सह्याद्रीओफिस’ असं नाव देण्यात आलं आहे. टीमला मिळालेल्या या यशामुळं ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या च्या नावे आणखी एका यशस्वी मोहिमेची नोंद झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार ठाकरे वाईल्ड लाईफ फाऊंडेशननं लंडन येथील नॅचरल हिस्ट्री म्युझियम, जर्मनीतील मॅक्स प्लॅन्क इन्स्टीट्युट यांच्यासह हर्षित पटेल आणि तेजस ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली ही मोहिम यशस्वीरित्या पार पाडली.

Loading

Mumbai Goa Highway : “दगड फोडला तर कलाकृती उभी राहते आणि दगड फेकला विध्वंस होतो..” रवींद्र चव्हाण यांचे मनसेला तोडफोडीवर पत्रातून खडे बोल….

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पनवेल येथील निर्धार मेळाव्यानंतर कोकणातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांचाकडून टोलनाके आणि कंत्राटदारांची कार्यालये फोडण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र या प्रकारानंतर राज्याचे सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण भलतंच नाराज झाले आहेत. या विषयावर त्यांनी एक पत्र लिहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि कार्यकर्त्यांना खडे बोल  सुनावले आहेत.
पत्रात ते लिहितात 
दगड फोडला तर कलाकृती उभी राहते आणि दगड फेकला विध्वंस होतो याची कोणीतरी कधीतरी आठवण करून द्यावी म्हणून आज हे पत्र लिहीत आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात अतिशय वेगाने सुरु आहे आणि त्यात ही सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड महाराष्ट्र विरोधी आणि विनाशकारी मानसिकतेची आहे.
जे कार्यकर्ते स्वतःला महाराष्ट्र सैनिक म्हणवतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा की कुठला सैनिक आपल्या देशाचे आणि आपल्या राज्याच्या मालमत्तेचे तोडफोड करून नुकसान करतो…. ? तो कसा काय महाराष्ट्र सैनिक….. ? आम्हीही रस्त्यावर आंदोलन करून इथपर्यंत पोहोचलो पण आमची निष्ठा सर्वप्रथम देश नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हीच आहे…. त्यात अशी तोडफोड करून विघ्न आणण्याचं कारण समजण्यापलीकडे आहे.
मुंबई गोवा महामार्ग आता खरोखरी दृष्टीपथात येत आहे. येत्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात जाण्यापूर्वी सिंगल लेन पूर्ण झालेली असेल याचा मी अत्यंत जबाबदारीने पुनरुच्चार करतो आणि डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण मुंबई गोवा महामार्ग देशसेवेसाठी तयार होईल हा शब्द देतो. म्हणून … दगड भिरकावून तोडफोड करणारी विनाशकारी विचारसरणी नको आता त्या ऐवजी दगड रचून नवा इतिहास रचणारी प्रगतिशील कामं करणारी तरुणाईची साथ हवी आहे…. अवघ्या महाराष्ट्राला….
कोकणचा सुपुत्र म्हणून अनेक लहान-मोठ्या समस्या जवळून बघितल्या होत्या. यातल्या अनेक समस्यांचं मूळ मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरण हेच आहे, याची देखील जाणीव आहे. केंद्रात मोदीजी आणि राज्यात त्रिशुळ सरकार गतिमान पद्धतीने काम करत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री या नात्याने पनवेल ते झाराप मुंबई गोवा महामार्गावर रस्त्यावर कडक उन्हात आणि भर पावसात उतरून रस्ते कामाची सलग आठ वेळा पाहणी केलेला मी कोकणी माणूस आहे. भाजपाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे.
खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर हा रखडलेला प्रश्न कायमस्वरूपी सोडवणं ही स्वाभिमानी प्रतिज्ञा केली होती ती कार्यसिद्धी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे व्रत म्हणून स्वीकारलं आहे.
या कामात असणाऱ्या असंख्य अडचणी सोडवणं हे शिवधनुष्यच होतं. पण कार्यभार स्वीकारताच कोकणवासियांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने एकेक पाऊल उचलू लागलो. या कामातील सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत. केवळ खड्डे न बुजवता CTB टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून समस्येला कायमस्वरूपी पूर्णविराम दिला जातो आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालयं फोडण्यापर्यंत या श्रेयजीवींची मजल गेली आहे. या तोडाफोडीमुळे महामार्गाचे काम करणाऱ्या कामगारांमध्ये दहशत पसरत आहे, अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सुरु असलेल्या कामांना हातभार लावण्याऐवजी अशाप्रकारे आडकाठी आणून यांना नेमकं काय साध्य करायचं आहे ? हा प्रश्नच आहे. गणेशोत्सवापूर्वी सिंगल लेन आणि वर्षाअखेरपर्यंत पूर्ण महामार्ग पूर्ण करणारच या निश्चयातूनच आपला विभाग काम करत आहे.
ज्या आदरणीय मोदीजींनी काश्मीर मधल्या दगडफेकू तरुणांच्या हाती रोजगार दिला तेव्हाच त्यांची अनेक दशकांची विनाशकारी विचारसरणी बदलली आणि बदलली काश्मीरची अर्थव्यवस्था….त्याचप्रमाणे मोदीजींचा कट्टर अनुयायी म्हणून एक दिवस हीच मंडळी तोडफोडप्रेमी विनाशकारी विचारधारा सोडून कोकणच्या विकासाची आणि प्रगतीची विचारसरणी फॉलो आणि लाईक करतील ही आशा बाळगून आहे…..
आपला,
रविंद्र चव्हाण

Loading

कुणकेश्वर मंदिर : उत्तेजक व तोकडे कपडे घालून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश बंद

सिंधुदुर्ग : दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरामध्ये श्रावणी सोमवारचे औचित्य साधून येणाऱ्या भाविकांसाठी वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष दिनेश धुवाळी यांनी दिली.
कुणकेश्वर येथील देवस्थान ट्रस्ट कार्यालय मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे. भारतीय हिंदू संस्कृतीचे नीट पालन होण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. येणारे भाविक अंग प्रदर्शन, उत्तेजक, असभ्य, अशोभनीय व तोकडे वस्त्र तसेच अवास्तविक वेशभूषा करून मंदिरात प्रवेश करत होते. परंतु आता अशा वस्त्र परिधान करणाऱ्या व्यक्तींना मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच येणाऱ्या भाविकांसाठी पंचा-उपर्णे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.यासाठी भाविकांनी नियमाचे पालन करून मंदिर प्रशासनात सहकार्य करावे आणि संस्कृतीचे पालन करावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष दिनेश धुवाळी यांनी केले आहे. यावेळी माजी सरपंच गोविंद घाडी, संजय आचरेकर, संतोष लाड गणेश वाळके, व्यवस्थापक रामदास तेजम अजय नाणेरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Loading

कोकणात बिहारराज; कोकण रेल्‍वेच्‍या गेटमनची गोळ्या झाडून हत्‍या

Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर एक थरारक घटना घडली आहे. कोकण रेल्‍वेच्‍या गेटमनची गोळ्या झाडून हत्‍या करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोलाडजवळील तिसे येथील रेल्‍वे फाटकाजवळ हा हत्येचा थरार रंगला.यामुळे रेल्वे फाटक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कोकण रेल्‍वे मार्गावरील कोलाड स्‍थानकाजवळ गेटमनची गोळया झाडून हत्‍या करण्‍यात आली. चंद्रकांत कांबळे असे असे हत्या झालेल्या गेटमनटे नाव आहे. मृत मोटरमन हा तेथून जवळच असलेल्‍या महाबळे गावचा रहिवासी आहे. गोळीबाराच्‍या घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाला आहे. हल्‍लेखोर आणि हत्‍येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.
या हत्येचे वृत्त समजताच पोलीस घटनास्‍थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा सुरू केला. या घटनेनंतर महाबळे ग्रामस्‍थ घटनास्‍थळी पोहोचले. भर दिवसा हत्या झाल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले. जोपर्यंत मारेकऱ्याला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्‍यात घेणार नाही अशी भूमिका त्‍यांनी घेतली होती. यामुळे येथे तणावाचे वातावरण होते.

Loading

गणेशोत्सव विशेष गाडी मडुरे स्थानकावर थांबणार

Konkan Railway News :प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मडुरे स्थानकावर एका विशेष गाडीला थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
01151 स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव दरम्यान 13.09.2023 ते 02.10.2023 पर्यंत दररोज धावणारी हि गाडी मडुरे या स्थानकावर थांबणार असून तिची या स्थानकावरील वेळ रात्री १०:५२  आहे.
01152 स्पेशल मडगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान 13.09.2023 ते 02.10.2023  दररोज धावणारी हि गाडी मडुरे या स्थानकावर थांबणार असून तिची या स्थानकावरील वेळ पहाटे ०४:२४ आहे.
प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
स्थानिकांच्या प्रयत्नांना यश 
गेल्याच आठवड्यात गणपती स्पेशल गाडीस थांबा मिळावा यासाठी रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे आणि स्थानिक ग्रामस्थांनी उपोषण केले होते. मात्र कोरेचे रत्नागिरी विभागीय व्यवस्थापक रविंद्र कांबळे यांनी तसे  आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले होते. कोरेच्या गणपती स्पेशल गाड्यांच्या वेळापत्रकात तसे प्रसिद्ध न झाल्यास ३० ऑगष्ट नंतर थेट रेल रोको आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला गेला होता.  या मागणीव्यतिरिक्त  मडुरे स्थानकावर कोकणकन्या एक्सप्रेसला थांबा मिळावा. तसेच तुतारी एक्सप्रेस मडुरा स्टेशनवरुन सोडावी अशी मागणी दशक्रोशीतील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Loading

Konkan Railway | लांब पल्ल्याच्या ३ एक्सप्रेस गाड्यांना खेड आणि संगमेश्वर येथे थांबे

रत्नागिरी : कोंकण रेल्वेने कोंकणवासीयांना एक खुशखबर दिली आहे.  रेल्वे प्रशासनाने  कोकण रेल्वे मार्गावरील काही एक्सप्रेस गाड्यांना  थांबे प्रायोगिक तत्त्वावर मंजूर केले आहेत.
१) संगमेश्वर रोड येथे नेत्रावती एक्सप्रेसला थांबा
16345 Lokmanya Tilak (T) – Thiruvananthapuram Central Netravati Express हि एक्सप्रेस दिनांक २२/०८/२०२३ पासून संगमेश्वर रोड येथे थांबणार आहे. संगमेश्वर येथे या गाडीची वेळ संध्याकाळी ५ वाजुन ३४ मिनिटे अशी असणार आहे.
परतीच्या प्रवासात 16346 Thiruvananthapuram Central – Lokmanya Tilak (T) Netravati Express  या गाडीची वेळ संगमेश्वर येथे सकाळी ९ वाजून ५६ मिनिटे अशी असणार आहे.
२) खेड येथे मंगला एक्सप्रेसला थांबा
12618 H. Nizamuddin – Ernakulam Jn. Mangala Express हि एक्सप्रेस दिनांक २२/०८/२०२३ पासून खेड या स्थानकावर  थांबणार आहे. खेड या स्थानकांवर या गाडीची वेळ सकाळी  १०  वाजून  ०८  मिनिटे अशी असणार आहे.
परतीच्या प्रवासात 12617 Ernakulam Jn. – H. Nizamuddin Mangala Express या गाडीची वेळ खेड  येथे सकाळी ८ वाजून १२ मिनिटे अशी असणार आहे.
3) खेड येथे एलटीटी कोचुवेल्ली एक्सप्रेसला थांबा
22113 Lokmanya Tilak (T) – Kochuveli Express हि एक्सप्रेस दिनांक २२/०८/२०२३ पासून खेड या स्थानकावर  थांबणार आहे. खेड या स्थानकांवर या गाडीची वेळ रात्री ०८ वाजून ५६ मिनिटे अशी असणार आहे.
परतीच्या प्रवासात 22114 Kochuveli – Lokmanya Tilak (T) Express या गाडीची वेळ खेड  येथे रात्री  2 वाजून २० मिनिटे अशी असणार आहे.
Train no.StationTimingsWith Effect from Journey commences on
16345 Lokmanya Tilak (T) - Thiruvananthapuram Central Netravati ExpressSangameshwar Road17:34 / 17:3622/08/2023
16346 Thiruvananthapuram Central - Lokmanya Tilak (T) Netravati ExpressSangameshwar Road09:56 / 09:5822/08/2023
12618 H. Nizamuddin - Ernakulam Jn. Mangala ExpressKhed10:08 / 10:1022/08/2023
12617 Ernakulam Jn. - H. Nizamuddin Mangala ExpressKhed08:12 / 08:1422/08/2023
22113 Lokmanya Tilak (T) - Kochuveli Express Khed20:56 / 20:5822/08/2023
22114 Kochuveli - Lokmanya Tilak (T) ExpressKhed02:20 / 02:2224/08/2023

Loading

”जोपर्यंत खड्ड्यात तुमचा पाय….” महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतून देण्यात आला कोकणवासियांना मेसेज… .

Mumbai Goa Highway : कोकणवासीयांना त्रास देणारा आणि येथील राजकारण्यांना शरमेने मान खाली घालाव्या लागणार्‍या मुंबई गोवा महामार्गाचा विषय महाराष्ट्राची हास्यजत्रा या मराठी विनोदी मालिकेत सुद्धा चांगलाच गाजला आहे. ज्या विनोदी मालिकेत प्रेक्षकांना हसवण्यात येते त्याच विनोदी मालिकेत हा गंभीर विषय दाखविण्यात आला आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे हा कधीच विनोदाचा विषय होऊ शकत नाही यात वाद नाही. कारण या खड्ड्यांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. मात्र या विनोदी मालिकेत या विषयाचे भांडवल न करता साध्या आणि सोप्या पद्धतीने  कोकणातील जनतेला एक स्पष्ट मेसेज देण्यात आला आहे. ‘मी एकटा काय करणार?’ ह्या विचाराने कित्येक कोकणवासिय या प्रश्नावर गप्पच असल्याने हा विषय सुटत नाही. या प्रश्नासाठी प्रत्येकाने आपल्या परीने सुरवात केली पाहिजे.

Loading

गणेश चतुर्थी २०२३ : मुख्यमंत्र्यांकडून चाकरमान्यांना एकाचवेळी दोन खुशखबर

मुंबई :यंदा कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्यां चाकरमान्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकावेळी एक नाही तर दोन खुशखबर दिल्या आहेत.  यावर्षी शिंदे गटाकडून मोफत एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदार संघ विभागातून  १२ ते १८ मोफत बसगाड्या सोडल्या जाणार आहेत. तर कोल्हापूर मार्गे जाणाऱ्यांसाठी टोलमाफी दिली जाणार आहे. शनिवारी वर्षा बंगल्यावर या संदर्भात निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात काल वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. मुंबई गोवा महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शिंदे गटाने सांगितले.
तसेच ज्यांना बुकिंग मिळालं नाही किंवा ज्यांच्याकडे जाण्याची काही सोय नाही अशा लोकांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईच्या प्रत्येक विधान सभा मतदार संघातून या गाड्या सोडल्या जाणार आहेत. वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीत मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, श्रीकांत शिंदे उपस्थित होते. तसेच काही पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search