Category Archives: शिक्षण

राज्यात उन्हाचा तडाखा कायम; शाळा सुरू होण्याची तारीख पुढे ढकलण्याचा विचार सुरू

   Follow us on        

नागपूर: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर वाढला असून, हा उष्णतेचा कहर लवकर कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. विदर्भ, मराठवाड्यासह इतर ग्रामीण आणि शहरी भागांतही सूर्य जणू आग ओकत आहे. या तीव्र उष्णतेमुळे आणि असह्य उकाड्यामुळे लहान मुलांच्या व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्याच्या काही भागांत उष्माघातामुळे नागरिकांचा बळी गेल्याच्या नोंदीही झाल्या आहेत. या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून राज्य सरकार शाळा सुरू होण्याचा दिवस पुढे ढकलण्याच्या हालचाली करत आहे. त्यानुसार, शाळा १५ जूनऐवजी २६ जून रोजी सुरू करण्याचे नियोजन केले जात असून, राज्याचे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शनिवारी नागपूर येथे ही महत्त्वाची माहिती दिली.

​दुसरीकडे, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट अतिशय तीव्र झाली असून पुढील दोन दिवस येथे ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे आज तब्बल ४७ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या हंगामात वर्ध्यात दुसऱ्यांदा एवढे प्रचंड तापमान नोंदवले गेले आहे. दिल्लीतही उष्णतेचा पारा इतका वाढला आहे की, पत्रकार परिषदेसाठी आलेले अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांना असह्य उकाड्यामुळे आपली पीसी (पत्रकार परिषद) अर्धवट आटोपती घ्यावी लागली. त्यांनी दिल्लीतील उष्णता सहन होत नसल्याचे जाहीरपणे सांगितले.

​दरम्यान, मुंबईमध्ये शनिवारी सकाळपासून ढगाळ आणि पावसाळी वातावरण पाहायला मिळाले. मुंबईचे तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असले, तरी हवेत ८० टक्क्यांपर्यंत वाढलेली आर्द्रता आणि दमट वातावरणामुळे मुंबईकरांना प्रचंड आणि असह्य उकाडा सहन करावा लागला. अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे मुंबई हवामान विभागाच्या सुषमा नायर यांनी स्पष्ट केले असून, पुढील दोन ते तीन दिवस मुंबईत अशीच परिस्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

   Follow us on        

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या (SSC) विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल उद्या, ८ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. निकालापूर्वी उद्या सकाळी ११ वाजता राज्य मंडळाच्या कार्यालयात अधिकृत पत्रकार परिषद घेऊन निकालाची आकडेवारी जाहीर केली जाईल, त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक निकालाची प्रत ऑनलाईन पाहता येईल.

​यावर्षी राज्याच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतून लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. बोर्डाने बारावीचा निकाल २ मे रोजी जाहीर केल्यानंतर आता अवघ्या काही दिवसांतच दहावीचा निकाल लावून आपली ‘विक्रमी वेळेत निकाल’ लावण्याची परंपरा कायम ठेवली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मदत होणार आहे.

​निकाल कुठे पाहाल?

​विद्यार्थी खालील अधिकृत संकेतस्थळांवर आपला निकाल पाहू शकतात:

​sscresult.mahahsscboard.in

​mahahsscboard.in

​results.digilocker.gov.in

​results.targetpublications.org

​results.navneet.com

नवीन शैक्षणिक वर्षात चार इयत्तांचा नवीन अभ्यासक्रम लागू होणार.

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीने इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीपाठोपाठ आता इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्यालाही मंजुरी दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. यामुळे येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रात आता इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी अशा चारही वर्गांचा नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे.

​राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत राहून, विद्यार्थ्यांची काठिण्यपातळी आणि अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes) लक्षात घेऊन हा नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. या बैठकीला शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांच्यासह शिक्षण विभागातील विविध वरिष्ठ अधिकारी आणि सुकाणू समितीचे सदस्य उपस्थित होते.

​या नवीन आराखड्याला आता अभ्यासक्रम समन्वय समितीची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर, ‘बालभारती’मार्फत या वर्गांची पाठ्यपुस्तके तातडीने तयार केली जाणार आहेत. ही पुस्तके नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. दरम्यान, नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षकांच्या प्रशिक्षणाची प्रक्रियाही गतिमान करण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (SCERT) याच महिन्यात मुख्य प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले असून, त्यानंतर जिल्हास्तरावर शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

महत्वाची बातमी! महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार; ऑनलाईन कसा चेक कराल?

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) घेतलेल्या बारावीच्या (HSC) परीक्षेचा निकाल उद्या, २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. यासंदर्भात मंडळाने अधिकृत माहिती दिली असून, निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वी उद्या सकाळी ११ वाजता बोर्डाची अधिकृत पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना बोर्डाच्या संकेतस्थळावर स्वतःचा निकाल पाहता येईल.

​विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी त्यांचा सीट नंबर (Seat Number) आणि आईचे नाव (Mother’s Name) ही माहिती जवळ ठेवणे आवश्यक आहे. निकाल पाहण्यासाठी खालील अधिकृत संकेतस्थळांचा वापर करता येईल:

mahresult.nic.in

mahahsscboard.in

hscresult.mkcl.org

results.digilocker.gov.in

​यावर्षी बारावीची परीक्षा सुमारे १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका डाऊनलोड करता येईल, जी पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी (Verification) करायची आहे किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी आहे, त्यांच्यासाठी रविवार, ३ मे ते १७ मे २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन विहित शुल्क भरून अर्ज करावा लागेल.

​महत्वाची टीप: पुनर्मूल्यांकनासाठी (Revaluation) अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असल्याचेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.

दहावी बारावी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या केंद्रांवर कारवाई; १०७ परीक्षा केंद्रांवर कायमस्वरूपी बंदी

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) २०२६ च्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. राज्यातील तब्बल १०७ परीक्षा केंद्रांना गैरप्रकार आणि अनियमिततेच्या आरोपाखाली ‘काळ्या यादीत’ (Blacklist) टाकण्यात आले आहे. या केंद्रांवर पेपर फुटी, सामूहिक कॉपी आणि बोर्डाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारने ही कारवाई केली असून, आता या केंद्रांवर पुढील बोर्ड परीक्षा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

​शिक्षण विभागाने यावर्षी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले असून, परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही (CCTV) देखरेख, भरारी पथके आणि काही ठिकाणी ड्रोन सर्व्हिलन्सचाही वापर केला जात आहे. विशेष म्हणजे, अलीकडेच एका केंद्रावर एआय (AI) टूल्सचा वापर करून विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय दक्षता समित्या आणि विशेष भरारी पथकांद्वारे परीक्षेच्या पारदर्शकतेवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. राज्य सरकारने स्पष्ट ताकीद दिली आहे की, परीक्षेच्या कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जी किंवा गैरप्रकार आढळल्यास ‘महाराष्ट्र गैरप्रकार प्रतिबंधक कायद्यांतर्गत’ कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

धक्कादायक! NCERT च्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशाच गायब..

   Follow us on        

नवी दिल्ली: एनसीईआरटीने इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकात असलेला 1759 सालच्या मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा एकतर्फी हटवला असून राजस्थानमधील राजपूत घराण्यांच्या दबावाखाली एनसीईआरटीने हा खोडसाळपणा केल्याचा आरोप नागपूरकर भोसले राजघराण्याचे वर्तमान वंशज मुधोजीराजे भोसले यांनी केला आहे.

ऐन शिवजयंती दिवशीच मुधोजीराजांनी एनसीईआरटीने केलेला खोडसाळपणा उघडकीस आणल्यामुळे आता नव्या वादळाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुस्तकातून हटवलेला 1759 सालच्या मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा पुस्तकात पुन्हा प्रकाशित करण्याची मागणी मुधोजीराजांनी नागपुरातील शिवजयंतीच्या कार्यक्रमात बोलताना केली आहे.

​NCERT च्या पाठ्यपुस्तकात १७५९ सालातील मराठा साम्राज्याचा नकाशा समाविष्ट होता. या नकाशामध्ये उत्तरेत पेशावर (आजचे पाकिस्तान) पासून ते दक्षिणेत तंजावरपर्यंत मराठ्यांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसत होते. ‘अटक ते कटक’ असा हा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांच्या मनातून पुसून टाकण्याचा हा राजकीय कट असल्याचा आरोप मराठा इतिहासप्रेमींकडून केला जात आहे.

​RTI मधून झालेला धक्कादायक खुलासा

​या प्रकरणावर माहितीच्या अधिकाराखाली (RTI) प्रश्न विचारण्यात आले होते की, हा नकाशा हटवण्यासाठी कोणते ऐतिहासिक पुरावे वापरले किंवा कोणत्या तज्ज्ञांनी हा सल्ला दिला? यावर उत्तर देताना NCERT ने म्हटले आहे की, “यासंबंधीची कोणतीही माहिती किंवा कागदपत्रे त्यांच्या फाईल्समध्ये उपलब्ध नाहीत.” कोणत्याही पुराव्याशिवाय हा नकाशा का हटवला गेला, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

​या प्रकरणातील आरोपांचे स्वरूप अत्यंत गंभीर असून प्रामुख्याने दबावाचे राजकारण आणि हेतुपुरस्सर दुर्लक्ष यांवर बोट ठेवण्यात आले आहे. आंदोलकांचा असा दावा आहे की, काही तक्रारदार गट आणि तथाकथित राजघराण्यांच्या राजकीय दबावाला बळी पडून NCERT ने मराठा साम्राज्याचा नकाशा हटवण्याचा हा चुकीचा निर्णय घेतला आहे. त्यातच, ज्येष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या निधनानंतर NCERT च्या समितीवर एकाही तज्ज्ञ मराठा इतिहासकाराची नियुक्ती करण्यात आली नाही, ज्यामुळे समितीमध्ये इतर प्रादेशिक लॉबींचा प्रभाव वाढला आणि मराठा इतिहासाला दुय्यम स्थान देण्याचे प्रयत्न सुरू झाले, असा आरोप केला जात आहे. हा केवळ तांत्रिक किंवा शैक्षणिक बदल नसून, मराठ्यांनी संपूर्ण भारतावर मिळवलेले प्रभुत्व विद्यार्थ्यांच्या स्मृतीतून पुसून टाकण्याचा आणि पर्यायाने मराठा अस्मितेवर घाला घालण्याचा हा एक मोठा राजकीय कट असल्याचे अभ्यासकांचे आणि इतिहासप्रेमींचे म्हणणे आहे.

​या निर्णयाच्या विरोधात समाज माध्यमांवर #SaveMarathaHistory ही मोहीम जोरात सुरू झाली आहे. खासकरून मराठी एकीकरण समितीने यावर मोठा आक्षेप घेतला आहे. मराठा साम्राज्याने देशाला परकीय आक्रमकांपासून वाचवले, तोच इतिहास पाठ्यपुस्तकातून गायब करणे हे ऐतिहासिक सत्याचा अपलाप करणारे आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.

NCERT ने हा नकाशा पुन्हा समाविष्ट करावा आणि इतिहासाची छेडछाड थांबवावी, अशी मागणी इतिहासप्रेमी आणि विविध संघटनांकडून केली जात आहे.

SSC Result 2025: मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर; निकाल येथे पाहता येईल?

   Follow us on        

SSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. यंदा दहावीची परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत लवकर घेण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थी पालकांचे निकालाच्या तारखेकडे लक्ष लागले होते. त्यानुसार यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (१३ मे) जाहीर करण्यात येणार आहे.

राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यभरातील सुमारे १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. यंदा परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे कॉपीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल दीड टक्क्याने घटलाअसताना दहावीचा निकाल वाढणार की घटणार याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे

उद्या दिनांक 13 मे रोजी दुपारी ठीक 1 वाजता खालील संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे.

mahahsscboard.in

-mahresult.nic.in

msbshse.co.in

mh-ssc.ac.in

sscboardpune.in

 

HSC Result 2025: मोठी बातमी! १२ वीच्या निकालाची तारीख जाहीर; निकाल येथे पाहता येईल.

   Follow us on        
12th Result date: यंदा १२ वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांचा पालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या इ. १२ वीच्या परीक्षेचा निकाल ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता जाहीर करणार आहे. विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर (website) निकाल पाहू शकतील. तसेच, Digilocker ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका (marksheet) उपलब्ध असणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची सोय मंडळाने उपलब्ध करून दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इ. १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तयारी पूर्ण केली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी मंडळाने काही अधिकृत संकेतस्थळे (official websites) जाहीर केली आहेत. या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना विषयवार गुण पाहता येतील. तसेच, निकालाची प्रिंट (print out) काढण्याची सोय देखील उपलब्ध आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांचा एकत्रित निकाल (overall result) कॉलेज लॉगिनमध्ये पाहता येईल.
निकाल पाहण्यासाठी लिंक :

मोठी बातमी! ‘जात प्रवर्ग’ चा उल्लेख हटवून १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांना नवे हॉल तिकीट मिळणार

मुंबई: दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी देण्यात आलेल्या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख केल्याने समाजातील सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यानंतर आता महामंडळाने ही प्रवेशपत्रे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जातीचा उल्लेख काढून नवीन प्रवेशपत्रे दिली जाणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाने दिलगिरीदेखील व्यक्त केली आहे.
दहावी, बारावी परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर त्यांच्या जातीचा प्रवर्ग नमूद करण्यात आला होता. त्यानंतर विविध घटकांतून महामंडळावर टीका करण्यात आली होती. हा निर्णय विद्यार्थी हिताचा असल्याचं सांगत बोर्डाकडून त्याच समर्थन करण्यात आलं होतं. मात्र जनभावना लक्षात घेता हा निर्णय रद्द करण्यात आल्याचं राज्य शिक्षण मंडळाने म्हटलं आहे.
बारावीसाठी नव्याने प्रवेश पत्र देण्यात येणार असून त्यासाठी 23 जानेवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा प्रवेश पत्रे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. तर दहावीसाठी 20 जानेवारीपासून प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
बोर्डाचे म्हणणे काय होते? 
दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्याना समाजकल्याण तसंच, अन्य विभागांकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी माहिती द्यावी लागले. दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांचे नाव, अडनाव, पालकांचे नाव, जन्मतारिख, जात याबाबत शाळेच्या रजिस्टरमध्ये बदल करता येत नसल्याने मंडळाने प्रवेशपत्रावर जात प्रवर्गाचा उल्लेख केला असल्याचे मंडळाने म्हटलं होतं.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेचे दिलेल्या वेळापत्रकावर विभागीय मंडळाचे नाव, कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, लिंग, आईचे नाव, विद्याशाखा, अपंगत्व, बैठक क्रमांक, केंद्राचे नाव यासह प्रथमच जात प्रवर्ग नमूद केला होता. दहावी, बारावीच्या प्रवेशपत्रावर जात प्रवर्गाचा उल्लेख ही अयोग्य बाबा असल्याचे मन अनेकांनी नोंदवलं होतं. समाजमाध्यमांवरुनही अनेकांनी टीका केली होती.

शिक्षण धोरणात मोठा बदल; पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत जाण्यासाठी पास होणे बंधनकारक

   Follow us on        

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल करण्याची घोषणा केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आता पाचवी आणि आठवीच्या वर्गातही मुलांना नापास केलं जाऊ शकतं. इयत्ता 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दोन महिन्यांत पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी दिली जाईल. त्यातही ते नापास झाले तर नापास होतील आणि पुन्हा त्याच वर्गात शिकावे लागेल.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. आता नो डिटेंशन पॉलिसीला समाप्त करण्यात आले आहे. त्यामुळे इयत्ता पाचवी आणि आठवीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात थेट ढकलणे बंद केले जाणार आहे. या नापास विद्यार्थ्यांना आता पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. मात्र ते जर दुसऱ्यांदाही नापास झाले तर त्यांना वरच्या वर्गात जाण्याची द्वार बंद केले जाणार आहे.  मात्र तरीही आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेतून काढणार नाही असेही सरकारने म्हटले आहे.

नापास मुलांकडे विशेष लक्ष दिले जाईल

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. जर एखादा विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाला तर त्याला 2 महिन्यांत पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी मिळेल, मात्र त्यातही तो अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुढील वर्गात पदोन्नती दिली जाणार नाही, असे या अधिसूचनेत म्हटले आहे. मात्र या काळात पुन्हा नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सुधारण्याची संधी दिली जाईल. अनुत्तीर्ण विद्यार्थ्याकडे शिक्षक विशेष लक्ष देतील आणि पालकांना वेळोवेळी मार्गदर्शनही करतील.

नो डिटेन्शन पॉलिसी ही शिक्षण हक्क कायदा 2009 चे महत्त्वाचे धोरण होते. या धोरणांतर्गत इयत्ता पाचवी आणि आठवीच्या मुलांना वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण करण्यात आले नाही. या धोरणांतर्गत पारंपारिक परीक्षांना सामोरे न जाता सर्व विद्यार्थ्यांना आपोआप पुढील वर्गात बढती देण्यात आली. या धोरणात मुलांचे सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापन करण्यावर भर देण्यात आला होता.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search