Author Archives: Kokanai Digital

मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाचा गर्डर तुटला; दुर्घटनेचा थरारक व्हीडिओ व्हायरल

बांधकामाच्या दर्जाविषयी प्रशचिन्ह उपस्थित
चिपळूण :मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असेलेल्या उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील उड्डाणपुलाचा गर्डर तुटण्याचा प्रकार घडला आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेला नाही. मात्र, महाकाय लाँचरचे काही भाग तुटल्यानं मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.या दुर्घटनेचा थरारक व्हीडिओ देखील समोर आला आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यादरम्यान बांधकाम सुरू असताना अचानक मोठा आवाज होऊन पुलाचा काही भाग तुटल्याचा प्रकार घडला आहे. यादरम्यान पुलाच्या खाली नागरिकांची एकच पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारस ही घटाना घडली. गेल्या अनेक महिन्यांपासून या फ्लायओव्हरचे काम सुरु आहे.
पुलाचा काही भाग कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पूल कोसळला तेव्हा स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला अशी माहिती घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिली. घटनेनंतर स्थानीक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.

Loading

राजापूर पोस्ट ऑफिसमध्ये रेल्वे आरक्षणाची सुविधा

राजापूर : राजापूर पोस्ट ऑफिस येथे ग्राहकांसाठी रेल्वे आरक्षण सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ रेल्वे प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे. राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे औचित्य साधून रेल्वे तिकीट आरक्षण सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. राजापूर तालुक्यातील व इतर जवळच्या भागातील रेल्वे प्रवाशांसाठी आरक्षण सुविधा राजापूर पोस्ट ऑफिस येथे सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात रत्नागिरी हेड ऑफिस, लांजा, संगमेश्वर या पोस्ट ऑफिसमध्ये भारतीय रेल्वे व भारतीय डाक विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वे तिकीट आरक्षण सुविधा राजापूर पोस्ट ऑफिसमार्फत मिळावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी, विद्यार्थी, नोकरदार व लोकप्रतिनिधी यांच्याकडून होत होती. ही सेवा पोस्ट विभागाच्या पुढाकाराने सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर पुढील आठवड्यात मेगाब्लॉक; तुतारी एक्सप्रेससह चार गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर पुढील आठवड्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. या मेगाब्लॉक मुळे मार्गावर धावणाऱ्या ४ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
A) बुधवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी आडवली – राजापूर रोड दरम्यान सकाळी ०८:०० ते ११:०० या वेळेत तर राजापूर रोड – नांदगाव रोड दरम्यान सकाळी ०७:४० ते १०:४० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येत आहेत. या मेगाब्लॉक मुळे खालील गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
१) Train no. 11003 Dadar – Sawantwadi Road Tutari Express
दिनांक १८ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रोहा ते रत्नागिरी दरम्यान २ तास १५ मिनिटे  उशिराने धावणार आहे.
२) Train no. 10106 Sawantwadi Road – Diva Express 
दिनांक १८ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी सावंतवाडी ते नांदगाव रोड दरम्यान १ तास १५  मिनिटे उशिराने धावणार आहे.
B) दिनांक २० ऑक्टोबर (शुक्रवार) रोजी गोकर्णा रोड – भटकळ दरम्यान दुपारी १४:४० ते १७:४० या वेळेत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगाब्लॉकमुळे खालील गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
१) Train no.12620 Mangaluru Central – Lokmanya Tilak (T) Matsyagandha Express
दिनांक २० ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी ठोकूर ते भटकळ दरम्यान १ तास ५० मिनिटे  उशिराने धावणार आहे.
२) Train no. 06601 Madgaon Jn. – Mangaluru Central Special 
दिनांक २० ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मडगाव ते गोकर्णा रोड दरम्यान १ तास उशिराने धावणार आहे.

Loading

दिवाळी साठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार साप्ताहिक विशेष गाडी

Konkan Railway News: दिवाळी सणासाठी  कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक खुशखबर आहे. मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे दिवाळी सणासाठी मुंबई-मंगलुरु जंक्शन दरम्यान एक साप्ताहिक विशेष गाडी चालविणार आहे 
01185/01186  एलटीटी मुंबई  – मंगलुरु जंक्शन – एलटीटी मुंबई साप्ताहिक विशेष (14 सेवा) 
01185 एलटीटी मुंबई  – मंगलुरु जंक्शन विशेष ही गाडी दिनांक 20.10.2023 ते 01.12.2023 पर्यंत (एकूण 7 फेऱ्या) प्रत्येक शुक्रवारी  22.15 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरून सुटून दुसऱ्या दिवशी 17.05 संध्याकाळी मंगलुरु जंक्शन या स्थानकावर पोहचणार आहे. 
01186 मंगलुरु जंक्शन – एलटीटी मुंबई विशेष ही गाडी दिनांक ,21.10.2023 से 02.12.2023 पर्यंत (एकूण 7 फेऱ्या) प्रत्येक शनिवारी संध्याकाळी 18.45 वाजता मंगलुरु जंक्शन  या स्थानकावरून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 14:25 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहचणार आहे. 
या गाडीचे थांबे
ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड़, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाड़ी रोड, थिविम, करमाली, मडगांव, करवार, गोकर्ण रोड, कुमता, मुरुदेश्वर, भटकल, मूकाम्बिका रोड बिंदूर, कुंडापुरा , उडुपी, मुल्की, सुरथकल आणि ठोकुर
डब्यांची संरचना:
01 वातानुकूलित -2 टियर, 05 वातानुकूलित -3 टियर, 08 शयनयान श्रेणी , 07 जनरल आणि ०२ एसएलआर – (एकूण = 21 आईसीएफ कोच)
या गाड्यांचे आरक्षण सोमवार दिनांक १६ ऑक्टोबर पासून चालू होणार आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/10/special-train.pdf” title=”special train”]

Loading

भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे १८ तारखेला माणगावात

माणगाव :-भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुधुवार दि १८ रोजी माणगावाला येणार आहेत त्याचबोबर ग्रामपंचायत निवडणूक घोषित झाल्याने निवडणूक विषयी विचार विनिमय करण्यासाठी रविवारी दि.०८ रोजी बामणोली रोड, खरे मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली.लोकसभा निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येवून ठेपल्यांने रायगड रत्नागिरी जिल्हातील लोकसभा भाजपा लदवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.राज्याचे प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांचा रायगड जिल्ह्यात दोन दिवस प्रवस दौरा पार पडणार आहे.

दि.१८ रोजी भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे येणार असल्याने स्वागताची जंगी तयारी केली जात आहे.नुकतीच अदावा बैठक घेण्यात आली. व्यासपीठावर रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष माजी आमदार तसेच लोकसभेचे सांभाव्य उमेदवार धैर्यशील पाटील तसेच लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश धारप, प्रशांत शिंदे ,श्रीवर्धन विधानसभा प्रमुख व दक्षिण रायगड सरचिटणीस मिलिंद पाटिल, बिपिन दादा महामुंकर जिल्हा उपाध्यक्ष राजेश मापारा,जिल्हा उपाध्यक्ष नाना महाले,महिला जिल्हा मोर्चा अध्यक्ष सौ.हेमा मानकर,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष नीलेश थोरे, न.पं.चे उपनगराध्यक्ष राजेश मेहता,ता.अध्यक्ष उमेश साटम,सचिव गोविंद कासार माजी अध्यक्ष संजय अप्पा ढवळे सह आदी मान्यवर विराजमान झाले होते. धैर्यशिल पाटील यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान धैर्यशील पाटील तसेच इतर मान्यवर यांचे सह सर्व मान्यवर यांना स्थनिक पदाधिकारी यानी पुष्प गुच्छ देवून स्वागत केले.पुढे स्वागत व प्रास्ताविक भाषण ता.अध्यक्ष उमेश साटम यांनी केले. धैर्यशिल पाटील म्हणाले प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांचा दौरा असल्याने त्यांच्या स्वागताची तयारी केली जात आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी हातभर लावण्याची आवश्यकता आहे. मी आमदार असताना विधानसभा सभग्राहात माझा सर्वोत्कृष्ट आमदार महणून गौरव करण्यात आला होता. माझे वडील पाच वेळा आमदार महणून कार्य केले आत्ता तुमच्या बक्कम पाठींब्याने मी निवडूण रिंगणात उतरणार आहे. शिवसेना पक्ष सत्तेत असताना विकास खुंटल्याचे सांगून 

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप तगडे उमेदवार उतरविणार आहे लोकसभा निवडणुकीत तूम्ही मला मताधिक्याने निवडून देणार असल्याचा पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले.यावेळी नाना महाले, प्रशांत शिंदे तसेच निलेश थोरे यांचेही भाषणे झाली. कार्यक्रमाच्या शेवटी गोविंद कासार यानी आभार मानले तसेच सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम दरम्यान माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी उमेश साटम यांना माणगाव तालुकाचे नवनिर्वाचित अध्यक्ष झाल्याबद्दल पुष्प गुच्छ देवून स्वागत,अभिनंदन तसेच शुभेच्छा दिले.

Loading

सावंतवाडी टर्मिनसला प्रा. मधू दंडवते यांचे नाव देणे व अन्य मागण्यांसाठी स्मारक समितीचा रेल्वेला अल्टिमेटम

सावंतवाडी : कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी खासदार तथा माजी केंद्रीय रेल्वे व अर्थमंत्री प्रा. मधू दंडवते यांची स्मृती जपण्यासाठी कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनसचे ‘प्रा. मधू दंडवते टर्मिनस’, असे नामकरण करावे आणि अन्य मागण्यांचे  निवेदन प्रा. मधू दंडवते स्मारक समितीच्यावतीने रेल्वे प्रशासनास देण्यात आले. 
सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे नाव लवकरात लवकर पूर्ण करून त्यास माजी खासदार तथा माजी केंद्रीय रेल्वे व अर्थमंत्री प्रा. मधू दंडवते यांचे नाव देण्यात यावे, कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकाच्या प्रवेशद्वारावर त्यांचे तैलचित्र लावण्यात यावे, रत्नागिरी स्थानक ते महामार्ग जोडणाऱ्या मार्गास त्यांचे नाव देण्यात यावे. तसेच प्रा. मधू दंडवते यांच्या नावाने एक रेल्वे सुरु करावी किंवा विन्द्यमान गाडीस त्यांचे नाव देण्यात यावे. सावंतवाडी स्थानकास टर्मिनस चा दर्जा देऊन तेथे सर्व गाडयांना थांबा मिळावा या मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. 
दिनांक २६ जानेवारी २०२४ पर्यंत या मागण्यांची अंबलबजावणी करण्यात यावी अन्यथा समितीतर्फे  कोकणातील सर्व स्थानकावर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.  
सावंतवाडीत स्मारक समितीचे निमंत्रक ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, भाई देऊलकर, मिहीर मठकर, सागर तळवडेकर यांनी येथील स्थानकात भेट देत याबाबतचे निवेदन सादर केले. यावेळी रेल्वेस्थानक रिक्षा युनियन अध्यक्ष संदीप बाईत, उपाध्यक्ष श्याम सांगेलकर, अजित सातार्डेकर, प्रदीप सोनवणे, दिलीप तानावडे, सचिन तळकटकर, सुरेंद्र गावडे, सचिन गावकर, अजित वैज, एकनाथ नाटेकर, अशोक गावडे, महेश खडपकर, भास्कर तांडेल आदी उपस्थित होते. या निवेदनावर सुमारे ३२० प्रवाशी नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत. 

Loading

मुंबई ते बांदा शयनयान प्रवास फक्त ५ रुपयांत; रेल्वेने वाऱ्यावर सोडलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा दिलासा

मुंबई :एसटीची शयनयान Sleeper बस सेवा राज्यात सुरू करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा या सेवेची सुरवात झाली असून पहिली बस सेवा मुंबई ते बांदा अशी सुरू करण्यात आली आहे.
रेल्वे आणि ईतर खाजगी बस प्रमाणे लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासासाठी ही सेवा निश्चितच उपयोगी ठरणार आहे. मात्र या सेवेचा विशेष लाभ ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे.
याचे कारण असे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने MSRTC या बस साठी ईतर बस प्रमाणे देण्यात येणार्‍या सवलती या बस दिल्या आहेत. त्यात महिलांना अर्धे तिकीट आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास मोफत या महत्त्वाच्या सवलतींचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांना कुठल्याही स्थानका दरम्यान च्या प्रवासासाठी फक्त 5 रुपये एवढे आरक्षण शुल्क भरून प्रवास करता येणार आहे.
आरोग्याच्या समस्या असल्याने दहा ते बारा तास बसुन प्रवास करणे हे अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्रासदायक आणि गैरसोयीचे होते. सध्या रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या तिकिट दरांमध्ये असलेल्या सवलती कोरोना काळापासून बंद केल्या आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आरामदायक आणि मोफत असलेला पर्याय एसटीने उपलब्ध करून दिला आहे. याचा फायदा राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना नक्किच होईल.

Loading

”त्यादिवशी विवाह मुहुर्त असल्याने… ” निवडणूकीच्या तारखेत बदल करण्याचे दिले गेले अजब कारण…

राजस्थान :निवडणूक आयोगाने राजस्थान विधानसभेसाठी मतदानाची तारीख बदलली आहे. 23 नोव्हेंबर ऐवजी आता 25 नोव्हेंबरला राजस्थानमध्ये मतदान होणार आहे. ही तारीख बदलण्याचे कारण ऐकून तुम्हीपण थोडे आश्चर्यचकित व्हाल. 

23 नोव्हेंबर या दिवशी लग्नाचा चांगला मुहूर्त आहे. त्यामुळे त्याचा मतदानावर परिणामाची भीती सर्वच पक्षांनी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून हा बदल करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

दिनांक 23 नोव्हेंबर हा दिवस विवाह आणि मंगलकार्यासाठी शुभ असल्याने या दिवशी मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे आणि इतर सामाजिक कार्ये असतिल त्यामुळे या दिवशी मतदान करणे मतदारांना गैरसोयीचे जाईल. तसेच त्याचा परिणाम होवूनकमी मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या तारखेत बदल करावा अशी निवेदने राजकीय पक्षांकडून आणि सामाजिक संस्थे कडून आली होती. त्याचप्रमाणे समाज माध्यमातून सुद्धा हा याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. या सर्वांचा विचार करून आपण या तारखेत बदल करत असल्याचे भारतीय निवडणूक आयोगाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे. 

 

 

Loading

फक्त चीन, मलेशिया देशांत अस्तित्वाची नोंद असलेला दुर्मिळ प्रजातीचा ‘जम्पिंग स्पायडर’ सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडला

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गच्या कुडाळमधील वेताळबांबर्डे येथील अभ्यासक गौतम कदम आणि केरळमधील अभ्यासकांनी जम्पिंग स्पायडर’ च्या नवीन कोळीच्या प्रजातीचा शोध घेतला आहे.चीन, मलेशियामध्ये झालेल्या नोंदीनंतर भारतातील या कोळ्याच्या प्रजातीची ही पहिलीच नोंद सिंधुदुर्गात झाली आहे. ऋषिकेश त्रिपाठी, गौतम कदम या दोन संशोधकांनी गेली दोन वर्षापासून या कोळीवर संशोधन केलं आहे. ‘जम्पिंग स्पायडर’ च्या नवीन कोळीच्या प्रजातीचा शोध घेतला आहे.

‘स्पारबांबॅरस सिंधुदुर्ग’ या नावाने या ‘जम्पिंग स्पायडर’ कोळीचं नामकरण करण्यात आलं आहे. या नावाने आता जगभरात या कोळीची ओळख होणार आहे. स्पारबांबॅरस हे नाव हा कोळी बांबूच्या झाडावर याचा अधिवास असल्याने तस नामकरण करण्यात आले आहे. हा कोळी ज्या ठिकाणी जाळ बनवतो त्याचं ठिकाणी जाळ्यात अडकलेल्या कीटकांचा भक्ष करतात. भारतात जवळपास 2000 कोळ्याचे प्रजाती सापडतात. तर जगभरात 51,000 कोळ्यांचे प्रजाती सापडतात. जम्पिंग स्पायडरच्या 300 प्रजाती भारतात आढळतात.

Loading

वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मुंबईहून दोन विशेष वंदे भारत ट्रेन

मुंबई : वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मुंबईहून गुजरातमध्ये जाणाऱ्या क्रिकेटप्रेमी प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने ‘मुंबई ते अहमदाबाद’ दोन विशेष वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचे नियोजन केले आहे. क्रिकेट सामन्यांसाठी विशेष एक्स्प्रेस चालवण्याची भारतीय रेल्वे इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.

यंदाच्या वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामना शनिवारी, १४ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू होणार आहे. स्टेडियमची आसनक्षमता एक लाख ३२ हजार असून सामन्यांची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. यामुळे मुंबई ते अहमदाबाददरम्यान सामन्याच्या आदल्या दिवशी रात्री उशिरा आणि सामन्याच्या दिवशी पहाटे अशा दोन वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचे नियोजन आहे.

तात्पुत्या वेळापत्रकानुसार १३ ऑक्टोबरला रात्री दहा वाजता मुंबईहून अहमदाबादसाठी वंदे भारत एक्स्प्रेस रवाना होईल आणि १४ ऑक्टोबरला पहाटे सहा वाजता अहमदाबादमध्ये पोहोचेल. दुसरी विशेष एक्स्प्रेस मुंबईहून सामन्याच्या दिवशी म्हणजे १४ ऑक्टोबरला पहाटे पाच वाजता सुटेल आणि १२ वाजेपर्यंत अहमदाबादला पोहोचेल. तूर्त गाड्यांचे थांबे निश्चित करण्यात आले नसले, तरी महत्त्वाच्या स्थानकांवर गाड्यांना थांबा देण्यात येणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search