नागपूर :समृद्धी महामार्गावर होत असलेले जीवघेणे अपघात खूपच चर्चेचा विषय बनला आहे. शासनाने महामार्गावरील प्रवासी वाहने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कसोट्यांच्या पूर्तता केल्या नसल्याने हे अपघात होत असल्याचे आरोपही होत आहेत. मात्र अशातच एका खाजगी बस ड्रायव्हरचा धक्कादायक विडिओ समोर आला असल्याने येथे होणाऱ्या अपघातास चालकांचा निष्काळजीपणा कसा जबाबदार आहे हे सुद्धा दिसून आले आहे.
एका प्रवाशाने हा विडिओ व्हायरल केला आहे. गाडी वारंवार रस्ता सोडत असल्याने त्याला संशय आल्याने तो चालकाच्या केबिनजवळ गेला. तेथील प्रकार पाहून त्याला धक्काच बसला. बस चालकाने बस स्टिअरिंग च्या खाली आपला मोबाईल ठेवून त्यावर एक चित्रपट चालू ठेवला होता. बस चालवता चालवता तो वारंवार मोबाईल कडे पाहत होता. १०/१० सेकंड मान खाली घालत होता.
प्रवाशांनी सांगूनसुद्धा त्याने आपले वर्तन बदलेले नाही..केवळ नशीब बलवत्तर म्हणून कोणती दुर्घटना न होता आम्ही सुखरूप अंतिम स्थानकावर पोहोचलो असे त्या प्रवाशाने ट्विट केलेल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे.
प्रवासात रात्री अचानक बस लेन सोडत असल्याचं जाणवलं. समोर जाऊन शैलेश यांनी बघितलं तर ड्रायव्हर चक्क हेडफोन लावून, मोबाईल समोर ठेऊन गाडी चालवत पिक्चर बघत होता.
रत्नागिरी : एप्रिल महिन्यात गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या वारसांना वीस लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश शासनाच्या वतीने देण्यात आला आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर ही मदत शासनाकडून देण्यात आले आहे.
चिपळूण तालुक्यातील तळसरगावातील तुकाराम बडदे यांच्यावर २३ एप्रिल २०२३ रोजी गवा रेड्याने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्यात ते गंभीर प्रमाणात जखमी झाले होते. त्यांच्यावर अपरांत हॉस्पिटल, चिपळूण येथे सात ते आठ दिवस उपचार सुरु होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे. मृत व्यक्तीच्या वारसांना शासनाच्यावतीने दिली जाणारी मदत तातडीने मिळावी यासाठी आमदार शेखर निकम व वन विभागाचे अधिकारी यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर २० लाख रुपयांची मदत शासनाकडून प्राप्त झाली. प्राप्त झालेली मदत मृताच्या वारसांना आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. यावेळी वन विभागीय अधिकारी दिपक खाडे, वनपाल चिपळूण राजेश्री किर, सहाय्यक वनरक्षक वैभव बोराटे, वनपाल चिपळूण दौलत भोसले, वनक्षेत्रपाल रामपूर राजाराम शिंदे, वनरक्षक कोळकेवाडी राहुल गुंठे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, प्रदेश सचिव जयंत खताते, तालुकाध्यक्ष अबु ठसाळे, मिडीयाध्यक्ष सचिन साडविलकर उपस्थित होते.
मुंबई : मुंबई गोवा महामार्गावरच्या उड्डाण पुलाचा भाग आज सकाळी तुटला आहे. या अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. मुंबई – गोवा महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत सरकारने खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देखील लिहिलं आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई – गोवा महामार्गाचं काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. परंतु, काम जरी वेगात सुरू असलं तरी ते अत्यंत निकृष्ट पद्धतीने होत असल्याचा अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. कामाचा वेग वाढवताना गुणवत्तेशी शासनाने तडजोड केली आहे का? असा प्रश्न सर्वसामान्याच्या मनात निर्माण होत आहे, असं जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
सदर उड्डाणपुलाच काम निकृष्ट असल्याचा आरोप अनेक वेळा येथील स्थानिक नागरिकांनी केला होता. परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास येत आहे. वरील घटना नागरिकांच्या दाव्यात तथ्य असल्याचे दाखवून देत आहे.तरी सदरील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून महामार्गाच्या कामाच्या दर्जाचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत परीक्षण करण्यात यावे. तसेच, या घटनेची चौकशी करण्यात येऊन कंत्राटदार व अन्य दोषीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
या घटनेबाबत त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर एक ट्विट पोस्ट सुद्धा केली. या पोस्ट मध्ये ते म्हणाले
“मुंबई गोवा महामार्गावर बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा भाग कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित असा या महामार्गाच्या गुणवत्तेबाबत देखील प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. वेग वाढवून कामाचा दर्जा घसरवला आहे का? सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कामाच्या गुणवत्तेबाबत सरकारने खुलासा करावा. कोकणवासियांच्या डोळ्यात सरकारकडून केली जाणारी धूळफेक थांबवा.”
चिपळूण :मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असेलेल्या उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील उड्डाणपुलाचा गर्डर तुटण्याचा प्रकार घडला आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेला नाही. मात्र, महाकाय लाँचरचे काही भाग तुटल्यानं मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.या दुर्घटनेचा थरारक व्हीडिओ देखील समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यादरम्यान बांधकाम सुरू असताना अचानक मोठा आवाज होऊन पुलाचा काही भाग तुटल्याचा प्रकार घडला आहे. यादरम्यान पुलाच्या खाली नागरिकांची एकच पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारस ही घटाना घडली. गेल्या अनेक महिन्यांपासून या फ्लायओव्हरचे काम सुरु आहे.
पुलाचा काही भाग कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पूल कोसळला तेव्हा स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला अशी माहिती घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिली. घटनेनंतर स्थानीक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.
राजापूर : राजापूर पोस्ट ऑफिस येथे ग्राहकांसाठी रेल्वे आरक्षण सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ रेल्वे प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे. राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे औचित्य साधून रेल्वे तिकीट आरक्षण सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. राजापूर तालुक्यातील व इतर जवळच्या भागातील रेल्वे प्रवाशांसाठी आरक्षण सुविधा राजापूर पोस्ट ऑफिस येथे सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात रत्नागिरी हेड ऑफिस, लांजा, संगमेश्वर या पोस्ट ऑफिसमध्ये भारतीय रेल्वे व भारतीय डाक विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वे तिकीट आरक्षण सुविधा राजापूर पोस्ट ऑफिसमार्फत मिळावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी, विद्यार्थी, नोकरदार व लोकप्रतिनिधी यांच्याकडून होत होती. ही सेवा पोस्ट विभागाच्या पुढाकाराने सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर पुढील आठवड्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. या मेगाब्लॉक मुळे मार्गावर धावणाऱ्या ४ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
A) बुधवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी आडवली – राजापूर रोड दरम्यान सकाळी ०८:०० ते ११:०० या वेळेत तर राजापूर रोड – नांदगाव रोड दरम्यान सकाळी ०७:४० ते १०:४० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येत आहेत. या मेगाब्लॉक मुळे खालील गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
दिनांक १८ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रोहा ते रत्नागिरी दरम्यान २ तास १५ मिनिटे उशिराने धावणार आहे.
२) Train no. 10106 Sawantwadi Road – Diva Express
दिनांक १८ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी सावंतवाडी ते नांदगाव रोड दरम्यान १ तास १५ मिनिटे उशिराने धावणार आहे.
B) दिनांक २० ऑक्टोबर (शुक्रवार) रोजी गोकर्णा रोड – भटकळ दरम्यान दुपारी १४:४० ते १७:४० या वेळेत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगाब्लॉकमुळे खालील गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
Konkan Railway News: दिवाळी सणासाठी कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक खुशखबर आहे. मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे दिवाळी सणासाठी मुंबई-मंगलुरु जंक्शन दरम्यान एक साप्ताहिक विशेष गाडी चालविणार आहे
01185/01186 एलटीटी मुंबई – मंगलुरु जंक्शन – एलटीटी मुंबई साप्ताहिक विशेष (14 सेवा)
01185 एलटीटी मुंबई – मंगलुरु जंक्शन विशेष ही गाडी दिनांक 20.10.2023 ते 01.12.2023 पर्यंत (एकूण 7 फेऱ्या) प्रत्येक शुक्रवारी 22.15 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरून सुटून दुसऱ्या दिवशी 17.05 संध्याकाळी मंगलुरु जंक्शन या स्थानकावर पोहचणार आहे.
01186 मंगलुरु जंक्शन – एलटीटी मुंबई विशेष ही गाडी दिनांक ,21.10.2023 से 02.12.2023 पर्यंत (एकूण 7 फेऱ्या) प्रत्येक शनिवारी संध्याकाळी 18.45 वाजता मंगलुरु जंक्शन या स्थानकावरून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 14:25 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहचणार आहे.
माणगाव :-भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुधुवार दि १८ रोजी माणगावाला येणार आहेत त्याचबोबर ग्रामपंचायत निवडणूक घोषित झाल्याने निवडणूक विषयी विचार विनिमय करण्यासाठी रविवारी दि.०८ रोजी बामणोली रोड, खरे मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली.लोकसभा निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येवून ठेपल्यांने रायगड रत्नागिरी जिल्हातील लोकसभा भाजपा लदवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.राज्याचे प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांचा रायगड जिल्ह्यात दोन दिवस प्रवस दौरा पार पडणार आहे.
दि.१८ रोजी भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे येणार असल्याने स्वागताची जंगी तयारी केली जात आहे.नुकतीच अदावा बैठक घेण्यात आली. व्यासपीठावर रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष माजी आमदार तसेच लोकसभेचे सांभाव्य उमेदवार धैर्यशील पाटील तसेच लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश धारप, प्रशांत शिंदे ,श्रीवर्धन विधानसभा प्रमुख व दक्षिण रायगड सरचिटणीस मिलिंद पाटिल, बिपिन दादा महामुंकर जिल्हा उपाध्यक्ष राजेश मापारा,जिल्हा उपाध्यक्ष नाना महाले,महिला जिल्हा मोर्चा अध्यक्ष सौ.हेमा मानकर,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष नीलेश थोरे, न.पं.चे उपनगराध्यक्ष राजेश मेहता,ता.अध्यक्ष उमेश साटम,सचिव गोविंद कासार माजी अध्यक्ष संजय अप्पा ढवळे सह आदी मान्यवर विराजमान झाले होते. धैर्यशिल पाटील यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान धैर्यशील पाटील तसेच इतर मान्यवर यांचे सह सर्व मान्यवर यांना स्थनिक पदाधिकारी यानी पुष्प गुच्छ देवून स्वागत केले.पुढे स्वागत व प्रास्ताविक भाषण ता.अध्यक्ष उमेश साटम यांनी केले. धैर्यशिल पाटील म्हणाले प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांचा दौरा असल्याने त्यांच्या स्वागताची तयारी केली जात आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी हातभर लावण्याची आवश्यकता आहे. मी आमदार असताना विधानसभा सभग्राहात माझा सर्वोत्कृष्ट आमदार महणून गौरव करण्यात आला होता. माझे वडील पाच वेळा आमदार महणून कार्य केले आत्ता तुमच्या बक्कम पाठींब्याने मी निवडूण रिंगणात उतरणार आहे. शिवसेना पक्ष सत्तेत असताना विकास खुंटल्याचे सांगून
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप तगडे उमेदवार उतरविणार आहे लोकसभा निवडणुकीत तूम्ही मला मताधिक्याने निवडून देणार असल्याचा पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले.यावेळी नाना महाले, प्रशांत शिंदे तसेच निलेश थोरे यांचेही भाषणे झाली. कार्यक्रमाच्या शेवटी गोविंद कासार यानी आभार मानले तसेच सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम दरम्यान माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी उमेश साटम यांना माणगाव तालुकाचे नवनिर्वाचित अध्यक्ष झाल्याबद्दल पुष्प गुच्छ देवून स्वागत,अभिनंदन तसेच शुभेच्छा दिले.
सावंतवाडी : कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी खासदार तथा माजी केंद्रीय रेल्वे व अर्थमंत्री प्रा. मधू दंडवते यांची स्मृती जपण्यासाठी कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनसचे ‘प्रा. मधू दंडवते टर्मिनस’, असे नामकरण करावे आणि अन्य मागण्यांचे निवेदन प्रा. मधू दंडवते स्मारक समितीच्यावतीने रेल्वे प्रशासनास देण्यात आले.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे नाव लवकरात लवकर पूर्ण करून त्यास माजी खासदार तथा माजी केंद्रीय रेल्वे व अर्थमंत्री प्रा. मधू दंडवते यांचे नाव देण्यात यावे, कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकाच्या प्रवेशद्वारावर त्यांचे तैलचित्र लावण्यात यावे, रत्नागिरी स्थानक ते महामार्ग जोडणाऱ्या मार्गास त्यांचे नाव देण्यात यावे. तसेच प्रा. मधू दंडवते यांच्या नावाने एक रेल्वे सुरु करावी किंवा विन्द्यमान गाडीस त्यांचे नाव देण्यात यावे. सावंतवाडी स्थानकास टर्मिनस चा दर्जा देऊन तेथे सर्व गाडयांना थांबा मिळावा या मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
दिनांक २६ जानेवारी २०२४ पर्यंत या मागण्यांची अंबलबजावणी करण्यात यावी अन्यथा समितीतर्फे कोकणातील सर्व स्थानकावर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
सावंतवाडीत स्मारक समितीचे निमंत्रक ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, भाई देऊलकर, मिहीर मठकर, सागर तळवडेकर यांनी येथील स्थानकात भेट देत याबाबतचे निवेदन सादर केले. यावेळी रेल्वेस्थानक रिक्षा युनियन अध्यक्ष संदीप बाईत, उपाध्यक्ष श्याम सांगेलकर, अजित सातार्डेकर, प्रदीप सोनवणे, दिलीप तानावडे, सचिन तळकटकर, सुरेंद्र गावडे, सचिन गावकर, अजित वैज, एकनाथ नाटेकर, अशोक गावडे, महेश खडपकर, भास्कर तांडेल आदी उपस्थित होते. या निवेदनावर सुमारे ३२० प्रवाशी नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.
मुंबई :एसटीची शयनयान Sleeper बस सेवा राज्यात सुरू करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा या सेवेची सुरवात झाली असून पहिली बस सेवा मुंबई ते बांदा अशी सुरू करण्यात आली आहे.
रेल्वे आणि ईतर खाजगी बस प्रमाणे लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासासाठी ही सेवा निश्चितच उपयोगी ठरणार आहे. मात्र या सेवेचा विशेष लाभ ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे.
याचे कारण असे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने MSRTC या बस साठी ईतर बस प्रमाणे देण्यात येणार्या सवलती या बस दिल्या आहेत. त्यात महिलांना अर्धे तिकीट आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास मोफत या महत्त्वाच्या सवलतींचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांना कुठल्याही स्थानका दरम्यान च्या प्रवासासाठी फक्त 5 रुपये एवढे आरक्षण शुल्क भरून प्रवास करता येणार आहे.
आरोग्याच्या समस्या असल्याने दहा ते बारा तास बसुन प्रवास करणे हे अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्रासदायक आणि गैरसोयीचे होते. सध्या रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या तिकिट दरांमध्ये असलेल्या सवलती कोरोना काळापासून बंद केल्या आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आरामदायक आणि मोफत असलेला पर्याय एसटीने उपलब्ध करून दिला आहे. याचा फायदा राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना नक्किच होईल.