Author Archives: Kokanai Digital

मुंबई-गोवा महामार्गावर राजापुर येथे आराम बस आणि कार समोरासमोर धडकली; सहा प्रवासी गंभीर जखमी…

रत्नागिरी – काल बुधवारी सायंकाळी 6.30 च्या दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर कोदवली येथे कोदवली उपकेंद्र नजीक खाजगी आराम बस आणि कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन एक भीषण अपघात घडला. या अपघातात कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी आराम बसला मुंबईकडून गोवा दिशेकडे जाणारा खाजगी कारचालक समोरून जोरदार धडकला त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर राजापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी पाठवण्यात आले आहे.

या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये योगेश ज्ञानदेव मुंडे, साहिल स्वप्नील मुंडे, स्वप्निल राजू मुंडे , साक्षी योगेश मुंडे, अर्चना स्वप्नील मुंडे, कृष्णा गणेश दराडे रा. जालना यांचा समावेश आहे. या अपघाताचे वृत्त कळतात अनेक स्थानिकानी अपघात स्थळी धाव घेतली व जखमीना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या रुग्णांवर राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित मीना डॉ. लक्ष्मण शर्मा डॉ. मोनिका व उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार केले. 

या सर्व रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी हलविण्यात आले आहे या अपघाताचे वृत्त कळतात पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे

 

Loading

अल्कोहोल टेस्ट नंतरच वाहकांच्या हातात मिळणार बसचे स्टेअरिंग; महामंडळाचे आदेश..

MSRTC News :एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास मानला जातो. मात्र काही वाहक मद्यप्राशन करून गाडी चालवत असून त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत अशा तक्रारी अलीकडे वारंवार येवू लागल्या आहेत. यावर उपाय म्हणुन वाहकांची अल्कोहोल टेस्ट घेण्याचे आदेश आदेश प्रत्येक आगाराला दिले आहेत.

वाहकांनी मद्यप्राशन केले नसल्याची खात्री करुनच त्यांना कर्तव्यावर पाठवावे असे स्पष्ट आदेश महामंडळाने काढले आहेत.

एसटी चालक मद्यधुंद अवस्थेत आढळल्यास वाहतूक नियंत्रक, पर्यवेक्षक, वाहन परिक्षक यांनी तातडीने स्थानक, आगार प्रमुख यांना त्याची माहिती ताबडतोब द्यावी. त्यानंतर त्याला कामगिरीवरुन उतरुन घेतील. तसेच त्वरित ड्रायव्हरची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल, तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात येऊन खातेंतर्गत कारवाई करण्यात येईल असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

एसटीचा प्रवास सुरक्षित मानला जातो. वाहकांची नोकर भरती करताना त्याच्या आरोग्य चाचण्या केल्या जातात. त्यांना पूर्णपणे प्रशिक्षण देवूनच त्यांच्या हातात गाडीचे स्टेअरिंग दिले जाते. खाजगी वाहतुकीशी तुलना करता एसटी बसेसच्या अपघातांचे प्रमाण पण खूप कमी आहे. मात्र अलीकडे काही वाहक मद्यप्राशन करून गाड्या चालवत अशा तक्रारी प्रवाशांकडून यायला लागल्या होत्या त्यामुळे महामंडळाने असे आदेश काढल्याचे समजते.

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या निधी वाटपात कोकणाला दुजाभाव का? जनआक्रोश समितीचा सवाल…

Mumbai Goa Highway News | रुपेश दर्गे| एखादा अपघात घडतो त्यावेळेस मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत जाहिर करण्यात येते तर जखमीवर मोफत उपचार करण्यात येतात यावर आमचा काहीही आक्षेप नाही कारण एखाद्याच्या घरचा कर्ता कमावता जातो त्यावेळेस त्यांच्या कुटुंबाला आधार देण गरजेचं आहे.

पण हे आधार कोकणाच्या बाबतीत कुठेतरी मागे पडताना आपल्याला दिसत आहेत. एकाच दिवशी दिनांक- १९.०१.२०२३ रोजी रायगड जिल्ह्यातील रेपोली येथे अपघात होऊन १० कोकणकरांना आपला प्राण गमवावा लागला तर सिंधुदुर्गमध्ये बस अपघातात ०२ कोकणकरांचा प्राण गेला. सरकारच्यावतीने अद्यापही त्यांना ना कोणती मदत जाहीर करण्यात आली ना कोणते भाष्य करण्यात आले. यानंतर एक ना अनेक अपघात सतत मुंबई गोवा महामार्गांवर घडत आहेत परंतू शासन मदत म्हणून कोकणाला वाट्याला देताना दिसत नाहीत याउलट आपलीच चुकी दाखविण्यात दंग होऊन जातात.

काही दिवसांपूर्वी तावडे कुटुंब या अपघाताचे बळी ठरले परंतु शासनाने त्यांना देखील मदत जाहीर केली नाही.

शनिवारी सुखेळी खिंड येथे पहाटे झालेल्या अपघातात ०२ जखमी झाले शासनाने यांच्यावर मोफत उपचार करण्याची कोणतीही जबाबदारी स्वीकारली नाही.

योग्य दिशादर्शक फलक नसल्याने आज दिनांक-१८.०४.२०२३ रोजी माणगाव इंदापूर हद्दीत अपघात घडला यामध्ये एका तरुणाला आपला प्राण गमवावा लागला तर दोघेजण जखमी आहेत.

याआधी ज्यांना मदत जाहिर केलेली आहे ती अद्याप पोहचलेली नाही.

हे सर्व प्रकार कोकणाला कुठेतरी दुजाभावा देताना दिसत आहेत.एकतर मुंबई-गोवा महामार्गाचे काम सरकार जलदगतीने पूर्ण करताना दिसत नाही.ठेकेदार कामचुकार करून अधिकारी या ठेकेदारांना पाठीशी घालून राजकीय आशीर्वादाने कोकणाच्या पदरी निराशा येत आहे.

सरकारी चुकीमुळेच होत असलेल्या अपघाताची जबाबदारी देखील घ्यायला तयार नाहीत.

रुपेश दर्गे

जनआक्रोश समिती

 

 

Loading

खारघर घटनेतील बळींना प्रत्येकी २० लाखांची मदत जाहीर करा; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची पत्रातून मागणी…

मुंबई – खारघर येथील घटनेला सर्वस्वी सरकार जबाबदार असून त्यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा. तसंच या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख, तर उष्माघातामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोफत उपचारासह प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची मागणी आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. अशा मागणीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

पत्रात ते असे म्हणतात की खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी लाखो संख्येनं नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला,त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला.ही दुर्दैवी घटना निसर्ग निर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे.या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार आहे. निवृत्ती न्यायाधीशांमार्फत या घटनेची चौकशी केली गेली पाहिजे. या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा. तसंच या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केलेली मदत अगदी तुटपुंजी असून किमान प्रत्येकी २० लाख, तर उष्माघातामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोफत उपचारासह प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत केली गेली पाहिजे असे ते या पत्रात म्हणाले आहेत.

Loading

कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे

Konkan Railway News – सुट्टीच्या हंगामात कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी वाढल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या दूर पल्ल्याच्या दोन एक्सप्रेस गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात डबे वाढवण्यात आले आहेत. या दोन गाड्यांमध्ये हापा मडगाव तसेच पोरबंदर कोचुवेली या दोन एक्सप्रेसचा समावेश आहे.

हापा ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या 22908 Hapa – Madgaon Express या गाडीला दि. 19 एप्रिल रोजीच्या फेरीसाठी तर परतीच्या फेरीसाठी 22907 Madgaon Jn. – Hapa Express या गाडीला दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी स्लीपर श्रेणीचा एक डबा अतिरिक्त जोडण्यात येणार आहे.

याचबरोबर पोरबंदर ते कोचुवेली 20910 Porbandar – Kochuveli Express या गाडीला दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी तर परतीच्या फेरीसाठी कोचीवेली ते पोरबंदर 20909 Kochuveli – Porbandar Express या गाडीला दि. 23 एप्रिल 2023 रोजी स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.

Loading

परशुराम घाट वाहतुकीसाठी पुन्हा बंद होणार?

रत्नागिरी-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा मार्गाच्या पूर्णत्वाची डेडलाइन दिल्यापासून मुंबई गोवा महामार्गाचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. कोकणवासीयां साठी ही एक चांगली बातमी म्हणावी लागेल. या महामार्गाचा एक धोकादायक भाग म्हणुन ओळखल्या जाणार्‍या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील काम सुद्धा जलदगतीने सुरू आहे. या घाटावरील डोंगर कटाईचे काम चालू असल्याने वाहतूक अतिशय धोकादायक बनली आहे. या कामा दरम्यान, अधुनमधून रस्त्यावर दगड येत असल्याने येथे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. 

अपघात होऊ नये या साठी दिवसातील काही तास परशुराम घाट वाहतुकीस बंद ठेवण्याची मागणी होत आहे. तसा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला गेला आहे. मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. परिणामी अतिशय धोका पत्करून या ठिकाणी वाहतूक सुरू आहे. 

वाहतुक सुरू ठेवून खोदकाम करण्यास अडचणी येत आहेत. त्यासाठी खेड हद्दीतील ठेकेदार कल्याण टोलवेजने परशुराम घाटातील १२ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्याची मागणी केली होती. तसा अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभाग पेणकडून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक, प्रांताधिकारी चिपळूण तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी यांना अभिप्राय देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्यांना तो अहवाल देण्यात आला आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झाला नाही आहे. मात्र सद्य परिस्थिती पाहता तो निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

Loading

उष्माघात: कारणे, खबरदारी व मार्गदर्शक तत्वे

शहरात सर्वत्र सध्या उष्णतेची लाट पसरली आहे. महाराष्ट्रभूषण पुरस्कारासाठी उपस्थित ११ श्री सदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू होण्याची वेदनादायी घटना कालच घडली आहे. प्रखर उन्हामुळे होणाऱ्या उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. 

उष्माघात होण्याची कारणे

  • उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे
  • कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे
  • जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे
  • घट्ट कपड्याचा वापर करणे
  • अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.

लक्षणे

  • थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे
  • भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे
  • रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था इत्यादी

 

उपचार

  • रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत, वातानुकुलित खोलीत ठेवावे
  • रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत
  • रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी
  • रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आईसपॅक्ड लावावेत
  • आवश्यकतेनुसार शीरेवाटे सलाईन देणे

काय करावे

  • तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे
  • हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत
  • बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/ टोपी, बुट व चपलांचा वापर करण्यात यावा
  • प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी
  • उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसंच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा
  • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा
  • अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
  • गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे
  • घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, व सनशेडचा वापर करावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे
  • कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी
  • सूर्यप्रकाशाशी थेट संबंध टाळण्याचे कामगारांना सूचित करावे
  • पहाटेच्यावेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा
  • बाहेर कामकाज करताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा
  • गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी
  • रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत
  • जागोजागी पाणपोईची सुविधा उभारावी

काय करु नये

  • लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये
  • दुपारी १२.०० ते ३.३० कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे
  • गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे
  • बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत
  • उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

इन्सुली घाटात पुणे-पणजी शिवशाही बसला अपघात.

सिंधुदुर्ग – इन्सुली घाटीत ओव्हरटेक करण्याच्या नादात टेम्पोने धडक दिल्याने पुणे-पणजी प्रवास करणार्‍या शिवशाही बसला अपघात झाला आहे. ही घटना आज रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र शिवशाही गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

 

दरम्यान अपघात झाल्यावर टेम्पो चालकाने अपघात स्थळावरून पळ काढला.याबाबतची माहिती सावंतवाडी आगाराचे प्रमुख नरेंद्र बोधे यांनी दिली. तशी तक्रार सावंतवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Loading

गोव्यात काजूला १५० रुपये हमीभाव जाहीर; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतिक्षा कधी संपणार?

सिंधुदुर्ग: गोवा राज्यात काजू शेतकऱ्यांच्या मागणीला अखेर न्याय मिळाला आहे. गोवा राज्यात काजूला  १२५ रुपये प्रति किलो असा बाजारभाव चालला होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काजूची आधारभूत किमंत (हमीभाव) प्रतिकिलो १५० रुपये करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे जानेवारी पासून शेतकऱ्यांनी विकलेल्या काजूला पूर्वलक्षी प्रभावानुसार अनुदान मिळणार आहे. त्यामुळे यंदा पडलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे झाले नुकसान भरून निघणार आहे. 
कोकणातील शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार?
महाराष्ट्र राज्यात कोकणात आणि त्याच्या लगतच्या जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात काजू उप्तादन होते. काजू हे पीक वर्षातून एकदा येते, कोकणात काजूपीकाकरिता वापरण्यात येणाऱ्या जमीन आणि उत्पादन  खर्चाचा विचार करता काजूला चांगला भाव मिळणे अपेक्षित आहे. वेळी-अवेळी पडणारा पाऊस, वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान, उत्पादन खर्चापेक्षा कमी परतावा यामुळे कोकणातील शेतकरी पारंपरिक पिकांकडून काजू पिकाकडे वळला आहे. डोंगराळ भागात जेसीपीच्या साहाय्याने जमीन लागवडीयोग्य बनवून तिथे काजूची रोपे लावण्यात आली. पाण्याच्या सोयीसाठी विहिरी खोदल्या गेल्या. त्यावेळी  मिळणारा भाव निश्चित आणि योग्य होता त्यामुळे योग्य परतावा मिळेल या हिशोबाने हा खर्च काण्यात आला.  मात्र मागील २ ते ३ वर्षांपासून काजूला मिळणार भाव खूप कमी झाला आहे. आता तर तो १०० रुपये प्रति किलो होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता तर नफा तर सोडाच तर शेतकऱ्यांचा झालेला खर्च पण वसूल होत नाही आहे. 
वारंवार मागणी करूनही सरकारद्वारे काही ठोस पावले उचलण्यात येत नाही आहेत. महाराष्ट्रातील इतर भागात होणाऱ्या पिकांना सरकार हमी भाव देत आहे मात्र कोकणात होणाऱ्या पिकांना कधी हमीभाव देऊन येथील शेतकऱ्यांना दिलासा का मिळत नाही असा प्रश्न विचारण्यात येत आहे. कोकणातील राजकीय नेते राजकारणातच जास्त व्यग्र असल्याचे दिसत आहे. येथील शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही असे पुन्हा निदर्शनास येत आहे. 






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

सावंतवाडी तालुक्यातील पोस्टऑफिस मध्ये रेल्वे आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी… .

सिंधुदुर्ग | सावंतवाडी तालुक्यातील मुंबईस्थित चाकरमानी गावी जाण्यासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. सावंतवाडी स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पण दिवसेंदिवस वाढत आहे. मागेच सावंतवाडी रेल्वे  स्थानकाला टर्मिनस चा दर्जा पण देण्यात आला आहे. मात्र येथील प्रवाशांना रेल्वेच्या आरक्षणासंबंधी एक समस्या नेहमीच भेडसावत आहे. 
सावंतवाडी रेल्वे स्थानक ते सावंतवाडी शहर हे अंतर जवळपास ८ किलोमीटर आहे.आरक्षण करण्यासाठी यायचे म्हंटले तर प्रवाशांच्या वेळेचा, श्रमाचा आणि पैशाचा अपव्यव होतो. त्यामुळे सावंतवाडी पोस्ट ऑफिस मध्ये रेल्वे टिकेट्स आरक्षणाची सुविधा चालू करावी अशी मागणी होत आहे.
कुडाळ, कणकवली रेल्वे स्थानके त्या त्या शहरांच्या जवळ असल्याने तेथील प्रवाशांना हा त्रास कमी प्रमाणात होतो पण सावंतवाडीतील प्रवाशांना या त्रासाला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे. इंटरनेट वर आरक्षण करताना अनेक अडचणी  येतात. इंटरनेट वर रेल्वे तिकीट आरक्षित करता येते पण तिकीट प्रतीक्षा यादीत राहिल्यास ते रद्द होते या नियमामुळे प्रवाशांना आणीबाणीच्या Emergency वेळी तिकीट खिडकीवर येऊन आरक्षित टिकेट्स मिळवावे लागते.  
आमच्या प्रतिनिधींनी याबाबत अधिक चौकशी केली असता यापूर्वी सावंतवाडी शहर येथील पोस्ट ऑफिस मध्ये रेल्वे टिकेट्स आरक्षणाची सुविधा होती; पण कोरोना लॉकडाउन नंतर ही सुविधा बंद करण्यात आली त्यानंतर ही सुविधा पुन्हा सुरु झाली नाही अशी माहिती मिळाली. मात्र ही सुविधा पुन्हा चालू करावी अशी मागणी होत आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search