Author Archives: Kokanai Digital

कोकण रेल्वे मार्गावर आजपासून २ विशेष मेमू गाड्या धावणार

Konkan Railway News:कोकण रेल्वे मार्गावरील सध्याची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोकण रेल्वेमार्गावर दोन महिन्यांसाठी दोन विशेष मेमू गाड्या चालविण्याच्या निर्णय घेतला आहे. या गाड्या आठ डब्यांच्या असून पूर्णपणे अनारक्षित स्वरूपाच्या असणार आहेत. दोन्ही गाड्यांच्या प्रत्येकी ९ असे मिळून एकूण १८ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
१) गाडी क्रमांक ०११५७ पनवेल – रत्नागिरी विशेष मेमू 
दिनांक ४ फेब्रुवारी ते ३१ मार्च, २०२४ पर्यंत केवळ दर रविवारी ही गाडी पनवेल येथून रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी  सुटून रत्नागिरी येथे  पहाटे ४ वाजता पोहोचेल.
या गाडीचे थांबे : सोमटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड
2) गाडी क्रमांक ०११५८ चिपळूण – पनवेल विशेष मेमू 
दिनांक ४ फेब्रुवारी ते ३१ मार्च, २०२४ पर्यंत केवळ दर रविवारी ही गाडी चिपळूण  येथून दुपारी  ३ वाजून २५ मिनिटांनी  सुटून पनवेल येथे  रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल.
या गाडीचे थांबे : अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, जिते, आपटा, रसायनी आणि सोमटणे.

Loading

”…. म्हणुन गाड्यांचे हे डबे कमी केले जात आहेत.” गाड्यांचे स्लीपर कोचेस कमी केल्यावर मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचे स्पष्टीकरण

नागपूर: रेल्वेत प्रवाशांकडून वातानुकूलित (एसी) कोचला जास्त मागणी असल्याने ‘स्लिपर कोच’ कमी करून ‘एसी कोच’ वाढवले गेले, असा दावा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी केला.

मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकारांनी मध्य रेल्वेसह देशभरात प्रवासी गाड्यांमधील सातत्याने स्लिपर कोच कमी होऊन वातानुकूलित ‘थ्री टायर एसी कोच’ वाढत असल्याकडे लक्ष वेधले होते. त्यावर राम करण यादव पुढे म्हणाले, रेल्वेत सातत्याने प्रवाशांकडून ‘स्लिपर’च्या तुलनेत ‘थ्री टायर एसी’ची मागणी जास्त वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे वातानुकूलित कोच वाढवले गेले.

देशातील काही ठिकाणी मागणीनुसार ‘स्लिपर कोच’च्याही गाड्या चालवल्या जात आहेत. त्यातच सध्या ‘एसी थ्री टायर’ आणि ‘स्लिपर कोच’मधील सीटच्या प्रवासी भाड्यात खूप जास्त फरक नाही. रेल्वेकडून सातत्याने पायाभूत सुविधा बळकट केली जात असून थ्री लाईन, फोर लाईनसह इतरही कामांना गती दिली गेली आहे. हे काम पूर्ण झाल्यावर मग कमी झालेल्या पॅसेंजर रेल्वे पुन्हा चालवण्याबाबत प्रक्रिया होण्याची आशा आहे. मध्य रेल्वेत अमृत भारत योजनेअंतर्गत १५ रेल्वे स्थानकांचा विकास होत असल्याचेही यादव म्हणाले.

 

महाव्यवस्थापकांचा दावा कितपत योग्य? 

कोकण रेल्वे मार्गावरील कोकणकन्या आणि मांडवी या दोन गाड्यांचे दोन स्लीपर डबे कमी करून त्या जागी दोन ‘ईकाॅनाॅमी थ्री टायर एसी’ चे डबे जोडले गेले आहेत. या दोन्ही गाड्या मध्य रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर चालवते. या गाड्यांना स्लीपर कोचपेक्षा एसी कोचला जास्त मागणी होती हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. कारण या गाड्यांच्या स्लीपर कोच च्या तिकीट चार महिने आगावू बूक करताना भेटणे मुश्किल होत असे. मग मागणी कमी कशी असा प्रश्न प्रवाशांकडून विचाराला जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्लीपर श्रेणी आणि थ्री टायर एसी यांच्या तिकीट दरांमध्ये जास्त फरक नाही असे महाव्यवस्थापक बोलत आहेत. पण खरे पाहता थ्री टायर एसी चे प्रवासभाडे स्लीपर श्रेणीपेक्षा जवळपास तिप्पट आहे. त्यामुळे त्यांचा हा दावा पण चुकीचा आहे असे प्रवाशांकडून बोलले जात आहे.

Loading

रत्‍नागिरी-सिंधुदुर्गमधील रामभक्‍तांना भाजपतर्फे अयोध्यावारी; पनवेल येथून सोडण्यात येणार विशेष ट्रेन

मुंबई: रत्‍नागिरी-सिंधुदुर्गमधील सहा विधानसभा मतदारांतून प्रत्‍येकी अडीचशे या प्रमाणे दीड हजार रामभक्‍तांना आम्‍ही अयोध्यावारी घडविणार आहोत. त्‍यासाठी ८ फेब्रुवारीला पनवेल येथून विशेष ट्रेन सुटेल आणि १० फेब्रुवारीला अयोध्यानगरीत श्रीराम दर्शन घेता येईल. तसेच सकाळच्या महाआरतीमध्येही सहभागी होता येणार असल्‍याची माहिती भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी दिली.
श्री. जठार म्हणालेत  ८ फेब्रुवारीला पनवेल येथून विशेष ट्रेन सुटेल आणि १० फेब्रुवारीला अयोध्यानगरीत श्रीराम दर्शन घेता येईल. तसेच सकाळच्या महाआरतीमध्येही सहभागी होता येणार आहे 
 या ट्रेनचा प्रमुख आपण आणि स्थानिक नेते असणार आहेत. विधानसभा प्रमुख सावंतवाडी राजन तेली, कणकवली आ. नितेश राणे, कुडाळ येथून निलेश राणे, रत्नागिरी बाळ माने या नेत्यांकडे त्या त्या मतदार संघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर या इच्छुक राम भक्तांनी या ट्रेनमधून अयोध्या वारी करण्यासाठी भाजपच्या तालुकानिहाय मंडल अधिकारी तथा तालुकाध्यक्षांकडे संपर्क साधावयाचा आहे असे ते पुढे म्हणालेत.
                                       

Loading

पुण्यात नाटकामध्ये हिंदू देवतांचा अपमान; सीतामाईचे पात्र करणार्‍या कलाकाराचे आक्षेपार्ह वर्तन..

पुणे: अयोध्येत नुकतेच प्रभू रामलल्लांच्या मूर्तीचा राममंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. संपूर्ण देश राममय झाले असताना विद्येचे माहेरघर म्हणुन ओळखल्या जाणार्‍या पुण्यात एक संतापजनक प्रकार घडला आहे. कलेच्या गोंडस नावाखाली एका नाटकात रामायणाची पात्रे अगदी घाणेरड्या पद्धतीने दाखविण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

पुणे विद्यापीठातील ललित कला मंचाने आयोजित केलेल्या या नाटकात रामायणाची पात्रे खूप चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली आहेत. या नाटकात सीता माताची भूमिका करणारा कलाकार या नाटकात शिव्या देताना आणि सिगारेट पिताना दाखवला आहे. 

नाटक चालू असताना आपल्या देवी देवतांचा अपमान सहन न झाल्याने अभाविप पुणे महानगरच्या कार्यकर्त्यांनी हे आक्षेपार्ह नाटक बंद केले. हिंदू देवी देवतांबद्दल अशा प्रकारची भाषा मुळीच खपवून घेतली जाणार नाही व संबंधित दोषी विरूध्द कारवाई करण्यात यावी अशी भूमिका अभाविप पुणे तर्फे घेण्यात आली आहे.

 

Loading

Konkan Railway | सोमवारची मुंबई सिएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस उशिराने धावणार

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर येत्या सोमवारी आणि मंगळवारी दिनांक ०५ आणि ०६ फेब्रुवारी रोजी कोकण रेल्वेच्या वेर्णा ते माजोर्डा या विभागां दरम्यान रेल्वेच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. एकूण दोन तास हा मेगाब्लॉक चालणार आहे. या मेगाब्लॉक मुळे सोमवार दिनांक ५ फेब्रुवारीला मुंबई सिएसएमटी वरून सुटणाऱ्या गाडी क्रमांक 22229 Mumbai CSMT – Madgaon Jn. Vande Bharat या गाडीच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असून ही गाडी रत्नगिरी ते करमाळी या स्थानकांदरम्यान सुमारे १ तास उशिराने चालविण्यात येणार आहे.

Loading

आंबोली: परप्रांतीयांना जमिनी न विकण्याचा ग्रामस्थांचा ठराव

आंबोली: परप्रांतीय मोठ्याप्रमाणात कोकणात जमिनी विकत घेत आहेत. एक चांगली गुतंवणूक म्हणून जमिनी खरेदी करण्यात येत आहेत. तर काही बांधकाम व्यावसायिक जमिनी विकत घेऊन तेथे इमारतीची बांधकामे करत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असून कोकणच्या निसर्गाला हानी पोहचत आहे. प्रसिद्ध पर्यटनस्थळ आंबोली येथेही असेच प्रकार चालू असल्याने येथील ग्रामस्थ जागरूक झाले आहेत. काल दिनांक ३१ जानेवारीला आ बोली ग्रामपंचायत कार्यालय येथे आंबोलीतील गावठण फौजदारवाडी ग्रामस्थांची बैठक झाली. यावेळी बाहेरच्या तसेच परप्रांतीय लोकांना जमिनी विकण्यास मज्जाव करण्याबाबत ठराव घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना स्वाक्षरींचे निवेदन दिले. जमीन ही गावची असल्याने विकण्याचा कोणाला अधिकार नाही, असा ठराव घेण्यात आला. आंबोलीतील बाकी वाडीतील ग्रामस्थांनाही गावातील जमीन विक्रीला पायबंद घालण्याची मागणी केली आहे.
गावातील १५ एकर जागा परस्पर विकल्याचा आरोप  
आंबोली असलेला कबुलायतदार गावकर जमिन प्रश्न शासन दरबारी सुटण्याच्या मार्गावर असल्याचे लोकप्रतिनिधी सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर हिरण्यकेशी रस्त्यालगत १५ एकर जागा गावाबाहेरील व्यक्तींना काही स्थानिकांनी परस्पर विकल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. संबंधित जागेत जेसेबीने सपाटीकरण सुरू आहे. याविरोधात गावठण ग्रामस्थांनी एल्गार केला असून ते अतिक्रमविरोधात एकवटले. प्रशासनाला स्वाक्षरींचे निवेदन देऊन जिल्ह्याधिकाऱ्यांनी तत्काळ पंचनामे करावे; अन्यथा आंबोली ग्रामस्थांतर्फे आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
गावातील १९९९ नंतर विकलेल्या सर्व जागेचा सर्व्हे व्हावा तसेच तलाठी कार्यालयात भ्रष्टाचार करून घातलेल्या नोंदी काढून टाकाव्यात आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ यावर आदेश काढून पंचनामे करावेत आणि गाव वाचवावे, अशी मागणी गावठणवाडी ग्रामस्थांनी केली. दरम्यान, सरपंच सावित्री पालेकर, सदस्य काशीराम राऊत, ग्रामसेवक संदीप गोसावी, तंटामुक्ती अध्यक्ष उल्हास गावडे, प्रकाश गुरव, बबन गावडे, बाळकृष्ण गावडे, अंकुश राऊत, कांता गुरव, प्रथमेश गावडे, मोतीराम सावंत, रंजना गावडे, काशीबाई गावडे, सुनील राऊत, दीपक मेस्त्री, शंकर गावडे, अमित गुरव, राकेश अमृस्कर, झिला गावडे आदी उपस्थित होते.

Loading

मोठी बातमी: अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई: ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे. अशोक सराफ यांनी आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये आणि नाटकांमध्ये अभिनय केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या एक्स हँडलवरुन ही माहिती दिली आहे. अशोक सराफ यांनी विनोदी, गंभीर आणि खलनायकी भूमिकाही साकारल्या आहेत. तसंच आपल्या अभिनयातून रसिकांच्या मनावर राज्य गाजवलं आहे. अशोक सराफ हे एक लोकप्रिय अभिनेते आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी खूप गाजली होती.

 

Loading

सावधान! कोकण रेल्वे प्रवासादरम्यान विक्रेत्यांकडून वडापाव विकत घेत असाल तर ही बातमी वाचाच

रत्नागिरी : कोकण रेल्वेमधून प्रवास करताना चिपळूण – रत्नागिरी ही स्थानके आली कि खास करून वडापाव विकणारे फेरीवाले मोठ्या प्रमाणात गाडीत चढून वडापाव विक्री करतात. प्रवासी पण रास्त किंम्मत आणि गरम असल्याने हे वडापाव खरेदी करतात. मात्र हे फेरीवाले प्रवाशांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा प्रकार समोर आला आहे.  
समाज माध्यमांवर एक फोटो  मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. एक वडापाव विक्रेता विक्रीस आणलेल्या वडापाव च्या ट्रे वर पाय ठेवून झोपला असल्याचा हा किळस आणणारा हा फोटो आहे.  हा फोटो चिपळूण स्थानकावरील असल्याचे बोलले जात आहे. 
या प्रकारामुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. रेल्वे कॅन्टीन च्या विक्रेत्यांकडून असे किळसदायक प्रकार घडल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. त्यामुळे प्रवासी वर्ग या बाहेरील विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ घेत असे. मात्र इथेही असे अनुभव येत असल्याने प्रवासादरम्यान खाद्यपदार्थ घ्यावे कि न घ्यावे हा प्रश्न साहजिकच त्यांना पडला आहे. हे विक्रेते बहुतेक करून परप्रांतीय आहेत. विकताना ते असे किळसवाणे प्रकार करत असतील तर हे खाद्यपदार्थ बनवताना स्वच्छतेचे किती मापदंड पाळत असतील हा प्रश्न समोर आला आहे.  

Loading

अभिमानास्पद! युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी केंद्राकडून मराठ्यांच्या १२ किल्यांना मिळाले नामांकन; कोकणातील ‘या’ किल्ल्यांचा समावेश

जाने. ३० : युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या २०२४-२५ साठीच्या यादीसाठी केंद्र सरकारकडून मराठा शासन काळातील लष्करीदृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या १२ किल्ल्यांना नामांकन देण्यात आले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने सोमवारी (दि. २९ जानेवारी) ही माहिती दिली. मराठा राजवटीत शत्रूशी झुंज देण्यासाठी ज्या १२ किल्ल्यांचा लष्करी तळासाठी वापर केला, त्या किल्ल्यांना आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान मिळण्यासाठी भारताकडून नामांकन मिळाले आहे. यामध्ये शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, साल्हेर, राजगड, खंडेरी, प्रतापगड आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे.
Suvarnadurg-Fort.jpg
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, १७ व्या आणि १९ व्या शतकात मराठा शासन काळात या किल्ल्यांचा वापर करून राज्यकर्त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजविला. सह्याद्री, कोकण किनारपट्टी आणि दख्खनच्या पठारावर असलेल्या या किल्ल्यांचे भौगोलिक, सांस्कृतिक असे महत्त्व आहे. महाराष्ट्रात एकूण ३९० छोटे-मोठे किल्ले आहेत. त्यापैकी युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी १२ किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाकडून १२ पैकी आठ किल्ल्यांचे याआधीच संवर्धन करण्यात आलेले आहे.
Sindhudurg Fort
छत्रपती शिवाजी महाराज यांनी १७ व्या शतकात किल्ल्यांचा आधार घेत शत्रूला नामोहरण केले, त्यानंतर १८१८ पर्यंत पेशव्यांनी लष्करी कारवाया करण्यासाठी किल्ल्यांचा आधार घेतला.
Panhala Fort
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचे नामांकन सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा दोन श्रेणीमध्ये होत असते. महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश सांस्कृतिक श्रेणीत करण्यात आला आहे. भारतातील ४२ ठिकाणांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. यापैकी सहा ठिकाणे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.
Lohagadh fort
Vijaydurg Fort
Raigad Fort

Loading

वाशी: जानेवारी महिन्यात बाजारात हापूसची विक्रमी आवक; पेटीची किंमत किती?

वाशी, २९ जानेवारी : कोकणातील हापूस वाशी बाजारात दाखल व्हायला सुरूवात झाली आहे. वाशी बाजार समितीमध्ये जानेवारी महिन्यात हापूसची विक्रमी आवक झाली आहे. यावर्षी जानेवारीत बाजार समितीमध्ये विक्रमी ३६० पेट्यांची आवक झाली आहे. प्रतवारीनुसार या आंब्याला प्रतिपेटी सात हजार ते १२ हजारांचा दर मिळत आहे.

अद्याप आंबा हंगामाला पूर्णपणे सुरूवात झालेली नाही. दरवर्षी जानेवारी महिन्यात हापूसची २५ ते ३० पेट्यांची आवक होत असते. मात्र, यंदा जानेवारी महिन्यात वाशी बाजारात हापूसच्या विक्रमी ३६० पेट्यांची आवक झाली आहे. या आंब्याला दरही चांगला मिळत आहे.

अवकाळी पावसामुळे बऱ्याच ठिकाणी आंब्याचा मोहराची गळ झाली होता. तसेच बुरशीजन्य रोग आणि रसशोषक कीडींचाही प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले. पावसामुळे मोहर गळ झाल्याने पुनर्मोहराची प्रकिया लांबली. परिणामी फळ तयार होण्याच्या प्रक्रियेलाही उशीर झाला. परंतु काही भागात अवकाळीचा फटका बसूनही योग्य व्यवस्थापनामुळे फळ वेळेत तयार झाले आहे.

मागील वर्षी आंब्याचे उत्पादन घटले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात आंब्याचे चांगल्या प्रमाणत उत्पादन राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांना होता. मात्र, मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे एप्रिलमध्ये येणाऱ्या आंब्याचा मोहर काळा पडला. याशिवाय रसशोषक कीडीचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे एप्रिलच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search