Author Archives: Kokanai Digital

Loksabha Election 2024: मतदानाच्या टक्केवारीत सावंतवाडी सरस | राज्यात अपेक्षेपेक्षा कमी मतदान.. जाणून घ्या मतदानाची पूर्ण आकडेवारी

   Follow us on        

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यातील मतदान आज पार पाडले. महाराष्ट्र राज्यात 54.98% एवढे मतदान झाले असून सर्वात जास्त मतदान कोल्हापूर मतदारसंघात (63.71%) झाले आहे तर सर्वात कमी मतदान माढा मतदारसंघात (47.84%) एवढे झाले आहे.

  • लातूर 55.38 %
  • सांगली 52.56 %
  • बारामती 47.84%
  • हातकणंगले 62.18%
  • कोल्हापूर 63.71%
  • माढा 50%
  • उस्मानाबाद 58.24%
  • रायगड 50.31%
  • रत्नागिरी  – सिंधुदुर्ग 53.75 %
  • सातारा 56.38 %
  • सोलापूर 49.17%

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 53.75% मतदान झाले आहे. या मतदारसंघात सावंतवाडीत सर्वाधिक 60.30% एवढे मतदान झाले असून राजापुरात सर्वात कमी 47.31% एवढे मतदान झाले आहे.

  • कुडाळ 59.09%
  • कणकवली 55.14%
  • सावंतवाडी 60.30%
  • राजापूर 47.31%
  • चिपळूण 52.62%
  • रत्नागिरी  49.83%

रायगड लोकसभा मतदारसंघात 50.31% मतदान झाले आहे. या मतदारसंघात दापोली येथे सर्वाधिक 59.12% एवढे मतदान झाले असून महाड मध्ये  सर्वात कमी 45.60%  एवढे मतदान झाले आहे.

  • अलिबाग 52.33%
  • दापोली 59.12%
  • गुहागर 53.77%
  • महाड 45.60%
  • पेण 51%
  • श्रीवर्धन 49.48 %

देशात आज निवडणूकीच्या तिसर्‍या टप्प्यात एकूण 61.60% एवढे मतदान झाले असून आसाम राज्यात सर्वाधिक सुमारे 75.30% एवढे मतदान झाले आहे तर महाराष्ट्र राज्य टक्केवारीत (54.98%) सर्वात मागे आहे. अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याने उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. मतदानाच्या टक्क्यावर वाढलेल्या तापमानाचा परिणाम झाला असून मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे.

टीप : वरील आकडेवारी शासनाच्या अधिकृत माध्यमांतून उपलब्ध झाली असली तरी ती अंदाजित स्वरूपाची आहे. ही माहिती टप्प्याटप्प्याने येत असल्याने त्यात काहीशी वाढ अपेक्षित आहे. यात टपालाने केलेल्या मतांचा समावेश नाही आहे. 

Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

 

 

 

 

 

 

 

Loading

कोकणात टर्मिनस नसल्याने गणपतीबाप्पा कोकणात अन गणपती स्पेशल रेल्वे गोवा,कर्नाटक व केरळात

सावंतवाडी रोड स्टेशनला सुसज्ज टर्मिनस बनवून त्याला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधू दंडवते यांचे नाव देण्यात यावे अशी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने कोकण रेल्वेकडे केली मागणी

   Follow us on        
आवाज कोकणचा : कोकण रेल्वेला नुकतीच २५ वर्ष पूर्ण झाली.कोकण रेल्वेचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कोकणातील भूमिपुत्रांनी आपल्या स्वतःच्या जमिनी या बहाल केल्या, मात्र कोकण रेल्वेतून कोकणातील भूमिपुत्राला काय मिळाले हा प्रश्न आजही निरूत्तरीतच आहे, या ठिकाणी भूमिपुत्रांना अपेक्षित असणारा सुलभ आणि सोयीस्कर प्रवासा आजही होताना दिसत नाही, यासाठीच कोकणात सावंतवाडी रोड येथे सुसज्ज टर्मिनस बनवावे व त्याला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधू दंडवते यांचे नाव दयावे अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
गणेश उत्सवाच्या दरम्याने सर्व कोकण रेल्वे प्रवासी संघटना साधारण ३०० ते ३५० रेल्वेच्या फेऱ्यांची मागणी करतात मात्र कोकणात सुसज्ज टर्मिनस नसल्याने गणपतीबाप्पा कोकणात आणि सर्व गणपती स्पेशल ट्रेन दक्षिणेतील गोवा,कर्नाटक, केरळ व तामिळनाडू राज्यात न्याव्या लागतात. त्यामुळे गणपतीस्पेशल रेल्वे सोडूनही अर्धा रिझर्वेशन कोटा हा दक्षिणेतील राज्यांना मिळतो व खरा लाभार्थी वेटींगलिस्टमध्येच राहतो. त्यामुळे कोकणातील भूमिपुत्रांना कोकण रेल्वेचा काहीच फायदा होताना दिसत नाही.
सावंतवाडी स्टेशन येथे फेज एक मध्ये फक्त प्याटफॉर्म व ब्रिजचे काम करण्यात आले मात्र टर्मिनस म्हणून आवश्यक असणारे मुबलक पाणी, ट्रेन सरव्हिसींग व मेंटेनसचे काम येथे होत नसल्याने या कामासाठी पुढील राज्यांचा आधार घ्यावा लागतो.परिणामी कोकणातील प्रवाशांना कोकण रेल्वेच्या सेवेचा अपेक्षित फायदा घेता येत नाही.सावंतवाडी येथे सुसज्ज टर्मिनस झाल्यास प्रतिक्षेत असलेल्या वसई सावंतवाडी पॅसेंजर,कल्याण सावंतवाडी पॅसेंजर,दादर चिपळूण मेमू व सिएसएमटी रत्नागिरी इंटरसिरी एक्सप्रेस अशा कोकणाच्या हक्काच्या कमी अंतराच्या रेल्वे चालवल्या जातील त्याचा फायदा कोकणातील भूमिपुत्रांना होईल,अशी प्रवासी संघटनेची धारणा आहे.
सावंतवाडी रोड टर्मिनसच्या कामाला गती मिळावी यासाठी १६ मे २०२३ रोजी सावंतवाडी रोड स्टेशन मास्तर यांना वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले तर २६ जाने.२०२४ रोजी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या वतीने स्थानिक भूमिपुत्रांच्या सहकार्याने लाक्षणिक उपोषणही करण्यात आले.
म्हणूनच सावंतवाडी रोड स्टेशन ला सुसज्ज टर्मिनस बनवून त्याला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधू दंडवते साहेब यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
-अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती- मुंबई
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

Election 2024 Voting Live Updates: राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५% टक्के मतदान; टक्केवारीत महाराष्ट्र इतर राज्यांच्या मागे

   Follow us on        
Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत  ३१.५५% मतदान झाले असून सर्वात जास्त मतदान कोल्हापूर मतदारसंघात (३८.४२%)  झाले आहे तर सर्वात कमी मतदान माढा मतदारसंघात (२६.६१%)झाले आहे.
लातूर – ३२.७१ %
सांगली २९.६५ %
बारामती २७.५५%
हातकणंगले ३६.१७%
कोल्हापूर ३८.४२%
माढा २६.६१%
उस्मानाबाद ३०.५४%
रायगड ३१.३४%
रत्नागिरी  – सिंधुदुर्ग ३३.९१ %
सातारा ३२.७८ %
सोलापूर २९.३२%
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत ३३.९१% मतदान झाले आहे. या मतदारसंघात चिपळूण येथे सर्वाधिक ३७.९० % एवढे मतदान झाले असून रत्नागिरीत सर्वात कमी २८% एवढे मतदान झाले आहे.
कुडाळ ३२.८८%
कणकवली ३१.५९%
सावंतवाडी ३६.६५%
राजापूर ३७.०५%
चिपळूण ३७.९०%
रत्नागिरी  २८%
रायगड मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.३४% मतदान झाले आहे. या मतदारसंघात गुहागर येथे सर्वाधिक ३९.००% एवढे मतदान झाले असून पेण मध्ये  सर्वात कमी २२.२०%  एवढे मतदान झाले आहे.
अलिबाग ३२.९०%
दापोली ३६.४५%
गुहागर ३९.००%
महाड ३२.००%
पेण २२.२०%
श्रीवर्धन २६.९४ %
देशात १ वाजेपर्यंत एकूण ३९.९२% एवढे मतदान झाले असून गोवा आणि पश्चिम बंगाल येथे सर्वाधिक सुमारे ४९% मतदान झाले आहे तर महाराष्ट्र राज्य टक्केवारीत सर्वात मागे आहे.
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

राज्यात ११ वाजेपर्यंत १८.१८% टक्के मतदान; कोल्हापूर मतदारसंघात सर्वात जास्त मतदानाची नोंद, जाणून घ्या संपूर्ण माहिती

   Follow us on        
Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी  महाराष्ट्रात ११ वाजेपर्यंत  १८.१८% टक्के मतदान झाले असून सर्वात जास्त मतदान कोल्हापूर मतदारसंघात (२३.७७%)  झाले आहे तर सर्वात कमी मतदान बारामती मतदारसंघात ( १४.६४%)झाले आहे.
लातूर – २०.७४%
सांगली १६.६१%
बारामती १४.६४%
हातकणंगले २०.७४%
कोल्हापूर २३.७७%
माढा १५.११%
उस्मानाबाद १७.०६%
रायगड १७.१८%
रत्नागिरी  – सिंधुदुर्ग २१.१९%
सातारा १८.९४ %
सोलापूर १५.६९%
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात 11 वाजेपर्यंत  २१.१९%  मतदान झाले आहे. या मतदारसंघात चिपळूण येथे सर्वाधिक २४.१८% एवढे मतदान झाले असून रत्नागिरीत सर्वात कमी १५% एवढे मतदान झाले आहे.
कुडाळ २१.४०%
कणकवली २२.०९%
सावंतवाडी २१.७४%
राजापूर २३.६३%
चिपळूण २४.१८%
रत्नागिरी  १५.०० %
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

IMD Alert | मतदानाच्या दिवशी हे मतदारसंघ ‘तापणार’, कोणती काळजी घ्याल?

   Follow us on        

मुंबई :उद्या दिनांक ७ मे रोजी लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील भागातील निवडणूक होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतीय हवामान खात्याने IMD महाराष्ट्रात ज्या भागात मतदान होणार आहे त्या भागातील हवामान अंदाज जाहीर केले आहेत.

IMD ने वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापुर, वाडा, सांगली, सातारा आणि हातकंगाले या जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० डिग्री सेल्सिअस ही पातळी ओलांडणार आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या कोकण भागात तापमान ३४ ते ३६ डिग्री सेल्सिअस च्या घरात राहणार आहे. कोल्हापूर जिल्हय़ात अधिकतम तापमान ३९ डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.

कोणती काळजी घ्याल? 

शक्यतो सकाळी मतदानासाठी बाहेर पडावे. मतदान केंद्रावर गर्दी असल्यास उन्हातही मोठी रांग लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानासाठी बाहेर पडताना हातात छत्री घेऊनच बाहेर पडावे. सोबत पाण्याची मोठी बाटली घेऊन निघा. वेळोवेळी पाणी पीत रहा. तहान लागली नाही तरीही पाणी पित रहा. शक्य असेल तर ORS, लिंबू सरबत अशी घरगुती पेय सोबत घेतल्यास फायद्याचं ठरेल. हलक्या रंगाचे, सुती कपडे परिधान करावेत. बाहेर पडल्यानंतर शक्यतो डोकं टोपी, रुमाल यांनी झाकावं. तुम्हाला चक्कर येत असेल, आजारी वाटत असेल तर हयगय न करता मतदानकेंद्रातील कर्मचाऱ्याकडून मदत मिळवा.

 

Loading

आंबा कशाने खराब होतो?

   Follow us on        

Causes mango to rot : हापूस आंब्याची आवक वाढल्याने आता दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. सहाजिकच मोठ्या प्रमाणात त्याची खरेदी होताना दिसत आहे. मात्र त्याच बरोबर आंबा खराब निघण्याच्या तक्रारी सुद्धा वाढल्या आहेत.

ग्राहक बोलताना एक तक्रार सांगतात ती अशी – मागच्या वर्षी आम्ही अमुक कडून 5 डझन ची हिरव्या आंब्यांची पेटी घेतली होती,आम्ही 6-7 दिवसांनी जेव्हा आंबा पिकल्याचा वास यायला लागला तेव्हा पेटी उघडून बघितली तर बरेचसे आंबे देठा कडून नसलेलं होते, काळे पडले होते इत्यादी इत्यादी, हे सांगताना कुठेतरी त्यांच्या मनात असते कि त्या आंबा विक्रेत्यांनी फसवले आहे.परंतु या मध्ये कस्टमर चें अज्ञान आणि आंबे विक्रेत्यांनी न दिलेल्या सूचनामुळे आंबा वाया जातो. आंबा खराब निघाला की विक्रेत्याने फसवणूक केली आहे असा सूर निघतो. पण कित्येकदा विक्रेत्याची चूक नसते, तो चांगलाच आंबा देतो मात्र आपल्या चुकीमुळे आपणच तो खराब करतो. थोडीशी काळजी घेतली तर आंबा खराब होणार नाही.

आंबा खरेदी करून घरी आणल्यानंतर आंब्याचा बॉक्स लगेच उघडून हवेशीर आणि सावलीच्या जागेत ठेवा. शक्य झाल्यास घरात आंब्याची अढी लावा जेणेकरून आंबा तुमच्या डोळ्यादेखत राहिल आणि आंबा जास्त पिकून सडणार नाही किंवा देठा पाशी काळा पडणार नाही.

बर्‍याच लोकांचा असा गैरसमज आहे कि आंबा पिकण्यासाठी उष्णता लागते, म्हणून पेटी 5-6 दिवस उघडली जातं नाही आणि मग आंब्याचा कोळसा होऊन जातो. आंबा पिकण्यासाठी 30-35डिग्री तापमान पुरेसे असते..तसेच खेळती हवा याची आवश्यकता असते. पेटीतून खूप दिवस ना काढल्याने पेटीचता आतील तापमान वाढून आंबा हिरव्याचा पिवळा ना होता किंवा किंचित पिवळा होऊन तो काळा पडायला लागतो म्हणजेच नासतो, आणि आपल्या मराठी म्हणी प्रमाणे एक सडका नासका आंबा आजूबाजूच्या आंब्यांना नसवतो. त्यामुळे जेव्हा आंबा आणाल तेव्हा पेटी किंवा बॉक्स उघडून आंब्याची अढी टेबल किंवा बेड किंवा कुठेही अश्या ठिकाणी लावा ( खाली न्यूज पेपर पसरून )म्हणजे तुमचा आंबा नसणार नाही आणि नुकसान टळेल.

Loading

”नुसताच बाकड्यावर बसणारा…” राज ठाकरे यांचे कणकवलीतील जाहीर सभेतील संपूर्ण भाषण

   Follow us on        

सिंधुदुर्ग : काल कणकवली येथे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यापासून राज ठाकरे यांची निवडणूक प्रचारासाठी पाहिलीच जाहीर सभा होती. या सभेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यापासून या मतदारसंघातील विविध प्रश्न त्यावरील उपाय, नारायण राणे यांचे येथे निवडून येण्याचे फायदे याबाबत आपल्या भाषणात अनेक मुद्दे मांडलेत.

काय म्हणालेत राज ठाकरे? 

शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर जाहीर सभा घेण्याचा मनोदय नव्हता पण नारायणराव राणेंशी असलेला स्नेह आणि आग्रहामुळे त्यांना नाही म्हणून शकलो नाही. कारण ते माझे जुनेसहकारी आणि मित्र आहेत. 

जितकं आपलं तळकोकण देखणं आहे तितकीच इथली जनताही सुजाण आहे कारण महाराष्ट्र राज्याला ९ भारतरत्न आहेत त्यापैकी ७ भारतरत्न एकट्या कोकणातून येतात. 

माझी राजकीय वाटचाल आडेवेढे घेणारी नसते… सरळ आणि सुस्पष्ट असते. एखादी भूमिका पटली तर मी समर्थन करतो आणि नाही पटली तर टोकाचा विरोध करतो. 

२०१४ ते २०१९ मोदी सरकारकडून जी धोरणं आखली गेली त्यातल्या ज्या नाही पटल्या त्यांना २०१९ निवडणुकांमध्ये दाखवून जाहीर विरोध केला. नोटबंदी, पुतळ्यावर खर्च करणं अशा अनेक बाबी आजही नाही पटत. 

पण जेव्हा काश्मीरमधलं ३७० कलम रद्द झालं, तेव्हा पहिलं अभिनंदन करणारा मीच होतो. 

देश स्वतंत्र झाल्यापासून ३७० कलम रद्द करा ही मागणी होती. का? तर आपल्या देशाच्या भागात काश्मीरमध्ये एक इंचही जमीन खरेदी करू शकत नाही. असं ३७० कलाम आज मोदी सरकारने रद्द केलं हे मान्यच करावं लागेल. 

राम मंदिर उभं राहिलं आणि कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळाली. आताच सुप्रीम कोर्ट आणि प्रामुख्याने सत्तेत श्री. नरेंद्र मोदी नसते तर हे राममंदिर उभं राहिलंच नसतं. 

मित्राची खरडपट्टी काढताना आपण मागेपुढे पाहू नये आणि शत्रूची स्तुती करतानाही आपण मागे पुढे पाहू नये. 

२०१९ च्या निवडणुकांमध्ये माझी मांडणी लक्षपूर्वक ऐका आजच्या विरोधी पक्षांची बोलायचीही हिंमत होणार नाही इतके तीक्ष्ण प्रश्न मी उपस्थित केले होते कारण ते माझा हेतू शप्ष्ट होता तो विरोध फक्त धोरणांसाठीचा होता. मला काहीतरी हवं म्हणून नव्हते. 

श्री. उद्धव ठाकरे म्हणतात अडीच-अडीच वर्षाचा शब्द पाळला नाही म्हणून मी युतीतून बाहेर पडलो. ह्याचा अर्थ समजा भाजपाने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिले असते तर हे मोदींविरोधात बोलले असते का? ह्याचा अर्थ सत्तेचा बोळा तोंडात कोंबला असता तर आज विरोधात नसते.  

कोकणातले उद्योगधंदे गुजरातला जात आहेत असं श्री. उद्धव ठाकरे म्हणाले. मला एकंच प्रश्न विचारायचा आहे, वर्ष २०१४ ते २०१९ तुम्ही भाजप बरोबर सत्तेत होतात नंतर २०१९ ते २०२२ स्वतः मुख्यमंत्री होतात म्हणजे गेल्या दहा वर्षात तुम्ही साडेसात वर्ष सत्तेत होतात मग उद्योग गुजरातला गेलेच कसे? तुम्ही विरोध का केला नाहीत?

उद्योगधंदा आला कि उद्धव ठाकरेंचा खासदार विरोध करणार आणि आमदार पाठिंबा देणार. हे कोणतं पक्षाचं धोरण ?

अणुऊर्जा प्रकल्प आला तर नाश होईल असा प्रचार जैतापूरच्या प्रकल्पाला विरोध झाला. पण देशात तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, तारापूर (महाराष्ट्र) इतके अणुऊर्जा प्रकल्प भारतात आहेत आणि सगळ्यात महत्वाचा भाभा अणू संशोधन केंद्र मुंबईच्या मध्यात आहे मग उद्या तिथे काही विस्फोट झाला तर… असे प्रकल्प निर्धोक सुरु असताना का आणि कसली भीती घातली जाते आहे. 

नाणारला विरोध केला. तिथे हजारो एकर जमिनी कशा विकत घेतल्या गेल्या ? मग बारसू तिथेही ५००० एकर जमीन आधीच विकत घेतली होती. प्रकल्प कुठे येणार हे दलाल – अधिकारी – राजकारणी ह्यांना आधीच माहित असतं मग त्या जमिनी कवडीमोल दराने विकत घ्यायच्या आणि चढ्या भावाने सरकारला विकायच्या. हे कोणतं षडयंत्र ? कोण रचतंय ? ह्यावर खासदाराने लक्ष ठेवायला हवं होतं ना? 

कोकण रेल्वे किती वेगात पूर्ण झाली कारण तेव्हा जमिनीचे दलाल फिरत नव्हते. 

कोकणात चांगले उद्योग यावेत, प्रदूषणमुक्त उद्योग यावेत. 

गोवा राज्य फक्त पर्यटनावर सुरु आहे मग आपला रत्नागिरी-सिंधुदुर्ग का नाही ?

परदेशी पर्यटक आले कि आपल्या काही लोकांचं पालुपद असतं कि ‘संस्कृतीवर घाला येतो. संस्कृती बिघडेल’ वगैरे. दोन वेळेचं अन्न देऊ शकत नाही अशी कोणती संस्कृती. आपल्याच मुलांच्या हाताला रोजगार मिळेल. आपल्या लोकांच्या हाती पैसे येईल. 

परदेशी पर्यटक आल्याने गोव्याची, केरळची संस्कृती बिघडली का? तिथली संस्कृती रसातळाला गेली का? नाही. पर्यटक येतील, आपल्या प्रदेशाचा आनंद घेतील, चांगले पैसे इथे खर्च करतील आणि जातील. 

मी मलेशियाला गेलो होतो. मलेशिया हा मुस्लिम देश आहे. मुस्लिमांमध्ये दारू पिणं आणि जुगार खेळणं वर्ज्य मानलं जातं. तिथे जेंटिंग हाईलँड्स म्हणून एक ठिकाण आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर दारू आणि कसिनोचा आनंद घ्यायला लोकं येतात. आम्हीही तिथे गेलो पण मला जुगार खेळात येत नाही फक्त ५ वर्षातून एकदा जुगार खेळतो. 

मलेशियाच्या एका रेस्टोबारमध्ये एक पाटी दिसली ‘मुस्लिमांना प्रवेश नाही’. मी विचारपूस केली, तेव्हा कळलं. त्यांची धार्मिक मान्यता काहीही असली तरी पर्यटन आणि त्यातून आर्थिक सुबत्ता येणार असेल तर त्यांनी धर्म बाजूला ठेवला. मग आपण कोणती संस्कृती घेऊन बसलोय.

 गोवा, केरळ अशी बाकीची राज्य पुढे जात आहेत आपण तारकर्ली घेऊन बसलोय. 

आपलं कोकण जैविविधतेने इतकं समृद्ध आणि सुंदर आहे की, जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेझॉन नंतर ह्या सह्याद्री पश्चिम घाटाची दखल घेतली जाते. आपल्याला त्याची जाणीवच नाही. 

माझी नारायणराव राणे ह्यांना विनंती आहे. जगातील सुसज्ज हॉटेलची साखळी उभी करा. परदेशी पर्यटकांशी बोलायला इंग्लिश स्पिकिंग क्लासेस आणा.

नारायणराव राणेंना मुख्यमंत्रीपदाचे फक्त ६ महिने मिळाले ते जर पुढची ५ वर्ष मिळाली असती ना तर कुणाला इथे प्रचाराला यायची गरजच लागली नसती. ते ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले तेव्हा मलाही प्रश्न पडला होता कि मुख्यमंत्री पदाचा आवाका पाहता नारायणरावांना हे जमेल का? पण त्यांनी ज्याप्रकारे मुख्यमंत्रीपद हाकलं, हाताळलं ते भल्याभल्यांना नाही जमलं आहे. 

झपाटल्यासारखं काम करणं आणि कामाचा सपाटा लावणं हे काय असतं हे नारायणरावांकडे बघून तुम्हाला कळेल. मी

सन्मा. बाळासाहेब असे कधी गप्पांना बसायचो तेव्हा बाळासाहेब सांगायचे अंतुलेनंतर कुणी कामाचा वाघ बघितला असेन तर आपले नारायणराव राणे.

एखादा विषय समजून घेणं आणि समजल्या नंतर तो मांडणं… ह्याचं एक उत्तम उदाहरण देतो. नारायणराव राणे विरोधी पक्षनेते होते तेव्हा माझे आजचे सहकारी अनिल शिदोरे एकेदिवशी सामाजिक कार्यकर्ते श्री. अभय बंगांना घेऊन त्यांना भेटले. श्री. बंगांनी बालमृत्यू, कुपोषण ह्या समस्येबद्दल नारायणरावांना माहिती दिली. दुसरी दिवशी सभागृहात नारायणरावांनी तो विषय ज्या विस्तृतपणे, अभ्यासपूर्ण तासभर मांडला त्यावर बालमृत्यू, कुपोषण प्रश्नावर काम करणारे अभय बंगही बेहद्द खुश होते. असा माणूस तुमच्यासमोर खासदारकीचा उमेदवार म्हणून उभा आहे. 

रत्नागिरी-सिंधुदुर्गवासियांना माझी विनंती आहे कि, तुम्हाला नुसताच बाकड्यावर बसणार खासदार पाहिजे कि केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवून तळकोकणाचा विकास करणारा खासदार पाहिजे. 

कोकणाबद्दलची जी काही मतं आहेत, माझ्या ज्या कल्पना आहेत ते मी नारायणराव राणेंकडे घेऊन गेल्यावर ते चालढकल करणार नाहीत. त्या विषयांना न्याय देतील हा मला विश्वास आहे. मा

झा कोकणी माणूस आज उद्योग नाही, सुबत्ता नाही म्हणून कोकण सोडतो. त्या कोकणी माणसाला आपल्या कुटुंबापासून विभक्त व्हायची पुन्हा वेळ येणार नाही ह्यासाठी आम्ही काम करू. 

येत्या ७ मे ला, श्री. नारायणराव राणे ह्यांना प्रचंड मतांनी विजयी कराल, हि अपेक्षा.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर सोमवारपासून धावणार दोन ‘निवडणूक स्पेशल ट्रेन’

   Follow us on        

Konkan Railway News :कोकणात दिनांक 07 मे रोजी लोकसभेच्या जागेसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर दोन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे आहे. या गाड्यांच्या दोन्ही बाजूने मिळून एकूण चार फेर्‍या होणार आहेत. या गाड्यांमुळे कोकणात मतदानासाठी जाणार्‍या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.

या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे

1) गाडी क्रमांक 01158/01157 मडगाव जं. – पनवेल – मडगाव जं. विशेष:

गाडी क्र. 01158 मडगाव जं. – पनवेल विशेष ही गाडी दिनांक 06/05/2024, सोमवारी सकाळी 06:00 वाजता मडगाव जंक्शन येथून सुटून त्याच दिवशी संध्याकाळी 18:50 वाजता पनवेलला पोहोचेल.

गाडी क्र. 01157 पनवेल – मडगाव जं. -पनवेल विशेष दिनांक 08/05/2024, बुधवार रोजी सकाळी 04:00 वाजता पनवेल येथून सुटेल ती मडगाव जंक्शनला त्याच दिवशी संध्याकाळी 17:00 वाजता पोहोचेल.

ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा स्थानकांवर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण 20 LHB कोच = स्लीपर – 10 कोच, सामान्य – 08, SLR – 02.

2) गाडी क्रमांक 01159/ 01160 पनवेल – सावंतवाडी रोड – पनवेल विशेष :

गाडी क्र. 01159 पनवेल – सावंतवाडी रोड स्पेशल पनवेल येथून सोमवार दिनांक 06/05/2024 रोजी रात्री 20:00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 06:00 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.

गाडी क्र. 01160 सावंतवाडी रोड – पनवेल विशेष गाडी सावंतवाडी रोडवरून दिनांक 07/05/2024 मंगळवार रोजी संध्याकाळी 16:00 वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी सकाळी 03:00 वाजता पनवेलला पोहोचेल.

ही गाडी रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकावर थांबेल.

रचना : एकूण 20 LHB कोच = स्लीपर – 10 कोच, सामान्य – 08, SLR – 02.

वरील गाड्यांचे तपशीलवार थांबे आणि वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

 

Loading

Mumbai | अमरावती एक्सप्रेसला आग; प्रवाशी सुरक्षित

   Follow us on        

Amaravati Express Fire: मुबंईत दोन वेळा लोकल रुळावरून घसरल्याची घटना ताजी असताना दादर स्टेशनवर आज अजून एक दुघटना घडली आहे. अमरावती एक्स्प्रेसला किरकोळ आग लागल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी दादर स्टेशनला ही घटना घडली. सकाळी एक्स्प्रेस विदर्भातून दादरच्या स्टेशनला आहे. एक्स्प्रेसच्या ब्रेकमधून धूर निघू लागल्याने ही बाब समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावीत एक्स्प्रेसच्या बी ९ च्या कोचमधून धूर दिसल्यानंतर ही घटना समोर आली. आग किरकोळ असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही. परंतु आगीच्या घटनेमुळे स्टेशनवर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीची माहिती मिळताच, रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वेतून उतरून आग विझवली

 

Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

अबब..! सिंधुदुर्गातील या बागेत सापडत आहेत अर्धाकिलो पेक्षा जास्त वजन असलेले हापूस

   Follow us on        

सिंधुदुर्ग: साधारणपणे आंबा फळाचे वजन ३०० ग्रॅम ते ३५० ग्रॅम असते. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बापर्डे (ता. देवगड) येथे तब्बल अर्धा किलो पेक्षा जास्त वजन असलेले आंबे एका बागेत सापडत आहेत. येथील बागायतदार बाबूराव वामन राणे यांच्या बागेत ६०५ ग्रॅम वजनाचा हापूस आंबा आढळून आला आहे. या भागात आढळून आलेले हे या हापूसचे सर्वाधिक वजनाचे फळ आहे.

आंबा काढणी करीत असताना श्री. राणे यांना काही झाडांवरील फळे नियमित आंब्यांपेक्षा आकाराने मोठी दिसून आली. त्यामुळे त्यांनी या फळांचे वजन केले असता एका फळांचे वजन ६०५ ग्रॅम आढळून आले. ४५० ग्रॅम ते ६०० ग्रॅमपर्यंत सरासरी फळे दिसून येत आहेत.

साधारणपणे आंबा फळाचे वजन ३०० ग्रॅम ते ३५० ग्रॅम असते. या बागेचे व्यवस्थापन श्री. राणे हे नैसर्गिकरीत्या व सेंद्रिय पद्धतीने करतात. या फळांची माहिती मिळाल्यानंतर तालुका कृषी विभागाचे अमोल सदावर्ते, कृषी सहायक एस. व्ही. उलपे, मंडळ कृषी अधिकारी प्रदीप खाडे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. वजनाची देखील खात्री केली.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search