
आंतरराष्ट्रीय: क्रिकेटवर पूर्णपणे बंदी घालण्याची तयारी तालिबान सरकारने केली असल्याची चर्चा आहे. तालिबानी नेता हिबतुल्लाह अखुंदजादा यांनी देशात क्रिकेटवर बंदी घालण्याचे आदेश दिल्याचं वृत्त आहे. याबाबतची बातमी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये आली आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट संघाने अल्पावधीतच क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत बलाढ्य संघांना पराभूत करत अफगाणिस्तानने लक्ष वेधून घेतलं. तसेच उपांत्य फेरीत स्थान मिळवलं होतं. आता अफगाणिस्तान संघ कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. असं असताना तालिबान सरकारच्या डोळ्यात क्रिकेट खुपलेलं दिसत आहे.
क्रिकेटमुळे देशात वाईट वातावरण तयार होत आहे.तसेच हा खेळ शरिया कायद्याच्या विरोधात असल्याचं तालिबानी नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या खेळावर बंदी घालण्यात येत असल्याचं तालिबानचा नेता हिबतु्ला अखुंदजादा याने सांगितलं. देशात तालिबान सरकार आल्यानंतर सरकारने पहिल्यांदा महिला क्रिकेट आणि महिला सहभागी होत असलेल्या इतर खेळांवर बंदी घातली होती. आता पुरुष क्रिकेटवरी बंदी घालणार असल्याने क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे.
तालिबान सरकारने ही बंदी कधी आणि कशी लागू करणार याबाबत काही अधिकृत माहिती सांगितलेली नाही.
जर कोल्हापूर वंदे भारत ही ०७, ३२.७ आणि ३५ किलोमीटर दरम्यानच्या अंतरावर थांबू शकते तर मडगाव वंदे भारत सावंतवाडी स्थानकावर का थांबू शकत नाही? असा प्रश्न कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीच्या वतीने विचारला जात आहे.
Follow us onसिंधुदुर्ग: कोल्हापूर -पुणे आणि पुणे – हुबळी मार्गावर नवीन वंदे भारत येत्या १६ तारीख पासून सुरू होत आहे, वादाच्या भोवऱ्यात सापडलेली ही वंदे भारत ट्रेन कोल्हापूरकरांचा दबावानंतर कोल्हापूरकरांना पुण्यासाठी स्वतंत्र वंदे भारत मिळाली.
पुण्याहून कोल्हापूर साठी सुरू झालेली ही वंदे भारत मिरज, सांगली,किर्लोस्करवाडी, कराड, सातारा येथे थांबेल, तसेच हुबळी साठी सुरू झालेली वंदे भारत सातारा,सांगली,मिरज,बेळगाव,धारवाड येथे थांबेल
या दोन्ही वंदे भारत ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या गाड्या सांगली जिल्ह्यातील सांगली आणि मिरज या दोन्ही स्थानकांवर थांबणार आहेत आणि या स्थानकातील अंतर आहे अवघे ७ किलोमीटर, तसेच कोल्हापूर वंदे भारत ही कराड आणि किर्लोस्करवाडी येथे देखील थांबेल,कराड ते किर्लोस्करवाडी स्थानकादरम्यान अंतर हे ३५ किलोमीटर आणि किर्लोस्करवाडी ते सांगली हे अंतर ३२.७ किलोमीटर आहे.म्हणजेच एकूण ३२६ किलोमीटरच्या या पूर्ण प्रवासात या गाडीला मध्ये ५ थांबे देण्यात आले.
परंतु कोकण रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आलेली मडगाव – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ कणकवली येथे थांबते. या गाडीला सावंतवाडी थांबा मिळावा म्हणून स्थानिकांनी आणि प्रवासी संघटनांनी आपल्या परीने प्रयत्न केले आहेत. तसे बघता कणकवली ते सावंतवाडी रेल्वे स्थानक हे अंतर ४९ किलोमीटर आहे आणि सावंतवाडी ते थिवी (गोवा) हे अंतर ३२.५ किलोमीटर आहे. जर कोल्हापूर वंदे भारत ही ०७, ३२.७ आणि ३५ किलोमीटर दरम्यानच्या अंतरावर थांबू शकते तर मडगाव वंदे भारत सावंतवाडी स्थानकावर का थांबू शकत नाही असा सवाल सावंतवाडी येथील जनता करत आहे. या व्यतिरिक्त मुंबई ते मडगाव या ७६५ किलोमीटर ( कोल्हापूर – पुणे स्थानकाच्या अंतरापेक्षा दुप्पट )अंतरात केवळ ७ थांबे देण्यात आले आहेत.
त्यामुळे प्रत्येक वेळी सावंतवाडी साठी वेगळा न्याय का, सावत्र वागणूक का ? आणि सावंतवाडी हे ऐतिहासिक, पर्यटन शहर असूनही या ठिकाणी वंदे भारत का थांबत नाही असे मत कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी चे सचिव मिहिर मठकर आणि भूषण बांदिवडेकर यांनी व्यक्त केले.
मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे छत्रपती शिवाजी maharajaaMcaa १०० फूट उंचीचा पुतळा उभारण्यात यावा. त्याचबरोबर या परिसरात भव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची शिवसृष्टी उभारण्यात यावी, अशी विनंती शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे
मंत्री श्री.केसरकर यांनी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे प्रत्यक्ष भेट घेऊन यासंदर्भातील विनंतीपत्र तसेच ‘ऊर्जा हिंदुत्वाची’ या शीर्षकाखाली सविस्तर आराखड्यासह प्रस्ताव सादर केला. मालवण येथे भारतीय नौदलामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. नुकत्याच घडलेल्या दुर्देवी घटनेमध्ये हा पुतळा कोसळला. यामुळे याच ठिकाणी पुन्हा नव्याने १०० फूट उंचीचा पुतळा उभारण्यात यावा, त्याचबरोबर सध्या ३३ गुंठे जागेवर असलेल्या स्मारकाऐवजी लगतच्या परिसराचा विकास करुन तेथे भव्य दिव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘शिवसृष्टी’ उभारण्यात यावी, अशी विनंती श्री.केसरकर यांनी kolaI Aaho.
Konkan Railway Updates, दि.१२ सप्टें: यावर्षी कोकणात गावी गेलेल्या चाकरमान्यांसाठी रेल्वेकडून एक खुशखबर आहे. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर करण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे काही अनारक्षित गाड्यांची घोषणा आज करण्यात आली आहे. या गाड्यांमुळे जनरल डब्यांतील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.
१) गाडी क्र. ०१०६९ / ०१०७० मुंबई सीएसएमटी – खेड – मुंबई सीएसएमटी स्पेशल (अनारक्षित):
गाडी क्रमांक ०१०६९ मुंबई सीएसएमटी – खेड स्पेशल (अनारिक्षित) मुंबई सीएसएमटी येथून १२/०९/२०२४ रोजी रात्री २३:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:१५ वाजता खेडला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०७० खेड – मुंबई सीएसएमटी स्पेशल (अनारक्षित) खेड येथून १६/०९/२०२४ रोजी पहाटे ०६:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 13.30 वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.
ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी आणि कळंबणी बुद्रुक स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण 20 डबे = सामान्य – १४, (अनारक्षित) स्लीपर – ०४, एसएलआर – ०२ .
२) गाडी क्र. ०१०७४ / ०१०७१ खेड – पनवेल – खेड अनारक्षित विशेष:
गाडी क्रमांक ०१०७४ खेड – पनवेल अनारक्षित विशेष खेड येथून १३/०९/२०२४, १४/०९/२०२४ आणि १५/०९/२०२४ रोजी पहाटे ०६:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी १० वाजता पनवेलला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०७१ पनवेल – खेड अनारक्षित विशेष पनवेलहून १३/०९/२०२४, १४/०९/२०२४ आणि १५/०९/२०२४ रोजी सकाळी १ वाजता सुटेल आणि खेडला त्याच दिवशी दुपारी १४.४५ वाजता पोहोचेल.
ही गाडी कळंबणी बुद्रुक, दिवाणखावटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, पेण या स्थानकांवर गाडी थांबेल.
डब्यांची रचना : एकूण 20 डबे = सामान्य – १४, (अनारक्षित) स्लीपर – ०४, एसएलआर – ०२ .
3) ट्रेन क्र. ०१०७२ / ०१०७३ खेड – पनवेल – खेड अनारक्षित विशेष :
गाडी क्रमांक ०१०७२ खेड – पनवेल अनारक्षित विशेष खेड येथून १३/०९/२०२४, १४/०९/२०२४ आणि १५/०९/२०२४ रोजी दुपारी १५:१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २०.३० वाजता पनवेलला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०७३ पनवेल – खेड अनारक्षित स्पेशल पनवेल येथून १३/०९/२०२४, १४/०९/२०२४ आणि १५/०९/२०२४ रोजी रात्री २१:१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०१:०० वाजता खेडला पोहोचेल.
ही गाडी कळंबणी बुद्रुक, दिवाणखावटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, पेण या स्थानकांवर गाडी थांबेल.
डब्यांची रचना : एकूण 20 डबे = सामान्य – १४, (अनारक्षित) स्लीपर – ०४, एसएलआर – ०२ .
चिपळूण:- श्री रामवरदायिनी मंदिर देवस्थान ट्रस्ट, यांच्या वतीने मजरे दादर, कळकवणे येथे दसपटी विभागातील शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केलेल्या श्री समर्थ अविनाश शिंदे कळकवणे (आय. ए. एस), कु. हरिज्ञा लक्ष्मण शिंदे ओवळी (नेव्ही अधिकारी), श्री अथर्व श्रीधर कदम टेरव (सी. ए.), कु. स्नेहा अरूण शिंदे कळकवणे (सी. ए.), श्री शुभम शशिकांत शिंदे कोळकेवाडी (कबड्डी क्षेत्रात विशेष प्राविण्य), डॉ. सलोनी सुभाष शिंदे तिवरे (एम.बी.बी.एस.), श्री कृपाल दिलीप शिंदे कोळकेवाडी (पी. एच.डी. डॉक्टरेट परीक्षेत विशेष प्राविण्य), कु. अनुजा अनिल चव्हाण मोरवणे (डॉक्टरेट इन फिजिओथेरपी), श्री निलेश कृष्णाजी शिंदे कळकवणे (वैद्यकीय क्षेत्रात विशेष पुरस्कार) प्राप्त केलेल्या या नवरत्नांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व दसपटीभूषण, दसपटीरत्न असे सन्मानचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले.
सदर किर्तींवंतांचा गौरव करताना न्यासाचे अध्यक्ष श्री प्रतापराव शिंदे यांनी सांगितले की या गुणवंतांनी घेतलेले कठोर परिश्रम, चिकाटी, सातत्य तसेच आईवडिलांचे व कुलस्वामिनी रामवरदायिनी- भवानीचे आशीर्वाद यामुळेच त्यांना हे घवघवीत यश प्राप्त झाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपण आपल्या समाजाचेही काही देणे लागतो याचा विसर पडू देवू नये असा मोलाचा सल्ला दिला.
गुणवंतांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमचे गुणगौरव सोहळे अनेक झाले पण आई रामवरदायिनीच्या प्रांगणात आमच्या समाज बांधवांनी केलेला सन्मान आमच्यासाठी विशेष आहे व त्यामुळे आम्ही सर्व भारावून गेलो आहोत.
या सन्मान सोहळ्यास न्यासाचे विश्वस्त, व्यवस्थापन समिती, सल्लागार समिती, दसपटी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, दसपटी विभागातील मान्यवर तसेच आदरणीय समाज बांधव उपस्थित होते.
मुंबई, दि.४ सप्टें राज्यातील गणेश भक्तांसाठी एक खुशखबर आहे. राज्य सरकारने यावर्षी गणेश भक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत राज्य सरकारच्या वतीने सर्व गणेश भक्तांना टोल माफ असणार आहे. मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-बँगलोर महामार्ग, इतर सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या टोल नाक्यावर गणेश भक्तांना टोल माफी दिली जाणार आहे.
आज राज्य सरकाराच्या वतीने यासंबधी अधिसूचना काढून टोल प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत. गणेश उत्सवासाठी गावी निघालेल्या गणेश भक्तांच्या सर्व गाड्या आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या बसेसना टोल नाक्यावर मोफत सोडले जाणार आहे. तसेच फ्री पाससाठी संबंधित वाहतूक विभागाकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव २०२४, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल.तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना ही टोल माफी लागू असणार आहे. गणेशोत्सवासाठी ज्या जिल्ह्यातून बसेस येथील त्या ठिकाणच्या पोलीस किंवा आरटीओ यांच्याकडून हे पास एसटी महामंडळाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पोलीस आणि परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.
कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीची मागणी.
Follow us onसिंधुदुर्ग: काल रेल्वे बोर्डाने ०११०३/०११०४ मुंबई – कुडाळ – मुंबई अनारक्षित गणपती विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला, वास्तविक बघता गणेशोत्सव हा पूर्ण कोकणचा मोठा उत्सव असल्याकारणाने संपूर्ण कोकणात मुंबईकर चाकरमानी हे लाखोच्या संख्येने येत असतात, असे असताना रेल्वे प्रशासनाने आधीच गुजरात वरून सुटणाऱ्या गाड्या ह्या कुडाळ पर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला, एकीकडे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी, सावंतवाडी येथील अपूर्ण असणारे रेल्वे चे टर्मिनस मार्गी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असताना रेल्वे प्रशासन मात्र गाड्या ह्या कुडाळ पर्यंत सोडून सावंतवाडी तालुका, शिरोडा – तुळस पंचक्रोशी, आणि दोडामार्ग तालुका वासियांना वाऱ्यावर सोडत असल्याचे चित्र आहे.
सदर ची गाडी ही मुंबईहून येताना पहाटे ३.३० वाजता कुडाळ ला पोचेल आणि लगेच ४.३० वाजता तिथून मुंबई करिता रवाना होणार आहे.
असे असताना फक्त २० मिनिटे अंतर असणाऱ्या सावंतवाडी स्थानकावर ही गाडी आणल्यास या गाडीचा फायदा सावंतवाडीवासियांना देखील मिळेल आणि लोकांची ऐन रात्रीच्या वेळी परवड देखील होणार नाही.
त्यामुळे ही अनारक्षित गाडी सावंतवाडी पर्यंत सोडावी ही मागणी जोर धरू लागली आहे.
🚂सिएसएमटी – कुडाळ अनारक्षित विशेष गाडी सावंतवाडी किंवा मडुरेपर्यंत विस्तारित करण्याची मागणी – Kokanai
✴️कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीची मागणी.
सविस्तर वृत्त- https://t.co/cIpohPauPB…@KonkanRailway@Central_Railway pic.twitter.com/01aTxiGzEF
— को – बातम्या मराठीत (@kokanai21) September 4, 2024
Content Protected! Please Share it instead.