नारळाच्या करवंट्या-झावळ्यांपासून साकारला इको-फ्रेंडली सेल्फी पॉइंट; पावशी सखी केंद्र ठरले आकर्षणाचे केंद्र!

   Follow us on        

सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पावशी गावात सखी मतदान केंद्र खूपच चर्चेत आहे! नारळाच्या करवंट्या, माडाच्या झावळ्या आणि बांबू यांचा वापर करून पूर्णपणे पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली) सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. हा सेल्फी पॉइंट मतदान केंद्राचे मुख्य आकर्षण ठरला असून, मतदारांना आकर्षित करत होता.

या मतदान केंद्राचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे पर्यावरणपूरक (eco-friendly) पद्धतीने तयार केलेला सेल्फी पॉइंट. नारळाच्या झाडांच्या करवंट्या (fronds), माडाच्या झावळ्या (palm leaves) आणि बांबू यांसारख्या स्थानिक, नैसर्गिक आणि पुनर्वापरयोगी साहित्याचा वापर करून हा सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. या सुंदर आणि सर्जनशील रचनेमुळे मतदानासाठी आलेल्या मतदार – विशेषतः तरुण आणि महिलांना – सेल्फी घेण्यासाठी आणि सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी खूपच आवडले आहे.सखी मतदान केंद्र म्हणजे काय?

‘सखी मतदान केंद्र’ ही संकल्पना राज्य निवडणूक आयोगाने राबवली आहे. या केंद्रांवर संपूर्ण कर्मचारी वर्ग महिला असतो. महिलांना मतदान प्रक्रियेत अधिक सहज आणि सुरक्षित वाटावे यासाठी खास सोय उपलब्ध करून दिली जाते. यामध्ये बालसंगोपन केंद्र (creche), स्वच्छता पॅड्स, पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था अशा सुविधा पुरवल्या जातात. परिणामी ग्रामीण भागातील महिलांचा मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होते.पावशी गावातील या केंद्राने केवळ मतदान प्रक्रियेलाच नव्हे तर पर्यावरण जागृतीलाही चालना दिली आहे. प्लास्टिक आणि इतर कचऱ्याऐवजी स्थानिक उपलब्ध साहित्याचा वापर करून पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

 

 

 

 

Facebook Comments Box

‘देवखेळ’ वेबसीरिजमध्ये ‘शंकासुर’चा अपमान; बंदी घालण्यासाठी अ‍ॅड. आशिष शेलार यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

   Follow us on        

मुंबई: झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली ‘देवखेळ’ ही वेबसीरिज सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, या सीरिजवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या वेबसीरिजमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘नमन-खेळे’ या प्राचीन लोककलेचे चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्यात आले असून, या कलेतील प्रमुख पात्र असलेल्या ‘शंकासूर’ या देवतेचा अवमान केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची आणि वेबसीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

​कोकणातील ‘नमन-खेळे’ ही केवळ एक लोककला नसून ती सामाजिक आणि धार्मिक महत्त्व असलेली एक प्राचीन हिंदू परंपरा आहे. या कलेचा थेट संबंध ग्रामदैवतांशी असल्याने तिला विशेष पावित्र्य लाभले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत या कलेच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात आणि दरवर्षी शासकीय महोत्सवांचेही आयोजन केले जाते. मात्र, ‘देवखेळ’ वेबसीरिजमुळे या लोकपरंपरेला धक्का लागल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे. कोकणातील कलावंतांच्या विविध संघटनांनी या सीरिजला तीव्र विरोध दर्शवत शासनाकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

​सध्या कोकणात शिमगोत्सवाचे वातावरण असून ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान खेड येथे शासकीय नमन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सण-उत्सवाच्या या काळात अशा वादग्रस्त चित्रणामुळे सामाजिक वातावरण गढूळ होण्याची शक्यता अ‍ॅड. आशिष शेलार यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, लोकांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक भावना लक्षात घेऊन शासनाने यावर तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी आता सर्वस्तरातून होत आहे.

‘देवखेळ’ वेब सीरिजच्या टीझरमध्ये शंकासुर देवाला क्रूर, अमानवी आणि अंधश्रद्धेशी जोडलेला देव म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेषतः “शंकासूर शिक्षा करतो, बळी घेतो”, “होळीत दरवर्षी खून करण्याची प्रथा आहे”, अशा संवादांमुळे भाविक वर्गाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: निवडणुकीनंतर मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांची रेल्वेकडून ‘विशेष’ सोय

   Follow us on        

चिपळूण: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने कोकणात गावी आलेल्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनातर्फे चिपळूण-पनवेल आणि पनवेल-रत्नागिरी दरम्यान विशेष अनारक्षित गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी या गाड्या धावतील. या विशेष गाड्यांमुळे निवडणुकीनंतर मुंबई-पुण्याकडे परतणाऱ्या प्रवाशांची गर्दी विभागण्यास मोठी मदत होणार आहे.

१. गाडी क्र. ०११५८ चिपळूण – पनवेल विशेष (अनारक्षित)
दिवस: रविवार, ८ फेब्रुवारी २०२६

वेळ: चिपळूण येथून दुपारी ३:२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ८:१५ वाजता पनवेलला पोहोचेल.

गाडीचे थांबे: अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामने, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, पेण आणि आपटा.

२. गाडी क्र. ०११५७ पनवेल – रत्नागिरी विशेष (अनारक्षित)
दिवस: रविवार, ८ फेब्रुवारी २०२६

वेळ: पनवेल येथून रात्री ८:२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४:०० वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

गाडीचे थांबे: आपटा, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

महत्त्वाची टीप: प्रवाशांनी गाडीच्या अधिकृत वेळेसाठी रेल्वेच्या www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES / RailOne ॲपचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

Mumbai Local: रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी रेल्वेची नामी शक्कल!

   Follow us on        

मुंबई: उपनगरीय रेल्वे मार्गावर होणारे धोकादायक ट्रॅक ओलांडणे आणि कुंपण उडी मारण्याच्या घटना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेने एक नामी शक्कल लढवली आहे. चर्चगेट–विरार या सुमारे ६० किमी लांबीच्या मार्गावरील ट्रॅकलगतच्या कुंपणांवर औद्योगिक ग्रीस लावण्यास सुरुवात केली आहे. या उपाययोजनेचा उद्देश अपघात, मृत्यू आणि रेल्वे सेवेत होणारे अडथळे कमी करणे हा आहे.

चर्चगेट ते विरार दरम्यानच्या एकूण २९ स्थानकांवर ही कारवाई राबवली जात असून, गर्दीच्या वेळेत बेकायदेशीर ट्रॅक ओलांडणे ही मोठी सुरक्षा समस्या ठरत होती. कुंपणांवर ग्रीस लावल्यामुळे त्यावर चढणे किंवा पकड मिळवणे कठीण होते, त्यामुळे कोणताही अडथळा न आणता हा एक प्रभावी प्रतिबंधक उपाय ठरेल, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

२०२५ मध्ये मुंबईच्या उपनगरीय रेल्वे जाळ्यावर ट्रॅक ओलांडण्याच्या १,२९८ घटना नोंदल्या गेल्या असून, त्यात १,०६३ प्रवाशांचा मृत्यू तर २३५ जण जखमी झाले होते. “ग्रीस कोटिंगमुळे कुंपणांवर चढणे अवघड होते. ही व्यापक सुरक्षा मोहिमेचा भाग असून, यासोबतच वाढीव देखरेख, इशारा फलक आणि जनजागृती घोषणा केल्या जातील,” असे पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

प्रवासी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. “कपडे मळतील आणि हात घाण होतील, याच भीतीने अनेकजण कुंपण उडी मारणे टाळतील. गर्दी व्यवस्थापन आणि स्थानकांवरील प्रवेश व्यवस्था सुधारली, तर मृत्यूचे प्रमाण नक्कीच घटेल,” असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ग्रीस सुकते का?

रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, वापरण्यात येणारे औद्योगिक ग्रीस लवकर सुकत नाही. गरज भासल्यास देखभाल पथके नियमितपणे पुन्हा ग्रीस लावतील.

Facebook Comments Box

Konkan Railway: प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी–सावंतवाडी TOD विशेष एक्सप्रेस धावणार

   Follow us on        

मुंबईतील प्रवासी गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून सीएसएमटी–सावंतवाडी रोड–सीएसएमटी दरम्यान TOD (ट्रेन ऑन डिमांड) विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन ही विशेष रेल्वे नियोजित करण्यात आली असून प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन DRM मुंबई मध्य यांनी केले आहे.

०११२९ सीएसएमटी–सावंतवाडी रोड TOD विशेष रेल्वे ही गाडी १४, १९ आणि २१ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२.२० वाजता सीएसएमटी येथून सुटणार आहे. ही गाडी दुपारी १२.३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचणार आहे.

तसेच, ०११३० सावंतवाडी रोड–सीएसएमटी TOD विशेष रेल्वे ही गाडी १५,२० आणि २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.२० वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचणार आहे.

या विशेष रेल्वेच्या डब्यांची रचना एकूण २२ आयसीएफ डब्यांची असून त्यामध्ये जनरल, स्लीपर आणि एसी डब्यांचा समावेश आहे. कोकण आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असून गर्दीच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे.

स्थानके :

सीएसएमटी, दादर, ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड़, चिपळूण, सावरडा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड.

डब्यांची रचना :

जनरल (GS) – ४, जनरल-कम-गार्ड (GSLRD) – २, एसी थ्री टियर (WGACCN) – ५, एसी टू टियर (WGACCW) – १, स्लीपर (WGSCN) – १०, एकूण डबे – २२ (आयसीएफ).

मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, जास्तीत जास्त प्रवाशांनी या TOD विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा.

Facebook Comments Box

Ladki Bahin Yojna: e-KYC मध्ये चूक झाली असेल तर दुरुस्तीची अखेरची संधी

   Follow us on        

मुंबई: राज्यातील महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत e-KYC प्रक्रियेत झालेल्या त्रुटींमुळे काही पात्र लाभार्थ्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही. e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडला गेल्याच्या तक्रारी महिला व बालविकास विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, अशा सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून e-KYC माहिती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे.

महिला व बालविकास विभागामार्फत ऑनलाइन पोर्टलवर दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत e-KYC दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांनी e-KYC पूर्ण करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांनी आपल्या नोंदी तपासून आवश्यक ती दुरुस्ती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व पात्र बहिणींना योजनेचा लाभ मिळावा, हीच शासनाची प्रामाणिक भूमिका असून कोणतीही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC प्रक्रियेत चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

Metro Line 14: कांजूरमार्ग–बदलापूर मेट्रो लाइन बाबत मोठी अपडेट समोर

   Follow us on        

मुंबई: मुंबई मेट्रो लाईन १४ (कांजूरमार्ग–बदलापूर) प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, OPEC Fund for International Development (OFID) या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने गुरुवारी MMRDA चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, IAS यांची भेट घेतली. या बैठकीत OFID ने मेट्रो लाईन १४ (कांजूरमार्ग–बदलापूर) तसेच इतर मेट्रो प्रकल्पांच्या अर्थसहाय्यासाठी ठाम रस व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, OFID सध्या MMRDA च्या मेट्रो लाईन ५ (ठाणे–भिवंडी–कल्याण) या प्रकल्पात प्रणाली घटकांसाठी वित्तपुरवठा करणारा भागीदार आहे.

शिष्टमंडळात अल शायमा अल शैबी (उपाध्यक्षा – सार्वजनिक क्षेत्र संचालन), सोमनाथ बसु (संचालक – सेक्टर्स अँड थीम्स) आणि तोशिफुमी काझाओका (वरिष्ठ देश व्यवस्थापक) यांचा समावेश होता. यावेळी OFID ने ‘मुंबई 3.0’ तसेच महत्त्वाच्या पाणीपुरवठा प्रकल्पांमध्येही वित्तपुरवठ्याबाबत उत्सुकता दर्शवली असून, यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Facebook Comments Box

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम ‘मित्रा’कडे सोपवा; कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे मुख्यमंत्री सचिवालयात निवेदन

   Follow us on        

मुंबई: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले काम आणि या प्रकल्पाबाबत कोकण रेल्वे महामंडळाची असलेली उदासीन भूमिका, या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (मुंबई विभाग) यांच्या वतीने आज, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मुख्यमंत्री सचिवालयात एक विशेष निवेदन सादर करण्यात आले. या पत्राद्वारे संघटनेने सावंतवाडी टर्मिनसचा प्रकल्प राज्य सरकारच्या ‘मित्रा’ (MITRA) संस्थेकडे हस्तांतरित करण्याची आणि उर्वरित कामांसाठी तातडीने अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची आग्रही मागणी केली आहे. दहा वर्षांपूर्वी या कामाचे भूमिपूजन होऊनही प्रकल्प अद्याप अपूर्ण असल्याने कोकणवासियांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

​या निवेदनात कोकण रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढण्यात आले आहेत. कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी (CMD) ‘सावंतवाडी हे केवळ वे-साइड स्टेशन आहे, टर्मिनस नाही’ असे खळबळजनक विधान केल्याचा दावा संघटनेने केला असून, हे विधान कोकणच्या विकासाला खीळ घालणारे असल्याचे त्यांनी नमूद केले. या बेजबाबदार विधानामुळे रेल्वे प्रशासन आपली जबाबदारी झटकत असल्याचे स्पष्ट होत असून, यामुळे स्थानिक जनतेत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

​टर्मिनसचे काम रखडल्यामुळे मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांचे आणि पर्यटकांचे प्रचंड हाल होत असल्याकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. सण-उत्सव आणि सुट्ट्यांच्या काळात गावी जाण्यासाठी रेल्वे तिकीटांचा तुटवडा निर्माण होतो आणि काळाबाजार वाढतो. जोपर्यंत सावंतवाडी येथे हक्काचे टर्मिनस पूर्ण होत नाही, तोपर्यंत नवीन गाड्या सुरू करणे शक्य होणार नाही, ही वस्तुस्थिती प्रशासनासमोर मांडण्यात आली आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून हा प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी प्रवासी संघटनेचे मुंबई विभागाचे संपर्कप्रमुख श्री. विनोद नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

Facebook Comments Box

Holi Special Trains: होळी सणासाठी रेल्वेकडून १,४१० विशेष गाड्यांचे नियोजन

   Follow us on        

नवी दिल्ली: होळी सणाच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने यंदा विक्रमी संख्येने होळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी, सुरक्षित आणि सुरळीत व्हावा यासाठी देशभरात १,४१० हून अधिक होळी विशेष गाड्या चालवण्यात येणार असून ही संख्या वाढवून तब्बल १,५०० पर्यंत नेण्यात येणार आहे. या सर्व विशेष गाड्या मार्च महिन्यात धावणार आहेत.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, सणासुदीच्या काळात प्रमुख मार्गांवरील प्रवासी गर्दीचा ताण कमी करण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी होळी २०२५ दरम्यान एकूण १,१४४ विशेष गाड्यांचे संचालन करण्यात आले होते. यंदा त्या तुलनेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

विभागनिहाय गाड्यांचे नियोजन

मध्य रेल्वे (CR) कडून २०९ होळी विशेष गाड्या चालवण्यात येणार असून पश्चिम रेल्वे (WR) २३१ विशेष गाड्या चालवणार आहे. सर्वाधिक २८५ विशेष गाड्या पूर्व मध्य रेल्वे (ECR) कडून धावणार आहेत. त्यापाठोपाठ दक्षिण मध्य रेल्वे (SCR) १६०, उत्तर रेल्वे (NR) १०८ तर उत्तर पश्चिम रेल्वे (NWR) ७१ विशेष गाड्या चालवणार आहे.

याशिवाय उत्तर मध्य रेल्वे (NCR) ६६, उत्तर पूर्व रेल्वे (NER) आणि पूर्व किनारा रेल्वे (ECOR) प्रत्येकी ६२ गाड्या चालवणार आहेत. दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR) ४७, पश्चिम मध्य रेल्वे (WCR) ४३, दक्षिण रेल्वे (SR) ३९ आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) १५ विशेष गाड्या चालवणार आहे. कोकण रेल्वेकडून ९ तर ईशान्य सीमांत रेल्वे (NFR) कडून २ विशेष गाड्यांचे संचालन होणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी, सुरक्षितता आणि कार्यक्षम सेवा देण्याच्या दृष्टीने भारतीय रेल्वे कटिबद्ध असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

Facebook Comments Box

महत्वाची बातमी! कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एक्सप्रेसच्या टर्मिनलमध्ये बदल

   Follow us on        

मुंबई: कुर्ला स्थानकापुढील लोकल मार्गावरील आणि दादर स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने दादर–तिरुनेलवेली–दादर साप्ताहिक एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 22629/22630) च्या टर्मिनलमध्ये महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ही गाडी आता दादर स्थानकाऐवजी लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथून सुटणार व तेथेच तिचा प्रवास संपणार आहे.

गाडी क्रमांक 22629 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गुरुवारी रात्री 20:45 वाजता सुटेल, तर ठाणे स्थानकावर 21:02 ते 21:05 दरम्यान थांबेल आणि शनिवारी पहाटे 03:55 वाजता तिरुनेलवेली येथे पोहोचेल.

त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक 22630 तिरुनेलवेली येथून बुधवारी सकाळी 07:30 वाजता सुटून ठाणे स्थानकावर 14:27 ते 14:30 दरम्यान थांबेल आणि दादरऐवजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुपारी 15:00 वाजता दाखल होईल.

हा बदल 16 एप्रिल 2026 पासून लोकमान्य टिळक टर्मिनस–तिरुनेलवेली प्रवासासाठी, तर 15 एप्रिल 2026 पासून तिरुनेलवेली–लोकमान्य टिळक टर्मिनस प्रवासासाठी लागू होणार असून,

या निर्णयामुळे दादर स्थानकावरील गर्दी कमी होऊन मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना अधिक सोयीचा प्रवास उपलब्ध होणार आहे. मात्र कोकणातील आणि दक्षिणेकडील राज्यातील प्रवाशांना दादर ऐवजी एलटीटी स्थानक गाठण्यासाठी त्रास सहन करावा लागणार आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search