मुंबई : ग्लोबल कोकणचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ग्लोबल कोकण आयोजित स्वराज्य भूमी कोकण यात्रे साठी त्यांना निमंत्रित केले.
ह्या भेटीत त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या कोकणातील महान नररत्नांच्या गावांना भेट देणारी ”ग्लोबल कोकण यात्रा 2023” ची माहिती दिली. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे उपस्थित होते. तसेच आमदार भरतशेठ गोगावले,आमदार प्रकाशजी सुर्वे यावेळी उपस्थित होते. या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी कोकण विकासासंदर्भात चर्चा केली.
माननीय मुख्यमंत्र्यांच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली भविष्यात कोकण विकासाला विशेषतः पर्यटन ,मत्स्य उद्योग, हापूस आंबा…. आणि पायाभूत सुविधा याला प्रचंड गती मिळेल असा विश्वास आपणास आहे असे संजयजी ह्या भेटीनंतर म्हणाले.
मुंबई : अखेर राज्यपालांनी आपल्या त्या वादग्रस्त विधानावर माफी मागितली.आज त्यांनी प्रत्यक्ष आणि ट्विटर च्या माध्यमातून माफी मागितली. ट्विटर वर मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत त्यांनी आपला माफीनामा आज प्रसिद्ध केला.
ते म्हणाले :
दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एक सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासातील काही समाजबांधवाच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली.
महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकसत सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. खासकरून संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वाना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगतीपथावर अग्रेसर होत आहे.
गेल्या जवळपास ३ वर्षात मला ह्या राज्यातील लोकांकडून अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढविण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे.
परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल हि कल्पना देखील मला करवत नाही.
महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता ह्या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो.
मुंबई :संजय राऊतांच्या अटकेमुळे पत्रा चाळ जमीन घोटाळा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. नेमकं काय आहे पत्रा चाळ प्रकरण आणि संजय राऊतांचं नावं ह्यामध्ये कसं आलं? सविस्तर जाणून घ्या ईथे..
.
पत्राचाळ प्रकरण
गोरेगावमधील पत्रा चाळ पुनर्विकासासाठी 12 वर्षापूर्वी येथील रहिवासी, गुरू आशिष कन्स्ट्रक्शन आणि म्हाडा यांच्या मध्ये एक करार केला झाला होता. करारानुसार चाळीने व्यापलेली एकूण जमिनीचे 3 समान भाग केले जाणार होते. एका भागामध्ये रहिवाशांना सर्वात प्रथम 672 फ्लॅट बांधुन देण्याचे आणि म्हाडाला त्याच्या जागेत अशी सर्व मिळून 3000 पेक्षा अधिक घरे बांधुन गुरू आशिष कन्स्ट्रक्शने देणे असे ठरले गेले. ह्या मोबदल्यात गुरू आशिष कन्स्ट्रक्शनला उरलेली 13 एकर जमीन मिळणार होती.
गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीनं कोणतंही बांधकाम न करता म्हाडा आणि पत्रा चाळीतील रहिवाशांची फसवणूक केल्याचं नंतर समोर आलं. गुरू आशिष कन्स्ट्रक्शननं ही जमीन 1,034 कोटी रुपयांना दुसऱ्या बिल्डरला विकली होती.
या प्रकरणात ईडीनं प्रवीण राऊत यांना अटक केलेली. प्रवीण राऊत हे पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या एचडीआयएलचे सारंग आणि राकेश वाधवान यांच्यासह फर्मचे एक संचालक होते.
मार्च 2018 मध्ये म्हाडानं गुरु आशिष बांधकामांविरोधात एफआयआर दाखल केला. फेब्रुवारी 2020 मध्ये प्रवीण राऊत यांना EOW (आर्थिक गुन्हे शाखा) ने अटक केली होती, तर सारंग वाधवान अटकेत होता. मार्च 2018 मध्ये म्हाडानं गुरु आशिष बांधकामांविरोधात एफआयआर दाखल केला होता
फेब्रुवारी 2020 मध्ये प्रवीण राऊतला EOW ने अटक केली होती तर सारंग वाधवानला EOW ने त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये EOW ने अटक केली होती. त्यानंतर राऊत यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती.
ईडीनं या प्रकरणी ईसीआयआर नोंदवला आणि 1 फेब्रुवारी रोजी प्रवीण राऊत आणि त्यांचे सहकारी सुजित पाटकर यांच्या निवासस्थानांसह सुमारे सात ठिकाणी झडती घेतली. राऊत यांना 2 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती, तर पाटकरांचा जबाब ईडीनं नोंदवला होता.
शिवसेना खासदार संजय राऊत आणि पत्राचाळ
प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मित्र असून, पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू असताना त्यांचं नावही समोर आले होतं. प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 55 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज दिल्याचं समोर आलं होतं. या कर्जाच्या रकमेतून राऊत कुटुंबानं दादरमध्ये फ्लॅट खरेदीसाठी केला होता. त्यानंतर ईडीने वर्षा आणि माधुरी राऊत यांचे जबाब नोंदवले होते.
ईडीतील सूत्रांच्या माहितीनुसार 2010 मध्ये प्रवीण राऊत यांना त्याच्या बँक खात्यात इक्विटी आणि जमीन व्यवहाराच्या नावाखाली 95 कोटी रुपये मिळाले होते, तरीही कंपनी प्रकल्प पूर्ण करू शकली नाही आणि कोणतेही उत्पन्न मिळाले नाही.
या प्रकरणात ईडीने ज्यांच्या निवासस्थानाची झडती घेतली ते सुजित पाटकर हे प्रवीण राऊत यांचे सहकारी आहेत, तर संजय राऊत यांच्याशी जवळचे संबंध आहेत. पाटकर हे संजय राऊत यांच्या मुलींसह वाईन ट्रेडिंग फर्ममध्ये गेल्या वर्षभरापासून भागीदार आहेत. पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने यापूर्वी अलिबाग येथे संयुक्तपणे जमीन खरेदी केली होती.
शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीकडून कारवाई सुरू आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील ‘मैत्री’ बंगल्यात ठाण मांडून आहेत. मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे.
संजय राऊत यांनी ईडीला सहकार्य करावे नाहीतर त्यांची पुढील मुलाखत जेलर सोबतच होईल असे भाजप नेते निलेश राणे ट्विटर वर बोलले आहेत. संजय राऊत ह्यांनी ईडी ला सहकार्य केले नसल्याने ईडीने त्यांचा घरी जाऊन त्यांची चौकशी चालू केली आहे असे ते म्हणाले.
काल राजस्थानी समजाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या एका विधानावर संपूर्ण राज्याने आपली नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्यातून गुजराती आणि मारवाडी गेलेत तर मुंबई मध्ये पैसा राहणार नाही असे ते म्हणाले होते.
राज्यपालांनी ह्या विधानाबद्दल माफी मागावी अशी मागणी होऊ लागली होती. आज दुपारी राज्यपालांनी ट्विटरवर ह्या संबंधी एक ट्विट टाकले आहे. ते म्हणाले की…
मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला.
काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो.
मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही.
पण नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सोमवार १ ऑगस्ट २०२२ रोजी निष्ठा यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. यावेळी त्यांचे शिवसैनिकांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवसैनिकांशी ते संवाद साधणार आहेत. तर १२ वाजता सावंतवाडी येथील गांधी चौक येथे आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार असून या सभेला ते संबोधित करणार आहेत. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ३० नुसार सरपंचाची निवड ही पंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे व त्यांच्यामधून केली जात होती. याबाबतच्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये आणखी सुधारणा करण्यात आली आहे. या अधिनियमद्वारे आता गावातील पात्र मतदारांकडून पंचायतीच्या सरपंच पदाची थेट निवडणूक करण्याची पद्धती अवलंबिण्यात येणार आहे, असा अध्यादेश ग्रामविकास विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे.
प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीकरिता किंवा पोट-निवडणुकीकरिता सरपंच पदासाठी नामनिर्देशन करणाऱ्या व्यक्तीचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक असून त्याचे वय २१ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी नसावे. ज्या व्यक्तीचे नाव मतदार यादीत नोंदविले नसेल, ती त्या गावाच्या कोणत्याही प्रभागासाठी सदस्य म्हणून किंवा पंचायतीच्या सरपंच पदासाठी पात्र नसेल.
या अधिनियमात थेट निवडून आलेल्या सरपंचाविरूद्धच्या अविश्वास प्रस्तावास ग्रामसभेद्वारे शिरगणना करण्याच्या पद्धतीने साध्या बहुमताने अनुसमर्थन देण्यात येईल, असेही प्रावधान करण्यात आले आहे. या अविश्वास प्रस्तावास अनुसमर्थन दिल्यानंतर सरपंचास देण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर करण्याचे अधिकार उप-सरपंचाकडे देण्यात येईल. जर सरपंच आणि उप-सरपंच या दोघांविरूद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला असेल तर असा अविश्वास प्रस्ताव निर्णीत होईपर्यंत गट विकास अधिकाऱ्याकडून प्राधिकृत करण्यात येईल आणि हा अधिकार विस्तार अधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याकडे देण्यात येईल, असेही या अध्यादेशात नमूद करण्यात आलेले आहे.
मुंबई: उद्धव ठाकरे यांची चिंता वाढवणारी आणखी एक गोष्ट समोर आली आहे. ठाकरे घराण्याचा वारसदार असणारे निहार ठाकरे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. निहार ठाकरे यांनी शुक्रवारी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. एवढेच नव्हे तर निहार ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आता राजकारणातही प्रवेश करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ठाकरे घराण्यातील आणखी एका व्यक्तीची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे कितपत बदलणार, हे पाहावे लागेल.
बाळासाहेब ठाकरे यांना तीन चिरंजीव आहेत. त्यापैकी बिंदूमाधव हे थोरले चिरंजीव होते. त्यानंतर जयदेव ठाकरे हे मधले आणि उद्धव ठाकरे हे सर्वात लहान चिरंजीव आहेत. बिंदूमाधव यांचं 20 एप्रिल 1996 रोजी लोणावळा इथे एका मोटार अपघातात निधन झालं होतं. बिंदूमाधव यांच्या पश्चात त्यांचा मुलगा निहार ठाकरे हे आहेत. ते खरंतर व्यावसायिक आहेत. त्यांचं एलएलएमपर्यंत शिक्षण झालं आहे. पण ते आता राजकारणात जम बसवणार आहेत. त्यामुळेच त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. निहार हे बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वात मोठे नातू मानले जातात. त्यामुळे बाळासाहेबांचे नातू निहार हे त्यांच्यासारखे राजकारणात हुकमी एक्के म्हणून नावाजले जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सावंतवाडी : श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. CBSE बोर्डमध्ये SSC च्या पहिल्या बॅचनं १०० टक्के निकालासह घवघवीत यश संपादन केले आहे.
श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडीच्या SSC बॅचनं CBSE बोर्डात १०० टक्के निकालासह बाजी मारली आहे. प्रशालेची ही पहिलीच बॅच असून ३० विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त करत जिल्ह्यातील टॉप विद्यार्थ्यांच्या यादीत आपलं नाव कोरल आहे.
प्रशालेमध्ये वेदीका विनायक परब हीन ९५.८३ % गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. देवाशीष प्रसाद महाले यान ९५. ६७ % प्राप्त करत द्वितीय तर देवांग राजेश फोंडेकर यान ९३.०० % गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. दिया साईनाथ वेटे या विद्यार्थ्यांनींन ८९.५० % गुण प्राप्त करून उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. इंग्रजी विषयात वेदीका परब, देवाशीष महाले यांनी १०० पैकी ९८ गुण, हिंदी विषयात देवाशीष महाले, देवांग फोंडेकर, दिया वेटे यांनी १०० पैकी ९९ गुण प्राप्त करत विक्रम रचला. गणित विषयात वेदीकान ९२ तर विज्ञान विषयात ९६, सामाजिक शास्त्रमध्ये ९८ तर IT मध्ये ९९ गुण प्राप्त केले.
विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये प्राचार्य व्यंकटेश बक्षी, शिक्षक प्रियांका डिसोझा, संदीप पेडणेकर, प्राची कुडतरकर, श्वेता खानोलकर, दिपीका कदम यांनी मोलाच मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक व कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, अध्यक्षा सौ. अस्मिता सावंत-भोसले, सचिव संजीव देसाई, व्यवस्थापक समन्वयक सुनेत्रा फाटक यांनी गुणवंत विद्यार्थ्यी, शिक्षकांसह पालकांचे अभिनंदन केले.
गणेशोत्सवादरम्यान कोकणमार्गावर २००+ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते. त्याबरोबर जबलपुर – कोईम्बत्तूर सुपरफास्ट विशेष गाडी जी समर स्पेशल म्हणुन ह्या मार्गावर चालविण्यात आली होती ती गाडी गणेशोत्सवात चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
JBP CBE SPECIAL (02198)
दिनांक 05/08/2022 ते 30/09/2022 दरम्यान ही गाडी दर शुक्रवारी चालवली जाईल.
S.N.
Station Name
Time
Day
1
JABALPUR
23:50
1
2
NARSINGHPUR
00:55
2
3
GADARWARA
01:30
2
4
PIPARIYA
02:05
2
5
ITARSI JN
03:45
2
6
HARDA
04:47
2
7
KHANDWA
06:48
2
8
BHUSAVAL JN
08:35
2
9
NASHIK ROAD
11:50
2
10
PANVEL
15:25
2
11
ROHA
16:50
2
12
KHED
18:20
2
13
CHIPLUN
18:54
2
14
RATNAGIRI
20:40
2
15
KANKAVALI
22:52
2
16
KUDAL
23:22
2
17
THIVIM
00:32
3
18
MADGAON
01:45
3
19
KARWAR
02:52
3
20
KUMTA
03:52
3
21
MOOKAMBIKA ROAD
05:02
3
22
KUNDAPURA
05:52
3
23
UDUPI
06:52
3
24
MULKI
07:52
3
25
MANGALURU JN
09:30
3
26
KASARAGOD
10:15
3
27
KANNUR
11:40
3
28
KOZHIKKODE
13:05
3
29
SHORANUR JN
14:30
3
30
PALAKKAD JN
15:20
3
31
COIMBATORE JN
17:10
3
CBE JBP SPECIAL (02197)
दिनांक 05/08/2022 ते 30/09/2022 दरम्यान ही गाडी दर सोमवारी चालवली जाईल.
S.N.
Station Name
TIME
Day
1
COIMBATORE JN
15:25
1
2
PALAKKAD JN
16:35
1
3
SHORANUR JN
17:20
1
4
KOZHIKKODE
18:30
1
5
KANNUR
19:50
1
6
KASARAGOD
20:55
1
7
MANGALURU JN
23:10
1
8
MULKI
01:04
2
9
UDUPI
01:36
2
10
KUNDAPURA
02:02
2
11
MOOKAMBIKA ROAD
02:28
2
12
KUMTA
03:32
2
13
KARWAR
04:32
2
14
MADGAON
05:55
2
15
THIVIM
06:38
2
16
KUDAL
07:30
2
17
KANKAVALI
08:37
2
18
RATNAGIRI
10:55
2
19
CHIPLUN
13:02
2
20
KHED
13:32
2
21
ROHA
15:55
2
22
PANVEL
16:55
2
23
NASHIK ROAD
20:45
2
24
BHUSAVAL JN
00:30
3
25
KHANDWA
02:40
3
26
HARDA
03:55
3
27
ITARSI JN
05:15
3
28
PIPARIYA
06:17
3
29
GADARWARA
06:52
3
30
NARSINGHPUR
07:25
3
31
JABALPUR
08:45
3
डब्यांची स्थिती AC (1A) – 01 + AC (2A) – 02 + AC (3A) – 06 + Sleepr – 11 + General – 02 + SLR– 2 = Total 24
ह्या गाडीचे आरक्षण सुरु झाले असून सर्व आरक्षण तिकीट विंडो तसेच सर्व अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.