२३ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि – एकादशी – 22:32:49 पर्यंत
  • नक्षत्र – उत्तराभाद्रपद – 16:03:29 पर्यंत
  • करण – भाव – 11:57:55 पर्यंत, बालव – 22:32:49 पर्यंत
  • पक्ष – कृष्ण
  • योग – प्रीति – 18:36:05 पर्यंत
  • वार – शुक्रवार
  • सूर्योदय – 06:04
  • सूर्यास्त – 19:07
  • चन्द्र राशि – मीन
  • चंद्रोदय – 27:21:00
  • चंद्रास्त – 15:15:00
  • ऋतु – ग्रीष्म

जागतिक दिन :
महत्त्वाच्या घटना :
  • १५६८: नेदरलँड्सला स्पेनपासून स्वातंत्र्य.
  • १७३७: पोर्तुगीजांकडुन जिंकल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला.
  • १८०५: नेपोलियन बोनापार्टला इटलीचा राज्यपदी राज्याभिषेक.
  • १८२९: सिरील डेमियनला अ‍ॅकॉर्डियन या वाद्याचे पेटंट मिळाले.
  • १९११: न्यू यॉर्क सार्वजनिक ग्रंथालय सामान्य जनतेस खुले.
  • १९४९: पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्त्वात आले.
  • १९५१: तिबेट देशाने चीनबरोबर तिबेटच्या शांततेत मुक्तीसाठी सतरा बिंदू करार केला.
  • १९५६: आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले.
  • १९५८: अमेरिकेचा पहिला उपग्रह एक्सप्लोरर १ बंद पडला.
  • १९८४: बचेंद्री पाल या महिलेने एव्हरेस्ट शिखर चढून जाणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळविला.
  • १९९५: जावा संगणक भाषेची अधिकृत घोषणा.
  • १९९७: माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्‍च शिखर सर्वप्रथम सर करणार्‍या तेनसिंग नोर्गे यांचे नातू ताशी तेनसिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले.
  • २००८: भारतीय लष्कर दलाच्या सैन्यांनी जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पुर्थ्वी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
  • २०१६: भारतीय अंतरीक्ष संशोधन संस्था इस्रो ने आंध्रप्रदेश मधील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून संपूर्ण भारतीय बनावटीचे अंतराळ शटल आरएलव्ही-टीडी ची स्थापना केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १०५२: फ्रान्सचा राजा फिलिप (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै ११०८)
  • १७०७: स्वीडीश वनस्पतीतज्ञ कार्ल लिनिअस यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १७७८)
  • १८७५: अमेरिकन उद्योगपती आल्फ्रेड पी. स्लोन यांचा जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९६६)
  • १८९६: जुन्या जमान्यातील रंगभूमीवरील श्रेष्ठ संगीत समीक्षक केशवराव भोळे यांचा जन्म.
  • १९१८: इंग्लिश क्रिकेटपटू डेनिस कॉम्पटन यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९९७)
  • १९१९: जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्रीदेवी यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००९)
  • १९२२: प्रख्यात भारतीय उपखंडातील इतिहासकार रणजीत गुहा यांचा जन्मदिन.
  • १९२६: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी. गोविंद पिल्लई यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २०१२)
  • १९२६: भारतीय बिशप बॅसिल साळदादोर डिसोझा यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९६)
  • १९३३: मुद्रितशोधन तज्ञ मोहन वेल्हाळ यांचा जन्म.
  • १९४३: पटकथालेखक आणि दिग्दर्शक कोवेलमूडी राघवेंद्र राव यांचा जन्म.
  • १९४५: भारतीय दिग्दर्शक, पटकथालेखक आणि लेखक पद्मराजन यांचा जन्म.(मृत्यू: २४ जानेवारी १९९१)
  • १९४८: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित माजी सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आणि भारताचे माजी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक विनोद राय यांचा जन्मदिन.
  • १९५१: रशियन बुद्धीबळपटू अनातोली कार्पोव्ह यांचा जन्म.
  • १९६५: वूर्केरी रामन, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८५७: ऑगस्टिन लुई कॉशि, फ्रेंच गणितज्ञ. (जन्म: २१ ऑगस्ट १७८९)
  • १९०६: नॉर्वेजियन नाटककार, दिग्दर्शक आणि कवी हेन्‍रिक इब्सेन यांचे निधन. (जन्म: २० मार्च १८२८)
  • १९३०: प्रख्यात भारतीय पुरातत्व व संग्रहालय तज्ञ तसचं, बनारस हिंदू विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे प्राध्यापक राखालदास बंडोपाध्याय उर्फ जे. आर. डी. बनर्जी यांचे निधन.
  • १९३७: रॉकफेलर घराण्यातील पहिले उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचे संस्थापक जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १८३९)
  • १९६०: निऑन लाईट चे निर्माते जॉर्ज क्लोडे यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १८७०)
  • १९७५: भारतीय सैन्यातील ले. जनरल व व्हिक्टोरिया क्रॉस मिळविणाअरे पहिले ले. जनरल पी. एस. बापट यांचे निधन.
  • १९३४: क्लाईड बॅरो, अमेरिकन दरोडेखोर.
  • २०१०: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक व भारतीय नक्षलवादी आंदोलनाचे जनक कानू सन्याल यांचे निधन.
  • २०१०: राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय तेलगु भाषिक चित्रपट गायिका वेतुरी सुंदरम्मा मूर्ती यांचे निधन.
  • २०१४: भारतीय क्रिकेटर माधव मंत्री यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९२१)
  • २०१४: भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचे निधन. (जन्म: १३ मे १९५१)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

मुंबई ते तळकोकण प्रवास फक्त ५ तासांत; यंदा गणपतीत कोकणात जाण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध होणार

   Follow us on        
मुंबई: यंदा गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर हाती आली आहे. गणपतीत आता समुद्र मार्गे प्रवास करता येणार आहे. चाकरमान्यांना कमी वेळेत गावी पोहोचवण्यासाठी मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे साडेचार तासांत मालवण, विजयदुर्ग तर तीन तासांत रत्नागिरी गाठता येणार आहे. आता मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू होणार आहे.
जलवाहतूक सेवा सुरू झाल्याने चाकरमानी कमी वेळेत कोकणात पोहोचणार आहेत. हायटेक यंत्रणा असलेल्या एम टू एम या बोटीमार्फत कोकणात प्रवास करणार आहेत. फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे चाकरमान्यांचा मोठा त्रास कमी होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय मानला जात आहे.
चाकरमान्यांचा त्रास कमी होणार
गणेशोत्सवात कोकणात जाताना चाकरमान्यांना रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडीने होणारी परवड आणि वेळखाऊ प्रवासाचा त्रास चाकरमान्यांसाठी नेहमीचाच झाला आहे. या त्रासातून दिलासा देण्यासाठी मत्स्य व बंदरे विभागाकडून मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे.
जलवाहतूक सेवेसाठी एम टू एम बोट वापरली जाणार आहे. येत्या २५ मे रोजी ती मुंबईतील भाऊचा धक्का येथे दाखल होणार आहे. फडणवीस सरकारमधील मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून परवडणाऱ्या दरात जलवाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. याकरिता एम टू एम ही बोट सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचे प्रयोजन आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हायटेक यंत्रणा असलेल्या एम टू एम या बोटीमार्फत पुन्हा एकदा जलवाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
मुंबईतील माझगाव डॉक येथून प्रवास सुरू होईल. जवळपास साडेचार तासांत कोकणातील मालवण, विजयदुर्ग तर तीन तासांत रत्नागिरीपर्यंत पोहोचता येईल. लवकरच चाकरमान्यांना परवडतील, असे दर यासाठी निश्चित केले जाणार आहेत.
Facebook Comments Box

Amboli: सिंधुदुर्ग-चौकुळ येथील पाणवठ्यात पट्टेरी वाघाचे दर्शन

   Follow us on        
आंबोली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळ गावात एका पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. या गावातील जांभळ्याचे कोंड नदीतील एका पाणवठ्यात हा वाघ खडकावर बसून पाणी पिताना आढळून आला. याचे फोटो आणि व्हिडिओ स्थानिक युवकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहेत. सोशल मीडियावर हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
आंबोली वनविभागाशी या घटनेबाबत  संपर्क साधला असता त्यांनी या परिसरात पट्टेरी वाघांचे अस्तित्व मान्य केले. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो याच वाघाचे आहेत की नाही? याबाबत निश्चितपणे सांगता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वनखात्याकडे उपलब्ध असलेल्या अधिकृत नोंदीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पट्टयात एकूण आठ पट्टेरी वाघ आहेत. यामध्ये पाच मादी आणि तीन नर वाघांचा समावेश आहे. इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघांची अधिकृत नोंद वनविभागाच्या दप्तरी झाली आहे. वनविभागाने यापूर्वीच वाघांचे अस्तित्व मान्य केले होते आणि त्यानंतर बऱ्याचदा आंबोली-चौकुळ भागात वाघ दिसून आला होता. काही महिन्यांपूर्वी दोडामार्ग तालुक्यातील भेकुर्ली येथे दिवसाढवळ्या वाघ आढळला होता.
वनविभागाच्या नोंदीनुसार आंबोली ते मांगेली हा वाघांचा प्रमुख भ्रमणमार्ग आहे. काही दिवसांपूर्वी दाभिळमधील जंगल भागातील विहिरीत मृत पट्टेरी वाघीण आढळून आली होती. जी वनविभागाच्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाली होती. आणि आता पुन्हा चौकुळ येथे पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याने या पट्टयातील वाघांचे अस्तित्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
Facebook Comments Box

Yetav App: आता ‘ओला’, ‘उबेर’ प्रमाणे घरबसल्या रिक्षा आणि कार बुकिंग करता येणे शक्य; ‘येतंव अ‍ॅप’ कसे वापरावे?

   Follow us on        
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता रिक्षा प्रवाशांना महानगरातील ‘ओला’, ‘उबेर’ प्रमाणेच प्रवासासाठी घरबसल्या रिक्षा बुकिंग करता येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने ‘येतंव’ हे प्रवासी रिक्षा अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. ‘येतंव’ अ‍ॅप रिक्षा चालक व प्रवाशांसाठी मोफत आहे.सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने व कणकवली तालुका व्यापारी संघाच्या समन्वयाने सोल्युशन प्रा.लि.यांच्या सहकार्याने हे अ‍ॅप विकसित केले आहे. कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते या अ‍ॅपचे रविवारी लोकार्पण झाले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, माजी जिल्हाध्यक्ष विजय वळंजू, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, रिक्षा संघटना कोकण विभागाचे अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हाध्यक्ष नागेश ओरोसकर, कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे, झॅपअ‍ॅप सोल्यूशन प्रा.लि. कंपनीचे सुबोध मेस्त्री, आनंद वामनसे आदी उपस्थित होते.
ऱिक्षा चालकांनी असे वापरावे अ‍ॅप
रिक्षाचालकांनी या अ‍ॅपवर प्रथम लोकेशन टाकावे. यामुळे प्रवाशांना सर्च केल्यावर त्यांचे नाव व मोबाईल नंबर दिसणार आहेत. या अ‍ॅपद्वारे प्रवाशी रिक्षा कोठेही बोलवू शकतात. रेल्वे स्थानकावर थेट रिक्षाचालकांशी संपर्क साधता येणार आहे.
5300 जणांनी डाऊनलोड केले अ‍ॅप
गेल्या सव्वा महिन्यात 5300 जणांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले असून 220 रिक्षाचालकांनी नोंदणी केली आहे. पैकी रिक्षाचालकांना या अ‍ॅपवर 1914 कॉल आले आहेत.
‘येतंव’ कसे वापरावे
प्रवाशांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर या अ‍ॅपच्या माध्यमातून त्यांना जवळच्या दोन कि.मी. परिसरातील रिक्षा किंवा चारचाकी गाडी हवी असल्यास त्याची उपलब्धता व संपर्क क्रमांक मिळू शकेल. यामध्ये भाडे ठरवण्याची पद्धत पूर्वीप्रमाणेच असून प्रवासी व रिक्षाचालक परस्पर संवादाद्वारे किंवा व्हॉटस् अ‍ॅप मॅसेजवरून भाडे निश्चित करू शकतात. त्यात अ‍ॅप कोणताही हस्तक्षेप करणार नाही. स्मार्ट फोन नसलेल्या रिक्षाचालक कोणत्याही फोनवरून महासंघाने दिलेल्या 9082408882 क्रमांकावर व्हॉटस् अ‍ॅपद्वारे नोंदणी करू शकतात.
हे अ‍ॅप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी लिंक
Facebook Comments Box

२२ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

तिथि – दशमी – 25:15:26 पर्यंत
नक्षत्र – पूर्वाभाद्रपद – 17:48:30 पर्यंत
करण – वणिज – 14:24:43 पर्यंत, विष्टि – 25:15:26 पर्यंत
पक्ष – कृष्ण
योग – विश्कुम्भ – 21:48:52 पर्यंत
वार – गुरूवार
सूर्योदय – 06:04
सूर्यास्त – 19:07
चन्द्र राशि – कुंभ – 12:09:33 पर्यंत
चंद्रोदय – 26:41:59
चंद्रास्त – 14:16:00
ऋतु – ग्रीष्म

जागतिक दिन :
  • जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस International Day for Biological Diversity
महत्त्वाच्या घटना :
  • 1762 : स्वीडन आणि प्रशिया यांच्यात हॅम्बर्गचा तह.
  • 1906 : राइट बंधूंनी फ्लाइंग मशीनचे पेटंट घेतले.
  • 1915 : स्कॉटलंडच्या ग्रेटना ग्रीन गावात 3 ट्रेनची धडक होऊन 227 लोक ठार आणि 246 जखमी.
  • 1927 : चीनच्या झिनिंगजवळ 8.3 तीव्रतेच्या भूकंपात 200,000 लोकांचा मृत्यू झाला.
  • 1942 : दुसरे महायुद्ध – मेक्सिकोने मित्र राष्ट्रांच्या बाजूने युद्धात प्रवेश केला.
  • 1960 : द ग्रेट चिलीचा भूकंप हा 9.5 रिश्टर स्केलचा जगातील सर्वात शक्तिशाली भूकंप आहे.
  • 1961 : हुंडाबंदी कायदा राष्ट्रपतींच्या संमतीने हुंडाबंदी कायदा अस्तित्वात आला.
  • 1972 : सिलोनने नवीन संविधान स्वीकारले आणि प्रजासत्ताक बनले. देशाचे नामकरण श्रीलंका करण्यात आले आणि राष्ट्रकुल राष्ट्रांमध्ये सामील झाले.
  • 1987 : मेरठ जिल्ह्यात हाशिमपुरा हत्याकांड घडले.
  • 1990 : उत्तर येमेन आणि दक्षिण येमेन रिपब्लिक ऑफ येमेन या नावाने एकत्र आले.
  • 2004 : भारताचे 13 वे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी पदभार स्वीकारला.
  • 2009 : मनमोहन सिंग यांनी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
  • 2015 : सार्वमतानंतर समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा आयर्लंड हा जगातील पहिला देश ठरला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1408 : ‘अन्नामचार्य’ – हिंदू संत यांचा जन्म. (मृत्यू: 4 एप्रिल 1503)
  • 1772 : ‘राजा राम मोहन रॉय’ – समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 27 सप्टेंबर 1833)
  • 1783 : ‘विल्यम स्टर्जन’ – विद्युत चुंबक आणि विद्युत मोटर चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 4 डिसेंबर 1850)
  • 1813 : ‘रिचर्ड वॅग्‍नर’ – जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू: 13 फेब्रुवारी 1883)
  • 1859 : ‘सर आर्थर कॉनन डॉइल’ – स्कॉटिश डॉक्टर व शेरलॉक होम्स या गुप्तहेरकथांचे लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 7 जुलै 1930)
  • 1871 : ‘विष्णू वामन बापट’ – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 20 डिसेंबर 1933)
  • 1905 : ‘बोडो वॉन बोररी’ – इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे सहसंशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 17 जुलै 1956)
  • 1907 : ‘सर लॉरेन्स ऑलिव्हिये’ – ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता यांचा जन्म. (मृत्यू: 11 जुलै 1989)
  • 1940 : भारतीय फिरकी गोलंदाज एरापल्ली अनंतराव श्रीनिवास प्रसन्ना यांचा जन्म.
  • 1948 : ‘नेदुमुदी वेणू’ – भारतीय अभिनेता आणि पटकथालेखक यांचा जन्म.
  • 1959 : ‘मेहबूबा मुफ्ती’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
  • 1984 : ‘डस्टिन मॉस्कोविट्झ’ – फेसबुकचे सह-संस्थापक यांचा जन्म.
  • 1987 : ‘नोव्हान जोकोव्हिच’ – सर्बियाचा टेनिस खेळाडू यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1545 : ‘शेरशाह सूरी’- भारतीय शासक यांचे निधन.
  • 1802 : ‘मार्था वॉशिंग्टन’ – अमेरिकेची पहिली फर्स्ट लेडी यांचे निधन. (जन्म: 2 जून 1731)
  • 1885 : ‘व्हिक्टर ह्यूगो’ – जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबईकार, कवी आणि लेखक यांचे निधन. (जन्म: 26 फेब्रुवारी 1802)
  • 1991 : ‘श्रीपाद अमृत डांगे’ – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी कॉम्रेड यांचे निधन. (जन्म: 10 ऑक्टोबर 1899)
  • 1995 : ‘रविंद्र बाबुराव मेस्त्री’ – चित्रकार व शिल्पकार यांचे निधन.
  • 1998 : ‘डॉ. मधुकर आष्टीकर’ – लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1928)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

Covid-19 Updates: देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू..

   Follow us on        
मुंबई: देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या २० दिवसांत मुंबईत ९५ रुग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती एका आघाडीच्या वृत्तपत्रामार्फत देण्यात आली आहे. देशात एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता २५७ वर पोहोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक ९५ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तामिळनाडूमध्ये ६६, महाराष्ट्रात ५६ आणि कर्नाटकात १३ रुग्ण आहेत.
दरम्यान, मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. तथापि, डॉक्टरांचे म्हणणे आहे की त्यांचा मृत्यू कोविडमुळे नाही तर दीर्घकालीन आजारांमुळे झाला. एका रुग्णाला तोंडाचा कर्करोग होता आणि दुसऱ्याला नेफ्रोटिक सिंड्रोम, मूत्रपिंडाशी संबंधित आजार होता.
सिंगापूरमध्ये 14 हजार रुग्ण
आशियातील सिंगापूर, हाँगकाँग, चीन आणि थायलंडमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. या देशांमध्ये नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. १ ते १९ मेदरम्यान सिंगापूरमध्ये ३००० रुग्ण आढळले. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही संख्या ११,१०० होती. येथे प्रकरणांमध्ये २८% वाढ झाली असून १४ हजार रुग्ण असल्याचे समजते.
Facebook Comments Box

Konkan Railway Merger: “कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करावे; मात्र ‘कोकण रेल्वे’ हे नाव…..” मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र

   Follow us on        
Konkan Railway Merger:कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करावे यासाठी महाराष्ट्र सरकारने अलीकडेच संमती दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची संमती कळविण्यासाठी पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी हे विलीनीकरण करताना ‘कोकण रेल्वे’ चे स्वत्रंत अस्तित्व टिकवण्यासाठी विलीनीकरणानंतर भारतीय रेल्वेला हस्तांतरित केलेल्या रेल्वे मार्गांसाठी “कोकण रेल्वे” हे नाव कायम ठेवण्यात यावे अशी विनंती केली आहे.
या  पत्राचा मजकूर  खालीलप्रमाणे 
प्रिय श्री. अश्विनी वैष्णव जी,
कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना १९९० मध्ये पश्चिम घाटाच्या आव्हानात्मक भूभागावर रेल्वे प्रकल्प राबविण्यासाठी करण्यात आली. महाराष्ट्रातील रोहा ते केरळमधील मंगलोर पर्यंत पसरलेल्या प्रदेशात रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण आणि बांधकाम आणि रेल्वे सेवांचे संचालन करण्याची जबाबदारी या कॉर्पोरेशनवर सोपवण्यात आली होती. सुरुवातीला, त्याच्या भागधारक रचनेत भारत सरकार (५१%), महाराष्ट्र (२२%), कर्नाटक (१५%), गोवा आणि केरळ (प्रत्येकी ६%) राज्यांचा समावेश होता. नंतर ९ नोव्हेंबर २०११ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्याच्या भांडवल रचनेची पुनर्रचना करण्यात आली. महामंडळाने महाराष्ट्रातील रोहा आणि केरळमधील मंगलोर दरम्यान रेल्वे मार्गाचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण केले. सध्या ते या मार्गावर विशेष रेल्वे सेवा चालवत आहे, तर इतर विभागीय रेल्वे सेवा देखील या मार्गाचा फायदा घेत आहेत, ज्यामुळे मोठ्या संख्येने प्रवाशांना सेवा मिळत आहेत.
माझ्या माहितीप्रमाणे उत्पन्नाच्या मर्यादित स्रोतांमुळे, महामंडळ त्यांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यास किंवा वाढत्या मागण्या पूर्ण करण्यास असमर्थ आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर भागधारक राज्यांनी देखील या विलीनीकरणासाठी त्यांची संमती दिली आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची संमती कळवताना मला आनंद होत आहे, ज्यासाठी महाराष्ट्राला ३९६.५४२४ कोटी रुपये परतफेड करावी लागेल, जे पूर्वी राज्याच्या या प्रकल्पामधील वाटा म्हणून महामंडळाला पाठवले गेले होते. याव्यतिरिक्त, विलीनीकरणानंतर भारतीय रेल्वेला हस्तांतरित केलेल्या रेल्वे मार्गांसाठी “कोकण रेल्वे” हे नाव कायम ठेवण्यात यावे, कारण त्यांच्या महत्त्वपूर्ण प्रादेशिक वारशाची दखल घेतली जाईल.
वर उल्लेख केल्याप्रमाणे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाला सूचना द्याव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो.
Facebook Comments Box

Ratnagiri: कोकणातून महाबळेश्वरला जाण्यासाठी आता थेट नवा मार्ग; मुंबईतील ‘सीलिंक’ च्या धर्तीवर केबल स्टे ब्रिजही उभारला जाणार

   Follow us on        
रत्नागिरी:कोकणातून महाबळेश्वरला जाण्यासाठी आता थेट नवा मार्ग होणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन प्रांताना जोडण्यासाठी केबल स्टे ब्रिज उभारण्यात येत आहे. या ब्रिजमुळं सातारा आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे जोडले जाणार आहेत. तसंच, या ब्रिजवर पर्यटकांसाठी व्ह्यूविंग गॅलरीदेखील उभारण्यात येणार आहे. त्यामुळं सह्याद्रीतील कोयनेचे बॅकवॉटर आणि सनराइज व सनसेटही पर्यटकांना पाहता येणार आहे.
या नवीन मार्गामुळं कोयना खोऱ्यातील दुर्गम भागांना जोडणारा आहे. हा पूल साताऱ्यातील तापोळा ते पलीकडेल गाढवली आहिरपर्यंत होणार आहे. त्याच्याजवळच घाटमार्ग असून या पुलामुळं रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरचे अंतर सुमारे 50 किमीने कमी होणार आहे. खेड तालुक्यातील रघुवीर घाटमार्गे या पुलावरुन सातारा व महाबळेश्वर असा प्रवास करता येणार आहे.
मुंबईतील सीलिंकप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकाराचा ब्रिज होणार आहे. हा ब्रिज 540 मीटर लांब आणि 14 मीटर रुंदीचा पूल असणार आहे. मध्यवर्ती भागात 43 मीटर उंचीची पर्यटकांसाठी व्ह्यू गॅलरी उभारली जाणार आहे. त्यामुळं आता रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी पोलादपूरचा आंबेनळी घाटमार्गाऐवजी नवा मार्ग प्रवाशांना खुला होईल. खेड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या रघुवीर घाटमार्गाने नव्या ब्रिजवरुन पलीकडे तापोळामार्गे महाबळेश्वर व थेट तापोळा कासमार्गे सातारा असा प्रवास करता येणार आहे. याच मार्गावर बामणोली ते आपटी हा आणखी एक पूल उभारला जात आहे. त्यामुळं तापोळा ते सातारा हे अंतर 10 ते 15 किमीने कमी होईल.
Facebook Comments Box

Cyclone Alert: अरबी समुद्र खवळण्याची शक्यता, 21 ते 24 मे दरम्यान मच्छीमारांना सतर्कतेचे आवाहन!

   Follow us on        
Cyclone Alert: महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात बुधवार, 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे.22 ते 24 मे दरम्यान रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळ समुद्र खवळू शकतो, तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.
21 ते 24 मे दरम्यान मच्छीमारांनी घ्यावयाची सावधगिरी
* हवामान खात्याच्या अपडेट्स नियमितपणे तपासत राहावेत.
* स्थानिक प्रशासन व मच्छीमार सहकारी संस्थांकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
* खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे पूर्णतः टाळावे.
* लहान बोटींचा वापर टाळावा, किनाऱ्यालगतच कार्य करावे.
* सुरक्षेसाठी आवश्यक ती साधने (लाईफ जॅकेट्स, वायरलेस सेट) जवळ बाळगावीत.
* संभाव्य वाऱ्याचा वेग व लाटांचा जोर लक्षात घेऊन किनाऱ्यावरील होड्या व बोटी सुरक्षित स्थळी हलवाव्यात.
* समुद्र खवळलेला असताना मासेमारी टाळून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी.
Facebook Comments Box

२१ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-नवमी – 27:25:15 पर्यंत
  • नक्षत्र-शतभिष – 18:59:18 पर्यंत
  • करण-तैतुल – 16:16:41 पर्यंत, गर – 27:25:15 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-वैधृति – 24:34:06 पर्यंत
  • वार=बुधवार
  • सूर्योदय-06:04
  • सूर्यास्त-19:06
  • चन्द्र राशि-कुंभ
  • चंद्रोदय-26:03:59
  • चंद्रास्त-13:18:59
  • ऋतु-ग्रीष्म
जागतिक दिन :
  • जागतिक ध्यान दिवस
  • जागतिक मासे स्थलांतर दिन
  • आंतरराष्ट्रीय चहा दिवस
  • सांस्कृतिक विविधतेसाठी जागतिक दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1881 : वॉशिंग्टन (डी.सी.) मध्ये अमेरिकन रेड क्रॉसची स्थापना झाली.
  • 1904 : फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (FIFA) ची पॅरिसमध्ये स्थापना झाली.
  • 1927 : चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग एक अमेरिकन विमानचालक आणि लष्करी अधिकारी होता. त्यांनी न्यूयॉर्क शहर ते पॅरिस पर्यंत 3,600 मैल (5,800 किमी) चे पहिले नॉनस्टॉप उड्डाण केले, 33.5 तास एकट्याने उड्डाण केले.
  • 1932 : अमेलिया इअरहार्ट ह्या अटलांटिक महासागर पार करणारी पहिली महिला ठरली.
  • 1991 : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या.
  • 1992 : चीनने 1,000 किलोटन अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुस्फोट आहे.
  • 1994 : मिस इंडिया सुष्मिता सेनने ४३व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला. ही पदवी मिळवणारी ती पहिली भारतीय आहे.
  • 1996 : सांगली जिल्ह्यातील माधवराव पाटील हे ब्रिटन मधील इलिंग शहराचे महापौर झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1916 : ‘हेरॉल्ड रॉबिन्स’ – अमेरिकन कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू: 14 ऑक्टोबर 1997)
  • 1923 : ‘अर्मांड बोरेल’ – स्विस गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 11 ऑगस्ट 2003)
  • 1928 : ‘ज्ञानेश्वर नाडकर्णी’ – कला समीक्षक व लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 23 डिसेंबर 2010)
  • 1931 : ‘शरद जोशी’ – हिन्दी कवी, लेखक व उपहासकार यांचा जन्म. (मृत्यू: 5 सप्टेंबर 1991)
  • 1956 : ‘रविन्र्द मंकणी’ – अभिनेता यांचा जन्म.
  • 1958 : ‘नइम खान’ – भारतीय-अमेरिकन फॅशन डिझायनर यांचा जन्म.
  • 1960 : ‘मोहनलाल’ – दक्षिण भारतीय अभिनेता यांचा जन्म.
  • 1971 : ‘आदित्य चोप्रा’ – भारतीय चित्रपट निर्माता यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1471 : ‘हेन्‍री (सहावा)’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म: 6 डिसेंबर 1421)
  • 1686 : ‘ऑटो व्हॉन गॅरिक’ – वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थवैज्ञानिक यांचे निधन. (जन्म: 30 नोव्हेंबर 1602)
  • 1979 : ‘जानकीदेवी बजाज’ – स्वातंत्र्य वीरांगना यांचे निधन. (जन्म: 7 जानेवारी 1893)
  • 1991 : ‘राजीव गांधी’ – भारताचे माजी पंतप्रधान यांची हत्या. (जन्म: 20 ऑगस्ट 1944)
  • 1998 : ‘आबासाहेब बाबूराव किल्लेदार’ – इंटकचे सोलापुरातील नेते यांचे निधन.
  • 2000 : ‘मार्क आर. ह्यूजेस’ – हर्बालाइफ कंपनी चे स्थापक यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1956)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search