APMC Market | होळीच्या दिवशी हापूसची मोठी आवक; सध्याच्या दर काय?

नवी मुंबई:रविवारी होळीच्या दिवशी कोकणातून आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. कोकणातून ३०६८१ पेट्या व इतर राज्यातून ६०५७ अशा एकूण ३६ हजार ७३८ पेट्या आंब्याची आवक झाली आहे. होळी व धूलिवंदनला सर्व बाजारपेठा बंद असताना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केट रविवारी होळीच्या दिवशी सुरू ठेवले होते. दिवसभरात ३६ हजार पेट्या आंब्याची आवक झाली.

सलग दोन दिवस मार्केट बंद राहिल्यामुळे आंब्याचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे बाजार समिती प्रशासनाने रविवारी व्यापार सुरू ठेवण्यास परवानगी दिली हाेती.

हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने त्याच्या दरात पण घसरण होताना दिसत आहे. होलसेल मार्केट मध्ये हापूस ३०० ते ८०० रुपये डझन तर किरकोळ मार्केट मध्ये ६०० ते १५०० रुपये डझन दराने विकला जात आहे.

Loading

Facebook Comments Box

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण? दीपक केसरकर यांचे सूचक विधान

   Follow us on        
सिंधुदुर्ग: लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जागा कोणाला मिळणार याबाबत येथील नागरिकांना उत्सुकता लागली असताना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्या बद्दल केलेल्या स्तुतिसुमनांनी चर्चेला उधाण आले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. या लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे किरण सामंत आणि भाजपचे नारायण राणे यांच्यामध्ये उमेवारीसाठी स्पर्धा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्या उमेदवारीला समर्थन देणारे वक्तव्य केले आहे. नारायण राणे ही केवळ एक व्यक्ती नव्हे तर त्यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याचा विकास अवलंबून आहे, असे वक्तव्य दीपक केसरकर यांनी केले. ते सोमवारी सिंधुदुर्गात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्यासारखा आक्रमक नेता निवडून आला तर तुम्हाला आवडेल का, असा प्रश्न दीपक केसरकर यांना विचारण्यात आला. यावर दीपक केसरकर यांनी म्हटले की, नारायण राणे ही फक्त एक व्यक्ती नाही, त्यांच्यासोबत आमचं सिंधुदुर्गाचं मंत्रिपद आहे. आमचा पुढचा विकास त्यावर अवलंबून आहे. आज त्यांना राज्यसभेचे तिकीट मिळालेले नाही. ते लोकसभेवर निवडून आले तर ते मंत्री बनण्याची त्यांची क्षमता आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्याला मिळणारं केंद्रीय मंत्रिपद घालवायचे  का, याचा विचार जनतेने केला पाहिजे. मी नाही, माझं कसं आहे, एखादा संघर्ष झाला तर तो विषयापुरता मर्यादित असतो. आम्ही कोकणी लोक आहोत, आमचा जिल्हा आमच्यासाठी प्राधान्याचा विषय आहे.  कोकणातील माणूस कधीच कोणाकडे मागत नाही,  कर्जमाफी मागत नाही, फक्त कधीतरी मदतीची गरज लागते. पण विकासाची गंगा कोकणात येण्याची आवश्यकता आहे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
साहजिकच दीपक केसरकरांच्या या वक्तव्यांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दीपक केसरकारांचे सध्याच्या मंत्री मंडळातील स्थान पाहता ही जागा भाजपाला देण्यात येणार असल्याचे सूचक विधान त्यांनी केले असल्याचे बोलले जात आहे .

Loading

Facebook Comments Box

दुग्ध शर्करा योग! ऐन होळी पौर्णिमेला राजापूरात गंगा माईचे आगमन

   Follow us on        

राजापूर : सध्या सगळीकडे शिमगोत्सवाची धूम आहे. मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी आलेले असताना फाल्गुन पौर्णिमेला राजापूर येथे गंगेचे आगमन झाले असून मूळ प्रवाह प्रवाहित झाला आहे.

सध्या स्थानिकांसमोर भीषण पाणी टंचाईचे संकट आहे. अजून अडीच महिने कसे काढायचे हा प्रश्न तमाम कोकणवासीयांसमोर असतानाच राजापूर उन्हाळे येथील प्रसिद्ध गंगामाईचे आज 24 मार्च 2024 रोजी सकाळी आगमन झाले आहे.

मूळ गंगेचा प्रवाह प्रवाहित झाला असून काशी कुंडासह गंगा स्थळावरील सर्व चौदाही कुंडांमध्ये पाणी आले आहे, यातील काही कुंडे फुल भरले आहेत. पाण्याचा हा मोठा प्रवाह स्थानिकनां दिलासा देणारा आहे.आता भाविकांना गंगा स्नानाचा आनंद घेता येणार आहे

 

 

Loading

Facebook Comments Box

लोकसभेच्या उमेदवारांची पाचवी यादी भाजपतर्फे जाहीर; महाराष्ट्राच्या तीन उमेदवारांचा समावेश.

   Follow us on        
नवी दिल्ली; भाजपाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी पाचवी यादी यादी नुकतीच  जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्राच्या ३ उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. या उमेदवारांची नवे खालीलप्रमाणे
१) श्री. सुनील बाबुराव मेंढे ( भंडारा – गोंदिया मतदार संघ)
२) श्री. अशोक महादेव राव नेते ( गडचिरोली-चिमूर अजजा)
३)  श्री. राम सातपुते (सोलापूर अजा)
राम सातपुते यांना सोलापुरातून उमेदवारी जाहीर
भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना सोलापुरातून उमेदवारी जाहीर केली आहे. सोलापुरात विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे तिकीट भाजपने कापले आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात राम सातपुते लढणार आहेत.

 

Loading

Facebook Comments Box

Breaking | मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही

   Follow us on        
Loksabha Election 2024 : राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या वर्षी होणारी लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी माहिती समोर आली आहे. मनसे निवडणूक लढवत नसली तरीही ती युतीचा भाग असणार आहे. मनसेला विधान परिषदेच्या दोन जागा देण्यात येतील असे ठरले असल्याची माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे.
मनसे महायुतीत सामील होणार असल्याचे याआधीच जाहीर करण्यात आले होते. मनसेला युतीत दोन जागा दिल्या जातील अशी चर्चा होत होती. दक्षिण मुंबई आणि शिर्डी  मतदारसंघ मनसेला मिळणार असे बोलले जात होते. आता मात्र मनसे या निवडणुकीत आपला उमेदवार उभा करणार नसल्याचे समोर आले आहे. परंतु मनसे या निवडणुकीत महायुतीचाच भाग राहणार असून महायुतीच्या उमेदवारांना सर्वोतपरी सहकार्य करणार आहे. या बदल्यात मनसेला विधान परिषदेच्या दोन जागा देण्याचा निर्णय घेण्यात असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading

Facebook Comments Box

“दिनांक, दूरदर्शन, वेतन……….” स्वा. सावरकरांनी मराठी भाषेला दिलेत शेकडो शब्द; यादी येथे वाचा

   Follow us on        
Savarkar Contribution’s for Marathi Language : स्वात्रंत्र्य वीर सावरकर हा चित्रपट कालच प्रदर्शित झाला. या चित्रपटात सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू त्याचे देश प्रेम, देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला त्याग या गोष्टी आताच्या प्रेक्षकवर्गाला चांगल्या प्रकारे दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.  या शिवाय अजून एक महत्वाची गोष्ट जी अनेकांना माहितीही नसेल ती  म्हणजे त्यांचे मराठी प्रेम आणि मराठी भाषेसाठी त्यांनी दिलेले शेकडो शब्द.
सावरकरांनी दिलेले हे शब्द त्यांच्याकडून मरठी भाषेला दिलेलं एक गिफ्ट्च आहे..
कारण मराठी भाषेची व्याप्ती ही वेळीच वाढविणे खूप गरजेचे आहे हे सावरकरांनी आधीच ओळखले होते..त्यामुळे रोजच्या वापरात असे काही शब्द होते की जे उर्दू,हिंदी याची सरमिसळ असणारे शब्द होते.. त्यामुळे मराठी भाषेचे सौंदर्य खुलवायचे असेल तर त्या भाषेला साजेशी अशी शब्दरचना असायला हवी ही सावरकरांची इचछा होती.
सर्वसामान्य माणसाच्या संवादाचे माध्यम असणारी आपली ही सुंदर भाषा जर त्याच शैलीत बोलल्या गेली नाही तर त्याचे सौंदर्य हे खुलत नाही असे सावरकरांचे म्हणणे होते..अनेक इंग्रजी शब्द आपण आजही मराठी भाषेत वापरतो हे सावरकरांना मान्य नव्हतं.. आणि त्यातूनच त्यांनी अशी काही मराठी शब्दरचना केली की जी आजही आपण वापरतो..
  • दिनांक (तारीख)
  • क्रमांक (नंबर)
  • बोलपट (टॉकी)
  • नेपथ्य
  • वेशभूषा (कॉश्च्युम)
  • दिग्दर्शक (डायरेक्टर)
  • चित्रपट (सिनेमा)
  • मध्यंतर (इन्टर्व्हल)
  • उपस्थित (हजर)
  • प्रतिवृत्त (रिपोर्ट)
  • नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
  • महापालिका (कॉर्पोरेशन)
  • महापौर (मेयर)
  • पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
  • विश्वस्त (ट्रस्टी)
  • त्वर्य/त्वरित (अर्जंट)
  • गणसंख्या (कोरम)
  • स्तंभ ( कॉलम)
  • मूल्य (किंमत)
  • शुल्क (फी)
  • हुतात्मा (शहीद)
  • निर्बंध (कायदा)
  • शिरगणती ( खानेसुमारी)
  • विशेषांक (खास अंक)
  • सार्वमत (प्लेबिसाइट)
  • झरणी (फाऊन्टनपेन)
  • नभोवाणी (रेडिओ)
  • दूरदर्शन (टेलिव्हिजन)
  • दूरध्वनी (टेलिफोन)
  • ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
  • विधिमंडळ ( असेम्ब्ली)
  • अर्थसंकल्प (बजेट)
  • क्रीडांगण (ग्राउंड)
  • प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
  • मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
  • प्राध्यापक (प्रोफेसर)
  • परीक्षक (एक्झामिनर)
  • शस्त्रसंधी (सिसफायर)
  • टपाल (पोस्ट)
  • तारण (मॉर्गेज)
  • संचलन (परेड)
  • गतिमान
  • नेतृत्व (लिडरशीप)
  • सेवानिवृत्त (रिटायर)
  • वेतन (पगार)
असे शेकडो शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिले आहेत. असं असलं तरी, परभाषेबद्दल त्यांच्या मनात द्वेष नव्हता. फक्त कुठलीही भाषा शुद्ध असावी, इतकंच त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच त्यांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरला. मराठी भाषेतलं त्यांचं हे योगदान निश्चितच अतुलनीय आहे. त्यांना अभिप्रेत असलेल्या भाषाशुद्धीची आजही खरंच गरज आहे.

Loading

Facebook Comments Box

Breaking | वर्षा बंगल्यावर महायुतीची महत्वाची बैठक चालू; आज महायुतीच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता

Loksabha Election 2024: महायुतीच्या जागावाटपासंदर्भात एक मोठी  बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्ष बंगल्यावर एक महत्वाची बैठक काही वेळातच होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे आणि  इतर काही नेते वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. बैठक झाल्यावर काही  वेळातच पत्रकार परिषद घेऊन महायुतीच्या उरलेल्या जागेंच्या उमेदवारांची  यादी जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.
महायुतीच्या कालच्या दिल्लीतल्या बैठकीनंतर आज मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. महायुतीच्या नेत्यांची मुंबईत आज पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही बैठक जागावाटपासाठी अंतिम असल्याचं मानलं जात आहे. या बैठकीत दोन-तीन जागांच्या आदलाबदलीवर चर्चा होणार आहे.  बैठक लवकर झाली तर आजच पत्रकार परिषद घेऊन युतीचा फॉर्म्युला जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. बैठकीला उशीर झाला तर घोषणा उद्या जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

Loading

Facebook Comments Box

उन्हाळी हंगामासाठी मध्यरेल्वेच्या २२ विशेष गाड्यांचा जूनपर्यंत विस्तार; कोकण रेल्वे मार्गावरील एका गाडीचा समावेश

   Follow us on        
Railway News : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी  मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामासाठी काही विशेष गाड्यांच्या फेऱ्यांची कालावधी जूनपर्यंत विस्तारित  करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एकूण २२ विशेष गाड्यांचा तब्ब्ल १२०० अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
या यादीत कोकण रेल्वे मार्गावरील आठवड्यातून दोन दिवस चालविण्यात येणारी  ०११३९/०११४० नागपूर-मडगाव- नागपूर या गाडीचा समावेश आहे. या गाडीची सेवा या वर्षाच्या मार्च अखेरीस संपणार होती. मात्र तिची सेवा जून अखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे. दोन्ही बाजूने या गाडीच्या एकूण ५४ फेऱ्या होणार आहेत.
गाडी क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव ही विशेष गाडी दिनांक ०३ एप्रिल २०२४ ते २९ जून २०२४ पर्यंत चालविण्यात येणार असून गाडी क्रमांक ०११४० मडगाव – नागपूर ही गाडी दिनांक ०४ एप्रिल २०२४ ते ३० जून २०२४ या आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे, डब्यांच्या संरचनेनुसार चालविण्यात येणार आहे.
थांबे: वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थिवी आणि करमळी

 

Loading

Facebook Comments Box

पर्यटकांना खुशखबर! सावंतवाडी येथील जंगल सफारी ३१ मार्च पर्यंत मोफत

   Follow us on        

सावंतवाडी, दि. २३ मार्च : शहराच्या पर्यटन वाढीसाठी नरेंद्र डोंगरावर सुरू केलेली जंगल सफारी दिनांक ३१ मार्च पर्यंत मोफत करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

या सफारीच्या उद्घाटन प्रसंगी पर्यटकांना ही सेवा दिनांक ३१ मार्चपर्यंत मोफत देण्यात येईल असे दीपक केसरकर यांनी जाहीर केले होते. मात्र त्या ठिकाणी शुल्क आकारण्यात येत होते. याबाबत परशुराम उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ही सफारी आता मोफत सुरू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सुभेदार यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आली आहे.

आशिष सुभेदार यांच्या म्हणण्यानुसार, मंत्री केसरकर यांनी एका कार्यक्रमात ही सफर मोफत देणार असल्याचे जाहीर केले होते; परंतु त्या ठिकाणी वन विभागाकडून लहान मुलांसाठी ५० रुपये तर मोठ्यांसाठी १०० रुपये असा दर आकारण्यात आला होता. त्यानंतर ४ दिवस पैसे घेण्यात आले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सुभेदार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्याची दखल केसरकर यांच्याकडून घेण्यात आली असून, ही सफारी मोफत देण्यात यावी, अशा सूचना त्यांच्याकडून वन विभाग प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मोफत सफर सुरू केली असून, या सफारीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे

Loading

Facebook Comments Box

Nagpur Goa Highway Updates | शेतकरी आक्रमक; प्रति एकरी कमीत कमी दोन कोटी मोबदला देण्याची मागणी

   Follow us on        
Nagpur Goa Highway Updates:सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासनाकडून 7 मार्च 2024 रोजी अधिसूचना काढण्यात आली असून त्यामध्ये शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांच्या हरकती, आक्षेप 21 दिवसात अर्जाद्वारे लिखित स्वरूपात कारणासह कळविणेबाबत नमूद केले आहे. या अधिसुचनेनुसार, शेतकरी कामगार पक्ष व नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समितीचे वतीने सांगोला तालुक्यातील १३ गावांतील  शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांनी  बुधवारी हरकती व आक्षेप अर्ज व मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी मंगळवेढा यांना देण्यात आले. महामार्ग बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.
बाधित शेतकऱ्यांचे जगण्याचे प्रमुख एकमेव साधन असलेल्या बागायती जमिनीमधून महामार्ग गेला आहे. कुटुंब वाढीमुळे एकराच्या जमिनी गुंठ्यावर आल्या आहेत. त्यामुळे अनेक कुटुंब भूमिहीन होणार आहेत. महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या 6 ऑक्टोबर 2021 रोजीचे मोबदल्या बाबतच्या परिपत्रकेनुसार गुणांक एक नुसार मोबदला मिळणार आहे व तोही रेडीरेकनरनुसार त्यामुळे आमची एक एकर जमीन घेवूनही शासन मोबदल्यात एक गुंठा पण जमीन मिळणार नाही. यामुळे बाधित शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे.
शक्तिपीठ महामार्गांचे भूसंपादन अधिनियम 1955 नुसार सार्वजनिक हितार्थ म्हणून सक्तीने करणार असल्याचे नमूद केले आहे, त्यामुळे बाधीत क्षेत्राचे मूल्यांकन करीत असताना शेतकऱ्यांच्या बरोबर खासगी वाटाघाटी करून थेट खरेदी ने एकसमान सरसकट कमीत कमी एकरी दोन कोटी रुपये मोबदला, जिथे एमआयडीसी झोन व महानगरपालिका क्षेत्र असेल तिथे कमीत – कमी चार कोटी रुपये द्यावा आणि मगच सार्वजनिक हितार्थ महामार्ग करावा अशी मागणी महामार्ग बाधित शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search