मुंबई दि. १ मार्च २०२४: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार या महामार्गास राज्य महामार्ग (विशेष )क्रमांक १० म्हणून घोषित करण्यात आला आहे.
या अंतिम आराखड्यानुसार कोकणातील खालील गावातून हा महामार्ग जाणार असून लवकरच भूमी अधिग्रहण करण्याचे काम चालू करण्यात येणार आहे.
‘शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्यादरम्यान असला तरी हा महामार्ग पवनार, वर्धा येथून सुरू होणार असून गोवा, पत्रादेवी येथे येऊन संपेल. नागपूर – वर्धा असा ८० किमीचा समृद्धी महामार्गाचा भाग आहे. त्यामुळे शक्तीपीठ वर्धा येथून सुरू होणार असून हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यातून जाणार आहे.
११ हजार हेक्टर जागेची गरज
समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा असून यासाठी अंदाजे ९ हजार हेक्टर जागा संपादीत करावी लागली आहे. नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग ८०५ किमीचा असून यासाठी अंदाजे ११ हजार हेक्टर जागा संपादीत करावी लागण्याची शक्यता आहे. तर हे भूंसापदन एमएसआरडीसीसाठी मोठे आव्हान असणार आहे.
मुंबई, २९ फेब्रु. २०२४ : लवकरच लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुती आणि मित्रपक्षांकडून रस्सीखेच होताना दिसतेय.
शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात लोकसभेची तयारी सुरु केली असल्याची चर्चा होताना दिसत आहे. मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही जागा भाजपची असून भाजपच या जागेवर निवडणूक लढणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडून करण्यात आला आहे.
लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवित आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असुन भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे.’, असं ट्वीट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं असून ते ट्वीट चांगलंच चर्चेत आलंय.
लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवित आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असुन भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे.
सावंतवाडी: तळकोकणात सरकारी आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. काल गरजेच्या वेळी उपजिल्हा रुग्णालयात टाके घालण्या साठी लागणारा धागा उपलब्ध नसल्यामुळे जखमी रुग्णास जवळपास सव्वा तास रखडवल्याचा प्रकार येथे घडला. एवढेच नव्हे तर कर्मचाऱ्यांनी हा धागा आणण्यासाठी नातेवाईकांना पळापळ करण्यास लावली.
सविस्तर वृत्त असे की सावंतवाडी शहरात काल रात्री पावणे एक वाजता एक व्यक्ती गाडी रस्त्यावर स्लिप होवून अपघात झाला होता. व अपघात झालेल्या व्यक्तीला हाताला,पायाला डोक्याला चांगल्याच जखमा झाल्या होत्या. त्या नंतर अपघातातील जखमी रुग्णाला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णाला मोठ्या जखमा झाल्याने त्याला टाके पडले मात्र टाके घालण्या साठी लागणारा धागा रुग्णालयात उपलब्ध नाही तो बाहेरून घेवून या असे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर तो धागा शोधण्यासाठी नातेवाईक वेलनेस मध्ये गेले तेथे देखील सापडला नाही त्या नंतर त्यांनी जे जे मेडीकल गाठले तेथे देखील धागा सापडला नाही. अश्या अनेक ठिकाणी धाग्या साठी हेलपाट्या मारल्या नंतर शेवटी सर्वोदय नगर मध्ये धागा सापडला. व त्यानंतर नातेवाईक रुग्णालयात आले व नंतर टाके घालण्यात आले. तोपर्यंत सव्वा तास रुग्ण रक्त बंबाळ परिस्थितीत तसाच रुग्णालयात होता. असा भयंकर अनुभव रुग्णाच्या नातेवाईकांना आला.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदार संघातील हा प्रकार आहे. एकीकडे येथे मल्टि स्पेशालिटी रुग्णालय सुरु करण्याच्या गोष्टी केल्या जात असताना असे प्रकार घडत असतील तर सामान्य नागरिकांनी शासनाकडून कोणती अपेक्षा करावी असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
Kashedi Tunnel :मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणार्या हलक्या वजनाच्या एकेरी वाहतुकीसाठी खुला झाल्याने प्रवास वेगवान अन आरामदायी झाला आहे. मात्र रात्रीच्या सुमारास मुंबईच्या दिशेनेही जाणारी वाहने बोगद्यातून मार्गस्थ होत असल्याने वाहनचालकांची फसगतच होत आहे. विरूद्ध दिशेने धावणार्या वाहनांमुळे बोगद्यात एकेरी वाहतुकीची पायमल्ली सुरू आहे. नियोजनाच्या अभावामुळे अपघातांचा धोका कायम असून वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवरच आली आहे.
एकेरी वाहतुक चालू केली असली तरीही हा नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे विरोधी बाजूने म्हणजे गोव्यावरून मुंबईच्या दिशेने सुद्धा काही वाहनचालक वाहने चालवताना दिसत आहे. एखादा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार आहे का? अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात यावी तसेच वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात यावे अशी मागणी होत आहे.
शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने बोगद्यातील अंतर्गत कामांनी वेग घेतला होता. त्यानुसार २४ फेब्रुवारीपासून कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
मुंबई:जलद प्रवास आणि अत्याधुनिक सुविधांचा लाभ मिळावा यासाठी प्रवासी तेजस आणि वंदे भारत एक्सप्रेसंना प्राधान्य देतात. या गाड्यांचा जवळपास 90% मार्ग Route महाराष्ट्र राज्यात असल्याने या दोन्ही गाड्यांतून मोठ्या प्रमाणावर मराठी भाषक प्रवास करीत असतात. परंतु प्रवाशांना मराठीऐवजी इंग्रजीच वृत्तपत्र उपलब्ध करण्यात येते. याबद्दल प्रवासी खंत व्यक्त करू लागले आहेत.
मनसेचे नेते नितीन सरदेसाई दादरवरून बुधवारी तेजस एक्स्प्रेसने रत्नागिरीला जात होते. यावेळी त्यांना मराठी वृत्तपत्र वाचण्यास हवा होता. मात्र तेजस एक्स्प्रेसमध्ये फक्त इंग्रजी वृत्तपत्र उपलब्ध होते. मराठी वृत्तपत्र उपलब्ध नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मंगळवारी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला आणि बुधवारी मराठी भाषेची कशाप्रकारे गळचेपी होते, त्याचा अनुभव आला. आपल्याच राज्यातून सुरू होणार्या तेजस एक्स्प्रेसमध्ये मराठी वर्तमानपत्र नसणे. फक्त इंग्रजी वर्तमानपत्र असणे ही नक्कीच गौरवाची बाब नाही. यापुढे रेल्वेगाड्यांमध्ये मराठी वर्तमानपत्र मिळेल याची महाराष्ट्र नवनिर्माण सेना खात्री करेलच. परंतु प्रवाशांनी सुद्धा या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता सगळीकडेच मराठीचा आग्रह धरावा, असे मत मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केले. त्यांनी या आवाहनाचा एक विडिओ प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे.
मुंबई दि. २८ फेब्रु.: आज विधानभवनात अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काजू प्रक्रिया उद्योगासंदर्भात तसेच काजू बियांना अनुदान देण्यासंदर्भात आपण भूमिका मांडली असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
गोवा राज्य सरकारने काजू प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले आहेत, या निर्णयांच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील काजू उद्योग प्रक्रियेला चालना देण्यासाठी व काजूला चांगला भाव देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
गोवा राज्य सरकारने काजू प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले आहेत, या निर्णयांच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील काजू उद्योग प्रक्रियेला चालना देण्यासाठी व काजूला चांगला भाव देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी देखील यावेळी केली.
या सर्व मागण्या आणि सूचनांवर सखोल विचार करून त्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पणन, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी विभागातील उपस्थित अधिकाऱ्यांना दिले आहेत. महायुती सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून या संदर्भात गतिमानतेने कृती करून कोकणातील शेतकऱ्यांचे हित जपेल, असा विश्वास आहे.
या बैठकीला आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार योगेश कदम, आमदार राजेश पाटील, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
वाशी: नवी मुंबईतील वाशी येथील ए.पी.एम.सी. बाजारात साेमवारी काेकणातून पाच हजार पेट्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या. यामध्ये सर्वाधिक (६० टक्के) हापूस पेट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तर ४० टक्के रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील आहेत. बाजारात दाखल झालेल्या आंबा पेटीला सध्या दोन ते पाच हजार रुपये इतका भाव मिळत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा मोठ्या प्रमाणावर बाजारात येत आहे. त्या तुलनेने रत्नागिरीचे प्रमाण अल्प आहे. सध्या रात्री गारठा व दिवसा उष्मा, असे तापमान असले तरी शेतकरी तयार आंबा काढून विक्रीला पाठवू लागले आहेत सध्या बाजारात कर्नाटक हापूस, बदामी, लालबाग, तोतापुरी आंबा विक्रीसाठी येत आहे. हापूस ८० ते १७५ रुपये किलो, बदामी ६० ते १२० रुपये किलो, लालबाग १०० ते १४० रुपये किलो, तोतापुरी ६० ते ७० रुपये किलो दराने विकला जात आहे गेल्या दोन आठवड्यांपासून हापूस विक्रीसाठी येत आहे. या आठवड्यापासून आवक वाढली आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूसचे प्रमाण ६० टक्के आहे. उर्वरित ४० टक्के आंबा रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील आहे. आंब्याच्या वर्गवारी, दर्जानुसार दर आकारण्यात येत आहेत.
दक्षिण भारतात एक रेल्वे स्थानक आहे. जिथे दररोज 60 हून अधिक तिकिटे खरेदी केली जातात, परंतु प्रवासासाठी कोणीही त्यांचा वापर करत नाही. जर ते प्रवास करत नसतील तर ते तिकीट का घेतात असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर मग या प्रश्नाचे उत्तरही खाली वाचूया.
तेलंगणा राज्यात वारंगल जिल्ह्यातील नरसंपेटा मतदारसंघासाठी नेकोंडा रेल्वे स्टेशन हे एकमेव थांबा आहे. परंतु तिरुपती, हैदराबाद, दिल्ली आणि शिर्डी यांसारख्या महत्त्वाच्या शहरांना जाणाऱ्या गाड्या तिथे थांबत नाहीत, ज्यामुळे प्रवास करू इच्छिणाऱ्या रहिवाशांना अडचणी येतात. पद्मावती एक्स्प्रेसचा परतीचा प्रवासही रद्द करण्यात आला, त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली होती.
प्रवाशांच्या वारंवार विनंती केल्यामुळे अलीकडेच सिकंदराबाद ते गुंटूर या इंटरसिटी एक्स्प्रेसला नेकोंडा येथे तात्पुरता थांबा देण्यात आला. परंतु रेल्वे अधिकाऱ्यांनी एक अट घातली आहे: तीन महिन्यांसाठी उत्पन्न मिळाल्यासच ते पूर्ण थांबा देतील; अन्यथा, ते ते रद्द करतील.
मग काय? कसाबसा मिळालेला हा थांबा न गमावण्याचा निर्धार असलेले नेकोंडा येथील सर्व ग्रामस्थ एकत्र आले आणि त्याची त्यांनी ‘नेकोंडा टाउन रेल्वे तिकीट फोरम’ नावाचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला, ज्यामध्ये सुमारे 400 लोक सदस्य म्हणून सामील झाले. त्यांनी रु. 25 हजार रुपये देणगीद्वारे जमा केले. या रकमेतून ते याद्वारे ते नेकोंडा ते खम्मम, सिकंदराबाद आणि इतर ठिकाणी दररोज रेल्वे तिकीट खरेदी करतात मात्र प्रवास करत नाहीत.
स्थानकाला उत्पन्न दाखवण्यासाठी ते असे करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. स्टेशनवर अधिक गाड्या थांबवण्याच्या दिशेने काम करण्याची त्यांची योजना आहे.
गोवा वार्ता :कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांमध्ये आणि स्थानकांवर लुटमारीचे प्रकार वाढले आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव रेल्वे स्थानक परिसरातील प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर ४ अज्ञात युवकांकडून मारहाण करत एका युवकाला लुटण्याचा प्रकार घडला. त्यानंतर एटीएममधूनही पैसे काढायला भाग पाडून त्यांना लुटले. तक्रारीनंतर कोकण रेल्वे पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
मडगाव रेल्वेस्थानक परिसरात परराज्यांतून आलेले अनेक लोक वस्ती करतात. याचाच त्रास आता प्रवाशांना होत असून प्लॅटफॉर्मवर कुणीही नसल्याचे पाहून रात्रीच्या वेळेला लुटमारीचा प्रकार घडला आहे. वरीर चोरीची घटना २५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली होती. तक्रारदार मिथुन राज के. के. (३३, रा. केरळ) हे मडगाव रेल्वेस्थानकावरून स्वामी विवेकानंद रेल्वे हॉलिडे होम या ठिकाणी जात होते. प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वरून जात असताना फलाटावर कुणीही नसल्याची संधी साधून चार २० ते ३० वयोगटांतील युवकांनी त्यांना अडवले. त्यांनी मिथुन यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यांनी देण्यास नकार दिल्याने हाताच्या बुक्क्यांनी व थापटांनी त्यांना मारहाण करत त्यांच्या पाकिटातील १ हजार रुपये व रेल्वे ईमरजन्सी पास जबरदस्ती काढून घेतला. त्यानंतर मिथुनला बँक ऑफ इंडियाच्या एटीएमकडे नेत ५ हजार रुपये काढायला लावत त्या पैशांसह पाठीवरील पिशवी व त्यातील ६५० रुपये काढून घेतले.
वरील प्रकारानंतर मिथुन राज के. के. यांनी तक्रार नोंद केली. या तक्रारीला अनुसरून कोकण रेल्वे पोलिसांनी चार अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांच्यासह कोकण रेल्वे पोलीस तपास करत आहेत.
Maharashtra Budget 2024:आज उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात ४ लाख ९८ हजार ७५८ कोटी रुपयांची महसूली जमा आणि ५ लाख ८ हजार ४९२ कोटी महसूली खर्च दाखवण्यात आला आहे. तसेच राज्याची महसुली तूट ९ हजार ७३४ रुपयांची तर राजकोषीय तूट ९९ हजार २८८ कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात चार महिन्यांचे लेखानुदान मंजूरीसाठी ठेवण्यात आले आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कार्यक्रम खर्चाकरिता नियोजन विभागास ९ हजार १९३ कोटी, रोजगार हमी योजनेसाठी २ हजार २०५ कोटी, मराठी विभागासाठी ७१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १८ हजार १६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची वार्षिक योजना १ लाख ९२ हजार कोटी रुपयांची आहे. यासोबतच अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १५ हजार ८९३ कोटी रुपये, अदिवासी विकास उपयोजनेसाठी १५ हजार ३६९ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहे.
या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेने दिलेल्या दिशादर्शक अहवालानुसार आवश्यक धोरणांची अंमलबजावणीही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांकरिता मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विकास योजनांच्या अंमलबजावणीचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.
अर्थसंकल्पातील ठळक बाबी
मौजे वडज, तालुका जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय
युवक, महिला, गरीब आणि अन्नदाता या चार प्रमुख घटकांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी
स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत, विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार ठाणे शहरापर्यंत
विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गाकरीता भूसंपादनासाठी २२ हजार २२५ कोटी
पुणे चक्राकार वळण मार्गाकरीता भूसंपादनासाठी १० हजार ५१९ कोटी
जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनासाठी २ हजार ८८६ कोटी रुपये
सन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता नगरविकास विभागाला १० हजार ६२९ कोटी रुपये
सार्वजनिक बांधकाम (रस्ते) विभागाला १९ हजार ९३६ कोटी रुपये नियतव्यय
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ॲन्युईटी योजना भाग-२ अंतर्गत ७ हजार ५०० किलोमीटर रस्त्यांची कामे
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ मधील ७ हजार ६०० कोटी रुपये खर्चून ७ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती
कल्याण-मुरबाड, पुणे-नाशिक आणि सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन रेल्वे मार्गांचे भूसंपादन सुरु
फलटण-पंढरपूर, कांपा-चिमूर-वरोरा, जालना-जळगाव आणि नांदेड-बिदर या नवीन रेल्वे मार्गांकरिता ५० टक्के आर्थिक सहभाग
जालना-खामगाव, आदिलाबाद-माहूर-वाशिम, नांदेड-हिंगोली, मूर्तिजापूर-यवतमाळ शकुंतला रेल्वे आणि पुणे-लोणावळा मार्गिका ३ व ४ या रेल्वे मार्गांकरिता ५० टक्के आर्थिक सहभाग
वाढवण बंदर विकास प्रकल्पात महाराष्ट्र सागरी मंडळाचा २६ टक्के सहभाग- एकूण किंमत ७६ हजार २२० कोटी रुपये
सागरमाला योजनेअंतर्गत मुंबईत गेट वे ऑफ इंडियालगत रेडिओ क्लब सुसज्ज जेट्टीचे, २२९ कोटी २७ लाख रुपये किंमतीचे बांधकाम
भगवती बंदर, रत्नागिरी-३०० कोटी रुपये, सागरी दुर्ग जंजिरा, रायगड-१११ कोटी रुपये, एलिफंटा, मुंबई-८८ कोटी रुपये बंदर विकासाची कामे
मिरकरवाडा, रत्नागिरी बंदराचे आधुनिकीकरण-२ हजार ७०० मच्छीमारांना फायदा
छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या विस्ताराकरिता भूसंपादनासाठी ५७८ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी
सन २०२४ – २५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता ग्रामविकास विभागाला ९ हजार २८० कोटी रुपये
गृह-परिवहन, बंदरे विभागाला ४ हजार ९४ कोटी रुपये
उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी सुधारित औद्योगिक, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण उत्पादनाचे सुधारित धोरण तसेच नवीन सुक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम धोरण
१८ लघु-वस्त्रोद्योग संकुले स्थापन करुन सुमारे ३६ हजार रोजगार निर्मिती
“एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८” जाहीर-अंत्योदय शिधापत्रिकेवर एका कुटुंबास एका साडीचे मोफत वाटप
निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमात ४५० कोटी
निर्यातक्षम घटकांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी ४०० कोटी रुपये
निर्यात वाढीसाठी पाच इंडस्ट्रीयल पार्क
सामूहिक प्रोत्साहन योजनेतून आगामी वर्षात सुमारे सात हजार कोटी रकमेचा प्रोत्साहन निधी
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून २५ हजार उद्योग घटक -३० टक्के महिला उद्योजक -सुमारे ५० हजार नवीन रोजगार
थ्रस्ट सेक्टर तथा उच्च तंत्रज्ञानावर आधारित १० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक व चार हजार रोजगार निर्मिती करणाऱ्या १० अतिविशाल उद्योग घटकांना प्रणेता उद्योगाचा दर्जा- १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व २० हजार रोजगार निर्मिती
सन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता उद्योग विभागाला १ हजार २१ कोटी रुपये
सन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाला १ हजार ९५२ कोटी रुपये
अमृत २.० अभियानांतर्गत १४५ शहरांमधील २८ हजार ३१५ कोटीचे ३१२ प्रकल्प मंजूर
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान सन २०३० पर्यंत राबविण्यात येणार
महाअभियानात सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असून त्यांच्या वर्गीकरणानुसार शासनाकडून प्रकल्प किंमतीच्या ५० ते ९५ टक्के निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता
सन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला ३ हजार ८७५ कोटी रुपये नियतव्यय
दरवर्षी सुमारे २५ हजार किलोमीटर राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांच्या दोन्ही बाजूंना वृक्षलागवड
अटल बांबू समृध्दी योजना- १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड
जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत ५ हजार ७०० गावांमधील १ लाख ५९ हजार ८८६ कामांना मंजूरी
सन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाला २४५ कोटी रुपये
वन विभागास २ हजार ५०७ कोटी रुपये
मृद व जलसंधारण विभागास ४ हजार २४७ कोटी रुपये
शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा -मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० योजनेअंतर्गत ७ हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट
शेतकऱ्यांसाठी “मागेल त्याला सौर कृषि पंप” ही नवीन योजना- ८ लाख ५० हजार नवीन सौरकृषी पंप