Ganpati Special Bhajpa Express:दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त कोकणकरांसाठी भाजपतर्फे ‘भाजपा एक्सप्रेस’ चालविण्यात येणार असल्याची माहिती आज माजी खासदार निलेश यांनी एक्स X माध्यमातून दिली आहे.
यंदा गणेश चतुर्थीला कुडाळ आणि मालवणात जाणार्या मुंबईतील कोकणकरांना या गाडीचा लाभ घेता येईल. ही भाजपा एक्सप्रेस दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकावरून सुटणार असून तिची सेवा संपूर्णपणे मोफत आहे. इच्छुकांनी या गाडीच्या बूकिंग साठी ८६५७६७६४०४ व ८६५७६७६४०५ या क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन त्यांनी केले आहे.
Shaktipeeth Expressway Updates:महाराष्ट्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर पत्रादेवी शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाबद्दल एक महत्वाची अपडेट्स समोर येत आहे. या द्रुतगती मार्गावर आंबोलीजवळ पश्चिम घाटाखाली दोन मोठे बोगदे खोदले जाणार आहेत. या बोगद्यांची एकूण लांबी २१.९ किलोमीटर असणार आहे. हे काम पूर्ण झाल्यास तो देशातील सर्वात मोठा बोगदा ठरणार आहे.
महामार्गाची फेरआखणी
नागपूर-गोवा हा प्रस्तावित महामार्ग जवळपास ८०२ किलोमीटरचा आहे. हा महामार्ग १२ जिल्ह्यामधून जाणार आहे. यामध्ये १२ जिल्ह्यातील जवळपास २७ हजार हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. हा महामार्ग रद्द करण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक नेत्यांनी केली होती. तसेच या महामार्गामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होणार असल्याची भावना अनेकांनी बोलून दखवली आहे. त्यामुळे नागरिकांचे हित लक्षात घेता हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. या महामार्गाच्या झालेल्या विरोधानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठलाही प्रकल्प जनतेवर थोपणार नाही अथवा रेटून नेणार नाही असे आश्वासन दिले आहे. शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात ज्या ठिकाणी विरोध आहे, त्याची फेरआखणी करता येईल का? याचाही विचार करीत आहोत. मात्र जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही प्रकल्प पुढे नेणार नाही”, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.
आंबोली: पुणे हिंजवडी येथे सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकून पळालेले चोरीतील तीन आरोपी आंबोली पोलीसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पकडले असून त्यांना सावंतवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ते गोवा येथून पुणे येथे चालले असल्याची माहिती आहे .त्यांच्याकडून दोन रिव्हॉल्व्हर आणि जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. आंबोली पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई, हवालदार सुमित पिळणकर,पोलिस दिपक शिंदे, पो . अभिजित कांबळे आणि उत्तम नार्वेकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना शिताफीने पकडले
पुणे-हिंजवडी येथील सराफी पेढीवर दरोडा टाकून पसार झालेल्या तीन संशयित आरोपींना आज सावंतवाडी पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ६ ऑगस्टपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अल्ताफ खान -वय २४, राजस्थान , गोविंद दिनवाणी – वय २२ वर्षे ,राजस्थान , राजुराम बिष्णोई वय – २६ राजस्थान अशी त्यांची नावे आहेत. काल सायंकाळी आंबोली पोलिसांनी आंबोली घाटात पूर्वीचा वस मंदिराजवळ या तीन आरोपींना दोन रिव्हॉल्व्हर ,आठ जिवंत काडतुसांसह जेरबंद केले होते. त्यावेळी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा त्यांनी प्रयत्न करत या संशयित आरोपींनी पोलिसांना चेक पोस्टवर गुंगारा देत चकवा देण्याचा प्रयत्न देखील केला होता. परंतु , पोलिसांनी शिताफीने त्यांना अखेर जेरबंद केले
Konkan Railway News:रेल्वे प्रशासनाने सामान्य प्रवाशांचा विचार करायला सुरवात केली असून काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत . त्याचाच एक भाग म्हणून इतर श्रेणीच्या डब्यांचे रूपांतर आता जनरल डब्यात करण्याचा सपाटा भारतीय रेल्वेने लावला आहे. २२ ते २४ डब्यांच्या एक्सप्रेस गाडीला किमान ४ डबे जनरल असावेत याची दक्षता घेतली जात आहे. कोकण रेल्वे मार्गावरीलही गाडयांच्या जनरल डब्यांत वाढ करण्यात येत असून लांब काही गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात येत आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्ध पत्रकानुसार खालील ६ गाड्यांच्या जनरल डब्यात वाढ करण्यात आली आहे.
सध्याची रचना: टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०६, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०३, स्लीपर – ०७, जनरल – ०२, पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ LHB कोच
सुधारित रचना: टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०५, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०२, स्लीपर – ०७, जनरल – ०४, पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ LHB कोच
या गाडीच्या एका थ्री टियर एसी आणि एका थ्री टियर एसी इकॉनॉमी अशा २ कोचचे रूपांतर जनरल डब्यांत केले गेले आहे. दिनांक १९ डिसेंबर २०२४ पासून हा बदल अंमलात आणला जाईल.
2) १६३१२/ १६३११ कोचुवेली – श्रीगंगानगर -कोचुवेली एक्सप्रेस
सध्याची रचना: टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०५, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०३, स्लीपर – ०६, जनरल – ०३, पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ LHB कोच
सुधारित रचना: टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०४, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०३, स्लीपर – ०६, जनरल – ०४, पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ LHB कोच
या गाडीच्या एका थ्री टियर एसी कोचचे रूपांतर जनरल कोचमध्ये केले गेले आहे. दिनांक ०७ डिसेंबर २०२४ पासून हा बदल अंमलात आणला जाईल.
सध्याची रचना: टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०६, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६, जनरल – ०२, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१ असे मिळून एकूण २२ LHB कोच
सुधारित रचना: टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०५, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०३, स्लीपर – ०६, जनरल – ०४, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१ असे मिळून एकूण २२ LHB कोच
या गाडीच्या एका थ्री टियर एसी आणि एका थ्री टियर एसी इकॉनॉमी अशा २ कोचचे रूपांतर जनरल डब्यांत केले गेले आहे. दिनांक ०६ डिसेंबर २०२४ पासून हा बदल अंमलात आणला जाईल.
Special Train Request for Independence day: स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधननिमित्त १५ ते १९ ऑगस्ट पर्यंत मुंबई आणि सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या सर्व गाड्यांना भलीमोठी प्रतीक्षा यादी लागलेली आहे. १४ ऑगस्ट, २०२४ च्या रात्रीपासूनच्या गाड्यांना लागलेला रिग्रेट संदेश हा अनावर गर्दीचा निदर्शक आहे. तसेच, शुक्रवार, शनिवार, रविवार अशा लागून आलेल्या सुट्टीमुळे गाड्यांमध्ये गर्दी होणार यात शंका नाही.२६ जानेवारीला लागून आलेल्या सुट्टीच्यावेळी जादा गाड्या न सोडल्यामुळे आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांनी एसी डब्यांतही गर्दी केलेली आपण पहिली आहे. हा मागील अनुभव पाहता त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुंबई आणि सावंतवाडी दरम्यान स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधननिमित्त विशेष गाड्या सोडाव्यात असे विनंतीवजा निवेदन कोकण विकास समिती तर्फे संस्थापक सदस्य जयवंत दरेकर यांनी ईमेलद्वारे सबंधित रेल्वे प्रशासनाला केले आहे.
सिंधुदुर्ग, दि.०३ ऑगस्ट; जिल्ह्यातील मूर्तिकलेला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने मदतीचा हात पुढे केला आहे.सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत यावर्षी मूर्तिकारांना मूर्तिकाम व्यवसायाकरिता ७५% अनुदान अथवा कमल ५०,००० रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेच्या ग्रामपंचात विभागाने जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना लाभार्थ्यांची यादी दिनांक १० ऑगस्ट २०२४ रोजी पर्यंत बनवून ती १२ ऑगस्ट २०२४ पर्यंत संबंधित जिल्हापरिषद कार्यालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
मूर्तिकला टिकवून ठेवण्यासाठी मूर्तिकारांना अनुदान जाहीर करण्याची मागणी होत होती. शाडू माती, रंग आणि मजुरीचे वाढलेले दरामुळे मूर्तिकलेवर विपरीत परिणाम होत होता. या निर्णयाने जिल्हयातील मूर्ती व्यवसायीकांना दिलासा मिळणार आहे. हा लाभ मिळवण्यासाठी दिनांक १० ऑगस्ट २०२४ पर्यंत गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे अर्ज करावा लागणार आहे. अर्जात नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक ही माहिती भरून ग्रामपंचातीचा ना हरकत दाखला,गणेश मूर्तिकार व्यवसाय करत असल्याचे ग्रामपंचातीचे प्रमाणपत्र, ज्या जागेत व्यवसाय करत आहे त्या जागेचा घरपत्रक उतारा, गणेशमूर्ती बनवत असल्याचा फोटो, आधार कार्ड, पॅनकार्ड आणि बँक पासबुकची प्रत ही कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे. अर्जाचा नमुना या बातमीच्या खाली दिला आहे.
मुर्तीकारांना मुर्तीकाम व्यवसायाकरीता सहाय्य करणे अर्ज नमुना.pdf
Konkan Railway News: भारतीय रेल्वेने अलीकडे सर्वसामान्य प्रवाशांचा विचार करण्यास सुरु केला असून त्यांच्यासाठी काही हिताचे निर्णय घेत आहे. जनरल डब्यांत होणारी गर्दी विचारात घेऊन रेल्वेने काही गर्दीच्या मार्गावरील इतर श्रेणीच्या डब्यांचे रूपांतर जनरल डब्यांत करण्याचा सपाटा लावला आहे. त्याचाच भाग म्हणून कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात येणार आहे.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात येणार आहे.
1) गाडी क्रमांक ११०९९ / १११०० लोकमान्य टिळक (T) – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (T) एक्सप्रेस
सध्याची रचना: फर्स्ट एसी – ०१, टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०६, स्लीपर – ०८, जनरल – ०२, पॅन्ट्री कार – ०१,एसएलआर – ०१,जनरेटर कार – ०१ असे मिळून एकूण २२ LHB कोच
सुधारित रचना: फर्स्ट एसी – ०१, टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०६, स्लीपर – ०६, जनरल – ०४, पॅन्ट्री कार – ०१,एसएलआर – ०१,जनरेटर कार – ०१ असे मिळून एकूण २२ LHB कोच
या गाडीच्या दोन स्लीपर कोचचे रूपांतर जनरल डब्यांत केले गेले आहे. दिनांक ०१ डिसेंबर पासून हा बदल अंमलात आणला जाईल.
2) गाडी क्रमांक. २२११३ /२२११४ लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस
सध्याची रचना: टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०७, स्लीपर – ०९, जनरल – ०३ जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ LHB कोच
सुधारित रचना: टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०६, स्लीपर – ०८, जनरल – ०४, जनरेटर कार – ०१ आणि एसएलआर – ०१ असे मिळून एकूण २२ LHB कोच
या गाडीच्या एका स्लीपर कोचचे रूपांतर जनरल डब्यात केले गेले आहे, टू टियर एसीचा एक डबा वाढविण्यात आला आहे. तर थ्री टियर एसीचा एक डबा कमी करण्यात आला आहे. दिनांक ३० नोव्हेंबर पासून हा बदल अंमलात आणला जाईल
वाचकांचे व्यासपीठ: खरेतर देशाला आपले सर्वस्व समर्पित केलेल्या महान नेत्यांची तुलना करणे चुकीचे आहे. मात्र जेव्हा एखाद्या नेत्याच्या कर्तृत्वाचा सन्मान होत नाही, त्याची अवहेलना केली जाते तेव्हा नाईलाजाने त्या व्यक्तीने केलेल्या कार्याचे महत्व पटवून देण्यासाठी ही तुलना होतेच.
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर या दोन्ही कालखंडात प्रा. मधु दंडवते यांचे देशासाठी दिलेले योगदान अतुलनीय असेच आहे. १९४२ च्या चळवळीमध्ये त्यांनी आणि त्यांच्या पत्नी प्रमिला दंडवते यांनी आंदोलनात भाग घेऊन स्वातंत्र्यासाठी योगदान दिले आणि करावासही भोगला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोवा सत्याग्रहामध्येसुद्धा त्यांनी भाग घेतला होता त्यादरम्यान त्यांना पोर्तुगीज पोलिसांकडून एवढी मारहाण झाली की त्यांच्या शरीरातली हाडे मोडली होती व त्या जागी स्टीलच्या पट्या घातल्या होत्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनामध्ये दोघा पती पत्नीने आपले योगदान देऊन कारावास भोगला होता. देशात जेव्हा आणीबाणी जाहीर झाली होती तेव्हा लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांना अटक झाली होती. त्यात अटकेत प्रा. मधु दंडवते
आणि त्यांच्या पत्नींचाही समावेश होता.
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या त्यागासाठी आणि देशसेवेसाठी भारतरत्न देऊन गौरवण्यात आले. त्यांनी केलेली देशसेवेबद्दल तिळमात्र शंका नाही. मात्र त्यांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्तच देशसेवा केलेल्या मधू महानेत्याच्या त्यागाचा, कार्याचा सन्मान होणे गरजेचे आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी फक्त आणीबाणी मध्ये तुरुंगवास भोगला परंतु प्रा. मधु दंडवते यांनी स्वातंत्र्य चळवळीसह गोवा सत्याग्रह संयुक्त महाराष्ट्र आंदोलन यामध्ये तुरुंगवास भोगला मग प्रा. मधु दंडवते यांना भारतरत्न का दिला जाऊ नये?
केंदीय रेल्वे मंत्री असताना त्यांनी भारतीय रेल्वेमध्ये अमुलाग्र बदल केलेत. ६ डब्याच्या ऐवजी २२ डब्याच्या मेल एक्सप्रेस सुरू करून तिकिटांचा होणारा काळाबाजार त्यांनी रोखला. भारतीय रेल्वेच्या प्रत्येक गाडीला वेगळे नाव देण्याची सुरवात त्यांनीच केली. त्याची सुरुवात पहिली कलकत्त्या वरून मुंबईला येणाऱ्या ” गीतांजली” एक्सप्रेस या नावाने सुरुवात झाली. विशेष म्हणजे, त्यांनी दुय्यम दर्जाच्या स्लीपर कोचच्या प्रवाशांसाठी, अधिक आरामदायी प्रवासासाठी विद्यमान लाकडी बर्थ बदलून, उशी असलेले बर्थ सुरू केले. सुरुवातीला प्रमुख ट्रंक लाईन्समध्ये लागू केले जात असताना, 1980 च्या दशकाच्या अखेरीस सर्व गाड्यांमध्ये त्यांच्या द्वितीय श्रेणीच्या डब्यांमध्ये हे पॅड बर्थ होते. कोकण रेल्वे प्रत्यक्षात येण्यासाठी प्रा. मधु दंडवतेंनी रेल्वेमंत्री म्हणून सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पातच तरतूद केली. कोकण रेल्वे प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यांचे योगदानही सर्वश्रुत आहे.
एवढं मोठे भारताला योगदान देणाऱ्या या तपस्वी देशभक्ताला त्याच्या मृत्युपश्चात जर भारतरत्न देता येत नसेल तर किमान सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे टर्मिनस म्हणून तात्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलेल्या या टर्मिनस चे काम पूर्ण करून त्याला मधु दंडवते टर्मिनस असे नाव देण्यात यावे अशी मागणी मागील ३ वर्षांपासून मोठ्याप्रमाणात होत आहे. मात्र या मागणीला वेळोवेळी केराची टोपली दाखवली जात आहे. भारतरत्न पदासाठी योग्य असलेल्या एका महानेत्याची मरणोत्तर अशी अवहेलना होत असेल तर त्यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते?
स्वातंत्र्य चळवळीसह गोवा सत्याग्रह आणीबाणी मध्ये सहभाग घेणाऱ्या प्रमिला दंडवते यांनी महिला आयोगाची स्थापना करून संपूर्ण भारतातील महिलावर खूप मोठे उपकार केले आहे त्यांच्याही यथोचित सन्मान व्हावा असे मी जाहीर पत्रकाद्वारे मागणी करीत आहे विलंबित सावंतवाडी टर्मिनस चे काम लवकरात लवकर पूर्ण करून त्या टर्मिनसला मधु दंडवते यांचे नाव देण्यात यावे. हे वर्ष प्रा. मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे तरी येत्या २१ जानेवारी २०२५ रोजी मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता आहे तरी लवकरात लवकर सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम पूर्ण करून २१ जानेवारी २०२५ पुर्वी मधु दंडवते टर्मिनस असे नामांतर करून या थोर विभूतीला आदरांजली अर्पण करावी
श्री. सुरेंद्र हरिश्चन्द्र नेमळेकर संस्थापक सदस्य – कोकण रेल्वे, सल्लागार- सखांड कोकण रेल्वे सेवा समिती
Konkan Railway Updates: कोकणकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने दुसऱ्या टप्प्यात सोडलेल्या गणपती स्पेशल गाड्यांच्या आरक्षणाची तारीख जाहीर केली आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार गाडी क्रमांक ०१०३२, ०१४४८ , ०१४४४ , ०१४४६ आणि ०१४४२ साठी बुधवार दिनांक ०७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC संकेतस्थळावर चालू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
या गाड्यांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील बातमी वाचावी
Changes in Ganpati special trains:गणपती उत्सवासाठी सोडण्यात आलेल्या काही विशेष गाड्यांना पेण आणि झाराप येथे अतिरिक्त थांबे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी विशेष गाड्यांना या स्थानकांवर थांबे न दिल्याने प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती व या स्थानकांवर थांबे देण्यात यावे अशी मागणी केली गेली होती. सुबक गणेशमूर्ती साठी प्रसिद्ध असलेल्या पेण स्थानकावर गणपती विशेष गाड्यांना थांबा न देणे हा मोठा विरोधाभास म्हणावे लागेल. दुसरीकडे फक्त एका नियमित गाडीला थांबा असलेल्या झाराप स्थानकावर किमान विशेष गाड्यांना तरी थांबे मिळावेत अशी मागणी झाली आहे. त्याप्रमाणे रेल्वे प्रशासनाने खालील गाड्यांना येथे थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक क्र. ०११५१/०११५२ मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी रोड – मुंबई सीएसएमटी विशेष या गाडीला पेण आणि झाराप येथे
गाडी क्रमांक ०११५३/०११५४ मुंबई सीएसएमटी – रत्नागिरी – मुंबई सीएसएमटी विशेष या गाडीला पेण येथे
गाडी क्रमांक ०११६७/०११६८ लोकमान्य टिळक (टी) – कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण येथे
गाडी क्रमांक ०११८५/०११८६ लोकमान्य टिळक (टी) – कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण येथे
गाडी क्रमांक ०११६५/०११६६ लोकमान्य टिळक (टी)- कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण येथे
गाडी क्रमांक ०११७१/०११७२ लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण आणि झाराप येथे
गाडी क्रमांक ०९००९/ ०९०१० मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल स्पेशल या विशेष गाडीला झाराप येथे थांबे देण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे खालील दोन विशेष गाड्यांच्या सेवेच्या कालावधीत काही बदल करण्यात आले आहेत.
गाडी क्र. ०११५४ रत्नागिरी – मुंबई सीएसएमटी आणि गाडी क्र. ०११६८ कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या दोन्ही गाड्यांचा कालावधी ०२/०९/२०२४ ते १९/०९/२०२४ असा सुधारित करण्यात आला आहे. याआधी तो ०१/०९/२०२४ ते १८/०९/२०२४ असा होता.
प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.