Category Archives: रत्नागिरी

रत्नागिरीत एक मोठा आंतरराष्ट्रीय प्रकल्प येण्याच्या बेतात

रत्नागिरी: जिल्ह्यात आणखी एक मोठा प्रकल्प येण्याची शक्यता आहे. एप्रिल एशिया कंपनी असे त्याचे नाव आहे. उच्च दर्जाचे टिश्यू बनवणारी ही सिंगापूरमधील कंपनी आहे. हे टिश्यू कंपनी निर्यात करते. त्यासाठी किनारपट्टी भागात सुमारे दोन हजार एकर जागा कंपनीला अपेक्षित असून, १० हजार कोटीची गुंतवणूक करण्यास तयार आहे. यामुळे रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.
कच्चा माल आणण्यास सोपे जात असल्याने जिल्ह्याच्या किनारपट्टीजवळच्या जागांना मोठी मागणी आहे. जिल्ह्यातील सहाही एमआयडीसींमधील जागा शिल्लक नसल्याने नव्या उद्योगांसाठी ही एक अडचण निर्माण झाली आहे; परंतु काही नव्या एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्या अनुषंगाने नवे उद्योग येण्यास तयार झाले आहेत.(Latest Marathi News)
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील जिल्ह्यातील बंद पडलेल्या काही उद्योगांची धडधड पुन्हा सुरू केली आहे. नवे उद्योग यावे यासाठी स्टर्लाईटची मोठी जागा एमआयडीसीला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत तसेच जेके फाइल्सच्या जागेतही नवा उद्योग आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. उद्योगांना सहज गुंतवणूक करता यावी यासाठी राज्य शासनानेही आपले उद्योग धोरण बदलून त्यामध्ये गतिमानता आणली आहे.
त्यामुळे सिंगापूरची एप्रिल एशिया कंपनी जिल्ह्यात १० हजार कोटींची गुंतवणूक करण्यास तयार झाली आहे. हे टिश्यू विमानात व अन्य ठिकाणी वापरले जातात. हे टिश्यू निर्यात केले जाणार असल्याने बंदराच्या ठिकाणी जागा मिळाल्यास त्याला कंपनी अधिक प्राधान्य देणार आहे. 

Loading

अबब! गरवताना गळाला लागला चक्क २० किलोचा मासा

राजापूर: फावल्या वेळात गरवून मासे पकडणे हा बऱ्याच जणांचा आवडता छंद. तीन ते चार तास गरवून फक्त कालवणापुरते मासे भेटले तरी पुरे असे म्हणून वेळ घालवणारे पण तुम्ही पहिले असतील. पण एक कल्पना करा गरवताना एक दोन किलो नाही तर चक्क २० किलोचा मासा गळाला लागला तर? तुमची प्रतिक्रिया काय असेल?
हो असे झाले आहे.. बाकाळे गावातील राहुल वामन राऊत याला समुद्रकिनारी गरवताना काल चक्क 20 किलो वजनाचा कोकेर मासा गळाला लागला आहे. त्याने तो साखरी नाटे येथील विक्री केंद्रावर नेऊन विकला त्याला 180 रुपये किलोचा दर मिळाला आहे. म्हणजे त्याला एकूण या माशापासून  3600 रुपये इतका फायदा झाला आहे.
मजुरीची कामे करून चा उदरनिर्वाह करणारा राहुल फावल्या वेळात संध्याकाळी कामावरून सुटल्यावर बाकाळे परिसरातील समुद्रा जवळच्या कड्यावर मासे गरवण्यासाठी जात असतो. त्याच्यासारखे बरेच तरुण  युवक लोखंडी रॉड म्हणजेच गरीच्या साह्याने मासेमारी करताना दिसतात. 

Loading

मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा येथे अपघात; १ ठार, २ जण जखमी

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील पुलावर कंटेनर आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.
राजन बाबल्या डांगे (40, रा. हातखंबा, रत्नागिरी ) हा लाद्याची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोच्या हौद्यात बसलेला होता. या अपघातामुळे त्याच्या अंगावर लाद्या पडून त्याचा मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.या अपघातामुळे वाहतूक खोळंबली असून अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्याना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु होते.

Loading

चिपळूण पूल दुर्घटना: समितीकडून अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल – सा. बा. मंत्री रविन्द्र चव्हाण

चिपळूण : सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज पहाटे चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे भेट देऊन, मुंबई गोवा महामार्गावरील कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी केली. पूल कोसळणं ही दुर्देवी घटना आहे. यामध्ये कोणतीही हानी झाली नाही, हे फार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या श्री. गुप्ता, श्री. सिन्हा व श्री. मिश्रा या तिघाजणांच्या तज्ज्ञ समितीकडून तपासणी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे काल कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी आज पहाटे केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, तहसीलदार प्रवीण लोकरे, माजी आमदार सदानंद चव्हाण, राजेश सावंत आदी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, काल झालेली घटना ही दुर्देवी आहे. दोन किलोमीटरचा हा पूल आहे. ही घटना कशामुळे झाली, हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्गाची असणारी तिघा तज्ज्ञ लोकांची समिती याची तपासणी करुन, अहवाल देईल.

Loading

गवा रेड्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या वारसांकडे वीस लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्त

रत्नागिरी : एप्रिल महिन्यात गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या वारसांना वीस लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश शासनाच्या वतीने देण्यात आला आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर ही मदत शासनाकडून देण्यात आले आहे.
चिपळूण तालुक्यातील तळसरगावातील तुकाराम बडदे यांच्यावर २३ एप्रिल २०२३ रोजी गवा रेड्याने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्यात ते गंभीर प्रमाणात जखमी झाले होते. त्यांच्यावर अपरांत हॉस्पिटल, चिपळूण येथे सात ते आठ दिवस उपचार सुरु होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे. मृत व्यक्तीच्या वारसांना शासनाच्यावतीने दिली जाणारी मदत तातडीने मिळावी यासाठी आमदार शेखर निकम व वन विभागाचे अधिकारी यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर २० लाख रुपयांची मदत शासनाकडून प्राप्त झाली. प्राप्त झालेली मदत मृताच्या वारसांना आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. यावेळी वन विभागीय अधिकारी दिपक खाडे, वनपाल चिपळूण राजेश्री किर, सहाय्यक वनरक्षक वैभव बोराटे, वनपाल चिपळूण दौलत भोसले, वनक्षेत्रपाल रामपूर राजाराम शिंदे, वनरक्षक कोळकेवाडी राहुल गुंठे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, प्रदेश सचिव जयंत खताते, तालुकाध्यक्ष अबु ठसाळे, मिडीयाध्यक्ष सचिन साडविलकर उपस्थित होते.

Loading

Mumbai Goa Highway | कामाचा वेग वाढवला; पण दर्जाचे काय? जयंत पाटील यांचा सरकारला सवाल

मुंबई : मुंबई गोवा महामार्गावरच्या उड्डाण पुलाचा भाग आज सकाळी तुटला आहे. या अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. मुंबई – गोवा महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत सरकारने खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देखील लिहिलं आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई – गोवा महामार्गाचं काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. परंतु, काम जरी वेगात सुरू असलं तरी ते अत्यंत निकृष्ट पद्धतीने होत असल्याचा अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. कामाचा वेग वाढवताना गुणवत्तेशी शासनाने तडजोड केली आहे का? असा प्रश्न सर्वसामान्याच्या मनात निर्माण होत आहे, असं जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
सदर उड्डाणपुलाच काम निकृष्ट असल्याचा आरोप अनेक वेळा येथील स्थानिक नागरिकांनी केला होता. परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास येत आहे. वरील घटना नागरिकांच्या दाव्यात तथ्य असल्याचे दाखवून देत आहे.तरी सदरील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून महामार्गाच्या कामाच्या दर्जाचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत परीक्षण करण्यात यावे. तसेच, या घटनेची चौकशी करण्यात येऊन कंत्राटदार व अन्य दोषीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
या घटनेबाबत त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर एक ट्विट पोस्ट सुद्धा केली. या पोस्ट मध्ये ते म्हणाले

“मुंबई गोवा महामार्गावर बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा भाग कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित असा या महामार्गाच्या गुणवत्तेबाबत देखील प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. वेग वाढवून कामाचा दर्जा घसरवला आहे का? सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कामाच्या गुणवत्तेबाबत सरकारने खुलासा करावा. कोकणवासियांच्या डोळ्यात सरकारकडून केली जाणारी धूळफेक थांबवा.”

 

 

Loading

मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाचा गर्डर तुटला; दुर्घटनेचा थरारक व्हीडिओ व्हायरल

बांधकामाच्या दर्जाविषयी प्रशचिन्ह उपस्थित
चिपळूण :मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असेलेल्या उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील उड्डाणपुलाचा गर्डर तुटण्याचा प्रकार घडला आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेला नाही. मात्र, महाकाय लाँचरचे काही भाग तुटल्यानं मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.या दुर्घटनेचा थरारक व्हीडिओ देखील समोर आला आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यादरम्यान बांधकाम सुरू असताना अचानक मोठा आवाज होऊन पुलाचा काही भाग तुटल्याचा प्रकार घडला आहे. यादरम्यान पुलाच्या खाली नागरिकांची एकच पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारस ही घटाना घडली. गेल्या अनेक महिन्यांपासून या फ्लायओव्हरचे काम सुरु आहे.
पुलाचा काही भाग कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पूल कोसळला तेव्हा स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला अशी माहिती घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिली. घटनेनंतर स्थानीक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.

Loading

राजापूर पोस्ट ऑफिसमध्ये रेल्वे आरक्षणाची सुविधा

राजापूर : राजापूर पोस्ट ऑफिस येथे ग्राहकांसाठी रेल्वे आरक्षण सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ रेल्वे प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे. राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे औचित्य साधून रेल्वे तिकीट आरक्षण सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. राजापूर तालुक्यातील व इतर जवळच्या भागातील रेल्वे प्रवाशांसाठी आरक्षण सुविधा राजापूर पोस्ट ऑफिस येथे सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात रत्नागिरी हेड ऑफिस, लांजा, संगमेश्वर या पोस्ट ऑफिसमध्ये भारतीय रेल्वे व भारतीय डाक विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वे तिकीट आरक्षण सुविधा राजापूर पोस्ट ऑफिसमार्फत मिळावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी, विद्यार्थी, नोकरदार व लोकप्रतिनिधी यांच्याकडून होत होती. ही सेवा पोस्ट विभागाच्या पुढाकाराने सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Loading

आज आणि उद्या कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

Rain Alert :आज दिनांक 30 सप्टेंबर आणि उद्या दिनांक 01 ऑक्टोबर रोजी कोकणात जोरदार पावसाचा, तर उर्वरित राज्यात जोरदार वारे विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.मॉन्सूनची परतीची सीमा कायम असून, दोन ते तीन दिवसांत वायव्य भारताच्या आणखी काही भागातून मॉन्सून माघारी फिरण्याची शक्यता आहे. कर्नाटक किनारपट्टीच्या भागात वाऱ्यांचे पूर्व-पश्चिम जोडक्षेत्र कायम आहे. तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती टिकून आहे. बंगालचा उपसागरासह अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे.राज्यात जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळत आहे.

आज आणि उद्यासाठी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,कोल्हापूर या भागात अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट तर सातारा, रायगड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Loading

Guhagar: गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव टेम्पो शिरल्याने मोठा अपघात; २ ठार तर १५ जखमी

रत्नागिरी : जिल्ह्यात गुहागर तालुक्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणूकीत एक मोठी दुर्घटना घडली आहे. ब्रेक फेल झाल्याने एक टेम्पो गणेश विसर्जन मिरवणूक शिरल्याने झालेल्या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे गणेश मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीला गालबोट लागले आहे.
कोमल नारायण भुवड (वय १७) आणि दीपक लक्ष्मण भुवड (वय ४८) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. अपघातात मृत्यू झालेले हे दोघेजण व जखमी झालेले गणेशभक्त हे सगळे पाचेरी आगर येथील भुवडवाडी येथे राहणारे आहेत.गुहागर तालुक्यात पाचेरी आगर येथे अनंत चतुर्दशीनिमित्त गणपती विसर्जन मिरवणूक सुरू होती. दुर्दैवाने विसर्जन मिरवणूक सुरू असताना टेम्पोचे ब्रेक फेल झाले आणि टेम्पो उताराच्या दिशेने पुढे जाऊ लागला. हा प्रकार टेम्पो ड्रा यव्हरच्या लक्षात येताच त्यांनी टेम्पो मधून उडी मारून टेम्पो थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्या ड्रायव्हरच्या अंगावरून टेम्पो गेला. तसेच समोर नाचत असलेल्या भाविकांना या टेम्पोची जोरदार धडक बसली. या दुर्दैवी घटनेत टेम्पोमध्ये बसलेल्या १७ वर्षीय मुलीच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. यामधील जखमी झालेला चालक दीपक याला जवळच्या आबलोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक उपचाराकरिता त्याला डेरवण येथे नेण्यातयेत होते. मात्र वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search