Category Archives: देश

Video : लवकरच चालू होणाऱ्या नवीन ‘केशरी’ रंगाच्या वंदे भारत एक्सप्रेसची एक झलक

New Vande Bharat Express : अलीकडेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी चेन्नईतील एकात्मिक कोच फॅक्टरीला भेट दिली होती. त्यांनी नवीन रेकची पाहणी केली आणि घोषणा केली की भगव्या रंगाची सेमी-हायस्पीड ट्रेन भारताच्या तिरंग्यापासून प्रेरित आहे. आता प्रथमच वंदे भारत एक्सप्रेस ICF उत्पादन युनिटच्या बाहेर रेल्वे रुळांवर आदळल्याचे दिसून आले आहे. नवीन भगवी वंदे भारत एक्सप्रेस अद्याप कार्यरत नाही आणि सध्या ती ICF येथे आहे, जिथे वंदे भारत गाड्या तयार केल्या जातात, असे ANI ने वृत्त दिले आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी यापूर्वी जाहीर केले होते की, भारतीय-निर्मित अर्ध-हाय-स्पीड वंदे भारत एक्स्प्रेसचा 28वा रेक ‘भगवा’ रंगाचा असेल. एकूण 25 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सध्या भारतात कार्यरत आहेत, तर पारंपारिक पांढर्‍या आणि निळ्या रंगातील आणखी दोन वंदे भारत रेक आधीच तयार केले गेले आहेत. “या 28 व्या रेकचा रंग चाचणीच्या आधारावर बदलला जात आहे,” ते म्हणाले.
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी 28 वा रेक कार्यान्वित होईल अशी अपेक्षा होती. तथापि, नंतरच्या अहवालांनी सुचवले की नवीन केशर-ट्रेनचे उद्घाटन 19 ऑगस्ट ही तारीख असेल. तथापि, यास आणखी विलंब झाला आहे आणि तो प्रवाशांचा पहिला संच कधी घेऊन जाईल याबद्दल कोणतीही अधिकृत बातमी नाही. केंद्रीय मंत्र्याने आधी सांगितले की स्वदेशी ट्रेनच्या 28 व्या रेकचा नवीन रंग “भारतीय तिरंग्यापासून प्रेरित” आहे. ते म्हणाले की, वंदे भारत ट्रेनमध्ये 25 सुधारणा करण्यात आल्या आहेत. ही मेक इन इंडियाची संकल्पना आहे, (ज्याचा अर्थ) भारतात आमच्या स्वत:च्या अभियंत्यांनी आणि तंत्रज्ञांनी डिझाइन केलेली आहे. त्यामुळे वंदेच्या ऑपरेशनदरम्यान एसी, टॉयलेट इत्यादींबाबत फील्ड युनिट्सकडून आम्हाला जे काही फीडबॅक मिळत आहेत. भारत, त्या सर्व सुधारणांचा वापर रचनेत बदल करण्यासाठी केला जात आहे,” वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Loading

लेहमध्ये सैन्याच्या ताफ्यातील ट्रकला अपघात; ९ जवानांचा मृत्यू

लडाख : लेहमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. भारतीय सैन्याच्या एका ट्रकचा भीषण अपघात झालाय. या ट्रकमध्ये 2 ज्युनियर कमिशन ऑफिसर आणि 7 जवान होते. क्यारी शहरापासून 7 किमी अंतरावर अपघाताची दुर्घटना घडली. भारतीय सैन्याचं ट्रक थेट दरीत कोसळलं. या दुर्घटनेत गाडीतील सर्व 9 जवानांचा मृत्यू झाला. हे सर्व जवान कारु गॅरीसन येथून लेहच्या क्यारी शहाराच्या दिशेला जात होते. यादरम्यान ही दुर्घटना घडली.

भारतीय सैन्याची एक रुग्णवाहिका आणि आणखी काही वाहनं क्यारी शहाराच्या दिशेला जात होती. या दरम्यान एका ट्रकचा भीषण अपघात झाला. ट्रक थेट दरीत कोसळला. या अपघातात ट्रकमधील सर्व 9 जवान शहीद झाले. एकूण 34 जवान क्यारी शहराच्या दिशेला जात होती. त्यापैकी 9 जणांचा दुर्देवी अपघातात मृत्यू झालाय.

भारतीय सैन्याचा ताफा लेहच्या न्योमा येथून क्यारीच्या दिशेला जात होता. या दरम्यान घाटात संध्याकाळी पावणे सहा ते सहा वाजेच्या दरम्यान अपघाताची घटना घडली. सैन्याच्या ताफ्यातील एक ट्रक थेट दरीत कोसळलं. या ट्रकमध्ये 10 जण होते. त्यापैकी 9 जणांचा मृत्यू झालाय.

 

 

 

Loading

वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकिटाचे दर निम्म्याने कमी होणार; रेल्वे करणार ‘हा’ बदल..

Vande Bharat Express News :वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास महाग, ती फक्त श्रीमंतासाठी बनवण्यात आली आहे अशी टीका नेहमीच वंदे भारत ट्रेन विरोधात केली जात आहे. या टीकेला सरकारने गांभीर्याने घेतले असून वंदे भारत एक्सप्रेसची सेवा सर्वसामान्य नागरिकांना पण घेता येईल या दिशेने प्रयत्न चालू केले आहेत. याचाच एक भाग म्हणुन रेल्वे प्रशासन येत्या ऑक्टोबर महिन्यापासून नॉन एसी वंदे भारत ट्रेन चालू करणार आहे. यामुळे अगदी स्वस्तात आरामदायी प्रवास आता करणं शक्य होणार आहे. या वर्षात दोन नॉन-एसी वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा मानस असल्याचं सांगण्यात येत आहे. ICF चेन्नईकडून वंदे भारत नव्या स्वरुपात आणण्याची योजना आखण्यात येत आहे. दरम्यान, वेगाने, आरामदायी आणि अगदी वाजवी दरात प्रवाशांना प्रवास करता येण्यासाठी ही नॉन एसी वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात येणार असल्याचं रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

आता धावत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसची बाह्य रचना ही थोडी वेगळी असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पण यामध्ये आरामदायी प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नसल्याचं रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. तसेच यामध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा देखील उपलब्ध असणार आहे. या गाड्यांमध्ये फायर अलार्म सिस्टीम, इमर्जन्सी अलार्म या सुविधा असणार आहे. तर या ट्रेनमधील टॉयलेट देखील वंदे भारत एक्सप्रेस सारखेच असणार आहेत. दोन डब्यांमध्ये जर्क-फ्री प्रवास करण्यासाठी सुधारित कपलर देखील असणार आहे. या ट्रेनला एलएचबी कोच असणार आहेत.

एसी वंदे भारत पेक्षा वेग कमी

एसी वंदे भारतपेक्षा नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसचा वेग कमी असणार आहे. नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसचा ताशी वेग हा 130 किमी असणार आहे. सध्या वंदे भारत एक्सप्रेसचा वेग हा ताशी 160 किमी इतका आहे. यावर बोलतांना रेल्वे मंत्रालयाने म्हटलं की, रेल्वेच्या खिडक्या उघड्या असताना जास्त वेगाने रेल्वे चालवणे हे धोकादायक ठरु शकते. त्यामुळे या रेल्वेचा वेग एसी वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा कमी ठेवण्यात आला आहे.

सध्या वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर सामान्य लोकांच्या खिशाला परवडत नसल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून रेल्वे मंत्रालयाकडून सामान्य लोकांसाठी ही नॉन एसी वंदे भारत रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. तिकिटांचे दर किती असतिल हे जाहीर केले नसले तरी सध्या चालविण्यात येणार्‍या वंदे भारत एक्सप्रेस च्या तिकिट दरापेक्षा निम्मे किंवा त्याच्या आसपास असण्याचा अंदाज आहे. यामध्ये स्लिपर कोचची देखील सुविधा देण्यात येणार आहे.

Loading

केशरी रंगाच्या वंदे भारत ट्रेनचे अनावरण दिनांक १९ ऑगस्ट रोजी

Vande Bharat Train News : चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी येथे तयार होणारी एकतीसवी वंदे भारत ट्रेन ही देशातील पहिली केशरी रंगाची सेमी-हाय स्पीड एक्सप्रेस असणार आहे. दिनांक 19 ऑगस्ट रोजी चेन्नई उत्पादन युनिटमध्ये या केशरी रंगाच्या वंदे भारत ट्रेनचे अनावरण होण्याची अपेक्षा आहे.
देशभरात 25 वंदे भारत गाड्या धावत असताना, असे आणखी चार रेक या महिन्यात सेवेत येण्यासाठी ग्रीन सिग्नलच्या प्रतीक्षेत आहेत. तथापि, आणखी दोन वंदे भारत गाड्यांची निर्मिती प्रक्रिया पुढच्या टप्प्यात आहे, त्यापैकी एकतीसवा रेक नवीन कलर कोडनुसार बनवला जाणार आहे.
भारतीय राष्ट्रध्वजापासून प्रेरित होऊन, नवीन वंदे भारत ट्रेन भगव्या रंगाच्या संयोजनात दारावर आणि डब्यांवर  हिरव्या रंगाच्या पट्ट्यांसह बनवलेली असेल. भारतीय रेल्वेच्या म्हणण्यानुसार ड्रायव्हर केबिनच्या पुढील भागाला अधिक सौंदर्यपूर्ण आणि लक्षवेधी बनवण्यासाठी केशरी रंगाच्या आकर्षक रंगसंगती असतील.
भारतातील पहिल्यावहिल्या स्वदेशी डिझाइन आणि निर्मित सेमी-हाय स्पीड वंदे भारत ट्रेनने प्रवाशांना आधुनिक आणि आरामदायी रेल्वे प्रवासाचा अनुभव दिला आहे. हाय स्पीड, सुधारित सुरक्षा मानके आणि जागतिक दर्जाची सेवा ही या ट्रेनची वैशिष्ट्ये आहेत.स्वयंचलित दरवाजांनी सुसज्ज असलेल्या वंदे भारत गाड्यांचा वेग वेगवान आहे आणि त्यांचा वेग ताशी 160 किमी आहे. एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये रिव्हॉल्व्हिंग सीट्ससह, रिक्लाइनिंग एर्गोनॉमिक सीट्स आणि आरामदायी आसनांसह ट्रेनमध्ये उत्तम राइडिंग आराम आहे.प्रत्येक आसनासाठी मोबाईल चार्जिंग सॉकेटच्या सुविधेसह, ट्रेनमध्ये एक मिनी पॅन्ट्री आहे ज्यामध्ये हॉट केस, बाटली कुलर, डीप फ्रीझर आणि गरम पाण्याचा बॉयलर आहे.याशिवाय प्रत्येक डब्यात आपत्कालीन खिडक्या, अग्निशामक यंत्रणा आणि सीसीटीव्हीची व्यवस्था आहे.

Loading

भारतीय ध्वज फक्त २५ रुपयांत! अशी करा ऑर्डर

नवी दिल्ली ; “हर घर तिरंगा अभियान 2.0” अंतर्गत घरोघरी भारतीय ध्वज पोहोचवण्याच्या उद्देशाने शासनाने एक नवीन उपक्रम चालू केला आहे. अगदी कमी किमतीमध्ये म्हणजे फक्त 25 रुपये या शुल्कात  भारतीय ध्वज पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून उपलब्ध केला आहे. पोस्ट ऑफिस च्या संकेत स्थळावर ऑनलाईन ऑर्डर करून हा ध्वज घरपोच मागवता येईल.
येत्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन च्या निमित्ताने शासनाने हा उपक्रम राबविला आहे. हा ध्वज २० इंच X ३० इंच साईझचा हा ध्वज असणार आहे. ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करता येईल.

Loading

Amrit Bharat Station Scheme | महाराष्ट्र राज्याच्या ‘या’ ४४ स्थानकांचा समावेश

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकाच वेळी देशातील 508 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पांचे  भूमीपूजन करणार आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी या पुनर्विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. पुनर्विकास करण्यात येणाऱ्या देशभरातील 508 स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील 44 स्थानकांचा समावेश आहे. त्यात मुंबईतील 15 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे स्थानक पुनर्विकासात महाराष्ट्रातील एकूण 123 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. त्यापैकी 44 स्थानकांच्या प्रकल्पाची पायाभरणी आज होणार आहे.
देशभरातील 1309 स्थानकांच्या पुनर्विकासाकरता अमृत भारत स्थानक योजना (Amrit Bharat Station Scheme) ही पंतप्रधानांच्या दृष्टीकोनावर आधारित असलेली योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा भाग म्हणून पंतप्रधान 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. 24,470 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाने या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे.  शहराच्या दोन्ही बाजूंपासून योग्य अंतरावरील ‘सिटी सेंटर्स’ म्हणून या स्थानकांचा विकास करण्यासाठी एक बृहद आराखडा तयार करण्यात येत आहे. शहराच्या एकंदर नागरी विकासाच्या समग्र दृष्टीकोनाच्या आधारे या रेल्वे स्थानकांच्या विकासाबाबत एकात्मिकतेवर भर दिला जात आहे.
रेल्वे स्थानक पुनर्विकासात काय होणार?
रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत स्टेशन योजनेतून देशातील 508 रेल्वेस्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत विविध अद्ययावत सोयी सुविधा प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. स्थानक प्रबंधक ऑफिस, पार्सल ऑफिस, हेल्थ ऑफिस, टीसी ऑफिस, एमसीओ ऑफिस यांचे पूर्णपणे नूतनीकरण केले जाणार आहे. नवीन कोच डिस्प्ले बोर्ड बसवण्यात येणार आहे. विकास कामांमध्ये स्थानकाच्या दर्शनी भागाचा विकास, लँडस्केपिंग, मॉडल टॉयलेट, प्लॅटफॉर्म सरफेस केबल ट्रेज, अत्याधुनिक फर्निचर भरपूर प्रकाश योजनेसाठी एलईडी, नाम फलक, पार्किंग व्यवस्था, प्रतिक्षागृह, स्वच्छतागृह, नवीन फूटओवर ब्रीज, दोन्ही प्लॅटफॉर्मवर लिफ्ट व्यवस्था, नवीन कोच डिस्प्ले, सीसीटीव्ही कॅमेरे आदींचा समावेश असणार आहे.

Loading

वंदेभारत एक्सप्रेसचा रंग बदलणार; ‘हे’ आहे कारण

 

Vande Bharat Express :निळ्या आणि पांढर्‍या रंगातील वंदे भारत एक्सप्रेसला आता नवीन लूक मिळणार आहे. यापुढे निर्मिती होणार्‍या वंदे भारत एक्सप्रेस गाड्या भगव्या Orange आणि राखाडी Grey रंगाच्या असणार आहेत.

सध्या असलेला पांढरा रंग धूळ चिटकून खराब होत असल्याने लूक व्यवस्थित ठेवण्यासाठी त्याला वारंवार धुवून साफ करावे लागत आहे. हे जरा जास्त गैरसोयीचे होत असल्याने त्याला पर्यायी दुसरा कोणता रंग देता येईल याबद्दल ईतर रंगाचे पर्याय शोधले जात आहेत. सध्या भगव्या Orange आणि राखाडी Grey रंगाचा पर्याय विचाराधीन असून एका गाडीला प्रायोगिक तत्त्वावर हा रंग दिला आहे. या रंगाना हिरवा झेंडा भेटल्यास भविष्यात सर्वच वंदे भारत एक्सप्रेस भगव्या आणि राखाडी रंगाच्या दिसणार आहेत. या बदला बरोबरच प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी आसनव्यवस्थेत सुधारणा करण्यात येणार आहेत. 

भगवा रंग देशाच्या झेंड्याच्या रंगातून घेतला आहे असे केंदीय रेल्वे मंत्री आदित्य वैष्णव म्हणाले आहेत. भगवा रंग भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे तर राखाडी रंग आधुनिकतेचे प्रतीक आहे म्हणुन हे दोन्ही रंग या एक्सप्रेस गाडीसाठी निवडण्यात आले आहेत.

Loading

RBI कडून नवीन सुविधा | एटीएम कार्ड नसले तरीही एटीएम मधून पैसे काढू शकता

ICCW RBI | तुम्ही एटीएमवर गेलाय अन् डेबीट कार्ड जर विसरला असाल तर? चिंता करण्याचं कारण नाही. तुम्ही युपीआयच्या माध्यमातून आता एटीएममधून पैसे काढू शकता.

२०२२मध्ये आरबीआयने आयसीसीडब्लू नावाची सुविधा सुरु केलीय. ज्यात आपण डेबीट कार्ड न वापरता युपीआय थ्रू एटीएम मशीनमधून पैसे काढू शकतो.

यासाठी तुम्हाला फक्त एक प्रोसेस फॉलो करावी लागते. सर्वात पहिलं तुम्ही एटीएम मशीवर एटीएम कॅश विल्ड्राल या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला जी रक्कम हवी आहे ती टाका, त्यानंतर क्युआर कोड जनरेट होईल.

जनरेट झालेल्या क्युआर कोडला तुमच्या युपीआय ॲपवरुन स्कॅन करा आणि युपीआय पीन टाका. त्यानंतर ‘प्रेस हिअर फॉर कॅश’ पर्यायावर क्लिक करा. तुम्ही टाकलेली रक्कम तुम्हाला एटीएम मशीनमधून मिळेल.

ही सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे लागत नाही. युपीआयचा वापर करुन तुम्ही दोन वेळा दिवसांत असे पैसे काढू शकता. तसेच प्रत्येक ट्रान्जेक्शनला तुम्ही जास्तीत जास्त ५ हजार रुपये काढू शकता.

Loading

Odisha Train Accident : जुनियर इंजिनीअर कुटुंबासह फरार! घातपाताचा संशय वाढला

Odisha Train Accident  : बालासोर रेल्वे अपघात चौकशी प्रकरणी एक मोठी बातमी आहे. या प्रकरणात याआधी चौकशी करण्यात आलेला रेल्वेचा जुनियर इंजिनीअर आमीर खान अचानक कुटुंबासहित गायब झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की आमीर खान याची याआधी अपघात प्रकरणी सीबीआयने चौकशी केली होती. मात्र त्यानंतर तो कामावर रुजू झाला नाही होता. संशय आल्याने सीबीआयने चौकशीसाठी पुन्हा तो ज्या भाड्याच्या घरात राहत होता ते घर गाठले असता तो फरार असल्याचे दिसून आले. त्याचा घराला कुलूप लावले होते. शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता तो आणि त्याचे कुटुंब अचानक गायब झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.

सीबीआयने तो राहत असलेले घर सील करून त्यावर पाळत ठेवली आहे. सीबीआय फरार इंजिनीअर आमीर खान आणि त्याच्या कुटुंबाचा शोध घेत आहेत.

बालासोर येथील भीषण रेल्वे अपघातात 292 प्रवाशांनी आपला जीव गमावला होता तसेच बरेच प्रवासी जखमी झाले होते. हा अपघात की घातपात याची चौकशी करण्यासाठी सीबीआयला पाचारण करण्यात आले होते.

Loading

आधारकार्ड – पॅनकार्ड लिंक करण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक | स्मार्टफोनवर करू शकता लिंक; जाणून घ्या प्रोसेस…

नवी दिल्ली :सरकारने PAN आणि Aadhaar Card लिंक करणे अनिवार्य केले आहे. तुम्ही जर आतापर्यंत ही दोन्ही कागदपत्रं लिंक केली नसल्यास ३० जून २०२३ ही शेवटची तारीख आहे. ३० जून २०२३ पर्यंत आधार – पॅन लिंक न केल्यास पॅन कार्ड काम करणार नाही. असे पॅन कार्ड पुनः कार्यरत करण्यासाठी पुढील एक महिन्यासाठी अवधी भेटू शकतो मात्र मोठ्या रकमेचा दंड बसू शकतो. त्यामुळे आजच आपले आधार – पॅन लिंक करून निश्चित व्हा. 

आधार – पॅन कार्ड लिंक करण्याची प्रोसेस खूपच सोपी असून, तुम्ही घरबसल्या मिनिटात हे करू शकता. यासाठी तुम्हाला इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तुम्ही www.incometax.gov.in ला देखील ओपन करू शकता. वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला क्विक लिंकमध्ये Link Aadhaar या पर्यायावर जावे लागेल. हा पर्याय तुम्हाला वेबपेजच्या उजव्या बाजूला दिसेल. यावर टॅप केल्यानंतर पॅन नंबर, आधार नंबर, रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि नाव इत्यादी माहिती द्यावी लागेल.

आता तुम्हाला लिंक आधार हा पर्याय सिलेक्ट करावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर आधार व पॅन कार्ड लिंक होईल. जर तुमचे आधार कार्ड व पॅन कार्ड आधीपासूनच लिंक असल्यास तुम्हाला एक मेसेज दिसेल. ज्यात कागदपत्रं लिंक असल्याचे सांगितले जाईल. तसेच, तुम्ही आधीच आधार कार्ड व पॅन लिंक करण्याची रिक्वेस्ट केली असल्यास उजव्या बाजूला दिलेल्या Link Aadhaar Status वर क्लिक करून माहिती पाहू शकता. यानंतर आधार व पॅन नंबर देवून View Link Aadhaar Status वर क्लिक करा. या प्रोसेसनंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. दरम्यान, PAN आणि Aadhaar Card लिंक करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे.  

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search