Category Archives: महाराष्ट्र

राज्यातील बिबट्यांची ‘नसबंदी’ होणार

   Follow us on            Follow us on        

मुंबई : राज्यातील बिबट्यांची वाढती संख्या आणि बिबट्यांचे मानवी वस्तींवर होणारे हल्ले रोखण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्या नसबंदीचा पर्याय पुढे आणला आहे. बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठवला जाईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.

दरम्यान, चालू वर्षात १३ वाघांचा मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी दिली. वन मंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यानंतर गणेश नाईक यांनी मंत्रालयात पहिलीच पत्रकार परिषद घेतली. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी चार दिवसांपूर्वी बिबट्यांच्या नसबंदीबाबत आपल्याला पत्र दिले. या नसबंदीसाठी केंद्र सरकारची परवानगी लागते. सध्या राज्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

NHAI बांधणार 30 किमी लांबीचा ‘एक्सप्रेस वे’; मुंबई ते गोवा अंतर अर्ध्या तासाने कमी होणार….

   Follow us on        

मुंबई: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) नवीन एक्सप्रेस वे बांधणार आहे. हा द्रुतगती मार्ग जेएनपीटीजवळील पागोटे ते जुन्या पुणे महामार्गावरील चौक जंक्शनपर्यंत 30 किमी लांबीचा असेल. या प्रकल्पासाठी अंदाजे 3,700 कोटी रुपये खर्च येणार असून 30 महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

यामुळे एमटीएचएल (अटल सेतू) ते गोव्याला जाणाऱ्या महामार्गापर्यंतचा प्रवास अवघ्या 20-30 मिनिटांत पूर्ण होणार आहे. या मार्गामुळे मुंबई ते गोवा या महामार्गावरील प्रवासाचा वेळ कमी होणार आहेहा द्रुतगती मार्ग उरण-चिरनेर महामार्ग, गोवा महामार्ग आणि पुणे द्रुतगती महामार्ग अशा अनेक महत्त्वाच्या महामार्गांना जोडेल. भविष्यात हा महामार्ग अलिबाग-विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर, मुरबाड-जुन्नर महामार्ग, समृद्धी द्रुतगती महामार्ग आणि नाशिक महामार्गाशी देखील जोडला जाईल.

तसेच तो वडोदरा-मुंबई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेशी जोडला जाणार आहे. यामुळे बंदर आणि विमानतळ परिसरात मालवाहतूक सुलभ होईल आणि जेएनपीटी, गोवा, पुणे आणि मुंबई दरम्यानचा प्रवास वेळही कमी होईहा नवीन एक्स्प्रेस वे अटल सेतूच्या शिवडी टोकाला असलेल्या कोस्टल रोडला आणि वरळीजवळील सी लिंकला जोडेल. त्याचा पुढील विस्तार अलिबाग-विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर, मुरबाड-जुन्नर महामार्ग, समृद्धी द्रुतगती महामार्ग आणि पडघाजवळील नाशिक महामार्ग (मोरबे, कर्जत, शेलू, वाघणी आणि बदलापूर मार्गे) यांना जोडतील. हा दिल्ली-मुंबई कॉरिडॉरच्या वडोदरा-मुंबई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचाही भाग असेल.NHAI लवकरच या कामाचा कार्यादेश जारी करुन, येत्या सात महिन्यांत बांधकाम सुरू होण्याची अपेक्षा आहे. या कॉरिडॉरमुळे 10,000 हून अधिक वाहनांसाठी वाहतूक सुरळीत होणार आहे. यामुळे मल्टी-एक्सल कंटेनर ट्रक यांचा प्रवास सुलभ होणार आहे.

नव्या एक्स्प्रेस वेमुळे रस्त्यांवरील गर्दी कमी होणार असून प्रवासाचा वेळही वाचणार आहे, असे NHAI च्या प्रादेशिक व्यवस्थापक अंशुमाली श्रीवास्तव यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली.

Shaktipeeth Expressway: नागपूर-गोवा महामार्गाच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी सुधारित संरेखनासह अर्ज दाखल

   Follow us on        

Nagpur Goa Shaktipeeth Expressway: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शक्तीपीठे, काही महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आणि तीर्थक्षेत्रे यांना जोडणारा नागपूर आणि गोवा दरम्यान द्रुतगती मार्ग बांधण्याच्या महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आता गती मिळू लागली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती मार्गासाठी पर्यावरण मंजुरीसाठी नवीन अर्ज सादर केला आहे.

ऑगस्टच्या सुरुवातीला, स्थानिक शेतकऱ्यांसह शिष्टमंडळाने कोल्हापुरात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेऊन प्रकल्प रद्द करण्याची मागणी केल्यानंतर, एमएसआरडीसीने प्रकल्पासाठी पर्यावरण मंजुरी घेण्याची योजना मागे घेतली होती.मात्र MSRDC ने आता पुन्हा अर्ज केला आहे. या सुधारित अर्जात वर्धा ते सिंधुदुर्ग पर्यंतच्या सर्व पॅकेजेससाठी काही संरेखन पर्याय सादर केले आहेत.

प्रस्तावित सहा-लेन प्रवेश-नियंत्रित शक्तीपीठ एक्सप्रेसवे लांबीमध्ये नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्गापेक्षा लांबीला (802 किलोमीटर) मोठा असणार आहे. शक्तीपीठ द्रुतगती मार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होईल आणि महाराष्ट्र-गोवा राज्य सीमेवरील पत्रादेवी येथे संपेल. हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमधून जाण्याचा प्रस्ताव आहे. एक्स्प्रेस वेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ 18-20 तासांवरून 8-10 तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. वृत्तानुसार, विदर्भ आणि मराठवाड्यातील जमीन मालक या प्रकल्पाला पाठिंबा देत आहेत, तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून याला मोठा विरोध होत होता.

या विरोधामुळे प्रकल्पासाठी एकापेक्षा जास्त संरेखन पर्याय सादर करण्यात आलेले आहेत. हे पर्याय ठरविताना हा मार्ग सुपीक जमिनी नाश करणारा नसेल आणि पर्यावरणाला जास्त हानी पोहोचवणारा नसेल याची दक्षता यावेळी घेतली असल्याचे संबधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

 

 

महत्वाचे: १२ वीची हॉल तिकीटे डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध

   Follow us on        

HSC exam hall tickets: बारावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून परीक्षेचे हॉल तिकीट देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीटे आजपासून उपलब्ध देण्यात येणार आहेत.

यासोबतच उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना ही प्रवेशपत्रे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या  www.mahahsscboard.in ‘ या संकेतस्थळावरून आज पासून ऍडमिट कार्ड लिंकद्वारे डाऊनलोड करता येणार आहेत.

बारावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून परीक्षेचे हॉल तिकीट देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीटे आजपासून उपलब्ध देण्यात येणार आहेत.

ऑनलाईन हॉल तिकिटे मिळविण्यास काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत अशी माहिती सचिव देविदास कुलाळ यांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

 

मुंबई गोवा महामार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार; नितीन गडकरी यांची ग्वाही

   Follow us on        

नवी दिल्ली : मुंबई-गोवा महामार्गवरील परिस्थितीमुळे मला रोज प्रवाशांची नाराजी सहन करावी लागते. ही नाराजी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून समजते. यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी या महामार्गचे काम पूर्ण करू, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

याशिवाय दिल्ली- मुंबई या महत्त्वाकांक्षी महामार्गचे काम या वर्षात पूर्ण होईल, असेही गडकरी यांनी सांगितले.

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या वाहतूक मंत्र्याची ४२ वी बैठक भारत मंडपम येथे पार पडली. यावेळी पत्रकारांशी बोलताना गडकरी यांनी अपघातांत मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या वाढत्या संख्येवर खंत व्यक्त केली. सरकारने कॅशलेस उपचारांची व्यवस्था केली गेली आहे. अपघातात जखमी व्यक्तीचा ७ दिवस उपचार किंवा १.५ लाखांचा खर्च मंत्रालय करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

बेळगाव-चंदगड-सावंतवाडी रेल्वेसाठी प्रयत्न करणार: खा. धनंजय महाडिक

   Follow us on        

कोल्हापूर: बेळगाव-चंदगड सावंतवाडी रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालीन. रेल्वे मंत्र्यांना लवकरच भेटून निधी आणण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन खा. धनंजय महाडिक यांनी बेळगाव, चंदगड, सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले.

बेळगाव-चंदगड, सावंतवाडी रेल्वे हा रेल्वे मार्ग ११४.६ कि.मी.चा असून जवळपास १८०५ करोडचा खर्च अपेक्षित आहे. या रेल्वे मार्गाचा सर्व्हे रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आला असून या रेल्वे मार्गामुळे चंदगड, आजरा व गडहिंग्लज या तालुक्याचा विकास अपेक्षित आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिण विभाग रेल्वे मार्गाने देशाशी जोडला जाईल. या संदर्भात कोल्हापूर, बेळगावचे खासदार यांना प्रत्यक्ष भेटून संघर्ष समितीने निवेदने दिली आहेत.

खा. महाडिक यांना नेसरी येथे बेळगाव, चंदगड, सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश दळवी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे सुरू करण्यासंदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष विजयकुमार दळवी, भाजप नेते संग्रामसिंह कुपेकर, चंदगड पंचायत समितीचे माजी सभापती बबनराव देसाई, संघर्ष समितीचे सरचिटणीस रवी नाईक, एकनाथ वाके आदी उपस्थित होते.

Konkan Coastal Highway: रेवस ते रेड्डी महामार्गाच्या ‘वाटेत’ पहिला अडथळा

   Follow us on        

अलिबाग: प्रस्तावित रेवस ते रेड्डी या मुंबईला थेट कोकणाशी जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी करंजा (उरण) ते रेवस (अलिबाग) या बहुप्रतीक्षित सागरी पुलाच्या जोड मार्गिकेला करंजा ग्रामस्थांनी आक्षेप नोंदविला आहे.  एमएसआरडी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर ग्रामस्थांनी आपल्या हरकती नोंदविल्या आहेत. यावेळी ग्रामस्थांनी तत्कालीन मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांच्या १९८० च्या आराखड्यानुसार मार्गिका द्यावी अशी मागणी केली आहे. यासाठी प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे.

रामायणातील पौराणिक काळापासून द्रोणागिरी पर्वत सर्वांनाच माहीत आहे. अनेक आयुर्वेदिक वनस्पती, औषधी संजीवनी याच डोंगराच्या कडेकपारीमध्ये आहेत. या परिसरात डोंगरदेवी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या करंजा ग्रामस्थांचे आराध्यदैवत असलेल्या द्रोणागिरी मातेवर भाविकांची श्रद्धा आहे. मात्र या पौराणिक काळातील द्रोणागिरी पर्वताला पोखरून करंजा-रेवस सागरी सेतूची निर्मिती करण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. त्यामुळे उरणकर, भाविक तसेच गडप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ(एमएसआरडीसी) च्या माध्यमातून नव्याने हा मार्ग उभारण्यात येत आहे. प्रस्तावित रेवस ते रेड्डी या मुंबईला थेट कोकणाशी जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी सागरी महामार्गाच्या जोड मार्गिकेला करंजा ग्रामस्थांनी आक्षेप नोंदविला आहे. याची दखल घेत एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन शेतकरी आणि ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. उरणच्या करंजा ते अलिबाग येथील रेवस दरम्यानच्या दोन किलोमीटर लांबीच्या पुलाचे भूमिपूजन १४ ऑक्टोबरला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले आहे. २ हजार ४७८ कोटी रुपयांची निविदा या पुलाच्या उभारणीसाठी मागविण्यात आली आहे. या पुलाची एकूण लांबी ही १०.२०९ किलोमीटर आहे. मुंबईतील सागरी अटल सेतू मार्गे द्रोणागिरी नोड येथून या पुलावरून कोकणात हा प्रवास करता येणार आहे. नियोजित रेड्डी ते रेवस मार्गापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने १९८० साली महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अ.र अंतुले यांनी करंजा ते रेवस मार्गाची घोषणा केली होती. यावेळी भूसंपादनाची प्रकिया राबवून प्रत्यक्षात कामाला सुरुवात सुद्धा करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव सत्ताबदल होऊन अंतुले यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने या पुलाचे काम बंद झाले होते.

प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी मोटरमनने गाडी दीड किलोमीटर मागे घेतली

   Follow us on        

मनमाड : मुंबई वरून नांदेड कडे जाणारी तपोवन एक्सप्रेस मनमाड यार्डात (हद्दीत) आली असतांना एक प्रवाशी पडला असल्याचे समजले आणि काय मग रेल्वे ड्रायव्हर आणि गार्डने थेट एक ते दिड किलोमीटर मागे घेतली व इतर प्रवाशांच्या मदतीने जखमी असलेल्या सहप्रवाशाला गाडीत टाकून मनमाड रेल्वे स्थानकावर आणले व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस मुंबईवरून नांदेड कडे जात असताना मनमाड नजीक अर्थात मनमाड आल्यानंतर या गाडीतून एक प्रवासी पडल्याची घटना घडली गाडी पुढे गेली असता शेवटच्या बोगीत असलेल्या गार्डच्या लक्षात हा प्रकार आला गार्डने तात्काळ इंजिन ड्रायव्हरसोबत संपर्क साधला व सर्व कल्पना दिली ड्रायव्हरला सर्व माहिती मिळेपर्यंत गाडी दीड ते दोन किलोमीटर पुढे निघून आली होती. ड्रायव्हरने तात्काळ गाडी थांबवली व दोन किलोमीटर गाडी मागे घेतली सहप्रवाशांना घेऊन गाडीच्या गार्डने जखमी प्रवाशाला गाडीत टाकले.

रेल्वे स्थानकावर तात्काळ रुग्णवाहिका ही उपलब्ध करून देण्यात आली. जखमी प्रवाशाला उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. रेल्वे ड्रायव्हर गार्ड व इतर प्रवाशांचे अथक प्रयत्न करूनही तो प्रवासी वाचू शकला नाही. तो प्रवासी कोण होता कुठला होता याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती मिळू शकली नाही. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

मुंब्रा माफीनामा प्रकरणी दोन्ही बाजूने गुन्हे दाखल

   Follow us on        

ठाणे: मराठीची मागणी केली म्हणून तेथील जमावाने मराठी मुलाला माफी मागायला लावली आणि हा माफीचा विडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल केला होता. या प्रकरणाची मुंब्रा पोलिसांनी दखल घेतली असून या प्रकरणी दोषींवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची मुंब्रा पोलीस ठाण्याला भेट 

मुंब्रा येथे घडलेल्या प्रकरणी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून त्यांनी काल शुक्रवारी मुंब्रा पोलीस ठाण्याला भेट देवून त्या जमावातील दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

मुंब्रा पोलिसांनी जाहीर केलेली प्रेसनोट

मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि.०२/०१/२०२५ रोजी रोजी १५:३० वा.सु कौसा आयडियल मार्केट, अंबाजी मेडिकल समोर कौसा, मुंब्रा, ता. जि. ठाणे येथे एक मराठी युवक फळ विक्रेताकडुन फळे विकत घेताना फळविक्रेता यास मराठीत बोलण्याची विनंती केली असता फळविकत्याने मराठी युवकासोबत हुज्जत घातली होती. सदरवेळी फळ विक्रेता याने एस.डी.पी.आय. पक्षाचे पदाधिकाऱ्यांना बोलावुन गर्दी जमा केली तसेब सदर जमलेल्या गर्दीतील लोकांनी मराठी युवकास घेराव करून त्यास कान पकडुन माफी मागण्यास सांगीतली व सदरवेळी त्याचा हिडीओ बनवुन तो सोशल मिडीयावर प्रसारीत केला होता.

सदरचा हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारीत झाल्याने तसेच विविध न्युज चॅनेलवर प्रसारीत झाल्याने मराठी व हिंदी भाषीक यांच्यात तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. सदरचा व्हिडीओ मुंब्रा पोलीस स्टेशनला प्राप्त होताच त्यांनी नमुद प्रकरणाची तात्काळ गंभीर दखल घेवुन सदर फळ विक्रेता शोएब मोहम्मद नसीम कुरेशी, व्हिडीओमधील एस.डी.पी.आय. पक्षाचे पदाधिकारी अब्दुल रहेमान दिलशाद अन्सारी, उजेर जाफर आलम शेख तसेब २० ते २५ अनोळखी इसम यांचे विरुध्द मुंब्रा पोलीस स्टेशन येथे सरकारतर्फे गु.र.नं.१२/२०२५ म.पो.का. कलम ३७ (३)१३५ प्रमाणे तसेच फिर्यादी मारूती गवळी यांचा जबाब नोंद करून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १९६, १३५, ३५३(२), ३५१ (२) (३), ३५२, १२७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदर गुन्हयातील आरोपीत यांची ओळख पटवुन त्यांचा शोध घेवुन त्यांचे विरुध्द सदर गुन्हयावे अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यावी तजविज ठेवण्यात आली आहे.

नमुद गुन्हयाच्या तपास मा. पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त श्री ज्ञानेश्वर वव्हाण, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त श्री सुभाष बुरसे, सहा. पोलीस आयुक्त श्री उत्तम कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सपोनि / लोंढे हे करीत आहेत.

MSRTC: आपली एसटी बस वेळेवर येणार की उशिरा? आता समजेल फक्त एका क्लिकवर..

   Follow us on        

पुणे: प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी आता अपग्रेड होत आहे. आता राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम’ (व्हीटीएस) ही यंत्रणा विकसित करण्यात आली असून, प्रणालीची यशस्वी चाचणीही नुकतीच करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच ही सुविधा सुरू होणार आहे. या सुविधेमुळे ‘एसटी’चा ठावठिकाणा प्रवाशांना आता एका क्लिकवर पाहता येणार आहे

‘एसटी’महामंडळातर्फे प्रवाशांच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाच्या धर्तीवर बसची माहिती सहज समजण्यासाठी समजण्यासाठी ऑनलाईन ‘व्हीटीएस’ यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. सद्यास्थितीला एसटी महामंडळातील १६ हजारांहून अधिक नव्या-जुन्या बसमध्ये ‘व्हीटीएस’ ही आधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेची विविध पातळ्यांवर चाचण्या करण्यात आल्या. यातून समोर आलेल्या तांत्रिक त्रुटी दूर करण्यात आल्या असून, प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेली चाचणीदेखील यशस्वी झाली आहे. अॅप विकसित करण्याचेही काम सुरू आहे

जशी रेल्वे प्रवाशांना नियोजित गाडी सध्या कुठे आहे, हे तातडीने कळते. त्याचप्रमाणे आता आरक्षण केलेल्या किंवा अपेक्षित बसची माहिती कोठे आहे, किती अंतरावर आहे, बस बिघडली आहे किंवा नाही, किती विलंब होणार आहे, याची माहिती एका क्लिकवर समजणार आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search