Category Archives: रत्नागिरी

एखाद्या प्रकल्पातून परिसरात कायमचे नुकसान होणार असेल त्याला विरोध करायलाच हवा- अजित पवार, विरोधी पक्षनेते

मुंबई – बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा होणारा विरोध हा तीव्र वळण घेत आहे. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली. विकासाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध असण्याचे कारण नाही मात्र विकास होत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची खबरदारी आपण घ्यायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

बारसू रिफायनरी प्रकल्पाला होणाऱ्या विरोधाविषयी मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. एखाद्या प्रकल्पातून परिसरात कायमचे नुकसान होणार असेल किंवा भावी पिढी बरबाद होणार असेल तर जरूर त्या गोष्टीला विरोध करायला हवा परंतु त्यातून फायदा होणार असेल तर त्या दृष्टीकोनातूनही विचार केला पाहिजे, असे अजितदादा म्हणाले.

Loading

धक्कादायक! रिफायनरीसाठी बारसूची जागा ठाकरे सरकारनेच सुचविली होती..

रत्नागिरी – एकीकडे सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये बारसू रिफायनरी प्रकल्पावरून जुंपली असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी बारसूची जागा केंद्र सरकारला लिहिलेल्या एका पत्राद्वारे सुचवली असल्याचे समोर आले आहे. 

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिफायनरीच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहाल होतं. 12 जानेवारी 2022 रोजी ही पत्र लिहण्यात आलं होतं. बारसूमध्ये 13 हजार एकर जमीन राज्य सरकार उपलब्ध करून देण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी दर्शवली होती. त्याचबरोबर याठिकाणची बहुतांश जमीन ही ओसाड असल्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न येणार नाही असंही या पत्रात नमूद करण्यात आलं. या पत्रामध्ये स्पष्टपणे लिहण्यात आलं होतं की ही जागा ओसाड आहे. 

यामुळे आता ठाकरे गटाचीही कोंडी झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहताना बारसूमधील लोकांना विश्वासात घेतलं होतं का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Loading

बारसू रिफायनरी सर्वेक्षण विरोधाप्रकरणी शरद पवार यांनी घेतली दखल; उद्योगमंत्री उदय सामंत यांना केला फोन

Barsu Refinery News – बारसू रिफायनरी सर्वेसाठी स्थानिकांचा विरोध वाढला असून आंदोलक आक्रमक झाले असल्याचे चित्र दिसत आहे. विरोधकांनी पोलिसांच्या गाड्या अडवून विरोध केला आहे. आता या सर्व प्रकरणाची राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दखल घेतली आहे.

शरद पवार यांनी मंत्री उदय सामंत यांना फोन केला आहे. सर्व्हे थांबवून आंदोलनकर्ते यांच्याशी चर्चा करण्याची भूमिका घ्या, नाहीतर प्रकल्प अडकेल.त्यामुळे चर्चा करावी आणि ज्यांना अटक केली त्यांना सोडून द्यावे असे त्यांनी उदय सामंत यांना सांगितल्याचे समजते. 

 उदय सामंत यांनी या प्रकरणी शरद पवार यांना आश्वस्त केले आहे की ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील आणि निर्णय घेतील. 

Loading

बारसू रिफायनरी सर्वेक्षण; विरोधक महिलांनी पोलिसांच्या गाड्या अडवल्या

रत्नागिरी– कोकणातील रिफायनरीला स्थानिकांचा विरोध वाढला आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी देखील मोठा विरोध पाहायला मिळाला. आज आंदोलक महिलांनी रस्त्यावर झोपून पोलिसांचा ताफा अडवला. सकाळपासून आंदोलक जमले होते. त्यांनी प्रकल्पाच्या जागी धरणे धरले होते. दरम्यान, आंदोलकांवर कारवाई करण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हे पोलिस आंदोलन स्थळी येत असतांना आंदोलक महिलांनी रस्त्यावर झोपून पोलिसांचा ताफा अडवला. यावेळी अनेक आंदोलकांची धरपकड पोलिसांनी केली.
आज सकाळी आंदोलकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांचा ताफा आंदोलक महिलांनी अडवून धरला. सकाळी साडे आठच्या सुमारास महिलांनी पोलिसांच्या गाड्या अडवल्या. काही ही झाले तरी तरीहा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका आंदोलक महिलांनी घेतली. विरोधी करणाऱ्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचे रवानगी रत्नागिरी येथे करण्यात आली आहे.

Loading

बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी माती परीक्षणाचे सर्वेक्षण सोमवारपासून; परिसरात शासनाचा जमावबंदी आदेश लागू

रत्नागिरी – कोकणात राजापूर बारसू सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्पासाठी माती परीक्षणाच्या सर्वेक्षणाची सुरुवात सोमवारपासून केली जाणार आहे. रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटना आणि काही ग्रामस्थांकडून या कामात अडथळा आणण्याची शक्यतेच्या पार्श्वभूमीवर राजापूर बारसू सोलगाव या परिसरात राजापूरच्या तहसीलदार शितल जाधव यांनी आदेश जारी केले आहेत.
सोमवारी २४ एप्रिल म्हणजे उद्यापासून हे ड्रिलिंग करून माती सर्वेक्षण सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सगळ्या परिसरात कलम १४४ म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच या परीसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २२ एप्रिल ते ३१ मे या कालावधीपर्यंत हे मनाई आदेश लागू असणार आहेत. बारसू सडा बारसू, पन्हळे तर्फे राजापूर, धोपेश्वर, गोवळ, वरचीवाडी गोवळ, खालचीवाडी गोवळ या ड्रिलिंग करण्यात येणाऱ्या एक किलोमीटरच्या परिसरात हे आदेश लागू असणार आहेत.
भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुक्यात क्रूड ऑईल रिफायनिंग करणारी ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उदयोग’ प्रस्तावित आहे. महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे सदर प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्वर तसेच नाटे या परिसरात नियोजित आहे.
 ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उद्योग’ विरोधात काही स्थानिक ग्रामस्थ सक्रिय झाले आहेत. रिफायनरी विरोधी संघटना राजापूर तसेच मुंबई येथे स्थापन झालेल्या आहेत. त्या माध्यमातून ते विरोध दर्शवित आहेत. याबाबत रिफायनरी विरोधकांनी राजापूर शहरात मोर्चा, मेळावे, मुंबई येथील आझाद मैदान येथे धरणे, हिंसक आंदोलन अशा स्वरुपाची आंदोलने केली आहेत. तसेच इतर भागांतूनही आंदोलक अशा आंदोलनात सहभागी होत असतात, अशी टिप्पणी या आदेशात करण्यात आली आहे.बारसू परिसरात औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याकरीता जमीन योग्य आहे किंवा कसे? याकरीता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून प्राथमिक सुसाध्यता तपासणी करण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण व भू सर्व्हेक्षणाचे काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळच्या कालावधीत ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उदयोग’ प्रकल्प विरोधी भूमिका घेऊन लोकांचे नेतृत्व करणे, दंगल करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे, फौजदारी पात्र धाकदपटशा करणे, चिथावणी देणे, समान उद्देशासाठी बेकायदेशीर जमाव जमवून त्यात सामील होणे, इच्छा पूर्वक दुखापत पोहोचविणे, नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने आवेग करणे, लोकसेवकाला कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करणे, जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणे, असे गुन्हे घडलेले आहेत, असे स्पष्टपणे नमूद करत प्रशासनाचा मागील अनुभव लक्षात घेऊन हे मनाई आदेश जाहीर करण्यात आले आहेत.
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/04/बारसू-बंदी-आदेश.pdf” title=”बारसू बंदी आदेश”]

Loading

बंदी असतानाही भोस्ते येथील धोकादायक जगबुडी पुलावरून अवजड वाहतूक चालूच; सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता

संग्रहित छायाचित्र
रत्नागिरी – भोस्ते जगबुडी पूल धोकादायक स्थितीत असल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला होता. त्यानुसार हा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद केला आहे. तसा सूचना फलकही पुलाच्या दोन्ही बाजूंना लावण्यात आला आहे. मात्र या पुलावरून अवजड वाहतूक सुरूच आहे. रात्री-अपरात्री व सकाळच्या सुमारास वाळूचे डम्पर याच पुलावरून राजरोसपणे धावत आहेत. पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव लाल फितीतच अडकून पडला पुलाच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांसह स्वयंसेवी संस्था व प्रशासनाकडे सातत्याने पक्षांनी पत्रव्यवहारही पुलाच्या दुरुस्तीसाठी कुठलीच ठोस पावले उचललण्यात आलेली नाहीत. सरकारने दुर्लक्ष केल्यास सावित्री दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही 
शहरातून चिपळूण तसेच खाडीपट्ट्यातील शिवभागातील सुमारे १५ ते २० गावांना जवळचा रस्ता म्हणून या पुलाचा वापर केला जातो. या पुलाचे बांधकाम सुमारे ३० ते ३५ वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली करण्यात आले होते. सद्यःस्थितीत रेल्वस्थानकाकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून हा पूल अत्यंत महत्वाचा आहे; मात्र हा अरुंद असल्याने तसेच कुमकुवत असल्याने या पुलावरून अवघड वाहनातून राजरोसपणे खडी, वाळू तसेच खासगी बसेसच्या वाहतुकीच्या प्रमाणात वाढ झाली होती. हा पूल कमकुवत होऊ नये यासाठी भोस्ते गावातील नागरिकांनी आक्रमक पवित्र घेतला होता. बांधकाम विभागाने या पुलाच्या सुरक्षिततेचा विचार करून या पुलावरून अवजड वाहतुकीस बंदी घातली होती .

Loading

मुंबई-गोवा महामार्गावरील सोनवी पुलावर सुझुकी आणि क्रेटा गाडीमध्ये अपघात

रत्नागिरी – मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर येथील सोनवी पुलावर काल गुरुवारी  सुझुकी आणि क्रेटा गाडीमध्ये अपघात होऊन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातामुळे दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी  निर्माण झालेली होती. हा अपघात गुरुवार सकाळी 10:50 च्या दरम्यान घडला आहे.पुलावर अपघात घडल्यानंतर पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने गाड्या बाजूला करून वाहतूक हळूहळू सुरू झालेली आहे. 
सोनवी पूल हा अरुंद असल्याने अनेक वेळा या ठिकाणी वाहतूक कोंडी कों होते. काही दिवसापूर्वी
या पुलाचे काम सुरू करण्यासाठी रस्ता करण्यात आला मात्र त्यानंतर या पुलाचे काम रखडले आहे. गुरुवारी सकाळच्या दरम्याने मुंबईहून वांद्री च्या दिशेने जाणारे क्रेटा गाडी आणि रत्नागिरी हुन डेरवणला च्या दिशेने जाणारी गाडी या गाड्यांमध्ये अपघात होऊन गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. 

Loading

मुंबई-गोवा महामार्गावर राजापुर येथे आराम बस आणि कार समोरासमोर धडकली; सहा प्रवासी गंभीर जखमी…

रत्नागिरी – काल बुधवारी सायंकाळी 6.30 च्या दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर कोदवली येथे कोदवली उपकेंद्र नजीक खाजगी आराम बस आणि कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन एक भीषण अपघात घडला. या अपघातात कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी आराम बसला मुंबईकडून गोवा दिशेकडे जाणारा खाजगी कारचालक समोरून जोरदार धडकला त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर राजापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी पाठवण्यात आले आहे.

या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये योगेश ज्ञानदेव मुंडे, साहिल स्वप्नील मुंडे, स्वप्निल राजू मुंडे , साक्षी योगेश मुंडे, अर्चना स्वप्नील मुंडे, कृष्णा गणेश दराडे रा. जालना यांचा समावेश आहे. या अपघाताचे वृत्त कळतात अनेक स्थानिकानी अपघात स्थळी धाव घेतली व जखमीना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या रुग्णांवर राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित मीना डॉ. लक्ष्मण शर्मा डॉ. मोनिका व उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार केले. 

या सर्व रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी हलविण्यात आले आहे या अपघाताचे वृत्त कळतात पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे

 

Loading

परशुराम घाट वाहतुकीसाठी पुन्हा बंद होणार?

रत्नागिरी-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा मार्गाच्या पूर्णत्वाची डेडलाइन दिल्यापासून मुंबई गोवा महामार्गाचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. कोकणवासीयां साठी ही एक चांगली बातमी म्हणावी लागेल. या महामार्गाचा एक धोकादायक भाग म्हणुन ओळखल्या जाणार्‍या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील काम सुद्धा जलदगतीने सुरू आहे. या घाटावरील डोंगर कटाईचे काम चालू असल्याने वाहतूक अतिशय धोकादायक बनली आहे. या कामा दरम्यान, अधुनमधून रस्त्यावर दगड येत असल्याने येथे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. 

अपघात होऊ नये या साठी दिवसातील काही तास परशुराम घाट वाहतुकीस बंद ठेवण्याची मागणी होत आहे. तसा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला गेला आहे. मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. परिणामी अतिशय धोका पत्करून या ठिकाणी वाहतूक सुरू आहे. 

वाहतुक सुरू ठेवून खोदकाम करण्यास अडचणी येत आहेत. त्यासाठी खेड हद्दीतील ठेकेदार कल्याण टोलवेजने परशुराम घाटातील १२ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्याची मागणी केली होती. तसा अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभाग पेणकडून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक, प्रांताधिकारी चिपळूण तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी यांना अभिप्राय देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्यांना तो अहवाल देण्यात आला आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झाला नाही आहे. मात्र सद्य परिस्थिती पाहता तो निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

Loading

गुहागर समुद्र किनारी रंगणार ”सर्फ फिशिंग” स्पर्धा

रत्नागिरी– गुहागर समुद्र किनारी स्पोर्ट फिशिंग असोसिएशन, महाराष्ट्र तर्फे ”सर्फ फिशिंग” टूर्नामेंट स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदर स्पर्धा गुहागर समुद्र किनाऱ्यावर होणार आहे. या टूर्नामेंटला जिल्ह्याचे पालक मंत्री माननीय उदयजीं सामंत साहेब प्रमुख पाहुणे तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ६.०० वा. होणार असून बक्षीस वितरण सोहळा सायंकाळी ७.०० वा. होणार आहे.

सर्फ फिशिंग म्हणजे काय? 

सर्फ मासेमारी किनाऱ्यावर उभे राहून मासे पकडण्याचा किवा सर्फ मध्ये विहार करण्याचा खेळ आहे. सर्फ फिशिंग ही एक सामान्य संज्ञा आहे. आणि त्यात आमिष किवा आमिष टाकणे समाविष्ट असू शकते किवा नसू शकते. सर्व प्रकारच्या किनाऱ्यावरील मासेमारीचा संदर्भ देते. वालुकामय आणि खडकाळ किनारे, रॉक जेटी किवा अगदी मासेमारीच्या घाटांपासून अटी सर्फ कास्टिंग किवा बीच कास्टिंग किनाऱ्यावर किवा त्याच्या जवळ सर्फ मध्ये टाकून समुद्र किनाऱ्यावरून सर्फ करण्यासाठी विशेषतः खारट पाण्यामध्ये सर्फ मासेमारी केली जाते. सर्फ मच्छीमार सहसा १२ ते १६ फुट लांब मासेमारी रॉड वापरतात आणि लांब रॉडणे लांब अंतर टाकण्यासाठी कौशल्य आणि अनुभव आवश्यक असतो.

जास्तीत जास्त स्पर्धकांनी या मध्ये सहभाग नोंदवावा तसेच जास्तीत जास्त पर्यटकांनी या सुवर्णसंधीचा गुहागर किनारी फिशिंग स्पर्धा पाहण्यासाठी अवश्य भेट द्या असे आव्हान पर्यटन व्यवसायिक महासंघ गुहागर तालुका अध्यक्ष श्री संतोष घुमे व उपाध्यक्ष श्री संजय भागवत यांनी केले आहे

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search