Category Archives: रत्नागिरी

बारसू रिफायनरी प्रकल्पाचे भवितव्य अंधारात? प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीचा ईतर देशातील प्रकल्पांकडे फोकस..

मुंबई –कोकणात रिफायनरी प्रकल्प उभारणाऱ्या सौदी अर्माको ही कंपनी आता आपले लक्ष ईतर देशातील प्रकल्पामध्ये वळवताना दिसत आहे. या कंपनीने चीनमध्ये मोठा रिफायनरी प्रकल्प उभा करण्यासाठी नुकताच करार केला असून, चीनमधीलच आणखी एका प्रकल्पाचा विस्तार करण्याचीही घोषणा केली आहे.त्यामुळे कोकणातील वादग्रस्त रिफायनरी प्रकल्पाचे भवितव्य अंधारात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कोकणात रिफायनरी प्रकल्प उभा करण्याची घोषणा २०१६ साली झाली होती. आधी हा प्रकल्प नाणार इथे होणार होता. स्थानिकांचा विरोध झाल्याने नंतर बारसू इथे हा प्रकल्प करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र बारसू इथेही विरोध होत आहे. त्यात अजून या प्रकल्पासाठी तीन हजार एकर जागा संपादित व्हायची आहे. या सर्व प्रकारामुळे प्रकल्पाला दिरंगाई होत आहे. त्यामुळे सौदी आर्माको या कंपनीने आपले लक्ष आपल्या इतर देशातील प्रकल्पाकडे वळविल्याचे दिसत आहे.

मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या गोष्टीचा परिणाम बारसू येथील रिफायनरीवर होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. रिफायनरीला होणारा विरोध कमी झाला असून प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होईल असे ते म्हणाले.

Loading

काजूच्या दरात घसरण; काजू बागायतदार हैराण..

रत्नागिरी | रत्नागिरी आणि  सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजूचा (Raw Cashew nuts) दर दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. दोन्ही जिल्ह्यात काजूचा दर किलोला ११० ते ११५  रुपये प्रति किलोवर आला आहे. सुरवातीला १३५ रुपये प्रति किलो असेलेला दर असा पडत असल्यामुळे त्यामुळे काजू बागायतदार वर्ग हैराण झाला आहे.
कोरोनापूर्वी हा दर प्रतिकिलो १५० वर होता; परंतु कोरोना काळात तो ९० रुपयांवर आला. त्यानंतरच्या काळात हा दर १३०/१३५ रुपयापर्यंत आला. यंदाही हा दर १३५ रुपयापर्यंत गेला होता; परंतु आता तो १२० रुपये प्रति किलोपेक्षाही खाली गेला आहे. या मध्ये लक्ष न घातल्यास त्यापेक्षाही हा दर कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावठी काजू कोणी व्यापारी घेत नाही, घेतल्यास बाजारात चाललेल्या बाजारभावापेक्षा कमी भावात घेतल्या जातात. त्यामुळे कलमी काजू आणि गावठी काजुंसाठी दोन वेगवेगळे दर काही बाजारात चालू आहेत. 
प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, काजू बागायतदारांना दिलासा देण्यासाठी काजूला हमीभाव द्यावा तसेच केंद्राने काजूवरील कमी केलेले आयात शुल्क पूर्ववत करावेअशी मागणी जिल्हा शेतकरी संघटना आणि जिल्हा बागायतदार संघटनेने संयुक्तपणे केली आहे. 

Block "aadhar-pan" not found

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

बारसू रिफायनरी प्रकल्पग्रस्त म्हणून ‘गुप्ता’ ,’शहा’ आणि ‘मिश्रा’ यांची नावे लागणार?

रत्नागिरी | एखाद्या ठिकाणी  मोठा प्रकल्प येणार असेल तर तो जाहीर होण्यापूर्वीच तिथल्या जमिनी मोठ्या प्रमाणात राजकारणी  आणि  राजकीय व्यक्तींशी संबंधित असलेले व्यावसायिक खरेदी करण्यास सुरवात करतात. स्थानिक जमीनमालकांना या प्रकल्पाची कल्पनाही नसते त्यामुळे ते कमी भावात जमिनी विकून आपले नुकसान करतात. या खरेदी केलेल्या जमिनी प्रकल्पात गेल्या तर जमिनीचा चांगला भाव तर मिळतोच त्याबरोबर प्रकल्पग्रस्त म्हणून शासनाकडून अतिरिक्त फायदे पण मिळतात. जरी या जमिनी प्रकल्पात गेल्या नाही तरी फायदा होतो. कारण प्रकल्पाच्या आजूबाजूच्या जमिनीचे भाव गगनाला भिडतात. 
उदाहरण द्यायचे झाले तर बारसू सोलगाव येथे प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प. या प्रकल्पाच्या जागेवर आणि आजूबाजूस परप्रांतीयांनी मोठय़ा प्रमाणात जागा खरेदी केल्याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारात समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सचिव समीर शिरवाडकर यांनी ही सगळी माहिती माहितीच्या अधिकारात मिळवली आहे. या सगळ्याची माहिती देणारा एक ई-मेल शिरवाडकर यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे 16 मार्च रोजी पाठवला होता. त्यावर आपला ई-मेल अर्ज प्राप्त झाला असून पुढील कार्यवाहीसाठी महसूल विभागाकडे पाठवण्यात आला आहे, असे उत्तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून शिरवाडकर यांना देण्यात आले. या सगळ्या जमीन खरेदीच्या व्यवहारात राजकीय नेते, उच्चपदस्थ अधिकारी व परप्रांतीयांचा समावेश असल्याचा आरोप शिरवाडकर यांनी केला आहे.
राजापूर तालुक्यातीलच बारसू आणि सोलगावसह आसपासच्या गावामध्ये ही जमीन खरेदी केली गेली आहे. दरम्यान मागील दोन वर्षांमध्ये शेकडो एकर जमीन खरेदीचे व्यवहार याभागात झाल्याची बाबही माहिती अधिकारातून उघड आली आहे.
वारिसे यांच्या हत्येनंतर येथील बारसू प्रस्तावित रिफायनरी विशेष चर्चेत आली आहे. हा प्रकल्प उभारताना गैरप्रकार झालेत असे आरोप करण्यात येत आहेत. त्याची चौकशी व्हावी यासाठी विरोधकांनी मागणी केली आहे. तसेच या जमिनी विकत घेताना बळजबरीचा वापर केला गेला असेल तर त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. 
असे आहेत जमीन खरेदीदार






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

आम्हाला भीक मागून जगायचे नाही आहे.. व्यवसाय करायची संधी द्या.. तृतीयपंथींच्या या हाकेला अखेर शासनाचे उत्तर…

संग्रहित छायाचित्र

रत्नागिरी :समाजाच्या दृष्टीने तृतीयपंथी म्हणजे घरातून बाहेर काढलेले, रस्त्यावर भीक मागून उदरनिर्वाह करणारे आणि साामान्य माणसांना त्रास होईल अशी वागणारी व्यक्ती अशीच प्रतिमा आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील काही तृतीयपंथियांनी ईतर तृतीयपंथीना एक नवा आदर्श घालून दिला आहे. विशेष म्हणजे म्हणजे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने पण त्यांना मोलाची मदत केली आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींनी समाजकल्याण विभागाकडे आम्हाला व्यवसाय करण्यासाठी मदत करावी अशी मागणी केली होती. आम्हाला शासनाने व्यवसाय करण्याची संधी दिली तर आम्ही भीक मागणार नाही. आम्हाला व्यवसाय करायचा आहे. आम्हाला शासनाने पाठबळ द्यावे, अशी मागणी केली होती. आज त्यांच्या याच मागणीची जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आणि नोंदणीकृत तृतीयपंथियांना व्यवसाय उभारणीसाठी प्रत्येकी ८० हजाराचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याचा लाभ जिल्ह्यातील ४ तृतीयपंथियांनी होणार आहे.

हेही वाचा >‘देवगड’ च्या बॉक्‍समध्ये कर्नाटकाचा आंबा? ‘हापूस’ म्हणून तुम्ही दुसऱ्या राज्यातील आंबा तर खरेदी करत नाही ना?

 जिल्ह्यातील अतिशय संवेदनशील आणि तितकाच दुर्लक्षित असा घटक म्हणजे तृतीयपंथियांच्या व्यवसाय वृद्धी आणि त्यांच्या अडीअडचणींसंदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे समाजकल्याण विभागाची नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी रत्नागिरी जिल्हा सामाजिक न्यायभवन रत्नागिरी विभागाचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा समाजकल्याण विभागाकडे नोंदणी केलेले ४ तृतीयपंथी उपस्थित होते. 

Loading

तुतारी एक्स्प्रेसमध्ये रोख रक्कम व दागिने असलेली सापडलेली बॅग प्रवाशाला परत; प्रवाशांकडून रेल्वे कर्मचाऱ्यांचे कौतुक…

रत्नागिरी-कोकण रेल्वेत सेवेवर असणारे तिकीट तपासनीस श्री.नंदु मुळ्ये यांनी दाखवुन दिलेल्या प्रामाणिकपणा आणि सतर्कतेमुळे दादर – सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला त्याची गाडी मध्ये विसरलेली लाखोंचा ऐवज असणारी बॅग पुन्हा मिळाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की काल दिनांक 20 तारखेला प्रवासी सौ.जाधव या आपली एक बॅग गाडीतच विसरून विलवडे या स्थानकावर उतरली. त्या गाडीत सेवेवर असणारे तिकीट तपासनीस श्री.नंदु मुळ्ये याना ती बॅग आढळून आली. आजूबाजूला कोणताच प्रवासी नसल्याने त्यांना संशय आला म्हणुन त्यांनी त्या डब्यातील प्रवाशांकडे चौकशी केली. या चौकशीत ही बॅग तेथील कोणाचीच नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी कमर्शियल कंट्रोल मध्ये कळविले तसेच बॅगेत मिळालेल्या आधार कार्ड वरून त्यांचा PNR क्रमांक मिळवला व स्टेशन मास्तर यांच्याशी संपर्क केला. विलवडे स्टेशन मास्तरांनी बॅग विसरल्याबाबत आपणास कळवले असल्याचे सांगितले. 

सदर बॅग RPF कणकवली यांच्याजवळ सुपूर्द करून ताबडतोब RPF कर्मचाऱ्यांनी प्रवासी सौ.जाधव यांना फोन करून कळवून ओळख पटवून देऊन कणकवली येथे समक्ष भेटून बॅग नेण्यास सांगितले.

या बॅगमध्ये दागिने व रोख रक्कम ₹१,००,०००/- होते. 

या घटनेत तिकीट तपासनिस श्री.नंदु मुळ्ये,श्री.मिलिंद राणे, श्री.सदानंद तेली, श्री.विठोबा राऊळ, श्री.अजित परब, अटेंडंट श्री.तानावडे यांनी सतर्कता दाखवून रत्नागिरी कोकण रेल्वेची प्रतिमा उंचावली आहे, अशी पोचपावती इतर प्रवाशांनी दिली

हेही वाचा >‘देवगड’ च्या बॉक्‍समध्ये कर्नाटकाचा आंबा? ‘हापूस’ म्हणून तुम्ही दुसऱ्या राज्यातील आंबा तर खरेदी करत नाही ना?

Loading

मुंबई-गोवा महामार्गावर बोलेरो कार आणि स्कूल बस समोरासमोर धडकल्या; शालेय विद्यार्थी थोडक्यात बचावले

 

रत्नागिरी – मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ डिगेवाडी बस स्थानकासमोर आज सकाळी १०.३० वाजता बोलोरो आणि स्कूल बसला समोरासमोर भीषण अपघात घडला.अपघातात स्कूल बसमधील १४ विद्यार्थी बचावले.
येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्याबाबचे दिशादर्शक फलक उभारण्यात न आल्याने व काहीजण चुकीच्या दिशेने वाहने चालवत असल्याने वारंवार अपघात घडत आहेत.  
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा कार चालक संदीप सावंत हा रत्नागिरीहून खेडकडे निघाला होता. कामथे डिगेवाडी बस स्थानकासमोर स्कूलची बस अचानक विरुद्ध दिशेने आल्याने समोरासमोर धडक झाली. यात कार जागीच पलटी झाली. या अपघाताचा मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बस मधील सर्व विध्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. बोलोरो गाडीतील बँक कर्मचारी किरकोळ जखमी  झाले आहेत. दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

Loading

कोकणातील ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम; भरवणार ‘चाकरमान्यांची ग्रामसभा’

रत्नागिरी |आपल्या जन्मभूमीच्या विकासात आपण काही हातभार लावावा अशी प्रत्येक चाकरमान्यांची मनापासून इच्छा असते पण अनेक कारणांमुळे त्यांना सहभागी होता येत नाही. पण रत्नागिरीतील निवळी गावाच्या ग्रामपंचायतीने अशा चाकरमान्यांसाठी ‘चाकरमान्यांची ग्रामसभा’ हा उपक्रम चालू करून इतर गावांना एक नव आदर्श घालून दिला आहे.
निवळी गावचे सरपंच दैवत पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.ते म्हणाले कि गावातून शिक्षण घेऊन मुंबई, पुणे आणि  इतर शहरात गेलेल्या तरुण-तरुणींनी  गावच्या विकासाबाबत त्यांचे व्हिजन , नवीन संकल्पना मांडता याव्यात आणि त्यांच्या सहभागातून गावाचा सर्वांगीण विकास साधता यावा यासाठी ‘चाकरमान्यांची ग्रामसभा’ हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येणार आहे. आपल्याला या सूचना गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी दिल्या होत्या त्यावर विचार करून आम्ही हा निर्णय घेतला. ही सभा सुरवातीला वर्षातून एकदा म्हणजे गणेशोत्सवाच्या सुट्टीत किंवा मे महिन्यात आयोजित केली जाणार आहे. 
सुशिक्षित तरुण-तरुणी रोजगारासाठी शहरात जाण्याचे प्रमाण कोकणातील गावात जास्त आहे. त्यांच्या कल्पनाशक्तीचा, आधुनिक विचारसरणीचा आणि शिक्षणाचा फायदा घेऊन गावाचा आणि पर्यायाने जिल्ह्याचा विकास करण्यासाठी हा खूप चांगला उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे. असे उपक्रम प्रत्येक गावात राबविल्यास कोकणचा सर्वांगीण विकास होईल.

Loading

गावागावात असणारी गटबाजी गावांच्या विकासाला बाधक -सुहास खंडागळे

देवरुख:ग्रामीण भागाच्या विकासासाठी आता सामान्य माणसाला, तरुणांना पुढाकार घ्यावा लागेल.ठेकेदार प्रवृत्तीचे लोकं ग्रामीण राजकारणात आहेत यामुळे विकासात अडथळे येत आहेत.परिणामी कोणीतरी पैसेवाला शेठ येईल आणि आपल्या गावांचा विकास करेल या मानसिकतेतून लोकांनी बाहेर पडावे असे आवाहन गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी गोताडवाडी येथे आयोजित सभेत बोलताना केले.

धनिन देवी सेवा मंडळाच्या वतीने शनिवारी शिमगोत्सव निमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुहास खंडागळे यांनी ग्रामीण विकासाबाबत भाष्य केले.ठेकेदार प्रवृत्तीचे लोक राजकारण असल्याने गावांचा सर्वांगीण विकास होण्यात अडथळे येत असल्याचे सुहास खंडागळे यावेळी म्हणाले.ग्रामपंचायत कारभारात तरुणांनी लक्ष घातले पाहिजे. ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद यांचे सदस्य दुर्दैवाने अनेक लोकांना माहीत नसतात अशी परिस्थिती आपल्या ग्रामीण भागात आहे याकडेही खंडागळे यांनी लक्ष वेधले.कोणीतरी पैसेवाला येईल आणि आपल्या ग्रामीण भागात एखादा रस्ता पाखाडी करून देईल, अशा पद्धतीची मानसिकता आपण बदलली पाहिजे आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या गावांच्या विकासाला चालना दिली पाहिजे असे मत खंडागळे यांनी यावेळी व्यक्त केले.गावागावात असणारी गटबाजी ज्या दिवशी मोडीत निघेल त्या दिवशी गावांच्या विकासाचा मार्ग खुला झालेला असेल,ही गटबाजी मोडीत काढण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असे खंडागळे म्हणाले. एका गावात तीन, चार राजकीय गट असल्यानेच गावाचा विकास होत नाही.याकडे त्यांनी लक्ष वेधले. तरुणांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा असेही ते यावेळी आवर्जून म्हणाले .मोर्डे करंबेळे ग्रामपंचायत चे सदस्य असणारे नितीन गोताड यांनी मागील दोन वर्षात नळपाणी योजना,रस्ते विकासातील अडचणी, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य याबाबत खंडागळे यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले.

यावेळी व्यासपीठावर गावचे गावकर राजेश तुकाराम गोताड, अध्यक्ष उदय गोताड, गावीसचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे, डॉ. मंगेश कांगणे तसेच गोताडवतील सांगली व मुंबई मधील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Loading

बेशिस्त आणि मुजोर रिक्षाचालकांपासून ‘चाकरमानी’ बचावला; शिमगोत्सव दरम्यान रत्नागिरी आरटीओ विभागाची कडक मोहीम….

संग्रहित छायाचित्र
रत्नागिरी :गणेशोत्सव, होळी या सणांसाठी आणि हंगामात गावी येणाऱ्या चाकरमन्यांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून स्थानिक रिक्षाचालकांकडून त्यांची लूट केली जात आहे. रेल्वे स्थानकापासून गावापर्यंत सार्वजनिक वाहतुकीच्या अपुऱ्या व्यवस्थेचा ते गैरफायदा घेतात अशा तक्रारी कोकणात खासकरून रेल्वेस्थानकानजीकच्या रिक्षा चालकांविरोधात सर्रास ऐकायला मिळतात.
अशा तक्रारी वाढल्याने शिमगोत्सव दरम्यान रत्नागिरी आरटीओ विभागाने अशा रिक्षा चालकांविरोधात एक विशेष कडक मोहीम राबवली आहे. ह्या मोहिमे अंतर्गत ५० पेक्षा रिक्षाचालकाविरुद्ध विविध प्रकारात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
स्थानक व परिसर येथे २४ तास विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. प्रवाशांना नेमके भाडे कळावे यासाठी महत्वाच्या ठिकाणचे रिक्षा प्रवासाचे अधिकृत दरपत्रक आणि तक्रार करण्यासाठी आरटीओ विभागाचे दूरध्वनी क्रमांक रत्नागिरी स्थानक आणि इतर भागात लावण्यात आले आहेत. या दरांपेक्षा अतिरिक्त दर आकारणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात तशी तक्रार आल्यानंतर कारवाई करण्यात आली. 
या मोहिमेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी जयंत चव्हाण व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील सर्व मोटर वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी सहभाग नोंदवला. या मोहिमेबाबत प्रवासीवर्गाकडून समाधान व्यक्त होत आहे. तसेच  अशा प्रकारची मोहीम इतर रेल्वे स्थानिकांसाठी राबवावी अशी मागणी  होत आहे.  

Loading

१०५ वर्षाचे आजोबा आणि १०३ वर्षाच्या आजी..कोकणातील निसर्ग समृद्ध जीवनशैलीचा परिणाम. 

रत्नागिरी : प्रगतीमुळे विज्ञानामुळे माणसाचं आयुष्य वाढला. असं म्हणतात. पण यामुळे नद्या प्रदूषित झाल्या जंगला उध्वस्त झाले, कारखान्यांनी हवा प्रदूषित केली.

कोकणात असे गाव आहे जेथे स्वातंत्र्यानंतरही गेली 73 वर्ष रस्ता नव्हता. या गावात रुग्णाला डोलीतून खाली सात आठ किलोमीटर डोंगर उतरून दवाखान्यात आणावे लागत होते. अगदी दोन वर्षांपूर्वी या गावात पहिल्यांदा रस्ता आला.

अतिशय साधी मातीची घरे, तथाकथित कोणताही विकास नाही, निसर्ग पूरक जीवनशैली, हायब्रीड आणि केमिकल यांचा रोजच्या जगण्याशी काही संबंध नाही, कोणतेही प्रदूषण नाही, म्हटले तर अविकसीत पण जीवनशैलीच्या दृष्टीने अतिशय समृद्ध आणि प्रगत असे हे  रत्नागिरीतील लांजा या तालुक्यातील गाव म्हणजे माचाळ.

या गावात 105 वर्षाचे आजोबा आणि शंभर वर्षाच्या आजी हे दांपत्य राहते. या गावात अनेक वृद्ध माणसे 80/ 90 /95 वर्षाची आपल्याला भेटतील.

समृद्ध जीवनशैली प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी दोन दिवस आपण माचाळला येऊन राहिले पाहिजे. हे कोकणातील पहिले हिल स्टेशन येथील कार्यकर्त्यांनी इको हिल स्टेशन निसर्ग समृद्ध पर्यटन केंद्र म्हणून विकसित करायचं ठरवलं.

निसर्गावर प्रेम करणाऱ्या पर्यटकांनी येथे येऊन राहावं आणि या गावातील निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा यातून ग्रामीण अर्थव्यवस्था विकसित व्हावी अशा स्वरूपाचा हा उपक्रम आहे. याच साठी माचाळ महोत्सव 2023 आयोजित करत आहोत. अकरा व बारा मार्च हा विशेष महोत्सव आयोजित होत आहे

 येथील निसर्ग समृद्ध जीवनशैली लोककला उत्सव यांचा अनुभव निसर्गप्रेमी पर्यटकांनी सहपरिवार घ्यावा अशा स्वरूपाची संकल्पना आहे अर्थात मर्यादित पर्यटकांना या पर्यटन केंद्रावर प्रवेश दिला जाणार आहे. राजापूर लांजा तालुका नागरीक संघ, आणि स्थानिक कार्यकर्त्यांची टीम संपूर्ण नियोजन करत आहे.

संजय यादवराव 

कोकण क्लब /कोकण बिझनेस फोरम

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search