रत्नागिरी | रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजूचा (Raw Cashew nuts) दर दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. दोन्ही जिल्ह्यात काजूचा दर किलोला ११० ते ११५ रुपये प्रति किलोवर आला आहे. सुरवातीला १३५ रुपये प्रति किलो असेलेला दर असा पडत असल्यामुळे त्यामुळे काजू बागायतदार वर्ग हैराण झाला आहे.
कोरोनापूर्वी हा दर प्रतिकिलो १५० वर होता; परंतु कोरोना काळात तो ९० रुपयांवर आला. त्यानंतरच्या काळात हा दर १३०/१३५ रुपयापर्यंत आला. यंदाही हा दर १३५ रुपयापर्यंत गेला होता; परंतु आता तो १२० रुपये प्रति किलोपेक्षाही खाली गेला आहे. या मध्ये लक्ष न घातल्यास त्यापेक्षाही हा दर कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावठी काजू कोणी व्यापारी घेत नाही, घेतल्यास बाजारात चाललेल्या बाजारभावापेक्षा कमी भावात घेतल्या जातात. त्यामुळे कलमी काजू आणि गावठी काजुंसाठी दोन वेगवेगळे दर काही बाजारात चालू आहेत.
हेही वाचा > परशुराम घाट आठवाडाभरासाठी वाहतुकीस बंद राहणार
प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, काजू बागायतदारांना दिलासा देण्यासाठी काजूला हमीभाव द्यावा तसेच केंद्राने काजूवरील कमी केलेले आयात शुल्क पूर्ववत करावेअशी मागणी जिल्हा शेतकरी संघटना आणि जिल्हा बागायतदार संघटनेने संयुक्तपणे केली आहे.
Block "aadhar-pan" not found
Block "ad1" not found
Facebook Comments Box



