Category Archives: कोकण

Kudal: डंपर खाली सापडून शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

कुडाळ:वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर खाली सापडून शाळकरी विद्यार्थिनी मनस्वी सुरेश मेथर (15, रा. निवती) जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास पाट तिठा (माऊली मंदिर नजीक) येथे घडली. मोटारसायकलस्वार युवकाला किरकोळ दुखापत झाली. मनस्वी मोटारसायकलच्या मागे बसून जात होती. वाळू वाहतूक करणारा डंपर परुळे – पाट मार्गे कुडाळच्या दिशेने येत होता. मोटारसायकल व डंपरची धडक बसून झालेल्या अपघातात मनस्वी डंपरच्या चाकाखाली सापडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच निवती पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. जखमी मोटारसायकलस्वाराला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान निवती व पाट पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत, निवती पोलिस ठाण्यात धडक देत, अपघाताला कारणीभूत ठरणा-यांवर तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई करावी, तसेच बेदरकार डंपर वाहतुकीला आळा घालावा अशी मागणी लावून ठरली. या अपघाताची खबर योगेश उल्हास मेतर (रा. निवती मेढा) यांनी निवती पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार या अपघातप्रकरणी सोळा वर्षीय मोटारसायकलस्वार मुलगा, गाडी चालविण्याचा परवाना नसतानाही त्याला गाडी चालविण्यास दिल्याने त्याचे वडील वैभव मांजरेकर (रा.हुमरमळा करमळीवाडी) आणि डंपर चालक शैलेश कुमार सिंग अशा तिघांवर निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती सहाय्यक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी दिली.

Konkan Railway: मत्स्यगंधा एक्सप्रेस ‘एलएचबी’ झाली तरीही प्रवासी नाराज! कारण काय?

   Follow us on        
Konkan Raiwlay: अलीकडेच मत्स्यगंधा एक्सप्रेससाठी लिंके हॉफमन बुश (एलएचबी) कोचसह नवीन रेक मिळाल्याबद्दल प्रवाशांमध्ये उत्साह होता. मात्र तो अल्पकालीनच ठरला आहे. कारण या गाडीला जोडण्यात आलेले ५०% कोच जुने म्हणजे २०१४ ते २०२३ दरम्यान निर्माण केलेले आणि वाईट स्थितीत आहेत.
गाडी क्रमांक १२६२०/६१९ मंगळुरू-मुंबई एलटीटी-मंगळुरू मत्स्यगंधा एक्सप्रेस च्या एलएचबी रेक साठी  १६३४८/३४७ मंगळुरू सेंट्रल-तिरुवनंतपुरम सेंट्रल-मंगळुरू सेंट्रल एक्सप्रेस ही गाडी Rake Sharing Arrangement (RSA) साठी निवडण्यात आली आहे. या दोन्ही गाड्यांसाठी चालविण्यात येणारे एकूण चार रेक जुने आणि वाईट स्थितीत आहेत.
दक्षिण रेल्वेच्या तिरुवनंतपुरम विभागाकडे हे २२ कोचेचे चार रेक आहेत. चार रेकसाठी एकूण ८८ कोचपैकी ४४ कोच नवीन म्हणजे २०२४ मध्ये बांधले गेले आहेत तर उर्वरित २०१४ ते २०२३ दरम्यान बांधले गेले होते. यातील एका रेकमध्ये २०२४ मध्ये बांधलेले २१ कोच आहेत, दुसऱ्यामध्ये १२ कोच आहेत, तिसऱ्या मध्ये  ९ आणि चौथ्यामध्ये  २०२४ मध्ये बांधण्यात आलेले फक्त २ कोच आहेत. बाकी सर्व जुने म्हणजे २०१४ ते २०२३ दरम्यान बांधले गेलेले कोच आहेत. अशी माहिती मिळाली आहे.
दक्षिणेकडील खासदार कोटा श्रीनिवास पुजारी १२ मार्च रोजी नवी दिल्ली येथे रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांची भेट घेतली आणि ही बाब मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. खासदारांनी श्री. सोमन्ना यांना मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या सर्व रॅकवर अलीकडेच बांधलेले डब्यांची जोडणी करण्याचे निर्देश संबंधित विभागीय रेल्वेला द्यावेत अशी विनंती केली आहे.  रेल्वेमंत्र्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी सांगितले.
Year of manufacture
Number of coaches
2014 1
2015 3
2017 1
2018 8
2019 5
2020 4
2021 8
2022 8
2023 6
2024 44
Total 88

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील दोन स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांचे थांबे मंजूर

   Follow us on        
Konkan Railway: रेल्वे मंत्रालयाने कोकण रेल्वेमार्गावरील कुमठा आणि कुंदापूरा या दोन स्थानकांवर प्रायोगिक तत्वावर थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे. कुमठा येथे एक तर कुंदापूरा येथे दोन गाडयांना थांबे मंजूर करण्यात आले आहेत.
गाडी क्रमांक २२४७६ कोइम्बतूर – हिसार एक्सप्रेस / गाडी क्रमांक २२४७५ हिसार – कोइम्बतूर एक्सप्रेस ही गाडी दिनांक १५ मार्च २०२५ पासून कुमठा या स्थानकावर थांबणार आहे.
तर गाडी क्रमांक २२६५३ तिरुवनंतपुरम सेंट्रल – एच. निजामुद्दीन एक्सप्रेस / गाडी क्रमांक  २२६५४ एच. निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस ही गाडी दिनांक १५ मार्च २०२५ पासून आणि गाडी क्रमांक २२६५५ एर्नाकुलम जंक्शन – एच. निजामुद्दीन एक्सप्रेस / गाडी क्रमांक  २२६५६ एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जंक्शन. एक्सप्रेस दिनांक १४ मार्च २०२५पासून कुंदापूरा या स्थानकावर थांबणार आहे.

थांबे मिळवून देण्यात खासदारांचे विशेष प्रयत्न

उत्तरा कन्नड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी कुमठा येथे थांबे मिळवण्यासाठी तर श्री कोटा पुजारी  यांनी कुंदापूरा येथे थांबे मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

Mumbai Goa Highway: जनआक्रोश समितीकडून १३ रोजी ‘डेडलाईन’ची होळी

   Follow us on        

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. महामार्गाच्या अपूर्णावस्थेतील कामांमुळे चाकरमान्यांना प्रत्येक सणात जीवघेणा प्रवास करत गाव गाठावे लागत आहे. महामार्ग काम रखडल्याच्या निषेधार्थ मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती १३ मार्च रोजी सायंकाळी ६ वा. माणगाव-बायपास व संगमेश्वर एसटी आगारासमोर सरकारच्या ‘डेडलाईन’ची होळी पेटवणार आहे. महामार्गावरील पळस्पेपासून सिंधुदुर्गपर्यंत एकाच दिवशी आंदोलन छेडून प्रशासनाच्या नावाने ‘शिमगा’ करणार आहे.

मुंबई-गोवा महामार्ग पूर्णत्वाच्या आजवर देण्यात आलेल्या सर्व ‘डेडलाईन’ हवेत विरल्या आहेत. महामार्गाच्या अपूर्णावस्थेतील कामासह ठिकठिकाणी निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामामुळे कोकणवासियांची कसरत अजूनही कायम आहे. प्रत्येक सणांपूर्वी महामार्गाचे काम पूर्ण होईल, अशी हमी दिली जाते. मात्र सण संपल्यानंतर त्याकडे कानाडोळा करत महामार्गाचे संथगतीने काम सुरू असून १४ वर्षे लोटून अजूनही कोकणवासियांचा वनवास संपलेला नाही. महामार्गप्रश्नी महामार्ग जनआक्रोश समितीने सातत्याने महामार्गावर आंदोलने, मोर्चे काढून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान, वेळोवेळी समितीच्या शिष्टमंडळाला देण्यात आलेल्या ‘डेडलाईन’ आजमितीसही पूर्ण झालेल्या नाहीत. या निषेधार्थ शिमगोत्सवात जनआक्रोश समितीने सरकारसह प्रशासनाच्या नावाने शिमगा करण्याचे अस्त्र उगारले आहे. या निषेध आंदोलनात कोकणवासियांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

आतापर्यंत खालील ठिकाणी होळी करण्यासाठी कोकणकर एकवटले आहे.
१)पळस्पे
२)पेण
३)आमटेम
४)वाकण
५)कोलाड
६)इंदापूर
७)माणगाव बायपास
८)लोणेरे
९)महाड
१०)पोलादपूर
११)खेड टोलनाका
१२)चिपळूण बहादूर शेख नाका
१३)हातखांबा
१४)संगमेश्वर (डेपोच्या समोर)
१५)लांजा
प्रत्येक कोकणकरानी एक कोकणकर म्हणून आपण देखील या आंदोलनात सामील  व्हावे असे आवाहन समिती तर्फे करण्यात आले आहे.

 

सावंतवाडी: कलंबिस्त येथे युवकाची गळफास घेत आत्महत्या

   Follow us on        

सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त गणशेळवाडी येथील 26 वर्षीय निलेश न्हानु सावंत या युवकाने घराच्या अंगणातील लोखंडी छप्पराला गळफास लावत आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. या घटनेने कलंबिस्त गावात हळहळ व्यक्त होत आहे. मयत निलेश सावंत याचे काका राजन सावंत यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस हवालदार प्रसाद कदम, लक्ष्मण काळे यांनी जाऊन पंचनामा केला. निलेश हा शांत व मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याचा मित्रपरिवार ही मोठा होता. निलेश याच्या पश्चात आई, भाऊ, बहीण, काका असा मोठा परिवार आहे.

मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेसची यशस्वी वाटचाल

   Follow us on        
Konkan Railway:मुंबई-गोवा मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता पर्यंत सुरु करण्यात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या यशश्वी मार्गात या मार्गाची  गणना होता आहे. या गाडीच्या प्रवाशांची संख्याही वेगाने वाढत आहे. आरामदायी आणि वेगवान प्रवासाच्या चाहत्या वर्गाकडून या गाडीला तुफान प्रतिसाद मिळत आहे.
मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांत एकूण ५० हजार ७३९ प्रवाशांनी या ट्रेनमधून प्रवास केला आहे. वेगवान, सुरक्षित आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या ट्रेनला प्रवासी आणि पर्यटकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.

मागील २ महिन्यांची प्रवासी संख्या

मार्ग जानेवारी  फेब्रुवारी एकूण
सीएसएमटी-मडगाव १३,१९६ ११,६१४ २४,८१०
मडगाव-सीएसएमटी १३,२४५ १२,६८४ २५,९२९
सेमी-हायस्पीड ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. पहिल्याच फेरीत या ट्रेनच्या ५३३ आसन क्षमतेपैकी ४७७आसने भरली होती; प्रारंभी ९१.४४ ते ९३.११ टक्के क्षमतेने धावणाऱ्या या ट्रेनला सध्या ९५ टक्के प्रतिसाद मिळत आहे. या ट्रेनला सध्या आठ डबे असून प्रवाशांसाठी आरामदायी आसने, वेगवान सेवा आणि आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती केली असून ती किफायतशीर दरात उपलब्ध आहे. सध्या मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी-सोलापूर, सीएसएमटी-शिर्डी, सीएसएमटी-जालना आणि सीएसएमटी-मडगाव या वंदे भारत गाड्या धावत आहेत. या सर्व गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत असून सुरक्षित आणि वेगवान प्रवासासाठी प्रवासी समाधान व्यक्त करीत आहेत.

Video: लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ; फिरत्या विक्रेत्याच्या कुल्फीमध्ये आढळल्या अळ्या

   Follow us on        

सावंतवाडी: सावंतवाडीतील कलंबीस्त गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे आलेल्या एका फिरत्या विक्रेत्याच्या कुल्फीमध्ये किडे सापडले आहेत. हा प्रकार समजल्यानंतर येथील जागृत ग्रामस्थांनी त्या विक्रेत्याला धारेवर धरले आहे.

याबद्दल जाब विचारल्यानंतर विक्रेत्याने यात आपली काही चूक नसून या खाद्यपदार्थांची मी फक्त विक्री करत आहे असे सांगितले. त्याने जेथून हे खाद्यपदार्थ विकत घेतो त्या व्यावसायिकाचे नावही सांगितले.

या प्रकारामुळे या विक्रेत्यांकडून हे पदार्थ विकत घेणार्‍या लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे पदार्थ बनवताना योग्य ती स्वच्छता राखली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा व्यावसायिकांवर योग्य वेळी कारवाई केली गेली नाही तर पुढे या निष्काळजीपणामुळे जीव गमावण्यांची शक्यता नाकारता येत नाही. केंद्र सरकारने अन्नसुरक्षेसाठी FSSAI या संस्थेची नियुक्ती स्थापना केली आहे. या संस्थेने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Loading

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार पाटणा – वास्को द गामा विशेष एक्सप्रेस

   Follow us on        
Konkan Railway: होळी उत्सव – २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी ट्रेन क्रमांक ०७३११ / ०७३१२ वास्को द गामा – पटना – वास्को द गामा एक्सप्रेस स्पेशल या गाडी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनातर्फे  घेण्यात आला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहेत.
१) गाडी क्रमांक ०७३११ / ०७३१२ वास्को द गामा – पटना – वास्को द गामा एक्सप्रेस स्पेशल:
ट्रेन क्रमांक ०७३११ वास्को द गामा – पटना एक्सप्रेस स्पेशल मंगळवार, ११/०३/२०२५ रोजी दुपारी ४:०० वाजता वास्को द गामा येथून निघेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजता वास्को द गामा येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ०७३१२ पाटणा – वास्को द गामा एक्सप्रेस स्पेशल शनिवार, १५/०३/२०२५ रोजी सायंकाळी ५:४० वाजता पाटणा येथून निघेल आणि तिसऱ्या दिवशी १०.३० वाजता वास्को द गामा येथे पोहोचेल.
ही गाडी मडगाव जंक्शन, थिविम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण जंक्शन, नाशिक रोड, मनमाड जंक्शन, भुसावळ, खांडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज , पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि दानापूर स्टेशन या स्थानकांवर थांबेल.
रचना : एकूण २० एलएचबी कोच = दोन टायर एसी – ०१  कोच, थ्री टायर एसी – ०५  कोच, स्लीपर – १२  कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

….अन्यथा महाराष्ट्रदिनी सावंतवाडी स्थानकावर पुन्हा ‘रेल रोको’…प्रवासी संघटनेचा इशारा

   Follow us on        
सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी स्थानक हे तळकोकणातील महत्त्वाचे स्थानक असून या ठिकाणी कोकणवासी आणि पर्यटकांची नेहमी रेलचेल असते. येथील स्थानक टर्मिनस घोषित होऊन तब्बल दहा वर्षे उलटली परंतु हे काम देखील गेली अनेक वर्षे रखडले आहे. ह्या स्थानकातून कोरोना काळात एकूण सहा गाड्या काढून घेण्यात आल्या होत्या. या संदर्भात कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी या संघटनेने या बद्दल अनेक वेळा आवाज उठवला असून या ठिकाणी तब्बल तीन वेळा आंदोलन देखील केले होते, आताच २६ जानेवारी २०२६ रोजी केलेल्या रेल रोको आंदोलनाची दखल महाराष्ट्रातील जनतेने घेतली होती. तरी देखील कोकण रेल्वे प्रशासनाकडून याची योग्य दखल घेण्यात आली नाही असेच या वरून दिसते.
सावंतवाडी स्थानकाचे उत्पन्न आणि प्रवासी संख्या ह्या रेल्वे बोर्डाच्या मानकापेक्षा अधिक असून देखील येथे थांबे न देण्यामागे कोकण रेल्वे प्रशासनाचे काय हित आहे हे मात्र अनुत्तरित आहे.या वर्षात आधी रोहा आणि आता कुमठा येथे नवीन थांबे मंजूर झाले परंतु सावंतवाडी स्थानकात काढून घेण्यात आलेले थांबे पुन्हा देण्यात रेल्वे प्रशासन एवढा आखडता हात का घेत आहे हा प्रश्न सामान्य कोकणकर जनतेला पडला आहे.
कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या १२२३१ /३२ त्रिवेंद्रम – निजामुद्दीन – त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस, १२२०/०२ एल टी टी – कोचुवेली – एल टी टी गरीब रथ एक्सप्रेस या गडांचा थांबा अजूनही पूर्ववत केला गेला आहे. त्याबरोचर मुंबई सीएसएमटी  – मंगलोर या गाडीला सावंतवाडी येथे थांबा देण्यात यावा या मागणीलाही वारंवार केराची टोपली दाखवली जात आहे. मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेस या गाडीला सावंतवाडी येथे थांबा मिळणे अपेक्षित होते. मात्र तिथेही या स्थानकाला डावलले गेले आहे.  कोकण रेल्वे प्रशासन जर असेच करणार असेल तर पुन्हा महाराष्ट्र दिनी भव्य रेल रोको करू असा इशारा कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी  ने दिला आहे.

Konkan Railway: पुणे – कल्याण – सावंतवाडी विशेष गाडी चालविण्यात यावी

   Follow us on        

Konkan Railway: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि कोकण यांना जोडणारी थेट विशेष रेल्वे गाडी चालविण्यात यावी अशी मागणी कोकण विकास समितीने केली आहे. पुणे ते सावंतवाडी दरम्यान कल्याण मार्गे विशेष रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांवरील ताण कमी होऊन पुणे आणि कोकण दरम्यानची कनेक्टिव्हिटी वाढेल, असे कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत शंकर दरेकर यांनी ईमेल द्वारे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पुणे आणि कोकण दरम्यान थेट रेल्वे गाडी नसल्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते, त्यामुळे प्रवासाचा अनुभव खूपच त्रासदायक होतो. या मार्गावर विशेष रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि कोकणच्या विकासाला चालना मिळेल, असे दरेकर यांनी म्हटले आहे.

यापूर्वी या मार्गावर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या, ज्यांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा या मार्गावर विशेष गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण विकास समितीने केली आहे.

या गाडीला खालील थांबे देण्यात यावेत

पुणे – चिंचवड – तळेगाव – लोणावळा – कर्जत – कल्याण – पनवेल – पेण – रोहा – माणगाव – वीर – सापे वामने – करंजाडी – खेड – चिपळूण – सावर्डा – अरावली रोड – संगमेश्वर रोड – रत्नागिरी – आडवली – विलावडे – राजापूर रोड – वैभववाडी रोड – नांदगाव रोड – कणकवली – सिंधुदुर्ग – कुडाळ – झारप – सावंतवाडी रोड

रेल्वे प्रशासन या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर विशेष रेल्वे गाडी सुरू करेल, अशी अपेक्षा कोकण विकास समितीने व्यक्त केली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search