Category Archives: कोकण

Shaktipeeth Expressway: नागपूर-गोवा महामार्गाच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी सुधारित संरेखनासह अर्ज दाखल

   Follow us on        

Nagpur Goa Shaktipeeth Expressway: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शक्तीपीठे, काही महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आणि तीर्थक्षेत्रे यांना जोडणारा नागपूर आणि गोवा दरम्यान द्रुतगती मार्ग बांधण्याच्या महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आता गती मिळू लागली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती मार्गासाठी पर्यावरण मंजुरीसाठी नवीन अर्ज सादर केला आहे.

ऑगस्टच्या सुरुवातीला, स्थानिक शेतकऱ्यांसह शिष्टमंडळाने कोल्हापुरात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेऊन प्रकल्प रद्द करण्याची मागणी केल्यानंतर, एमएसआरडीसीने प्रकल्पासाठी पर्यावरण मंजुरी घेण्याची योजना मागे घेतली होती.मात्र MSRDC ने आता पुन्हा अर्ज केला आहे. या सुधारित अर्जात वर्धा ते सिंधुदुर्ग पर्यंतच्या सर्व पॅकेजेससाठी काही संरेखन पर्याय सादर केले आहेत.

प्रस्तावित सहा-लेन प्रवेश-नियंत्रित शक्तीपीठ एक्सप्रेसवे लांबीमध्ये नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्गापेक्षा लांबीला (802 किलोमीटर) मोठा असणार आहे. शक्तीपीठ द्रुतगती मार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होईल आणि महाराष्ट्र-गोवा राज्य सीमेवरील पत्रादेवी येथे संपेल. हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमधून जाण्याचा प्रस्ताव आहे. एक्स्प्रेस वेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ 18-20 तासांवरून 8-10 तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. वृत्तानुसार, विदर्भ आणि मराठवाड्यातील जमीन मालक या प्रकल्पाला पाठिंबा देत आहेत, तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून याला मोठा विरोध होत होता.

या विरोधामुळे प्रकल्पासाठी एकापेक्षा जास्त संरेखन पर्याय सादर करण्यात आलेले आहेत. हे पर्याय ठरविताना हा मार्ग सुपीक जमिनी नाश करणारा नसेल आणि पर्यावरणाला जास्त हानी पोहोचवणारा नसेल याची दक्षता यावेळी घेतली असल्याचे संबधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

 

 

“…अन्यथा प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी स्थानकावर रेल रोको आंदोलन…” कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचा इशारा

   Follow us on        
सावंतवाडी:  भूमीपूजन होऊन तब्बल ९ वर्षे उलटूनही अद्यापही अपूर्ण अवस्थेत असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनस बाबत सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेकडून प्रशासनाला जाग आणण्यासाठी येत्या प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे मोठ्या प्रमाणात प्रवासी एकञ करून रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. रेल्वे प्रवासी संघटनेकडून वेळोवेळी आंदोलने करूनही मागण्यांची दखल घेतली जात नसल्या कारणाने नाराज झाल्याने अखेर रेल रोको आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
याबाबतची नोटीस प्रवासी संघटनेकडून सावंतवाडी रेल्वे स्थानक स्टेशनमास्तर यांना देण्यात आली.या नोटीस मध्ये असे म्हटले आहे की, सावंतवाडी रोड स्थानकावर प्रस्तावित टर्मिनस चे भूमिपूजन दिनांक २०/०६/२०१५ रोजी मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, मा. रेल्वे मंत्री श्री सुरेश प्रभू, मा. पालकमंत्री श्री दिपक केसरकर, मा. खासदार श्री विनायक राऊत, लोकप्रतिनिधी, व रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेले आहे. तसेच या कामाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन देखील झाले आहे, असे असताना या स्थानकाच्या नामकरणाचा विषय अजूनही प्रलंबित आहे. याचबरोबर २६ जानेवारी २०२४ रोजी संघटनेतर्फे सावंतवाडी स्थानकावर लाक्षणिक उपोषण आंदोलन देखील करण्यात आले होते. त्यावर देखील आपणाकडून आलेल्या पत्रात असंख्य चुका करण्यात आल्या होत्या. आपण अजूनही सावंतवाडी येथील टर्मिनसच्या कामावर आणि येथील प्रवासी सुविधांवर गंभीर नाहीत हेच यावरून निदर्शनास येते.
     
तसेचं कोकण रेल्वे महामंडळाने सावंतवाडी येथील टर्मिनसच्या उर्वरित कामासाठी निधीची तरतूद करावी. कोकण रेल्वे महामंडळाने सावंतवाडी टर्मिनस च्या नामकरण संदर्भात आपला प्रस्ताव संबंधित प्रशासनाला पाठवावा. कोकण रेल्वे महामंडळाने सावंतवाडी स्थानकाचा समावेश केंद्राचा अमृत भारत स्थानक योजनेत करण्यासाठी पुन्हा एकदा योग्य तो पाठपुरावा संबंधित प्रशासनाकडे करावा. सावंतवाडी स्थानकात खालील रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा. सावंतवाडी स्थानकावरून कल्याण पुणे मार्गावर नवीन ट्रेन चालू करणे. सावंतवाडी ते बेळगाव ह्या नवीन रेल्वे मार्गाचे काम सुरु करणे. या मागण्या संघटनेकडून करण्यात आल्या आहेत, या मागण्या मान्य न झाल्यास प्रजासत्ताक दिनी मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी एकञ येऊन रेल रोको करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

Konkan Railway: खेड स्थानकावरील ‘अत्याधुनिक एक्झिक्युटिव्ह लाउंज’ चे उद्घाटन; ‘लाउंज’ मध्ये कोणत्या सुविधा मिळतात?

   Follow us on        
Konkan Railway: महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील  खेड रेल्वे स्थानकावर बनविण्यात आलेल्या  ‘अत्याधुनिक एक्झिक्युटिव्ह लाउंज’ चे उद्घाटन कोंकण रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी केले. यावेळी कोंकण रेल्वेचे मुख्य वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव, कोकण रेल्वेचे विभागीय व्यवथापक  शैलेश बापट आणि केआरसीएलचे इतर अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी कोकण रेल्वे मार्गावर मडगाव रेल्वे स्थानकावर अशी सुविधा देणारे एक्झिक्युटिव्ह लाउंज सुरु करण्यात आले होते. मात्र कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र क्षेत्रातील अशा प्रकारचे हे पहिले लाउंज ठरले आहे. वातानुकूलित आणि विविध सुविधा असलेले हे लाउंज आरामदायक असेल आणि प्रवाशांना खूप सोयीचे पडेल अशा विश्वास यावेळी संतोष कुमार झा यांनी केला.
एक्झिक्युटिव्ह लाउंज मध्ये कोणत्या सुविधा मिळतात? 
देशाच्या विमानतळावर असलेल्या आरामदायक एक्झिक्युटिव्ह लाउंजच्या धर्तीवर प्रवाशांना आरामदायक सोयी सुविधा देण्यासाठी असे लाउंज आता भारतीय रेल्वेच्या प्रमुख रेल्वे स्थानकावर बनविण्यात येत आहेत. प्रति तासासाठी काही ठराविक रक्कम देऊन लाउंज मध्ये प्रवाशांना थांबता येते. अशा प्रकारच्या लाउंज मध्ये कमी अधिक फरकाने  खालील सुविधा मिळतात
१. दोन तासांचा मुक्काम
२. वाय-फाय
३. शीतपेये (चहा, कॉफी, शीतपेये)
४. वर्तमानपत्र आणि मासिके वाचन
५. ट्रेन माहिती प्रदर्शन आणि घोषणा
६. टीव्ही
७. शौचालये आणि मूत्रालये
८. शू शायनर
९. पूर्णपणे एसी बसण्याची जागा

मुंबई गोवा महामार्गावर हातखंब्यानजीक कार आणि ट्रेलरचा अपघात; कारचालकाचा दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

रत्नागिरी : गोवा – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर हातखंब्यानजीक रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ कारने अवजड ट्रेलरला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारचालक ठार झाला.

अपघाताची सविस्तर माहिती अशी शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीहून हातखंब्याजवळ ट्रक जीजे 27 टिएफ 6818 हा गोव्याहून नवी मुंबईकडे चाललला होता. त्याला मागून येत असलेल्या कार एमएच 01 एएक्स 9281 ने जोराची धडक दिली. त्यात कारचालक नितीन श्रीकांत शिरवळकर, रा. मुंबई गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची हातखंबा येथील रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. त्यातून जखमीला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले.

दोन्ही वाहनांची धडक मोठी होती. त्यात कारच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला आहे. अपघतस्थळी लोकांनी गर्दी केली होती. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून वाहने बाजूला घेतली व वाहतूक पूर्ववत सुरू केली.

Konkan Railway: ‘शेकोटी’ मुळे कोकणरेल्वे रखडली

   Follow us on        
Konkan Railway: पहाटेच्यावेळी थंडीपासून बचाव करण्यासाठी मडगाव रेल्वे स्थानकाजवळ काहीजणांनी शेकोटी पेटविली होती. त्या शेकोटीची धग रेल्वेची सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणाऱ्या केबलला लागून संपूर्ण केबल जळाल्याने गोव्यातून बाहेरच्या राज्यांना संपर्कासाठी वापरली जाणारी यंत्रणा तब्बल चार तास कोलमडली.
यात रेल्वेच्या संदेशवहन प्रणालीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोकण रेल्वे स्थानकाच्या आवाराबाहेर हा प्रकार घडला. या भागात रेल्वे स्थानकावर काम करणारे काही हमाल राहतात. याच हमालाच्या एका ग्रुपने ही शेकोटी पेटविली होती. सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्ग तसेच दक्षिण-पश्चिम रेल्वे मार्गावरील कित्येक रेल्वेगाड्या वेगवेगळ्या ठिकाणी थांबवून ठेवल्या. शेवटी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचे कवच देऊन या रेलगाड्या हळूहळू मार्गस्थ केल्या.
यासंदर्भात कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांच्याशी संपर्क साधला असता, चार तासांच्या अथक परिश्रमानंतर सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित केली. मात्र, त्यामुळे काही रेल्वे उशिरा धावल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात मडगाव पोलिसांशी संपर्क साधला असता, अद्याप कुणाच्याही विरोधात तक्रार नोंदविलेली नाही, असे सांगण्यात आले.

बेळगाव-चंदगड-सावंतवाडी रेल्वेसाठी प्रयत्न करणार: खा. धनंजय महाडिक

   Follow us on        

कोल्हापूर: बेळगाव-चंदगड सावंतवाडी रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालीन. रेल्वे मंत्र्यांना लवकरच भेटून निधी आणण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन खा. धनंजय महाडिक यांनी बेळगाव, चंदगड, सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले.

बेळगाव-चंदगड, सावंतवाडी रेल्वे हा रेल्वे मार्ग ११४.६ कि.मी.चा असून जवळपास १८०५ करोडचा खर्च अपेक्षित आहे. या रेल्वे मार्गाचा सर्व्हे रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आला असून या रेल्वे मार्गामुळे चंदगड, आजरा व गडहिंग्लज या तालुक्याचा विकास अपेक्षित आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिण विभाग रेल्वे मार्गाने देशाशी जोडला जाईल. या संदर्भात कोल्हापूर, बेळगावचे खासदार यांना प्रत्यक्ष भेटून संघर्ष समितीने निवेदने दिली आहेत.

खा. महाडिक यांना नेसरी येथे बेळगाव, चंदगड, सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश दळवी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे सुरू करण्यासंदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष विजयकुमार दळवी, भाजप नेते संग्रामसिंह कुपेकर, चंदगड पंचायत समितीचे माजी सभापती बबनराव देसाई, संघर्ष समितीचे सरचिटणीस रवी नाईक, एकनाथ वाके आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५०% जमिनींवर वक्फ बोर्डाचा दावा; नितेश राणे यांचा धक्कादायक खुलासा

   Follow us on        

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० ते ६० टक्के जमिनींवर वक्फ बोर्डनं दावा ठोकला आहे. महत्वाच्या देवस्थानावर ही दावा केला गेला आहे, असं विधान राज्याचे मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी केला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दावा केलेल्या जागांची यादी समोर आली असून देवगड, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला आदी तालुक्यांचा समावेश या यादीत आहे. १५६ ठिकाणी वक्फ बोर्डानं दावा केल्याचं समोर येत आहे. मंत्री नितेश राणे म्हणाले होते की, या बोर्डानं दावा ठोकल्यावर आपण न्याय देखील मागू शकत नाही. या काद्यात कोर्ट, अधिकाऱ्यांसह सर्व मंडळी ही विशिष्ट समाजाची असणारी आहेत. या कायद्याचा विचार अन् माहिती आपण घेतली पाहिजे व सावध झालं पाहिजे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नव विधेयक पारीत करत आहेत. इस्लामिक राष्ट्रामध्ये असा कोणाही वक्फ बोर्ड नसताना आपल्याच देशात का? हा खरा प्रश्न आहे. हिंदुराष्ट्रात अशा प्रकरचे इस्लामीकरण षडयंत्र खपवून घेतले जाणार नाही. देशात आणि राज्यात हिंदूच सरकार आहे. हिंदू नीही धर्माभीमान बाळगून 100% कडवट पणा दाखवून पुढे यावे, असे नितेश राणे म्हणाले होते. तसेच जिल्ह्यात ५० ते ६० टक्के जमिनींवर वक्फ बोर्डनं दावा ठोकल्याचे विधान त्यांनी आंबोली येथील हिंदू धर्म परिषदेत केला होता.

सिंधुदुर्गातील आंबोलीमध्ये हिंदू धर्म परिषदेत मंत्री नितेश राणे यांनी धक्कादायक माहिती समोर आणलीय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० टक्के जागा आणि महत्त्वाच्या देवस्थानांवर वक्फ बोर्डने दावा केल्याचा खुलासा केला होता. तसेच त्यात जिल्ह्यातील देवस्थानं असल्याचा दावा देखील त्यांनी केला होता. त्या आधारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५६ ठिकाणी वक्फ बोर्डाने दावा केल्याची यादी आपल्या हाती लागली आहे. जिल्ह्यातील १५६ ठिकाणी वक्फ बोर्डाच्या जमिनीवर दावा केल्याचं दिसून येत आहे. यात शेतजमिनीवर दावा केल्याचं देखील दिसत आहे.

 

Konkan Coastal Highway: रेवस ते रेड्डी महामार्गाच्या ‘वाटेत’ पहिला अडथळा

   Follow us on        

अलिबाग: प्रस्तावित रेवस ते रेड्डी या मुंबईला थेट कोकणाशी जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी करंजा (उरण) ते रेवस (अलिबाग) या बहुप्रतीक्षित सागरी पुलाच्या जोड मार्गिकेला करंजा ग्रामस्थांनी आक्षेप नोंदविला आहे.  एमएसआरडी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर ग्रामस्थांनी आपल्या हरकती नोंदविल्या आहेत. यावेळी ग्रामस्थांनी तत्कालीन मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांच्या १९८० च्या आराखड्यानुसार मार्गिका द्यावी अशी मागणी केली आहे. यासाठी प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे.

रामायणातील पौराणिक काळापासून द्रोणागिरी पर्वत सर्वांनाच माहीत आहे. अनेक आयुर्वेदिक वनस्पती, औषधी संजीवनी याच डोंगराच्या कडेकपारीमध्ये आहेत. या परिसरात डोंगरदेवी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या करंजा ग्रामस्थांचे आराध्यदैवत असलेल्या द्रोणागिरी मातेवर भाविकांची श्रद्धा आहे. मात्र या पौराणिक काळातील द्रोणागिरी पर्वताला पोखरून करंजा-रेवस सागरी सेतूची निर्मिती करण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. त्यामुळे उरणकर, भाविक तसेच गडप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ(एमएसआरडीसी) च्या माध्यमातून नव्याने हा मार्ग उभारण्यात येत आहे. प्रस्तावित रेवस ते रेड्डी या मुंबईला थेट कोकणाशी जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी सागरी महामार्गाच्या जोड मार्गिकेला करंजा ग्रामस्थांनी आक्षेप नोंदविला आहे. याची दखल घेत एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन शेतकरी आणि ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. उरणच्या करंजा ते अलिबाग येथील रेवस दरम्यानच्या दोन किलोमीटर लांबीच्या पुलाचे भूमिपूजन १४ ऑक्टोबरला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले आहे. २ हजार ४७८ कोटी रुपयांची निविदा या पुलाच्या उभारणीसाठी मागविण्यात आली आहे. या पुलाची एकूण लांबी ही १०.२०९ किलोमीटर आहे. मुंबईतील सागरी अटल सेतू मार्गे द्रोणागिरी नोड येथून या पुलावरून कोकणात हा प्रवास करता येणार आहे. नियोजित रेड्डी ते रेवस मार्गापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने १९८० साली महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अ.र अंतुले यांनी करंजा ते रेवस मार्गाची घोषणा केली होती. यावेळी भूसंपादनाची प्रकिया राबवून प्रत्यक्षात कामाला सुरुवात सुद्धा करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव सत्ताबदल होऊन अंतुले यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने या पुलाचे काम बंद झाले होते.

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या विशेष गाडीला आठवडाभर मुदतवाढ

   Follow us on        
कोंकण रेल्वे: कोकण रेल्वे मार्गावर नववर्षासाठी सोडण्यात आलेल्या अहमदाबाद थिवीम गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आठवड्यातून दोन दिवस चालविण्यात आलेली  हि गाडी आता अजून आठवडाभर चालविण्यात येणार आहे. या गाडीच्या दोन्ही बाजूने प्रत्येकी दोन अशा एकूण चार फेऱ्या होणार आहेत.
गाडी क्र. ०९४१२ अहमदाबाद – थिविम द्विसाप्ताहिक विशेष ही गाडी दिनांक ०५ जानेवारी २०२५ (रविवार) आणि ०८ जानेवारी २०२५ (बुधवार) तर गाडी क्र. ०९४११ थिविम – अहमदाबाद द्विसाप्ताहिक विशेष ही गाडी  दिनांक ०६ जानेवारी २०२५ (सोमवार)आणि ०९ जानेवारी २०२५ (गुरुवार) या दिवशी आपल्या पूर्वनियोजित थांब्यासह आणि  वेळापत्रकासह चालविण्यात येणार आहे.
   Follow us on        

ब्रेकिंग: ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

   Follow us on        
Konkan Railway : आडवली येथे वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली आहे. या मार्गावरील दोन्ही  दिशेची  वहतूक बंद झाली आहे. ही घटना दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली असून अनेक गाड्या दीड ते दोन तासांपेक्षा अधिक काळ विविध रेल्वे स्थानकावर अडकून पडलेल्या आहेत.
मुंबई मडगाव मांडवी एक्स्प्रेस संगमेश्वर येथे दीड तासापासुन उभी आहे तर मडगाव मुंबई मांडवी एक्स्प्रेस रेल्वे गाडी वैभववाडी येथे दीड तासांपासून थांबलेली आहे. मुंबई मडगाव तेजस एक्स्प्रेस रेल्वे गाडी दोन तासांपासून रत्नागिरी येथे उभी आहे. तर जनशताब्दी अडीच तासांपासून आडवली येथे थांबवून ठेवण्यात आली आहे.
ओव्हरहेड वायर जोडण्याचे काम यद्धपातळीवर सुरु असून पुढील दीड ते दोन तासात वाहतूक पुर्वत होईल असे कोकण रेल्वे चे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search