Category Archives: कोकण

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेची सभा मुंबईत संपन्न

   Follow us on        

मुंबई : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेची सभा काल दिनांक ११ ऑगस्ट रोजी मुंबईत पार पाडली.

या सभेला कार्यसम्राट आमदार माननीय श्री कालिदास कोळंबकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले व सर्वतोपरी मदत करण्याचे त्यांनी वचनच दिले. भाषणात त्यांनी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत त्वरित विलीनीकरण होणे आवश्यक आहे, गोवा महामार्ग त्वरित पूर्ण झालाच पाहिजे, कोकणच्या पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने बोट वाहतूक पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे तसेच कोकणातील सर्वच बंदरांचा मांडवा बंदरा प्रमाणे विकास होणे आवश्यक आहे व तेथे सर्वसोई सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे त्यामुळे भारतातील व परदेशीय पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी कोकणात येतील, त्यामुळे अनेक प्रकारचे रोजगार निर्माण होतील.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणाल्या प्रमाणे भारतातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात मेडिकल कॉलेज निर्माण करून त्यामध्ये मातृभाषेतून शिक्षण दिलेगेले पाहिजे त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सुधारणा होतील तळागाळातील समाजातील हुशार मुले डॉक्टर होतील त्याची सुरुवात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातून या वर्षापासुन सुरू होईल असे ते यावेळी म्हणाले.

संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष माननीय श्री श्रीकांत सावंत यांनी कोकण रेल्वेचे विलीनीकरण व सावंतवाडी टर्मिनस होणे का जरूरी आहे याचा आपल्या भाषणात प्राधान्याने तसेच प्रभावीपणे उल्लेख केला तसेच यासाठी सर्व कोकणवासियांना एकत्र येण्याचे आवाहन केले. यासोबत इतर मान्यवरांनी तसेच उपस्थित असलेल्या सदस्यांनी आपले विषय तसेच मते मांडली.

सभेला विलास राणे वडाळा विधानसभा क्षेत्र प्रमुख,माजी नगरसेवक सुनील मोरे,मुकुंद पडियाल,नामदेव मठकर निवृत्त सुप्रिटेंड जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्ग जिल्हा,ऍड योगिता सावंत,पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते प्रकाश कदम,कोकणातील अनेक संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते,सभेचा समारोप करताना संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी सर्वांचे उपस्थित राहिल्या बद्दल धन्यवाद दिले व आभार मानले व पुढील काळात सर्वच कोकनवासीयांनी आपले राजकीय मतभेद विसरून एकत्रित येऊन कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी कार्य करूया असे आवाहन केले

Loading

Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावर धावणार स्वातंत्र्यदिन विशेष गाडी; एकूण ४ फेऱ्या

Special train for Independence day: येत्या स्वातंत्र्यदिनी कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल झाल्याने मध्य रेल्वेने या मार्गावर एक विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एलटीटी ते मडगाव दरम्यान ही गाडी चालविण्यात येणार असून या गाडीच्या दोन्ही बाजूने एकूण चार फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
०११४९/०११५० एलटीटी – मडगाव  – एलटीटी विशेष (एकूण ४ फेर्‍या)
गाडी क्रमांक ०११४९ विशेष ही गाडी एलटीटी येथून गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी आणि शनिवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी रात्री २१.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०० वाजता मडगाव येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११५० विशेष मडगाव येथून शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी आणि रविवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सुटेल ती रात्री ००.४० वाजता एलटीटी येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिवी
डब्यांची रचना: टू टायर एसी – ०२, थ्री टायर एसी – ०६, सेकंड स्लीपर- ०८, जनरल – ०३, जनरेटर व्हॅन -०१ एसएलआर- ०१ असे मिळून एकूण २१ LHB डबे

Loading

Mumbai Goa Highway: बाप्पा आता तूच वाचव! महामार्गावर १०६ ठिकाणी गंभीर स्वरूपाचे खड्डे

   Follow us on         Mumbai Goa Highway: कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जाणारा गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. रेल्वेचे आरक्षण आधीच फुल झाल्याने मोठ्या उत्साहाने कोकणात गावी जाणाऱ्या कित्येक गणेश भाविकांकडे रस्ते वाहतुकीचा पर्याय राहिला आहे. साहजिक दरवर्षीप्रमाणे मुंबई गोवा महामार्गावर मोठ्याप्रमाणात गणेश चतुर्थी दरम्यान वाहतूक होणार आहे. मात्र सध्याची महामार्गाची परिस्थिती पाहता गणेशोत्सवात प्रवास करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. महामार्गाच्या या परिस्थितीकडे कोंकण विकास समिती व मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी महामार्गाच्या दुर्दशेच्या फोटो पुराव्यासहित पत्रव्यवहार केला आहे.

“आपण मुंबई गोवा हायवे दुर्दशेबाबत स्वतःहून लक्ष घालून सहयाद्री अतिथी गृह येथे बैठक घेऊन नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया तसेच राष्ट्रीय महामार्ग (सा.बा.) चे अधिकारी यांना खड्डे बुजविने तसेच खड्डे बुजविणेसाठी कोणत्या प्रतीचे मटेरियल वापरावे याबाबत स्पष्ट आदेश देवूनही पूर्तता होत नसलेने एकंदरीत मुंबई गोवा हायवे संबंधात आपणाकडून स्पष्ट आदेश होऊनही पूर्तता होत नसलेने कोंकणात लवकरच साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सव उत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊन आपण मुंबई गोवा हायवे पाहणी दौरा करावा अशी नम्र विनंती आहे. कोंकण विकास समितीचे सदस्य व मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचे सह सचिव श्री चैतन्य उषा लक्ष्मण पाटील यांनी स्वखर्चाने तसेच कोंकण विकास समितीचे सदस्य श्री अक्षय मधुकर महापदी तसेच श्री सुधीर सापळे यांनी दिनांक २८.०७.२०२४ ते ०७.०८.२०२४ रोजी केलेले पाहणीत तसेच सोबत जोडलेले पीडीएफ मधील फोटो वरून दिसत आहे. या पाहणीत कासू ते माणगाव मार्गावर ४७ तर कासू ते पळस्पे मार्गावर ६९ ठिकाणी गंभीर स्वरूपाचे खड्डे आढळले” अशा आशयाचे पत्र ई-मेल द्वारे संबधीत लोकप्रतिनिधींना पाठविण्यात आले आहे.

Loading

कोकण रेल्वेतील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एका लोहमार्ग पोलीस ठाण्याला मंजुरी

   Follow us on        

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर वाढते गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता कोकण रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रत्नागिरी येथे लोहमार्ग पोलीस ठाण्याला शासनाने मंजुरी दिली आहे. शासनाने यासाठी ९१ लाख ७० हजारांचा निधी मंजूर केला असून १५२ अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदनिर्मिती करण्यात येणार आहे. शासनाच्या गृह विभागाने याबाबतचा अद्यादेश शुक्रवारी जारी केला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गुन्हेगारीच्या प्रमाणाला आळा बसणार आहे.

कोकणातील रोहा, कणकवली आणि रत्नागिरी या तीन ठिकाणी लोहमार्ग पोलीस ठाणी प्रस्तावित होती त्यापैकी रत्नागिरी येथे लोहमार्ग पोलीस ठाण्याला शासनाने मंजुरी दिली आहे. त्यापैकी रेल्वे सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हद्दीतील स्थानके, प्रवाशांची सुरक्षा आणि गुन्ह्यांचा तपास करण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांवर आहे. रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) अखत्यारित आहे. सध्या लोहमार्ग पोलिसांची हद्द सीएसएमटी ते पनवेल आणि कर्जत, खोपोली, मंकीहिलपर्यंत आहे. रोह्यापासून पुढे कोकण रेल्वेची हद्द सुरू होते. याहद्दीतील सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलावर आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाडीत कोकण रेल्वे स्थानकांदरम्यान एखादा गुन्हा घडल्यानंतरही त्याबाबतची तक्रार प्रवासी मुंबईत आल्यानंतर करतात. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल, स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून गुन्हा संबंधित यंत्रणेकडे वर्ग करण्याचे काम लोहमार्ग पोलिसांना करावे लागते. रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधून कारवाई करावी लागते. आपल्या हद्दीतील स्थानके, तसेच प्रवाशांची सुरक्षा व घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करता यावा यासाठी कोकण रेल्वेवरील तीन स्थानकांमध्ये पोलीस ठाणे स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी दिली आहे.

Loading

Accident on South Western Railway : दूधसागर जवळ मालगाडी घसरली; गाडया कोकण रेल्वे मार्गे वळवल्या

   Follow us on        
पणजी : गोव्यातील  दूधसागर ते सोनालीम सेक्शन दरम्यान आज सकाळी ९.३५ वाजता सतरा डब्यांची मालगाडी रुळावरून घसरल्याने दक्षिण पश्चिम रेल्वेवरील रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली आहे.
दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मंजुनाथ कनमडी यांनी येथे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, शुक्रवारी सकाळी 9.35 वाजता, गोव्यातील हुबली विभागातील घाट विभागात सोनालीम आणि दूधसागर सेक्शन दरम्यान सतरा (17) वॅगनसह मालगाडी रुळावरून घसरली असून खालील दोन गाड्या कोकण रेल्वे मार्गे वळवल्या असल्याची माहिती दिली आहे.
ट्रेन क्र. १२७७९ वास्को द गामा – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस मडगाव, रोहा, पनवेल, कल्याण आणि पुणे मार्गे वळवण्यात आली आहे, त्यापुढे ही गाडी आपल्या नियमित मार्गाने जाईल
दुसरी ट्रेन क्र. १२७८० हजरत निजामुद्दीन – वास्को दा गामा एक्स्प्रेस पुणे, कल्याण, पनवेल, रोहा आणि मडगाव मार्गे वळवण्यात आली आहे, त्यापुढे ही गाडी आपल्या नियमित मार्गाने जाईल

Loading

Sawantwadi Terminus: “नवरी तर नटली पण……?”

   Follow us on        
सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी या तीन स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम खूप कमी वेळात पूर्ण झाले असून आज या स्थानकांचे त्यांचाच हस्ते लोकार्पण होणार आहे.
कोकण पट्ट्यातील एकूण १२ स्थानकांचे सुशोभीकरण करण्यासाठी त्यांनी १०० कोटी मंजूर करून घेतले. सावंतवाडी स्थानकाचे सुशोभीकरण पूर्ण झाले असून  या कामाला सुमारे ९ कोटी खर्च आला. या स्थानकाचे बाहेरचे रुपडे पालटून एखाद्या विमानतळाचे स्वरूप आले आहे. एखाद्या पर्यटन जिल्ह्याला साजेसे अशा स्वरूपाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. प्रशासनाने केलेल्या या कामाबद्दल प्रवाशांकडून, प्रवासी संघटनेंकडून समाधान व्यक्त होत आहे. मात्र एक प्रश्न अजूनही अनुत्तरीत राहतो. “नवरी तर नटली पण सुपारी कधी फुटणार?”
आंबोली, रेडी, सावंतवाडी शहर, तळकोकणातील समुद्र किनारे या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी, दोडामार्ग तालुक्यातील काही भाग, सावंतवाडी पंचक्रोशी, बांदा, शिरोडा, वेंगुर्ला या मोठ्या पट्ट्यातील प्रवाशांसाठी सावंतवाडी स्थानकाचा विकास होणे खूप गरजेचे आहे. सध्याची परिस्थिती बघता या स्थानकावर खूप कमी गाड्यांना थांबे दिले आहेत. प्रवासी संख्या पाहता हे थांबे पुरेसे नाही आहेत. त्यामुळे वंदे भारत, मंगलोर एक्सप्रेस आणि ईतर प्रमुख गाड्यांना येथे थांबे मिळणे गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे मंजूर झालेल्या टर्मिनसचे काम पूर्ण होणे. ९ वर्षापूर्वी सावंतवाडी स्थानकाचे ‘सावंतवाडी टर्मिनस’ या नावाने तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. कोकण रेल्वेचा लाभ खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यातील कोकणातील जनतेला व्हावा यासाठी सावंतवाडी येथे टर्मिनस होणे खूप गरजचे आहे ही गोष्ट सुरेश प्रभू यांच्या तेव्हाच लक्षात आली होती. टर्मिनस झाल्यास  मुंबई /कल्याण/पुणे ते सावंतवाडी दरम्यान गाड्या चालविण्यास शक्य झाले असते. मात्र सुरेश प्रभू यांचा मंत्रिपदावरुन पायउतार होताच टर्मिनसचे काम रखडले ते आजतागायत अपूर्णच आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे टर्मिनसच्या दुसर्‍या टप्प्यातील कामासाठी आलेला निधी परत गेला. ‘सावंतवाडी टर्मिनस’ अशा नावाने भूमिपूजन झाले असूनही अजूनही रेल्वे रेकॉर्ड मध्ये ‘सावंतवाडी रोड’ असा उल्लेख होत आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांच्या प्रयत्नांने सार्वजनिक बांधकाम विभाग PWD आणि कोकण रेल्वे KRCL यांच्यात एक सामंजस्य करार झाला. या करारानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने कोकण रेल्वे च्या १२ स्थानकाच्या बाहेरील सुशोभीकरणाची आणि रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या पुनर्बांधणी करण्याची जबाबदारी स्वीकारली आणि कमी वेळात ती पार पाडत आहे. मात्र आता कोकण रेल्वेने स्थानकाच्या आतील सुधारणांची जबाबदारी घेतली पाहिजे. सावंतवाडी स्थानकावर सध्या शेड नसल्याने प्रवाशांना ऊन आणि पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्व प्लॅटफॉर्मवर शेड बांधणीचे काम प्राधान्याने घेण्याची गरज आहे. सध्या स्थानकावरील तिकीट आरक्षण खिडकीची वेळ दुपारी २ वाजेपर्यंत आहे ती पूर्णवेळ करण्याची गरज आहे.
सावंतवाडी शहर ते मळगाव रस्ता दुपदरीकरण होणे गरजेचे. 
तालुक्याच्या विकासासाठी रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक यांचा बरोबरीने विकास होणे गरजेचे आहे. संपूर्ण जिल्ह्यातील सावंतवाडी हे एकमेव स्थानक शहरापासून दूर आहे. हे अंतर ८ किलोमीटर एवढे आहे. तसेच मार्गावर घाटरस्ता लागतो. त्यामुळे सावंतवाडी शहर ते मळगाव ही वाहतूक जलद होण्यासाठी हा रस्ता दुपदरीकरण होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
एसटी च्या वेळापत्रकात बदल आवश्यक
मळगाव ते वेंगुर्ला, शिरोडा, बांदा आणि सावंतवाडी जाण्यासाठी एसटी आणि रिक्षा हे दोन पर्याय प्रवाशांनकडे आहेत. अंतर जास्त असल्याने सर्वच प्रवाशाना रिक्षाने प्रवास करणे परवडत नाही. त्यामुळे सामान्य प्रवाशांसाठी एसटीने या मार्गावर लवचिक वेळापत्रक अंगीकारणे आवश्यक आहे. सध्या प्रवाशांना इतर गावांसाठी चालविण्यात येणाऱ्या बसवर अवलंबुन राहावे लागत आहे. सावंतवाडी आगाराची अजूनही फक्त रेल्वे स्थानकाला विशेष बस नाही आहे. रेल्वेच्या वेळापत्रकाप्रमाणे एसटीच्या या मार्गावरील बसच्या वेळापत्रकात बदल केल्यास त्याचा फायदा प्रवाशांना तर होईलच आगाराच्या उत्पन्नातही भर पडेल.

Loading

सावंतवाडी: ‘ती’ चूक दुरुस्त करा…अन्यथा ‘घंटानाद’ करू

सिंधुदुर्ग: सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाचे “सावंतवाडी रेल्वे टर्मिनस” भूमिपूजन होवूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने बाह्य सुशोभीकरण केले त्याला” सावंतवाडी रोड ” असा फलक लावण्यात आला आहे त्याला सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने आक्षेप घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष निवेदनाद्वारे वेधले आहे.

सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर, सचिव मिहीर मठकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,सागर तळवडेकर आदींनी सार्वजनिक बांधकाम मंत्री, कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक,सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी आदींचे लक्ष वेधले आहे.

या निवेदनात म्हटले आहे,सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन दि.२७ जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते तर पालकमंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाले आहे. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत. त्यावेळी “सावंतवाडी रेल्वे टर्मिनस” नावाची भूमिपूजन कोनशिला आवारात बसविण्यात आली आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने बाह्य सुशोभीकरण केले. तेथे “सावंतवाडी रोड” अशा स्वरूपाचा सुशोभीकरणानंतर फलक लावण्यात आलेला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग तर्फे बाह्य सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाले आहे. याचे उद्घाटन या आठवड्यात अपेक्षित आहे, त्या अनुषंगाने, सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थानक परिसरात नाव फलक लावण्यात आला आहे त्यावर “सावंतवाडी रोड” असा उल्लेख करण्यात आला आहे, जो काही अंशी चुकीचा आहे, कारण त्या ठिकाणी टर्मिनस चे उद्घाटन झालेले आहे आणि कोकण रेल्वेच्या दफ्तरी देखील सावंतवाडी टर्मिनस असा उल्लेख कागदोपत्री करण्यात येत असल्याचे निर्दशनास आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे नामकरण हे कोकण रेल्वेचे शिल्पकार कै. प्रा. मधु दंडवते यांचा नावे करावे, अशी मागणी सातत्याने जनतेतून होत आहे, त्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.सावंतवाडी रेल्वे टर्मिनस दर्जा ची कामे व्हावीत. तसेच अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा,पाणी भरण्याची सुविधा आणि इतर प्रवासी सुविधांची निर्मिती झाली पाहिजे. त्यासाठी स्वतंत्र निवेदन दिली आहेत. तसेच आंदोलन छेडले, जनजागृती सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू केली आहे. यासाठी यापुढेही आंदोलने छेडण्यात येणार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच रेल्वे स्थानकाच्या प्रवेश द्वारावरील त्या फलकावरील नावाची दुरुस्ती करून ‘सावंतवाडी टर्मिनस’ असे न केल्यास ‘घंटानाद’ आंदोलन छेडण्याचा ईशारा सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने दिला आहे.

 

 

 

Loading

चाकरमान्यांसाठी खुशखबर: सिंधुदुर्ग – पुणे विमानसेवेला हिरवा कंदील

सिंधुदुर्ग:  पुणेकर चाकरमान्यांसाठी एक खुशखबरआहे. चिपी- पुणे या रूटसाठी अखेर विमानतळ प्राधिकरण आणि संरक्षण मंत्रालय यांनी परवानगी दिली आहे. गणेश चतुर्थी पूर्वी ही विमानसेवा Fly 91 कंपनी तर्फे सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकर चाकरमान्यांना यंदाच्या गणेश चतुर्थीला विमानाने कोकणात उतरण्याची संधी मिळणार आहे.
सुरवातीला प्रत्येक शनिवार आणि रविवारी चिपी-पुणे -चिपी अशी प्रवासी विमानसेवा सुरु करण्यात येत आहे. याबाबत पुणे विमानतळ येथे स्लॉट उपलब्ध करून मिळण्यासाठी अडचण येत होती. याबाबत खासदार नारायण राणे यांनी हवाई मंत्री आणि संरक्षण मंत्री यांना पत्र पाठवून लक्ष वेधले होते. या नंतर दोन दिवसांसाठी विमान सेवा सुरु करण्याचे आदेश देण्यात आले. या बाबतची माहिती आज माजी सभापती निलेश सामंत यांनी खा.नारायण राणे यांची भेट घेऊन दिली. तसेच त्‍यांचे आभार मानले. सदर विमानसेवा संपूर्ण आठवडाभर सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी त्‍यांनी यावेळी केली. याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन ना. राणे यांनी दिले. यावेळी आमदार नितेश राणे, भाजप जल्हा उपाध्यक्ष प्रसाद पाटकर आदी उपस्थित होते.

Loading

आपल्याच लोकांकडून चाकरमान्यांची होणारी ‘ही’ लूट थांबणार कधी?

   Follow us on        

Voice of Konkan : गणेशोत्सव काहीच दिवसांवर आला आहे. लवकरच चाकरमान्यांची गावी जाण्यासाठी लगबग सुरू होईल. कोकणात जाणार्‍या गाड्या फुल भरून जातील आणि कोकणातील सर्व रेल्वे स्थानके गर्दीने फुलून जातील.

कशीबशी ट्रेनची तिकिटे मिळवून (नाही मिळाली तर प्रवासात कसरत करून) चाकरमानी गावी जाण्यास निघतो. गाडीतील गर्दी, रेल्वे मार्गावरील अतिरिक्त गाड्यांमुळे तब्बल 4 ते 5 तास उशीरा धावणाऱ्या गाड्या हे सर्व सहन करून चाकरमानी कोकणातील आपल्या गावच्या जवळच्या स्थानकावर उतरतो. हा त्रास कमी की काय तर त्याला अजून एका त्रासाला सामोरे जावे लागते.

हा त्रास म्हणजे आपल्याच लोकांकडून होणारी त्याची लुबाडणूक. येथील खाजगी वाहतुक व्यावसायिकांकडून खासकरून रिक्षा व्यावसायिकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून त्याची लूट केली जाते. काही ठिकाणी तर हंगामात जवळपास दुप्पट भाडे आकारले जाते. त्यामुळे काही वेळा चाकरमान्यांना मुंबई ते त्या स्थानकापर्यंत जेवढे रेल्वेच्या तिकिटाचे पैसे लागले त्यापेक्षा जास्त भाडे स्थानक ते घर या काही किलोमीटर अंतरासाठी द्यावे लागते. 

कोकणात बरीचशी स्थानके शहरापासून दूर असून सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा अपुऱ्या आहेत. गाड्या रात्री अपरात्री पोहोचत असल्याने खाजगी वाहतुकीशिवाय दुसरा पर्याय नसतो. या मजबुरीचा फायदा घेऊन दुप्पट भाडे आकारले जाते. या बद्दल विचारले असता ”हेच दिवस आमचे कमवायचे असतात”, ”जायचे असेल तर सांगा नाहीतर सोडा”, ”शहराप्रमाणे आम्हाला रिटर्न भाडे भेटत नाही” अशी उत्तरे भेटतात.

सर्वच रिक्षा व्यायवसायिकांना येथे दोष देणे चुकीचे ठरेल. काही मुजोर रिक्षा व्ययवसायीकांमुळे कोकणातील समस्त रिक्षा व्यायवसायिकांचे नाव खराब होत आहे.

स्थानिक प्रशासनाने आणि राज्य परिवहन महामंडळाने RTO लक्ष घालणे महत्त्वाचे.

स्थानिक प्रशासनाने आणि राज्य परिवहन महामंडळाने RTO यांनी यात लक्ष घालून ही लूट थांबवणे अपेक्षित आहे. किलोमीटर प्रमाणे भाडे ठरवून दिले पाहिजे. या भाड्यापेक्षा अतिरिक्‍त भाडे मागत असल्यास त्या व्यावसायिकावर कारवाई केली गेली पाहिजे. हंगामात प्रत्येक रेल्वे स्थानकावर 24 तास RTO कर्मचारी कर्तव्यावर ठेवले गेले पाहिजेत. प्रवासी तक्रार निवारण केंद्र आणि हेल्पलाईन उपलब्ध करून दिली गेली पाहिजे. तरच या लूटीला आळा घालता येवू शकतो.

 

 

Loading

‘भाजपा एक्सप्रेस’ यंदाही धावणार

   Follow us on        

Ganpati Special Bhajpa Express:दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त कोकणकरांसाठी भाजपतर्फे ‘भाजपा एक्सप्रेस’ चालविण्यात येणार असल्याची माहिती आज माजी खासदार निलेश यांनी एक्स X माध्यमातून दिली आहे.

यंदा गणेश चतुर्थीला कुडाळ आणि मालवणात जाणार्‍या मुंबईतील कोकणकरांना या गाडीचा लाभ घेता येईल. ही भाजपा एक्सप्रेस दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकावरून सुटणार असून तिची सेवा संपूर्णपणे मोफत आहे. इच्छुकांनी या गाडीच्या बूकिंग साठी ८६५७६७६४०४ व ८६५७६७६४०५ या क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन त्यांनी केले आहे.

   Follow us on        

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search