Category Archives: कोकण रेल्वे




वाचकांचे व्यासपीठ: कोकण रेल्वे २५ वर्षापूर्वी कोकणात आली. कोकण रेल्वे मार्ग साकारणे हे अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक कार्य KRCL कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीने आणि त्यावेळेच्या लोकप्रतिनिधींनी अगदी लीलया पेलले. मात्र त्यानंतर आतापर्यंत पाहिजे तसा विकास कोकण रेल्वेचा झाला नाही. असे नाही की प्रयत्न झालेच नाही. कोकण रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी अनेक योजना, प्रस्ताव पुढे आलेत, मात्र त्यांना मूर्त स्वरूप देण्यात अपयश आले. कोणत्या आहेत या योजना आणि प्रस्ताव हे थोडक्यात पाहू.
राज्यात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना चिपळूण कराड रेल्वे मार्ग होणार असे जाहीर केले गेले होते. या प्रस्तावाला ७ मार्च २०१२ रोजी मंत्रिमंडळात मान्यताही दिली गेली होती. मात्र त्यानंतर यासाठी प्रयत्न झाले नाहीत. मात्र कोकण आणि पाश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा रेल्वे मार्ग मृगजळच ठरला आहे.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू रेल्वे यांच्या प्रयत्नाने कोल्हापूर वैभववाडी मार्ग याबाबत सर्वेक्षण झाले होते. मात्र पुढे यासाठी म्हणावे तसे प्रयत्न न झाल्याने हाही मार्ग रखडला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये हा मार्ग होणे काळाची गरज आहे त्यामुळे गणपती मे महिन्याच्या सुट्टीमध्ये ज्यादा गाड्याअप किंवा डाउन कोल्हापूर मार्गे वळवता येतील व गाड्यांचा होणारा खोळंबा रोखता येईल.
विद्यमान खासदार नारायण राणे काँग्रेसच्या सत्तेत मंत्री असताना सावंतवाडी ते रेडी रेल्वे मार्ग टाकण्याचे सुतवाच झाले होते त्याचे पुढे काय झाले? कणकवली ते रेडी पर्यंत स्वतंत्र टॉय ट्रेन सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरणार अशी रेवडी त्याच वेळेला उडवली होती त्या रेवडीचे पुढे काय झाले? हे देखील प्रश्नच आहेत.
सावंतवाडी आंबोलीमार्गे बेळगाव जोडण्याची एक रेवडी मध्यंतरी उडवली केली होती त्यामध्ये सीमा वरती भागातील काही आमदार खासदार सक्रिय झाले होते त्याचे पुढे काय झाले ?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सावंतवाडी रेल्वे टर्मिनस याचा कोनशिला समारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला होता. खरं म्हणजे सावंतवाडी टर्मिनस काळाची गरज आहे. मे महिन्यामध्ये आणि गणपती मध्ये सावंतवाडी टर्मिनस जर पूर्ण झाले तर जादा गाड्या सोडता येतील तसेच वसई सावंतवाडी कल्याण सावंतवाडी पुणे सावंतवाडी अशा गाड्या सोडता येतील
सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न येत्या दिवाळीपूर्वी सोडवून निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्या टर्मिनसचे उद्घाटन करा आणि त्याला मधु दंडवते यांचे नाव द्या कारण कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे आणण्याचे श्रेय फक्त आणि फक्त मधू दंडवते जॉर्ज फर्नांडिस यांना जाते. 2024 साल हे मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे तरी या वर्षात टर्मिनसला त्यांचे नाव देऊन सावंतवाडी टर्मिनस वरून स्पेशल गाडी वसई किंवा कल्याण पर्यंत सोडण्यात यावी हीच मधु दंडवते यांना आदरांजली ठरेल. पाणी भरण्याची आणि पाण्याची सोय आता दीपक केसरकर यांनी पूर्णत्वास नेलेली आहे तिलारी प्रकल्पातून पाणी देण्याची योजना त्यांनी मंजूर केलेली आहे तरी लवकरात लवकर सावंतवाडी टर्मिनस पूर्ण करून मधु दंडवते यांचे नाव देण्यात यावे.
श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर
संस्थापक सदस्य कोकणरेल्वे
सल्लागार :अखंड कोकण रेल्वे सेवा समिती




आम्ही कोकणासाठी पॅसेजर मागतोय तुम्ही सुपरफास्ट देताय,आम्ही रात्रीसाठी रेल्वे मागतोय तुम्ही दिवसाला देताय,आम्ही कोकणासाठी रेल्वे मागतोय तर तुम्ही गोव्यासाठी देताय? कोकणातील फक्त सात रेल्वे स्थानकावर थांबणारी सुपरफास्ट एक्सप्रेस देऊन कोकण रेल्वे प्रशासनाने कोकणी माणसाच्या जखमेवर मिठ चोळलेय अशा शब्दात संघटनेने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
कोकण रेल्वेच्या प्रकल्पात ज्या महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक २२% गुंतवणूक केली त्याच्या वाटयाला मध्यरेल्वेच्या फक्त तीनच रेल्वे आल्या,त्यामुळे पश्चिम रेल्वेवरून चालू झालेली नवीन रेल्वेही वांद्रे ते वसईमार्गे सावंतवाडीपर्यत पॅसेंजर किंवा स्लो एक्सप्रेस चालवावी म्हणजे किमान कोकणातील प्रत्येक तालुक्याला एकतरी हॉल्ट मिळेल अशी मागणी करणाऱ्या प्रवासी संघटनेची धारणा होती.मात्र कोकण रेल्वेने बोरीवली मार्गे सुटणारी स्लो रेल्वे न देता बोरीवली ते मडगाव दरम्याने धावपारी सुपरफास्ट एक्सप्रेस १०११५/१६ देऊन काय साध्य केले?
कोकणातील रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हातील तब्बल ३४ रेल्वे स्थानकांवर हया पश्चिम रेल्वेवरून सुरू झालेल्या नवीन रेल्वेला हॉल्टच दिला नाही.यामध्ये १)आपटे २) जिते ३) पेण ४) कासू ५) नागोठणे ६) कोलाड ७) इंदापूर ८) माणगाव ९) गोरेगाव रोड ८) सापे वामने ९) करंजडी १०) विन्हेरे ११) दिवाणखवटी १२) कलंबनी बु. १३) खेड १४) अंजनी १५) कामथे १६) सावर्डा १७) आरवली रोड १८) कडवई १९) संगमेश्वर रोड २०) उक्षी २१) भोके २२) निवसर २३) आडवली २४ ) वेरवली २५) विलवडे २६) सौंदळ २७) राजापूर रोड २८) खारेपाटण रोड २९) वैभववाडी रोड ३०) आचरणे ३१) नांदगाव रोड ३२) सिंधुदुर्ग ३३) कुडाळ ३४) झाराप ह्या स्टेशनवरील चाकरमनी मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये राहत नाहीत का?असा संतप्त सवाल कोकणातील चाकरमनी विचारत आहेत.
लोकसभा प्रचाराच्या वेळी मंत्री पियुष गोयल यांनी मला मतदान करा मी कोकणाला नेहमीसाठी रेल्वे सुरू करून देतो असे आश्वासन दिले होते स्वाभिमानी कोकणी माणसाने गोयल यांना भरभरून मतदानही केले पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पियुष गोयल हे सर्वाधिक मताधिक्याने निवडूनही आले, कोकणी माणसामुळे साहेब पुढे कॅबिनेट मंत्रीही झाले व पुढे जाऊन द्विसाप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस कोकणा ऐवजी गोव्यासाठी सोडण्याचे प्रयोजन मंत्री महोदयांनी केले त्यामुळे ही सुपरफास्ट एक्सप्रेस नेमकी कोकणासाठी की गोव्यासाठी असा सवाल श्री.यशवंत जडयार यांनी विचारला आहे.
पश्चिम रेल्वेवरून नवीन सुरू होणाऱ्या बांद्रे ते मडगाव सुपरफास्ट एक्सप्रेसला फक्त बोरीवली,वसई,पनवेल,रोहा,विर,चिपळूण,रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग,सावंतवाडी,थिवीम,करमळी हे थांबे देण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. प्रवासी संघटना ह्या रेल्वेची रात्रीसाठी मागणी करीत आहे तरीही ती दिवसाची दिल्याने ती तळकोकणात रात्री १०.३५ च्या दरम्याने पोहोचतेय.म्हणजे कोकणातील लोकांनी मुंबईतून ३०० रू.मध्ये रेल्वेने जायचे आणि तेथे उतरल्यावर १५०० रू.ची रिक्षा करून घरी जायचे.
प्रवासी संघटनेच्या वतीने पश्चिम रेल्वेवरून वसईमार्गे कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे सुरू करण्यासाठी मागील १o वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे यासाठी वसई विरारमध्ये फक्त एका महिन्यामध्ये १८ हजार सहयांचे क्याम्पीयनही राबवले,कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील कार्यालयासमोर उपोषण,वसई रोड येथे रेल्वे आंदोलन,सावंतवाडी रोड येथे लाक्षणिक उपोषण केले तर माजी खासदार श्री.विनायक राऊत,श्री.राजेद्र गावीत,श्री.गोपाळ शेट्टी तर विद्यमान खासदार श्री.नारायण राणे,श्री.पियुष गोयल,श्री.अरविंद सावंत,श्रीम.सुप्रिया सुळे व रेल्वे प्रशासन यांच्याकडे सततचा पाठपुरावा केला आहे.त्यामुळे फक्त कोकणासाठी स्वतंत्र्य रेल्वे मिळणे अपेक्षित होते,मात्र प्रवासी संघटनेने पाठपुरावा करूनही प्रत्यक्ष ही नवीन रेल्वे सोडताना कोकण रेल्वे प्रशासनाने ह्या प्रवासी संघटनांशी संपर्क न साधता वेळापत्रक परस्परच जाहिर केले.
पश्चिम उपनगरातील कोकणातील प्रवाशांनी मागील १० वर्षे ही रेल्वे मिळवण्यासाठी संघर्ष केला आत्ता पुढील १० वर्ष त्याचे हॉल्ट मिळवण्यासाठी कोकणकरांनी आंदोलने / उपोषण करत राहायची का? असा सवाल कोकणातील चाकरमनी विचारत आहेत.
वांद्रे मडगाव एक्सप्रेस नेहमीसाठी सुरू करून त्यातील एक जनरल कोच वसई रोड स्टेशनला राखीव ठेवावा व किमान माणगाव,खेड,संगमेश्वर रोड,विलवडे,राजापूर रोड,वैभववाडी रोड व कुडाळ ह्या तालुक्याच्या ठिकाणी जादाचे हॉल्ट मिळावेत अन्यथा प्रवासी संघटना आपल्या मूळच्या वसई सावंतवाडी पॅसेंजरच्या मागणीवर ठाम असल्याचे प्रवासी संघटनेने सांगितले.
आज पश्चिम रेल्वेच्या वसईमार्गे दक्षिणेतील राज्यामध्ये दिवसाला साधारण ५ सुपरफास्ट एक्सप्रेस जात आहेत,त्यामुळे कोकणाला सुपर फास्ट एक्सप्रेसची आवश्यकताच नाही आहे. दिव्यावरून सावंतवाडी पर्यत पॅसेंजर किंवा स्लो एक्सप्रेस जाऊ शकते तर वांद्रे ते सावंतवाडी पॅसेंजर का शक्य नाही? नवीन सुपर फास्ट एक्सप्रेस कोकणाच्या नावाखाली गोव्याला देण्यापेक्षा कोकण रेल्वे प्रशासनाने ती उरलेल्या ३४ स्टेशनवर थांबवावी असे श्री.यशवंत जडयार यांनी सांगितले.




Confirmed seats missing after chart preparation #konkanrailway #centralrailway #IndianRailways
News link ➡️ https://t.co/saVlHDQMWz@KonkanRailway @RailMinIndia @Central_Railway pic.twitter.com/mAIkjtdLbV
— को – बातम्या मराठीत (@kokanai21) September 17, 2024

जर कोल्हापूर वंदे भारत ही ०७, ३२.७ आणि ३५ किलोमीटर दरम्यानच्या अंतरावर थांबू शकते तर मडगाव वंदे भारत सावंतवाडी स्थानकावर का थांबू शकत नाही? असा प्रश्न कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीच्या वतीने विचारला जात आहे.
Follow us on



सिंधुदुर्ग: कोल्हापूर -पुणे आणि पुणे – हुबळी मार्गावर नवीन वंदे भारत येत्या १६ तारीख पासून सुरू होत आहे, वादाच्या भोवऱ्यात सापडलेली ही वंदे भारत ट्रेन कोल्हापूरकरांचा दबावानंतर कोल्हापूरकरांना पुण्यासाठी स्वतंत्र वंदे भारत मिळाली.
पुण्याहून कोल्हापूर साठी सुरू झालेली ही वंदे भारत मिरज, सांगली,किर्लोस्करवाडी, कराड, सातारा येथे थांबेल, तसेच हुबळी साठी सुरू झालेली वंदे भारत सातारा,सांगली,मिरज,बेळगाव,धारवाड येथे थांबेल
या दोन्ही वंदे भारत ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या गाड्या सांगली जिल्ह्यातील सांगली आणि मिरज या दोन्ही स्थानकांवर थांबणार आहेत आणि या स्थानकातील अंतर आहे अवघे ७ किलोमीटर, तसेच कोल्हापूर वंदे भारत ही कराड आणि किर्लोस्करवाडी येथे देखील थांबेल,कराड ते किर्लोस्करवाडी स्थानकादरम्यान अंतर हे ३५ किलोमीटर आणि किर्लोस्करवाडी ते सांगली हे अंतर ३२.७ किलोमीटर आहे.म्हणजेच एकूण ३२६ किलोमीटरच्या या पूर्ण प्रवासात या गाडीला मध्ये ५ थांबे देण्यात आले.
परंतु कोकण रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आलेली मडगाव – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ कणकवली येथे थांबते. या गाडीला सावंतवाडी थांबा मिळावा म्हणून स्थानिकांनी आणि प्रवासी संघटनांनी आपल्या परीने प्रयत्न केले आहेत. तसे बघता कणकवली ते सावंतवाडी रेल्वे स्थानक हे अंतर ४९ किलोमीटर आहे आणि सावंतवाडी ते थिवी (गोवा) हे अंतर ३२.५ किलोमीटर आहे. जर कोल्हापूर वंदे भारत ही ०७, ३२.७ आणि ३५ किलोमीटर दरम्यानच्या अंतरावर थांबू शकते तर मडगाव वंदे भारत सावंतवाडी स्थानकावर का थांबू शकत नाही असा सवाल सावंतवाडी येथील जनता करत आहे. या व्यतिरिक्त मुंबई ते मडगाव या ७६५ किलोमीटर ( कोल्हापूर – पुणे स्थानकाच्या अंतरापेक्षा दुप्पट )अंतरात केवळ ७ थांबे देण्यात आले आहेत.
त्यामुळे प्रत्येक वेळी सावंतवाडी साठी वेगळा न्याय का, सावत्र वागणूक का ? आणि सावंतवाडी हे ऐतिहासिक, पर्यटन शहर असूनही या ठिकाणी वंदे भारत का थांबत नाही असे मत कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी चे सचिव मिहिर मठकर आणि भूषण बांदिवडेकर यांनी व्यक्त केले.




Konkan Railway Updates, दि.१२ सप्टें: यावर्षी कोकणात गावी गेलेल्या चाकरमान्यांसाठी रेल्वेकडून एक खुशखबर आहे. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर करण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे काही अनारक्षित गाड्यांची घोषणा आज करण्यात आली आहे. या गाड्यांमुळे जनरल डब्यांतील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.
१) गाडी क्र. ०१०६९ / ०१०७० मुंबई सीएसएमटी – खेड – मुंबई सीएसएमटी स्पेशल (अनारक्षित):
गाडी क्रमांक ०१०६९ मुंबई सीएसएमटी – खेड स्पेशल (अनारिक्षित) मुंबई सीएसएमटी येथून १२/०९/२०२४ रोजी रात्री २३:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:१५ वाजता खेडला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०७० खेड – मुंबई सीएसएमटी स्पेशल (अनारक्षित) खेड येथून १६/०९/२०२४ रोजी पहाटे ०६:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 13.30 वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.
ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी आणि कळंबणी बुद्रुक स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण 20 डबे = सामान्य – १४, (अनारक्षित) स्लीपर – ०४, एसएलआर – ०२ .
२) गाडी क्र. ०१०७४ / ०१०७१ खेड – पनवेल – खेड अनारक्षित विशेष:
गाडी क्रमांक ०१०७४ खेड – पनवेल अनारक्षित विशेष खेड येथून १३/०९/२०२४, १४/०९/२०२४ आणि १५/०९/२०२४ रोजी पहाटे ०६:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी १० वाजता पनवेलला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०७१ पनवेल – खेड अनारक्षित विशेष पनवेलहून १३/०९/२०२४, १४/०९/२०२४ आणि १५/०९/२०२४ रोजी सकाळी १ वाजता सुटेल आणि खेडला त्याच दिवशी दुपारी १४.४५ वाजता पोहोचेल.
ही गाडी कळंबणी बुद्रुक, दिवाणखावटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, पेण या स्थानकांवर गाडी थांबेल.
डब्यांची रचना : एकूण 20 डबे = सामान्य – १४, (अनारक्षित) स्लीपर – ०४, एसएलआर – ०२ .
3) ट्रेन क्र. ०१०७२ / ०१०७३ खेड – पनवेल – खेड अनारक्षित विशेष :
गाडी क्रमांक ०१०७२ खेड – पनवेल अनारक्षित विशेष खेड येथून १३/०९/२०२४, १४/०९/२०२४ आणि १५/०९/२०२४ रोजी दुपारी १५:१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २०.३० वाजता पनवेलला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०७३ पनवेल – खेड अनारक्षित स्पेशल पनवेल येथून १३/०९/२०२४, १४/०९/२०२४ आणि १५/०९/२०२४ रोजी रात्री २१:१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०१:०० वाजता खेडला पोहोचेल.
ही गाडी कळंबणी बुद्रुक, दिवाणखावटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, पेण या स्थानकांवर गाडी थांबेल.
डब्यांची रचना : एकूण 20 डबे = सामान्य – १४, (अनारक्षित) स्लीपर – ०४, एसएलआर – ०२ .