Category Archives: कोकण रेल्वे

Konkan Railway: मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसवर कन्नडीगांचा डोळा

   Follow us on        
Mumbai Goa Vande Bharat Express:
मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस पुढे मंगुळुरूपर्यंत विस्तारित करण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत. सध्या कोकण रेल्वे मार्गावर धावत असलेली मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आणि मडगाव मंगुळुरु एक्सप्रेस या दोन्ही गाड्या एकत्र करून  मुंबई – मंगुळुरु अशी अखंड वंदे भारत एक्सप्रेस चालविण्याबाबत रेल्वे प्रशासन योजना आखत असल्याचे वृत्त मातृभूमी या आघाडीच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे.  कर्नाटकातील लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्नशील आहेत.
मुंबई मंगुळुरु वंदे भारत अशी अखंड वंदे भारत सेवा सुरु झाल्यास हे अंतर १२ तासांत कापता येईल आणि कर्नाटक कोस्टल भागातील प्रवाशांना एक जलद वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होईल. सध्या कोकण रेल्वे मार्गावरील दोन्ही वंदे भारत एक्सप्रेसचा एकत्रित विचार करता त्या सरासरी ७० टक्के क्षमतेने धावत आहेत. मात्र मुंबई मंगुळुरु वंदे भारत अशी अखंड वंदे भारत सेवा सुरु झाल्यास हाच रेट १००% होईल असा युक्तिवाद करून ही मागणी करण्यात येत आहे.
सध्या मंगळुरू-गोवा वंदे भारत हा सर्वात कमी गर्दीच्या मार्गांपैकी एक आहे, ज्यामध्ये प्रवाशांची संख्या ४० टक्क्यांपेक्षा कमी आहे. यावर उपाय म्हणून, रेल्वेने सुरुवातीला कोझिकोडपर्यंत सेवा वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तथापि, कर्नाटकातील राजकीय नेत्यांच्या विरोधामुळे ही योजना रद्द करण्यात आली. मुंबई-गोवा वंदे भारतचा प्रवास दर (Occupancy Rate)सुमारे ९० टक्के होता, परंतु त्यानंतर तो सुमारे ७० टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. रेल्वेचा असा विश्वास आहे की मुंबई-गोवा आणि मंगळुरू-गोवा सेवा एकाच मुंबई-मंगळुरू मार्गात विलीन केल्याने पूर्ण प्रवासी क्षमता साध्य होण्यास मदत होईल.
सध्या, मुंबई-गोवा वंदे भारत सकाळी ५:२५ वाजता मुंबईहून निघते आणि दुपारी १:१० वाजता गोव्यात पोहोचते. प्रस्तावित वेळापत्रकानुसार, ती नंतर मंगळुरूला पोहोचेल तिथे संध्याकाळी ६:०० वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे, मंगळुरू-गोवा वंदे भारत सकाळी ८:३० वाजता मंगळुरूहून निघते आणि दुपारी १:१० वाजता गोव्यात पोहोचेल. जर ट्रेन मुंबईकडे निघाली तर ती रात्री ९:०० वाजता पोहोचेल अशी अपेक्षा आहे. तथापि, या वेळी मुंबईच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दीमुळे आव्हान निर्माण होऊ शकते. कारण याच वेळी अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या याच  वेळी मुंबईला येतात. मध्य रेल्वेने मुंबई-मंगळुरू वंदे भारत वेळापत्रकात बदल करण्याची आवश्यकता असल्याचे सूचित केले आहे.
वरील वृत्त मातृभूमी या आघाडीच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. कर्नाटकातील लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. महाराष्ट्रातील कोकण रेल्वे  प्रवासी संघटनांनी याला विरोध केला आहे. . मुंबई-गोवा वंदे भारतचा प्रवास दर (Occupancy Rate) सुमारे ७० टक्क्यांपर्यंत आला असल्याची बातमी खोटी असून सध्या तो ९०% च्या वर आहे.  सध्याची मुंबई  गोवा वंदे भारत एक्सप्रेस तशीच ठेवून मुंबई ते मंगुळुरु दरम्यान स्लीपर वंदे भारत चालू करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्रातील कोकण रेल्वे  प्रवासी संघटनांनी केली आहे.

Konkan Railway Disruption: मुंबईहून कोकणात जाणार्‍या दोन गाड्या उशिरा सुटणार

   Follow us on        

Konkan Railway 07:45 PM:

कोकण रेल्वे मार्गावर आज आडवली स्थानका जवळ ओव्हरहेड सपोर्ट वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. परिणामी (पेअरींग गाड्या उशिराने धावत असल्याने) मुंबईहून गोव्यासाठी सुटणार्‍या दोन गाड्या उशिराने सोडण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक २२ मार्च रोजी सीएसएमटी मुंबई स्थानकावरून रात्री ११ वाजता सुटणारी गाडी क्रमांक २०१११ सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस २३ मार्च रोजी पहाटे ४:०० वाजता सोडण्यात येणार आहे.

एलटीटी मुंबई या स्थानकावरून दिनांक २३ मार्च रोजी ००:४५ वाजता सुटणारी गाडी क्रमांक ११०९९ एलटीटी मडगाव एक्सप्रेस ही गाडी २३ मार्च रोजी सकाळी ०४:०० वाजता सोडण्यात येणार आहे.


Konkan Railway 06:15 PM:

कोकण रेल्वे मार्गावर आज आडवली जवळ ओव्हरहेड वायरला सपोर्ट करणारी वायर तुटल्याने कोकण रेल्वेची वाहतूक काही काळ बंद झाली होती. वायर तुटल्याने मंगला एक्स्प्रेस व मांडवी व अन्य काही गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवण्यात आल्या होत्या.

आता ही वायर जोडण्यात आली असून रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरू झाली असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे. तरी देखील त्याचा परिणाम कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर झाला असून कोकण रेल्वेच्या गाड्या अजूनही सुमारे दोन ते तीन उशिराने धावत आहेत.

कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्यांची सध्याची स्थिती.. (06:15 pm) 

सीएसएमटी मडगाव मांडवी एक्सप्रेस वैभववाडी स्थानकावर पोहोचली असून ती सुमारे ४ तास उशिराने धावत आहे तर मडगाव सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस आडवली स्थानकावरून नुकतीच निघाली असून ती सुमारे चार तास उशिराने धावत आहे. दिवा सावंतवाडी एक्सप्रेस आताच आडवली स्थानकावर आली असून ती सुमारे साडेतीन तास उशिराने धावत आहे. मडगाव एलटीटी सिंधुदुर्ग स्थानकावर असून ती तीन तास उशिराने धावत आहे.

कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि अन्य मागण्यांसाठी खासदार रविंद्र वायकर यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत भेट

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे तसेच महाराष्ट्रात रेल्वेच्या कारभारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे शिंदे सेनेचे खासदार रविंद्र वायकर यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. खासदार वायकर यांनी काल केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची लोकसभेतील त्यांच्या दालनात भेट घेतली. रेल्वेशी निगडीत विविध विषयांचे त्यांना निवेदन दिले. यात जोगेश्वरी येथे नव्याने टर्मिनल बनवण्यात येत आहे, या टर्मिनलला हाँगकाँगच्या धर्तीवर मल्टीमोडेल कनेक्टीविटीने जोडण्यात यावे. येथे पार्किंग, हॉटेल्स तसेच मॉल्सची सुविधा करण्यात यावी.

कोकण रेल्वेच्या दुपदरी कामासाठी बैठक घेण्यात येईल असे आश्वासन बजेट मध्ये देण्यात आले होते. पण हो बैठक अद्याप घेण्यात आली नसल्याकडे लक्ष वेधत कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे (३७० किलो मीटर) काम सुरु करण्यात यावे. कोकण रेल्वे स्वतंत्र महामंडळ असले तरी गोवा व महाराष्ट्र सरकारने भारतीय रेल्वे मध्ये विलीनिकरणास तयारी दर्शवली आहे अशी माहिती खासदार वायकर यांनी रेल्वे मंत्री यांनी दिली.

माननीय मंत्री महोदयांना दिलेल्या निवेदनात मांडलेल्या काही महत्त्वाच्या समस्या : 

  • जोगेश्वरीला जंक्शन हे हाँगकाँगच्या धर्तीवर मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीने जोडलेले असावे. तसेच तिथे कार पार्किंग, हॉटेल, मॉल आदी सुविधा उपलब्ध असाव्या .
  • रेल्वे स्थानकांवरील, विशेषतः कल्याणच्या पुढच्या स्थानकांच्या, स्वच्छतागृहांची अवस्था बिकट आहे. दुर्गंधी, पाण्याचा अभाव, स्तनपान कक्षांची अनुपलब्धता इत्यादी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
  • मराठी भाषेला आता राजभाषेचा दर्जा मिळाला असल्याने महाराष्ट्रात सर्वच कारभारात, विशेषतः रेल्वेच्या कारभारात मराठी भाषा अनिवार्य असावी.
  • एसी लोकलची फ्रिक्वेन्सी किंवा एसी गाड्यांची संख्या वाढवण्यात याव्या
  • उपनगरीय रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव डबा असूनही कित्येकदा इतर नागरिक त्या डब्यात प्रवास करत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना उभे राहून प्रवास करावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांच्या या गैरसोयींवर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.

 

कोकण रेल्वे

  • प्रवाशांची वाढती गर्दी आणि कोकण रेल्वेचा सिंगल ट्रॅक यामुळे होणाऱ्या अडचणींवर उपाय म्हणून कोकण रेल्वे डबल ट्रॅक करण्यासाठी प्रयत्न करून हा प्रकल्प पुढे नेण्यात यावा.
  • अनेक स्थानकांची स्वच्छता अत्यंत निकृष्ट आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छतागृहांची स्थितीही समाधानकारक नाही. आजही अनेक स्थानकांवर छत नसल्याने प्रवाशांना नाहक ऊन, पावसाचा सामना करावा लागत आहे.
  • कोकण रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांवर सोलर पॅनल बसवावेत.
  • कोकण रेल्वे मार्गावरील सर्व जुने बोगदे व पुलांचे सर्वेक्षण करून वेळोवेळी आवश्यकतेनुसार दुरुस्तीचे काम करण्यात यावे.
  • मालगाड्यांचे वेळापत्रक अशा प्रकारे ठरवावे की त्यामुळे प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकात अडथळा येणार नाही.

Konkan Railway: उन्हाळी हंगाम विशेष गाड्यांच्या आरक्षणाची तारीख जाहीर

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या उन्हाळी विशेष गाड्यांच्या आरक्षणाची तारीख जाहीर करण्यात आहे या गाड्यांचे आरक्षण दिनांक २४ मार्च २०२५ रोजी संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सकाळी ८ वाजल्यापासून उपलब्ध होणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

१) गाडी क्रमांक ०११५१ / ०११५२ मुंबई सीएसएमटी- करमाळी. – मुंबई सीएसएमटी स्पेशल (साप्ताहिक): 

गाडी क्रमांक ०११५१ मुंबई सीएसएमटी – करमाळी स्पेशल (साप्ताहिक) दर गुरुवारी, १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत मुंबई सीएसएमटीहून ००:२० वाजता सुटेल आणि ट्रेन त्याच दिवशी दुपारी १:३० वाजता करमाळीला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११५२ करमाळी. – मुंबई सीएसएमटी स्पेशल (साप्ताहिक) दर गुरुवारी, १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत करमाळीहून दुपारी १:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३:४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.

ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांवर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण २२ कोच : दोन टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०५ कोच, स्लीपर – १० कोच, जनरल – ०४ कोच , SLR – ०२

२) गाडी क्रमांक ०११२९ / ०११३० लोकमान्य टिळक (टी) – करमाळी – लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक): 

गाडी क्रमांक ०११२९ लोकमान्य टिळक (टी) – करमाळी विशेष साप्ताहिक १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक (टी) येथून २२:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२:०० वाजता करमाळीला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११३० करमाळी – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक ११/०४/२०२५ ते ०६/०६/२०२५ पर्यंत दर शुक्रवारी करमाळीहून दुपारी २:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४:०५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि या स्थानकांवर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण १९ एलएचबी कोच : फर्स्ट एसी – ०१ कोच, टू टायर एसी – ०२ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरेटर कार – ०२

३) गाडी क्रमांक ०१०६३/०१०६४ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक: 

गाडी क्रमांक ०१०६३ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर विशेष साप्ताहिक ही गाडी दर गुरुवारी, ०३/०४/२०२५ ते २९/०५/२०२५ पर्यंत लोकमान्य टिळक (टी) येथून दुपारी ४:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २२:४५ वाजता तिरुवनंतपुरम उत्तर येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१०६४ तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक ही गाडी ०५/०४/२०२५ ते ३१/०५/२०२५ पर्यंत दर शनिवारी तिरुवनंतपुरम उत्तर येथून सायंकाळी ४:२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक (टी) येथे ००:४५ वाजता पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकुंदोब रोड, मुकुंदोब रोड, कुंडुरा रोड सुरथकल, मंगळुरु जं., कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर जं., त्रिसूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम आणि कोल्लम जं. या स्थानकांवर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण २२ एलएचबी कोच : टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०९ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

“मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मंगळुरू पर्यंत नेण्यापेक्षा…..” कोकण विकास समितीने रेल्वेला दिला हा पर्याय..

   Follow us on        

Konkan Railway: मुंबई मडगाव वंदेभारत एक्सप्रेसचा मंगळुरू स्थानकापर्यंत विस्तार करण्यात यावा अशी मागणी आता कर्नाटक राज्यातून होत आहे. मात्र या मागणीला महाराष्ट्र राज्यातील रेल्वे प्रवासी संघटनांनी आपला विरोध दर्शवला आहे. कोकण विकास समितीने रेल्वे प्रशासनाला ईमेल पाठवून या प्रस्तावाला विरोध केला आहे.

सध्या कोकण रेल्वे मार्गावर दोन वंदे भारत एक्सप्रेस चालत आहेत. गाडी क्रमांक 22229/30 मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मुंबई मडगाव दरम्यान तर 20645/46 मडगाव – मंगळुरू सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मडगाव मंगळुरू दरम्यान चालविण्यात येत आहेत. मुंबई मडगाव दरम्यान धावणारी वंदेभारत एक्सप्रेस यशस्वी ठरत असताना मडगाव – मंगळुरू दरम्यान धावणारी वंदेभारत तितकीशी यशस्वी ठरलेली दिसत नाही आहे. त्यामुळे ती बंद करण्याची नामुष्की येणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मात्र कर्नाटक राज्यातील खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी ही गाडी बंद न करता तिचा रेक वापरून 22229/30 मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी पुढे मंगळुरू स्थानकापर्यंत विस्तारित करण्याची मागणी केली आहे.

मात्र महाराष्ट्र राज्यातील प्रवासी संघटनांनी याला विरोध केला आहे. कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत शंकर दरेकर यांनी रेल्वे प्रशासनाला ईमेल पाठवून या प्रस्तावाला विरोध केला आहे. मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सध्या जवळपास आपल्या 98% क्षमतेने चालत आहे. ही गाडी पुढे दक्षिणेकडे विस्तारित केल्यास महाराष्ट्र राज्यातील प्रवाशांना या गाडीच्या आसन उपलब्धतेच्या समस्येला तोंड देण्याची वेळ येईल. त्याच बरोबर स्थानकांना मिळालेल्या आसन कोट्यात परिणाम होऊन खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थीवी या स्थानकांच्या प्रवाशांना तिकीट मिळणे कठीण होईल. तसेच या गाडीचा लांब मार्ग असल्यास गाडीची देखभाल, दिरंगाई या सारख्या समस्या निर्माण होऊन ही गाडी आपली सध्याची लोकप्रियता गमावून बसेल.

दक्षिणेकडील राज्यातील आणि महाराष्ट्र राज्यातील प्रवाशांच्या रेल्वे प्रवासाबद्दल अपेक्षा, मागण्या भिन्न आहेत. ही गाडी दक्षिणेकडे विस्तारित केल्यास भविष्यात दोन्ही प्रवासी गटांत या गाडीवरून वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यावर उपाय म्हणजे ही गाडी विस्तारित न करता कोकण रेल्वे मार्गावर मुंबईहून मंगळुरु पर्यंत नवीन वंदेभारत गाडी या मार्गावर चालवली जावी. मुंबई ते मंगळुरु अंतर पाहता (९०० किलोमीटर) दुसरा आणि उत्तम पर्याय म्हणजे या दोन्ही स्थानका दरम्यान नवीन स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस किंवा अमृत भारत एक्सप्रेस चालविण्यात यावी आणि तिला चिपळूण, कुडाळ आणि सावंतवाडी या वंदे भारत एक्सप्रेस सेवेपासून वगळण्यात आलेल्या महत्त्वाच्या स्थानकांवर प्राधान्याने थांबे देण्यात यावेत अशी मागणी या निवेदनात जयवंत दरेकर यांनी केली आहे.

 

 

 

 

Konkan Railway: मत्स्यगंधा एक्सप्रेस ‘एलएचबी’ झाली तरीही प्रवासी नाराज! कारण काय?

   Follow us on        
Konkan Raiwlay: अलीकडेच मत्स्यगंधा एक्सप्रेससाठी लिंके हॉफमन बुश (एलएचबी) कोचसह नवीन रेक मिळाल्याबद्दल प्रवाशांमध्ये उत्साह होता. मात्र तो अल्पकालीनच ठरला आहे. कारण या गाडीला जोडण्यात आलेले ५०% कोच जुने म्हणजे २०१४ ते २०२३ दरम्यान निर्माण केलेले आणि वाईट स्थितीत आहेत.
गाडी क्रमांक १२६२०/६१९ मंगळुरू-मुंबई एलटीटी-मंगळुरू मत्स्यगंधा एक्सप्रेस च्या एलएचबी रेक साठी  १६३४८/३४७ मंगळुरू सेंट्रल-तिरुवनंतपुरम सेंट्रल-मंगळुरू सेंट्रल एक्सप्रेस ही गाडी Rake Sharing Arrangement (RSA) साठी निवडण्यात आली आहे. या दोन्ही गाड्यांसाठी चालविण्यात येणारे एकूण चार रेक जुने आणि वाईट स्थितीत आहेत.
दक्षिण रेल्वेच्या तिरुवनंतपुरम विभागाकडे हे २२ कोचेचे चार रेक आहेत. चार रेकसाठी एकूण ८८ कोचपैकी ४४ कोच नवीन म्हणजे २०२४ मध्ये बांधले गेले आहेत तर उर्वरित २०१४ ते २०२३ दरम्यान बांधले गेले होते. यातील एका रेकमध्ये २०२४ मध्ये बांधलेले २१ कोच आहेत, दुसऱ्यामध्ये १२ कोच आहेत, तिसऱ्या मध्ये  ९ आणि चौथ्यामध्ये  २०२४ मध्ये बांधण्यात आलेले फक्त २ कोच आहेत. बाकी सर्व जुने म्हणजे २०१४ ते २०२३ दरम्यान बांधले गेलेले कोच आहेत. अशी माहिती मिळाली आहे.
दक्षिणेकडील खासदार कोटा श्रीनिवास पुजारी १२ मार्च रोजी नवी दिल्ली येथे रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांची भेट घेतली आणि ही बाब मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. खासदारांनी श्री. सोमन्ना यांना मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या सर्व रॅकवर अलीकडेच बांधलेले डब्यांची जोडणी करण्याचे निर्देश संबंधित विभागीय रेल्वेला द्यावेत अशी विनंती केली आहे.  रेल्वेमंत्र्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी सांगितले.
Year of manufacture
Number of coaches
2014 1
2015 3
2017 1
2018 8
2019 5
2020 4
2021 8
2022 8
2023 6
2024 44
Total 88

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील दोन स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांचे थांबे मंजूर

   Follow us on        
Konkan Railway: रेल्वे मंत्रालयाने कोकण रेल्वेमार्गावरील कुमठा आणि कुंदापूरा या दोन स्थानकांवर प्रायोगिक तत्वावर थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे. कुमठा येथे एक तर कुंदापूरा येथे दोन गाडयांना थांबे मंजूर करण्यात आले आहेत.
गाडी क्रमांक २२४७६ कोइम्बतूर – हिसार एक्सप्रेस / गाडी क्रमांक २२४७५ हिसार – कोइम्बतूर एक्सप्रेस ही गाडी दिनांक १५ मार्च २०२५ पासून कुमठा या स्थानकावर थांबणार आहे.
तर गाडी क्रमांक २२६५३ तिरुवनंतपुरम सेंट्रल – एच. निजामुद्दीन एक्सप्रेस / गाडी क्रमांक  २२६५४ एच. निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस ही गाडी दिनांक १५ मार्च २०२५ पासून आणि गाडी क्रमांक २२६५५ एर्नाकुलम जंक्शन – एच. निजामुद्दीन एक्सप्रेस / गाडी क्रमांक  २२६५६ एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जंक्शन. एक्सप्रेस दिनांक १४ मार्च २०२५पासून कुंदापूरा या स्थानकावर थांबणार आहे.

थांबे मिळवून देण्यात खासदारांचे विशेष प्रयत्न

उत्तरा कन्नड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी कुमठा येथे थांबे मिळवण्यासाठी तर श्री कोटा पुजारी  यांनी कुंदापूरा येथे थांबे मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेसची यशस्वी वाटचाल

   Follow us on        
Konkan Railway:मुंबई-गोवा मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता पर्यंत सुरु करण्यात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या यशश्वी मार्गात या मार्गाची  गणना होता आहे. या गाडीच्या प्रवाशांची संख्याही वेगाने वाढत आहे. आरामदायी आणि वेगवान प्रवासाच्या चाहत्या वर्गाकडून या गाडीला तुफान प्रतिसाद मिळत आहे.
मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांत एकूण ५० हजार ७३९ प्रवाशांनी या ट्रेनमधून प्रवास केला आहे. वेगवान, सुरक्षित आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या ट्रेनला प्रवासी आणि पर्यटकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.

मागील २ महिन्यांची प्रवासी संख्या

मार्ग जानेवारी  फेब्रुवारी एकूण
सीएसएमटी-मडगाव १३,१९६ ११,६१४ २४,८१०
मडगाव-सीएसएमटी १३,२४५ १२,६८४ २५,९२९
सेमी-हायस्पीड ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. पहिल्याच फेरीत या ट्रेनच्या ५३३ आसन क्षमतेपैकी ४७७आसने भरली होती; प्रारंभी ९१.४४ ते ९३.११ टक्के क्षमतेने धावणाऱ्या या ट्रेनला सध्या ९५ टक्के प्रतिसाद मिळत आहे. या ट्रेनला सध्या आठ डबे असून प्रवाशांसाठी आरामदायी आसने, वेगवान सेवा आणि आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती केली असून ती किफायतशीर दरात उपलब्ध आहे. सध्या मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी-सोलापूर, सीएसएमटी-शिर्डी, सीएसएमटी-जालना आणि सीएसएमटी-मडगाव या वंदे भारत गाड्या धावत आहेत. या सर्व गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत असून सुरक्षित आणि वेगवान प्रवासासाठी प्रवासी समाधान व्यक्त करीत आहेत.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार पाटणा – वास्को द गामा विशेष एक्सप्रेस

   Follow us on        
Konkan Railway: होळी उत्सव – २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी ट्रेन क्रमांक ०७३११ / ०७३१२ वास्को द गामा – पटना – वास्को द गामा एक्सप्रेस स्पेशल या गाडी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनातर्फे  घेण्यात आला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहेत.
१) गाडी क्रमांक ०७३११ / ०७३१२ वास्को द गामा – पटना – वास्को द गामा एक्सप्रेस स्पेशल:
ट्रेन क्रमांक ०७३११ वास्को द गामा – पटना एक्सप्रेस स्पेशल मंगळवार, ११/०३/२०२५ रोजी दुपारी ४:०० वाजता वास्को द गामा येथून निघेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजता वास्को द गामा येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ०७३१२ पाटणा – वास्को द गामा एक्सप्रेस स्पेशल शनिवार, १५/०३/२०२५ रोजी सायंकाळी ५:४० वाजता पाटणा येथून निघेल आणि तिसऱ्या दिवशी १०.३० वाजता वास्को द गामा येथे पोहोचेल.
ही गाडी मडगाव जंक्शन, थिविम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण जंक्शन, नाशिक रोड, मनमाड जंक्शन, भुसावळ, खांडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज , पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि दानापूर स्टेशन या स्थानकांवर थांबेल.
रचना : एकूण २० एलएचबी कोच = दोन टायर एसी – ०१  कोच, थ्री टायर एसी – ०५  कोच, स्लीपर – १२  कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

….अन्यथा महाराष्ट्रदिनी सावंतवाडी स्थानकावर पुन्हा ‘रेल रोको’…प्रवासी संघटनेचा इशारा

   Follow us on        
सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी स्थानक हे तळकोकणातील महत्त्वाचे स्थानक असून या ठिकाणी कोकणवासी आणि पर्यटकांची नेहमी रेलचेल असते. येथील स्थानक टर्मिनस घोषित होऊन तब्बल दहा वर्षे उलटली परंतु हे काम देखील गेली अनेक वर्षे रखडले आहे. ह्या स्थानकातून कोरोना काळात एकूण सहा गाड्या काढून घेण्यात आल्या होत्या. या संदर्भात कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी या संघटनेने या बद्दल अनेक वेळा आवाज उठवला असून या ठिकाणी तब्बल तीन वेळा आंदोलन देखील केले होते, आताच २६ जानेवारी २०२६ रोजी केलेल्या रेल रोको आंदोलनाची दखल महाराष्ट्रातील जनतेने घेतली होती. तरी देखील कोकण रेल्वे प्रशासनाकडून याची योग्य दखल घेण्यात आली नाही असेच या वरून दिसते.
सावंतवाडी स्थानकाचे उत्पन्न आणि प्रवासी संख्या ह्या रेल्वे बोर्डाच्या मानकापेक्षा अधिक असून देखील येथे थांबे न देण्यामागे कोकण रेल्वे प्रशासनाचे काय हित आहे हे मात्र अनुत्तरित आहे.या वर्षात आधी रोहा आणि आता कुमठा येथे नवीन थांबे मंजूर झाले परंतु सावंतवाडी स्थानकात काढून घेण्यात आलेले थांबे पुन्हा देण्यात रेल्वे प्रशासन एवढा आखडता हात का घेत आहे हा प्रश्न सामान्य कोकणकर जनतेला पडला आहे.
कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या १२२३१ /३२ त्रिवेंद्रम – निजामुद्दीन – त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस, १२२०/०२ एल टी टी – कोचुवेली – एल टी टी गरीब रथ एक्सप्रेस या गडांचा थांबा अजूनही पूर्ववत केला गेला आहे. त्याबरोचर मुंबई सीएसएमटी  – मंगलोर या गाडीला सावंतवाडी येथे थांबा देण्यात यावा या मागणीलाही वारंवार केराची टोपली दाखवली जात आहे. मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेस या गाडीला सावंतवाडी येथे थांबा मिळणे अपेक्षित होते. मात्र तिथेही या स्थानकाला डावलले गेले आहे.  कोकण रेल्वे प्रशासन जर असेच करणार असेल तर पुन्हा महाराष्ट्र दिनी भव्य रेल रोको करू असा इशारा कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी  ने दिला आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search