Category Archives: देश

DigiPIN: आता पिनकोड विसरा; अचूक स्थान दाखवण्यासाठी डिजीपिन द्या; आपला डिजीपिन कसा शोधाल?

   Follow us on        

DigiPIN : सध्याच्या पिनकोड प्रणालीला एक उत्तम आणि अचूक पर्याय म्हणून भारतीय पोस्ट विभागाने ‘डिजीपिन’ (DigiPIN) नावाचा डिजिटल पत्ता सादर केला आहे. डिजीपिन ही आता देशातील नवी पत्ता प्रणाली (Address System) ठरणार आहे. 10 अंकी डिजीपिन प्रणाली तुमच्या घराचे किंवा व्यवसायाचे अचूक स्थान दर्शविणार आहे.
.

पिन कोड आणि डिजीपिनमधील फरक…

भारतीय पोस्ट विभागाने अचूक स्थान समजून घेण्यासाठी डिजीपिन (DigiPIN) प्रणाली सादर केली आहे. डिजीपिन हा 10 अंकी डिजिटल कोड आहे. पारंपरिक पिन कोड ज्या प्रकारे विस्तृत क्षेत्राचा समावेश करत होता, त्याऐवजी डिजीपिनमुळे अचूक स्थानाची माहिती मिळणार आहे. म्हणजेच, तुमच्या घराचे किंवा व्यवसायाचे अचूक स्थान डिजीपिनद्वारे शोधता येईल.

डिजीपिन तयार करण्यासाठी आणि कोड मिळवण्यासाठी सरकारी संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही तुमचा डिजीपिन मिळवू शकतात. डिजीपिनचा सर्वात मोठा फायदा असा आहे की, तो पत्रव्यवहार योग्य पत्त्यावर पोहोचवण्यात मदत करेल आणि रुग्णवाहिका, अग्निशमन दल यांसारख्या आपत्कालीन सेवांना अचूक ठिकाणी पोहोचण्यात मदत करेल. ग्रामीण भागांसह दुर्गम भागात डिजीपिन फायदेशीर ठरेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. डिजीपिन केवळ पत्रव्यवहारासाठीच नव्हे, तर ई-कॉमर्स वेबसाइट्सवरील पार्सलसुद्धा अचूक ठिकाणी पोहोचवण्यात सक्षम ठरेल, असं सांगितलं जात आहे.

तुमचा डिजीपिन कसा शोधाल?
तुमचा डिजीपिन शोधण्यासाठी भारत सरकारने https://dac.indiapost.gov.in/mydigipin/home ही वेबसाइट तयार केली आहे. या वेबसाइटला भेट दिल्यावर आणि तुमचे लोकेशन निवडल्यावर तुम्हाला तुमचा 10 अंकी डिजीपिन कोड मिळू शकतो. डिजीपिन इतर पत्त्यांच्या प्रणालींपेक्षा वेगळी ठरण्याचे कारण म्हणजे, यात तुम्ही फक्त चार मीटरच्या त्रिज्येत तुमचे अचूक स्थान ओळखू शकता. इंडिया पोस्टने IIT हैदराबाद, NRSC आणि ISRO यांच्या सहकार्याने डिजीपिन ही जिओकोड केलेली डिजिटल अ‍ॅड्रेस प्रणाली विकसित केली आहे. विशेष म्हणजे, डिजीपिनचा ऑफलाइन देखील वापरता येऊ शकतो.

Railway Updates: कन्फर्म तात्काळ तिकीट मिळण्याच्या शक्यता वाढणार; भारतीय रेल्वे मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

   Follow us on        
नवी दिल्ली : रेल्वे तिकीट आरक्षणात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.  भारतीय रेल्वे लवकरच तत्काळ तिकीट बुकिंगसाठी (Tatkal Ticket Booking) ई-आधार पडताळणीचे काम सुरू करणार आहे. यामुळे प्रवाशांना गरजेच्या वेळी कन्फर्म तिकिटे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. रेल्वेने असेही म्हटले आहे की, ज्या लोकांचे ओळखपत्र आधारशी जोडलेले असतील. त्यांना तत्काळ तिकीट बुकिंगच्या पहिल्या १० मिनिटांत प्राधान्य दिले जाणार आहे. आयआरसीटीसीच्या अधिकृत एजंटनाही तात्काळ विंडो उघडल्यानंतर पहिल्या १० मिनिटांत सिस्टमवर तिकिटे बुक करण्याची परवानगी आतापर्यंत नाही. अशा परिस्थितीत, ज्या लोकांचे ओळखपत्र आधारशी जोडलेले असेल त्यांना तिकिटे बुकिंग करणे अधिक सोयीस्कर ठरणार आहे, असे रेल्वेने घोषित केले आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वेने स्वयंचलित साधनांचा वापर करून ऑनलाइन तिकिटे बुक करणाऱ्या तिकीट एजंटविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. रेल्वेचे असेही नमूद केले की, अकाउंट्सच्या अलीकडच्या तपासणीत २० लाख इतर खाती देखील संशयास्पद आढळली आहेत. त्यांचे आधार आणि इतर कागदपत्रे तपासली जात आहेत. सध्या, आयआरसीटीसी वेबसाइटवर १३ कोटींहून अधिक सक्रिय ग्राहक आहेत. यापैकी, आधारशी जोडलेल्या खात्यांची संख्या १.२ कोटी आहे.
आता आयआरसीटीसीने आधारशी प्रमाणित नसलेल्या या सर्व ११ कोटी ८० लाख खात्यांविरोधात सक्त भूमिका घेतली आहे. यासाठी विशेष चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संशयास्पद आढळणारी सर्व खाती ब्लॉक केली जाणार आहेत. रेल्वे तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ सेवेअंतर्गत फक्त योग्य प्रवाशांनाच तिकिटे मिळावीत यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. अशा परिस्थितीत, जे खातेधारक त्यांचे खाते आधारशी लिंक करतील, त्यांना तत्काळ बुकिंगच्या पहिल्या १० मिनिटांत प्राधान्य मिळणार आहे.

जामनगर-तिरुनेलवेली एक्सप्रेसवर झाड कोसळले; लोको पायलटच्या प्रसंगवधाने अनर्थ टळला

   Follow us on        
त्रिशूर: चेरुथुरुथी येथील रेल्वे पुलाजवळ एक झाड उन्मळून चालत्या ट्रेनवर पडले. ही घटना सकाळी १०.३० च्या सुमारास जामनगर-तिरुनेलवेली एक्सप्रेस परिसरातून जात असताना घडली. झाड ट्रेन आणि ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाईन्सवर आदळले, परंतु लोको पायलटने तातडीने कारवाई केली आणि ट्रेन थांबवली, ज्यामुळे संभाव्य अनर्थ टळला आहे.
या मार्गावरील रेल्वे सेवा सुमारे दीड तास विस्कळीत झाली होती. काही गाड्या तात्पुरत्या थांबवण्यात आल्या किंवा पर्यायी मार्गांनी वळवण्यात आल्या आहेत. ट्रॅक्शन डिस्ट्रिब्युशन डिपार्टमेंट (टीआरडी) ची एक टीम घटनास्थळी पोहोचली आणि पडलेल्या झाडाला बाजूला केले, त्यानंतर दोन्ही ट्रॅकवरील सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

Covid-19 Updates: देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू..

   Follow us on        
मुंबई: देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या २० दिवसांत मुंबईत ९५ रुग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती एका आघाडीच्या वृत्तपत्रामार्फत देण्यात आली आहे. देशात एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता २५७ वर पोहोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक ९५ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तामिळनाडूमध्ये ६६, महाराष्ट्रात ५६ आणि कर्नाटकात १३ रुग्ण आहेत.
दरम्यान, मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. तथापि, डॉक्टरांचे म्हणणे आहे की त्यांचा मृत्यू कोविडमुळे नाही तर दीर्घकालीन आजारांमुळे झाला. एका रुग्णाला तोंडाचा कर्करोग होता आणि दुसऱ्याला नेफ्रोटिक सिंड्रोम, मूत्रपिंडाशी संबंधित आजार होता.
सिंगापूरमध्ये 14 हजार रुग्ण
आशियातील सिंगापूर, हाँगकाँग, चीन आणि थायलंडमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. या देशांमध्ये नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. १ ते १९ मेदरम्यान सिंगापूरमध्ये ३००० रुग्ण आढळले. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही संख्या ११,१०० होती. येथे प्रकरणांमध्ये २८% वाढ झाली असून १४ हजार रुग्ण असल्याचे समजते.

Covid-19 Updates: ‘कोरोना’ पुन्हा येतोय?

   Follow us on        

Covid-19 Updates: एकेकाळी संपूर्ण जगात दहशतीचे वातावरण निर्माण करणारा कोरोना पुन्हा येत आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. अलिकडच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार गेल्या काही आठवड्यात सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये #COVID19 च्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मात्र उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, ही प्रकरणे बहुतेक सौम्य आहेत, असामान्य तीव्रता किंवा मृत्युदराशी संबंधित नाहीत.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य सेवा महासंचालक (DGHS) यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC), आपत्कालीन वैद्यकीय मदत (EMR) विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि केंद्र सरकारी रुग्णालयांमधील तज्ञांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत असा निष्कर्ष काढण्यात आला की भारतातील सध्याची कोविड-१९ परिस्थिती नियंत्रणात आहे. १९ मे २०२५ पर्यंत, भारतात सक्रिय कोविड-१९ प्रकरणांची संख्या २५७ आहे, जी देशाच्या मोठ्या लोकसंख्येचा विचार करता खूपच कमी आहे. यापैकी जवळजवळ सर्व प्रकरणे सौम्य आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (IDSP) आणि ICMR द्वारे कोविड-१९ सह श्वसन विषाणूजन्य आजारांवर देखरेख ठेवण्यासाठी एक मजबूत प्रणाली देशात अस्तित्वात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी सतर्क आणि सक्रिय आहे, सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जात आहेत याची खात्री करत आहे.

Mansoon 2025: यंदा मान्सून किती तारखेला दाखल होणार? हवामान खात्याने दिली महत्वाची अपडेट

   Follow us on        
Mansoon Update:यंदा मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नैऋत्य मोसमी वारे अंदमान व निकोबार बेटावर 13 रोजी, तर देवभूमी केरळात नियोजित वेळेच्या 4 दिवस आधीच म्हणजेच 27 मे रोजी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे यंदा मोसमी पावसाचा प्रवास लवकरच सुरू होण्याची चिन्हे असून, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
साधारणपणे मान्सून अंदमानात 18 ते 20 मे दरम्यान, केरळात 1 जूनच्या आसपास, तळकोकणात 7 जूनला, महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत, तर संपूर्ण देशभरात 15 जुलैपर्यंत सक्रिय होत असतो. मात्र, यंदाच्या मान्सूनने लवकरच वर्दी दिल्याचे दिसत आहे. पुढील आठवड्यापर्यंत अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सूनचा पाऊस सुरू होऊ शकतो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 13 मेपर्यंत मान्सून अंदमान आणि निकोबारच्या काही भागात दाखल होण्याची शक्मयता आहे. त्यानंतरच्या तीन ते चार दिवसात तो अंदमान, निकोबार बेटासह अंदमान समुद्राचा परिसर व्यापण्याची शक्यता आहे. मोसमी पावसाकरिता स्थिती अनुकूल असल्याने त्याचा पुढचा प्रवास झपाट्याने होण्याची चिन्हे आहेत. 2009 मध्ये मान्सून लवकरच म्हणजे 23 मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता. यंदा 27 मे रोजी केरळच्या किनाऱ्यावर तो लवकरच सक्रिय झाला, तर मागच्या 15 वर्षांतील मान्सूनची हा गतिमान प्रवास असेल. त्यानंतरही मान्सूनची वाटचाल सुरूच राहणार असून, महाराष्ट्रातही तो नियोजित वेळेआधी येण्याची लक्षणे आहेत. तर साधारण 8 जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापेल, असा अंदाज आहे.

Pahalgam Terror Attack: भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानच्या विमानांसाठी भारताची हवाई हद्द बंद

   Follow us on        

Pahalgam Terror Attack: पाकिस्तान ची गोची करण्यासाठी भारताने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताने आता पाकिस्तानच्या विमानांसाठी आपली हवाई हद्द Airspace बंद केले आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात यापुर्वी काही मोठे निर्णय घेतले आहेत. त्यानंतर पाकने देखील भारताच्या विरोधात काही निर्णय घेतले. भारतीय विमानांसाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेशास मनाई केली. पाकिस्तानने भारतातील विमान वाहतूक क्षेत्राला हानी पोहोचवण्याच्या दृष्टीने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. त्यानंतर आता भारतानेही पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केलं आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर संभाव्य लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केलं आहे. 30 एप्रिल ते 23 मे पर्यंत हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. या काळात, पाकिस्तानच्या नोंदणीकृत, चालवल्या जाणाऱ्या किंवा भाडेतत्त्वावर घेतलेल्या विमानांसह पाकिस्तानी लष्करी विमानांना या क्षेत्रात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यानंतर त्यांच्या विमान कंपन्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. पूर्वी पाकिस्तानी विमाने भारतीय हवाई हद्द वापरून चीन, म्यानमार, थायलंड, मलेशिया आणि श्रीलंकेत उड्डाण करत होता, परंतु आता हवाई हद्द बंद झाल्यानंतर, त्यांच्या विमानांना पुन्हा या देशांमध्ये पोहोचण्यासाठी जास्त अंतराचा प्रवास करावा लागेल.

 

पाकिस्तानी एअरलाइन्स पीआयएने उड्डाणे केली रद्द 

भारतीय हवाई क्षेत्र बंद करण्यापूर्वी, पाकिस्तानी माध्यमांनी वृत्त दिले होते की, पाकिस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी पीआयएने गिलगिट, स्कार्दू आणि पाकव्याप्त काश्मीरला जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. उर्दू दैनिक ‘जंग’ ने दिलेल्या वृत्तानुसार, पीआयएने कराची आणि लाहोरहून स्कार्दूला जाणारी प्रत्येकी दोन उड्डाणे रद्द केली आहेत. इस्लामाबादहून स्कार्दू आणि गिलगिटला जाणाऱ्या एकूण सहा विमान उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत. पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्राची देखरेखही कडक केली आहे.

एक्सप्रेस ट्रिब्यूननुसार, सुरक्षेच्या कारणास्तव सर्व व्यावसायिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, ही सर्व पावले खबरदारीचा उपाय म्हणून आणि प्रादेशिक तणावादरम्यान राष्ट्रीय हवाई सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उचलण्यात आली आहेत. याशिवाय, पाकिस्तान प्राधिकरणाने सर्व विमानतळांना हाय अलर्टवर ठेवले आहे.

Mansoon Updates: यंदाच्या मान्सूनबाबत महत्वाची बातमी…हवामान खात्याने वर्तविली ‘ही’ शक्यता

   Follow us on        

Mansoon Updates: यंदाचा उन्हाळा यंदा फेब्रुवारीपासूनच कडक उन्हाळा राज्यात सुरू झाला आहे. त्यामुळे सुमारे शंभर वर्षातील सर्वांत उष्ण फेब्रुवारी ठरला. वातावरणातील या बदलाचा परीणाम मान्सूनच्या आगमनावर करणारा ठरणार आहे. यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच केरळमध्ये येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. गेल्या आठवडय़ात वातावरणात मोठे बदल झाले असून, मान्सूनच्या हालचाली अंदमानात दिसण्यास सुरुवात होत आहे.

यंदा फेब्रुवारीपासूनच कडक उन्हाळा राज्यात सुरू झाला. थंडी कमी अन् ऊन जास्त, असे वातावरण होते. त्यामुळे सुमारे शंभर वर्षातील सर्वांत उष्ण फेब्रुवारी ठरला. त्यापाठोपाठ मार्च आणि एप्रिलमध्येही तीच स्थिती आहे. मार्चमध्ये कमाल तापमानाचा पारा 40 अंशांवर गेला तसेच सरासरी पाऊस कमीच झाला. त्यामुळे मार्च महिना पूर्ण उष्ण ठरला.एप्रिलची सुरुवातही खूप कडक उष्ण झळांनी झाली. गत अनेक वर्षांतील यंदाचा एप्रिल उष्ण ठरत आहे. हे वातावरण मान्सूनच्या तयारीसाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक असे आहे.

हवामानशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा खूप कडक उन्हाळा आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही जास्त आहे. ढगांची निर्मिती वेगाने होते असून, सॅटेलाइट इमेज पाहिल्यावर असे लक्षात येते की, मान्सून आपल्या तयारीला लागला आहे. संपूर्ण देशाला ढगांनी वेढले आहे. बाष्प मोठ्या प्रमाणावर तयार होत असून, ते आपल्या देशाकडे येत आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.

शास्त्रज्ञांनी सांगितले की, मान्सूनच्या हालचाली या समुद्रातील पाण्याचे तापमान, वार्‍याची दिशा, हवेचे दाब यावर अवलंबून असतात. सध्या अरबी समुद्रातील तापमान 31, तर हिंदी महासागराचे तापमान 30 अंश सेल्सिअस इतके आहे. पाणी खूप तापल्याने वेगाने बाष्पीभवन होत आहे. हवेचे दाब सध्या समुद्रावर 1005 ते 1010 हेक्टा पास्कल इतके आहेत.

देशात हवेचे दाब 1005 ते 1008 दरम्यान आहेत. देशातील दाब कमी झाले की वारे समुद्राकडून देशाच्या दिशेने वाहू लागतात. अंदमानात मान्सून हा तयारीला यंदा लवकर लागला आहे. काही दिवसांतच त्याच्या हालचाली सॅटेलाइट इमेजवर दिसण्याची शक्यता आहे.

यंदा एप्रिलमध्ये पारा 43 ते 44 अंशांवर गेल्याने समुद्रातील पाणी वेगाने तापले. परिणामी, बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढल्याने देशाभोवती सर्व बाजूंनी बाष्प मोठ्या प्रमाणावर तयार झाल्याचे सॅटेलाइट इमेजमध्ये दिसत आहे.

” यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता जास्त आहे. कारण, सर्व लक्षणे अनुकूल दिसत आहेत. कडक उन्हाळ्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने बाष्प वेगाने तयार होऊन मान्सूनपूर्व पावसाची तयारी सुरू झाली आहे. तसेच हवेचा दाब, वार्‍याची दिशा अन् समुद्राचे तापमान, ही मान्सूनसाठी पोषक असणारी लक्षणे यंदा अनुकूल दिसत आहेत. त्यामुळे मान्सून यंदा वेळेआधीच केरळमध्ये दाखल होऊ शकेल, अशी शक्यता आहे.” 

– डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ, पुणे

Tatkal Booking Time Changed: रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंग वेळेत बदल होणार?

   Follow us on        
Tatkal ticket timing changed: रेल्वेच्या तात्काळ आरक्षण वेळेत बदल झाला असल्याची माहिती सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित viral होत आहे. या माहिती प्रमाणे एसी श्रेणीसाठी (AC Classes) तात्काळ आरक्षणासाठी सध्याची वेळ जी सकाळी, १० वाजता आहे ती सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. तर नॉन-एसी क्लास म्हणजे स्लीपर, सेकंड सीटिंग श्रेणीच्या आरक्षणाची सध्याची वेळ जी सकाळी ११ वाजताची आहे ती बदलून दुपारी १२ वाजता करण्यात येणार आहे. या माहितीप्रमाणे येत्या दिनांक १५ एप्रिल पासून हा बदल अंमलात आणला जाणार आहे.
मात्र समाज माध्यमावर व्हायरल होत असलेला हा संदेश खोटा असल्याची माहिती समोर येत आहे. Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) ने तात्काळ आरक्षणात असा कोणताही बदल करण्यात येणार नसून हा संदेश फेक असल्याचे जाहीर केले आहे.  “एक्स”  वरील अधिकृत खात्यावर या आशयाची पोस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MP Salary Hike: खासदारांचा पगार वाढला; इतर भत्ते आणि पेन्शनमध्येही कमालीची वाढ

   Follow us on        

नवी दिल्ली: सरकारने लोकसभा आणि राज्यसभा खासदारांच्या पगारात वाढ केली आहे. खासदारांच्या पगारासोबतच इतर भत्ते आणि माजी खासदारांच्या पेन्शनमध्ये पण वाढ झाली आहे. ही वाढ १ एप्रिल २०२३ पासून लागू झाली आहे. त्यामुळे खासदारांना जबरदस्त लाभ मिळणार आहे.

संसदीय कामकाज मंत्रालयाने सोमवारी एक नोटिफिकेशन काढले. या नोटिफिकेशननुसार, लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचा पगार १ लाख रुपयांवरून १.२४ लाख रुपये प्रति महिना झाला आहे. त्याचबरोबर, दैनिक भत्ता २००० रुपयांवरून २,५०० रुपये झाला आहे.

खासदारांच्या पगारात वाढ झाली आहे, त्याचप्रमाणे माजी खासदारांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये पण वाढ झाली आहे. पूर्वी माजी खासदारांना २५,००० रुपये पेन्शन मिळत होती, ती आता ३१,००० रुपये प्रति महिना मिळणार आहे. ज्या माजी खासदारांनी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा दिली आहे, त्यांना मिळणारी जास्तीची पेन्शन २,००० रुपयांवरून २,५०० रुपये झाली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. याआधी,एप्रिल २०१८ मध्ये खासदारांच्या पगार आणि भत्त्यांमध्ये बदल करण्यात आला होता.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search