Category Archives: महाराष्ट्र

मोठी बातमी: रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती

   Follow us on        

मुंबई:रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्त केलेल्या आदिती तटकरेंच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. फलोत्पादन व रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांच्या विरोधानंतर ही स्थगिती देण्यात आली आहे. मंत्रीपदावर वर्णी लागल्यानंतर भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी केली होती. जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजप आमदारांनी रायगडचे पालकमंत्री म्हणून फलोत्पादन व रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांची निवड करण्याची मागणी केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद आले आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन, भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे. तरीही तटकरे यांना पद मिळाले हे विशेष मानले जाते. हा निर्णय मनाला पटण्यासारखा नाही, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी व्यक्त केली. त्यांच्या समर्थकांनी महामार्गावरील वाहतूक रोखून या नियुक्तीवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या पाश्र्वभूमीवर ही स्थगिती देण्यात आली असल्याचे समजते.

गिरीश महाजनांच्या नियुक्तीलाही स्थगिती
गोगावलेंप्रमाणेच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पालकमंत्रीपद मिळालेले नाही. दादा भुसे हे पुन्हा एकदा नाशिकचे पालकमंत्री होण्यासाठी प्रयत्नशील होते, परंतु हे पद जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले होते. या दोन्ही जिल्ह्यांतील महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर दोन्ही जिल्ह्यांतील पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे

 

७६ व्या प्रजासत्ताक दिनी सकाळी ९.१५ वाजता होणार मुख्य शासकीय समारंभ; जिल्हानिहाय ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर

मुंबई, दि. १९: भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असे राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

मुंबई येथील मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल यांच्या हस्ते व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क दादर मुंबई येथे ध्वजारोहण व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल. विभागीय आणि जिल्हा स्तरावर पुढे दर्शविल्याप्रमाणे मंत्री अथवा राज्यमंत्री ध्वजारोहण करतील.

  • ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे,
  • पुणे – उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार,
  •  नागपूर – मंत्री सर्वश्री चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे,
  • अहिल्यानगर – राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील,
  • वाशिम – हसन सकीना मियालाल मुश्रीफ,
  • सांगली – चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील,
  • नाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजन,
  • पालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक,
  • जळगाव- गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील,
  • यवतमाळ- संजय प्रमिला दुलीचंद राठोड,
  • मुंबई शहर- मंगलप्रभात प्रेमकवर गुमनमल लोढा,
  • मुंबई उपनगर- ॲड.आशिष मीनल बाबाजी शेलार,
  • रत्नागिरी- उदय स्वरूपा रवींद्र सामंत,
  • धुळे- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल,
  • जालना- श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे,
  • नांदेड- अतुल लीलावती मोरेश्वर सावे,
  • चंद्रपूर- अशोक जनाबाई रामाजी उईके,
  • सातारा- शंभुराज विजया देवी शिवाजीराव देसाई,
  • बीड- दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे,
  • रायगड- आदिती वरदा सुनील तटकरे,
  • लातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले,
  • नंदुरबार- ॲङ माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे,
  • सोलापूर- जयकुमार कमल भगवानराव गोरे,
  • हिंगोली- नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ,
  • भंडारा- संजय सुशीला वामन सावकारे,
  • छत्रपती संभाजीनगर संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट,
  • धाराशिव- प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक,
  • बुलढाणा- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील),
  • सिंधुदुर्ग- नितेश नीलम नारायण राणे,
  • अकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर,
  • गोंदिया- बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील,
  • कोल्हापूर- प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर,
  • गडचिरोली- ॲड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल,
  • वर्धा- पंकज कांचन राजेश भोयर,
  • परभणी- श्रीमती मेघना दीपक साकोरे – बोर्डीकर
  • अमरावती- इंद्रनील अनिता मनोहर नाईक.

राष्ट्रध्वजारोहण करणारे मंत्री अथवा राज्यमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रम स्थळी उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी तसेच इतर विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. संबंधित प्रांत अधिकारी व तहसीलदार हे अनुक्रमे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालयी ध्वजारोहण समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान स्वीकारतील.

राज्यात वरील दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत, असेही कळविण्यात आले आहे.

राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी-१०९१/३०, दिनांक २ मार्च १९९१ तसेच क्रमांक एफएलजी १०९१(२)/३०, दिनांक ५ डिसेंबर १०९१ तसेच क्रमांक एफएलजी १०९८/ ध्वजसंहिता/३०, दिनांक ११ मार्च १०९८ अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. याप्रसंगी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित रहावे. तसेच उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोशाख प्रजासत्ताक दिन समारंभप्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई- वडील यांना समारंभास निमंत्रित करावे. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना या परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शिवशाही बसला भीषण आग

   Follow us on        

पुणे : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर शिवशाही बसला भीषण आग लागली आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर बसने अचानक पेट घेतल्याने मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. शिवशाही बसमध्ये १२ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. चालकाने प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाशांना खाली उतरवले.सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. किंवा कोणीही जखमी झालेलं नाही.

या घटनेमुळे काही वेळ मुंबईकडे जाणारी लेन वाहतुकीसाठी ठप्प झाली होती. अग्निशमन दलाने तात्काळ येऊन आग विझवली आहे. मुंबईच्या दिशेने वाहतूक पूर्ववत झाली आहे. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांना आग लागण्याच्या घटना वाढतच आहेत.

मोठी बातमी | जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नावे जाहीर; यादी ईथे वाचा

   Follow us on        

Maharashtra Guardian Minister List : राज्याच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याच्या जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आले आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहरचं पालकमंत्रिपद असणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्हा आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे.

कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद कोणाकडे? वाचा यादी

क्र. जिल्हा – पालकमंत्रिपद

१ गडचिरोली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सह.आशिष जयस्वाल

२ ठाणे, मुंबई शहर -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

३ पुणे, बीड- उपमुख्यमंत्री अजित पवार

४ नागपूर, अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे

५ अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील

६ नाशिक – गिरीश महाजन

७ वाशिम – हसन मुश्रीफ

८ सांगली- चंद्रकांत पाटील

९ जळगाव – गुलाबराव पाटील

१० यवतमाळ – संजय राठोड

११ मुंबई उपनगर -आशिष शेलार व सह.मंगलप्रभात लोढा

१२ रत्नागिरी – उदय सामंत

१३ धुळे – जयकुमार रावल

१४ जालना – पंकजा मुंडे

१५ नांदेड – अतुल सावे

१६ चंद्रपूर – अशोक ऊईके

१७ सातारा – शंभुराजे देसाई

१८ रायगड – अदिती तटकरे

१९ सिंधुदुर्ग – नितेश राणे

२० लातूर – शिवेंद्रसिंहराजे भोसले

२१ नंदुरबार – माणिकराव कोकाटे

२२ सोलापूर – जयकुमार गोरे

२३ हिंगोली – नरहरी झिरवाळ

२४ भंडारा – संजय सावकारे

२५ छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट

२६ धाराशीव – प्रताप सरनाईक

२७ बुलढाणा – मकरंद जाधव

२८ अकोला – आकाश फुंडकर

२९ गोंदिया – बाबासाहेब पाटील

३० कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह, माधुरी मिसाळ

३१ वर्धा – पंकज भोयर

३२ परभणी – मेघना बोर्डीकर

३३ पालघर – गणेश नाईक

 

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांचे विभाजन होऊन दोन नवीन जिल्हे अस्तित्वात येणार? या बातमीत किती तथ्य?

   Follow us on        

मुंबई: प्रशासन सुलभ होण्याच्या दृष्टीने आणि स्थानिक विकासाला गती मिळण्यासाठी महाराष्ट्रातील सध्या अस्तित्वात असलेल्या जिल्ह्यांतून नवीन 21 जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. येत्या २६ जानेवारी रोजी या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे अशा आशयाची बातमी समाज माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मात्र ही बातमी खरी नसून अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती समोर येत आहे.

या बातमी नुसार राज्यात नवीन २१ जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी या २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या अस्तित्वात असलेल्या ३५ जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार होणार आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून मंडणगड हा स्वतंत्र जिल्हा घोषित होण्याची शक्यता आहे. तर रायगड जिल्हय़ाचे विभाजन होऊन महाड हा जिल्हा अस्तित्वात येणार आहे. २६ जानेवारीला या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मात्र या बातमीला कोणताही आधार नसून जुन्या संदर्भाचा वापर करून ही फेक बातमी पसरविण्यात येत आहे.

 

Cricket: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर

   Follow us on        

Kokanai online : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी 18 जानेवारी (शनिवार) मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. पत्रकार परिषदेत तो उपस्थित होता. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी ‘हायब्रिड मॉडेल’ अंतर्गत पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळवली जाणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी कराची येथे यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल. तर भारतीय संघ 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळेल.

भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यासह स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे आगामी आयसीसी स्पर्धेत सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाही.

भारतीय संघ पुढीलप्रमाणे

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह/हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.

दिल्लीत खेलरत्न पुरस्कारांचे वितरण; कोण-कोणत्या खेळाडूंना भेटला सन्मान? यादी ईथे वाचा

   Follow us on        

नवी दिल्ली: राष्ट्रपती भवनात आयोजित राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेमबाज मनू भाकर आणि बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित केले. मनू-गुकेश यांच्या व्यतिरिक्त भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा-ॲथलीट प्रवीण कुमार यांनाही क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल समान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याशिवाय राष्ट्रपती मुर्मू यांनी अर्जुन पुरस्कार (आजीवन), राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित आणि लाइटटाइम श्रेणी) आणि मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) ट्रॉफी विजेत्यांनाही सन्मानित केले.

भारताला पहिले गोल्ड मेडल मिळवून देणारे पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळे आणि पॅरा ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता सचिन खिलारी यांना मानाचा अर्जुन पुरस्कारदेण्यात आला, तसेच जागतिक दर्जाचे भारतीय खेळाडू घडविणाऱ्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार आज नवी दिल्ली येथे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या खेळाडूंना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला

1. डी गुकेश (बुद्धिबळ)

2. हरमनप्रीत सिंग (हॉकी)

3. प्रवीण कुमार (पॅरा ॲथलेटिक्स)

४. मनू भाकर (शूटिंग)

 

यांना अर्जुन पुरस्कार मिळाला

1. ज्योती याराजी (ॲथलेटिक्स)

2. अन्नू राणी (ॲथलेटिक्स)

3. नीतू (बॉक्सिंग)

4. स्वीटी (बॉक्सिंग)

5. वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)

6. सलीमा टेटे (हॉकी)

7. अभिषेक (हॉकी)

8. संजय (हॉकी)

9. जर्मनप्रीत सिंग (हॉकी)

10. सुखजित सिंग (हॉकी)

11. राकेश कुमार (पॅरा तिरंदाजी)

12. प्रीती पाल (पॅरा ॲथलेटिक्स)

13. जीवनजी दीप्ती (पॅरा ॲथलेटिक्स)

14. अजित सिंग (पॅरा ॲथलेटिक्स)

15. सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा ॲथलेटिक्स)

16. धरमबीर (पॅरा ॲथलेटिक्स)

17. प्रणव सुरमा (पॅरा ॲथलेटिक्स)

18. एच होकातो सेमा (पॅरा ॲथलेटिक्स)

19. सिमरन जी (पॅरा ॲथलेटिक्स)

20. नवदीप (पॅरा ॲथलेटिक्स)

21. नितेश कुमार (पॅरा बॅडमिंटन)

22. तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन)

23. नित्य श्री सुमती सिवन (पॅरा बॅडमिंटन)

24. मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)

25. कपिल परमार (पॅरा ज्युदो)

26. मोना अग्रवाल (पॅरा नेमबाजी)

27. रुबिना फ्रान्सिस (पॅरा नेमबाजी)

28. स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग)

29. सरबज्योत सिंग (शूटिंग)

30. अभय सिंग (स्क्वॉश)

31. साजन प्रकाश (पोहणे)

32. अमन (कुस्ती)

 

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार (आजीवन श्रेणी)

  • सुचा सिंह (ऍथलेटिक्स)
  • मुरलीकांत राजाराम पेटकर (पॅरा-स्विमिंग)

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार

  • सुभाष राणा (पॅरा-शूटिंग)
  • दीपाली देशपांडे (शूटिंग)
  • संदीप सांगवान (हॉकी)

 

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन श्रेणी)

  • एस मुरलीधरन (बॅडमिंटन)
  • अरमांडो अग्नेलो कोलाको (फुटबॉल)

 

 

“खोटा प्रचार करणाऱ्या सरकारची पोलखोल करणार”… शक्तिपीठ महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीचा इशारा

   Follow us on        

कोल्हापूर: येत्या 24 जानेवारी रोजी शक्तिपीठ महामार्ग जाणाऱ्या बारा जिल्ह्यातून शेतकरी हे आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे आंदोलन एक इशारा आंदोलन असेल. महाराष्ट्र सरकारने शपथविधी आटोपल्या आटोपल्यानंतर युद्ध पातळीवर शक्तिपीठ महामार्ग रेटण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी व सरकारचा खोटारडेपणा उघडा पाडण्यासाठी 24 जानेवारी रोजी या 12 जिल्ह्यातून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शक्तीपीठ महामार्ग बाधित 12 पैकी दहा जिल्ह्यांतील आंदोलनाच्या प्रतिनिधींची ऑनलाईन मोडवर मीटिंग दिनांक 16 जानेवारी रोजी संध्याकाळी पार पडली. यामध्ये सरकारने उचललेल्या पावलांबद्दल सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये बोलताना संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले,” महाराष्ट्रातील महायुती सरकार सरकार हे मोठे पसरवून निवडून आले आहे. या निवडणुकीनंतर देखील शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी ते या महामार्गास फक्त कोल्हापुरातून विरोध आहे व इतर जिल्ह्यातून विरोध नाही असे खोटे नेरिटीव्ह वापरत आहेत. हे सर्व ज्ञात आहे की इतर जिल्ह्यांमध्ये देखील आंदोलन सुरू होती व आता देखील आहेत. या सरकारला कंत्राटदारांचे भले करण्यासाठी व उद्योगपतींना नैसर्गिक साधन संपत्ती खनिज संपत्ती लुटी साठी हा महामार्ग म्हणजे रेड कार्पेट आहे. पर्यावरण विभागांनी ग्राउंड सर्वे करणे गरजेचे असताना एक-दोन दिवसांमध्ये या महामार्गाच्या प्रस्तावास कशी मंजुरी देते. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला तसेच पर्यावरण विरोधी शेतकरी विरोधी व जनविरोधी शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी जर शासन जिद्दीस पेटले असेल तर शेतकरी देखील छातीचा कोट करून घाव झलक लढायला तयार आहे.

नांदेडचे गोविंद घाटोळ म्हणाले,”मराठवाडा मधील सर्व जिल्हे संघर्ष समितीने पिंजून काढून शेतकऱ्यांना त्यांच्यावरती होणारा अन्याय अन्यायकारक भूसंपादनाची प्रक्रिया सांगून शेतकऱ्यास लढण्यास सज्ज बनवू.

लातूरचे गजेंद्र येळकर म्हणाले,” स्वतः महायुतीतील अनेक आमदार व खासदार या शक्तिपीठ महामार्ग विरोधात आंदोलनात उतरले किंवा त्यांनी भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूने मांडली आहे. त्यामुळे हे सरकार आपल्याच आमदार खासदारांचे ऐकत नाही. हे सरकार काही कारभारी मंडळींकडून आदानी अंबानींसाठी चालवले जाते.

यावेळी पुढील आठवड्यात मुंबईमध्ये बैठक घेऊन प्रसार माध्यमांसमोर सरकारच्या छोट्या करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या मीटिंगमध्ये गिरीश फोंडे,गोविंद घाटोळ, गजेंद्र येळकर,सतीश कुलकर्णी,शांतीभूषण कच्छवे विजयराव बेले,शिवराज राऊत,विठ्ठलराव गरुड,लालासाहेब शिंदे,अभिजीत देशमुख,गणेश घोडके,सुभाष मोरलवार,गजानन तीमेवार, केतन सारंग,भारत महाजन, सुदर्शन पडवळ, संभाजी फरताळे ,अनिल बेळे ,केदारनाथ बिडवे,श्रीधर माने संतोष ब्याळे, सतीशराव घाडगे सुनील भोसले,मेहताब पठाण,रवी मगर ,परमेश्वर मोठे, बसवराज झुंजारे,नानासाहेब चव्हाण रामेश्वर चव्हाण,उमेश एडके प्रकाश पाटील,केदारनाथ बिडवे,गणेश माने,सुरेशराव राजापूरकर,नवघरे बाबुळगावकर हे विविध जिल्ह्याचे शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यातील बिबट्यांची ‘नसबंदी’ होणार

   Follow us on            Follow us on        

मुंबई : राज्यातील बिबट्यांची वाढती संख्या आणि बिबट्यांचे मानवी वस्तींवर होणारे हल्ले रोखण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्या नसबंदीचा पर्याय पुढे आणला आहे. बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठवला जाईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.

दरम्यान, चालू वर्षात १३ वाघांचा मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी दिली. वन मंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यानंतर गणेश नाईक यांनी मंत्रालयात पहिलीच पत्रकार परिषद घेतली. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी चार दिवसांपूर्वी बिबट्यांच्या नसबंदीबाबत आपल्याला पत्र दिले. या नसबंदीसाठी केंद्र सरकारची परवानगी लागते. सध्या राज्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

NHAI बांधणार 30 किमी लांबीचा ‘एक्सप्रेस वे’; मुंबई ते गोवा अंतर अर्ध्या तासाने कमी होणार….

   Follow us on        

मुंबई: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) नवीन एक्सप्रेस वे बांधणार आहे. हा द्रुतगती मार्ग जेएनपीटीजवळील पागोटे ते जुन्या पुणे महामार्गावरील चौक जंक्शनपर्यंत 30 किमी लांबीचा असेल. या प्रकल्पासाठी अंदाजे 3,700 कोटी रुपये खर्च येणार असून 30 महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

यामुळे एमटीएचएल (अटल सेतू) ते गोव्याला जाणाऱ्या महामार्गापर्यंतचा प्रवास अवघ्या 20-30 मिनिटांत पूर्ण होणार आहे. या मार्गामुळे मुंबई ते गोवा या महामार्गावरील प्रवासाचा वेळ कमी होणार आहेहा द्रुतगती मार्ग उरण-चिरनेर महामार्ग, गोवा महामार्ग आणि पुणे द्रुतगती महामार्ग अशा अनेक महत्त्वाच्या महामार्गांना जोडेल. भविष्यात हा महामार्ग अलिबाग-विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर, मुरबाड-जुन्नर महामार्ग, समृद्धी द्रुतगती महामार्ग आणि नाशिक महामार्गाशी देखील जोडला जाईल.

तसेच तो वडोदरा-मुंबई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेशी जोडला जाणार आहे. यामुळे बंदर आणि विमानतळ परिसरात मालवाहतूक सुलभ होईल आणि जेएनपीटी, गोवा, पुणे आणि मुंबई दरम्यानचा प्रवास वेळही कमी होईहा नवीन एक्स्प्रेस वे अटल सेतूच्या शिवडी टोकाला असलेल्या कोस्टल रोडला आणि वरळीजवळील सी लिंकला जोडेल. त्याचा पुढील विस्तार अलिबाग-विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर, मुरबाड-जुन्नर महामार्ग, समृद्धी द्रुतगती महामार्ग आणि पडघाजवळील नाशिक महामार्ग (मोरबे, कर्जत, शेलू, वाघणी आणि बदलापूर मार्गे) यांना जोडतील. हा दिल्ली-मुंबई कॉरिडॉरच्या वडोदरा-मुंबई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचाही भाग असेल.NHAI लवकरच या कामाचा कार्यादेश जारी करुन, येत्या सात महिन्यांत बांधकाम सुरू होण्याची अपेक्षा आहे. या कॉरिडॉरमुळे 10,000 हून अधिक वाहनांसाठी वाहतूक सुरळीत होणार आहे. यामुळे मल्टी-एक्सल कंटेनर ट्रक यांचा प्रवास सुलभ होणार आहे.

नव्या एक्स्प्रेस वेमुळे रस्त्यांवरील गर्दी कमी होणार असून प्रवासाचा वेळही वाचणार आहे, असे NHAI च्या प्रादेशिक व्यवस्थापक अंशुमाली श्रीवास्तव यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search