Viral Video:रेल्वेने प्रवास करताना अनेकदा लहान मुले चटपटीत अशी भेळीची मागणी करतात. कांदा, मिरची, मसाला, चिवडा, शेव, कुरमुरे टाकून बनवलेली भेळ त्यांना हवी हवीशी वाटते. मात्र तुम्ही अशा प्रकारे रेल्वेस्थानकावरील दुकानातील चटपटीत भेळ खात असाल, तर व्हायरल होणारा हा व्हिडीओ तुम्ही पाहाच. कारण- या व्हिडीओतून असा काही किळसवाणा प्रकार दाखविला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.
ही बातमी वाचल्यानंतर तुम्ही कधीच रेल्वेमध्ये विकायला येणारी भेळ खाणार नाही. कारण या प्रवासात तुम्ही जी भेळ आवडीने खाता ती कशी बनवली जातं, याचं एक उदाहरण समोर आलं आहे. याचा किळसवाना व्हिडीओ पाहून तुमचीही झोप उडेल.रेल्वेवर तयार होणाऱ्या अन्नातून अनेकांना बाधा झाल्याचे समोर आले आहे. अतिशय अस्वच्छ पद्धतीने व गलिच्छ प्रकाराने खाद्य पदार्थ तयार केले जातात. सध्या रेल्वेमधील भेळ विक्रेत्याचा एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यानं भेळमध्ये असणारा कांदा चक्क टॉयलेटच्या बाजूला जमीनीवर कापला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
मुंबई:मराठी भाषेला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा भेटला असताना तिची खुद्द महाराष्ट्रातच अवहेलना होण्याचे प्रकार घडताना दिसत आहे. असाच एक प्रकार मुंबई उपनगरीय रेल्वेच्या नालासोपारा स्थानकावर घडला आहे.
एका हिंदी भाषिक टीसीने एका प्रवाशांकडून तो प्रवासी यापुढे मराठी भाषेचा आग्रह धरणार नाही असे लिहून घेतल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रमाणावर व्हायरल होत आहे. अमित पाटील या नावाच्या प्रवाशाला नालासोपारा रेल्वेस्थानकावर कर्तव्यावर असलेल्या रितेश मोरया नावाच्या एका टीसीने तिकीट दाखवण्यास सांगितले. मात्र त्या प्रवाशाने आपल्याला हिंदी भाषा समजत नसल्याने मराठीत बोला असा आग्रह धरला. मात्र त्या तिकीट तपासनीसाने मराठीत बोलण्यास नकार दिला आणि बाचाबाची केली, एवढेच नव्हे तर त्याने तेथे कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्या प्रवाशाकडून यापुढे तो मराठीचा आग्रह धरणार नाही असे लिहून घेतले.
काय लिहून घेतले?
“नाव- अमित पाटील…..रितेश मोरया मला नालासोपारा स्टेशन वर भेटले असता मला तिकीट दाखवायला सांगितले. मी त्यांना बोललो कि मला स्थानिक भाषा येते त्यामुळे माझ्याशी मराठीत बोला, हिंदी मला फारशी येत नाही. तर त्यांनी मराठी भाषा बोलण्यास नकार दिला. यापुढे मी मराठी भाषा बोलण्यास प्रेशर देणार नाही.”
नालासोपारा स्थानकावर @WesternRly च्या तिकीट तपासनीस रितेश मोर्याची भाषा एक ‘स्थानिक प्रवाशाला’ समजली नाही, मराठी बोला म्हटल्यावर मोर्याने गुंडागर्दी केली, पोलीस बोलावले धमकावून मराठीची मागणी करणार नाही लिहून घेतले
मराठी राज्यात दंडेलशाही का? @drmbct@grpmumbai@AshwiniVaishnaw
— मराठी एकीकरण समिती – Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) November 3, 2024
मुंबई: सध्या सणासुदीचे दिवस असल्याने बहुतेकजण नातेवाईकांकडे जायला बाहेर पडत आहेत. मुंबई लोकल गाड्यांतून अनेक ठिकाणी प्रवास करायचा असल्यास पुन्हा पुन्हा तिकीट काढणे गैरसोयीचे असते. मात्र यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने एक सुविधा दिली आहे. मुंबईमध्ये पर्यटनासाठी किंवा आपल्या कामासाठी जर तुम्हाला मोजक्या दिवसांसाठी फिरायचे असेल तर उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवर खास ‘पर्यटन तिकीट’ ( Tourist Tickets ) विकत मिळते. या तिकीटांद्वारे लोकल ट्रेनच्या सेंकडक्लासमधून मुंबईत मध्य रेल्वेवर Central Railway सीएसएमटी ते कर्जत-कसारा-पनवेल आणि पश्चिम रेल्वेवर Western Railway चर्चगेट ते डहाणूपर्यंत कितीही वेळा प्रवास करण्याची सोय आहे.
मुंबईत नवख्या आलेल्या व्यक्तींकडे जर रेल्वेचा पास नसेल तर त्यांच्यासाठी एक रेल्वेची सुविधा आहे. अशा व्यक्तींना जर मुंबई फिरायची असेल किंवा काही कामानिमित्त विविध ठीकाणांना भेट द्यायची असेल किंवा प्रवास करायचा असेल तर उपनगरीय रेल्वेची ‘पर्यटन तिकीट’ ही सुविधा अत्यंत उपयोगाची आहे. त्यामुळे वारंवार तिकीट काढण्याची काही गरज उरत नाही. शिवाय रेल्वेचा पास नसलेल्या व्यक्तींसाठी रेल्वे मोजक्या दिवसांच्या मुंबई आणि उपनगरातील प्रवासासाठी हे ‘पर्यटन तिकीट’ अत्यंत उपयुक्त आहे.
किंमत आणि वैधता…
मुंबईत पर्यटन करणाऱ्यांसाठी पर्यटन तिकीट विकत मिळते. एक दिवसाचे तिकीट 80 रूपयांना तिकीट खिडक्यांवर विकत मिळते. परंतू या तिकीटांतून रात्री 12 वाजेपर्यंतच प्रवास करता येतो. तसेच केवळ रेल्वेच्या द्वितीय दर्जातूनच प्रवा करता येतो. तसेच हे पर्यटन तिकीट एक दिवसाचे ( 80 रूपये ), तीन दिवसाचे ( साधारण 170 रूपये ) आणि पाच दिवसांचे ( 210 रूपये ) अशा किंमतीत ही पर्यटन तिकीटे मिळतात. आपल्याला ज्या तारखे पासून प्रवास करायचा असेल त्या तारखेपासूनही आगाऊ ही तिकीटे काढण्याची देखील सोय उपलब्ध असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.
मुंबई:- रायझिंग सन क्रीडा उत्सव मंडळ (रजि.) चारकोप सेक्टर एक यांच्या वतीने आयोजित केलेल्या वार्षिक उत्सवात क्रिकेट, होम मिनिस्टर, वेश भूषा, चित्रकला, पाक कला स्पर्धा, कोजागिरी, रास गरबा – दांडिया तसेच श्री सत्यनारायणाची महापूजा इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम आर.एस.सी. १५ मधील बाळ-गोपाळ, बंधू – भगिनी व रहिवाश्यांनी जल्लोषात व उत्साहात साजरा केला. उत्सवा दरम्यान रस्ता क्रमांक १५ विद्युत रोषणाईने झगमगला होता.
क्रिकेट स्पर्धेच्या अटीतटीच्या लढतीत साईकुंज संस्थेनेच्या महिला व पुरुष या दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळ करत विजेते पद पटकविले. या स्पर्धेचे अप्रतिम नियोजन केतन धाटावकर व गिरीश दहीबावकर यांनी केले होते.
महिलांचा आवडता कार्यक्रम “होम मिनिस्टर” म्हणजेच खेळ पैठणीचा पाऊस असूनही खूपच रंगतदार ठरला. आपल्या खास शैलीत निवेदक प्रशांत प्रिंदावनकर आणि सुधाकर वस्त यांनी एकामागून एक रंगतदार खेळांचे सादरीकरण करून खेळाडूंसोबतच प्रेक्षकांनादेखील या खेळांची भुरळ पाडली. या स्पर्धेच्या विजेत्या रंगावली संस्थेतील श्वेता सतिश कदम यांना पैठणी भेट देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आपला माणूस भूषण अनंत विचारे यांनी पैठणी, सोन्याची नथ, स्मार्ट घड्याळे आणि एअर पौडस्, तसेच सहभगी भगिनिंस पारितोषिके देवून मंडळास मोलाचे सहकार्य केले.
सत्यनारायण पूजा दिनी बाळ गोपलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्यात १३६ स्पर्धकांनी भाग घेऊन स्पर्धेत चुरस निर्माण केली. तसेच महिलांसाठी आयोजलेल्या पाककला स्पर्धेत देखील अनेक भगिनींनी भाग घेवून एकापेक्षा एक सरस पदार्थांची मेजवानी सादर केली. साई कुंज संस्थेतील सुजाता नाईक यांच्या ‘कडबू’ या पारंपरिक पदार्थाने बाजी मारून प्रथम क्रमांक पटकावला. डी.जे.जग्गु यांच्या तालावर रास – गरब्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यात विविध वेशभूषा करून अबाल वृद्धांनी सहभाग घेवून आनंद व्यक्त केला.
उत्सव मंडळाच्या वतीने विभागात कला, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय व शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा मंडळाचा मानस आहे असे राजेश सोरप अध्यक्ष व अमित पालांडे, चिटणीस यांनी सांगितले.
कार्यक्रमांची सांगता भूषण विचारे, निखिल गुढेकर, राजन निकम , दिनेश साळवी, सुधाकर कदम या व इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरण करून करण्यात आली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष राजेश सोरप, उपाध्यक्ष सुधाकर वस्त, चिटणीस अमित पालांडे, उपचिटणीस राहूल केदारी, खजिनदार सुनीत कदम, उपखजिनदार निलेश धावडे तसेच प्रशांत प्रिदांवनकर, हरीश सूर्यवंशी, राजेश सोनवणे प्रवीण सावंत, कुणाल विश्वकर्मा, विशाल पांड्या, राजू परब, चेतन चौलकर, डॉक्टर मकरंद गावडे, कमलाकर सक्रे या व इतर अनेक कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत प्रिदांवनकर यांनी केले. तसेच सर्व रहिवाशी, मान्यवर, हितचिंतक, देणगीदार यांच्ये आभार सुधाकर वस्त यांनी व्यक्त केले.
संपादकीय: वांद्रे टर्मिनस येथे काल पहाटे गाडीमध्ये चढताना चेंगराचेंगरी होऊन प्रवासी गंभीररीत्या जखमी होण्याचा प्रकार घडला होता. घटनास्थळी पडलेला रक्ताचा सडा घटनेचे गांभीर्य दाखवते.
वांद्रे-गोरखपूर एक्सप्रेस पूर्ण अनारक्षित स्वरुपाची होती. या गाडीच्या आसन क्षमतेपेक्षा तिकीटविक्री झाली होती. गाडी प्लॅटफॉर्म येत असताना जागा पकडण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली. या वेळी चेंगराचेंगरी होऊन 9 प्रवासी जखमी झाले. त्यात 2 दोघे जण गंभीररीत्या जखमी झाले.
या घटनेनंतर या घटनेस जबाबदार कोण? कारणे काय? हे प्रश्न उठले. अन्य कारणे अनेक असतीलच मात्र मागणी – पुरवठा यातील तफावत हेच या घटने मागचे मुख्य कारण म्हणता येईल. देशातील प्रवाशांची मागणी कोणती आहे हेच ओळखणे प्रशासनाला जमले नाही; किंवा ते जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. देशातील प्रवाशांचा मोठा गट सामान्य आणि गरीब या प्रकारात मोडतो. या प्रवाशांना एसी आणि प्रिमीयम श्रेणीतून प्रवास प्रवास करणे परवडत नाही. एकतर जनरल नाहीतर स्लीपर या श्रेणीची तिकिटे त्यांना परवडतात. त्यामुळे प्रीमियम वंदे भारत, तेजस, राजधानी या सारख्या पूर्णपणे प्रिमीयम त्यांच्यासाठी नाहीच आहेत. आता राहिल्या बाकीच्या रेग्युलर गाड्या. या गाड्यांना फक्त 2 ते 4 जनरल डबे जोडलेले असतात, तर साधारणपणे 8 ते 10 सेकंड स्लीपर डबे या प्रवाशांसाठी असतात. ही संरचना प्रत्येक गाडीपरत्वे कमी अधिक असल्याने आपण ती आपण साधारणपणे 50% पकडून चालू. देशातील मोठ्या प्रवासगटाला ही क्षमता नक्किच कमी आहे.
रेल्वे प्रशासनाने अलीकडेच स्लीपर श्रेणीच्या डब्यांतून प्रवास करणाऱ्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना आरक्षित डब्यातून प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कालची घटना याच निर्णयाचा एक परीणाम आहे. यापूर्वी प्रवाशांना वेटिंग तिकीटावरून स्लीपर डब्यांतून प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध होता. तो आता नाहीसा झाल्याने जनरल डब्यातील गर्दी वाढली. प्रशासनाने यावर तोडगा न काढल्यास, हे चित्र असेच राहिल्यास भविष्यातही अशा घटना घडतच राहणार.
रेल्वे प्रशासन सध्या उत्पन्न वाढीवर भर देताना दिसत आहे. त्यामुळे वंदे भारतसारख्या प्रिमीयम गाड्या रूळांवर आणण्यास भर देत आहे. तर देशातील लोकप्रतिनिधींना आधुनिक आणि प्रगत भारत घडवायचा आहे. मात्र या आधुनिक भारतात वंदे भारत एक्सप्रेस रिकाम्या जात असतिल आणि सामान्य प्रवासी असे चिरडले जात असतिल तर अश्या आधुनिकतेचा काय उपयोग?
Bandra Terminus : मुंबईमधील वांद्रे रेल्वे स्थानकातील आज पहाटे गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये ९ प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच यातील दोण जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
वांद्रे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पहाटे 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. रेल्वेत चढण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रेल्वेत चढत असतानाच झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये काही प्रवाशी प्लॅटफॉर्मवर पडले. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन ९ प्रवासी जखमी झाले आहेत. वांद्रे – गोरखपूर ही गाडी पूर्णपणे अनारक्षित डब्यांची चालविण्यात येते. सामान्यपणे ही गाडी दोन तास अगओड्र प्लॅटफॉर्म वर लागते मात्र आज या गाडीला थोडा उशीर झाला होता. त्यामुळे रेल्वे आल्यानंतर प्रवाशांनी रेल्वेत चढण्यासाठी मोठी गर्दी केली आणि या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली.
वांद्रे ते गोरखपूर या रेल्वेने प्रवास करण्यासाठी गर्दी केलेले बहुतांश प्रवाशी हे छट पुजेसाठी उत्तर प्रदेशात आपल्या गावी जात होते, अशी प्राथमिक माहिती सांगितली जात आहे. यावर अद्याप रेल्वे प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. सध्या वांद्रे स्थानकातील प्लॅटफॉर्म परिस्थिती व्यवस्थित असून प्लॅटफॉर्मवर पोलीस उपस्थित असल्याची माहिती देण्यात येत आहे.
Bhumi Abhilekh: भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून जमीन मोजणीची कामे गतिमान व्हावीत याकरिता जमीन मोजणी नियमांमध्ये बदल करण्यात आला असून यानुसार आता ग्रामीण भागात जमीन मोजणीच्या दरामध्ये सवलत देण्यात आली आहे व जमीन मोजणीचा कालावधी 130 दिवसांवरून 90 दिवसांवर आणला गेला आहे. तसेच जमीन मोजणीसाठी आता ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यामुळे हा कालावधी कमी झाल्याने तातडीने जमीन मोजणीचे प्रकरणांचा निपटारा करता येणे शक्य होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे अगोदर भूमी अभिलेख विभागाकडून सिटीसर्वे आणि सर्वे नंबरच्या जमीन मोजणीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क आकारले जायचे.
परंतु आता जमीन भाग आणि नगरपालिका हद्द असे दोन प्रकार करण्यात आले आहेत. तसेच अगोदर साधी मोजणी, तातडीची आणि अति तातडीची असे जमीन मोजणीचे तीन प्रकार होते. ते आता बंद करण्यात आले असून दोनच प्रकार त्यामध्ये आता निश्चित करण्यात आलेले आहेत.
या नियमाची अंमलबजावणी येत्या 1 नोव्हेंबरपासून करण्यात येणार असून जमीन मोजणीच्या कार्यप्रणालीमध्ये सुसूत्रता यावी व मोजणी सुलभ व्हावी याकरिता शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून हे नवे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. याबाबत भूमी अभिलेख विभागाने परिपत्रक जारी केले आहे.
या नवीन धोरणानुसार जमीन मोजणीसाठी लागणारे शुल्क व कालावधी नव्याने निश्चित करण्यात आला असून यामध्ये ग्रामीण भागाला दिलासा मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आला आहे.
यामध्ये सर्वे नंबर तसेच गट नंबर, पोटहिस्सा आणि सिटीसर्वे इत्यादी मधील एका भूखंडासाठी दोन हेक्टरपर्यंत नियमित मोजणी करिता 2000 रुपये, द्रूतगती मोजणीसाठी 8000 रुपये मोजणी शुल्क निश्चित करण्यात आलेले आहे.
तसेच नगरपालिका हद्दीतील मोजणी हा दुसरा प्रकार निश्चित करण्यात आला असून या प्रकारामध्ये एका भूखंडासाठी एक हेक्टर पर्यंत नियमित मोजणीस 3000 रुपये इतके शुल्क ठरवण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे जमीन मोजणीसाठी आता ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे या सुविधेचा लाभ घेऊन अर्जदार https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळास भेट देऊन अर्ज करू शकतात.
अलिबाग : गोल्ड फ्लेक कंपनीच्या नावाने बनावट सिगरेट बनवून वेगवेगळ्या राज्यात वितरण करणाऱ्या कंपनीवर रायगड पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कंपनी चालवणाऱ्या १५ आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांकडून जिल्हय़ात शोध पथके कार्यन्वित करण्यात आली होती. या शोध पथकांना कर्जत येथील सागंवी गावात एका निर्जन ठिकाणी असलेल्या आलिशान फार्महाऊस परिसरात सुरु असलेल्या संशयास्पद हालचालीची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला लागली. त्यामुळे त्यांनी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या परवानगीने या फार्म हाऊसवर धाड टाकली. तेव्हा या बनावट सिगरेट कंपनीचा उलगडा झाला. मध्ये ही कंपनी बेकायदेशीरपणे थाटण्यात आली होती. पंधरा कर्मचारी तिथे काम करत होते. सिगरेट बनवण्यासाठी लागणारे साहीत्य आणि तीन मशिन्स या ठिकाणी बसवण्यात आल्या होत्या. गोल्ड फ्लेक कंपनीच्या नावाने दररोज १५ लाख रुपयांची सिगरेट्स या ठिकाणी बनवल्या जात होत्या. बॉक्स पॅकींगसाठी लागणारे साहित्य या ठिकाणी आढळून आले होते. कंपनीत काम करणाऱ्या १५ कामगारांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. हे कामगार आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील आहेत. कंपनीचा सुरु करणार मुळ सुत्रधार दक्षिण भारतातील असल्याचे समोर आले असून त्याचा शोध सुरु आहे. ज्या फार्म हाऊस मध्ये ही कंपनी सुरु होती. त्या मुंबईतील फार्म हाऊस मालकाची शोध पोलीसांनी सुरू केला आहे.
Shivsena UBT list:विधानसभा निवडणुकी साठी शिवसेना उबाठा पक्षाने आपली यादी जाहीर केली असून या यादीतून त्यांनी ६५ उमेदवार जाहीर केले आहेत.
कुडाळ तालुक्यातून विद्यमान आमदार वैभव नाईक तर सावंतवाडी तालुक्यातून नुकतेच पक्षात आलेल्या राजन तेली यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दापोलीतून संजय कदम, रत्नागिरीतून सुरेंद्रनाथ (बाळ) माने आणि राजापूर मतदारसंघात राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Ajit Pawar NCP List:आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ३८ उमेदवारांच्या यादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ते आता बारामतीमधून विधानसभा लढवणार हे फायनल झालं आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी आपल्याला बारामतीमधून निवडणूक लढवण्यास रस नसल्याचं विधान केलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.
अजित पवार गटातील उमेदवारी मिळालेले नेते.
बारामती- अजित पवार,
येवला- छगन भुजबळ,
आंबेगाव- दिलीप वळसे पाटील,
कागल- हसन मुश्रीफ,
परळी- धनंजय मुंडे,
दिंडोरी- नरहरी झिरवाळ,
अहेरी- धर्मरावबाबा आत्राम,
श्रीवर्धन – आदिती तटकरे,
अंमळनेर- अनिल पाटील,
उदगीर- संजय बनसोडे,
अर्जुनी- मोरगाव राजकुमार बडोले,
माजलगाव- प्रकाश सोळंके,
वाई- मकरंद पाटील,
सिन्नर- माणिकराव कोकाटे,
खेड आळंदी- दिलीप मोहिते,
अहिल्यानगर शहर (अहमदनगर)- संग्राम जगताप,
इंदापूर- दत्तात्रय भरणे,
अहमदपूर- बाबासाहेब पाटील,
शहापूर- दौलत दरोडा,
पिंपरी- अण्णा बनसोडे,
कळवण- नितीन पवार,
कोपरगाव- आशुतोष काळे,
अकोले- किरण लहामटे,
वसमत- चंद्रकांत नवघरे,
चिपळूण- शेखर निकम,
मावळ- सुनील शेळके,
जुन्नर- अतुले बेनके,
मोहोळ- यशवंत विठ्ठल माने,
हडपसर- चेतन तुपे,
देवळाली- सरोज अहिरे,
चंदगड- राजेश पाटील,
इगतपुरी- हिरामण खोसकर,
तुमसर- राजू कारेमोरे,
पुसद- इंद्रनील नाईक,
अमरावती शहर – सुलभा खोडके,
नवापूर- भरत गावित,
पाथरी- उत्तमराव विटेकर,
मुंब्रा कळवा- नजीब मुल्ला
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची शिदोरी जोपासून आणि थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे पाऊल टाकत आहोत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येत आहे. मी सर्व उमेदवारांना त्यांच्या यशस्वी… pic.twitter.com/T6MOZPf5gs