Category Archives: स्थानिक बातम्या

Sangameshvar: अंत्रवली ग्रामपंचायत कार्यालयाला आश्वासनाचा विसर, पत्रकार संदेश जिमन यांच्या स्मरणपत्राने कार्यकारी मंडळाला येईल काय जाग?

   Follow us on        

गतवर्षी १२ जून २०२३ रोजी पत्रकार संदेश जिमन आणि वाडी ग्रामस्थ यांनी प्रशासनाला धारेवर धरत मागणी नसताना बांधण्यात आलेल्या मालपवाडी येथील साकवाचा मुद्दा उपस्थित केला. त्या साकवाला दोन्ही बाजूला चढणे उतरणे यासाठी योग्य ती सुविधा नसल्याने उपोषण करणार असे पत्र संदेश जिमन यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला दिले होते.

या पत्राची दखल घेत सरपंच महोदयांनी लेखी पत्र संदेश जिमन यांना दिले. त्या पत्रात स्पष्ट उल्लेख केला असा की “३१ जानेवारी २०२४ पर्यंत साकवाच्या दोन्ही बाजूचे काम पूर्ण केले जाईल.” हे एक वेळकाढू आश्वासन ठरले. अद्याप ते काम पूर्ण न झाल्याने पत्रकार संदेश जिमन यांनी या समस्येकडे आपला मोर्चा पुन्हा वळवला आहे.

दिनांक २० जून २०२४ रोजी ग्रामपंचायत अंत्रवली येथे ग्रामसेवक महोदयांना स्मरणपत्र देऊन संदेश जिमन यांनी चांगली झाडाझडती घेतली. या पत्रात संदेश जिमन यांनी ग्रामपंचायत अंत्रवली च्या कार्यकारी मंडळाला दिलेल्या आश्वासनाकडे डोळे झाक का केली? उपोषणाला विरोध करण्यासाठीच केवळ हा आश्वासनाचा बनाव होता काय?
असे प्रश्न विचारले आहेत.

ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाने जर कर्तव्यदक्षतेने हा विषय मार्गी लावला असता तर स्थानिक ग्रामस्थांना आणि संदेश जिमन यांना हा खटाटोप करावा लागला नसता. केवळ मोठ्या पदांची लालसा बाळगणे पण प्रत्यक्षात त्या पदांचे महत्त्व ध्यानात न घेता कामात कुचराई करणे हे कितपत योग्य! कोणत्या दबावामुळे हे काम आजवर पुर्ण झाले नाही,याचे उत्तर गुलदस्त्यात आहे.

या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलवावी. प्रश्न निकाली काढावा. जर काहीच शक्य नसेल तर संदेश जिमन यांनी कायदेशीर मार्गाने जाण्यास ग्रामपंचायत कार्यालयाची काही हरकत नसल्याचे लेखी पत्र ग्रामपंचायतीने द्यावे असे पत्रात म्हटले आहे.

या विषयाचे गांभीर्य ध्यानात घेऊन संबंधित विभागाने चौकशी आदेश देऊन सत्यता पडताळणे गरजेचे आहे. दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. लाखोंचा निधी कोणाच्या भल्यासाठी? ठेकेदार आणि त्यांच्या बगलबच्च्यांसाठी की जनसामान्यांच्या हितासाठी?  ही अनागोंदी कोणाच्या आशिर्वादाने चालते? याला जबाबदार कोण? कारवाई झाली पाहिजे! ही ग्रामस्थांची मागणी आहे.

Chiplun: श्री क्षेत्र टेरव येथे भवानी मातेचा गोंधळ शुक्रवार १३ जून, २०२५ रोजी संपन्न होणार.

   Follow us on        

चिपळूण : श्री क्षेत्र टेरव येथे कुलस्वामिनी श्री भवानी मातेचा मंगलमय गोंधळ सोहळा रूढी परंपरेनुसार शुक्रवार दिनांक १३ जून, २०२५ रोजी मृग नक्षत्रात जल्लोषात व आनंदान संपन्न होणार आहे. भवानी माता ही महाराष्ट्राचे व कदम कुळांचे कुलदैवत असून ही देवता सुख, समृद्धी, सौभाग्य व स्वास्थ देणारी असून दुःखाचा नाश करणारी तसेच इच्छापूर्ती करणारी देवता आहे. श्री क्षेत्र तुळजापूर येथे भवानी मातेच्या पूजेचा मान कदम कुळाचा असून त्यांना भोपे असे संबोधले जाते.

 

जसे वैष्णवाच्यांत भजन – कीर्तन, हरिनाम सप्ताह साजरे होतात, तसेच देवीचा, खंडोबाचा, ज्योतिबाचा गोंधळ, जागर करण्याचा अनेक कुळांचा कुलाचार आहे. ९६ कुळांपैकी ७२ कुळांची कुलस्वामिनी श्री भवानी माता आहे. गोंधळ हा भवानी मातेचा मुख्य व महत्वाचा धार्मिक विधी आहे.

 

देवस्थानच्या पुजाऱ्यानी पूजेची मांडणी व घट स्थापित केल्यावर मानकऱ्यांच्या हस्ते पूजा करण्यात येईल. त्या नंतर दिवट्या पाजळून घटाच्या भोवती पाच प्रदक्षिणा घालून *’भैरी – भवानीचा गोंधळ मांडीला, गोंधळाला यावे, उदो -उदो -उदो’* असा उदघोष करण्यात येईल. परंपरेनुसार हा गोंधळ, गोंधळी न घालता श्री क्षेत्र टेरव गावातील कदम घालतील.

 

कुलस्वामिनी श्री भवानी मातेस गाऱ्हाणे घालून मंदिराच्या पूर्वेस आवाराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून देवीचे देणे-मागणे देण्यात येईल. विधिवत पूजा-अर्चा संपन्न झाल्यावर महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.

 

दुसऱ्या दिवशी मंदिर स्वच्छ करून उद्यापनासह देवीला अभिषेक करण्यात येईल व अशा प्रकारे गोंधळ ह्या धार्मिक विधीची सांगता होईल.

 

गोंधळ या भवानी मातेच्या मुख्य व आवडत्या मंगल उत्सवात सर्वांनी अगत्याने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा व उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा अशी विनंती टेरव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

 

Dodamarg: दोन कार समोरासमोर धडकल्याने अपघात

   Follow us on        

दोडामार्ग: कसई दोडामार्ग केळीच टेंब येथे दोन गाड्या समोरासमोर आदळल्याने अपघात झाला. हा अपघात सकाळी १०:०० च्या सुमारास घडला. अपघातात दोन्ही गाडीतील प्रवासी जखमी झाले आहेत.
जखमीना उपचारासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांना अधिक उपचारासाठी त्यांना गोवा बांबूळी हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामुळेदोडामार्ग ते तिलारी या राज्यमार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

Chiplun: राधाकृष्ण वाडी, टेरव आयोजित कबड्डी स्पर्धेत कळकवणे क्रीडा मंडळ विजेता तर काळेश्री कान्हे, मोडकवाडी संघ उपविजेता.

 

   Follow us on        

Chiplun: श्री सत्यनारायण महापूजे निमित्त राधाकृष्ण साधनालय संघ पुरस्कृत, राधाकृष्ण क्रीडा मंडळ आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा गुरुवार ८ मे ते शनिवार दिनांक १० मे २०२५ या कालावधीत कै.बाबुराव दादाजीराव कदम क्रिडा नगरीत राधाकृष्ण मंदिरा समोर संपन्न झाली. सदर स्पर्धा ग्रामीण कबड्डी विकास संघटना, चिपळूण या संस्थेच्या मान्यतेने घेण्यात आल्या. एकूण २० संघानी सदर स्पर्धेत भाग घेतला. कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन श्री अजित आबाजीराव कदम संचालक सरस्वती कोचिंग क्लासेस, मुंबई, टेरवच्या उपसरपंच सौ. रिया राकेश म्हालीम व वाडीतील मान्यवर ग्रामस्थांच्या हस्ते ८ मे रोजी करण्यात आले.

स्पर्धेस विजेत्या संघास रोख पारितोषिके व आकर्षक चषक भेट देण्यात आले.

१. कळकवणे क्रीडा मंडळ, कळकवणे या अंतिम विजयी संघास कै. वसंतराव अमृतराव कदम यांच्या स्मरणाचा श्री अजित वसंतराव कदम यांसकडून रुपये रोख ₹. १०,००० व आकर्षक चषक,

२. काळेश्री कान्हे, मोडकवाडी या अंतिम उपविजयी संघास कै. सौरभ सुहासराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री सुहास (नंदू) दत्तात्रयराव कदम (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) यांस कडून रोख ₹.७५०० व आकर्षक चषक,

३, ४ केदारनाथ, आडरे व केदार वाघजाई, कोळकेवाडी या दोन्ही उपांत्य विजय संघास प्रत्येकी ₹. ५,००० व आकर्षक चषक कै. रघुनाथ नारायणराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री अशोक रघुनाथराव कदम व कै. महादेवराव कृष्णाजीराव यांच्या स्मरणार्थ श्री निलेश महादेवराव कदम यांसकडून देण्यात आले.

५. काळेश्री कान्हे, मोडकवाडी या संघाचे श्री राकेश मोडक यांस उत्कृष्ट चढाई पटू म्हणून कै. अनंतराव सखारामराव मोर यांच्या स्मरणार्थ श्री प्रशांत अनंतराव मोरे आणि बंधू,

६. कळकवणे क्रीडा मंडळ, कळकवणे या संघाचे श्री सोहम कदम यांस उत्कृष्ट पकडी करिता कै. सौ. वनमाला मानसिंगराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री स्वप्नील मानसिंगराव कदम,

७. तसेच कळकवणे क्रीडा मंडळ, कळकवणे या संघाचे श्री संकेत घडशी यांची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कै. दीपकराव दिनकरराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री विनय दीपकराव कदम,

८. तर कुलस्वामिनी धामणवणे (उंडरेवाडी) या संघास शिस्तबद्ध संघास कै. राधेश्याम पांडुरंगराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री रुपेश राधेश्यामराव कदम यांच्या वतीने रोख रक्कम व आकर्षक चषक प्रदान करण्यात आले.

सर्वोत्कृष्ट खेळाडूस कूलरही भेट देण्यात आला. सदर बक्षिचांचे वितरण सर्वश्री दशरथराव, मानसिंगराव, बजाजीराव, अजितराव, जिजाजी घडशी, वासुदेव सुतार, गोपीचंदराव, अनिलराव, संभाजीराव, अनंत साळवी, अशोकराव, भाऊराव, विश्वासराव, अशोकराव या मान्यवरांच्या शुभहस्ते शनिवार दिनांक १० मे, २०२५ रोजी करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुण्यांसाठी २५ सन्मानचिन्हे कै. सौ. वनमाला मानसिंगराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री मानसिंगराव बाबुराव कदम यांनी प्रायोजित केली.

सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वाडीतील सर्व अबाल वृद्धांनी अपार मेहनत घेतली. सर्व तरुणांनी तसेच वाडीतील अनेक मान्यवरांनी यथाशक्ती अर्थिक सहाय्य करून संस्थेस उपकृत केले.

सदर संघाच्या वृक्षाचे, वटवृक्षात रुपांतर करण्यासाठी गेली पन्नास वर्षे कैलासवासी हणमंतराव, काशीरामराव, उद्धवराव, वसंतराव, दत्तारामराव, पर्वतराव, पांडुरंगराव, दत्तात्रयराव, सखारामराव, भाऊराव, जगन्नाथराव, बाबुराव या व इतर अनेक सद्गृहस्थानी अपार कष्ट घेतले. सध्या राधाकृष्ण साधनालय संघाचे कार्य पुढे नेण्याचे काम सर्वश्री धोंडजीराव, रघुनाथराव, दशरथराव, मानसिंगराव, बजाजीराव, संभाजीराव, भाऊराव, विश्वासराव, बाळकृष्णराव, अशोकराव, गोपीचंदराव, जिजाजी घडशी, वासुदेव सुतार व शहरातील व वाडीतील सर्व लहान थोर ग्रामस्थ व तरूण वर्ग एकत्रितपणे करत आहेत. राधाकृष्ण मंदिरात, वाडीत होणारे सर्व उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदान एकत्र पणे साजरे करण्यात येतात.

कबड्डी स्पर्धेस आलेल्या अंदाजे ₹ १,५०,००० खर्च वाडीतील सर्व लहान थोर मंडळींनी सढळहस्ते सहकार्य करून उचलल्याबद्दल आम्ही सर्व तरुणवर्ग व बांधवांचे आभारी आहोत . सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वश्री शिरीष पांडुरंगराव कदम, ओंकार (बाबू) अशोकराव कदम, प्रशांत अनंतराव मोरे, विनय दीपकराव कदम, राजेश मारुतीराव कदम व ओम अविनाशराव कदम यांनी विशेष मेहनत घेतली.

स्पर्धेचे नियोजन व समालोचन श्री चंद्रकांत शंकरराव मोरे, मुंबई उपनगर कबड्डी असोसिएनचे मा.जेष्ठ पदाधिकारी यांनी उत्तम रित्या पार पाडले.

दोडामार्ग भेडशी गावची सुकन्या साक्षी गावडेची गोवा रणजी क्रिकेट संघात निवड

 

मुंबई: दोडामार्ग तालुक्यातील भेडशी खानयाळ गावची सुकन्या आणि सद्यस्थितीत मुंबई-दहिसर येथे स्थायिक असलेल्या साक्षी बंड्या गावडे हिची 23 वर्षाखालील महिलांच्या गोवा रणजी क्रिकेट संघात ऑलराऊंडर खेळाडू म्हणून दिनांक २८ फेब्रुवारी रोजी निवड झाली असून तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. साक्षी हिने मास मीडिया मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. इयत्ता सातवी पासून लेदर बॉल क्रिकेटचे धडे घेत आहे. तिचे वडील बंड्या गावडे यांना क्रिकेटची फार आवड. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिची यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये १६ आणि १९ वर्षाखालील महिलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली होती. तिचा परफॉर्मन्स पाहून गोवा क्रिकेट अकॅडमीने तिची 23 वर्षाखालील महिलांच्या गोवा रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी ऑलराऊंडर म्हणून निवड केली आहे. सध्या ती गोवा येथे रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी प्रशिक्षण घेत आहे. सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त येथील अशोक नारायण परब (मांजरेकर) यांची ती नात असून रणजी संघामध्ये झालेल्या निवडीबद्दल तिच्या मामेगावी कलंबिस्त येथे तिचे कौतुक होत आहे. सामाजिक कार्यकर्ते किरण सावंत, निलेश पास्ते, अशोक राऊळ यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

सावंतवाडी रेल्वे स्थानकावर रेल हॉटेल्स आणि विविध कामांसाठी ३९ कोटींचा आराखडा तयार – आ. दिपक केसरकर

   Follow us on        

सावंतवाडी, दि. १२ फेब्रु. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर लागणार्‍या पाण्याची व्यवस्था, रेल हॉटेल व छोटे निवासी रूम तसेच नव्या प्लॅटफॉर्मसाठी जवळपास 39 कोटी रुपये खर्चाच्या कामाचा आरा  खडा तयार करण्यात आला आहे. या कामासाठी लागणारा निधी रत्नसिंधू योजनेतून देण्यात येणार असल्याची माहिती रत्नसिंधू योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सावंतवाडी स्थानकावर लवकरच ठिकाणी रेल हॉटेल्स व रूम उभारण्यात येणार असून तिलारी धरणाचे पाणी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला देण्याची निविदा प्रक्रिया ही राबवण्यात येणार आहे. सावंतवाडी- मळगाव रेल्वे टर्मिनस या ठिकाणी दर्जेदार असे रेल हॉटेल व तुतारी रेल्वे रुळाच्या बाजूला नवे प्लॅटफॉर्म आणि छोट्या निवासी रूमची व्यवस्था करण्यासाठी नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. या जागेची पाहणी आज श्री केसरकर यांनी केली. यावेळी त्यांनी जवळपास दोन तास सावंतवाडी मळगाव रेल्वे टर्मिनसच्या जागेची पाहणी केली. आणि तुतारी एक्सप्रेसमध्ये बसून नवीन आराखड्याची चर्चा केली यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, स्टेशन मास्टर कृष्णकांत परब , रेल्वेचे जे पी प्रकाश, श्री ए बी फुले, सुरज परब, सुनील परब ,श्री गाड , योगेश तेली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वैभव सगरे आदी उपस्थित होते.

रत्नागिरी: जि. प. शाळा टेरव क्रमांक १ येथे शैक्षणिक साहित्य वितरण

सेवा सहयोग फाउंडेशनचा उपक्रम

   Follow us on        

चिपळूण:- SS &C – Globe Op या कंपनीच्या माध्यमातून व सेवा सहयोग फाउंडेशन या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थेच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळा टेरव क्रमांक १ या शाळेतील इयत्ता १ली ते ७ वीच्या १५१ विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, नोटबुक व इतर शैक्षणिक साहित्याचे रविवार दिनांक २६ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी दहा वाजता वितरण करण्यात आले.

तसेच श्री रुपेश श्याम कदम फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने वरील शाळेतील तसेच सुमन विद्यालय टेरव या शाळेतील मिळून २५८ विद्यार्थ्यां खाऊचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास मा.श्री. सुधाकर कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.रश्मी काणेकर, उपाध्यक्षा सौ. दिक्षिता मोहिते, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ.मानवी मेंगे, सौ.मानसी दाभोळकर, सौ. रूचीता हेमंत तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री.महेंद्र खांबे, टेरव वेतकोंड पोलीस पाटील सौ.वृषाली लाखण, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री दिपक मोने, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. टेरव सारख्या ग्रामीण भागात SS &C – Globe Op या कंपनीच्या माध्यमातून सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल आभार व ऋण व्यक्त करण्यात आले.

रत्नागिरीत प्रथमच होणार क्षेत्रीय वैदिक संमेलन; १०० वैदिक पंडितांच्या उपस्थितीत होणार वेदमंत्रांचा जागर

   Follow us on        

रत्नागिरी:महर्षी हर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैन आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीच्या इतिहासात पहिल्यांदाच क्षेत्रीय वैदिक संमेलनाचे आयोजन दिनांक ७,८,९ फेब्रुवारी रोजी केले जाणार आहे.

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक या ४ राज्यांतून प्रमुख मंदिरांचे पुजारी आणि विविध वेद पाठशाळांमध्ये अध्यापक म्हणून कार्यरत असणारे शिवाय वेदातील क्रमांत, घनांत असे अध्ययन पूर्ण केलेले वैदिक मान्यवर येणार आहेत. या ३ दिवसांच्या संमेलनात ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद या ४ वेदांच्या विशिष्ट शाखांचे सामूहिक पठण होणार आहे.

हे संमेलन रत्नागिरी शहरातील माधवराव मुळ्ये भवन येथे संपन्न होणार असून संमेलनात वेद, वेदविज्ञान या संबंधी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

वेदाचा प्रचार व प्रसार व्हावा आणि त्यांचे महत्व जनमानसापर्यंत पोहचावे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे हा संमेलनाला वेदप्रेमी रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या वतीने करण्यात आलेले आहे

राजमाता जिजाबाई भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त “बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट” ची “एकलव्य आश्रम शाळा” आदिवासी शाळेस सदिच्छा भेट

   Follow us on        

पालघर:- रविवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी स्वराज्य जननी, राजमाता जिजाबाई भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त “बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट” च्या वतीने “एकलव्य आश्रम शाळा” हिरडपाडा, ता. जव्हार, जि. पालघर या आदिवासी शाळेस सदिच्छा भेट देण्यात आली. सदर प्रसंगी “बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट” कडून या शाळेस राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत तुकाराम महाराज, राजश्री शाहू महाराज, स्वामी विवेकानंद अशा अनेक थोर व्यक्तींचे फ्लेक्स फोटो व नकाशे वेगवेगळ्या वर्गात लावण्यासाठी भेट देण्यात आले. शिवाय शाळेतील सर्व मुलांना खाऊचे वाटप सुद्धा करण्यात आले….

सदर कार्यक्रमासाठी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. नंदकुमार राणे, सचिव श्री. नारायण चव्हाण, उपाध्यक्ष श्री. ओमप्रकाश सिंह, खजिनदार श्री. सूरज सिंह, तसेच विश्वस्त श्री. सतिश राणे व सुनिल सिंह उपस्थित होते. शाळेतर्फे शाळेचे संचालक श्री . दिलिप पटेकर, मुख्याध्यापक श्री. मेदगे, शिक्षक श्री. राजेश विंचूरकर, श्री. नागरगोजे, श्री.जरे, श्री. पाटील , श्री. इंगळे, श्री. बडगुजर उपस्थित होते.

ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष श्री. नंदकुमार राणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व ट्रस्ट तर्फे केली जाणारी मदत योग्य ठिकाणी पोहचत आहे याबद्दल समाधान व्यक्त केले आणि उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांना शूभेच्छा दिल्या……

पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते श्री क्षेत्र टेरव देवस्थान दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

   Follow us on        
चिपळूण: श्री क्षेत्र टेरव, कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई देवस्थान २०२५ दिनदर्शिकेचा प्रकाशन व लोकार्पण सोहळा, कोकणचे लाडके सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या शुभहस्ते नुकताच दिमाखात संपन्न झाला. गेली १५ वर्षे भाविक व ग्रामस्थांना आकर्षक, दर्जेदार व परिपूर्ण  दिनदर्शिका भेट देण्यात येत आहे.
सालाबादप्रमाणे या वर्षीही  दिनदर्शिकेला  वाढती  मागणी आहे.  टेरव गावातील सर्व ग्रामस्थांना तसेच मुंबई, पुणे, ठाणे, सुरत इ. शहरात वास्तव्यास असलेल्या  टेरव वासियांना सदर दिनदर्शिकेचे  वितरण करण्यात येणार आहे.
देवस्थानात तसेच टेरव गावात साजरे होणारे सार्वजनिक सण, उत्सव व इतर सर्व धार्मिक कार्यक्रमांची माहिती दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search