Author Archives: Kokanai Digital

सावंतवाडीतील चिमुकल्या ‘नृत्या’ला जीवनदानाची गरज – उपचारासाठी १५ लाखांची आवश्यकता, समाजातील दानशूरांकडून मदतीचे आवाहन

   Follow us on        

सावंतवाडी, ता. ९ : सावंतवाडीतील अवघी तीन वर्षांची चिमुरडी ‘नृत्या’ सध्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहे. निमोनियाच्या गंभीर प्रकारामुळे तिला कोल्हापूर येथील साई स्पर्श चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचारासाठी तब्बल १० ते १५ लाख रुपयांची आवश्यकता आहे.

‘नृत्या’ ही सावंतवाडीतील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर महेश जांभोरे यांची कन्या आहे. जन्मापासूनच विविध आरोग्य समस्यांशी ती लढत आहे. आतापर्यंत जांभोरे यांनी आपली सर्व जमापुंजी खर्च करून मुलीवर उपचार सुरू ठेवले, मात्र सध्याच्या परिस्थितीत उपचारांचा खर्च परवडणं कठीण झालं आहे.

आठवडाभरापूर्वी ताप व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्याने जिल्ह्यातील अन्य रुग्णालयांमधून तिला कोल्हापूर येथे हलविण्यात आलं. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

त्यासाठी प्रवीण कुबल (7066415169) या नंबरवर संपर्क साधावा. तसेच ज्या दात्यांना आर्थिक मदत द्यायची असेल त्यांनी या बँक अकाउंटवर IFSC :- SBIN0000476, Account no :- 20300618631 किंवा गुगल पे महेश जांभोरे (9545472152) वर आपली मदत पाठवावी.

नृत्याच्या उपचारांसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन मदतीचा हात द्यावा, असे आवाहन तिच्या मित्रपरिवाराकडून करण्यात आले आहे.

 

 

तळकोकणात थांबा नसणार्‍या त्या ३२ गाड्यांना थांबा द्यावा; शरद पवार यांची रेल्वेला विनंती

   Follow us on        

पुणे: कोकणवासीयांसाठी जिव्हाळ्याचा आणि अत्यंत महत्त्वाचा विषय असलेल्या कोकण रेल्वेवरील एक्स्प्रेस गाड्यांच्या थांब्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून विशेष विनंती केली आहे.

या पत्रात त्यांनी कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या तळकोकणातील स्थानकांवर निवडक लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली आहे.

शरद पवार यांनी पत्रात नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा असून तो आपल्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांसाठी, ऐतिहासिक किल्ल्यांसाठी आणि समृद्ध कोकणी संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, अनेक एक्स्प्रेस गाड्या सध्या या जिल्ह्यातून न थांबता जात असल्याने स्थानिक नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर पवार यांनी प्रायोगिक तत्त्वावर पर्यटन हंगामात आणि प्रमुख सणांच्या काळात — म्हणजे गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, नववर्ष, होळी आणि उन्हाळी सुट्टीच्या काळात — निवडक एक्स्प्रेस गाड्यांना कुडाळ, कणकवली किंवा सावंतवाडी येथे थांबे देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.

त्यांनी नमूद केले आहे की, या निर्णयामुळे तळकोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, विद्यार्थी, व्यावसायिक आणि रुग्णांच्या प्रवासात मोठी सोय होईल, तसेच स्थानिक उत्पादने आणि हस्तकलेच्या वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल. यामुळे सर्वसामान्य कोकणवासीयांच्या प्रलंबित मागणीला न्याय मिळेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.

Konkan Railway: रेल्वेचा गलथान कारभार! आरक्षित असलेला डब्बा न जोडताच गाडी रवाना

   Follow us on        

मुंबई, दि. ८ ऑक्टोबर : मुंबईवरून मडगावकडे जाणाऱ्या १२०५१ जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांमध्ये आज तीव्र संतापाची लाट उसळली. प्रवाशांकडे  कन्फर्म तिकीटे असलेला DL-1 डबा गाडीला लावण्यातच आलेला नव्हता.

या अनपेक्षित घटनेमुळे गाडीत गोंधळ आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांना जागा न मिळाल्याने प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागला. परिस्थिती हाताळताना रेल्वेतील टीसी आणि कर्मचारी देखील अडचणीत सापडले.

टीसींनी प्रवाशांना या प्रकरणाची तक्रार रेल्वे प्रशासनाकडे नोंदविण्याचा सल्ला दिला असून, प्रवाशांनी या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला आहे. रेल्वेच्या या गलथान कारभारामुळे प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.

प्रवाशांनी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली असून, हा प्रकार रेल्वेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली आहे

लहान मुलांसाठी कफ सिरप धोकादायक? केंद्र सरकारने दिला महत्वाचा इशारा

   Follow us on        

नवी दिल्ली: लहान मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी कफ सिरप आणि सर्दीवरील औषधांच्या वापराबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार बालरोग तज्ज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लहान मुलांना ही औषधे देताना विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, दोन वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीवरील कोणतीही औषधे देऊ नयेत. तसेच, पाच वर्षांखालील मुलांसाठी ही औषधे सामान्यतः शिफारस केलेली नाहीत. कारण, लहान मुलांमधील तीव्र कफ आणि सर्दीचे बहुतांश आजार स्वतःहून बरे होतात आणि त्यासाठी औषधांची गरज पडत नाही.


सर्व आरोग्य केंद्रे आणि दवाखान्यांनी केवळ उत्तम उत्पादन मानकांनुसार (GMP) तयार केलेली आणि उच्च औषधी दर्जाची कफ सिरप खरेदी करावीत, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद आहे. या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी सर्व दवाखाने, जिल्हा आरोग्य विभाग, औषध वितरण केंद्रे, प्राथमिक आणि सामुदायिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये तसेच वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये तातडीने करावी, असे निर्देश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत.

 

Loading

Konkan Railway: वास्को-द-गामा – मुझफ्फरपूर विशेष गाडी एलएचबी रेकसह धावणार

   Follow us on    

 

 

Konkan Railway: वास्को-द-गामा : प्रवाशांच्या अधिक सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी वास्को-द-गामा – मुझफ्फरपूर – वास्को-द-गामा साप्ताहिक विशेष गाडी (क्र. 07311/07312) आता पारंपरिक आयसीएफ डब्यांऐवजी आधुनिक एलएचबी डब्यांसह धावणार आहे.

ही सुविधा 22 सप्टेंबर 2025 पासून वास्को-द-गामा येथून सुटणाऱ्या गाडी क्रमांक 07311 साठी लागू होणार असून, मुझफ्फरपूर येथून 25 सप्टेंबर 2025 रोजी सुटणाऱ्या गाडी क्रमांक 07312 पासून अमलात येईल.

रेल्वेच्या माहितीनुसार, या गाडीत यापुढे एक फर्स्ट एसी, दोन टू टियर एसी, तीन थ्री टियर एसी, नऊ स्लीपर, तीन जनरल, एक जनरेटर कार आणि एक एसएलआर असा एकूण 20 एलएचबी डब्यांचा समावेश असेल. पूर्वी या गाडीत 21 आयसीएफ डबे जोडले जात होते.

प्रवाशांच्या प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायी, सुरक्षित आणि वेगवान व्हावा या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. संबंधित गाडीचे तपशीलवार वेळापत्रक आणि थांबे www.enquiry.indianrail.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या बदलामुळे प्रवाशांनी रेल्वेच्या सेवांचा अधिक सोयीस्कररीत्या लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.

सरकारी नोकरी: धर्मदाय आयुक्त कार्यालयात १७९ पदांसाठी मोठी भरती सुरू; वेतन लाखांच्या घरात

   Follow us on    

 

 

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाने विविध पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. गट-ब आणि गट-क मधील एकूण १७९ रिक्त जागांसाठी ही भरती होणार असून, या पदांसाठी मिळणारे वेतन आकर्षक आहे. काही पदांसाठी वेतन ₹१,४२,४००/- पर्यंत आहे.

पदांचा आणि वेतनाचा तपशील:

गट-ब (अराजपत्रित):

विधी सहायक: वेतनश्रेणी ₹३८,६०० ते ₹१,२२,८०० (S-13)

लघुलेखक-उच्च श्रेणी: वेतनश्रेणी ₹४४,९०० ते ₹१,४२,४०० (S-16)

लघुलेखक-कनिष्ठ श्रेणी: वेतनश्रेणी ₹४१,८०० ते ₹१,३२,३०० (S-14)

गट-क:

निरीक्षक: वेतनश्रेणी ₹३५,४०० ते ₹१,१२,४०० (S-13)

वरिष्ठ लिपिक: वेतनश्रेणी ₹२५,५०० ते ₹८१,१०० (S-8)

महत्वाच्या तारखा:

अर्ज सुरू होण्याची तारीख: ११ सप्टेंबर २०२५

अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०३ ऑक्टोबर २०२५ (रात्री ११:५५ वाजेपर्यंत)

परीक्षा: ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२५ दरम्यान

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा:

प्रत्येक पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा भिन्न आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे आहे, तर आरक्षित प्रवर्गासाठी ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

अर्ज प्रक्रिया:

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला https://charity.maharashtra.gov.in भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा.

ऑनलाइन अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि परीक्षा शुल्क जमा करणे अनिवार्य आहे.

खुला प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क ₹१०००/- आणि मागासवर्गीय/अनाथ उमेदवारांसाठी ₹९००/- आहे.

या भरतीसाठी अधिक माहिती व सविस्तर जाहिरात धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Konkan Railway Updates: प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेकडून नवीन मोबाइल अ‍ॅप्लिकेशन सादर

   Follow us on    

 

 

Konkan Railway Updates: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) आज नव्याने डिझाईन केलेले KR MIRROR मोबाईल अ‍ॅप्लिकेशन  सादर केले. हे अ‍ॅप्लिकेशन प्रवाशांना आधुनिक, सुलभ आणि समावेशक डिजिटल अनुभव देण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.

हे अ‍ॅप्लिकेशन केवळ माहिती देणारे साधन न राहता आता एक संपूर्ण प्रवास साथीदार ठरत आहे. दृष्टी, हालचाल किंवा संज्ञानात्मक अडचणी असलेल्या प्रवाशांनाही सहज वापरता येईल, याची काळजी घेण्यात आली आहे. बहुभाषिक पर्याय, मोठ्या अक्षरे, तसेच डार्क/लाईट मोडसारख्या सुविधा यात उपलब्ध आहेत.

महत्त्वाच्या सुविधा:

  • गाडीचे प्रत्यक्ष धावते स्थिती व वेळापत्रक

  • स्थानकांवरील व गाड्यांवरील सेवा, केटरिंग माहिती

  • महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र सुविधा व सुरक्षा हेल्पलाईन्स

  • पर्यटन व चित्रपट स्थळांची माहिती, छायाचित्रे

  • हेल्पडेस्क व तक्रार नोंदविण्याचे पर्याय

  • कोकण रेल्वेचा इतिहास, कामगिरी व घोषणा

  • आपत्कालीन माहिती व सुरक्षा सुविधा

प्रवासी लाभ:
या अ‍ॅप्लिकेशन द्वारे प्रवाशांना जलद माहिती, सुरक्षा जागरूकता, पर्यटन नियोजन, स्थानिक भाषांतील माहिती तसेच थेट KRCL शी संवाद साधण्याची सुविधा मिळणार आहे.

हे अ‍ॅप्लिकेशन आता Google Play Store वर डाउनलोडसाठी उपलब्ध असून, खालील लिंकवर जाऊन ते डाउनलोड करता येईल.

https://play.google.com/store/apps/details?id=com.konkanrailway.krclapp

लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम उत्तर विशेष गाडीला खेेड स्थानकावर तात्काळ थांबा द्या

   Follow us on    

 

 

खेेड: लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम उत्तर (०१४६३/०१४६४) विशेष गाडी पुजा, दिवाळी व छठ २०२५ उत्सव काळात चालविण्याची घोषणा कोकण रेल्वेकडून करण्यात आली आहे. मात्र या गाडीला खेेड स्थानकावर थांबा देण्यात आलेला नाही. या निर्णयाविरोधात प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

जल फाउंडेशन कोकण विभागाचे संस्थापक व अध्यक्ष श्री. नितीन सखाराम जाधव यांनी या संदर्भात निवेदन देऊन संताप व्यक्त केला आहे. उन्हाळी २०२५ विशेष गाड्यांच्या वेळी खेेड येथे थांबा देण्यात आला होता. मात्र आता तो रद्द करण्यात आला असून त्यामागचे कारण जनतेला समजत नाही, असे जाधव यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, “कोकण रेल्वेकडून महाराष्ट्रातील स्थानकांकडे कायम दुय्यम दृष्टीने पाहिले जाते. केरळ व इतर दक्षिणेकडील प्रवाशांच्या मागण्या मान्य करून त्यांना पुरेसे थांबे दिले जातात. पण कोकणवासीयांच्या सोयीसाठी वारंवार दुर्लक्ष केले जाते. हा अन्याय व पक्षपात आहे.”

खेेड हे तालुक्याचे ठिकाण असून हजारो प्रवाशांसाठी ते महत्त्वाचे स्थानक आहे. ही गाडी पुढे नियमित सेवेतही रूपांतरित होऊ शकते. त्यामुळे प्रवाशांना आंदोलन करावे लागू नये म्हणून तातडीने खेेड येथे थांबा निश्चित करणे आवश्यक असल्याची ठाम मागणी जाधव यांनी केली आहे.

अन्यथा हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर उचलून धरला जाईल व प्रवाशांना संघर्षाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पीएसआय परिक्षेत अव्वल ठरलेल्या अश्विनी केदारीचा दुर्दैवी मृत्यू; पुण्यात हळहळ

   Follow us on    

 

 

पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू येथील रहिवासी अश्विनी केदारी (वय ३०) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेतलेल्या २०२३ च्या पीएसआय परीक्षेत मुलींत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या अश्विनीचा २८ ऑगस्ट रोजी झालेल्या अपघातात गंभीर भाजल्याने मृत्यू झाला.

२८ ऑगस्टच्या सकाळी अभ्यास करताना तिने बाथरूममधील गिझर सुरू करून पाणी गरम केले होते. पाण्याचे तापमान पाहण्यासाठी गेल्यावर तिला विजेचा धक्का बसला आणि अंगावर उकळते पाणी ओतले गेले. यात ती ८० टक्क्यांहून अधिक प्रमाणात भाजली.

तिला तात्काळ पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या उपचारासाठी समाजातील अनेकांनी आर्थिक मदतही केली. मात्र, काही दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

शेतकरी कुटुंबातील अश्विनीने स्वतःच्या कष्टावर यश मिळवले होते. जिल्हाधिकारी होण्याचे तिचे स्वप्न होते. तिच्या निधनाने खेड तालुक्यासह तिचे कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्पर्धा परीक्षेतील अभ्यासकांवर दुःखाचे सावट पसरले आहे

Konkan Railway: दसरा-दिवाळीनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांची घोषणा

   Follow us on    

 

 

मुंबई : आगामी दसरा व दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेतर्फे कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना या गाड्यांमुळे मोठा दिलासा मिळणार असून, दोन साप्ताहिक विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.

१) गाडी क्रमांक ०१४६३ / ०१४६४ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक):

गाडी क्रमांक ०१४६३ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर विशेष साप्ताहिक दर गुरुवार २५/०९/२०२५ ते २७/११/२०२५ रोजी लोकमान्य टिळक (टी) येथून दुपारी ४:०० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री २२:४५ वाजता तिरुवनंतपुरम उत्तर येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१४६४ तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक दर शनिवारी २७/०९/२०२५ ते २९/११/२०२५ रोजी तिरुवनंतपुरम उत्तर येथून सायंकाळी ४:२० वाजता सुटेल. तिसऱ्या दिवशी दुपारी ०१:०० वाजता गाडी लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकुंदोब रोड, मुकदुर्ग रोड, कुंडुरा, मुकदुर्ग रोड, सुर्थकल, मंगळुरु जं., कासरगोड, कन्नूर, कोझिकोड, तिरूर, शोरानूर जं., त्रिसूर, अलुवा, एर्नाकुलम जंक्शन, कोट्टायम, चांगनासेरी, त्रिउवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम, सस्थानकोट्टा आणि कोल्लम जं. या स्थानकांवर थांबेल.

रचना : एकूण २२ एलएचबी कोच = २ टायर एसी – ०१ कोच, ३ टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०९ कोच, जनरल – ०४, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१.

२) गाडी क्रमांक ०११७९ / ०११८० लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक):

गाडी क्रमांक ०११७९ लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड विशेष (साप्ताहिक) दर शुक्रवारी १७/१०/२०२५ ते ०७/११/२०२५ रोजी लोकमान्य टिळक (टी) येथून सकाळी ०८:२० वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी रात्री २१:०० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११८० सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक) दर शुक्रवारी १७/१०/२०२५ ते ०७/११/२०२५ रोजी रात्री २२:२० वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी १०:४० वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्टेशनवर थांबेल.

रचना: एकूण २२ एलएचबी कोच = पहिला एसी – ०१ कोच, २ टियर एसी – ०३ कोच, ३ टियर एसी – ०७ कोच, स्लीपर – ०८ कोच, पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२.

गाडी क्रमांक ०११८० चे बुकिंग ११/०९/२०२५ रोजी सर्व पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम (पीआरएस), इंटरनेट आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search