Author Archives: Kokanai Digital

मुंबई गोवा महामार्गाचे काम यावर्षी जूनअखेरपर्यंत पूर्ण होईल -नितीन गडकरी

   Follow us on        

मुंबई : मुंबई गोवा महामार्गाचे काम यावर्षी जूनअखेरपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. दादरच्या अमर हिंद मंडळाने आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत ‘महामार्ग विकासाचा’ या विषयावर ते बोलत होते.

गडकरी यांनी पुढील दोन वर्षात नॅशनल हायवेचे रस्ते जाळे अमेरिकेपेक्षा चांगले होईल, असा आशावाद व्यक्त केला.

नवी मुंबई विमानतळाकडे वॉटर टॅक्सी जाणार

मुंबईमधील कोणत्याही दिशेकडून जलमार्गाने १७मिनिटात नवी मुंबई विमानतळाकडे जाता यावे यासाठी वॉटर टॅक्सीची योजना तयार करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिली आहे.

वसई विरारपासून ते गेटवे ऑफ इंडिया या कोणत्याही ठिकाणाहून या नवी मुंबई विमानतळाकडे जाता येईल, असेही गडकरी यांनी सांगितले.

तसेच वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी नवे १०८ जलमार्ग तयार केले जाणार असून, त्यातील दोन जलमार्ग सुरू झाले आहेत, असेही गडकरी यांनी सांगितले.

१५ दिवसांत टोलचे नवे धोरण

‘एनएचएआय’च्या टोलनाक्यांबाबत पुढील पंधरा दिवसांत नवे धोरण आणले जाणार आहे. त्यातून या टोलनाक्यांबाबत वाहनचालकांची कोणतीही तक्रार राहणार नाही, असे गडकरी यांनी सांगितले.

तसेच भविष्यात सॅटेलाइट बेस टोलवसुली केली जाणार असून त्यातून नागरिकांना टोलनाक्यांवर थांबावे लागणार नाही, असेही गडकरी म्हणाले.

अटल सेतूवरून बंगळुरूपर्यंत महामार्ग

अटल सेतूपासून पुण्याच्या रिंग रोडपर्यंत जाणारा नवा महामार्ग उभारला जाणार आहे. हा महामार्ग पुणे-मुंबई एक्सप्रेसपेक्षा रुंदीने तीन पट असेल. पुढे पुण्यापासून बंगळुरुपर्यंत नवा मार्ग उभारला जात आहे. त्यामुळे मुंबईपासून बंगळुरुला ५ तासांत जाता येईल.

 

 

 

१५ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-द्वितीया – 10:58:19 पर्यंत
  • नक्षत्र-विशाखा – 27:10:52 पर्यंत
  • करण-गर – 10:58:19 पर्यंत, वणिज – 24:10:42 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-सिद्वि – 23:31:06 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:24
  • सूर्यास्त- 18:54
  • चन्द्र-राशि-तुळ – 20:27:31 पर्यंत
  • चंद्रोदय- 21:00:00
  • चंद्रास्त- 07:29:00
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • जागतिक कला दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1673 : मराठा साम्राज्याचे सरदार प्रतापराव गुजर यांनी बहलोल खान पठाण विरुद्ध मोठी लढाई जिंकली.
  • 1892 : जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.
  • 1912 : आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले.
  • 1923 : मधुमेह असलेल्या लोकांसाठी इन्सुलिन सामान्यतः वापरण्यासाठी उपलब्ध झाली.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – मित्र राष्ट्रांनी नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्विक शहरावर हल्ला केला.
  • 1955 : डेस प्लेन्स, इलिनॉय येथे पहिले मॅकडोनाल्डचे रेस्टॉरंट उघडले.
  • 1994 : भारताची दर आणि व्यापारावरील सामान्य करार ( GATT ) प्रस्तावावर स्वाक्षरी झाली
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1452 : ‘लिओनार्डो डा विंची’ – इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 2 मे 1519)
  • 1469 : ‘गुरू नानक देव’ – शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू यांचा जन्म. (मृत्यू: 22 सप्टेंबर 1539)
  • 1707 : ‘लिओनार्ड ऑयलर’ – स्विस गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 18 सप्टेंबर 1783)
  • 1741 : चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक चार्ल्स विल्सन पील अमेरिकन यांचा जन्म. (मृत्यू: 22 फेब्रुवारी 1827)
  • 1893 : नरहर रघुनाथ तथा ‘न. र. फाटक’ – चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 21 डिसेंबर 1979)
  • 1894 : ‘निकिता क्रूश्चेव्ह’ – सोविएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 11 सप्टेंबर 1971)
  • 1901 : ‘अजय मुखर्जी’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
  • 1912 : ‘मल्हार सदाशिव’ तथा ‘बाबूराव पारखे’ – उद्योजक व वेदाभ्यासक यांचा जन्म. (मृत्यू: 13 जानेवारी 1997)
  • 1912 : ‘किम सुंग’ (दुसरे) – उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 8 जुलै 1994)
  • 1922 : ‘हसरत जयपुरी’ – गीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 17 सप्टेंबर 1999)
  • 1932 : ‘सुरेश भट’ – कवी यांचा जन्म. (मृत्यू: 14 मार्च 2003)
  • 1963 : ‘मनोज प्रभाकर’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1794 : ‘मोरेश्वर रामचंद्र पराडकर’ उर्फ मोरोपंत – पंडीतकवी यांचे निधन.
  • 1864 : ‘अब्राहम लिंकन’ – अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष यांची जॉन बूथ याने हत्या केली. (जन्म: 12 फेब्रुवारी 1809)
  • 1912 : ‘कप्तान एडवर्ड जे. स्मिथ’ – आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान यांचे निधन. (जन्म: 27 जानेवारी 1850)
  • 1980 : ‘जेआँ-पॉल सार्त्र’ – फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते यांचे निधन. (जन्म: 21 जून 1905)
  • 1990 : ‘ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन’ ऊर्फ ‘ग्रेटा गार्बो’ – हॉलिवूड अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 18 सप्टेंबर 1905)
  • 1995 : ‘पंडित लीलाधर जोशी’ – तत्कालीन मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री यांचे निधन.
  • 1998 : ‘पॉल पॉट’ – कंबोडियातील 20 लाख नागरिकांच्या हत्याकांडास जबाबदार असणारा ख्मेर रुजचा नेता यांचे निधन. (जन्म: 19 मे 1925)
  • 2013 : ‘वि. रा. करंदीकर’ – संत साहित्याचे अभ्यासक यांचे निधन. (जन्म: 27 ऑगस्ट 1919)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

श्री क्षेत्र टेरव येथे चैत्र पौर्णिमेला भाविकांच्या अलोट गर्दीत वार्षिक जत्रोत्सव जल्लोषात संपन्न.

   Follow us on        

चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरव गावातील पुरातन व सुप्रसिद्ध देवस्थानचे ग्रामदैवत श्री वाघजाई देवी आणि कुलदैवत आदिमाया आदिशक्ती श्री भवानी  देवी आहे. श्री कालकाई देवी ही माहेरवाशिणींची रक्षणकर्ती देवी म्हणून प्रसिद्ध आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत आणि नवसाला पावणाऱ्या देवता असा या देवतांचा लौकीक आहे.

रामवरदायिनी मंदिर मजरे दादर येथे दसपटकर शिंदे कदम मोकाशी यांची एकच जत्रा होत असे. परंतु अंदाजे एका शतकापासून रामवरदायिनी मंदिर दादर आणि श्री कुलस्वामी भवानी वाघजाई मंदिर श्री क्षेत्र टेरव अशा दोन वेगवेगळ्या जत्रांचे आयोजन चैत्रपौर्णिमेस केले जाते. या जत्रेविषयी एक दंतकथा आहे, एक वेळ कदम मोकाशी टेरकर यांच्या काही मनाबद्दल थोडी चूक झाली होती. त्यामुळे त्याच रात्री श्री रामवरदायिनी मंदिर दादर येथून निघून टेरवकरांनी आपल्या टेरव गावी जत्रा भरविली. एकमेकांची समजूत घालण्यात आली व पूर्वीप्रमाणे एकोप्याने वागू लागले, परंतु देवीचे कार्य सुरू केल्यामुळे ते चालू ठेवावे लागले, यावरून दसपटकरांचे एकमेकांवरचे प्रेम व सौख्य दिसून येते.

शक्ती, युक्ती, बुद्धी व भक्ती यांचा अजोड मिलाप असलेल्या संकटमोचक महाबली श्री हनुमान जन्मोत्सव शनिवार दिनांक १२ एप्रिल  रोजी चैत्र पौर्णिमेला रुढी परंपरेनुसार सुर्योदय झाल्यावर ब्राम्हण, मानकरी, ग्रामस्थ आणि पुजारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. दुपारी १२ वाजता ग्रामस्थांच्या उपस्थितीत दोन्ही मानकऱ्यानी श्रीफळाच्या तीन जोड्या श्री कुलस्वामिनी भवानी  मातेसमोर ठेवून  गाऱ्हाणे (आर्जव) घालून  पुजाऱ्यानी ते श्रीफळ वाढवून  प्रसाद म्हणून मानाप्रमाणे त्याचे वाटप केले. तसेच मंदिराच्या पोवळीबाहेर पूर्व दिशेस देवीचे देणे-मागणे  देवून उपस्थित ग्रामस्थ,  भाविकांना  पावट्याच्या घुगऱ्या व देवीच्या देण्या – मागण्याचा  प्रसाद वाटप करण्यात आला.  रुढी परंपरेनुसार सर्व पुजाविधी पार पडल्यावर पालखीमध्ये  कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी या देवतांची रुपी लावण्यात आली.

शतकाच्या दिशेने वाटचाल करणारा  श्री क्षेत्र टेरव गावचा चैत्रपोर्णिमा जत्रोत्सव म्हणजेच ग्रामस्थ, माहेरवाशिणी, चाकरमानी आणि भक्तांच्या आनंदाला उधाण आणणारा दिवस होय. माहेरवाशिणी, सगे सोयरे विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकानी या जत्रोत्सवात सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घेतला. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अन्य ग्रामस्थांप्रमाणे मुंबई, ठाणे, पुणे, सुरत इ. शहरात स्थायिक झालेले टेरकर आपल्या मायभूमीला विसरलेले नाहीत, ही  गावासाठी जमेची बाजू होय.

जत्रेनिमित्त घराघरात उल्हासाचे व आनंदाचे वातावरण होते. अंगणात, रस्त्यावर, पाय वाटेवर रांगोळ्या घालून विद्युतरोषणाईची आरास  करण्यात आली होती. तसेच मंदिराच्या आवारात कुरमुऱ्यांचे, शेंगदाण्याचे लाडू, चिक्की, मिठाई, सरबत, आईस्क्रीम, कलिंगड इ. तसेच पिपाणी, भिंगरी, भिरभिरे, मोटार, बॅट-बॉल अशी नाना तर्‍हेची दुकाने थाटण्यात आली होती. तसेच या वर्षी  बाल गोपालांसाठी  जंपिंग झपाक, मिकी माऊस, रिंग गेम या खेळांचेही आयोजन करण्यात आले होते.

संध्यकाळी ५ वाजता देवीना परिधान केलेल्या साड्या व पालखीस अर्पण केलेल्या पासोड्यांचा (वस्त्रांचा) रंगमंचावर लिलाव करण्यात आला.

चैत्र पौर्णिमा जत्रेस मोठ्या प्रमाणावर धार्मिक स्वरुप यावे आणि जत्रेची शोभा वाढावी यासाठी पंचक्रोशीतील मौजे कामथे व चिंचघरी येथील पालख्या वाजतगाजत मिरवणुकीने टेरव येथे रात्रौ १० वाजता पोहचल्या होत्या. पालख्या विद्युत रोषणाईंनी तसेच विविध प्रकारच्या फुलांनी  सजविण्यात आल्या होत्या. रूढी परंपरे प्रमाणे  चिंचघरीची पालखी श्री शिवराम गुरव यांच्या अंगणात  तर कामथे गावची पालखी श्री संतोष म्हालीम यांच्याअंगणात थांबली होती. कामथेच्या पालखीचे स्वागत  टेरवच्या   पालखीने  भारतीवाडीच्या होळीवर  करून तेथून या दोन्ही पालख्या श्री शिवराम गुरव यांच्या घराजवळ  चिंचघरीच्या पालखीस भेटल्या. ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत तिन्ही पालख्यांची मिरवणूक श्री शिवराम गुरव यांच्या घराजवळून मंदिराकडे मार्गस्थ झाली. तिन्ही पालख्या नाचत उंचावून एकमेकींना भेटवितानाचे दृश्य विलोभनीय, मनमोहक व नयनरम्य होते, ते पाहून असंख्य भाविक आनंदाने बेभान झाले व तो क्षण डोळ्याचे पारणे फेडणारा होता. या तीन पालख्यांची भेट पाहून मन अगदी भरुन आले होते. पालख्यांची भेट झाल्यावर प्रथम कामथे नंतर चिंचघरी व शेवटी टेरवची पालखी  छबेना काढून मंदिरात स्थानापन्न झाली. मंदिरात ओटी भरण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी झाली होती. कोकणातील प्रति तुळजापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेरवच्या श्री भवानी वाघजाई देवीच्या दर्शनासाठी तसेच वस्त्रालंकारांनी सजलेले देवीचे रूप पाहण्यासाठी भाविकांचा महापूर श्री क्षेत्र टेरव येथे लोटला होता. या वार्षिक जत्रोत्सवास चैत्रावली  असेही संबोधले जाते. ग्रामदेवतांच्या पालख्या, करमणुकीची साधने, खाद्य व प्रसादाची दुकाने,  आणि विविध खेळांचे प्रदर्शन ही या जत्रेची विशेषता होय.

तिन्ही पालख्या मंदिरात स्थानापन्न झाल्यावर रात्रौ  कोल्हापुर येथील एका पेक्षा एक अप्सरा ह्या मराठी लोकधरेने सजलेल्या आणि महाराष्ट्राच्या लावणीने बहरलेला मराठी व  हिंदी गीतांच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही पालख्यांची पूजा व सन्मान केल्यावर आपआपल्या गावी मार्गस्थ झाल्या, त्यावेळी  श्री क्षेत्र टेरवची पालखी मंदिराच्या उत्तरेच्या प्रवेशद्वारापर्यंत निरोप देण्यासाठी नेण्यात आली आणि अशाप्रकारे जत्रोत्सवाची सांगता करण्यात आली. हनुमान जन्मोत्सवा दिनी वार्षिक जत्रोत्सव उत्साहात व आनंदाने संपन्न झाला.

 

१४ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-प्रथम – 08:27:45 पर्यंत
  • नक्षत्र-स्वाति – 24:13:56 पर्यंत
  • करण-कौलव – 08:27:45 पर्यंत, तैतुल – 21:43:44 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-वज्र – 22:36:35 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:24
  • सूर्यास्त- 18:54
  • चन्द्र-राशि-तुळ
  • चंद्रोदय- 20:07:59
  • चंद्रास्त- 06:52:59
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
  • राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस National Fire Service Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1661 : प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने दुर्बिणीसाठी टेलिस्कोप हा शब्द प्रथम वापरला.
  • 1665 : पुरंदरच्या प्रसिद्ध वेढादरम्यान दिलरखान पठाणने वज्रमल किल्ला ताब्यात घेतला.
  • 1736 : चिमाजीअप्पाने जंजिऱ्याच्या सिद्धीसाताचा पराभव केला.
  • 1865 : जॉन विल्क्स बूथने अब्राहम लिंकनवर गोळी झाडली. दुसऱ्या दिवशी लिंकनचा मृत्यू झाला.
  • 1912 : आर.एम.एस. टायटॅनिक रात्री 11:40 वाजता (स्थानिक वेळेनुसार) उत्तर अटलांटिक महासागरातील एका हिमखंडाला धडकले.
  • 1944 : दुपारी 4:50 वाजता, बॉम्बे डॉक्सवर फोर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजावर मोठा स्फोट झाला, 300 लोक ठार झाले आणि सुमारे 2 कोटी पौंडचे आर्थिक नुकसान झाले.
  • 1995 : टेबल टेनिसमधे सलग 6670 रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1629 : ‘क्रिस्टियन हायगेन्स’ – डच गणितज्ञ, खगोलविद्‌ आणि पदार्थवैज्ञानिक, लंबकाच्या घड्याळाचा शोध यांचा जन्म. (मृत्यू: 8 जुलै 1695)
  • 1891 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म. (मृत्यू: 6 डिसेंबर 1956)
  • 1914 : ‘शांता हुबळीकर’ – अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 17 जुलै 1992)
  • 1919 : ‘शमशाद बेगम’ – पार्श्वगायिका यांचा जन्म. (मृत्यू: 23 एप्रिल 2013)
  • 1919 : ‘के. सरस्वती अम्मा’ – भारतीय लेखक आणि नाटककार यांचा जन्म. (मृत्यू: 26 डिसेंबर 1975)
  • 1922 : मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब यांचा जन्म. (मृत्यू: 18 जून 2009)
  • 1927 : ‘द. मा. मिरासदार’ – विनोदी लेखक यांचा जन्म.
  • 1942 : ‘मार्गारेट अल्वा’ – केंद्रीय मंत्री व राजस्थानच्या राज्यपाल यांचा जन्म.
  • 1943 : ‘रामदास फुटाणे’ – वात्रटिकाकार यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1950 : योगी रमण महर्षी तथा वेंकटरमण अय्यर – भारतीय तत्त्ववेत्ते समाधिस्थ झाले. (जन्म: 30 डिसेंबर 1879)
  • 1962 : भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मृत्यु. (जन्म: 15 सप्टेंबर 1860)
  • 1963 : केदारनाथ पांडे तथा ‘राहूल सांकृतायन’ – इतिहासकार यांचे निधन. (जन्म: 9 एप्रिल 1893)
  • 1997 : ‘चंदू पारखी’ – चित्रपट आणि नाट्य अभिनेते यांचे निधन.
  • 2013 : ‘राम प्रसाद गोएंका’ – उद्योगपती यांचे निधन. (जन्म: 1 मार्च 1930)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Mumbai Local: मध्य रेल्वे मार्गावरील १४ लोकल गाड्यांच्या जागी एसी लोकल्स धावणार; वेळापत्रक इथे वाचा

Mumbai Local: मुंबईचे तापमान अधिकच वाढू लागले आहे. त्यामुळे लोकल प्रवासही अधिक त्रासदायक ठरत आहे. अशा वेळी प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येतेय, मध्य रेल्वेवर लवकरच १४ नॉन एसी गाड्यांचे रूपांतर एसी गाड्यांमध्ये होणार आहे.. विशेष म्हणजे येत्या १६ एप्रिलपासून ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे.
खालील गाड्या दिनांक १६ एप्रिलपासून रविवार आणि सुट्टीचे दिवस वगळता एसी लोकल म्हणून चालविण्यात येणार आहेत.
Down Direction ( From CST)
मार्ग निर्गमन आगमन
विद्याविहार – कल्याण ६:२६ ७:२५
सीएसएमटी – बदलापूर ९:०० १०:३२
सीएसएमटी – ठाणे १२:२४ १३:२०
सीएसएमटी – ठाणे १४:२९ १५:२५
सीएसएमटी – ठाणे १६:३८ १७:३५
सीएसएमटी – ठाणे १८:४५ १९:४२
सीएसएमटी – बदलापूर २१:०८ २२:५६

Konkan Railway: पावसाळ्यात वेग मंदावणाऱ्या ‘त्या’ ३२ गाड्यांच्या प्रवासावर ‘सुपरफास्ट’चा अधिभार कशाला?

   Follow us on        
मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर सुरक्षिततेच्या कारणांसाठी अंगिकारलेल्या पावसाळी वेळापत्रकामुळे मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा वेग मंदावतो. परिणामी प्रवासाचा वेळ दोन ते चार तासांनी वाढतो. असे असतानाही मेल-एक्स्प्रेस ट्रेनच्या तिकिटात ‘सुपरफास्ट’चा अधिभार प्रवाशांकडून वसूल करण्यात येतो. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात हे वेळापत्रक लागू होण्यापूर्वी रेल्वेने तिकीट यंत्रणेत बदल करावा, अशी मागणी कोकण विकास समितीने इमेलद्वारे केली आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून कोकण मार्गावर नियमित ट्रेन व्यतिरिक्त ३०० हून अधिक एक्स्प्रेस फेऱ्या चालवण्यात येत आहेत. कोकणातील अतितीव्र पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे मार्गावर ट्रेनसाठी तशी 50 किलोमीटर ची वेगमर्यादा घालण्यात येते. कोकण रेल्वेवर १० जून ते ३१ ऑक्टोबरदरम्यान १४४ दिवस पावसाळी वेळापत्रक लागू होते. वेग कमी झाल्याने प्रवासाचा वेळ वाढत असला तरीही तिकिटांवर अतिजलदचा अधिभार प्रवाशांकडून घेतला जातो.
रेल्वेच्या २००६ च्या १०५ कमर्शियल परिपत्रकात, ५५ किलोमीटर प्रति तास वेगापेक्षा कमी ट्रेनचा समावेश ‘सुपरफास्ट’ म्हणून करू नये. त्यामुळे या ट्रेनवर ‘सुपरफास्ट’ गाड्यांचा अधिभार लावू नये, असे स्पष्ट सांगितले आहे. असे असतानाही हा अधिभार घेतला जात असल्याकडे प्रवासी संघटनांनी लक्ष वेधले आहे.
नियमाप्रमाणे सुपरफास्ट ट्रेचा वेग ताशी किमान ५५ किमी असणे आवश्यक आहे. तेवढा वेग नसणाऱ्या गाड्यांसाठी सुपरफास्ट अधिभार घेणे योग्य नाही. आधीच कोकण रेल्वेच्या भाड्यावर ४० टक्के अधिभार असताना त्यात ‘सुपरफास्ट’ अधिभाराचा भर पडत आहे. रेल्वे प्रशासनाने या निवेदनाचा विचार करून कोकण रेल्वे मार्गावर सुपरफास्ट म्हणून चालविण्यात येणाऱ्या ३२ गाड्यांच्या प्रवासावरील हा अधिभार रद्द करावा अशी मागणी कोकण रेल्वे विकास समितीतर्फे जयवंत दरेकर आणि अक्षय महापदी यांनी केली आहे.
Sr. No. Train No Name Owner Zone Actual Distance (KM)
Average Speed (kmph)
1 12051 Janshatabdi Express Central Railway 590 52
2 12052 Janshatabdi Express Central Railway 590 50
3 22119 Tejas Express Central Railway 590 53
4 22120 Tejas Express Central Railway 590 51
5 12133 Mumbai Mangaluru Express Central Railway 905 51
6 12134 Mangaluru Mumbai Express Central Railway 905 51
7 22113 LTT Kochuveli Express Central Railway 1517 51
8 22114 Kochuveli LTT Express Central Railway 1517 49
9 22115 LTT Karmali AC Express Central Railway 546 52
10 22116 Karmali LTT AC Express Central Railway 546 49
11 22149 Ernakulam Pune Express Central Railway 1372 50
12 22150 Pune Ernakulam Express Central Railway 1372 51
13 12223 LTT Ernakulam Duronto Express Central Railway 1306 57
14 12224 Ernakulam LTT Duronto Express Central Railway 1306 54
15 20111 Konkan Kanya Express Konkan Railway 590 47
16 20112 Konkan Kanya Express Konkan Railway 590 51
17 22629 Dadar Tirunelveli Express Southern Railway 1765 48
18 22630 Tirunelveli Dadar Express Southern Railway 1765 53
19 12619 Matsyagandha Express Southern Railway 895 48
20 12620 Matsyagandha Express Southern Railway 895 50
21 12201 Garibrath Express Southern Railway 1516 51
22 12202 Garibrath Express Southern Railway 1516 50
23 2197 Coimbatore Jabalpur Special
West Central Railway
2219 54
24 2198 Jabalpur Coimbatore Special 2220 54
25 22475 Hisar Coimbatore AC Express
North Western Railway
2790 54
26 22476 Coimbatore Hisar AC Express 2790 55
27 20931 Kochuveli Indore Express Western Railway 2300 53
28 20932 Indore Kochuveli Express Western Railway 2300 52
29 20909 Kochuveli Porbandar Express Western Railway 2426 53
30 20910 Porbandar Kochuveli Express Western Railway 2426 51
31 20923 Tirunelveli Gandhidham Humsafar Express Western Railway 2410 54
32 20924 Gandhidham Tirunelveli Humsafar Express Western Railway 2409 53

Mumbai Local: ‘फेविकॉल’ च्या जाहिरातीवरून नवा वाद

   Follow us on        
Western Railway: वांद्रे (पश्चिम) येथील वांद्रे रिक्लेमेशन जंक्शनवरील एका होर्डिंग वरील जाहिरातीवर पश्चिम रेल्वे प्रशासनाने आक्षेप घेतला आहे. या जाहिरातीत एका जुन्या काळातील प्रतिमा होती, ज्यामध्ये गर्दीने भरलेल्या मुंबई लोकल गाड्या फूटबोर्डवरून लटकलेल्या प्रवाशांना दाखवण्यात आले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते या जाहिरातीत भारतीय रेल्वे, विशेषतः मुंबई लोकल गाड्यांचे अपमानजनक आणि दिशाभूल करणाऱ्या पद्धतीने चित्रण केले आहे.
शुक्रवारी पश्चिम रेल्वेने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) द्वारे व्यवस्थापित केलेल्या वांद्रे येथील एका होर्डिंगवर औपचारिक आक्षेप घेतल्यानंतर फेविकॉलच्या जुन्या जाहिरातीमुळे वाद निर्माण झाला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी हे होर्डिंग, तसेच त्यासारख्या सर्व जाहिरातींमध्ये असलेली प्रतिमा त्वरित काढून टाकण्याची आणि “निर्णयातील चूक” म्हणून वर्णन केल्याबद्दल औपचारिक माफी मागण्याची मागणी केली आहे.
“आपल्या रेल्वेमध्ये अभूतपूर्व परिवर्तन होत आहे. चुकीचे प्रतिनिधित्व किंवा नकारात्मक चित्रण पूर्णपणे अस्वीकार्य आहे. आम्ही या जाहिरातीला तीव्र आक्षेप घेतला आहे आणि ब्रँडला ती त्वरित मागे घेण्याची विनंती केली आहे,” असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गेल्या ११ वर्षांत, मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या आहेत, आधुनिक रेकची सुरुवात, डीसी ते एसी सिस्टीममध्ये रूपांतर, वातानुकूलित लोकल ट्रेन सुरू करणे आणि प्रवाशांची सुरक्षितता आणि सोय सुधारण्यासाठी अनेक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाल्या आहेत. पश्चिम आणि मध्य रेल्वे एकत्रितपणे दररोज ७० लाखांहून अधिक प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सुविधा देत आहेत. मात्र जुना फोटो वापरून केलेल्या अशा जाहिरातीमुळे जनतेत चुकीचा संदेश जातो असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.

१३ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-प्रथम – पूर्ण रात्र पर्यंत
  • नक्षत्र-चित्रा – 21:11:08 पर्यंत
  • करण-बालव – 19:11:07 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-हर्शण – 21:37:48 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:25
  • सूर्यास्त- 18:53
  • चन्द्र-राशि-कन्या – 07:39:21 पर्यंत
  • चंद्रोदय- 19:17:00
  • चंद्रास्त- चंद्रोस्त नहीं
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • जालियानवाला बाग हत्याकांड
महत्त्वाच्या घटना :
  • 1648 : दिल्ली येथील लाल किल्ला बांधण्यात आला.
  • 1731 छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यातील राज्याच्या सीमेचा वाद वारणा तहाने मिटला.
  • 1849 : हंगेरी देश प्रजासत्ताक बनले.
  • 1919 : जालियनवाला बाग हत्याकांड, 379 लोक ठार आणि 1,200 जखमी.
  • 1942 : व्ही. शांताराम यांनी प्रभात फिल्म कंपनी सोडली.
  • 1948 : भुवनेश्वरला ओरिसा राज्याची राजधानी बनवण्यात आली.
  • 1960 : अमेरिकेने ट्रान्झिट 1-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपित केला.
  • 1997 : टायगर वुड्स मास्टर्स स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण गोल्फर ठरला.
  • 2000 : प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री लारा दत्ता ह्या विश्वसुंदरी बनल्या.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1743 : ‘थॉमस जेफरसन’ – अमेरिकेचे ३रे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 4 जुलै 1826)
  • 1895 : ‘वसंत रामजी खानोलकर’ – भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे यांचा जन्म. (मृत्यू: 29 ऑक्टोबर 1978)
  • 1905 : ‘ब्रूनो रॉस्सी’ – पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे होणार्‍या वैश्विक किरणांच्या विकीरणा विषयी संशोधन करणारे इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू: 23 नोव्हेंबर 1993 〉
  • 1906 : ‘सॅम्युअल बेकेट’ – आयरिश लेखक, नाटककार आणि कवी यांचा जन्म.
  • 1922 : टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांचा जन्म. (मृत्यू: 14 ऑक्टोबर 1999)
  • 1940 : ‘नजमा हेपतुल्ला’ – राज्यसभा सदस्य यांचा जन्म.
  • 1956 : ‘सतीश कौशिक’ – अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1963 : ‘गॅरी कास्पारॉव्ह’ – रशियन बुद्धिबळपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1951 : औंध संस्थानचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे निधन. (जन्म: 24 ऑक्टोबर 1868)
  • 1973 : ‘बलराज सहानी’ – अभिनेता दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 1 मे 1913)
  • 1973 : ‘अनंत काकबा प्रियोळकर’ – भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक यांचे निधन. (जन्म: 5 सप्टेंबर 1895)
  • 1988 : ‘हिरामण बनकर’ – महाराष्ट्र केसरी यांचे निधन.
  • 1999 : ‘डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले’ – कृषितज्ज्ञ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांचे निधन.
  • 2000 : ‘बाळासाहेब सरपोतदार’ – चित्रपट निर्माते व वितरक यांचे निधन.
  • 2008 : ‘दशरथ पुजारी’ – संगीतकार यांचे निधन. (जन्म: 30 ऑगस्ट 1930)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

१२ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पौर्णिमा – 29:54:32 पर्यंत
  • नक्षत्र-हस्त – 18:08:15 पर्यंत
  • करण-विष्टि – 16:38:45 पर्यंत, भाव – 29:54:32 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-व्याघात – 20:38:57 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:26
  • सूर्यास्त- 18:53
  • चन्द्र-राशि-कन्या
  • चंद्रोदय- 18:29:00
  • चंद्रास्त- 30:18:59
  • ऋतु- वसंत

जागतिक दिवस :
  • वाचण्याचा दिवस Drop Everything And Read Day
  • मानवी अंतराळ उड्डाण दिवस Human Space Flight Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1606 : ग्रेट ब्रिटनने युनियन जॅकचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकार केला.
  • 1935 : प्रभातचा चंद्रसेना हा हिंदी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
  • 1945 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांचे पदावर असताना निधन झाले.
  • 1955 : डॉ. जोनास साल्क यांनी विकसित केलेली पोलिओ लस सुरक्षित आणि प्रभावी घोषित करण्यात आली.
  • 1961 : रशियाचा युरी गागारिन हे अंतराळात प्रवास करणारे पहिले अंतराळवीर ठरले, त्यांनी 108 मिनिटांत पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण केली.
  • 1967 : कैलाशनाथ वांचू भारताचे 10 वे सरन्यायाधीश बनले.
  • 1981 : स्पेस शटलचे पहिले प्रक्षेपण (कोलंबिया) झाले: एसटीएस-१ मोहीम.
  • 1988 : SEBI ची स्थापना.
  • 1997 : भारताचे पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला.
  • 1997 : पूर्व प्राथमिक प्रवेशासाठी मुलांची किंवा पालकांची मुलाखत घेण्यास मनाई करणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले.
  • 1998 : सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.
  • 2009 : झिम्बाब्वेने अधिकृतपणे झिम्बाब्वे डॉलरचे चलन सोडून दिले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 599 : 599 ई.पुर्व : जैनांचे 24 वे तीर्थंकर महावीर यांचा जन्म.
  • 1382 : ‘राजा संग्रामसिंग’ ऊर्फ राणा संग – मेवाडचा महापराक्रमी यांचा जन्म.
  • 1871 : ‘वासुदेव गोविंद आपटे’ – लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार यांचा जन्म. (मृत्यू: 2 फेब्रुवारी 1930)
  • 1910 : ‘पु. भा. भावे’ – सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू: 13 ऑगस्ट 1980)
  • 1914 : कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव – संवाद व गीतलेखक यांचा जन्म. (मृत्यू: 28 फेब्रुवारी 1995)
  • 1917 : ‘विनू मांकड’ – सलामीचे फलंदाज तसेच डावखुरे मंदगती गोलंदाज यांचा जन्म. (मृत्यू: 21 ऑगस्ट 1978)
  • 1932 : ‘लक्ष्मण कादिरमगार’ – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री तामिळ नेते यांचा जन्म.
  • 1943 : ‘सुमित्रा महाजन’ – केंद्रीय मंत्री यांचा जन्म.
  • 1954 : ‘सफदर हश्मी’ – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 2 जानेवारी 1989)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1720 : बाळाजी विश्वनाथ भट – तथा पहिला पेशवा यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1662)
  • 1817 : ‘चार्ल्स मेसिअर’ – फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 26 जून 1730)
  • 1906 : महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्‍न भट्टाचार्य यांचे निधन. (जन्म: 22 फेब्रुवारी 1836)
  • 1912 : कारा बार्टन – अमेरिकन रेड क्रॉस च्या स्थापक यांचे निधन. (जन्म: 25 डिसेंबर 1821)
  • 1945 : ‘फ्रँकलिन डी. रुझवेल्ट’ – अमेरिकेचे 32 वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 30 जानेवारी 1882)
  • 2001 : ‘देवांग मेहता’ – NASSCOM चे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 10 ऑगस्ट 1960)
  • 2001 : ‘हार्वे बॉल’ – स्माईली चे जनक यांचे निधन. (जन्म: 10 जुलै 1921)
  • 2001 : हिंदकेसरी पै. चंबा मुत्‍नाळ यांचे निधन.
  • 2006 : ‘राजकुमार’ – कन्नड चित्रपट अभिनेता तसेच गायक यांचे निधन. (जन्म: 24 एप्रिल 1929)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Tatkal Booking Time Changed: रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंग वेळेत बदल होणार?

   Follow us on        
Tatkal ticket timing changed: रेल्वेच्या तात्काळ आरक्षण वेळेत बदल झाला असल्याची माहिती सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित viral होत आहे. या माहिती प्रमाणे एसी श्रेणीसाठी (AC Classes) तात्काळ आरक्षणासाठी सध्याची वेळ जी सकाळी, १० वाजता आहे ती सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. तर नॉन-एसी क्लास म्हणजे स्लीपर, सेकंड सीटिंग श्रेणीच्या आरक्षणाची सध्याची वेळ जी सकाळी ११ वाजताची आहे ती बदलून दुपारी १२ वाजता करण्यात येणार आहे. या माहितीप्रमाणे येत्या दिनांक १५ एप्रिल पासून हा बदल अंमलात आणला जाणार आहे.
मात्र समाज माध्यमावर व्हायरल होत असलेला हा संदेश खोटा असल्याची माहिती समोर येत आहे. Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) ने तात्काळ आरक्षणात असा कोणताही बदल करण्यात येणार नसून हा संदेश फेक असल्याचे जाहीर केले आहे.  “एक्स”  वरील अधिकृत खात्यावर या आशयाची पोस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search