Author Archives: Kokanai Digital

‘वंदे भारत’चा नवा स्लिपर व्हर्जन लवकरच; फोटो येथे पहा

Sleeper Version Of Vande Bharat : आरामदायी, वेग आणि अत्याधुनिक अशी ओळख असलेल्या वंदे भारतचा प्रवास आणखी आरामदायी होणार आहे. ट्रेनमध्ये नवा स्लिपर व्हर्जन येणार आहे.
केंदीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या स्वरुपातील स्लिपर व्हर्जनचे फोटो शेअर केले आहेत. ट्रेनमधील स्लिपर कोच अतिशय आरामदायी असून, यामुळे प्रवाशांना सुखद अनुभव मिळणार आहे.
नव्याने प्रस्तावित स्लिपर कोच पुढील वर्षाच्या (२०२४) सुरवातीला येणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी म्हटले आहे.

Loading

पुणे-विजयदुर्ग एसटी बस प्रवासात वाहकाचे चांगले वर्तन; भारावलेल्या प्रवाशाने लिहिले आगाराला कौतुकाचे पत्र

सिंधुदुर्ग :एसटीच्या अस्तित्वात चालकासोबतच वाचकाचा (कंडक्टर) चा वाटा पण महत्त्वाचा मानला जातो. वाहकाची वागणूक जर विनम्र आणि सोज्वळ असेल तर प्रवासी एसटीला प्राधान्य देतो. त्यामुळे वाहकाने गर्दी आणि कामाच्या ताणला न कंटाळता अगदी प्रवाशांबरोबर चांगले वागणे गरजेचे आहे.

कित्येक वेळा एसटीच्या प्रवासात खूप चांगले अनुभव वाहकांकडून प्रवाशांना येत असतात. असाच एक अनुभव पुणे ते विजयदुर्ग या मार्गावर गणेश चतुर्थीदरम्यान प्रवास करणार्‍या एका प्रवाशाला आला. वाहकाच्या प्रवाशांना दिल्या गेलेल्या चांगल्या वागणुकीमुळे भारावून गेलेल्या या प्रवाशाने विजयदुर्ग आगाराला चक्क पत्र लिहून त्या वाहकाचे कौतुक केले आहे.

गाडी मध्ये गर्दी असूनही वाहक शिरसाट यांचा व्यवहार खूपच चांगला आणि प्रवाशांना मदत करणारा होता. अशा वाहकांमुळे एसटीची प्रतिष्ठा वाढत असल्याचे त्याने या पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने या पत्रास एसटीचा गौरव मानून आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वर प्रसिद्ध केले आहे.

Loading

कोकणात दहशतवादविरोधी पथकाची मोठी कारवाई; तीन बांग्लादेशी घुसखोरांना अटक

चिपळूण : चिपळूण येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बांगलादेशातून भारतात घुसखोरी करून आलेल्या तिघांना चिपळूण शहरानजीकच्या खेर्डी येथून ताब्यात घेण्यात आले. गेले काही महिने ते तेथे वास्तव्यास होते. त्यांच्यावर रत्नागिरीतील दहशतवादविरोधी पथकाने (Anti Terrorism Squad Ratnagiri) कारवाई करून बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.
या तिघांकडून काही कागदपत्रे हस्तगत केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता ६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. गुल्लू हुसेन मुल्ला (५६), जिलानी गुल्लू मुल्ला (२६), जॉनी गुल्लू मुल्ला (२९, तिघेही बांगलादेश) अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत.
त्यांच्याकडून मोबाईल, आधारकार्ड, पॅनकार्ड व निवडणूक ओळखपत्र अशी कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. बांगलादेशहून भारतात अवैधरित्या प्रवेश करून मुलकी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय खेर्डी मोहल्ला परिसरात ते काही महिन्यांपासून वास्तव्य करत होते.
याविषयीची रत्नागिरी दहशतवादविरोधी पथकाला माहिती मिळताच त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने मंगळवारी (ता. ३) रात्री १०.३० वा. कारवाई करून तिघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर बुधवारी त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पारपत्र अधिनियम ३ (ए) ६, परकीय नागरिक आदेश कायदा ३ (१) (ए) व विदेशी व्यक्ती अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
रत्नागिरी दहशतवादविरोधी पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत पाटील, पोलिस हेडकॉन्स्टेबल उदय चांदणे, आशिष शेलार यांनी ही कारवाई केली. या तिघांना चिपळूण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय पाटील हे करीत आहेत.
मुळचे बांगलादेशी असलेले गुल्लू मुल्ला व त्याच्या दोन्ही मुलांकडे भारतीय नागरिकांप्रमाणे आधारकार्ड, निवडणूक मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड अशी कागदपत्रे आढळून आली आहेत. त्यामुळे नागरिकत्त्व नसताना देखील ही कागदपत्रे कोणत्या आधारे त्यांनी मिळवली, तसेच या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी कोणकोणते व्यवहार केले, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

Loading

नितीन गडकरी यांच्या कारकीर्दीवर चित्रपट येतोय; पोस्टर प्रदर्शित

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशीही आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच ‘गडकरी’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. ‘गडकरी’मध्ये नितीन गडकरींची रीं भूमिका कोण साकारेल? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘गडकरी’ या चित्रपटाच्या ट्रेलरची आणि टीझरची प्रेक्षक आता उत्सुकतेने वाट बघत आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनुराग भुसारी म्हणतात, ‘’नितीन गडकरी यांची राजकारणातील कारकिर्द निश्चितच उल्लेखनीय आहे. अभ्यासू, प्रभावी वक्ता, कणखर, निरपेक्ष विचार करणारा नेता, रस्ता सुधारणा प्रवर्तक. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या या विविध बाजू जनतेला माहितच आहेत. समाज कल्याणाचा ध्यास असणाऱ्या या नेत्याचा राजकारणातील प्रवास तसा अनेकांना माहित आहे. मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य व तरुण काळ तितकाच रंजक आहे. अशा या नेत्याचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.’’ 27 ॲाक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे अनुराग भुसारी, मिहिर फाटे सहनिर्माते आहेत.

Loading

आजपासून पुढील चार दिवसांत कोकण रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचाच; ‘या’ गाड्यांच्या आरंभ व अंतिम स्थानकांत बदल

Konkan Railway News: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनजीकच्या वाडी बंदर यार्डामधील रेल्वे लाईन 3 ते 7 साठी कनेक्टिव्हिटीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम दिनांक ०२ ऑक्टोबर ते ०८ ऑक्टोबर पर्यंत चालणार असून मुंबई सीएसएमटी स्थानकावरून सुटणाऱ्या काही गाड्यांवर त्याचा परिणाम होणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावरील खालील गाड्यांवर या कामाचा परिणाम होणार आहे. 
१) Train no. 22230 Madgaon Jn. – Mumbai CSMT Vande Bharat Express
दिनांक ०५ ऑक्टोबरला ही गाडी आपला प्रवास दादर या स्थानकावर संपविणार आहे. 
२) Train no. 11004 Sawantwadi Road – Dadar Tutari Express 
दिनांक ०५ आणि ०६ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणाऱ्या या गाड्यांचा प्रवास पनवेल स्थानकावर संपविण्यात येणार आहे.
३) Train no. 12052 Madgaon Jn. – Mumbai CSMT Janshatabdi Express 
दिनांक ०७ ऑक्टोबरला ही गाडी आपला प्रवास पनवेल या स्थानकावर संपविणार आहे. 
४) Train no. 11003 Dadar – Sawantwadi Road Tutari Express
दिनांक ०७ आणि  ०८ ऑक्टोबर रोजी ही गाडी आपला प्रवास पनवेल या स्थानकावरून ०१:१५ वाजता सुरु करणार आहे. 
५) Train no. 12051 Mumbai CSMT – Madgaon Jn.  Janshatabdi Express 
दिनांक ०८ ऑक्टोबर रोजी वरील गाडी पनवेल या स्थानकावरून आपला प्रवास सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी सुरु जाणार आहे. 

Loading

मालगाडी अपघात | “…. तर कोकणातून परतणाऱ्या प्रवासांचे हाल झाले नसते.”

मालगाडी अपघातानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुक चुकीच्या पद्धतीने हाताळली गेल्याचा आरोप.. 

मुंबई :गेल्या आठवड्यात कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती त्याचे कारण साफ आणि स्वच्छ होते. पनवेल स्टेशनच्या पुढे दोन फरलांगावरती नवीन पनवेल जुना पनवेलच्या पुलाखाली मालगाडी घसरली पण ही मालगाडी घसरण्याचे कारण आता पुढे येत आहे तेथे असलेल्या नाल्यावर टाकलेले पाच स्लीपर चुकीच्या पद्धतीने टाकले गेले होते त्या स्लीपर च्या वरती अचानक लोड आल्यामुळे रेल्वे रूळ वाकले आणि मालगाडी घसरली असे समजते परंतु त्याच वेळेला कोकण रेल्वेच्या प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून जवळपास च्या लाईन वरून कोकण रेल्वेची दुसरी गाडी येत नव्हती अन्यथा हा अपघात भीषण असा झाला असता.

या अपघाताची पार्श्वभूमी अशी आहे अगोदर शनिवारपासून हार्बर लाइन मार्गावरती बेलापूर ते पनवेल मेगाब्लॉक घेण्यात आला होता आणि तो मेगाब्लॉक चालू असताना बेलापूर पासून रेल्वे मार्ग पनवेल पर्यंत बंद करण्यात आला होता. परंतु ज्या वेळेला अपघात घडला त्यावेळेला कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत चालू झाली असती परंतु मालगाडीमुळे ही वाहतूक पुढे होऊ शकणार नव्हती याचे निदान स्पष्ट झाल्यानंतर त्वरित मेगा ब्लॉक रद्द करणे गरजेचे होते व कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या गाड्या पनवेल पर्यंत आणून तिथे रिकाम्या करून त्या गाड्या कर्जत उरण मार्गावर वळवून पुढे उभ्या करून ठेवता आल्या असत्या, परंतु हे न करता सरळ पुढे गाड्या येऊन देण्याचा मूर्खपणा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला यावर कोणाचाच लक्ष जात नाही आहे कसे? पनवेलच्या पुढे रेल्वे घसरली म्हणजे पनवेल पर्यंत गाड्या आरामात येऊ शकत होत्या .पनवेलला एकंदरीत तीन गाड्या येऊन लागू शकत होत्या या तीन गाड्या रिकाम्या करून पुन्हा कुठेतरी पुढे कर्जत उरण मार्गावरती पाठवून येणाऱ्या गाड्यांना पनवेल पर्यंत येऊ द्यायला पाहिजे होते व मेगाब्लॉक रद्द करून प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन तीन चार वरून ठाणा गोरेगाव आणि सीएसटी वडाळा अशा लोकल सेवा चालू ठेवल्या पाहिजे होत्या परंतु मेगा ब्लॉक का रद्द केला गेला नाही ?तसेच या गाड्या पनवेल पर्यंत येऊ शकत होत्या पनवेलला त्या गाड्या रिकाम्या करून त्या गाड्या कर्जत उरण मार्गावरती नेऊन कुठेतरी सायडींगला उभ्या करून ठेवल्या पाहिजे होत्या तेवढी जर समय सुचकता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दाखवली असती तर किमान गणपतीला गावाला गेलेले सगळे चाकरमानी सुखरुप पणे पनवेल पर्यंत येऊ शकले असते आणि मेगा ब्लॉक रद्द केला असता तर पनवेल पासून पुढे प्रवास करून लोक सुखरूप घरी गेली असती.तीस तीस तास रखडपट्टी झाली नसती 

 त्यात आणखीन एक शहाणपणा केला तो म्हणजे जनशताब्दी एक्सप्रेस लोढा मिरज मार्गे वळवली त्यामुळे पनवेलच्या पुढे मडगाव पर्यंत ती गाडी कुठेही स्टॉप वर थांबणार नव्हती ती गाडी लोढा मिरज मार्गे मडगाव करून मडगावला गेली मडगावला गेल्यानंतर तिथे नेत्रावती एक्सप्रेस तिथल्या लोकांना पाच मिनिटांसाठी चुकली मडगावच्या अधिकाऱ्यांनी पाच मिनिटं नव्हे तर अर्धा तास तरी नेत्रावती एक्सप्रेस थांबवुन ठेवली असती तर मडगाव पासून ते चिपळूण पर्यंतच्या प्रवाशांना नेत्रावती मध्ये जागा करून घेता आली असती कारण गाडीचा खोळंबा झाल्यामुळे नेत्रावतीचीअनेक तिकिटे रद्द झालेली होती आणि प्रवास फक्त पाच तासाचा होता रेल्वेच्या ह्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे तिसपस्तिस तास मनस्ताप प्रवाशांनी का बरं सोसावा? याचे उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी देणे गरजेचे आहे आणि या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करणे गरजेचे आहे असे मला वाटते.

कोकण रेल्वेचे रेल्वे रूळ हार्बर लाइन मार्गावरती आज तीस वर्षे झाली अजून जोडलेले नाहीत ते जर जोडले असते तर गाडी ठाणा हार्बर मार्गे सुद्धा नेता आली असती याबाबतचे पत्र मी दोन ऑगस्ट २३ रोजी पा ठवलेले होते आता तरी गंभीर होऊन कोकण रेल्वे मार्ग हार्बर लाइन ला जोडला जावा जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोकण रेल्वे वाशी ठाणा मार्गे सीएसटी पर्यंत पोहोचू शकते आपला एक शेअर कोकण रेल्वेचे भविष्य बदलू शकते.

मे महिन्यात गणपती मध्ये वाशी बेलापूर येथून थेट केरळ कन्याकुमारी पर्यंत गाड्या सोडता येतील गणपती मध्ये बेलापूर वाशी येथून थेट गाड्या सावंतवाडी चिपळूण रत्नागिरी ला सोडता येतील

श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर.

मोबाईल क्रमांक -9404135619

Loading

एसटीची मुंबई ते बांदा स्लीपर बससेवा आजपासून सुरु; वेळापत्रक, थांबे आणि तिकीटदर येथे जाणून घ्या.

मुंबई : एसटीची मुंबई ते बांदा अशी नवीन शयनयान बस सेवा आजपासून म्हणजे दिनांक 5 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होत आहे. ही गाडी संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी मुंबई सेंट्रल या स्थानकावरून सुटणार आहे. दुसर्‍या दिवशी सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी ती बांदा या ठिकाणी पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ती बांदा शहरातून संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून ती मुंबई सेंट्रलला ९ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल 
ही गाडी मुंबई गोवा महामार्गावरून न चालविता पुणे सातारा मार्गे चालविण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणातील फक्त सिंधुदुर्ग जिल्हय़ातील प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. 
मुंबई ते बांदा या मार्गावरील प्रवासासाठी 1246 रुपये तिकीट दर असणार आहेत. राज्य सरकारने लागू केलेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिला प्रवाशांसाठी असलेल्या तिकीट सवलती या विना वातानुकूलीत शयनयान बसला देखील लागू होणार आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबई सेंट्रल – बोरीवली – बांदा या मार्गावर ही शयनयान बसस धावणार आहे. त्यानंतर गोव्यातील पणजीपर्यंत या बसेचा विस्तार करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन पन्नास विना वातानुकूलित शयनयान बसेस ( sleeper coach ) येणार आहेत.
या गाडीचे थांबे
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/10/MSRTC-__-Bus-Stops.pdf” title=”__ MSRTC __ Bus Stops”]
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/10/MSRTC-__-Stops2.pdf” title=”__ MSRTC __ Stops2″]

Loading

कोकण रेल्वे मार्गावरील ‘या’ स्थानकांच्या तिकीट खिडक्यांचे यूटीएस-कम-पीआरएस खिडक्यांमध्ये रूपांतर करण्याची मागणी

Konkan Railway News: कोकण रेल्वेवरील वीर, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, सिंधुदुर्ग आणि पेडणे स्थानकांवरील मॅन्युअल कोटा आरक्षण प्रणाली (क्यूआरएस/QRS) बुकिंग काउंटर कोरोनानंतर बंद करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना संबंधित स्थानकांवरून आरक्षित तिकिटांचे व्यवहार करता येत नाहीत. काही ठिकाणी पोस्टात आरक्षण केंद्रे आहेत, परंतु ते आरक्षण सुरु होणेच्या वेळेत (सकाळी ८ वाजता) सुरू होत नसल्यामुळे व काही वेळा योग्य इंटरनेट कनेक्शन अभावी बंद असल्यामुळे प्रवाशांना तोही पर्याय उपलब्ध नाही. 

याचाच विचार करून जल फाउंडेशनने वरील स्थानकांतील अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS) बुकिंग काउंटरचे यूटीएस-कम-पीआरएस (UTS-cum-PRS) काउंटरमध्ये रूपांतर करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील पत्र आज मंगळवार दि. ३ ऑक्टोबर, २०२३ रोजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा. श्री. रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयात देण्यात आले. याबाबतची माहिती जल फाउंडेशन (कोकण विभाग) चे संस्थापक अध्यक्ष नितीन सखाराम जाधव यांनी दिली आहे.

Loading

तळकोकणातील उद्योजकांसाठी महत्वाची बातमी; आडाळी एमआयडीसीमधील १९० भूखंड विक्रीसाठी उपलब्ध. असा करा अर्ज

सिंधुदुर्ग : आडाळी एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील आणखी १९० भूखंड (एकूण क्षेत्र १२१.१५ हेक्टर) दुसऱ्या टप्प्यात उद्योजकांसाठी खुले झाले आहेत. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आडाळी येथील एमआयडीसी स्थानिक कृती समिती आणि ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संचालित आडाळी एमआयडीसी स्थानिक लोकाधिकार संरक्षण समिती यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर डिसेंबर २०२२मध्ये २२० भुखंड पहिल्या टप्प्यात खुले करण्यात आले होते, अशी माहिती ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत यांनी दिली आहे.

लळीत यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आडाळी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड खुले व्हावेत, यासाठी आमच्याबरोबरच अनेकांनी आपापल्या परीने प्रयत्न केले होते. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना आता यश आले आहे. आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठ्यासाठी बंधारा, पाण्याची टाकी, पाईपलाईन आदि सर्व कामे पूर्ण झाली आहेत. भूखंड उद्योजकांना तात्काळ उपलब्ध करावेत, या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी आडाळीतील ग्रामस्थांनी आडाळी एमआयडीसी स्थानिक कृती समिती स्थापन केली.

तसेच ‘घुंगुरकाठी’ संस्थेने आडाळी एमआयडीसी स्थानिक लोकाधिकार संरक्षण समिती स्थापन केली. समितीच्या पाठपुराव्यानंतर जाहिरात प्रसिद्ध होऊन उद्योजकांनी अर्जाची प्रक्रीया पूर्ण केली. तरीही प्रत्यक्षात भूखंडाचे वितरण दीर्घकाळ होत नव्हते. महामंडळाकडुन या मागणीला प्रतिसाद मिळत नसल्याने अलिकडेच समितीमार्फत आडाळी ते बांदा असा आठ किलोमीटरचा लाँग मार्च काढण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भूखंड वितरणाचे आदेश काढण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्यात एकुण १२१.१५ हेक्टर क्षेत्र असलेले विविध आकाराचे एकूण १९० भूखंड वितरणासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. हे भूखंड महामंडळाच्या
धोरणाप्रमाणे सामान्य (खुले), अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व राखीवसह आहेत.

या भूखंडासाठी ऑनलाइन अर्ज करावयाचे असून www.midcindia.org या संकेतस्थळावर अर्ज करावयाचे आहेत. अर्ज करण्याची मुदत ५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजेपासून १९ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे. यासंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५या वेळात फोन केल्यास सविस्तर माहिती मिळू शकेल. आडाळी येथे एकुण ७२० एकर क्षेत्रामध्ये हे नवीन औद्योगिक क्षेत्र निर्माण झाले आहे. महामंडळाच्या या प्रकल्पाला सप्टेंबर २०१३ मध्ये मंजुरी मिळाली. या प्रकल्पासाठी स्थानिकांचे सकारात्मक सहकार्य होते. अवघ्या वर्षभरात ८० टक्केहुन अधिक क्षेत्र स्थानिकांनी महामंडळाकडे हस्तांतरित केले. मात्र आडाळी ग्रामस्थांनी या प्रकल्पाचा प्रस्ताव महाराष्ट्राचे तत्कालिन उद्योगमंत्री व सद्याचे केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याकडे दिला आणि त्यांनी अवघ्या सहा महिन्यात तो मार्गी लावला.

आडाळी ग्रामस्थांनी या प्रकल्पाचे स्वागत करुन आवश्यक असलेली जमीन महामंडळाला दिली. जमीन खरेदीचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर महामंडळाने निविदा प्रक्रीया करुन पायाभूत सुविधांच्या कामांना सुरुवात केली. सुमारे नऊ वर्षे एवढा प्रदीर्घ कालावधी गेल्यानंतर या औद्योगिक क्षेत्राच्या पायाभुत सुविधांची कामे आता पुर्णत्वाकडे वाटचाल करीत आहेत.

Loading

”मी एक घर बोलत आहे.. ” कोकणातील एका आईची व्यथा

मी एक घर बोलतेय, तुम्ही चाकरमानी आलात की भरलेले आणि बाकी पूर्ण वर्षभर ओसाड असलेल्या घरापैकी वाडीतील एक घर… खूप आहे मनात बोलण्यासारखे पण कधी काही बोलले नाही.. यावर्षी अगदी राहावले नाही म्हणुन मी माझ्यात वर्षभर एकट्या राहणार्‍या एका आईची, एका आजीची आणि एका सासूची व्यथा ईथे मांडत आहे ….

मी एक घर बोलतेय… गणपती मुक्कामाला गेलेत तसा तू पण आल्या वाटेने पाहुण्यांसारखा आपल्या शहरातील ”घरी” परतलास. तुझ्या आईने जाताना तुला पाणावलेल्या डोळ्याने “बाबू सांभाळून जा, कामधंदो जीव सांभाळून कर, फोन करीत रव” अशा शब्दात निरोप दिला.

निरोप देवून मागे फिरली आणि माझ्याकडे पाहिले,ओट्यावर येवून खूप रडली रे ती. माझ्याकडे पाहून का रडली असेल? या प्रश्नाचे उत्तर तुलाही माहीत आहे. चतुर्थी सणात जे रूप मला आले होते ते पूर्ण बदलले, कदाचित भकास झालेले रूप पाहून ती रडली असेल.

आता माझ्यात (घरात) पुढील कित्येक दिवस नको नकोशी वाटणारी शांतता असेल. या घरात आता तिच्या नातवंडांची किलबिल नसेल. तिला साद घालणारे किंवा तिने कोणाला साद घालावी असे कोणीही नसेल. तोंड असून मुक्या सारखे तिला जगावे लागेल. कधी बाबू तुझा फोन आला तेव्हाच फक्त तिचा आवाज मला यापुढे ऐकू येईल. दिवस तर ठीक आहे मात्र रात्र खूपच भयानक आणि एकाकी असणार रे तिच्यासाठी. ८/१० खोल्या असल्या तरी फक्त एकाच खोलीत लाईट लागलेली असेल. ती पण जेमतेम संध्याकाळी ८ वाजेपर्यंत.

कोरी चाय (चहा) जरी दिवसातून चार वेळा असली तरी ”एकटी साठी कित्याक व्हया” असा विचार करून तिच्या जेवणात फक्त पेज, मसाला आणि भात आणि कधीतरी भाकरी हेच असेल. कधी सणावाराला ”वाडी” घालण्यासाठी एखादा गोडधोड पदार्थ असेल. कधी आजारी पडली तर काळजी घेणारे कोणीच नसणार. जेवण तर दूरची गोष्ट पाणी पण देणारे आता कोणी नसणार. कधी कधी तर भीती पण वाटायला लागणार की एखाद्या आजारपणात अगदी एकटेपणात जीवच जायचा.

बाबू तू तिची सर्व सोय केलीस, तिला जाताना पैसे दिलेस, वाडीतील लोकांना तिच्याकडे लक्ष द्यायला सांगितलास. दर दोन दिवसांनी फोन तर तू करणारच आहे. मात्र तीची सर्व सुख तुझ्यासोबत घेऊन गेलास रे. आता चतुर्थी सणाला ती खरे आयुष्य जगली. पुढे तू पुन्हा येईपर्यंत ती जे जगणार त्याला जगणे म्हणतात की नाही हा मला प्रश्न पडलाय. पोटापाण्यासाठी तुला जावे लागले हे मान्य, मात्र तू शक्य तितक्या दिवशी येथे येत जा रे. ” या वेळी सुट्टी नाय/मुलांची परीक्षा हा, यावेळी यायला जमणार नाही ” अशी कारणे देताना दहावेळा तिचा विचार कर. एवढीच विनंती आहे माझी तुला….

महेश धुरी, सावंतवाडी 

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search