Author Archives: Kokanai Digital

राज्यात चार जिल्ह्यांना आज पावसाचा ‘रेड अलर्ट’; शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

रायगड : हवामान खात्याने IMD दिलेल्या अतिदक्षतेच्या इशाऱ्यामुळे तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज, बुधवारी रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.त्यामुळे, धरणांतून मोठ्या प्रमाणावर नदीत पाणी सोडले जात असल्याने अनेक पूल पाण्याखाली गेले असून, काही गावांचा संपर्क तुटला आहे. पुढील 24 तासांतही शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आज बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

IMD ने आज दिनांक 19 जुलै रोजी पालघर, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी ‘रेड’ अलर्ट तर ठाणे, मुंबई, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि रत्नागिरीसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे.

Loading

कोंकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या २ गाड्यांचे जनरल डबे कमी केले.

Kokan Railway | रेल्वे प्रशासनाने कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांच्या LHB डब्यांच्या संरचनेत काही बदल केले आहेत. या दोन्ही गाड्यांचे प्रत्येकी एक जनरल डबा कमी करण्यात आले असून इतरही काही बदल करण्यात आले आहेत. हे बदल पुढीलप्रमाणे

1) 22113/22114 Lokmanya Tilak (T) - Kochuveli - Lokmanya Tilak (T) Bi-Weekly Express

श्रेणी सध्याची संरचना
सुधारित संरचना बदल
(फर्स्ट एसी + टू टियर एसी संयुक्त )01-डबा कमी केला
टू टियर एसी0101बदल नाही
थ्री टायर एसी0507२ डबे वाढवले
स्लीपर 0909बदल नाही
जनरल 0403१ डबा कमी केला
जनरेटर कार 0202बदल नाही
एकूण 2222

दिनांक ०४/११/२०२३ पासून Train no. 22113 ex. Lokmanya Tilak (T) ही गाडी तर दिनांक 06/11/2023Train no. 22114 ex. Kochuveli ही गाडी या सुधारित डब्यांच्या संरचनेनुसार धावणार आहे.

 

2) 11099 / 11100 Lokmanya Tilak (T) - Madgaon Jn. - Lokmanya Tilak (T) Express

श्रेणी सध्याची संरचना
सुधारित संरचना बदल
(फर्स्ट एसी + टू टियर एसी संयुक्त )0101बदल नाही
फर्स्ट एसी ---
टू टियर एसी0102१ डबा वाढवला
थ्री टायर एसी0806२ डबे कमी केले
स्लीपर 0608२ डबे वाढवले
जनरल 0302१ डबा कमी केला
एसएलआर-01१ डबा वाढवला
पेन्ट्री कार0101
जनरेटर कार0201१ डबा कमी केला
एकूण 2222

दिनांक 10/11/2023 पासून या दोन्ही गाड्या सुधारित डब्यांच्या संरचनेनुसार धावणार आहे.

 

Loading

पर्यटकांना भुरळ पाडणारा मुंबई-गोवा महामार्गालगतचा ‘सवतसडा धबधबा’ प्रवाहित

चिपळूण :मान्सूनचे आगमन झाले असून, गेले काही दिवस कोकणात सर्वत्र मुसळधार वृष्टी होत आहे. त्यामुळे नद्या, ओहोळ भरले असून, काही धबधबेही प्रवाहित झाले आहे. मुंबई- गोवा महामार्गावरील चिपळूण पेढे येथे महामार्ग लगतच असणारा ‘सवतसडा धबधबाही’ प्रवाहित झाल्याने या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी या धबधब्याचा आनंद घेताना दिसत आहेत.मुंबई, पुणेसह स्थानिक नागरिक या धबधब्याखाली भिजण्यासाठी आनंद घेण्यासाठी येत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्याचीही येथे गर्दी पाहायला मिळत आहे. उंच कड्यावरून कोसळणारा हा धबधबा दरवर्षी सर्वांनाच आकर्षित करत असतो. हा धबधबा सुरक्षित मानला जातो. विशेष म्हणजे, हा धबधबा महामार्गाला लागून असल्याने या ठिकाणी दररोज हजारो लोक भेट देत आहेत.

मुंबई-गोवा हायवेवरील चिपळूण हे शहर मुंबईपासून २४७ किमी अंतरावर आहे. या शहरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला निसर्गरम्य असा परशुराम घाट लागतो.

या घाटामध्येच कोकणच्या निर्मात्या श्री परशुरामाचं पुरातन मंदिर आहे. इथून आपण चिपळूणच्या दिशेने जात असताना, मुंबई गोवा महामार्गावर  उजव्या हाताला, चिपळूणपासून ५ किमी आधी आपणास एक प्रचंड जलप्रपात लांबूनच दिसून येतो. धबधब्याचा आवाज ऐकू येतो.

धबधब्याच्या पायथ्याची जाण्यासाठी येथील स्थानिक प्रशासनाकडून सिमेंटची पायवाट आणि रेलिंग बांधण्यात आली आहे. त्यामुळे अगदी धबधब्याच्या जवळ जावून पर्यटकांना त्याचा मनमुराद आनंद घेता येतो. हायवेच्या अगदी कडेस असल्याने आबालवृद्धदेखील याला भेट देऊ शकतात. ज्यांना धबधब्यात जाण्याची भीती वाटते ते जवळ उभे राहून वरून पडणाऱ्या पाण्याचा तूषारांनी चिंब भिजू शकतात.

Loading

आंबोली धबधबा | पर्यटकांकडुन शुल्क आकारण्याचा निर्णय स्थगित

सावंतवाडी : पावसाळी पर्यटनासाठी नावाजलेल्या तळकोकणातील आंबोली येथील प्रसिद्ध धबधब्याला भेट देण्यासाठी पर्यटकांकडून शुल्क घेण्याच्या निर्णयास स्थगिती देण्यात आली आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही शुल्क आकारणी स्थगित केली जावी असे आदेश दिले आहेत. सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आठवडाभरा पूर्वी धबधबा पाहण्यासाठी 14 वर्षावरील पर्यटकांना 20 रुपये तर 14 वर्षाखालील मुलांना 10 रुपये असे तिकीट दर आकारण्यात येणार आहेत असे एस. नवकिशोर रेड्डी यांनी जाहीर केले होते. मात्र दीपक केसरकर यांनी दिलेल्या आदेशानुसार या निर्णयाला स्थगिती दिली गेली आहे.

 

Loading

कोकण रेल्वे मार्गावर लागोपाठ दोन दिवस मेगाब्लॉक; ६ गाड्यांवर परिणाम

 

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर दोन ठिकाणी लागोपाठ दोन दिवस देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे. 

A) संगमेश्वर ते भोके

संगमेश्वर ते भोके दरम्यान दि. 11 जुलैला सकाळी 7.30 ते 10.30 असा 3 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक मुळे खालील गाड्यांवर परिणाम होणार आहे. 

1) दि. 10 जुलै रोजी सुटणारी तिरुनेलवेली-जामनगर एक्सप्रेस 11577 ही गाडी ठोकुर ते रत्नागिरी दरम्यान 2 तास 30 उशिराने चालविण्यात येणार आहे. 

2) दि. 10 जुलै रोजी सुटणारी तिरुअनंतरपुरम सेंट्रल- लो. टिळक टर्मिनस नेत्रावती एकस्प्रेस (16346) कर्नाटकातील ठोकुर ते रत्नागिरी दरम्यान 1 तास उशिराने चालविण्यात येणार आहे. 

B) कुडाळ ते वेर्णा

दि. 12 रोजी कुडाळ ते वेर्णा दरम्यानच्या कामासाठी घेण्यात येणार्‍या सायंकाळी 3 ते 6 वाजेपर्यंत अशा तीन तासांच्या ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गे धावणार्‍या चार गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

1) 12 जुलै रोजी सुटणारी मुंबई सीएसएमटी -मडगाव (12051) ही जनशताब्दी एक्स्प्रेस गोव्यातील थीवी स्थानकावर तीन तास थांबवून ठेवण्यात येणार आहे. 

2) दि. 11 जुलैला सुटणारी हजरत निजामुद्दीन -एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस (12618) ही गाडी रोहा ते कुडाळ दरम्यान अडीच तास उशिराने चालविण्यात येणार आहे. 

3) दिनांक 12 जुलै रोजी सुटणारी दिवा सावंतवाडी एक्स्प्रेस (10105) ही गाडी रोहा ते कणकवली दरम्यान 50 मिनिटे उशिराने चालणार आहे. 

4) दिनांक 12 जुलै रोजी सुटणारी तिरुअनंतरपुरम सेट्रल- हजरत निजामुद्दीन (22653) ही गाडी ठोकुर ते वेर्णा दरम्यान 2 तास 50 मिनिटेे उशिराने चालविण्यात येणार आहे. 

Loading

वंदेभारत एक्सप्रेसचा रंग बदलणार; ‘हे’ आहे कारण

 

Vande Bharat Express :निळ्या आणि पांढर्‍या रंगातील वंदे भारत एक्सप्रेसला आता नवीन लूक मिळणार आहे. यापुढे निर्मिती होणार्‍या वंदे भारत एक्सप्रेस गाड्या भगव्या Orange आणि राखाडी Grey रंगाच्या असणार आहेत.

सध्या असलेला पांढरा रंग धूळ चिटकून खराब होत असल्याने लूक व्यवस्थित ठेवण्यासाठी त्याला वारंवार धुवून साफ करावे लागत आहे. हे जरा जास्त गैरसोयीचे होत असल्याने त्याला पर्यायी दुसरा कोणता रंग देता येईल याबद्दल ईतर रंगाचे पर्याय शोधले जात आहेत. सध्या भगव्या Orange आणि राखाडी Grey रंगाचा पर्याय विचाराधीन असून एका गाडीला प्रायोगिक तत्त्वावर हा रंग दिला आहे. या रंगाना हिरवा झेंडा भेटल्यास भविष्यात सर्वच वंदे भारत एक्सप्रेस भगव्या आणि राखाडी रंगाच्या दिसणार आहेत. या बदला बरोबरच प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी आसनव्यवस्थेत सुधारणा करण्यात येणार आहेत. 

भगवा रंग देशाच्या झेंड्याच्या रंगातून घेतला आहे असे केंदीय रेल्वे मंत्री आदित्य वैष्णव म्हणाले आहेत. भगवा रंग भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे तर राखाडी रंग आधुनिकतेचे प्रतीक आहे म्हणुन हे दोन्ही रंग या एक्सप्रेस गाडीसाठी निवडण्यात आले आहेत.

Loading

कोकणच्या ‘समृद्धीला’ राज्य सरकारची मान्यता.

Mumbai : नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर प्रस्तावित असणार्‍या पेण ते पत्रादेवी या ग्रीनफील्ड महामार्गास सरकारकडून मान्यता मिळाली आहे. राज्य सरकारने यासंदर्भात एक जीआर गुरुवारी प्रसिद्ध केला आहे. सुमारे ३८८ किलोमीटरच्या या महामार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून काम करणार आहे.

मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून कोकण विभाग हा पर्यटन, औद्योगिक व वाणिज्य कामांसाठी समृद्ध आहे. कोकण तसेच गोवा ते कोकणातून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या पर्यटकांची, व्यावसायिकांची मोठी संख्या आहे. मुंबई ते कोकण पुढे गोवा असा द्रुतगती महामार्ग झाल्यास औद्योगिक पर्यटन क्षेत्र व दैनंदिन दळणवळण गतिमान होऊन कोकणची सर्वांगीण प्रगती होऊ शकेल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावात म्हटले आहे.

कोकण द्रुतगती महामार्ग झाल्यानंतर मुंबईसाठी सर्वात गतिमान महामार्ग तयार होईल. हा महामार्ग नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाईल. त्यामुळे कोकणातून आंतरराष्ट्रीय प्रवास करणे सोयीचे होईल. कोकण द्रुतगती महामार्ग हा रायगड जिह्यातील पेण, अलिबाग, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा तसेच रत्नागिरी जिह्यातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि सिंधुदुर्ग जिह्यातील देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी असा जाणार आहे.

महामार्ग पेण जिह्यातल्या बलवली गावातून सुरू होईल आणि पुढील टप्प्यात या महामार्गाचे बांधकाम करण्यात येईल.

पेण-बलवली ते रायगड/रत्नागिरी सीमा (रायगड जिल्हा) 94.40 किलोमीटर

रायगड/रत्नागिरी सीमा ते गुहागर चिपळूण (रत्नागिरी जिल्हा) 69.39 किलोमीटर

गुहागर,चिपळूण ते रत्नागिरी/सिंधुदुर्ग जिल्हा सीमा (रत्नागिरी जिल्हा) 122.81 किलोमीटर

रत्नागिरी/सिंधुदुर्ग जिल्हा सीमा ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग जिल्हा) असा 100.84 किलोमीटर

असा एकूण 388.45 किलोमीटरचा हा महामार्ग आहे.

या महामार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई ते कोकण अगदी कमी वेळामध्ये पार करता येणार आहे. त्याच बरोबर मुंबई गोवा महामार्गावरील ताण कमी होईल.

Loading

Mumbai-Goa Highway | आश्वासन पाळले नाही; उच्च न्यायालयाने NHAI आणि PWD ला ठोठावला दंड..

Mumbai Goa Highway | मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे आश्वासन न पाळल्याबद्दल उच्च न्यायालयाने (High Court) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) ला 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

ॲड. ओवेस पेचकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली. हायवेच्या बांधकामात निष्काळजीपणा केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला असे न्यायालयाने म्हटले आहे.मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने बुधवारी हा दंड ठोठावला आहे.

NHAI आणि राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी व्हावी यासाठी याचिकाकर्त्यांनी न्यायालयात तिसऱ्यांदा धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतरही खड्डे दुरुस्त झाले नाहीत. अशी माहिती याचिकाकर्ते अधिवक्ता ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयाला दिली.

अधिवक्ता पेचकर यांनी 2 जुलै 2023 रोजी काढलेली मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांची छायाचित्रे न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रासोबत जोडली. खंडपीठाने एनएचएआयचे प्रकल्प संचालक आणि पीडब्ल्यूडीचे अधीक्षक अभियंता यांना चार आठवड्यांत सर्वेक्षण करून उच्च न्यायालयात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दंडाची रक्कम आलेल्या न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या खर्चाची भरपाई म्हणुन याचिकाकर्त्यांना सुपूर्त करण्यात यावी असेही आदेश देण्यात आले आहेत.

 

Loading

Amboli Waterfall | धबधब्याला भेट देण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार.

सावंतवाडी | प्रतिनिधी :पावसाळी पर्यटनासाठी नावाजलेल्या तळकोकणातील आंबोली येथील प्रसिद्ध धबधब्याला भेट देण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. हा धबधबा पाहण्यासाठी 14 वर्षावरील पर्यटकांना 20 रुपये तर 14 वर्षाखालील मुलांना 10 रुपये असे तिकीट दर आकारण्यात येणार आहेत. तर 5 वर्षापर्यंतच्या मुलांना कोणतेही शुल्क नसणार आहे.

कोरोना पूर्व काळात या धबधब्याला भेट देणार्‍या सर्व पर्यटकांना सरसकट 10 रुपये असे तिकीट दर अस्तित्वात होते. त्यानंतर ही तिकीट पद्धत बंद झाली होती. आता ती पुन्हा सुरू करण्यात येणार असून ही रक्कम जमा करण्याचा अधिकार वनव्यवस्थापन समितीला दिला असून मिळणार्‍या पैशाचा वापर धबधबा आणि आजूबाजूचा परिसरातील वनविकास करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी दिली आहे. येत्या शनिवार पासून हे पैसे आकारले जातील.

Loading

“Train Cancelled” | मध्य रेल्वेने चाकरमान्यांची मांडलेली थट्टा…

Kokan Raiway | गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जायचे आहे, नियमित गाड्यांची तिकिटे अवघ्या 1 मिनिटांत बूक झाल्याने भेटली नाहीत म्हणुन रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे तरी आरक्षण भेटेल या आशेने प्रयत्न करणार्‍या गणेश भाविकांची रेल्वे प्रशासनाने चक्क थट्टा मांडली असल्याचे दिसत आहे.

गणेशोत्सवासाठी 204 अतिरिक्‍त गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या गाड्यांच्या आरक्षणावेळी प्रवाशांना विचित्र अनुभव मिळताना दिसत आहे. ईतर गाड्यांच्या आरक्षणा सारखे या गाड्यांचे आरक्षणही सकाळी ८ वाजता रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर तसेच IRCTC च्या अधिकृत वेब पोर्टल वर सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र जे प्रवासी ऑनलाईन तिकीट बूकिंग करत आहेत त्यांना या गाड्यांचे स्टेटस पाहिल्या 15 मिनिटांसाठी ‘Train Cancelled’ असे दाखवते आणि त्यानंतर बूकिंग चालू होते तेव्हा आरक्षणाचे स्टेटस वेटिंग लिस्ट पर्यंत दाखवते. फक्त एका दोघांना हा अनुभव आला असे नाही तर बहुतेक प्रवाशांना असा अनुभव आला आहे. अनेक तक्रारी सोशल मीडिया मार्फत केल्याचे दिसून येत आहे.

हा नेमका प्रकार काय आहे या साठी काही जणांनी सोशल मीडिया आणि ऑनलाईन तक्रार नोंदवून याबाबत जाब विचारला होता. रेल्वेने औपचारिकता म्हणुन या तक्रारीला उत्तरे दिली असून त्याला कोणताही आधार नाही आहे. मध्यरेल्वेने एका प्रवाशाच्या ट्विटर वरील तक्रारीला खालीलप्रमाणे उत्तर दिले आहे.

प्रश्न ……….
आज सकाळी IRCTC एप्लिकेशनवर आरक्षण सुरू झालेल्या विशेष रेल्वे गाडी क्रमांक ०११६५ समोर सुरुवातीची १५ मिनिटे ट्रेन ‘Train Cancelled’ असे दाखवले. त्यानंतर अचानक आरक्षण सुरु होताच उपलब्ध तिकीटे दिसण्याऐवजी अवघ्या १० सेकंदात १७१ प्रतीक्षा यादीच दिसू लागली.
असं कसं होऊ शकतं ?

उत्तर……….
511 passengers booked online tickets& 1013 booked PRS tickets from 08.00 hrs to 08.05 hrs, in first 5 minutes

511 online tickets booked in first 5 minutes, since train shown online. So question of train cancel does not arise. For those having problem might some technical issue.

मध्यरेल्वेच्या म्हणण्यानुसार 01165 या गाडीचे 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या दिवसांचे आरक्षण सकाळी 08:00 ते 08:05 या काळात ऑनलाईन 511 सीट्स तर पीआरएस काऊंटरवर 1013 एवढ्या सीट्सचे आरक्षण झाले. त्यामुळे ‘Train Cancelled’ असण्याचा प्रश्नच येत नाही. हा फक्त तुमच्या बाजूने काही तांत्रिक इश्यू असेल.

मध्य रेल्वेच्या या उत्तराने समाधान तर सोडाच अजून प्रश्न निर्माण झाले आहेत.

जर हा तांत्रिक (टेक्निकल) इश्यू असता तर बरोबर गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या याच अतिरिक्त गाड्यांच्या आरक्षणावेळी का घडत आहे?

टेक्निकल इश्यू तंतोतंत 15 मिनिट कसा काय असू शकतो?अगदी सोळाव्या मिनिटाच्या पाहिल्या सेकंदात ”Train Cancelled” हे स्टेटस गायब होऊन आरक्षण चालू कसे झाले?

जर हा तांत्रिक (टेक्निकल) इश्यू असता सर्व्हर स्लो झाले असते, युझरला बाहेर फेकले असते.  मात्र येथे क्लीअर ”Train Cancelled” असे का दाखवले गेले?

पाहिल्या 5 मिनीटांत 511 तिकिटे आरक्षित झालीत. पुढील 10 मिनीटांत यापेक्षा दुप्पट/तिप्पट तिकीटे बूक झालीत ती दलालांच्या घशात गेलीत का?

या रेल्वे तिकीट आरक्षणातही दलालांनी रेल्वेतील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून गैरप्रकार केला असल्याचा आरोप चाकरमान्यांकडून होत असून या प्रकारची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search