KONKAN RAILWAY NEWS : कोंकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. या मार्गावर विशेष गाडी म्हणून चालविण्यात येणाऱ्या एका गाडीचा 3 जुलै -२०२३ पर्यंत विस्तार करण्यात आला आहे. ही गाडी या आधीच्या वेळापत्रकानुसार, स्थानकानुसार आणि डब्यांच्या संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहे.
02198 Jabalpur Jn. – Coimbatore Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर शुक्रवारी धावणारी हि गाडी 02/06/2023 पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा 30/06/2023 पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
02197 – Coimbatore Jn. – Jabalpur Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर सोमवारी धावणारी हि गाडी 05/06/2023 पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा 03/07/2023 पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
रत्नागिरी – रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची ताकद कमी असल्यामुळे बाहेरचे लोक हे वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहेत. दिनांक 6 मे रोजी उद्धव ठाकरे रत्नागिरी येथील बारसू येथे येणार आहेत. येथे जमणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेऊन काही अनुचित प्रकार या बाहेरच्या लोकांकडून होण्याची शक्यता असल्याने योग्य ती काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी असे त्यांनी पोलिसांना आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या ठिकाणी अनेक कामे सुरू असून या ठिकाणी मटेरियल सप्लायचे काम आहे सुरू झाले आहे. हीच संधी साधून जिलेटिन स्टिक सारख्या स्फोटकांचा साठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. जिलेटिन सारख्या स्फोटकांचा साठा व त्यामागील गटाचा पोलीस व प्रशासनाने शोध घ्यावा याकडे लक्ष वेधण्यासाठी माजी खासदार भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांची सिंधुनगरी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली होती.
यावेळी पुढे बोलताना निलेश राणे म्हणाले बारसू रिफायनरी परिसरात जवळपास 72 ठिकाणी बोरवेल मारण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी मटेरियल चे सप्लाय करणारे ठेकेदार बाहेरचे आहेत. व या मटेरियल सप्लाय च्या माध्यमातून व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होण्यापूर्वी जिलेटिन स्टिक या स्फोटकांचा मोठा साठा या परप्रांतीय सप्लायरमार्फत सुरू झाला आहे. त्या ठिकाणी आंदोलकांची गर्दी होऊन काही अनुचित प्रकार घडू नये व आपल्या मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये, त्याची झळ बसू नये यासाठी ही माहिती आपण जाहीर करत आहोत, असे निलेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. आपण तीन लोकसभा निवडणुका या मतदारसंघात लढल्या आहेत. या भागातील नागरिकांचा विरोध असला तरी त्याची तीव्रता कमी आहे या लोकांना भडकवण्याचे काम बाहेरची लोक करीत आहेत. विरोधासाठी गर्दी जमवून त्या ठिकाणी चेंगराचेंगरी किंवा अनुचित प्रकार घडविण्याचा कट सुरू झाल्याचा आपल्याला संशय आहे. याबाबतची काही माहिती काही सूत्राने माझ्यापर्यंत पोहचवली आहे. लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही माहिती त्यांच्याकडे पोहोच करणार आहे. तसेच याबाबत पोलिसांनाही आवश्यकता भासल्यास माझ्याकडे असलेली माहिती देणार आहे. यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व सर्वसामान्य नागरिकांना त्याची झळ बसू नये एवढी आपली प्रामाणिक अपेक्षा आहे असेही निलेश राणे यांनी स्पष्ट केले.
Konkan Railway News: उन्हाळी सुट्टीच्या हंगामात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे दक्षिण रेल्वेच्या सहकार्याने एक आठवड्यातुन तीन दिवस धावणारी एक समर स्पेशल गाडी चालविणार आहे.
दिनांक 06/05/2023 ते 31/05/2023 शनिवार, सोमवार आणि बुधवार या दिवशी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री 22:50 वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी सकाळी 11:30 वाजता थीवी या स्थानकावर पोहोचेल.
दिनांक 07/05/2023 ते 01/06/2023 रविवार , मंगळवार आणि गुरुवार या दिवशी ही गाडी थीवी या स्थानकावरुन संध्याकाळी 16:40 वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी पहाटे 04:05 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल
Trains no. 01130 Thivim – Lokmanya Tilak या गाडीचे आरक्षण उद्या दिनांक 04 मे 2023 पासून रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहेत.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
मालवण – उन्हाळी सुट्यांमुळे मालवणचे पर्यटन बहरलेले दिसून येत आहे; मात्र यात निवासव्यवस्थेचे दर आकारण्यात पर्यटन व्यावसायिकांमध्ये सुरू झालेली जीवघेणी स्पर्धा, येथील व्यावसायिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. यातच पर्यटकांनी मासळी आणून दिल्यास ती बनवून देण्याचा नवा ट्रेंड सुरु झाल्याने हॉटेल व्यवसायालाही मोठा फटका बसत आहे. एकूणच येथे काही काळापूर्वी वाढत असलेला पर्यटन व्यवसाय आता नव्या वळणावर पोहचला आहे. यातच अंमली पदार्थांसह व्यसनाधिनतेचे काही प्रकारही धोक्याची घंटा वाजवणारे ठरत आहेत.
पर्यटनाची राजधानी म्हणून मालवणकडे बघितले जाते. गेल्या काही वर्षात समुद्राखालील अनोखे विश्व पाहण्याची संधी स्कूबा, स्नॉर्कलिंगमुळे उपलब्ध झाली आहे. याबरोबरच साहसी जलक्रीडा प्रकार यामुळे येथील पर्यटन हंगाम हा गेल्या काही वर्षात बहरत असल्याचे दिसून येत आहे. पर्यटकांना अत्यावश्यक सोईसुविधा पर्यटन व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिल्याने दरवर्षी लाखोंच्या संख्येने येथे दाखल होत असून त्यांच्याकडून सागरी पर्यटनाचा आनंद लुटला जात आहे. पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असल्याने नोकरीच्या मागे न लागता अनेक तरूण बेरोजगारांनी पर्यटन व्यवसायात उतरण्याचे धाडस दाखवित त्यातून गेल्या काही वर्षात चांगले अर्थांजन मिळविण्यास सुरवात केल्याचे किनारपट्टी भागात पहावयास मिळत आहे.सागरी पर्यटनासाठी सिंधुदुर्गात पर्यटक जास्ती पसंती देतात. वर्षातील साधारणतः ८० ते १०० दिवसांचा हा पर्यटन उद्योग सुरू असतो. गेल्या दोन वर्षाच्या कोरोना महामारीच्या काळानंतर पर्यटन व्यवसाय आता खर्या अर्थांने उभारी घेत असल्याचे दिसून येत आहे; परंतु सर्वात मोठी समस्या निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. यात हॉटेल्स, होम-स्टे, रिसॉर्टची जी वर्गवारी आहे. त्यात जी निवासव्यवस्थेची दर आकारणी केली जाते. यात ज्यांच्याकडे चांगल्या सोईसुविधा उपलब्ध आहेत. त्यांच्या निवासव्यवस्थेचे दर १५०० ते २५०० रुपये प्रतिदिवस असे आहेत. असे पर्यटन व्यावसायिक विनाकारण स्पर्धा करताना दिसून येत आहे. संबंधितांकडून ३० ते ४० टक्के दर कमी करून पर्यटकांना निवासाची व्यवस्था करून दिली जात आहे. परिणामी याचा फटका ज्यांच्याकडे चांगल्या सुविधा आहेत मात्र ते दर स्थिर ठेवून व्यवसाय करू पाहतात अशा पर्यटन व्यावसायिकांना बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात नवा ट्रेंड निर्माण झाला आहे. पर्यटक बुकींग करून येण्यापेक्षा थेट रिसॉर्ट, निवास न्याहरी, हॉटेल्सच्या ठिकाणी येऊन दरांमध्ये आपल्याला हवी तशी तडजोड करून घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात जर अशीच परिस्थिती राहिल्यास निवास व्यवस्थेचा जो व्यवसाय आहे तो कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे.किनारपट्टी भागास पर्यटकांची जास्त पसंती असल्याचे दिसून येत आहे. मात्र गेल्या काही वर्षात पर्यटकांनाच तुम्ही मासे आणून द्या ते बनवून देतो असे पर्यटन व्यावसायिकांकडून सांगितले जात असल्याने हा नवा ट्रेंड या क्षेत्रात निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे. यामुळे येथे येणारा पर्यटक हा थेट मासळी लिलावाच्या ठिकाणी जावून मासळी खरेदी करतात. मग ती वास्तव्यास असलेल्या हॉटेलच्या ठिकाणी येऊन त्या व्यावसायिकाला ती बनविण्याचे सांगून किलोप्रमाणे दर निश्चित करून घेतात. ही प्रथा म्हणजे वेगळ्या प्रकारची कीड या व्यवसायास लागली आहे. जेमतेम १०० दिवसांच्या या पर्यटन व्यवसायाच्या काळात किलोवर असे मासे बनवून दिल्यास तर व्यावसायिक पैसे कमावणार केव्हा? बँकांचे हफ्ते, विविध शासनाचे कर कोठून भरणार? जेव्हा एखादा पर्यटक हॉटेलला वास्तव्यास असतो त्यावेळी त्याचे जेवण, वास्तव्य याचा विचार केला तर त्यातून सरासरी वार्षिक खर्च निघत असतो; परंतु असे जे प्रकार किनारपट्टी भागात सध्या सुरू आहेत हे चुकीचे असून येणाऱ्या काळात पर्यटन व्यावसायिकांनी यातून स्वतःला सावरण्याची गरज आहे. आपण जो व्यवसाय करत आहोत. तो कमर्शिअल पद्धतीने करायला हवा. या गंभीर बाबींकडे लक्ष न दिल्यास हा व्यवसाय कमर्शिअल पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांच्या हाती जाण्याची शक्यता असून याचा फटका स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना बसण्याची भीती आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांनी आताच सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे.
विष्णू ऊर्फ बाबा मोंडकर,
जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील बारसू ग्रामस्थांनी सुरू केलेले रिफायनरीविरोधी आंदोलनामुळे येथील तणावपूर्ण वातावरण आहे. हा तणाव अजून वाढण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच दिवशी दि.६ मे रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
उद्धव ठाकरे बारसू ग्रामस्थांना भेटण्यासाठी येत असल्याने प्रशासनाकडून सुरू असलेल्या चर्चेला खीळ बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोणी अडवल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा ठाकरे शिवसेना गटाकडून दिला आहे.
तर राज ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा पंधरा दिवस आधीच जाहीर झाला होता. ”जागा राखल्या नाहीत तर तुमचे अस्तित्व काय?” या शिर्षकाखाली त्यांची रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे सायंकाळी जाहीर सभा होणार आहे.
या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यामुळे वातावरण तापाण्याची शक्यता आहे. ग्रामस्थ, प्रकल्पविरोधी संघटनांचे नेते चर्चेऐवजी पुन्हा संघर्ष हाती घेतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच या दौऱ्याबाबत प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दोन्ही नेत्यांचे दौरे होणार असल्याचे पोलिस यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग – मुंबई गोवा महामार्गावर मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाल्याने यात 25 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथील हॉटेल वक्रतुंडसमोर, टेम्पो देवगडच्या दिशेने जात असताना दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप टेम्पो देवगड पाडगावच्या दिशेने लग्नाचे वऱ्हाड घेऊन जात होता. दरम्यान, पिकअप चालकाने डिव्हायडरवर गाडी चढवल्याने महामार्गावर टेम्पो पलटी झाला. यात 25 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. अनेकांच्या डोके, हाताला गंभीर दुखापत झाली असून जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जमावबंदी आदेश (३७/३) लागू केला आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील पर्यटनावर होण्याच्या चर्चा चालू असताना रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या बंदी बद्दल खुलासा केला आहे. जमावबंदी आदेश (३७/३) लागु केला किंवा ईतर कडक निर्बंध घातले असले तरीही पर्यटनावर निर्बंध घातलेले नाहीत, असा खुलासा त्यांनी केला आहे.
बारसू परिसरात रिफायनरी प्रकल्पाच्या दृष्टीने माती परीक्षणासाठी ड्रिलिंगचे काम सध्या चालू आहे. या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी गेल्या २४ एप्रिलपासून आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे पोलिसांनी बारसूसह आजूबाजूच्या आठ गावांमध्ये संचारबंदी ( कलम १४४), तर अन्य ठिकाणी जमावबंदी आदेश लागू केला आहे. अर्थात त्याचाही मुख्य उद्देश आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अन्य भागातून येऊ पाहणाऱ्या समर्थकांना रोखणे, हा आहे. मात्र बाहेरच्या जिल्ह्यातून येणारे प्रवासी किंवा पर्यटकांना रोखलेले नाही, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
मुंबई – महाराष्ट्र राज्या संबधी एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्यआता 36 जिल्ह्या ऐवजी 58 जिल्हाचे होण्याचे संकेत आहेत. राज्यात आणखी 22 जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे.
हे नवीन जिल्हे खालील जिल्ह्यांतून तयार होण्याची शक्यता आहे
मूळ जिल्हा – नवीन जिल्हे नाशिक- मालेगाव, कळवण पालघर- जव्हार ठाणे- मीरा भाईंदर, कल्याण अहमदनगर- शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर पुणे-शिवनेरी रायगड- महाड सातारा- माणदेश रत्नागिरी- मानगड बीड- अंबेजोगाई लातूर- उदगीर नांदेड- किनवट जळगाव- भुसावळ बुलडाणा-खामगाव अमरावती-अचलपूर यवतमाळ- पुसद भंडारा- साकोली चंद्रपूर- चिमूर गडचिरोली- अहेरी
1 मे 1960 रोजी 26 जिल्ह्यांचं महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. अनेक जिल्हे हे लोकसंख्या आणि आकाराच्यादृष्टीने मोठे होते. मात्र प्रशासकीय कामासाटी नागरिकांची गैरसोय होऊ लागली. त्यानंतर आजपर्यंत राज्यात नवीन 10 जिल्ह्यांची भर पडून ते 36 जिल्हे झाले.
राज्यात पहिल्यांदा हे 26 जिल्हे होते ठाणे, कुलाबा ( आताचे रायगड), रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), बीड परभणी, उस्मानाबाद, नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जळगाव, भंडारा, चांदा ( आता चंद्रपूर) हे 26 जिल्हे नव्याने अस्तित्त्वात आलेल्या महाराष्ट्रात होते.
या जिल्ह्यातून 10 नवीन जिल्हे तयार झालेत.
रत्नागिरी- सिंधुदुर्ग ( 1 मे 1981) छत्रपती संभाजीनगर – जालना ( 1 मे 1981) धाराशिव- लातूर ( 16 ऑगस्ट 1982) चंद्रपूर- गडचिरोली ( 26 ऑगस्ट 1982) बृहन्मुंबई- मुंबई उपनगर ( 1 ऑक्टोबर 1990) अकोला- वाशिम ( 1 जुलै 1998) धुळे- नंदुरबार ( 1 जुलै 1998) परभणी – हिंगोली ( 1 मे 1999) भंडारा- गोंदिया ( 1 मे 1999) ठाणे -पालघर ( 1 ऑगस्ट 2014) आणखी 22 जिल्हे प्रस्तावित आहेत ( 2018 मध्ये स्थापना समितीचा प्रस्ताव)
Konkan Railway News: गणेश चतुर्थीला गावी न जाणारा चाकरमानी सापडणे तसे मुश्किल. नवीन वर्षाचे कॅलेंडर हातात आल्यावर या वर्षी गणेशचतुर्थी कोणत्या दिवशी आहे हे पहिले पाहणारा हा चाकरमानी खूप आधीपासूनच गणेशचतुर्थीला गावी जायचा बेत आखत असतो. यात सर्वात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे प्रवास. चाकरमान्यांचा खूप मोठा वर्ग गावी जाण्यासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. पण मोजक्या गाड्या असल्याने इथे आरक्षणाची खूप मारामारी असते. म्हणून कोकणमार्गे धावणाऱ्या रेल्वे गाडीला खूप मोठ्या प्रमाणात आगाऊ आरक्षण होत असते.
यंदा गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर रोजी मंगळवारी आहे. या वर्षी अंगारक योग असल्याने मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गावी जाणार आहेत. तुम्ही जर आगाऊ आरक्षण करत असाल तर खाली तुम्हाला आरक्षण तारखेचा चार्ट दिला आहे.
आरक्षण तारीख
प्रवासाची तारीख
वार
सण/सुट्टया
17-May
14-Sep
Thursday
18-May
15-Sep
Friday
19-May
16-Sep
Saturday
20-May
17-Sep
Sunday
21-May
18-Sep
Monday
हरतालिका तृतीया
22-May
19-Sep
Tuesday
गणेश चतुर्थी
23-May
20-Sep
Wednesday
ऋषिपंचमी
24-May
21-Sep
Thursday
25-May
22-Sep
Friday
26-May
23-Sep
Saturday
गौरी गणपती विसर्जन
27-May
24-Sep
Sunday
28-May
25-Sep
Monday
29-May
26-Sep
Tuesday
30-May
27-Sep
Wednesday
31-May
28-Sep
Thursday
अनंत चतुर्दशी , ईद-ए-मिलाद
01-Jun
29-Sep
Friday
02-Jun
30-Sep
Saturday
03-Jun
01-Oct
Sunday
04-Jun
02-Oct
Monday
महात्मा गांधी जयंती
आरक्षण करण्यासाठी तुम्हाला खालील गाड्यांचे पर्याय उपलब्ध आहेत.
सिंधुदुर्ग | वेंगुर्ला बंदरावर बनलेला कोकणातील पहिला झुलता पूल Sea Link पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. पर्यटक आणि स्थानिक सुद्धा फोटोशूट, सेल्फीशूट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येथे भेटी देत आहेत. या पुलामुळे वेंगुर्ले तालुक्याच्या पर्यटनात भर पडली आहे. मात्र रात्री हा नयनरम्य पूल काळोखात दिसत नाही त्यामुळे त्यावर विद्युत रोषणाई करण्याची मागणी होत आहे.
या झुलत्या पूलावर आकर्षक विद्युत रोषणाई तसेच शहरातील आंतर्रिक रस्त्यांची सुधारणा करण्याबाबत मनिष सातार्डेकर यांनी वेंगुर्ले नगरपरिषदला निवेदन दिले आहे. हे निवेदन कार्यालय अधीक्षक संगीता कुबल यांनी स्वीकारले आहे
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, झुलता पूलामुळे वेंगुर्ल्याच्या पर्यटनात भर पडत आहे. परंतु, या पुलावर विद्युत रोषणाई नसल्याने रात्रीच्यावेळी हा झुलता पुल काळोखात असल्याने या पुलाचे सौंदर्य रात्रीच्यावेळी पर्यटकांना पाहता येत नाही. त्यामुळे या पुलावर लवकरात लवकर विद्युत रोषणाई करावी. तसेच शहरातील आंतर्रिक रस्त्यांची दुरावस्था झालेली असून हे रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी त्याची डागडुजी करावी असे नमुद केले आहे.
इतर शहरात झुलते पूल पर्यटकांचे आकर्षण बनले आहेत. त्या पुलांवर आकर्षक रोषणाई करून मनमोहक दृश्य निर्मण केले जाते. त्यामुळे त्या त्या शहरांच्या सौंदर्यात भर पडली आहे. त्याच धर्तीवर वेंगुल्रे येथील पुलावर तशी आकर्षक रोषणाई करावी अशी मागणी होत आहे.