Author Archives: Kokanai Digital
“मुंबई गोवा महामार्गावर बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा भाग कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित असा या महामार्गाच्या गुणवत्तेबाबत देखील प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. वेग वाढवून कामाचा दर्जा घसरवला आहे का? सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कामाच्या गुणवत्तेबाबत सरकारने खुलासा करावा. कोकणवासियांच्या डोळ्यात सरकारकडून केली जाणारी धूळफेक थांबवा.”
मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाचा गर्डर लॉन्चर तुटला; दुर्घटनेचा थरारक व्हीडिओ व्हायरल#kokanaiLiveNews #KonkanNews #mumbaigoahighway pic.twitter.com/HsVdV3jnty
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) October 16, 2023
राजापूर : राजापूर पोस्ट ऑफिस येथे ग्राहकांसाठी रेल्वे आरक्षण सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ रेल्वे प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे. राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे औचित्य साधून रेल्वे तिकीट आरक्षण सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. राजापूर तालुक्यातील व इतर जवळच्या भागातील रेल्वे प्रवाशांसाठी आरक्षण सुविधा राजापूर पोस्ट ऑफिस येथे सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात रत्नागिरी हेड ऑफिस, लांजा, संगमेश्वर या पोस्ट ऑफिसमध्ये भारतीय रेल्वे व भारतीय डाक विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वे तिकीट आरक्षण सुविधा राजापूर पोस्ट ऑफिसमार्फत मिळावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी, विद्यार्थी, नोकरदार व लोकप्रतिनिधी यांच्याकडून होत होती. ही सेवा पोस्ट विभागाच्या पुढाकाराने सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
माणगाव :-भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुधुवार दि १८ रोजी माणगावाला येणार आहेत त्याचबोबर ग्रामपंचायत निवडणूक घोषित झाल्याने निवडणूक विषयी विचार विनिमय करण्यासाठी रविवारी दि.०८ रोजी बामणोली रोड, खरे मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली.लोकसभा निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येवून ठेपल्यांने रायगड रत्नागिरी जिल्हातील लोकसभा भाजपा लदवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.राज्याचे प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांचा रायगड जिल्ह्यात दोन दिवस प्रवस दौरा पार पडणार आहे.
दि.१८ रोजी भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे येणार असल्याने स्वागताची जंगी तयारी केली जात आहे.नुकतीच अदावा बैठक घेण्यात आली. व्यासपीठावर रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष माजी आमदार तसेच लोकसभेचे सांभाव्य उमेदवार धैर्यशील पाटील तसेच लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश धारप, प्रशांत शिंदे ,श्रीवर्धन विधानसभा प्रमुख व दक्षिण रायगड सरचिटणीस मिलिंद पाटिल, बिपिन दादा महामुंकर जिल्हा उपाध्यक्ष राजेश मापारा,जिल्हा उपाध्यक्ष नाना महाले,महिला जिल्हा मोर्चा अध्यक्ष सौ.हेमा मानकर,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष नीलेश थोरे, न.पं.चे उपनगराध्यक्ष राजेश मेहता,ता.अध्यक्ष उमेश साटम,सचिव गोविंद कासार माजी अध्यक्ष संजय अप्पा ढवळे सह आदी मान्यवर विराजमान झाले होते. धैर्यशिल पाटील यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान धैर्यशील पाटील तसेच इतर मान्यवर यांचे सह सर्व मान्यवर यांना स्थनिक पदाधिकारी यानी पुष्प गुच्छ देवून स्वागत केले.पुढे स्वागत व प्रास्ताविक भाषण ता.अध्यक्ष उमेश साटम यांनी केले. धैर्यशिल पाटील म्हणाले प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांचा दौरा असल्याने त्यांच्या स्वागताची तयारी केली जात आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी हातभर लावण्याची आवश्यकता आहे. मी आमदार असताना विधानसभा सभग्राहात माझा सर्वोत्कृष्ट आमदार महणून गौरव करण्यात आला होता. माझे वडील पाच वेळा आमदार महणून कार्य केले आत्ता तुमच्या बक्कम पाठींब्याने मी निवडूण रिंगणात उतरणार आहे. शिवसेना पक्ष सत्तेत असताना विकास खुंटल्याचे सांगून
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप तगडे उमेदवार उतरविणार आहे लोकसभा निवडणुकीत तूम्ही मला मताधिक्याने निवडून देणार असल्याचा पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले.यावेळी नाना महाले, प्रशांत शिंदे तसेच निलेश थोरे यांचेही भाषणे झाली. कार्यक्रमाच्या शेवटी गोविंद कासार यानी आभार मानले तसेच सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम दरम्यान माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी उमेश साटम यांना माणगाव तालुकाचे नवनिर्वाचित अध्यक्ष झाल्याबद्दल पुष्प गुच्छ देवून स्वागत,अभिनंदन तसेच शुभेच्छा दिले.
राजस्थान :निवडणूक आयोगाने राजस्थान विधानसभेसाठी मतदानाची तारीख बदलली आहे. 23 नोव्हेंबर ऐवजी आता 25 नोव्हेंबरला राजस्थानमध्ये मतदान होणार आहे. ही तारीख बदलण्याचे कारण ऐकून तुम्हीपण थोडे आश्चर्यचकित व्हाल.
23 नोव्हेंबर या दिवशी लग्नाचा चांगला मुहूर्त आहे. त्यामुळे त्याचा मतदानावर परिणामाची भीती सर्वच पक्षांनी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून हा बदल करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
दिनांक 23 नोव्हेंबर हा दिवस विवाह आणि मंगलकार्यासाठी शुभ असल्याने या दिवशी मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे आणि इतर सामाजिक कार्ये असतिल त्यामुळे या दिवशी मतदान करणे मतदारांना गैरसोयीचे जाईल. तसेच त्याचा परिणाम होवूनकमी मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या तारखेत बदल करावा अशी निवेदने राजकीय पक्षांकडून आणि सामाजिक संस्थे कडून आली होती. त्याचप्रमाणे समाज माध्यमातून सुद्धा हा याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. या सर्वांचा विचार करून आपण या तारखेत बदल करत असल्याचे भारतीय निवडणूक आयोगाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.













