Author Archives: Kokanai Digital

कुडाळ: उद्याच्या दहीहंडी उत्सवास सिनेकलाकारांची हजेरी

कुडाळ :भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून तसेच “मेरी माती मेरा देश” या संकल्पनेअंतर्गत  यंदा कुडाळ येथे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात पथकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
या उत्सवास सिनेअभिनेत्री  प्राजक्ता माळी, मानसी नाईक, अभिनेता भाऊ कदम, देवदत्त नागे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. बॉलीवूड गायक सचिन गुप्ता यांचा लाईव्ह शो या उत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. आतापर्यंत २६ पथकांनी नोंदणी केली असून त्यात  मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी येथील पथकांचा समावेश आहे. या स्पर्धेतील विजेत्या मंडळाला ५,५५,५५५ या रकमेचे पारितोषिक दिले जाणार असल्याचे कुडाळ भाजपचे तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी सांगितले आहे. 
ज्या मंडळांना या उत्सवात सहभागी व्हायचे आहे त्यांनी नाव नोंदणी साठी रुपेश कानडे यांच्याशी 7020363896 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   

Megablock on Konkan Railway: उद्याची जनशताब्दी एक्सप्रेस उशिराने धावणार

Konkan Railway News :  कोकण रेल्वे मार्गावर उद्या गुरुवार दिनांक ०७ सप्टेंबर रोजी चिपळूण ते संगमेश्वर दरम्यान रेल्वेच्या मालमत्ता देखभालीच्या कामासाठी सकाळी ७:३० ते १०:३० असा तीन तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या मेगाब्लॉकमुळे या मार्गावर धावणाऱ्या ३ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
१) Train no. 01139 Nagpur – Madgaon Jn. Special 
दिनांक ०६ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी कोलाड ते चिपळूण दरम्यान १०० मिनिटे उशिराने धावणार आहे.
२) Train no. 12051 Mumbai CSMT – Madgaon Jn. Janshatabdi Express
दिनांक ०७ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी कोलाड ते चिपळूण दरम्यान सुमारे ४० मिनिटे उशिराने धावणार आहे.
३)Train no. 16346 Thiruvananthapuram Central – Lokmanya Tilak (T) Netravati Express
दिनांक ०६ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रत्नागिरी ते संगमेश्वर दरम्यान सुमारे ४० मिनिटे  उशिराने धावणार आहे.

Mumbai Goa Highway | गणेशोत्सवात महामार्गावरील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वाहतुक पोलिसांची विशेष बैठक

नवी मुंबई : गणेशोत्सव काळात कोंकणातील गणेश भक्तांना त्यांच्या गावी वेळेत पोहचता यावे व गणेशोत्सवा दरम्यान वाहतुक कोंडी न होता हा सण निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी आज अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) डॉ.रविंद्र सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली नवीमुंबई येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

19 सप्टेंबर पासून सुरु होत असलेल्या गणेशोत्सवासाठी राज्यभरातून चाकरमाने कोकणात मोठया संख्येने जातात. शासकीय सुट्टीला जोडून दि. 16 व 17 रोजी शनिवार व रविवार आल्याने महामार्ग क्र. 66 वरील वाहतुक कोंडी लक्षात घेता पोलीस प्रशासनामार्फत वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात या बैठकीत आले असल्याचे सांगण्यात आले आहे. 

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ अंतर्गत मुंबई-पुणे दृतगती महामार्गावर गणेशोत्सव काळात वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी डेल्टा फोर्स व पेट्रोलिंग वाहनांची गस्त वाढविण्यात आली आहे. आवश्यक त्याठिकाणी सुचना फलक, रंबलर स्ट्रीप, गतीरोधक फलक, वाहतुक नियंत्रण सुचना फलक आदि लावण्यात आले आहेत अशी माहिती या बैठकीत देण्यात आली आहे 

तसेच राष्ट्रीय महामार्गांवर झालेल्या विविध अपघातात मदत करणाऱ्या मृत्युंजय दूतांचा अपर पोलीस महासंचालक(वाहतुक) डॉ.रविंद्र सिंगल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

 

रत्नागिरी : प्रशासनाकडून रिक्षा प्रवास वाहतुकीचे दरपत्रक जाहीर; ‘या’ दरांपेक्षा अधिक दर आकारला गेल्यास…..

रत्नागिरी: हंगामात खाजगी वाहतुकदारांकडून प्रवाशांची होणारी लूट थांबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या RTO राज्य परिवहन प्राधिकरणने पाउले उचलली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात रिक्षांचे दरपत्रक ठरवून दिले असून ते प्रसिद्ध केले आहे. या दरांपेक्षा जर कोणी रिक्षाचालक अतिरिक्त दर आकारत असेल तर त्याची तक्रार करण्यासाठी एक हेल्पलाइन नंबर सुद्धा जाहीर करण्यात आला आहे.

सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेऊन कमी अंतराला अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्याचे प्रकार हमखास घडत असतात. हे प्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणने रिक्षाचे मिटरने आणि शेअर-ए-रिक्षा तत्त्वावर चालविण्यात येणार्‍या रिक्षांचे दरपत्रक ठरवून जाहीर केले आहेत. या दरापेक्षा अधिक दर एखादा रिक्षाचालक आकारत असल्यास त्याच्या विरोधात तक्रार 02352 – 225444 या व्हॉटस् ॲप क्रमांकावर क्रमांकावर नोंदविण्यात यावी असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.

Mumbai Goa Highway :गणेशभक्तांच्या स्वागतासाठी २४ स्वागत कक्ष सज्ज

Mumbai Goa Highway :रत्नागिरी व रायगड जिल्हा पोलिस प्रशासनाने मुंबई गोवा महामार्गाने कोकणात येणार्‍या गणेशभक्तांच्या स्वागतासाठी तयारी सुरू केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १४ ठिकाणी, तर रायगड जिल्ह्यात १० ठिकाणी पोलिस चेकनाके स्वागत कक्ष सज्ज केले जाणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ सप्टेंबरपासून गणेशभक्त कोकणातील आपल्या गावी येण्यासाठी सुरवात होईल. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १० लाख चाकरमानी दाखल होतील, असा अंदाज जिल्हा पोलिस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात एकूण १० ठिकाणी पोलिस चौकी सज्ज असणार आहेत. रत्नागिरी जिल्हा आढावा घेणारी बैठक जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी ३९ ऑगस्टला घेतली. जिल्ह्यात एकूण १४ ठिकाणी पोलिस चेकनाके स्वागत कक्ष व्यवस्था करण्यात येणार आहे.

कशेडी घाटापासून खारेपाटणपर्यंत तसेच आंबाघाट येथे ही व्यवस्था असणार आहे. रायगड जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थापन करताना गणेशभक्तांचा प्रवास सुखकर करण्याकरिता दहा ठिकाणी चौक्या सज्ज असणार आहेत, अशी माहिती रायगड जिल्हा पोलिस प्रशासनाने दिली. खारपाडा पोलिस चौकी, पेण वाहतूक चौकी, वडखळ वाहतूक चौकी, वाकण वाहतूक चौकी, कोलाडनाका वाहतूक चौकी, माणगांव वाहतूक चौकी, लोणेरे वाहतूक चौकी,नातेखिंड महाड चौकी, पोलादपूर वाहतूक चौकी, पाली वाहतूक चौकी या सगळ्या ठिकाणी वाहतूक स्वागतकक्ष सुरू करण्यात येणार आहेत. गणेशोत्सव स्वागतासाठी वाहतूक व्यवस्थापनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची आढावा बैठक नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी बुधवारी (ता. ६) आयोजित केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ व सावंतवाडी हे तीन तालुके हे महामार्ग कक्षेत येतात.

क्रेन, रुग्णवाहिकेची सुविधा

गणेशोत्सव काळात भक्तांसाठी महामार्गावर असलेल्या सर्व स्वागत कक्षाच्या ठिकाणी वायरलेस सेट, क्रेन, रुग्णवाहिका या सुविधा सज्ज असणार आहेत, अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.

वसई-विरार आणि पाश्चिम रेल्वे क्षेत्रातील कोकणवासियांसाठी खुशखबर; कोकणात जाण्यासाठी सोयीच्या रेल्वेमार्गाला रेल्वेबोर्डाकडून मंजुरी

मुंबई:वसई-विरार, मिरा- भायंदर तसेच बोरिवली आणि पश्चिम रेल्वे कक्षेत राहणाऱ्या कोकण वासियांसाठी एक खुशखबर आहे. कोकणात जाण्यासाठी एक सोयीचा आणि जवळचा रेल्वेमार्ग लवकरच उपलब्ध होणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरून पनवेलसाठी सोयीचा असलेल्या नायगाव आणि जूचंद्र दरम्यानच्या नवीन दुहेरी रेल्वे लाईनचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्याला रेल्वेबोर्डकडून मान्यता मिळाली आहे.
पश्चिम रेल्वेवरून मुंबई सेंट्रल, वांद्रे, बोरिवली येथून कोकण रेल्वेवर जाणाऱ्या नियमित गाड्या सुरु करण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या नायगाव – जूचंद्र कॉर्ड लाईन (जोड मार्गिका) चा प्रस्ताव रेल्वे कडे पाठविण्यात आला होता. रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी माहिती अधिकारात या प्रस्तावाची सद्यस्थितीची माहिती मागवली  होती. या महितीनुसार या प्रस्तावाला रेल्वे बोर्डने दिनांक २७ जुलै २०२३ रोजी मान्यता दिली असून या प्रकल्पाची अंदाजित रक्कम १७५.९९ कोटी इतकी ठरविण्यात आली आहे. जमिनी अधिग्रहण केल्यापासून ३ वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे.
सध्या उपरोक्त परिसरातील नागरिकांना कोकणाकडे जाण्याकरिता दादर किंवा कुर्ला स्थानकात जाऊन पुढची रेल्वे पकडावी लागते. गर्दीमुळे ते त्रासचे ठरते. म्हणून नायगाव आणि जूचंद्रदरम्यान नवीन दुहेरी रेल्वे लाईन टाकण्याची मागणी केली गेली होती, त्या मागणीला यश आले आहे. आता प्रतीक्षा आहे ती लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करून करण्याची.  त्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. हा नवीन मार्ग झाल्यास पश्चिम रेल्वे कक्षेत येणाऱ्या मुंबईतील नागरिकांना कोकणात जाण्याचा जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. कोकणात जाणाऱ्या काही गाड्या या मार्गावरून वळविण्यात येणे शक्य होणार आहे. 

‘सिल्वर पापलेट’ महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणुन घोषित

मुंबई :’सिल्वर पापलेट’ महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून ओळखला जाईल अशी माहिती आज मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. सातपाटीमधील मच्छीमार सहकारी संस्थांनी याबाबत सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्याबद्दल मागणी केली होती ती आता पूर्ण झाली आहे. पापलेटला महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून घोषित केल्यास या अधिकृत मत्स्य प्रजातीच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासोबतच सागरी पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. असं त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.

 

 

गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावरील मालवाहतूक आणि रो-रो सेवा स्थगित ठेवा

रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे साकडे
मुंबई: गणेशचतुर्थीला कोकणात रेल्वेने गावी जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि जलद होण्यासाठी दिनांक १५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावरील मालवाहतूक आणि रो रो सेवा स्थगित ठेवावी असे साकडे रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे घातले आहे.
गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे मार्गावर नियमित गाड्यांशिवाय अजूनपर्यंत ३१२ विशेष गाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे. या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून मालवाहतूक आणि रो रो सेवा या कालावधीत पूर्णपणे स्थगित ठेवल्यास अजून गाड्या चालविण्यात येऊ शकतात. असे त्यांनी या निवेदनात म्हंटले आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे अतिरिक्त गाड्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावर ताण येणार आहे. या कालावधीत मालवाहतूक आणि रो रो सेवा चालविल्यास रेल्वेमार्गावर गाड्यांचा खोळंबा होणार आहे. अनेक गाड्या सिंग्नल साठी थांबवाव्या लागणार असून त्याचा त्रास प्रवाशांना होणार आहे. त्यामुळे मालवाहतूक आणि रो रो सेवा या कालावधीत पूर्णपणे बंद ठेवण्याचे साकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे. 
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/09/Fw-गणेशोत्सव-काळात-१५-ते-२७-सप्टेंबर-२०२३-पर्यंत-कोकण-रेल्वे-मार्गावरील-मालवाह.pdf” title=”Fw गणेशोत्सव काळात १५ ते २७ सप्टेंबर, २०२३ पर्यंत कोकण रेल्वे मार्गावरील मालवाह”]

Rain Alert : कोकणसह राज्यात पुढील चार दिवस पाऊस सक्रिय होणार

Rain Alert : राज्यातील शेतकर्‍यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. राज्यातील बहुतेक जिल्हय़ात पुढच्या ४/५ दिवसात पाउस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने येत्या ४८ तासात तेथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे त्यामुळे पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिनांक ३ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर पर्यंत कोकण गोव्यात मेघगर्जनेसह हलका-मध्यम पाऊस , तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज दिनांक ०४ सप्टेंबर रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ात तर दिनांक ०५ ते ०७ सप्टेंबर पर्यंत कोकणातील सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

दिनांक ५ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर पर्यंत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ात पावसाची शक्यता आहे.

उद्या होणारी तलाठी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी; विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई : मराठा आरक्षणाची मागणी करणार्‍या आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज निषेधार्थ उद्या बंद पुकारण्यात आला असल्याने उद्या होणारी तलाठी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याचा मुख्य सचिवांकडे केली आहे. याबाबत माहिती त्यांनी समाज माध्यमातून जनतेला दिली आहे. 

काय म्हणालेत विजय वडेट्टीवार? 

राज्यात उद्या तलाठी परीक्षा आहे, ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा करून मागणी केली आहे.

मराठा आरक्षणाची मागणी करणार्‍या आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज निषेधार्थ उद्या बंद पुकारण्यात आला आहे.

उमेदवारांना परीक्षेसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागणार आहे. मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस सरकारने बंद केल्या आहे त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भार वाढून वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तलाठी भरती परीक्षेच्या परीक्षार्थींना फटका बसू नये ,म्हणून ही परीक्षा तातडीने पुढे ढकलण्याची घोषणा सरकारने करावी.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search