Train Derailment:मागच्या काही दिवसांपासून ट्रेनचे अपघात किंवा दुर्घटना थांबण्याचं नाव घेत नाही. पुन्हा एकदा पहाटेच्या सुमारास एक्सप्रेसचे डबे रुळावरुन घसरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रेन रुळ सोडून पुढे गेली. या दुर्घटनेत मोठं नुकसान झालं असून घटनास्थळावरचे फोटो समोर आले आहेत.
19168 वाराणसी अहमदाबाद साबरमती एक्सप्रेस रुळावरुन घसरले. 22 डबे डिरेल झाले आहेत. मागच्या काही दिवसांपासून अशा घटना वाढत आहेत. या दुर्घटनेचं कारण अद्याप समोर आलं नाही
कानपूर भीमसेन सेक्शनदरम्यान ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेनंतर हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहेमहत्त्वाची बाब म्हणजे अजून तरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही.या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरू आहे.
प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचं काम सुरू आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. हा अपघात भयंकर होता. मात्र थोडक्यात जीवितहानी टळली आहे.
इंजिनला बोल्डर आदळल्याने इंजिनच्या कॅटल गार्डचे मोठे नुकसान झाल्याचं लोको पायलनं सांगितलं आहे. त्यामुळे ट्रेन डिरेल झाली असावी असा अंदाज आहे.
Konkan Railway: रविवार दिनांक 18/08/2024 रोजी ठाणे – दिवा स्थानकांदरम्यान ५ व्या आणि ६ व्या रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वेच्या काही गाड्यांच्या आरंभ आणि अंतिम स्थानकात तात्पुरता बदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार
दिनांक १६ ऑगस्ट रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) “नेत्रावती” एक्सप्रेसचा प्रवास पनवेल स्थानकावर समाप्त करण्यात येणार आहे.
गाडी क्र. १६३४५ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम सेंट्रल “नेत्रावती” एक्स्प्रेसचा प्रवास १८ ऑगस्ट रोजी पनवेल स्थानकावर सुरू होणार आहे.
दिनांक १८ ऑगस्ट रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. ५०१०४ रत्नागिरी – दिवा पॅसेंजरचा प्रवास पनवेल स्थानकावर समाप्त करण्यात येणार आहे.
मुंबई: बोरिवली येथून कोकणात जाण्यासाठी एक नियमित रेल्वे गाडी असावी असे स्वप्न पाहणाऱ्या कोकणकरांसाठी एक आशा निर्माण करणारी बातमी समोर येत आहे. नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रयत्नाने बोरिवली ते सावंतवाडी अशी गाडी येत्या २४ ऑगस्ट रोजी चालू होणार असल्याची माहिती उत्तर मुंबईच्या कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुमेश आंब्रे यांनी दिली आहे.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार पियुष गोयल यांनी हल्लीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बोरिवली तुन कोकणात जाणारी नियमित रेल्वे चालू करणार अशी ग्वाही दिली होती. त्यांनी आपला शब्द खरा केला असून ही गाडी सोडण्यासाठी सर्व तजवीज केली आहे. या गाडीचे वेळापत्रक, थांबे आणि इतर माहिती दिनांक २३ ऑगस्टपूर्वी जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.
बोरिवली-दहिसर, कांदिवली, गोरेगाव, जोगेश्वरी या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कोकणकर जनतेची वस्ती आहे. कोकणात जाण्यास गाडी पकडण्यासाठी त्यांना दादर किंवा वसई या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे बोरिवली येथून कोकणसाठी नियमित स्वरूपात गाडी चालविण्यात यावी यासाठी खूप वर्षांपासून मागणी होत आहे. खासदार पियुष गोयल यांनी बोरिवली येथून कोकणसाठी गाडी चालविण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
मुंबई:- रायझिंग सन क्रीडा उत्सव मंडळ (रजि.) चारकोप सेक्टर एक आयोजित ७८ व्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कार्यक्रम बाळ-गोपाळ, भगिनी व रहिवाश्यांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन जल्लोषात व उत्साहात पार पाडला. ध्वजारोहण सुधाकर कदम, विषश कार्यकारी अधिकारी व संचालक सरस्वती कोचिंग क्लासेस यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाल्यावर राष्ट्रध्वजाला सलामी देवून राष्ट्रगीत गाण्यात आले.
उत्सव मंडळाच्या वतीने वर्षभरात विविध कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जातात.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सल्लागार डॉ. मकरंद गावडे, राजेश सोनवणे, अध्यक्ष राजेश सोरप, उपाध्यक्ष सुधाकर वस्त, चिटणीस अमित पालांडे, उपचिटणीस राहूल केदारी, खजिनदार सुनीत कदम, उपखजिनदार निलेश धावडे, व्यवस्थापक प्रशांत प्रिदांवनकर यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत प्रिदांवनकर यांनी केले तर सुधाकर वस्त यांनी समस्त रहिवाशी, मान्यवर, हितचिंतक, देणगीदार यांच्ये आभार व्यक्त केले.
Revas Reddy Coastal Highway:रेवस रेड्डी सागरी महामार्गाविषयी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. या सागरी महामार्गावरील 1.7 किमीच्या बाणकोट खाडी वरील EPC मोडवर असलेल्या पुलाच्या नागरी बांधकामासाठी NCC Ltd या कंपनीला सर्वात कमी बोली लावणारा बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले आहे.
सावित्री नदीवरील हा नवीन पूल रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट (वेसवी बंदराजवळ) आणि रायगड जिल्ह्यातील बागमांडला (हरिहरेश्वरजवळ) जोडणार आहे. रेवस – रेड्डी कोस्टल महामार्गावरील बाणकोट पूल हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) द्वारे खाड्या आणि नद्यांवर बांधण्यात येणाऱ्या ८ नवीन पुलांच्या मालिकेचा एक भाग आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRDC ने मार्च 2024 मध्ये या पुलाच्या बांधकामासाठी अंदाजित रु. 272.88 कोटी आणि बांधकाम कालावधी अवधी ३ वर्षे साठी निविदा मागवल्या होत्या. एकूण 4 बोलीदारांच्या बोली दिनांक 2 जुलै रोजी तांत्रिक बोली आल्या होत्या. या बोलींत सर्वात कमी बोली रुपये NCC Ltd ची रुपये 355.99 या रकमेची होती. तर टी आणि टी इन्फ्रा (359.92 कोटी रुपये), अशोका बिल्डकॉन (363.47 कोटी रुपये), रेल विकास निगम लिमिटेड RVNL (380.70 कोटी रुपये) या बोलीदारांनी बोली लावली होती.
एनसीसीची 355.99 कोटी रु.ची बोली MSRDC च्या 272.88 कोटी रुपयांच्या अंदाजापेक्षा 30.45% जास्त होते त्यामुळे त्यामुळे MSRDC आणि बोली लावणारी कंपनी यांच्यात वाटाघाटी होऊन या पुलाचे कंत्राट अंतिम करण्याबाबत बोलीच्या दुसऱ्या फेरीत निर्णय घेतला जाणार आहे.
सावंतवाडी-सावंतवाडी येथील अपूर्ण रेल्वेचे टर्मिनस मार्गी लागावे, येथे सुपरफास्ट गाड्यांना थांबा मिळण्याबरोबरच कोरोना काळात काढून घेण्यात आलेले थांबे पूर्ववत करावे, सावंतवाडी स्थानकाचे नामकरण करावे आदी मागण्यांसाठी आज १५ ऑगस्ट रोजी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी तर्फे पुकारण्यात आलेले घंटानाद आंदोलन शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार श्री दिपक भाई केसरकर यांचा आश्वासनांअंती तात्पुरते स्थगित करण्यात आले.
कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी तर्फे गेल्या २.५ वर्षात सावंतवाडी स्थानकातील अपूर्ण प्रवासी सुविधा आणि रेल्वेचे अपूर्ण असणारे टर्मिनस पूर्ण करण्यात यावे यासाठी विविध प्रयत्न करण्यात आले होते. २६ जानेवारी २०२४ ला प्रवासी संघटना सावंतवाडी ने आपल्या सलग्न संस्थांना सोबत घेऊन हजारो लोकांचा उपस्थितीत एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन केले होते. तरी देखील शासन आणि प्रशासनाकडून कोणतीही दखल व हालचाल केली गेली नव्हती. परंतु पुन्हा संघटनेने आंदोलन पुकारल्यानंतर लगेच सावंतवाडी स्थानकातील PRS सुविधा ही १२ तास करण्यात आली.
आज झालेल्या या आंदोलनात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीसावंतवाडी टर्मिनसला लागणारे पाणी हे तिलारी धरणातून जल जीवन मिशन अंतर्गत मिळेल त्यासाठी ७ कोटी मंजूर आहेत तसेच येथील प्रस्तावित रेलोटेल लवकरच पूर्ण करण्यात येईल आणि टर्मिनस साठी लागणाऱ्या रस्त्याला जिल्हा नियोजन मधून ३ कोटी मंजूर झाले असल्याची माहिती दिली. तसेच येथील रेल्वे थांब्यासाठी पुढील आठवड्यात कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष कुमार झा यांच्याशी आपल्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक लावू असे सांगितले.या वेळी त्यांचा सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख श्री अशोक दळवी, गजानन नाटेकर, आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर श्री राजन तेली तसेच रुपेश जी राऊळ, मायकल डिसोझा यांनी देखील आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आंदोलनकर्त्यांची बाजू समजून आपण आपल्या परीने पाठपुरावा करू असे सांगितले.
याला प्रतिसाद म्हणून संघटनेचे अध्यक्ष ॲड संदीप निंबाळकर यांनी जर कोकण रेल्वे च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक लावली नाही आणि आमच्या मागण्या केल्या नाहीत तर गणेशोत्सवाच्या तोंडावर सावंतवाडी स्थानकावर हजारोच्या संख्येने रेल्वे रुळावर बसून आंदोलन करू असा इशारा दिला. यावेळी संघटनेचे सल्लागार बबन साळगावकर, बाळासाहेब बोर्डेकर, सचिव मिहिर मठकर, ॲड नकुल पार्सेकर, नरेंद्र तारी, माजी पंचायत सदस्य शांताराम गावडे, गुणाजी गावडे, भूषण बांदिवडेकर, सागर तळवडेकर,सुधीर राऊळ,सागर नानोसकर,गणेश चमणकर, प्रथमेश पाडगावकर, विनोद नाईक, अभिषेक शिंदे आदी संघटनेचे सदस्य उपस्थित होते
रायगड – १७ वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि त्यातच पावसाळ्यात झालेली दुरावस्था याकडे सरकारचे लक्ष केंद्रित करण्याकरिता जनआक्रोश समितीने माणगाव येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू केले असून आधी हा महामार्ग पूर्ण करा नाहीतर कोकणात येणारा एकही नवीन महामार्ग होऊ देणार नाही, असा इशाराच राज्य सरकारला कोकणवासियांनी दिला आहे.
माणगावमध्ये समितीच्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली. यामध्ये माणगावसह कोकणातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर निघालेल्या रॅलीमध्ये सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत महामार्ग रोखून धरण्यात आल्याने काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर महामार्गावरील आंदोलन स्थगित करत नियोजित जागेवरती आमरण उपोषण सुरू करण्यात आले.
हा महामार्ग केव्हा पूर्ण होईल याबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या महामार्गाच्या दुरावस्थेमुळे झालेल्या अपघातात जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कसलेही आर्थिक सहाय्य केले जात नाही, अपघातात जखमी झालेल्यांना सहाय्य केले जात नाही याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. कोकणातील नागरिकांची उपजीविका पर्यटनावरती अवलंबून आहे मात्र रस्ता खराब असल्याने पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवली आहे त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला असल्याने त्याची नुकसान भरपाई राज्य सरकारने करून द्यावी, यासह विविध चौदा मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
संजय यादवराव, रुपेश दर्गे, अजय यादव, संजय जंगम,पराग लाड, सुरेंद्र पवार, प्रशिल लाड, आशिष बने, अनिल जोशी यांनी या आंदोलनाची हाक दिली असून त्यास मावळ प्रतिष्ठान, बजरंगदलसह अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब साबळे, उद्योजक शेखर गोडबोले यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणास उपस्थित राहून पाठींबा व्यक्त केला.
नवीन महामार्ग होऊ देणार नाही – यादवराव
गणेशोत्सव आणि शिमगा हे कोकणवासियांचे प्रमुख सण आहेत. या सणाला कोकणी माणूस यायला निघाला की सरकार सल्ला देते पुणे कोल्हापूर मार्गे कोकणात जा, अरे आम्ही आमच्या हक्काच्या रस्त्याने जायचे नाही तर किती वर्षे दुसर्यांच्या दारातून घरी जायचे हे यापुढे जमणार नाही, आधी आमचा रस्ता पूर्ण करा. जोपर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत कोकणासाठी घोषणा होत असलेल्यापैकी एकही नवीन महामार्ग होऊ देणार नाही, असा इशारा कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी दिला.
Konkan Railway:कोकण रेल्वेने स्पर्धात्मक निविदांद्वारे 1200 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे नवीन प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करून 2023-24 या वर्षात आतापर्यंतचा सर्वात जास्त म्हणजे 301 कोटी रुपयांचा नफा मिळवला असल्याचे कोकणरेल्वे तर्फे आज स्वातंत्र्यदिनाच्या औचित्य साधून जाहीर करण्यात आले आहे. याबरोबरच कोकण रेल्वेने केलेल्या इतर कामगिरींची यादीही जाहीर केली आहे
जानेवारी ते जुलै 2024 या कालावधीत सौर उर्जेपासून 3.18 लाख युनिट वीज निर्मिती केली आहे, ज्यामुळे ऊर्जा बिलांमध्ये 38.56 लाख रुपयांची बचत झाली करण्यात कोकण रेल्वेला यश आले आहे.
रेल्वे मंत्रालयाने गोव्यातील जुने गोवा आणि पेरनेम बोगद्याच्या बांधकामासाठी 1,486 कोटी रुपयांच्या भागीदारीस मान्यता दिली असून कर्नाटकातील ठोकूर आणि येथील गुड्स शेडचे काम पूर्ण झाले आहे. तर उडुपी (कर्नाटक), इंदापूर (महाराष्ट्र), वेर्णा (गोवा) येथील गुड्स शेडचे काम प्रगतीपथावर आहे.
कोकण रेल्वेने जानेवारी 2024 ते जुलै 2024 दरम्यान सुमारे 15,399 गाड्या चालवल्या असून त्यात 181 उन्हाळी विशेष गाड्यांसह 11,444 मेल/पॅसेंजर गाड्या 3,955 मालगाड्यांचा समावेश आहे.
एकूण 26 हरवलेल्या मुलांची रेल्वे आणि रेल्वे परिसरातून सुटका करण्यात आली आणि त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांना आणि चाइल्ड हेल्पलाईनला सुपूर्द करण्यात आले. दिनांक 05 जुन 2024, जागतिक पर्यावरण दिनी कोकण रेल्वे मार्गावर आणि कोकण रेल्वे विहार येथे एकूण 6,548 रोपे लावण्यात आली.
कोकण रेल्वेतील 190 पदांसाठी भरती अधिसूचना लवकरच जारी करण्याचे नियोजन असल्याचे कोकण रेल्वे तर्फे जाहीर करण्यात आले. 2021-22 आणि 2022-23 या वर्षांसाठी कर्मचारी कल्याण निधीतून कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी 20.78 लाख रुपये रोख पुरस्कार आणि शिष्यवृत्ती म्हणून वितरित करण्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी 9 जुलै 2024 रोजी इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड (IIFCL) आणि कोकण रेल्वे यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.
भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक/कोकण रेल्वे, संतोष कुमार झा यांनी आज राष्ट्रीय ध्वज फडकावला आणि कोकण रेल्वे विहार, नेरुळ, नवी मुंबई येथे रेल्वे संरक्षण दल (RPF) तुकडीची पाहणी केली. मेळाव्याला संबोधित करताना झा यांनी कोकण रेल्वेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या अपवादात्मक टीमवर्क आणि समर्पणाची प्रशंसा केली. त्यांनी संस्थेच्या वाढीसाठी आणि यशासाठी त्यांचे परिश्रमपूर्वक प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन केले. याशिवाय, त्यांनी कोकण रेल्वेच्या उत्कृष्टतेची वचनबद्धता अधोरेखित करणाऱ्या अनेक महत्त्वाच्या कामगिरी आणि भविष्यातील उपक्रमांवर प्रकाश टाकला.
मुंबई :गणेशभक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूशखबर दिली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे गणेशोत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्थेचा आढावा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत बुधवारी बैठक झाली. या बैठकीत गणेशभक्तांसाठी टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता. तसेच, गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे असे आदेश दिले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे. राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवापूर्वी राज्यात सर्वत्र गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत. त्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करावा. झाडांच्या फांद्याची छाटणी करावी. कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी. मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तैनात करावेत असे निर्देशही या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोल माफीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे.राज्यात गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक त्या तातडीच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे असे शिंदे यांनी या बैठकीत सांगितले. गेल्या वर्षी ज्या सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली होती, ती यावर्षीही कायम राहील त्यासाठी शुल्क आकारणी करू नये. मंडळांना ज्या अन्य परवानग्या लागतात त्यासाठी एक खिडकी य़ोजना राबवावी. गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावर मिरवणुकीदरम्यान अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी तातडीने करावी. खड्डे बुजवताना आधुनिक तंत्रज्ञनाच्या वापराणे बनविण्यात आलेले साहित्य वापरावे. खड्डे बुजविण्याकामी हयगय करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.राज्यातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिले. मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते. अशा ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्नीशमन वाहन तैनात करावेत. महापालिकांनी गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी तैनात केलेल्या अग्नीशमन वाहनासाठी कुठलेही शुल्क आकारणी करू नये, असेही निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याचबरोबर, सर्वंत्र पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी मंडळांनी देखील सहकार्य करावे. मूर्ती विसर्जनासाठी महापालिकांनी कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पुणे येथील एका संस्थेने विसर्जित केलेल्या शाडू मातीच्या मुर्तीचा पुनर्वापराचा प्रयोग केला असून त्यांनी पुनरावर्तन हा उपक्रम सुरू केला आहे. राज्यात सर्वच महापालिकांनी हा उपक्रम राबवावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी एक्स खात्यावरून दिली.
महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) अंमलात आणली आहे. १ जुलैपासून ही योजना कार्यान्वित झाली असून आतापर्यंक १ कोटी ३५ लाख अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. तर, रक्षाबंधाच्या पार्श्वभूमीवर १७ ऑगस्ट रोजी हा निधी पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे व उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी दिली होती. परंतु, त्या आधीच पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याची माहिती भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी दिली. पैसे जमा झाल्याचा मेसेज आल्याचे काही स्क्रीनशॉटही त्यांनी शेअर केले आहेत.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची रक्कम रक्षाबंधनाच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यांवर जमा होण्यास सुरुवात!!
राज्यभरात अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या योजनेत राज्यभरातून कोट्यावधी माता-भगिनींचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातून मान्यता प्राप्त अर्जदारांना थेट… pic.twitter.com/iTeaZpCH71
— Ranajagjitsinha Padmasinha Patil (@ranajagjitsinh1) August 14, 2024