Konkan Railway Updates: दिनांक 10.07.2024 मडुरे – पेडणे विभागादरम्यानच्या पेडणे येथे बोगद्यामध्ये पाणी भरल्याने कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. कोकण रेल्वे ह्याआधी काही गाड्या रद्द केल्याचे तसेच काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याचे जाहीर केले आहे. त्यात अजून काही गाड्यांची भर पडली आहे.
कोकण रेल्वेने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार खालील गाड्या रद्द, शॉर्ट टर्मिनेटेड आणि अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत
गाडी क्र. 12449 मडगाव जं. – 10/07/2024 रोजी सुरू होणारा चंदीगड एक्स्प्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
गाडी क्र. 12620 मंगळुरु सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) 10/07/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
गाडी क्र. 12134 मंगळुरु जं. – 10/07/2024 रोजी सुरू होणारा मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
गाडी क्र. 50107 सावंतवाडी टर्मिनस – मडगाव जं. 10/07/2024 रोजी सुरू होणारा प्रवासी प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन आणि आंशिक रद्द केलेल्या गाड्या.
दिनांक 09/07/2024 रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्र. 20111 मुंबई सीएसएमटी – मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेसचा प्रवास सावंतवाडी टर्मिनस येथे समाप्त करण्यात आला आहे
दिनांक 09/07/2024 रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्र. 12619 लोकमान्य टिळक (टी) – मंगळुरु सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेसचा प्रवास सावंतवाडी टर्मिनस येथे समाप्त करण्यात आला आहे.
Konkan Railway Updates : आताच हाती आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावरील अडकलेल्या गाड्या मागे फिरवून पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.
अधिक माहिती खालील प्रमाणे
दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु केलेली गाडी क्र. २२११३ लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली एक्स्प्रेस सिंधुदुर्ग स्थानकावरून मागे फिरवून पनवेल – पुणे जंक्शन – सोलापूर जंक्शन मार्गे वळविण्यात आली आहे.
दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु केलेली गाडी क्र. १२४३२ ह. निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस राजापूर रोड येथून मागे फिरवून पनवेल – पुणे जंक्शन – सोलापूर जंक्शन मार्गे मागे वळवली आहे.
दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु केलेली गाडी क्र. 19260 भावनगर – कोचुवेली एक्स्प्रेस रत्नागिरी स्थानकावरून मागे फिरवून पनवेल – पुणे जंक्शन – सोलापूर जंक्शन मार्गे मागे वळवली आहे.
दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु केलेली गाडी क्र.१२२२३ लोकमान्य टिळक (टी) – एर्नाकुलम एक्स्प्रेस चिपळूण येथून मागे फिरवून पनवेल-पुणे जंक्शन- सोलापूर जंक्शन मार्गे वळविण्यात आला आहे.
दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु केलेली गाडी क्र. 20932 इंदूर जं. – कोचुवेली एक्स्प्रेसचा प्रवास सुरत – जळगाव – बडनेरा जं. – वर्धा जं. – बल्हारशाह – वारंगळ – विजयवाडा जं. – रेनिगुंटा जं. – काटपाडी जं. आणि कोईम्बतूर मार्गे वळविण्यात आला आहे.
Follow us on Kokan Railway Stopped :काल दिनांक 09/07/2024 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास कोकण रेल्वेच्या कारवार विभागातील मडूरे-पेडणे विभागादरम्यानच्या बोगद्यात पाण्याच्या फुटलेल्या मोठ्या पाझरामुळे रूळावर मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल जमा झाला होता. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतुक ठप्प झाली होती. रात्री 10 वाजून 13 मिनिटांनी कोकण रेल्वेने मोठ्या शर्थीने प्रयत्न करून हा बोगदा वाहतुकीसाठी योग्य केला आणि वाहतुक सुरू केली होती मात्र आज(10/07/2024) पहाटे 3 वाजताच्या सुमारास पुन्हा मोठा पाझर फुटला आणि बोगद्यात पुन्हा पाणी जमा झाले असल्याची माहिती कोकण रेल्वे तर्फे देण्यात आली आहे.
अनेक गाड्या रद्द
या घटनेमुळे कोकण रेल्वेने या मार्गावरील अनेक गाड्या रद्द केल्या असून तर काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविल्या आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार खालील गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
गाडी क्रमांक २२२२९ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. वंदे भारत एक्सप्रेसचा दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.
गाडी क्र. १२०५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. जनशताब्दी एक्स्प्रेसचा दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.
गाडी क्र. १०१०३ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. मांडवी एक्सप्रेसचा दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.
गाडी क्र. १२१३३ मुंबई सीएसएमटी – मंगळुरु एक्सप्रेसचा ०९/०७/२०२४ रोजी सुरु होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.
गाडी क्र. १०१०४ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेसचा – दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.
गाडी क्र. ५०१०८ मडगाव जं. – सावंतवाडी दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवासी प्रवास रद्द करण्यात आला आहे.
गाडी क्रमांक २२१२० मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसचा दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.
गाडी क्र. १२०५२ मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी – जनशताब्दी एक्स्प्रेसचा १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.
गाडी क्र. १०१०६ सावंतवाडी रोड -दिवा एक्सप्रेसचा दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.
खालील गाड्या पर्यायी मार्गाने चालविण्यात येणार आहेत.
दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणार्या गाडी क्र. १२६१८ एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. मंगला पनवेल – लोणावळा – पुणे – मिरज – लोंडा – मडगाव मार्गे चालविण्यात येणार आहे.
दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणार्या गाडी क्रमांक १९५७७ तिरुनेलवेली – जामनगर एक्स्प्रेसचा प्रवास शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. – इरोड जं.- धर्मावरम – गुंटकल जंक्शन – रायचूर – वाडी – सोलापूर जं. – पुणे जं. – लोणावळा – पनवेल आणि पुढील योग्य मार्ग..
दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणार्या गाडी क्र. १६३३६ नागरकोइल – गांधीधाम एक्स्प्रेसचा शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. – इरोड जं.- धर्मावरम – गुंटकल जंक्शन – रायचूर – वाडी – सोलापूर जं. – पुणे जं. – लोणावळा – पनवेल आणि पुढील योग्य मार्ग..
दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्रमांक १२२८३ एर्नाकुलम – एच. निजामुद्दीन शोरानूर जंक्शन मार्गे वळवली जाईल. – इरोड जं.- धर्मावरम – गुंटकल जंक्शन – रायचूर – वाडी – सोलापूर जं. – पुणे जं. – लोणावळा – पनवेल आणि पुढील योग्य मार्ग..
दिनांक १०/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणार्या गाडी क्र.गाडी क्र. २२६५५ एर्नाकुलम – एच. निजामुद्दीन एक्स्प्रेसचा प्रवास शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. – इरोड जं.- धर्मावरम – गुंटकल जंक्शन – रायचूर – वाडी – सोलापूर जं. – पुणे जं. – लोणावळा – पनवेल आणि पुढील योग्य मार्ग..
दिनांक १०/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणार्या गाडी क्र.गाडी क्र. १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) एक्स्प्रेसचा प्रवास तिरुअनंतपुरम सेंट्रल येथून 16:55 वाजता पुन्हा शेड्यूल करण्यात आला आणि शोरानूर जंक्शन मार्गे वळवण्यात आला आहे – इरोड जं.- धर्मावरम – गुंटकल जंक्शन – रायचूर – वाडी – सोलापूर जं. – पुणे जं. – लोणावळा – पनवेल आणि पुढील योग्य मार्ग..
Konkan Railway Stopped:तळकोकणात पडणार्या मुसळधार पावसामुळे मालपे (पेडणे) येथील बोगद्यात रूळांवर पाणी साचल्याने कोकण रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली आहे.
पाणी साचल्याने मार्ग पूर्ण झाला असून दक्षिणेकडून मुंबईच्या दिशेने येणार्या गाड्या गोवा राज्यातील स्थानकांवर तर दक्षिणेला जाणार्या गाड्या सिंधुदुर्गातील स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. गाड्यांची सद्यस्थिती पाहता (08:00 PM) गोव्याचा दिशेने जाणार्या गाड्यांपैकी तेजस एक्सप्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेस, दिवा एक्सप्रेस अजुनहि सावंतवाडी स्थानकावर पोहोचल्या नाही आहेत. तर मांडवी एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकावर आहे.
रेल्वेकडून प्रवाशांसाठी याबाबत अजूनही कोणती माहिती आली नसली तरी रेल्वे कर्मचारी त्या बोगद्याकडे पोहोचले असून लवकरच याबाबत सविस्तर माहिती जाहीर करतील अशी अपेक्षा आहे.
मुंबई : ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या नावे मुंबई उपनगरातील अनेक स्थानकांना मिळाली होती. इतकी वर्षे ही नावे या रेल्वे स्थानकांची ओळख बनली होती. आता या स्थानकांच्या नावांना स्थानिक परिसरातील ओळखीनूसार नावे देण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावा राज्य विधान सभेच्या पावसाळी अधिवेशनात अखेर मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे या स्थानकांची जुनी ओळख पुसली जाणार आहे. आता यापुढे इंग्रजी नावे जाऊन नवीन मराठी नावे स्थानकांना मिळणार आहेत. त्यामुळे आता मरीन लाईन्स मुंबादेवी असे त्या परिसराला साजेसे असे नाव मिळणार आहे. तर करीरोडला काय नाव मिळणार आहे. ? ते पाहूयात….
मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव आज विधानसभेत अखेर मंजूर करण्यात आला आहे. आता हा ठराव केंद्र सरकारला पाठवला जाणार आहे. त्यानंतर रितसर नावं बदलण्यात येणार आहेत. आता करी रोड – लालबाग रेल्वे स्थानक म्हटले जाणार आहे. तर पुढील बदल अनुक्रमे सँडहर्स्ट रोड – डोंगरी रेल्वे स्थानक, मरीन लाईन्स – मुंबादेवी, चर्नी रोड – गिरगाव, कॉटन ग्रीन – काळाचौकी, डॉकयार्ड रोड – माझगाव रेल्वे स्थानक, किंग सर्कल – तीर्थकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक अशी नावे देण्यात आली आहेत.
मुंबई सेंट्रस स्थानकाला मुंबईचे शिल्पकार समाजसेवक नाना शंकर शेठ असे नाव देण्यात यावे अशी मागणी नामदार जगन्नाथ ( शंकर ) शेठ प्रतिष्ठान गेली कित्येक वर्षे करीत आहे. परंतू या स्थानकाचे नाव बदलण्यात आले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नाना शंकर शेठ यांना आशियातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 साली मुंबईच्या बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर धावली होती. या जीआपीआर रेल्वे कंपनीचे कार्यालयच नाना शंकर शेठ यांच्या घरात उघडण्यात आले होते. व्हीक्टोरीया टर्मिनस या स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नाव देण्याची मागणी 90 च्या दशकात कॉंग्रेसने केली होती.
मुंबई : 2023 विश्वचषकाचा अंतिम सामना मुंबईत ठेवण्याचा बेत होता. मात्र वानखेडे स्टेडियम च्या कमी प्रेक्षक संख्येचे कारण देवून तो सामना गुजरात राज्यातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात आला. क्रिकेटप्रेमी मुंबईकरांना याचे मोठे दुःख झाले होते. मात्र आता मुंबईजवळ लवकरच 1 लाख आसन क्षमतेचं स्टेडियम उभारलं जाणार आहे. हे स्टेडियम आसन क्षमते बाबतीत राज्यातील पाहिले तर देशातील दुसर्या क्रमांकाचे स्टेडियम ठरणार आहे.
पाहिल्या मुंबईमध्ये वानखेडे, ब्रेबॉर्न आणि नवी मुंबईत डी.वाय.पाटील ही आंतरराष्ट्रीय स्डेटियम असताना आता मुंबईला आणखी एक अद्ययावत आणि 1 लाख क्षमता असलेलं स्टेडियम मिळणार आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबईच्या वानखेडे स्टेडियमपासून 68 किमी अंतरावर आणि ठाण्यापासून 26 किमी अंतरावर हे स्टेडियम उभारलं जाणार आहे. कल्याणच्या जवळ अमाने गावामध्ये हे स्टेडियम उभारलं जाईल. 50 एकर जमिनीवर हे स्टेडियम उभारलं जाईल.
ही जमीन विकत घेण्यासाठी एमसीएने एमएसआरडीसीने काढलेली खुली निविदा भरली आहे. महाराष्ट्र सरकारकडून स्टेडियम उभारणीला परवानगी मिळावी, याची एमसीए वाट पाहत आहे. मुंबईमध्ये एवढं मोठं स्टेडियम उभारण्याचं दिवंगत एमसीए अध्यक्ष अमोल काळे यांचं स्वप्न होतं. मागच्याच महिन्यात अमोल काळे यांचं 47व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं.
सिंधुदुर्ग: सावंतवाडी टर्मिनसच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र सुशोभीकरणात प्रवेशद्वारावर स्थानकाच्या नावाचा चुकीचा बोर्ड लावल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. प्रवेशद्वारावर “सांवतवाडी टर्मिनस” असा बोर्ड न लावता “सावंतवाडी रोड” असा बोर्ड लावल्याने तळकोकणातील जनतेत संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराबद्दल प्रवासी रेल्वे संघटना देखील सक्रिय झाल्या असून याबद्दल त्यांनी आपला निषेधही नोंदविला आहे. प्रशासनाने त्वरीत हा बोर्ड हटवून सावंतवाडी टर्मिनस असा बोर्ड लावावा अशी मागणी केली आहे.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे भूमिपूजन 9 वर्षापूर्वी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले होते. मात्र मा. सुरेश प्रभू यांचा केंद्रीय रेल्वेमंत्रिपदावरून पायउतार होताच हे काम रखडले ते आजतायगत पूर्ण झाले नाही. रेल्वे प्रवासी संघटनांनी या दरम्यान कित्येकदा आवाज उठवला, मात्र त्याच्या हाती पोकळ आश्वासनांशिवाय काहीच आले नाही. आता तर स्थानकाच्या नावातून “टर्मिनस” हा शब्द कायमचा हटवण्याचा प्रयत्न होत आहे. विशेष म्हणजे सावंतवाडी टर्मिनस चे भूमिपूजन ज्या सरकारच्या कार्यकाळात झाले होते तेच सरकार आता सत्तेत असताना हा प्रकार होत असल्याने तळकोकणातील प्रवाशांच्या मनात सरकारविषयी आणि लोकप्रतिनिधींविषयी चीड निर्माण होत आहे.
टर्मिनस समस्त कोकणकरांसाठी फायद्याचे
सावंतवाडी टर्मिनस होणे हे फक्त सावंतवाडी पंचक्रोशीतील प्रवाशांसाठीच नाही तर समस्त कोकण प्रवाशांसाठी फायद्याचे ठरणार आहे. कारण हे टर्मिनस झाले तर वसई/बोरिवली – सावंतवाडी, पुणे – सावंतवाडी, कल्याण – सावंतवाडी या महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी सोयीच्या ठरणाऱ्या गाड्या सोडणे शक्य होणार आहे . त्याचबरोबर गणेश चतुर्थी, होळी या सारख्या सणांसाठी कोकणात सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्या दक्षिणेकडे न पाठवता सावंतवाडी पर्यंत मर्यादित करणे शक्य झाले असते. त्यामुळे सध्या गुरं ढोरांसारखा प्रवास करण्याऱ्या कोकणकरांचा प्रवास चांगल्या प्रमाणात सुखकर झाला असता. Follow us on
मुंबई: मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम उपनगरीय लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांवर झाला आहे. रुळांवर पाणी साचल्याने मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या ४ एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहे. आज सकाळी सीएसएमटी वरून कोकणात जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस तसेच वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकांवर झाला आहे.
सीएसएमटी वरून सुटणारी मांडवी एक्सप्रेस सुमारे ४ तास उशिराने सकाळी सोडण्यात आली आहे. तर जनशताब्दी एक्सप्रेस तसेच वंदे भारत एक्सप्रेस या गाड्या वेळेवर सुटल्या असल्या तरी सुमारे २ ते अडीच तास उशिराने धावत आहे.
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुवांधार कोसळत असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून आंबोलीत धबधब्यातील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. वाढत्या प्रवाहामुळे आज येथील आलेल्या पर्यटकांना खबरदारी म्हणून खाली उतरविण्यात आले आणि प्रवेश बंद करण्यात आला. वेंगुर्ला बेळगाव मार्गावर माडखोल बाजारात चार फूट पाणी आल्याने येथील रस्ताही काही कालावधी साठी बंद होता.
हवामान खात्याने आज सिंधदुर्गला दक्षतेचा ‘रेड’ अलर्ट दिला होता. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला आहे. सिंधुदुर्गात आज मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून अनेक ठिकाणी रस्त्यावर आणि तसेच बाजारात पाणी साचल्याने येथील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले आहे. सावंतवाडी शहरातही मुसळधार पाऊस झाल्याने बाजारपेठ तसेच रस्ते पाण्याने भरले आहेत. खारबारदारी म्हणून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
जिल्ह्यात उद्याही पावसाचा जोर कायम
हवामान खात्याने पुढील चार दिवसांचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असून त्यानंतर पावसाचा जोर ओसरणार आहे.
Indian Railway News:भारतीय रेल्वे अपग्रेड करण्याच्या आणि उत्त्पन्न वाढविण्याच्या नादात प्रशासनाला सामान्य वर्गातील प्रवाशांचा विसर पडला होता. मात्र उशिरा का होईना सरकारला आपली चूक उमजली आहे. रेल्वे बोर्डाने पुढच्या दोन वर्षांत १० हजार नॉन एसी कोच निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे.
रेल्वे गाड्यांमधील वाढलेली प्रचंड गर्दी आणि जनरल कोचची कमी असलेली संख्या यामुळे सामान्य वर्गातील प्रवाशांची प्रचंड कुचंबना होत आहे. त्या संबंधाने मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहेत. त्या लक्षात घेता यातील ५३०० कोच जनरल राहणार आहेत, हे विशेष !गेल्या वर्षभरात सर्वच मार्गावर रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशात रेल्वेकडून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी गाड्यांमधील जनरल कोचची संख्या कमी केल्याने गरिब वर्गाच्या रेल्वे प्रवाशांची मोठी कुचंबना होत आहे. एसीचे तिकिट काढून प्रवास करणे त्यांना परवडत नाही. त्यामुळे ते जनरलच्या तिकिटा घेऊन गाडीत चढतात. जागा मिळेल तेथे बसून, उभे राहून प्रवास करतात. त्यामुळे अन्य प्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे रेल्वे गाड्यात वाद होतात. त्याच्या तक्रारीही होतात अन् अधिकाऱ्यांच्या नावाने शिमगा केला जातो. हा सर्व प्रकार प्रवाशांसाठीच नव्हे तर रेल्वे अधिकाऱ्यांसाठीही मनस्तापाचा विषय ठरला आहे. तो लक्षात घेता रेल्वे बोर्डाने पुढच्या दोन वर्षांत १० हजार नवीन कोच निर्माण करण्याची योजना तयार केली आहे. त्यात ५३०० कोच जनरलचे राहणार आहेत. असा आहे कोच निर्मितीचा आराखडा२०२४ -२५ मध्ये अमृत भारत जनरल कोच सह एकूण २६०५ कोच, १४७० स्लीपर आणि नॉन एसी कोच, ३२३ एसएलआर कोच, ३२ पार्सल व्हॅन आणि ५५ पॅन्ट्री कार तयार करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे २०२५-२६ मध्ये अमृत भारत जनरल कोचसह २७१० कोचची निर्मिती केली जाणार असून, १९१० नॉन एसी स्लीपर, ५१४ एसएलआर कोच, उच्च क्षमतेच्या २०० पार्सल व्हॅन आणि ११० पॅन्ट्री कार निर्माण करण्याची योजना रेल्वेने बनविली आहे.