अभिमानास्पद! छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘गनिमीकावा’ जेएनयुच्या अभ्यासक्रमात

   Follow us on        
राज्यातील तमाम जनतेला अभिमान वाटावा अशी एक अभिमानाची बातमी समोर आली आहे. आता जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि मराठा लष्करी इतिहास शिकवला जाणार आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात येणार आहे. या द्वार अखंड भारताची संकल्पना आणि हिंदवी स्वराज्यासाठी शिवरायांचा संघर्ष शिकवला जाणार आहे. जेएनयूच्या – कुलगुरू प्रा. शांति श्री घुलीपूडी पंडित यांनी याबाबत माहिती दिली.
हा अभ्यासक्रम जेएनयू येथील स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज अंतर्गत सुरू केला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज सेंटर फॉर सिक्युरिटी अँड स्ट्रैटिजिक स्टडीज वा नावाने सुरू होणाऱ्या या अभ्यासक्रमाला महाराष्ट्र सरकारचे सहकार्य लाभणार आहे.  या कोर्समध्ये इतर विषयांसह भारतीय सामरिक विचार, मराठा लष्करी इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांची नौदल रणनीती आणि गनिमी युद्ध शिकविण्यावर भर दिला जाईल. जेएनयूमध्ये मराठा ग्रँड स्ट्रॅटेजि, गुरिल्ला डिप्लोमसी, शिवाजी महाराजांच्या काळातील स्टेटक्राफ्ट आणि त्यानंतर स्टेटक्रापट इत्यादी सहा अभ्यासक्रम शिकवण्याचा प्रस्ताव आहे. या कोर्ससाठी पहिल्या पाच वर्षात सुमारे १५ ते ३५ कोटी रुपये खर्च येऊ शकतो.
महाराष्ट्र सरकारकडून १० कोटींचा निधी
“आम्हाला भारतीय ज्ञान व्यवस्थेत बदल घडवून आणायचा होता आणि भारताच्या सुरक्षा आणि धोरणात्मक अभ्यासासाठी पर्यायी मॉडेल्स आणायचे होते. जेएनयुमधील सध्याचा अभ्यासक्रम हा प्रामुख्याने पाश्चात्य अँग्लो-अमेरिकन मॉडेलचा आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, विशेषतः त्यांची नौदल शाखा, त्यांची नौदल युद्धाची संकल्पना आणि हिंदवी स्वराज या संकल्पनेचा नीट अभ्यास केलेला नाही. आम्हाला वाटले की यांचाही अभ्यास करायला हवा. महाराष्ट्र सरकारने या उपक्रमासाठी खूप उत्साह दाखवला आणि आम्हाला १० कोटी रुपयेही दिले. भारत बदलाच्या काळातून जात आहे आणि म्हणूनच आपला इतिहास आणि प्रतीके पुनर्मूल्यांकन करणे देखील महत्त्वाचे आहे. असं जेएनयूच्या प्राचार्या शातिश्री धुलीपुडी पंडित यांनी सांगितलं.
Facebook Comments Box

महत्वाचे: रेल्वे आरक्षण नियमांत १ नोव्हेंबर पासून होणार मोठा बदल

Indian Railway: भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमांत एक मोठा बदल केला आहे. सध्या आगाऊ आरक्षण 120 दिवस आधी करता येते त्यात बदल करून ही मर्यादा 60 दिवसांवर आणण्यात आली आहे . म्हणजे आता रेल्वे आरक्षण फक्त 60 दिवस अगोदर करता येणार आहे. गुरुवारी (17 ऑक्टोबर 2024) रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आता आगाऊ आरक्षणाची अंतिम मुदत कमी करण्यात आली आहे. यामुळे लोकांना आगाऊ तिकीट काढण्यासाठी कमी वेळ मिळेल.
रेल्वेने या अधिसूचनेत म्हटले आहे की 1 नोव्हेंबर 2024 पासून, ट्रेनमधील आगाऊ आरक्षणाची सध्याची वेळ मर्यादा 120 दिवसांवरून 60 दिवसांपर्यंत कमी केली जाईल (प्रवासाची तारीख वगळता). तथापि, 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत 120 दिवसांच्या ARP अंतर्गत केलेले सर्व बुकिंग कायम राहतील. हा नवा नियम नोव्हेंबरपासून केलेल्या बुकिंगवर लागू होणार आहे.
ताजसारख्या ट्रेनला नियम लागू होत नाहीत
ताजसारख्या दिवसा काही वेळा धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांच्या बाबतीत कोणताही बदल होणार नाही, असेही रेल्वेने म्हटले आहे. एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रेस इत्यादींमध्ये आगाऊ आरक्षणाची वेळ मर्यादा कमी आहे. याशिवाय विदेशी पर्यटकांसाठी ३६५ दिवसांच्या मर्यादेत कोणताही बदल होणार नाही.

Facebook Comments Box

Konkan Railway: प्रवाशांसाठी धोकादायक बनलेली ही गाडी आता एलएचबी स्वरूपात धावणार; स्लीपर डब्यांमध्येही कपात

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर सुरवातीपासून धावणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस येत्या फेब्रुवारीपासून एलएचबी कोचसहित धावणार असल्याची माहिती दक्षिण रेल्वेने प्रसिद्ध केली आहे. अलीकडेच या गाडीच्या छताचा भाग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली होती त्यामुळे या गाडीचे जुने डबे बदलून नवीन स्वरूपाचे एलएचबी कोच जोडण्यात यावेत अशी मागणी प्रवासी संघटनेनंकडून होत होती.
दक्षिण रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक १२६२०/१२६१९ मंगुळुरु – एलटीटी – मंगुळुरु मत्स्यगंधा एक्सप्रेस दिनांक १७ फेब्रुवारीपासून एलएचबी कोचसहित धावणार आहे.
डब्यांच्या संरचनेत बदल 
ही गाडी सध्या २३ आयआरएस कोच सहित धावत असून सुधारित डब्यांच्या संरचनेनुसार २२ एलएचबी डब्यांसह चालविण्यात येणार आहे.
सध्याची संरचना – एसी टू टियर – ०२, एसी थ्री टियर – ०४,  सलीपर – ११, जनरल – ०४, एसएलआर  – ०२  असे मिळून एकूण २३ आयआरएस डबे
सुधारित संरचना  – एसी टू टियर – ०२, एसी थ्री टियर – ०४, एसी थ्री टियर इकॉनॉमी – ०२, सलीपर – ०८, जनरल – ०४, दिव्यांगनासाठी  – ०१, ब्रेकव्हॅन  – ०१  असे मिळून एकूण २२ एलएचबी  डबे
सुधारित संरचनेत या गाडीच्या जनरल डब्यांत कपात करण्यात आली असून त्यांची संख्या ११ वरुन ८ वर आणण्यात आली आहे. तर एसी थ्री टियर इकॉनॉमीचे २ जोडण्यात येणार आहेत.
देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्रवासी, पर्यटक आणि व्यापाऱ्यांसाठी मे १९९८ रोजी मत्स्यगंधा एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. मात्र गेल्या २६ वर्षांत या रेल्वेगाडीत कोणतेही बदल करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे या रेल्वेगाडीचे डबे खराब झाले असून, मोडकळीस आले होते. गेल्या पाच वर्षांपासून प्रवासी संघटनाकडून या रेल्वेगाडीला लिंके हॉफमन बुश (एलएचबी) डबे जोडण्याची मागणी रेल्वे मंत्रालय, रेल्वे मंडळ आणि दक्षिण रेल्वेकडे करण्यात येत होती. तर, जुलै २०२४ रोजी उडुपी – चिकमंगलुरू येथील खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी रेल्वेमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान मत्स्यगंधा एक्स्प्रेससाठी एलएचबी डबे जोडण्याची मागणीही केली होती. अलीकडेच या गाडीच्या छताचा काही भाग कोसळल्याचा विडिओ एका प्रवाशाने X या समाज माध्यमावर पोस्ट केला होता.

Facebook Comments Box

Mumbai Local: मुंबई पश्चिम उपनगरीय लोकलचे वेळापत्रक बदलले; नविन वेळापत्रक येथे डाऊनलोड करा

   Follow us on        

Mumbai Local: पाश्चिम उपनगरीय मार्गावरील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पाश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकल गाड्यांचे वेळापत्रक दिनांक 12 ऑक्टोबर पासून बदलण्यात आले आहे.

नवीन वेळापत्रकात १२ नव्या लोकल फेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर ६ लोकल सेवांचा विस्तार करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने नवीन वेळापत्रकात अप दिशेने सहा आणि डाउन दिशेने सहा लोकल सेवांचा समावेश केला आहे.

अप दिशेने बोरिवली – चर्चगेट जलद लोकल बोरिवलीहून सकाळी १०.३६ वाजता चालविण्यात येत होती. ती लोकल आता भाईंदरहून सकाळी १०.२१ वाजता सुटेल आणि चर्चगेटला सकाळी ११.२४ वाजता पोहोचेल. विरार – अंधेरी जलद लोकल दादरपर्यंत विस्तारित केली आहे. ही गाडी विरारहून दुपारी ३.३६ वाजता सुटेल आणि दुपारी ४.४१ वाजता दादरला पोहोचेल. तर वसई रोड – चर्चगेट जलद लोकल विरारहून चालविण्यात येणार आहे. वसई रोडवरून रात्री ८.४१ वाजता सुटणारी चर्चगेट जलद वातानुकूलित लोकल आता विरारहून रात्री ८.२९ वाजता सुटेल आणि रात्री ९.५३ वाजता चर्चगेटला पोचणार आहे.

प्रवाशांच्या मागणीनुसार पश्चिम रेल्वेने १२ डब्यांच्या १० जलद लोकलला १५ डब्यांत रूपांतरित केले आहे. अप मार्गावर १०.३९ वाजताची विरार – चर्चगेट, १०.४४ ची विरार – दादर लोकल, दुपारी १.१४ वाजता सुटणारी विरार – अंधेरी, दुपारी १.४२ वाजता सुटणारी विरार – चर्चगेट, दुपारी २.४८ वाजता सुटणारी विरार – बोरिवली या लोकल १५ डब्बा चालविण्यात येणार आहेत. तर डाउन दिशेने दुपारी १२.६ वाजता सुटणारी दादर – विरार लोकल, दुपारी १२.०९ वाजताची चर्चगेट – विरार, दुपारी २ वाजताची अंधेरी – विरार, दुपारी ३. १८ वाजता सुटणारी चर्चगेट – विरार, दुपारी ३. २३ वाजता सुटणारी बोरिवली – विरार जलद लोकल १५ डब्याची चालविण्यात येणार आहे.

नवीन १२ लोकल कोणत्या? 

अप दिशेने सकाळी ५.३२ वाजता अंधेरी – चर्चगेट धीमी लोकल, सकाळी ७ वाजताची डहाणू रोड – विरार धीमी लोकल, सकाळी १०.२५ वाजताची डहाणू रोड – विरार धीमी लोकल, सकाळी ११.३५ ची जलद विरार – चर्चगेट लोकल, दुपारी २. २८ ची गोरेगाव – चर्चगेट धीमी लोकल आणि रात्री ९.५८ वाजता बोरिवली – चर्चगेट धीमी लोकल चालविण्यात येणार आहे. तर डाऊन दिशेने सकाळी ४.५० वाजता विरार – डहाणू रोड दरम्यान धीमी लोकल, सकाळी ९.०७ वाजता चर्चगेट – गोरेगाव धीमी लोकल, ९.३० वाजता विरार – डहाणू रोड धीमी लोकल, दुपारी २. २३ वाजता चर्चगेट – गोरेगाव धीमी लोकल, रात्री ९.२७ वाजता चर्चगेट – अंधेरी धीमी लोकल, रात्री १०. ५ वाजता चर्चगेट – नालासोपारा जलद लोकल चालविण्यात येणार आहे.

बदललेले वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक क्लिक करा.

अप लोकल

https://kokanai.in/wp-content/uploads/2024/10/1728545484440-UP-AC-78-PTT-W.E.F.-12.10.2024.pdf

डाऊन लोकल

https://kokanai.in/wp-content/uploads/2024/10/1728545420850-DN-AC-PTT-78-W.E.F.-12.10.2024.pdf

 

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाघांच्या संख्येत वाढ

   Follow us on        

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या जनगणनेत आठ वाघांची नोंद झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच विक्रमी ८ वाघांची नोंद झाली आहे. यात तीन नर आणि पाच मादींचा समावेश आहे. जानेवारी २०२४ ते मे २०२४ या कालावधीत वनविभागाने लावलेल्या सीसीटीव्हीत हे वाघ टिपण्यात आले आहेत.
सावंतवाडी व दोडामार्ग या दोन तालुक्यांत गेल्या काही महिन्यांपासून जनावरांवर मोठ्या प्रमाणात हल्ले वाढू लागले होते. त्यामुळे हे हल्ले वाघाकडूनच होत असल्याचे वनविभागाच्या लक्षात आले होते. तसेच काही ठिकाणी वाघ प्रत्यक्षात वन कर्मचाऱ्यांना दिसले.

सिंधुदुर्ग वनविभाग तसेच सह्याद्री टायगर रिझर्व्ह, फॉरेस्ट  डब्लू सी टी ही स्वयंसेवी संस्था अशा तिघांनी मिळून जानेवारी महिन्यात वाघांची जनगणना केली यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत जंगलातील प्रमुख ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. या कॅमेऱ्यात सावंतवाडी पासून दोडामार्ग तालुक्यातील जंगलात तब्बल आठ वाघ आढळून आले. एवढे मोठ्याप्रमाणात वाघ दिसण्याचे सिंधुदुर्ग च्या इतिहासात प्रथमच घडले आहे.कारण २०१४ च्या जनगणेत वाघांची संख्या ही पाच होती तर २०१९ मध्ये हीच संख्या शून्य वर आली होती मात्र आता २०२४ मध्ये वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.विशेष म्हणजे यात तीन नर व पाच मादीचा समावेश आहे.

 

Facebook Comments Box

ओंकार लाड; वैभववाडीचा ‘संदेश जिमन’

   Follow us on        
सिंधुदुर्ग: समाज माध्यमांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास आपला संदेश संबंधित यंत्रणेकडे पोहोचवून इच्छित परिणाम  साधता येतो. कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसताना केवळ फेसबुकच्या  माध्यमातून जनजागरण करून संगमेश्वर या रेल्वे स्थानकावर गाडयांना थांबे मिळवून देऊन पत्रकार संदेश जिमन यांनी ही गोष्ट दाखवून दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी स्थानकावरील प्रश्नांसाठी सुद्धा ओंकार लाड या नावाच्या तरुणाने नेहमीच आवाज उठवला आहे. सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून त्याने या स्थानकावरील गैरसोयींवर यंत्रणेचे लक्ष वेधले आहे. वैभववाडी स्थानकावर पुरेशी प्रवासी संख्या असताना सुद्धा पादचारी नाही होता. याकडे ओंकार ने वेळोवेळी X च्या माध्यमातून इथे पादचारी पूल व्हावा अशी मागणी केली होती. त्याचा या प्रयत्नाला अखेर यश आले असून येथे एक पादचारी मंजूर करण्यात आला असून कालच आमदार नितेश राणे यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
मूळ गाव वैभववाडी-नापणे असलेला ओंकार सध्या मुंबईमध्ये आपले एमबीएचे शिक्षण पूर्ण करत आहे. तसेच शिक्षण पूर्ण करता करता तो नामांकित बिग ४ मध्ये नोकरी सुद्धा करत आहे. मुंबईमध्ये सध्या तो आई बाबा समवेत वास्तव्यास आहे. कोकण रेल्वे असो व मुंबई लोकल, ज्या ज्या गोष्टी त्याला खटकतात त्या त्या गोष्टी तो X च्या माध्यमातून शासनासमोर आणि जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. वैभववाडी रेल्वे स्थानकावर पादचारी पूल नसल्याने प्रवाशांना प्लॅटफॉर्म वरून खाली उतरून रूळ ओलांडावे लागत आहे. यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींचे खूप हाल होतात. पुरेशी प्रवासी संख्या असूनही प्रशासन इथे साधा एक पादचारी पूल का बांधत नाही हा प्रश्न त्याने उठवायला सुरवात केली. येथील आमदार नितेश राणे यांच्या x वरील पोस्ट वर कंमेंट करून किंवा संबंधित यंत्रणेला टॅग करून त्याने जनजागरण केले. अखेर त्याचा प्रयत्नांना यश आले असून येथे एक पादचारी पूल मंजूर झाला आहे.
वैभववाडी स्थानकावर या पुलाव्यतिरिक्त अजून कित्येक प्रश्न आहेत. या स्थानकावर अजून गाडयांना थांबा मिळणे आवश्यक आहे. तसेच येथे PRS तिकीट बुकिंग सुविधा सुरु करणे आवश्यक आहे. या गोष्टींसाठी मी माझे प्रयत्न नेहमीच चालू ठेवीन असे ओंकार आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाला

Facebook Comments Box

Konkan Railway: मध्य रेल्वेचा शनिवार – रविवार ब्लॉक; कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ‘या’ गाड्यांवर परिणाम

   Follow us on        

Konkan Railway: मध्य रेल्वेच्या मुंबई सीएसएमटी आणि मस्जिद स्थानकांदरम्यान रेल्वे रूळावरील पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले जाणार असून या कामासाठी मध्य रेल्वे मार्गावर ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या ब्लॉकचा परिणाम कोकण रेल्वे सेवेवर होणार आहे,तो खालील प्रमाणे

या गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन:

गाडी क्रमांक १२०५२ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी “जनशताब्दी” एक्सप्रेसचा दिनांक १२/१०/२०२४ आणि १३/१०/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास दादर येथे समाप्त होईल.

दिनांक १२/१०/२०२४ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्रमांक २०११२ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी “कोकणकन्या” एक्सप्रेसचा प्रवास पनवेल येथे समाप्त होईल.

दिनांक १२/१०/२०२४ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्रमांक २२१२० मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी “तेजस” एक्सप्रेसचा प्रवास दादर येथे समाप्त होईल.

या गाड्यांचे शॉर्ट ओरिजिनेशन : 

गाडी क्रमांक १२०५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. “जनशताब्दी” एक्सप्रेसचा दिनांक १३/१०/२०२४ प्रवास दादर येथून सुरू होणार आहे.

गाडी क्रमांक १०१०३ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. मांडवी एक्सप्रेसचा दिनांक १३/१०/२०२४ प्रवास पनवेल स्थानकावरून सुरू करण्यात आहे.

Facebook Comments Box

सावंतवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस कै. जयानंद मठकर यांचे नाव

   Follow us on        

सिंधुदुर्ग: सावंतवाडीकरांसाठी एक अभिमान वाटेल अशी बातमी समोर आली आहे. सावंतवाडी तालुक्यातील कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोलगाव सावंतवाडीस, ज्येष्ठ समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, सिंधुदुर्गातील कामगार चळवळीचे प्रणेते माजी आमदार स्वर्गीय जयानंद शिवराम मठकर यांचे नाव देण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाने राज्यातील 108 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नावात बदल करून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती तसेच समाजसुधारकांची नावे देण्याचा शासन निर्णय जाहीर केला असून माजी आमदार ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर यांनी कोकण रेल्वेसाठी लढा दिला. कोकणातील सामाजिक आणि विकासात्मक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. त्यांचे नाव आज सावंतवाडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस दिल्याने ही समस्त सावंतवाडीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

मठकर यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२९ रोजी मुंबईत झाला. त्यांचे शिक्षणही मुंबईत झाले. मालवणच्या टोपीवाला स्मारक शाळेतही ते काही काळ शिक्षणासाठी होते. त्यांनी १९४२ मध्ये समाजवादी पक्षाच्या विचाराने प्रभावित होऊन सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उडी घेतली.

त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कामगार आणि गरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वेचले. त्यासाठी आंदोलने, संघर्ष केले. ज्येष्ठ समाजवादी नेते बॅ. नाथ पै, मधु दंडवते, ना. ग. गोरे, मृणाल गोरे, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या ज्येष्ठ समाजवादी नेत्यांच्या बरोबर त्यांनी काम केले.

मठकर यांनी राजकीय, सामाजिक, ग्रंथालय, सहकार, कामगार, पत्रकारिता, साहित्य अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला. कामगार आणि ग्रंथालय चळवळीत विशेष कार्य केले. पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, वनखात्यातील रोजंदारी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले.

कामगार क्षेत्राबरोबरच तयांनी ग्रंथालय चळवळीसाठीही कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनातून जिल्ह्यात अनेक ग्रंथालये उभी राहिली. गोवामुक्ती संग्रामातही त्यांचा सक्रीय सहभाग होता. तेरेखोल किल्ल्यावर पाठवण्यात आलेल्या सत्याग्रहींच्या एका तुकडीचे नेतृत्वही त्यांनी केले होते.

पत्रकारितेतील त्यांचे योगदानही मोठे होते. १९५३ पासून ते १९७४ पर्यंत त्यांनी नवशक्ती, लोकमान्य, केसरी आदी वृत्तपत्रांत वार्ताहर म्हणून काम केले होते.

Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वेमध्ये मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेसाठी झालेल्या निवडणुकीत NRMU चा विजय

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वेमध्ये मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेसाठी झालेल्या निवडणुकीत नॅशनल रेल्वे मजदुर युनियनने NRMU पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ३४२ मतांनी त्यांचा विजय झाला. नॅशनल रेल्वे मजदुर युनियन व कोकण रेल्वे कॉर्पोरेशन एम्प्लॉईज युनियन अशा २ प्रमुख संघटनांमध्ये ही निवडणूक गुप्त मतदान पध्दतीने बुधवारी झाली होती. याची मतमोजणी मडगाव येथे गुरुवारी झाली. कॉम्रेड नेते संघटनेचे महामंत्री कॉ.वेणू पी नायर यांच्या नेतृत्वाखाली एनआरएमयुने ही निवडणूक लढवली होती. विजयानंतर लाल सलाम च्या घोषणांनी कोकण रेल्वेच्या सर्व स्थानंकावर जल्लोष सुरु होता.

लाल बावटा प्रणीत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने आपला लाल झेंडा फडकवत केआरसी तसेच संलग्न अन्य संघटनांचा पराभव केला.कोकण रेल्वे ज्या राज्यातून जाते त्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथील कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी या निवडणुकीत मतदान केले. या निवडणुकीत ५ हजार २४९ कर्मचाऱ्यांपैकी ४ हजार ७९६ कर्मचाऱ्यांनी मतदान केले. त्यापैकी एनआरएमयूला २ हजार ५५३ मते मिळाली तर केआरसी एम्पा्लॉईज युनियनने २ हजार २११ मते मिळवता आली. यामुळे ३४२ मतांनी एनआरएमयुने विजय मिळवला आहे.या विजयाचा जल्लोष सर्वच रेल्वे स्थानकांवर एनआरएमयुच्या वतीने कर्मचारी करत होते.

Facebook Comments Box

पालघर येथील बेंचरेस्ट रायफल शुटींग स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद; ४०० हून जास्त खेळाडूंची उपस्थिती. 

   Follow us on        

पालघर: राज्यात मोठ्याप्रमाणावर नेमबाज तयार करण्याच्या ध्येय्याने प्रेरीत झालेल्या अनेक मातब्बर नेमबाजांसह प्रेसीहोल कंपनीने ऑलंपिक धर्तीवर आयोजीत राज्य स्तरीय बेंचरेस्ट रायफल शुटींग स्पर्धा पालघर येथे संपन्न झाली. या स्पर्धेत मोनल कारदानी यांनी प्रथम तर राल्सन सिइल्हो द्वितीय तर विनय पाणीग्रही यांनी तृतीय क्रमांकाचे यश संपादन केले. तर रत्नागिरीच्या पुष्कराज इंगवले रायफल शुटींग स्पोर्टस अकॅडमीच्या किमया जाधवला यंगेस्ट शुटर ॲवॉर्ड देवून गौरविण्यात आले.

पालघर येथील समीर पाटील रायफल शुटींग अकॅडमीच्या भव्य आधुनिक मैदानात आयोजित या स्पर्धेत संपूर्ण राज्यभरातून सुमारे ४०० हून अधिक खेळाडू उपस्थित होते. त्यामुळे मैदानाला मिनी ऑलंपिकचे स्वरूप प्राप्त झालेले दिसत होते.

जगभरात तब्बल ६७ पेक्षा अधिक देशांमध्ये बेंचरेस्ट रायफल शुटींग खेळले जाते. तसेच आगामी काही वर्षात ऑलंपिकमध्ये या खेळाची वर्णी लागण्याची शक्यता जेष्ठ नेमबाज व टायरो कंपनीचे राजीव ठाकूर यांनी व्यक्त केली .यावेळी प्रेसीहोल कंपनीचे मालक डॉ .श्री. वाय पी. तथा योगेंद्र शिरसाट व अंजूम काझी यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना नियम पाळा ,खेळा आणि जिंका असा सल्ला दिला. दरम्यान बॉलीवुडचे जेष्ठ विनोदवीर टिकू तलसानिया यांनी देखील स्पर्धक म्हणून हजेरी लावल्याने उपस्थितांना आणखी प्रेरणा मिळाली. राज्यसरकारने याकडे लक्ष पुरविल्यास महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल अस उद्गार त्यांनी यावेळी काढले. सदर स्पर्धेत वयाने सर्वात कमी असलेल्या यंगेस्ट शुटर ठरलेल्या किमयाचे प्रेसीहोल्सच्या अंजूम काझी व जेष्ठ अभिनेते टिकू तलसानिया यांनी विशेष अभिनंदन केले. यावेळी जेष्ठ राष्ट्रीय नेमबाज पुष्कराज इंगवले , एज्युकेशन ॲण्ड स्पोर्टस प्रमोशन फाऊंडेशनचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष व स्काऊट मास्टर ॲड . प्रशांत जाधव , ठाणेचे प्रथितयश नेमबाज मनिष कर्णिक , एसपीएसएसए पालघर चे सर्वेसर्वा समीर पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

 

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search