इंदापूर ते भोगाव (कशेडी) पाहिल्या टप्प्यातील महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी वनविभागाला 17 कोटी रुपयांचा निधी वर्ग
Follow us on
Mumbai Goa Highway Updates: जुन्या मुंबई गोवा महामार्गाच्या दुतर्फा मोठी सावली देणारी झाडे होती. नवीन महामार्गाच्या कामासाठी ती झाडे तोडण्यात आली. त्यामुळे दोन्ही बाजूचा भाग उजाड झाला आहे. या भागात या पावसाळ्यापासून झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाला काही वर्षानी त्याचे ‘हिरवे’ गतवैभव प्राप्त होणार आहे.
झाडे लावण्यात वन विभागाकडून दिरंगाई?
महामार्ग पूर्ण होत असताना दोन वर्षापूर्वी वन विभागाकडे निधी आला होता. मात्र वनविभागाने तो निधी वापरून झाडे लावण्यात दिरंगाई केली असल्याचा आरोप केला जात आहे. इंदापूर ते भोगाव (कशेडी) पाहिल्या टप्प्यातील महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी वनविभागाला 17 कोटी रुपये ईतका निधी दोन वर्षापूर्वीच वर्ग करण्यात आला होता. मात्र तेव्हा झाडे लावली गेली नाहीत. महामार्गाचे काम पूर्ण झाले नसल्याने तसेच आलेला निधी टॅप झाला असल्याने झाडे लावण्यात दिरंगाई झाली असल्याचे कारण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढे केले आहे. मात्र यावर्षी पावसाळय़ात झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
Revas Reddy Coastal Highway Updateds: रेवस-रेड्डी कोस्टल हायवे बद्दल एक महत्वाची माहिती समोर येत आहे. अशोका बिल्डकॉन लिमिटेड (ABL) या कंपनीलाला शुक्रवारी कोकणातील जयगड आणि कुंडलिका नद्यांवर दोन नवीन पुलांच्या नागरी बांधकामासाठी सर्वात कमी बोली लावणारा बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRDC ने दोन्ही पुलांच्या बांधकामासाठी मार्च 2024 मध्ये 3 वर्षांच्या बांधकाम मुदतीसह निविदा मागवल्या होत्या. अशोका बिल्डकॉन आणि हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी (HCC) या दोन्ही करारांसाठी आपल्या निविदा सादर केल्या होत्या.
जयगड खाडी पूल
रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड नदीवरील तवसल आणि सांडेलवगण यांना जोडणारा 2 लेन असलेला 4.4 किमी लांबीचा जयगड खाडी पुलाच्या बांधकामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या.
MSRDC चा अंदाज: रु. 625.87 कोटी
पक्की बोली (रु. कोटी)
Ashoka -794.85
HCC – 826.15
जयगड खाडी पूल
कुंडलिका खाडी पूल
3.8 किमी लांबीचा कुंडलिका पूल 2 लेनसह रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीवरील रेवदंडा आणि साळव यांना जोडेल. या पुलाला रेवदंडा खाडी पूल असेही संबोधले जाते.
MSRDC चा अंदाज: रु. 1061.67 कोटी
पक्की बोली (रु. कोटी)
Ashoka -1357.87
HCC – 1422.64
कुंडलिका खाडी पूल
अशोका बिल्डकॉन लिमिटेड ची बोली जयगड पुलासाठी 794.85 कोटी आणि रु. कुंडलिका पुलासाठी 1357.87 कोटी हे MSRDC च्या अंदाजापेक्षा 26.99% आणि 27.89% जास्त होते, त्यामुळे वाटाघाटी करून अंतिम निर्णय घेण्यात येईल.
या मार्गावरील निविदांची आतापर्यंतची माहिती
• आगरदांडा क्रीक ब्रिज – HCC सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• धरमतर क्रीक ब्रिज – Afcons इन्फ्रास्ट्रक्चर ही सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• जयगड खाडी पूल – अशोका बिल्डकॉन सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• कुंडलिका ब्रिज – अशोका बिल्डकॉन सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• कुणकेश्वर पूल – विजय एम मिस्त्री बांधकाम कंपनी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• काळबादेवी पूल – विजय एम मिस्त्री बांधकाम कंपनी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• बाणकोट खाडी पूल – बोलीसुरू आहे (निविदा उघडण्याची तारीख: ७ जून)
• दाभोळ खाडी पूल – बोली सुरू आहे ( निविदा उघडण्याची तारीख: ७ जून)
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन भरती 2024 :कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने ( KRCL ) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प अभियंता + प्रकल्प अभियंता (निविदा आणि प्रस्ताव), CAD/ड्राफ्ट्समन आणि सहाय्यक अभियंता/कंत्राटी या पदांसाठी उमेदवार भरती जाहीर केली आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार दिलेल्या पदांसाठी 11 रिक्त जागा उपलब्ध झाल्या आहेत. निवडलेल्या उमेदवारांना पदांनुसार रु.35400 ते रु.56100 पर्यंत मासिक मानधन मिळणार आहे. तसेच अर्ज करण्याची उच्च वयोमर्यादा ही पदांनुसार ४५ वर्षांपर्यंत आहे
कोकण रेल्वेच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, लागू उमेदवारांची निवड समितीने घेतलेल्या वॉक-इन मुलाखतीच्या आधारे केली जाईल . पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार समितीने घेतलेल्या वॉक-इन मुलाखतीसाठी थेट उपस्थित राहू शकतात.ही नियुक्ती 01-वर्षाच्या सुरुवातीच्या कालावधीसाठी कराराच्या आधारावर असेल आणि उमेदवारांच्या कामगिरीनुसार ती पुढे वाढविण्यात येणार आहे. मुलाखतीच्या ठिकाणी सर्व संबंधित कागदपत्रे आणि रीतसर भरलेला अर्ज सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.
पदांनुसार रिक्त जागा खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत:
किमान /कमाल वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि ईतर सविस्तर माहितीसाठी खालील जाहिरात वाचा 👇🏻
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्यातून होणार्या अवजड वाहतुकीच्या वाहनांमुळे अन्य वाहनचालकांचा गोंधळ उडत होता. या अवजड वाहतुकीच्या वाहनांना ब्रेक लावण्यासाठी अखेर राष्ट्रीय महामार्ग खात्याने शुक्रवारी सायंकाळी पुन्हा मजबूत हाईट खांब उभारले. यामुळे अवजड वाहतुकीच्या खांबांना अखेर ब्रेक लागला आहे.बहुचर्चित कशेडी बोगदा महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर केवळ हलक्या वजनांच्या वाहनांकरिता दुतर्फा वाहतुकीसाठी खुला झाला होता. मात्र बोगद्यातून अवजड वाहनांची दुतर्फा वाहतूकही सुरू होती. यामुळे अन्य वाहनचालकांचा गोंधळ उडून वादाचे प्रसंग देखील घडत होते. अवजड वाहतूक नियंत्रित करताना कशेडीतील महामार्ग वाहतूक पोलिसांची कसरत सुरू होती.यामुळे बोगद्यातील अवजड वाहतुकीला ब्रेक लावण्यासाठी हाईट खांबाचा अवलंब करण्यात आला. मात्र हे हाईट खांब अवजड वाहतुकीच्या वाहनचालकांनी अवघ्या दोन दिवसातच उखडले होते. अखेर राष्ट्रीय महामार्ग खात्याने आणखी मजबूत हाईट खांबाची उभारणी करण्याचा निर्णय घेत शुक्रवारपासून प्रत्यक्षात कार्यवाही देखील सुरू केली आहे.
मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाट हा महत्त्वाचा मानला जातो. गेल्या काही वर्षात नागमोडी वळणाच्या या घाटामध्ये अपघाताचे प्रमाण वाढतच आहे. या घाटामध्ये काही ठिकाणी ब्लॅक स्पॉट म्हणून निश्चित झालेले आहेत. हा घाट पूर्ण करण्यासाठी जवळपास 45 मिनिटांचा कालावधी लागतो आणि त्यात एखादं अवजड वाहनात बिघाड झाल्यास घाटावरती वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागतात. यासाठी नागमोडी वळणाच्या या मार्गाला पर्यायी म्हणून या घाटाचा सर्वे करण्यात आला होता. सर्वे केल्यानंतर पर्यायी घाटमाथावरच्या सध्या स्थितीत असलेल्या चालू रस्त्याच्या खाली बोगदा तयार करण्याचे निश्चित करण्यात आले होते.
रत्नागिरी, दि. २ जून : सोलापूर येथून गणपतीपुळे येथे देवदर्शन व पर्यटनाला आलेल्या एकाचासमुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने एकाचा बुडून मृत्यू झाला. आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अजित धनाजी वाडेकर (वय २५, रा. इसबावी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे मृताचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी कि सोलापूर जिल्ह्यातील इसबावी येथून अजित वाडेकर, अजय बबन शिंदे (वय २३), सार्थ दत्तात्रय माने (वय २४) व आकाश प्रकाश पाटील (वय २५) असे चार तरुण गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी व पर्यटनासाठी आले होते. गणपतीपुळे येथे समुद्रात अंघोळ करण्याचा मोह टाळता आला नाही. प्रथम देवदर्शन न करता ते समुद्रात अंघोळीसाठी उतरले. पोहता पोहता खोल पाण्यात जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी अजित वाडेकर हा खोल समुद्राच्या पाण्यात प्रवाहात अडकला. अजितला पाण्याबाहेर येता येत नसल्याचे लक्षात येताच त्याच्याबरोबर असलेल्या तरुणांनी व इतर पर्यटकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. किनाऱ्यावर असलेल्या गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक व गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राचे सहायक पोलिस उपनिरीक्षक संदीप साळवी, हवालदार कुणाल चव्हाण यांनी किनाऱ्याकडे धाव घेतली. जीवरक्षक अक्षय माने, महेश देवरुखकर, अंजिक्य रामाणी, विशाल निंबरे आदींसह किनाऱ्यावरील येथील व्यावसायिक राकेश शिवलकर यांनी पाण्यात उड्या घेतल्या. समुद्राच्या खोल पाण्यात अडकलेल्या तीन तरुणांना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर समुद्राच्या पाण्यात अडकलेल्या अजित वाडेकर या तरुणाला वाचविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याला पाण्याबाहेर काढल्यानंतर तो बेशुद्ध झाल्याने गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने तातडीने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी नेण्यात आले; मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्याने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा जाधव यांनी त्याला मृत घोषित केले. या तरुणाचे शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्रातून देण्यात आली. या घटनेचा अधिक तपास जयगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
रत्नागिरी,आवाज कोकणचा: चिपळूण, खेड, महाड, माणगाव विभागातील प्रवाशांना स्वतंत्र गाडी नसल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये गर्दी होऊन सर्वांनाच अडचणीचा सामना करावा लागतो. तर गावातून मुंबईला येताना आतील प्रवाशांनी दरवाजे आतून बंद केल्यामुळे खेड व त्यापुढील प्रवाशांना गाडीत चढताच येत नाही. काही वेळेस आरक्षण असलेल्या प्रवाशांची गाडीही चुकते. गणेशोत्सवात तर हा त्रास आणखी वाढतो. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून दादर व चिपळूण दरम्यान स्वतंत्र गाडी सोडण्याची मागणी होत आहे. तिकडे दुर्लक्ष करून रेल्वे प्रशासन केवळ गणेशोत्सव व होळीच्या काळात पनवेलवरून चिपळूण गाडी सोडत आहे. परंतु खेड/चिपळूणचे मुंबईपासूनचे अंतर रत्नागिरी/सावंतवाडीच्या तुलनेत कमी असल्यामुळे व पनवेल किंवा दिव्याला पोहोचणे त्रासदायक असल्यामुळे अति गर्दीचे दिवस वगळता प्रवासी त्या गाडीने प्रवास करण्यास उत्सुक नसतात.
हेच लक्षात घेता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातून रत्नागिरी, सावंतवाडी, मडगाव, मंगळुरुप्रमाणेच चिपळूणसाठीही स्वतंत्र गणपती विशेष गाडी सोडावी अशी मागणी जल फाउंडेशनने रेल्वे मंत्री, मध्य रेल्वे व कोंकण रेल्वेकडे केली आहे.
मागील काही वर्षांत खेड, माणगाव, रोहा येथे अति गर्दीमुळे प्रवाशांमध्ये झालेले वाद, गाडीवर दगडफेक यांसारखे प्रकार लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे जल फौंडेशच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Revas Reddy Coastal Highway Updates:विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड (VMCPL) ला शुक्रवारी रेवस रेड्डी या सागरी महार्गावरील कुणकेश्वर आणि काळबादेवी येथील दोन नवीन पुलांच्या नागरी बांधकामासाठी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी म्हणून घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य महामार्ग SH-4 (रेवस-रेड्डी कोस्टल हायवे) वरील दोन्ही पूल हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) द्वारे खाड्या आणि नद्यांवर बांधण्यात येणाऱ्या 8 नवीन पुलांच्या मालिकेचा भाग आहेत.
MSRDC ने दोन्ही पुलांच्या बांधकामासाठी मार्च 2024 मध्ये 3 वर्षांच्या बांधकाम मुदतीसह निविदा मागवल्या होत्या. 15 मे रोजी कुणकेश्वर पुलाच्या कंत्राटासाठी एकूण 3 आणि काळबादेवी पुलाच्या कंत्राटासाठी एकूण 2 निविदा उघडण्यात आल्या होत्या.
कुणकेश्वर पूल
1.6 किमी कुणकेश्वर पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिरासमोर बांधण्यात येणार आहे. यामध्ये 165 मीटर लांबीच्या मुख्य स्पॅनसह 330 मीटर लांबीचा “आयकॉनिक केबल-स्टेड” पूल हे घटक समाविष्ट आहेत.
MSRDC चा अंदाज: रु. 158.69 कोटी
कंपनी
बोली
Vijay M Mistry
187.53
Ashoka
196.78
T and T Infra
तांत्रिकदृष्ट्या अपात्र
“iconic” cable-stayed Kunkeshwar Bridge
काळबादेवी पूल
2 लेन असलेला 1.8 किमी लांबीचा काळबादेवी पूल रत्नागिरी जिल्ह्यातील काळबादेवी खाडीवर बांधण्यात येणार आहे.
MSRDC चा अंदाज: रु. 291.64 कोटी
कंपनी
बोली
Vijay M Mistry
353.32
Ashoka
367.47
“Iconic” cable-stayed Kalbadevi Bridge
विजय एम मिस्त्री यांची रु. कुणकेश्वर पुलासाठी 187.53 कोटी आणि रु. काळबादेवी पुलासाठी 353.32 कोटी MSRDC च्या अंदाजापेक्षा 18.18% आणि 21.15% जास्त होत आहे. त्यामुळे MSRDC आणि बोली लावणारी कंपनी यांच्यात वाटाघाटी होऊन बोलीच्या दुसऱ्या फेरीत निर्णय घेतला जाणार आहे.
या मार्गावरील निविदांची आतापर्यंतची माहिती
• आगरदांडा क्रीक ब्रिज – HCC सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• धरमतर क्रीक ब्रिज – Afcons इन्फ्रास्ट्रक्चर ही सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• जयगड खाडी पूल – अशोका बिल्डकॉन सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• कुंडलिका ब्रिज – अशोका बिल्डकॉन सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• कुणकेश्वर पूल – विजय एम मिस्त्री बांधकाम कंपनी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• काळबादेवी पूल – विजय एम मिस्त्री बांधकाम कंपनी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• बाणकोट खाडी पूल – बोलीसुरू आहे (निविदा उघडण्याची तारीख: ७ जून)
• दाभोळ खाडी पूल – बोली सुरू आहे ( निविदा उघडण्याची तारीख: ७ जून)
Exit Poll: लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवार दिनांक ०४ जून रोजी हाती येणार आहे. मंगळवारी अंतिम निकाल हाती येणार असला तरी त्याआधी अंदाज वर्तवले जात आहेत. यामधील एक प्रक्रिया म्हणजे एक्झिट पोल. एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात येत असतो. हा एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय आहे ? कशा पद्धतीने तो घेतला जातो ? अशा अनेक गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत.
निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करण्याची अनेक माध्यमं असून त्यातील सर्वात विश्वासार्ह माध्यम म्हणून एक्झिट पोलकडे पाहिलं जातं. कारण एक्झिट पोल तंतोतंत नसला तरी निकालाच्या जवळपास जाणारा असतो.
एक्झिट पोल कधी जाहीर केला जातो ?
एक्झिट पोल हा नेहमी निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर घेतला जातो. भारतात एक्झिट पोल मतदान झाल्यानंतरच दाखवण्यास परवानगी आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर त्यादिवशी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर केला जातो.
कशा पद्धतीने घेतला जातो एक्झिट पोल ?
एक्झिट पोल हा ज्यादिवशी मतदान होते म्हणजे मतदानाच्या दिवशीच घेतला जातो. मतदानाच्या दिवशीच मतदारांकडून माहिती गोळा केली जाते. मतदान करुन आल्यानंतर मतदाराला कुणाला मत दिलं आहे यासंबंधी विचारलं जातं. यावेळी त्या मतदान केंद्रावर किती मतदार आहेत याची माहिती आधीच घेतली गेलेली असते. त्याच्या आधारेच मतदान केंद्रांची निवड करण्यात आलेली असते. मतदान करुन येणार पंधरावा, विसावा माणूस सॅम्पल म्हणून निवडला जातो. यावेळी मतदारांनी दिलेल्या उत्तराच्या आधारे सर्व्हे केला जातो आणि संबंधित मतदारसंघातील निकालाचा अंदाज व्यक्त केला जातो.
एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलमध्ये काय फरक ?
ओपिनियन पोल म्हणजे जनमत चाचणी. ओपिनियन पोल मतदानापुर्वी सादर केला जातो. मतदान होण्यापुर्वी विविध मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांचा कल जाणून घेतला जातो आणि त्यानुसार ओपिनियन पोल तयार केला जातो.
ओपनियन पोलवर कितपत निर्भर राहू शकतो ?
एक्झिट पोल आणि ओपनियन पोलमधील मुख्य फरक म्हणजे एक मतदानाआधी आणि एक मतदानानंतर घेतला गेलेला असतो. ओपनियन पोल मतदानाच्या आधी घेतला गेला असल्याने तो बदलण्याची शक्यता असते. त्याचे अंदाज बदलू शकतात. पण एक्झिट पोल हा मतदान घेतल्यानंतरचा असल्याने त्याच्यावर निर्भर राहू शकतो.
एक्झिट पोलची सुरुवात कधी झाली ?
एक्झिट पोलची सुरुवात कधी झाली यामध्ये मतांतर आहेत. नेदरलँडमधील समाजशास्त्र आणि माजी राजकीय नेते मार्सेल वॉन डॅम यांनी एक्झिट पोलची सुरुवात केली असं म्हटलं जातं. १५ फेब्रुवारी १९६७ रोजी पहिला एक्झिट पोल आला होता.
एक्झिट पोल निकालाचं चित्र स्पष्ट करतात का?
आता प्रश्न उरतो की निकालाचं चित्र हे एक्झिट पोल स्पष्ट करतात की नाही? या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे. बऱ्याचदा एक्झिट पोलचा अंदाज हा निकालाच्या जवळ जाणाराच असतो असं दिसून आलं आहे. मात्र एक्झिट पोल म्हणजे निकाल नाही हे मात्र आपण लक्षात ठेवायला हवं.
सी व्होटर, चाणक्य, इंडिया टुडे-अॅक्सिस, एबीपी-नेल्सन, इंडिया टीव्ही-CNX या आणि अशा अनेक संस्था न्यूज चॅनल्सच्या सोबतीने त्यांचे अंदाज वर्तवतात. या अंदाजामध्ये जनतेचा सहभाग असतो. कारण अंदाज जनतेशी बोलून झाल्यानंतर हा अंदाज बांधण्यात आलेला असतो. त्यामुळेच निकालाचं चित्र स्पष्ट करणारे हे एक्झिट पोल ठरतात. देशात सात आणि महाराष्ट्रात चार टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकालाच्या दिवसापर्यंत विविध जनमत चाचण्या आणि अंदाज घेतले जातात. बऱ्याचदा राजकीय विश्लेषकही काही अंदाज वर्तवत असतात त्यावरूनही एक्झिट पोलचे अंदाज बांधले जातात.
लोकांनी दिलेली माहिती, एक्झिट पोल मांडणाऱ्या संस्थाचं तयार झालेला अंदाज, राजकीय तज्ज्ञ, विश्लेषकांनी वर्तवलेले अंदाज या सगळ्यातून एक्झिट पोल आकाराला येत असतो. त्याचमुळे तो निकालाचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट करणारा ठरतो. सत्ताधारी पक्षाला किती जागा? विरोधी पक्षाला किती जागा? अपक्षांची कामगिरी काय? हे आणि अशा अनेक प्रकारचे अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात येत असतात. त्यामुळे एक्झिट पोल हे निकाल काय लागू शकतो याचा अंदाज वर्तवणारं एक उत्तम माध्यम ठरतं.
Maharashtra Lok Sabha Poll of Exit Poll : 2024 एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळतील?
एक्झिट पोल एजन्सी
महायुती
महाविकास आघडी
इतर
ABP News-CVoter
24
23
1
TV9 पोलस्ट्राट
22
25
1
Republic Bharat-Matrize
30-36
13-19
0
Republic PMARQ
29
19
0
News18 exit poll
32-35
13-16
0
School of Politics
31-35
42705
0
TIMES NOW Survey exit polls
26
24
0
News 24 Chanakya exit polls report
33
15
0
Rudra survey
13
34
1
NDTV India – Jan Ki Baat
34-41
42614
0
Lok Sabha Poll of Exit Poll : 2024 एक्झिट पोलमध्ये देशात कुणाला किती जागा मिळतील?
Mansoon Arrivals 2024: प्रचंड उन्हाच्या कडाक्यामुळे राज्यातील नागरिकांचे हाल होत असून, बहुतांश शहरांतील कमाल तापमान चाळीशीपार नोंदवले जात आहे. मात्र हवामान खात्याने एक दिलासा देणारी बातमी दिली आहे. आता लवकरच मॉन्सून येणार असून, तळकोकणात म्हणजे तो ४ जूनपर्यंत येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
यंदा देशामध्ये १०६ टक्के पाऊस होईल, असा अंदाज देण्यात आला आहे. तसेच मॉन्सून लवकर दाखल होत असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यात प्रचंड उकाडा जाणवत असल्याने नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा येत आहेत. त्यामुळे मॉन्सून दाखल झाल्यानंतर नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. येत्या ४ जून रोजी मॉन्सून तळकोकणात दाखल होईल, असा अंदाज देण्यात आलेला आहे.’रेमल’ या चक्रीवादळाच्यामुळे बंगालच्या उपसागरावरील मॉन्सून सक्रिय झालेला आहे. त्यामुळे मॉन्सूनाला कुठेही अडथळा येणार नाही. मॉन्सूनची केरळच्या पुढील वाटचाल चांगल्यारितीने होणार आहे. मॉन्सूनने यावर्षी अकरा दिवस अगोदरच पूर्वोत्तर राज्यांसह सिक्कीम आणि पश्चिम बंगालपर्यंत मजल मारलेली आहे. मॉन्सूनच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन्ही शाखा रविवारपासून (दि.२) अधिक बळकट होतील. परिणामी मॉन्सूनची वेग चांगला राहील, असा अंदाज देण्यात आला आहे. जून महिना सुरू झाल्याने या महिन्यात जो पाऊस पडेल, तो मॉन्सूनचा समजला जाईल. त्याची नोंद होणार आहे. त्यामुळे जून ते सप्टेंबर दरम्यान जो पाऊस पडेल, त्यात आजपासून होणाऱ्या पावसाचा समावेश होईल. राज्यात काही भागात मॉन्सून पाेचलेला नसला तरी देखील तो पाऊस मॉन्सूनचा समजला जाईल. सध्या पं. बंगालच्या काही भागात आणि केरळच्या पुढे जाण्यासाठी मॉन्सूनला पोषक वातावरण आहे. त्यामुळे गोव्यामध्ये ३ जून रोजी, तळकोकणात ४ जून रोजी तर मुंबई पुण्यात ६ जून रोजी दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोकण रेल्वे प्रवासी संघटनांच्या नवीन गाड्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवून दक्षिणेकडील राज्यांसाठी नवीन गाडी चालविण्याची कोकण रेल्वेची तयारी
Follow us on
Railway Updates: कोकण रेल्वेमार्गावर पनवेल – कोचुवेली साप्ताहिक एक्सप्रेस सुरु करण्यात येणार आहे. कोकण रेल्वेने ही गाडी चालवण्याची संमती दिली असल्याची माहिती आहे. मात्र ही सेवा कधी सुरू होणार हे स्पष्ट नाही असा खुलासा मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे.
सध्या नेत्रावती एक्स्प्रेस ही मुंबईहून केरळला जाणारी एकमेव दैनिक गाडी आहे. कोकण रेल्वे मार्ग सुरु झाल्यावर तीन गाड्यांची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्या गाड्या दैनिक स्वरूपाच्या नसून आठवड्यातून २ दिवस धावणाऱ्या आहेत. मुंबई-कन्याकुमारी डेली ट्रेन जयंती जनता एक्स्प्रेस चे रूपांतर पुणे-कन्याकुमारी झाल्यामुळे, केरळातील मल्याळीं जनतेने मुंबईसाठीची एक दैनंदिन ट्रेन गमावली आहे.
या स्थितीत मुंबई-केरळ दैनिक गाडी सुरू करण्याची मागणी मध्य रेल्वे आणि दक्षिण रेल्वेने गेल्या वेळापत्रक समितीच्या बैठकीत केली होती. या बैठकीत दैनिक ट्रेनचे वेळापत्रक काढण्यात अडचणी येत असल्याने दररोजच्या ऐवजी साप्ताहिक सेवेच्या विनंतीवर विचार करण्याचे कोकण रेल्वेने सुचवले होते. त्यानुसार ही गाडी आठवड्यातून एकदाच धावणार असल्याचे मान्य करण्यात आले आहे.
ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा मुंबईतील इतर ठिकाणाहून सोडावी, अशी शिफारस दक्षिण रेल्वेने केली आहे. तथापि, मध्य रेल्वेने सांगितले की शहरातील सर्व टर्मिनस जास्तीत जास्त क्षमतेने कार्यरत आहेत, त्यामुळे ट्रेन पनवेलहून निघू सोडण्यात येईल. या निर्णयानंतर आता लवकरच पनवेल – कोचुवेली या नवीन साप्ताहिक गाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्यातील प्रवासी संघटनांची नाराजी.
कोकण रेल्वे प्रवासी संघटनांनी वसई- सावंतवाडी, कल्याण – सावंतवाडी अशा गाड्या सोडण्यात याव्यात यासाठी रेल्वे प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन मागण्या केल्या आहेत. मात्र कोकण रेल्वे पूर्ण क्षमतेने चालत असून या मार्गावर नवीन गाडी चालविणे शक्य नाही हे कारण देऊन या मागण्यांना केराची टोपली दाखवली आहे. मात्र आता दक्षिणेकडील राज्यासाठी नवीन गाडी कशी काय मंजूर केली गेली हा प्रश्न विचारला जात आहे.